* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: MOTHER-HOOD WITH A SMILE
  • Availability : Available
  • Translators : DR.RATNAVALI DATAR
  • ISBN : 9788177662665
  • Edition : 6
  • Publishing Year : AUGUST 2000
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 100
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HEALTHCARE & PSYCHOLOGY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
EVERY SINGLE FEMALE HAS AN INNER WISH, SHE WANTS TO BE A MOTHER SOMEDAY. SHE EXPERIENCES THE SHINING SUN AND THE WONDERFUL RAINBOW COLOURS THROUGH HER EARLIER DAYS OF MARRIAGE, THE ROMANTIC MOOD LEADS TO HAPPINESS; SLOWLY THE WISH FOR A FAMILY STARTS MERGING OUT. ONCE A WOMAN GETS PREGNANT, THEN THERE ARE SO MANY THINGS TO CONSIDER. DR. DATAR HERE INTRODUCES US TO THINK ABOUT IT ON PHYSICAL AS WELL AS MENTAL LEVEL. THIS BOOK IS A MUST FOR EVERY NEWLY MARRIED WOMAN. IT GIVES AN IMPORTANT MESSAGE ABOUT ENJOYING MOTHERHOOD AND AT THE SAME TIME TELLS US TO BE A GOOD NATURED, HEALTHY AND WISE MOTHER.
प्रत्येक स्त्रीला आई होण्याची आंतरिक इच्छा असतेच. वैवाहिक जीवनातील सुरुवातीची सप्तरंगांची उधळण संपते आणि आकाशी अनुभवांतून जमिनीवरील सांसारिक जीवनाचा आरंभ होतो. लग्नानंतरची कुणाही स्त्रीची मुख्य ओढ असते, ती ‘मी आई केव्हा होणार?’ याची! एकदा आई व्हायचं निश्चित झालं, की त्याचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनांतून असा सर्वांगीण विचार कसा करायचा, हे डॉ. रत्नावली दातार यांनी तपशिलानं सांगितलं आहे. प्रत्येक नवविवाहित स्त्रीनं वाचलंच पाहिजे, असं हे पुस्तक ‘सुखद मातृत्व’. ‘आईपण मौजमजेत जगा; सुस्वभावी, सुज्ञ आणि सुदृढ आई व्हा’ हा संदेश देणारं एक महत्त्वाचं पुस्तक.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLIN EMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #PARVESHHANDA #डॉ.रत्नावलीदातार #DR.RATNAVALIDATAR #सुखदमातृत्व #MOTHER-HOODWITHASMILE #SUKHADMATRUTWA#SUKHAD BALSANGOPAN #सुखद बालसंगोपन
Customer Reviews
  • Rating Starसुप्रिया तापीराम पाटील

    सुखद मातृत्व हे पुस्तक वाचून फार आनंद झाला या पुस्तकात गर्भधारणेपासून ते बाळ संगोपणा पर्यंत खूप छान अशी माहिती दिलेली आहे पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार पोटॅशियमची गोळी कोणी खावी याबाबत मात्र उल्लेख नाही तरी कृपया तो सांगावा

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    जीवनाचे सार्थक करणारा एक विलक्षण अनुभव म्हणून मातृत्वाकडे पहा... `मदरहूड वुइथ ए स्टाइल` या पुस्तकाच्या आधाराने गरोदरपण आणि बाळंतपण याविषयी महत्त्वाचे मार्गदर्शन करणारे `सुखद मातृत्व` हे पुस्तक प्रत्येक मातेला आणि विशेषत्वाने ग्रामीण भागातील प्राथमिकआरोग्य केंद्रांमधील मिडवाइफ परिचारिकांना व दायांनाही उपयुक्त ठरेल. जन्माला येणारे प्रत्येक मूल हा एक चमत्कारच असतो, हे तर खरेच आहे; परंतु त्याच बरोबर तो एक परमेश्वराजवळ जाण्याचा ईश्वरी संकेत असतो. प्रत्येक मूल हे ईश्वराचेच रूप असते आणि गरोदरपणात त्या गर्भाची व्यवस्थित काळजी घेणे ही परमेश्वराचीच पूजा आहे, अशा श्रद्धेने डॉ. रत्नावली दातार अपत्यसंभवाकडे पाहतात. परमेश्वराने आपल्याला मानवाचा जन्म दिला आणि मानव हा या सृष्टीतील सर्वात प्रगत, बुद्धिमान आणि प्रयोगशील अशी निर्मिती आहे. या मानवी जन्माचे सार्थक होण्यासाठी ज्या अनेक गोष्टी कर्तव्यभावनेने पार पाडाव्या लागतात त्यापैकीच वंशसातत्य ही देखील एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे हे आपापल्या गुणसूत्रांमध्येच अंर्तिनहित असते आणि त्यासाठी योग्य त्या प्रेरणा वा उर्मी विशिष्ट वयात प्रभावी व्हाव्या अशी निसर्गाची योजना असते. आपल्याच रक्तामासांतून, आपल्याच कुशीतून एक नवीन जीव जन्माला घालण्याचा आनंद हा अवर्णनीयच होय. स्त्री-पुरुषाच्या मीलनाने गर्भसंभव होतो; परंतु त्या गर्भाचा भार स्त्रीलाच स्वशरीरात वाहिला लागतो; त्याला गर्भाशयातच परिपुष्ट करून एका सक्षम स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा आकार दिला जातो. ही सर्व प्रक्रिया म्हटले तर स्वाभाविक सरळ सहजसाध्य आहे, म्हटले तर जगातली अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ९ महिन्यांच्या काळात गर्भाशयात गर्भाची वाढ निरोगी, निकोप होणे, प्रसूती सुलभपणे होणे, आणि अनंत भावनिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता असणाऱ्या एका व्यक्तित्वाचे या जगात पदार्पण होणे ही सर्व प्रक्रिया घराघरात अनुभवाला येणारी सर्वसामान्य घटना आहे; परंतु ती कधीकधी अत्यंत जीवघेणी आणि गुंतागुंतीचीही होऊ शकते; आणि मातेला तसेच बाळालाही घातक ठरू शकते. बीजाचे रोप, क्षेत्र निकृष्ट असेल तर किंवा त्यात रुजणारे बी कमजोर असेल तर येणारे रोप खुरटलेले असेल. स्त्री-पुरुष निकोप असतील, तर त्यांच्या मीलनातून निर्माण होणारा अंकुरही सुदृढच निपजेल; स्त्री-पुरुष अशक्त, रोगी, कमजोर असतील तर जन्मणारे बालकही अनेक समस्या निर्माण करीत पालकांची तसेच स्वत:चीही फरफट करीत राहील. माता-पित्याकडून मिळणाऱ्या गुणसूत्रांनी जन्माला येणाऱ्या नव्या जीवाचे स्वरूप ठरते. स्त्री-पुरुषांच्या प्रत्येकी २२ जोड्या या सारख्याच असतात. पुरुषाकडून मिळणाऱ्या २३ व्या क्रोमोझोममधील एक्स किंवा वाय या क्रोमोझोमनुसार गर्भाचे लिंग ठरते. वाय क्रोमोझोममुळे गर्भाला पुरुषत्व लाभते. एक्समुळे स्त्रीत्व. नेहमी मुलीच होतात म्हणून स्त्रीला दोष देणे हा प्रकार पूर्वी समाजात सर्रास रूढ होता. नव्या संशोधनाने स्त्रीच्या ऐवजी पुरुषच यासाठी जबाबदार ठरतो. डॉ. रत्नावली दातार यांनी या पुस्तकात प्रथम आई होण्यासाठी प्रत्येक विवाहित स्त्रीची मनोभूमिका पक्की होण्यापासून आरंभ केला आहे. शरीरातील विशिष्ट इंद्रियांची रचना मातृत्व, गर्भसंभव, गर्भसंगोपन वगैरे दृष्टींनी कशी कार्यरत असते याचीही कल्पना दिली आहे. गर्भारपण कसे ओळखावे, त्यासाठी कराव्या लागणाऱ्या चाचण्या, गरोदरपणी घ्यावयाची काळजी, गरोदरपणात आढळणारी सर्वसामान्य दुखणी, (ओटीपोटात दुखणे, पांढरा स्त्राव वाहणे, त्वचा ताणली जाणे, रक्तदाब अचानक वाढणे, स्तनांची वाढ होणे, पोटात दुखणे, मळमळणे, उलट्या होणे, छातीत जळजळणे, रक्तातील लोह कमतरता जाणवणे, अपचन, वांब येणे, लघवी अडकणे, गर्भाशयात जास्त पाणी होणे, स्तनांमध्ये दुखणे इ. इ.) यांची कल्पना दिली आहे. स्तनपानाच्या दृष्टीनेही पहिलटकरणीच्या मनात अनेक शंका असतात. स्तनपान हे सर्वात स्वस्त आहे; ते पूर्णत: निर्जंतुक असते. आईचे दूध बालकाला पचायला सोपे असते. त्यात अ‍ॅलर्जीचा धोका नसतो. वरच्या दुधाप्रमाणे जीवाणू-विषाणू बाधा होण्याची शक्यता नसते, बाळाची प्रतिकारशक्ती वाढते, स्तनपानामुळे आई व मूल यांच्यामध्ये जवळिकीचे प्रेम-विश्वासाचे नाते दृढ होते. स्तनपानामुळे स्तनांचा देखणेपणा कमी होतो, सौंदर्यात तो उणेपणा आणतो या आक्षेपात तथ्य नाही असे डॉ. दातार आवर्जून सांगतात. अर्थात दूध पाजणाऱ्या मातेने स्तनांची योग्य प्रकारे काळजी घ्यायलाच हवी असेही त्या बजावतात. स्तनाग्रे स्वच्छ व कोरडी ठेवणे, बाळाला पाजायला घेताना कोमट पाण्यात मऊ रुई वा कापड भिजवून स्तनाग्रे पुसून घेणे, दूध खूप गळत असल्यास ब्रेसियर दिवसातून तीन-चार वेळा बदलणे, स्तन दाटू न देणे, स्तनाग्रे दिवसात थोडा वेळ तरी मोकळी हवेवर उघडी राहू देणे, दोन स्तनपानांमध्ये क्रीम वा तेल लावणे, स्तनपान करणाऱ्या स्त्रीने योग्य आहार घेणे, (मद्यपान-धूम्रपान टाळणे, विशिष्ट औषधे टाळणे), इ. टिप्स लक्षात ठेवायला हव्या. गरोदरपणाच्या काळात अनेक प्रकारे सावधगिरी बाळगावी लागते. तीन-तीन महिन्यांचे तीन टप्पे पाडून त्या त्या टप्प्यात काय करावे, काय करू नये, काय खावे-प्यावे, व्यायाम कुठला करावा, याबाबत बहुमोल सूचना दिल्या आहेत. बाळाच्या जन्माच्या आधीचा व नंतरचा काळ हाही अनेक दृष्टींनी कसोटीचा असतो. बाळंतपणासाठी तयारी करताना कितीतरी गोष्टींची जमवाजमव करावी लागते. बाळंतपण ही एक कठीण स्थिती आहे. जी स्त्री प्रसूती कळा सहन करते ती जगातली कोणतीही वेदना सहन करू शकते, असेही म्हटले तर चालेल. बाळंतपणानंतर येणारा लठ्ठपणा टाळण्यासाठी आहार आणि व्यायाम, यांचा योग्य तो वापर करावा लागतो. त्याबाबत स्वतंत्र प्रकरणाद्वारे मार्गदर्शन केले आहे. अनेक आकृत्यांद्वारे व्यायामाचे प्रकार स्पष्ट केले आहेत. ब्रेड, बिस्किट, केक्स, मटण, चिकन, फॅटी फिश, तळलेले पदार्थ, तेलतूप, कोकाकोला, बियर, वाईन वगैरे पदार्थ या काळात खाऊ नयेत. शाकाहारी लोकांनी चौरस आहार घ्यावा. दूध घ्यावे. मांसाहारी लोकांनी रोज एक अंडे आणि नॉन फॅटी तूप याची त्याला जोड द्यावी. गर्भतेजाने स्त्रीचे अंगचे सौंदर्य झळाळून येते. कांती उजळ होते. चेहऱ्यावर हास्य येते. केसांनाही तकाकी येते. समतोल आहार, मानसिक प्रसन्नता, उत्तम वातावरण यामुळे हे तेज अधिक झळाळते. आईपण मौजमजेत जगा, जीवनाचे सार्थक करणारा एक अनुभव म्हणून त्याकडे पाहा. जाणकार मातृत्वाचा आनंद घ्या, असा संदेश देणारे हे पुस्तक आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-10-2000

    सुखद मातृत्वासाठी उपयुक्त पुस्तक... जगातील सर्व नात्यांमध्ये आईचे व तिच्या अपत्याचे–बाळाचे–नाते सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. कारण ते अपूर्व त्यागाचे, प्रेमाचे, वात्सल्याचे असे एक पवित्र नाते आहे. आई बाळाला जन्माला घालण्यापासून त्याच्याजवळ असते, त्याच सर्व प्रकारची काळजी घेते. म्हणून बाळाची गर्भात चाहूल लागताच ती त्याच्यात हरखून जाते. त्याच्या आगमनाची योग्यप्रकारे तयारी करण्यासाठी ती सज्ज होते. यासाठी सर्व मातांना ‘सुखद मातृत्व’ हे डॉ. रत्नावली दातार यांचे पुस्तक उपयोगाचे ठरेल; परंतु अनुवाद करताना त्यांनी नवीन माहिती व संदर्भ घालून एक पुस्तक तयार केले आहे. डॉ. रत्नावली दातार यांनी ‘सुखद मातृत्व’ या पुस्तकामध्ये स्त्रियांनी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊन ते अमलात आणण्यासाठी स्वत:ची शारीरिक व मानसिक तयारी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. समाजात दोन स्वतंत्र भाग जाणवतात. एक शहरी भाग व दुसरा ग्रामीण भाग. शहरी स्त्रिया स्वतंत्रपणे विचार करू शकतात. विशेषत: स्वत:बद्दल! आपण लग्न, कसे, केव्हा व कोणाशी करायचे याबद्दल त्यांची स्वत:ची अशी खास मते असतात. त्यामुळे लग्नानंतर होणारी गर्भधारणा केव्हा होऊ द्यायची, त्याचे नियोजन मग बालसंगोपन वगैरे गोष्टींचे शास्त्र त्या अवगत करून घेतात. स्वत:चा व्यक्ती-विकास घडवताना सर्व कुटुंबाचेही शिस्तबद्ध नियमन, नियोजन व विकास कसा करायचा, याचे शास्त्रीय ज्ञान त्या मिळवतात! आपण स्वत: व आपले कुटुंब शारीरिक व मानसिक पातळीवर सुदृढ राखतात. परंतु ग्रामीण भाग मात्र बराचसा मागासलेला आहे. ग्रामीण भागातील अस्वच्छता, आरोग्याबाबतचे अज्ञान आणि बेपर्वाई यामुळे तेथे भयावह स्थिती आहे. या ग्रामीण भागातील स्त्रियांना जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी, तसेच आरोग्य केंद्रातील मिडवाईफ नर्सेसना, तसेच दाईचे काम करणाऱ्या स्त्रियांना या पुस्तकाचा उपयोग व्हावा, यासाठी ‘आई’ होण्याच्या निर्णयापासून ते बाळंतपणानंतरच्या व्यायामापर्यंत सविस्तर माहिती या पुस्तकात दिलेली आहे. ‘होय, आता मला आई व्हायचंय!’ या पहिल्या प्रकरणात त्यांनी आई होण्यासाठी योग्य वय, शारीरिक सुडौलता व सुयोग्यता तसेच वजनाचे महत्त्व सांगितले आहे. वैद्यकीय तपासणी, गर्भधारणेचे नियोजन व आखणी कशी करावी, स्त्रियांची पोटातील इंद्रिये चित्रासहित समजावून सांगितली आहेत. ‘मी, आई होणार हे नक्की ठरले.’ या दुसऱ्या प्रकरणात स्त्रीचे जनन अवयव तसेच संतती प्रतिबंधक उपाय कसे, कोणते करावे, त्याबद्दल कोणती काळजी घ्यावी हे सुचविले आहे. प्रसूतीचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. ‘गर्भारपणात आढळणारी सर्वसामान्य दुखणी म्हणजे रक्तदाब, मूळव्याध, त्वचेवरील परिणाम, योनी मार्गातून पांढरा स्राव वाहणे, ओटीपोटात दुखणे इत्यादी. तसेच बाळंतरोग, अपचन, मळमळणे, बद्धकोष्ठता इत्यादींबद्दल सविस्तर लिहून त्याचवेळी कोणती काळजी घ्यावी हे सुचविले आहे.’ ‘स्तनपानाची तयारी’ या प्रकरणात प्रसूतीनंतर कोणते कपडे वापरावे, स्तनांच्या समस्या व स्तनपानाचे फायदे स्वत: आईसाठी व बाळासाठी सांगितले आहेत. सर्वसामान्य स्त्रियांच्या मनातले पुढच्या प्रकरणात मांडले आहेत. त्यामुळे स्त्रिया नि:शंक मनाने बाळंतपणास सामोऱ्या जाऊ शकतात. डॉ. दातार यांनी गर्भारपणाच्या कालावधीचे एकूण तीन टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा पहिल्या तीन महिन्यांचा, दुसरा टप्पा त्याच्या पुढील तीन महिन्यांचा व शेवटचा टप्पा शेवटच्या तीन महिन्यांचा. या प्रत्येक टप्प्यांमध्ये गर्भार स्त्रीने काय करावे, कोणती काळजी घ्यावी यासंदर्भातल्या सूचना आहेत. गर्भाची वाढ कशी होते, या दिवसातील आहार कसा असावा. बसताना कसे बसावे याबद्दल माहिती दिलेली आहे. बाळाच्या जन्माच्या आधीचा काळ व जन्मदात्यानंतरचा काळ यांत कोणती तयारी करावी हे सांगितले आहे. बाळंतपणानंतर बऱ्याच स्त्रिया लठ्ठ होतात. पूर्वीचा शारीरिक डौल राहत नाही. त्यामुळे पुन्हा तसेच सुंदर दिसण्यासाठी, शरीराची कमनीयता जपण्यासाठी कोणते व्यायाम करावे, ते कशा प्रकारे करावे या प्रत्येक आसनाची चित्रासहित माहिती दिलेली आहे. गर्भार स्त्रीच्या लहानसहान शंकांपासून ते बाळंतपणासाठीची शस्त्रक्रियापर्यंतची अनेक दृष्टिकोनातून सविस्तर माहिती डॉ. रत्नावली दातार यांनी वाचकांना दिलेली आहे. नवीन बाळाच्या स्वागतासाठी व जगातल्या सर्वश्रेष्ठ प्रेमाचे प्रतीक म्हणजे आई होण्यासाठी, ‘आईपण मौजमजेत जगा. सुस्वभावी, सुज्ञ आणि बांधेसूद आई व्हा!’ अशा शुभेच्छा या पुस्तकात दिलेल्या आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more