* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MOTHER-HOOD WITH A SMILE
  • Availability : Available
  • Translators : DR.RATNAVALI DATAR
  • ISBN : 9788177662665
  • Edition : 6
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
  • Available in Combos :MOTHERS DAY COMBO SET-3
    MOTHERS DAY COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERY SINGLE FEMALE HAS AN INNER WISH, SHE WANTS TO BE A MOTHER SOMEDAY. SHE EXPERIENCES THE SHINING SUN AND THE WONDERFUL RAINBOW COLOURS THROUGH HER EARLIER DAYS OF MARRIAGE, THE ROMANTIC MOOD LEADS TO HAPPINESS; SLOWLY THE WISH FOR A FAMILY STARTS MERGING OUT. ONCE A WOMAN GETS PREGNANT, THEN THERE ARE SO MANY THINGS TO CONSIDER. DR. DATAR HERE INTRODUCES US TO THINK ABOUT IT ON PHYSICAL AS WELL AS MENTAL LEVEL. THIS BOOK IS A MUST FOR EVERY NEWLY MARRIED WOMAN. IT GIVES AN IMPORTANT MESSAGE ABOUT ENJOYING MOTHERHOOD AND AT THE SAME TIME TELLS US TO BE A GOOD NATURED, HEALTHY AND WISE MOTHER.
प्रत्येक स्त्रीला आई होण्याची आंतरिक इच्छा असतेच. वैवाहिक जीवनातील सुरुवातीची सप्तरंगांची उधळण संपते आणि आकाशी अनुभवांतून जमिनीवरील सांसारिक जीवनाचा आरंभ होतो. लग्नानंतरची कुणाही स्त्रीची मुख्य ओढ असते, ती ‘मी आई केव्हा होणार?’ याची! एकदा आई व्हायचं निश्चित झालं, की त्याचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनांतून असा सर्वांगीण विचार कसा करायचा, हे डॉ. रत्नावली दातार यांनी तपशिलानं सांगितलं आहे. प्रत्येक नवविवाहित स्त्रीनं वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक ‘सुखद मातृत्व’. ‘आईपण मौजमजेत जगा; सुस्वभावी, सुज्ञ आणि सुदृढ आई व्हा’ हा संदेश देणारं एक महत्त्वाचं पुस्तक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PARVESHHANDA #डॉ.रत्नावलीदातार #DR.RATNAVALIDATAR #सुखदमातृत्व #MOTHER-HOODWITHASMILE #SUKHADMATRUTWA#SUKHAD BALSANGOPAN #सुखद बालसंगोपन
Customer Reviews
  • Rating Starसुप्रिया तापीराम पाटील

    सुखद मातृत्व हे पुस्तक वाचून फार आनंद झाला या पुस्तकात गर्भधारणेपासून ते बाळ संगोपणा पर्यंत खूप छान अशी माहिती दिलेली आहे पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार पोटॅशियमची गोळी कोणी खावी याबाबत मात्र उल्लेख नाही तरी कृपया तो सांगावा

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    जीवनाचे सार्थक करणारा एक विलक्षण अनुभव म्हणून मातृत्वाकडे पहा... `मदरहूड वुइथ ए स्टाइल` या पुस्तकाच्या आधाराने गरोदरपण आणि बाळंतपण याविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन करणारे `सुखद मातृत्व` हे पुस्तक प्रत्येक मातेला आणि विशेषत्वाने ग्रामीण भागातील प्राथमिकआरोग्य केंद्रांमधील मिडवाइफ परिचारिकांना व दायांनाही उपयुक्त ठरेल. जन्माला येणारे प्रत्येक मूल हा एक चमत्कारच असतो, हे तर खरेच आहे; परंतु त्याच बरोबर तो एक परमेश्वराजवळ जाण्याचा ईश्वरी संकेत असतो. प्रत्येक मूल हे ईश्वराचेच रूप असते आणि गरोदरपणात त्या गर्भाची व्यवस्थित काळजी घेणे ही परमेश्वराचीच पूजा आहे, अशा श्रद्धेने डॉ. रत्नावली दातार अपत्यसंभवाकडे पाहतात. परमेश्वराने आपल्याला मानवाचा जन्म दिला आणि मानव हा या सृष्टीतील सर्वात प्रगत, बुद्धिमान आणि प्रयोगशील अशी निर्मिती आहे. या मानवी जन्माचे सार्थक होण्यासाठी ज्या अनेक गोष्टी कर्तव्यभावनेने पार पाडाव्या लागतात त्यापैकीच वंशसातत्य ही देखील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे हे आपापल्या गुणसूत्रांमध्येच अंर्तिनहित असते आणि त्यासाठी योग्य त्या प्रेरणा वा उर्मी विशिष्ट वयात प्रभावी व्हाव्या अशी निसर्गाची योजना असते. आपल्याच रक्तामासांतून, आपल्याच कुशीतून एक नवीन जीव जन्माला घालण्याचा आनंद हा अवर्णनीयच होय. स्त्री-पुरुषाच्या मीलनाने गर्भसंभव होतो; परंतु त्या गर्भाचा भार स्त्रीलाच स्वशरीरात वाहिला लागतो; त्याला गर्भाशयातच परिपुष्ट करून एका सक्षम स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आकार दिला जातो. ही सर्व प्रक्रिया म्हटले तर स्वाभाविक सरळ सहजसाध्य आहे, म्हटले तर जगातली अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ९ महिन्यांच्या काळात गर्भाशयात गर्भाची वाढ निरोगी, निकोप होणे, प्रसूती सुलभपणे होणे, आणि अनंत भावनिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता असणाऱ्या एका व्यक्तित्वाचे या जगात पदार्पण होणे ही सर्व प्रक्रिया घराघरात अनुभवाला येणारी सर्वसामान्य घटना आहे; परंतु ती कधीकधी अत्यंत जीवघेणी आणि गुंतागुंतीचीही होऊ शकते; आणि मातेला तसेच बाळालाही घातक ठरू शकते. बीजाचे रोप, क्षेत्र निकृष्ट असेल तर किंवा त्यात रुजणारे बी कमजोर असेल तर येणारे रोप खुरटलेले असेल. स्त्री-पुरुष निकोप असतील, तर त्यांच्या मीलनातून निर्माण होणारा अंकुरही सुदृढच निपजेल; स्त्री-पुरुष अशक्त, रोगी, कमजोर असतील तर जन्मणारे बालकही अनेक समस्या निर्माण करीत पालकांची तसेच स्वत:चीही फरफट करीत राहील. माता-पित्याकडून मिळणाऱ्या गुणसूत्रांनी जन्माला येणाऱ्या नव्या जीवाचे स्वरूप ठरते. स्त्री-पुरुषांच्या प्रत्येकी २२ जोड्या या सारख्याच असतात. पुरुषाकडून मिळणाऱ्या २३ व्या क्रोमोझोममधील एक्स किंवा वाय या क्रोमोझोमनुसार गर्भाचे लिंग ठरते. वाय क्रोमोझोममुळे गर्भाला पुरुषत्व लाभते. एक्समुळे स्त्रीत्व. नेहमी मुलीच होतात म्हणून स्त्रीला दोष देणे हा प्रकार पूर्वी समाजात सर्रास रूढ होता. नव्या संशोधनाने स्त्रीच्या ऐवजी पुरुषच यासाठी जबाबदार ठरतो. डॉ. रत्नावली दातार यांनी या पुस्तकात प्रथम आई होण्यासाठी प्रत्येक विवाहित स्त्रीची मनोभूमिका पक्की होण्यापासून आरंभ केला आहे. शरीरातील विशिष्ट इंद्रियांची रचना मातृत्व, गर्भसंभव, गर्भसंगोपन वगैरे दृष्टींनी कशी कार्यरत असते याचीही कल्पना दिली आहे. गर्भारपण कसे ओळखावे, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या, गरोदरपणी घ्यावयाची काळजी, गरोदरपणात आढळणारी सर्वसामान्य दुखणी, (ओटीपोटात दुखणे, पांढरा स्त्राव वाहणे, त्वचा ताणली जाणे, रक्तदाब अचानक वाढणे, स्तनांची वाढ होणे, पोटात दुखणे, मळमळणे, उलट्या होणे, छातीत जळजळणे, रक्तातील लोह कमतरता जाणवणे, अपचन, वांब येणे, लघवी अडकणे, गर्भाशयात जास्त पाणी होणे, स्तनांमध्ये दुखणे इ. इ.) यांची कल्पना दिली आहे. स्तनपानाच्या दृष्टीनेही पहिलटकरणीच्या मनात अनेक शंका असतात. स्तनपान हे सर्वात स्वस्त आहे; ते पूर्णत: निर्जंतुक असते. आईचे दूध बालकाला पचायला सोपे असते. त्यात अ‍ॅलर्जीचा धोका नसतो. वरच्या दुधाप्रमाणे जीवाणू-विषाणू बाधा होण्याची शक्यता नसते, बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, स्तनपानामुळे आई व मूल यांच्यामध्ये जवळिकीचे प्रेम-विश्वासाचे नाते दृढ होते. स्तनपानामुळे स्तनांचा देखणेपणा कमी होतो, सौंदर्यात तो उणेपणा आणतो या आक्षेपात तथ्य नाही असे डॉ. दातार आवर्जून सांगतात. अर्थात दूध पाजणाऱ्या मातेने स्तनांची योग्य प्रकारे काळजी घ्यायलाच हवी असेही त्या बजावतात. स्तनाग्रे स्वच्छ व कोरडी ठेवणे, बाळाला पाजायला घेताना कोमट पाण्यात मऊ रुई वा कापड भिजवून स्तनाग्रे पुसून घेणे, दूध खूप गळत असल्यास ब्रेसियर दिवसातून तीन-चार वेळा बदलणे, स्तन दाटू न देणे, स्तनाग्रे दिवसात थोडा वेळ तरी मोकळी हवेवर उघडी राहू देणे, दोन स्तनपानांमध्ये क्रीम वा तेल लावणे, स्तनपान करणाऱ्या स्त्रीने योग्य आहार घेणे, (मद्यपान-धूम्रपान टाळणे, विशिष्ट औषधे टाळणे), इ. टिप्स लक्षात ठेवायला हव्या. गरोदरपणाच्या काळात अनेक प्रकारे सावधगिरी बाळगावी लागते. तीन-तीन महिन्यांचे तीन टप्पे पाडून त्या त्या टप्प्यात काय करावे, काय करू नये, काय खावे-प्यावे, व्यायाम कुठला करावा, याबाबत बहुमोल सूचना दिल्या आहेत. बाळाच्या जन्माच्या आधीचा व नंतरचा काळ हाही अनेक दृष्टींनी कसोटीचा असतो. बाळंतपणासाठी तयारी करताना कितीतरी गोष्टींची जमवाजमव करावी लागते. बाळंतपण ही एक कठीण स्थिती आहे. जी स्त्री प्रसूती कळा सहन करते ती जगातली कोणतीही वेदना सहन करू शकते, असेही म्हटले तर चालेल. बाळंतपणानंतर येणारा लठ्ठपणा टाळण्यासाठी आहार आणि व्यायाम, यांचा योग्य तो वापर करावा लागतो. त्याबाबत स्वतंत्र प्रकरणाद्वारे मार्गदर्शन केले आहे. अनेक आकृत्यांद्वारे व्यायामाचे प्रकार स्पष्ट केले आहेत. ब्रेड, बिस्किट, केक्स, मटण, चिकन, फॅटी फिश, तळलेले पदार्थ, तेलतूप, कोकाकोला, बियर, वाईन वगैरे पदार्थ या काळात खाऊ नयेत. शाकाहारी लोकांनी चौरस आहार घ्यावा. दूध घ्यावे. मांसाहारी लोकांनी रोज एक अंडे आणि नॉन फॅटी तूप याची त्याला जोड द्यावी. गर्भतेजाने स्त्रीचे अंगचे सौंदर्य झळाळून येते. कांती उजळ होते. चेहऱ्यावर हास्य येते. केसांनाही तकाकी येते. समतोल आहार, मानसिक प्रसन्नता, उत्तम वातावरण यामुळे हे तेज अधिक झळाळते. आईपण मौजमजेत जगा, जीवनाचे सार्थक करणारा एक अनुभव म्हणून त्याकडे पाहा. जाणकार मातृत्वाचा आनंद घ्या, असा संदेश देणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-10-2000

    सुखद मातृत्वासाठी उपयुक्त पुस्तक... जगातील सर्व नात्यांमध्ये आईचे व तिच्या अपत्याचे–बाळाचे–नाते सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. कारण ते अपूर्व त्यागाचे, प्रेमाचे, वात्सल्याचे असे एक पवित्र नाते आहे. आई बाळाला जन्माला घालण्यापासून त्याच्याजवळ असते, त्याच सर्व प्रकारची काळजी घेते. म्हणून बाळाची गर्भात चाहूल लागताच ती त्याच्यात हरखून जाते. त्याच्या आगमनाची योग्यप्रकारे तयारी करण्यासाठी ती सज्ज होते. यासाठी सर्व मातांना ‘सुखद मातृत्व’ हे डॉ. रत्नावली दातार यांचे पुस्तक उपयोगाचे ठरेल; परंतु अनुवाद करताना त्यांनी नवीन माहिती व संदर्भ घालून एक पुस्तक तयार केले आहे. डॉ. रत्नावली दातार यांनी ‘सुखद मातृत्व’ या पुस्तकामध्ये स्त्रियांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन ते अमलात आणण्यासाठी स्वत:ची शारीरिक व मानसिक तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. समाजात दोन स्वतंत्र भाग जाणवतात. एक शहरी भाग व दुसरा ग्रामीण भाग. शहरी स्त्रिया स्वतंत्रपणे विचार करू शकतात. विशेषत: स्वत:बद्दल! आपण लग्न, कसे, केव्हा व कोणाशी करायचे याबद्दल त्यांची स्वत:ची अशी खास मते असतात. त्यामुळे लग्नानंतर होणारी गर्भधारणा केव्हा होऊ द्यायची, त्याचे नियोजन मग बालसंगोपन वगैरे गोष्टींचे शास्त्र त्या अवगत करून घेतात. स्वत:चा व्यक्ती-विकास घडवताना सर्व कुटुंबाचेही शिस्तबद्ध नियमन, नियोजन व विकास कसा करायचा, याचे शास्त्रीय ज्ञान त्या मिळवतात! आपण स्वत: व आपले कुटुंब शारीरिक व मानसिक पातळीवर सुदृढ राखतात. परंतु ग्रामीण भाग मात्र बराचसा मागासलेला आहे. ग्रामीण भागातील अस्वच्छता, आरोग्याबाबतचे अज्ञान आणि बेपर्वाई यामुळे तेथे भयावह स्थिती आहे. या ग्रामीण भागातील स्त्रियांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी, तसेच आरोग्य केंद्रातील मिडवाईफ नर्सेसना, तसेच दाईचे काम करणाऱ्या स्त्रियांना या पुस्तकाचा उपयोग व्हावा, यासाठी ‘आई’ होण्याच्या निर्णयापासून ते बाळंतपणानंतरच्या व्यायामापर्यंत सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. ‘होय, आता मला आई व्हायचंय!’ या पहिल्या प्रकरणात त्यांनी आई होण्यासाठी योग्य वय, शारीरिक सुडौलता व सुयोग्यता तसेच वजनाचे महत्त्व सांगितले आहे. वैद्यकीय तपासणी, गर्भधारणेचे नियोजन व आखणी कशी करावी, स्त्रियांची पोटातील इंद्रिये चित्रासहित समजावून सांगितली आहेत. ‘मी, आई होणार हे नक्की ठरले.’ या दुसऱ्या प्रकरणात स्त्रीचे जनन अवयव तसेच संतती प्रतिबंधक उपाय कसे, कोणते करावे, त्याबद्दल कोणती काळजी घ्यावी हे सुचविले आहे. प्रसूतीचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. ‘गर्भारपणात आढळणारी सर्वसामान्य दुखणी म्हणजे रक्तदाब, मूळव्याध, त्वचेवरील परिणाम, योनी मार्गातून पांढरा स्राव वाहणे, ओटीपोटात दुखणे इत्यादी. तसेच बाळंतरोग, अपचन, मळमळणे, बद्धकोष्ठता इत्यादींबद्दल सविस्तर लिहून त्याचवेळी कोणती काळजी घ्यावी हे सुचविले आहे.’ ‘स्तनपानाची तयारी’ या प्रकरणात प्रसूतीनंतर कोणते कपडे वापरावे, स्तनांच्या समस्या व स्तनपानाचे फायदे स्वत: आईसाठी व बाळासाठी सांगितले आहेत. सर्वसामान्य स्त्रियांच्या मनातले पुढच्या प्रकरणात मांडले आहेत. त्यामुळे स्त्रिया नि:शंक मनाने बाळंतपणास सामोऱ्या जाऊ शकतात. डॉ. दातार यांनी गर्भारपणाच्या कालावधीचे एकूण तीन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा पहिल्या तीन महिन्यांचा, दुसरा टप्पा त्याच्या पुढील तीन महिन्यांचा व शेवटचा टप्पा शेवटच्या तीन महिन्यांचा. या प्रत्येक टप्प्यांमध्ये गर्भार स्त्रीने काय करावे, कोणती काळजी घ्यावी यासंदर्भातल्या सूचना आहेत. गर्भाची वाढ कशी होते, या दिवसातील आहार कसा असावा. बसताना कसे बसावे याबद्दल माहिती दिलेली आहे. बाळाच्या जन्माच्या आधीचा काळ व जन्मदात्यानंतरचा काळ यांत कोणती तयारी करावी हे सांगितले आहे. बाळंतपणानंतर बऱ्याच स्त्रिया लठ्ठ होतात. पूर्वीचा शारीरिक डौल राहत नाही. त्यामुळे पुन्हा तसेच सुंदर दिसण्यासाठी, शरीराची कमनीयता जपण्यासाठी कोणते व्यायाम करावे, ते कशा प्रकारे करावे या प्रत्येक आसनाची चित्रासहित माहिती दिलेली आहे. गर्भार स्त्रीच्या लहानसहान शंकांपासून ते बाळंतपणासाठीची शस्त्रक्रियापर्यंतची अनेक दृष्टिकोनातून सविस्तर माहिती डॉ. रत्नावली दातार यांनी वाचकांना दिलेली आहे. नवीन बाळाच्या स्वागतासाठी व जगातल्या सर्वश्रेष्ठ प्रेमाचे प्रतीक म्हणजे आई होण्यासाठी, ‘आईपण मौजमजेत जगा. सुस्वभावी, सुज्ञ आणि बांधेसूद आई व्हा!’ अशा शुभेच्छा या पुस्तकात दिलेल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more