ERNEST HEMINGWAY

About Author

Birth Date : 21/07/1899
Death Date : 02/07/1961


ERNEST HEMINGWAY, THE GREATEST AMERICAN NOVELIST OF THE 20TH CENTURY, WAS BORN IN OAK PARK, ILLINOIS, USA. AT THE AGE OF EIGHTEEN, HE STARTED WORKING AS A REPORTER IN THE NEWSPAPER KANSAS CITY STAR. IN 1925, HIS FIRST IMPORTANT BOOK IN OUR TIME, BASED ON HIS CHILDHOOD EXPERIENCES IN MICHIGAN, WAS PUBLISHED.

विसाव्या शतकातील श्रेष्ठ अमेरिकन कथा-कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांचा जन्म अमेरिकेतील इलिनॉय राज्यातील ओक पार्क येथे झाला. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी ‘कान्सास सिटी स्टार’ या वृत्तपत्रात वार्ताहर म्हणून कामास सुरुवात केली. १९२५ साली त्यांचे मिशिगनमधील बालपणीच्या अनुभवांवर आधारित पहिले महत्त्वाचे पुस्तक ‘इन अवर टाइम’ प्रकाशित झाले. १९२६ साली ‘द सन ऑल्सो राइझेस’ आणि १९२९ साली ‘अ फेअरवेल टू आम्र्स’ नावाच्या पहिल्या महायुद्धावर आधारीत कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. यात पहिल्या महायुद्धाच्या विध्वसंक अनुभवाने हताश झालेल्या तरूण पिढीचे चित्रण हेमिंग्वे यांनी केले आहे. १९३७ साली प्रकाशित ‘टू हॅव अँड हॅव नॉट’ ही कादंबरी आर्थिक मंदीच्या पाश्र्वभूमीची, ‘फॉर हूम द बेल टोल्स’ (१९४०) ही स्पॅनिश यादवी युद्धावर आधारीत महाकाव्यसदृश कादंबरी, ‘अ‍ॅक्रॉस द रिव्हर अँड इन्टू द ट्रीज’ (१९५०) ही दुसऱ्या महायुद्धानंतर एका प्रेमसंबंधांवर आधारीत कादंबरी, अशा विविध विषयांवर हेमिंग्वे यांनी विपुल लिखाण केले. हेमिंग्वे यांची ‘द ओल्ड मॅन अँड द सी’ ही सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली जाते. त्यांनी सुमारे ५० कथा लिहिल्या असून त्यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. १९५४ साली अर्नेस्ट हेमिंग्वे यांना साहित्यातील सर्वाधिक मानाचे नोबेल पारितोषिक मिळाले.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GHANGHANTO GHANTANAD Rating Star
Add To Cart INR 550

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more