* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BESHARAM
  • Availability : Available
  • Translators : MANJIRI DHAMANKAR
  • ISBN : 9789353175511
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2021
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 252
  • Language : Translated From BENGALI to MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :TASLIMA NASREEN COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MY NAME IS SURANJAN. YOU DONT RECOGNIZE ME? YOU WROTE A NOVEL ABOUT ME. IT WAS CALLED LAJJA. ONE DAY IN CALCUTTA, TASLIMA SUDDENLY FINDS HERSELF FACE TO FACE WITH SURANJAN, THE PRINCIPAL CHARACTER FROM HER CONTROVERSIAL NOVEL LAJJA. PERSECUTED IN THEIR NATIVE BANGLADESH, SURANJAN AND HIS FAMILY HAVE, LIKE TASLIMA, MOVED TO THE CITY ACROSS THE BORDER. BUT IS LIFE FOR A HINDU FAMILY FROM AN ISLAMIC NATION ANY BETTER IN A COUNTRY WHERE A MAJORITY OF THE POPULATION HAPPENS TO BE HINDU? LEADING POOR, UNMOORED LIVES, EXPLOITED AND FRUSTRATED AT EVERY STEP OF THE WAY, AND ALWAYS CARRYING WITH THEM THE MEMORIES OF A SCARRED COMMUNAL HISTORY, SURANJAN AND SO MANY OTHERS LIKE HIM SEEM TO LEAD INCOMPLETE LIVES IN THEIR SO-CALLED SAFE HAVEN. SHAMELESS, THE EXPLOSIVE SEQUEL TO LAJJA, IS AN UNCOMPROMISING, HEART-BREAKING LOOK AT ORDINARY PEOPLES LIVES IN OUR TROUBLED TIMES.
तसलिमा नासरिन यांची ही कादंबरी स्थलांतरितांच्या जीवनाची चित्तरकथा आहेण् आपली जन्मभूमि सोडून परक्या मुलखातए जगभरच्या कानाकोपऱ्यातए वेगवेगळ्या वातावरणात स्वतःला रूजवू पाहणाऱ्यांची ही गोष्ट आहेण् अर्थात तसलिमा यांनी स्वतः हे आयुष्य जवळून अनुभवलेले आहेण् म्हणूनच स्वतः तसलिमा यांचं जगणंही यात प्रतिबिंबित होत राहतंण् त्यांच्या ष्लज्जाष् कादंबरीमुळे त्यांना कट्टरपंथी लोकांनी देश सोडायला लावलाण् लज्जामध्ये अनुभवाला येणाऱ्या प्रसंगांचीच पुढील आवृत्ती या कादंबरीत पाहायला मिळतेण् तसलिमा यांनी मोठा काळ देशाबाहेर व्यतित केला आहेण् आपली मूळे उखडली जाण्याची ही वेदना या कादंबरीत प्रकर्षाने येतेण् कादंबरीची सुरुवातच एका भेटीने होतेण् लज्जा कादंबरीतील पात्र असणारा सुरंजन लेखिकेला अचानक भेटायला येतोण् हा तोच सुरंजन असतोए जो लज्जा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहेण् लेखिका या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे की सुरंजन आणि त्याचे कुटुंब बांगलादेशातील 1993मधील सांप्रदायिक दंगलीवेळी स्वतःचा बचाव करत भारतात येण्यात यशस्वी झाले होतेण् या भेटीत लेखिकेला कळतं की सुरंजनचे वडील सुधामय यांचे निधन झाले आहेए तर त्याची आई आणि बहीण जिवंत आहेतण् या भेटीत सुरंजनच्या स्थलांतराचे गोष्ट समोर येतेण् या दोघांच्या संवादातून एकेक धागा उलगडत जातोण् याच धर्तीवर लेखिकेला एकेक पात्र भेटत जातेण् आणि त्यांच्या कथा समोर येत जातातण् हे पुस्तक कट्टरपंथीयांची बेशरमी वृत्ती अधोरेखित करत त्या विरोधात आवाज उठवण्याच्या संभावनांची चाचपणी करतंण् पण हे पुस्तक राजकीय नाहीए तर सामाजिक स्तरावरील स्थितीबाबत अधिक निवेदन करतंण् लेखिका अर्थात तसलिमा यांना सुरंजनए किरणमयीए माया आणि जुलेखा ही चार पात्र भेटतातण् आणि या पात्रांसोबतचा संवाद कादंबरी प्रवाहित करतोण्
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#BESHARAM #TASLIMANASREEN #LAJJA #BENGALIBOOKS #MANJIRIDHAMANKAR #MARATHIBOOKS #ONLINEBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #TRANSLATEDBOOK #बेशरम #तसलीमानसरीन #लज्जा #बंगालीपुस्तके # मंजिरीधामणकर #मराठीपुस्तके #अनुवादितपुस्तके #ऑनलाईनपुस्तके #मेहतापब्लिशिंगहाऊस
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS
FRANKLIN MALIKA COMBO SET - 29 BOOKS by PAULETTE BOURGEOIS Rating Star
रश्मी मुसळे-साळगांवकर

लहानग्यांच्या विश्वातल्या छोट्या छोट्या गमतीजमती या पुस्तकांच्या मालिकेतून अगदी मजेशीर पद्धतीने मुलांसमोर येतात..त्या गोष्टी ऐकताना, वाचताना मूलं यात अगदी रमून जातात... शिवाय आजवर ससा आणि कासव यांव्यतिरिक्त इतर कथाविश्वात काहीसा दुर्लक्षित राहिलेलया कासवाच्या जगातही अनेक गंमती घडू शकतात ही नवखी कल्पना मुलांना भारीच आवडते... ...Read more

MARATHI DAULATICHE NARI SHILP
MARATHI DAULATICHE NARI SHILP by GOPAL DESHMUKH Rating Star
लोकसत्ता २२ जानेवारी २०२३.

बाईचे विश्व हे चूल आणि मूल एवढय़ापुरतेच मर्यादित नसते याची उदाहरणे आपल्याला इतिहासातसुद्धा पाहायला मिळतात. इतिहासात डोकावून पाहिले तर स्त्रियांचे आयुष्य हजार बंधनांनी जखडलेले होते. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात असत. सतीची चाल, विधवांना केशपनाची सक्ती, सती जाणाऱ्या स्त्रियांच्या मरणाइतकेच सती न जाणाऱ्या विधवांचे जगणे भयंकर होते. अशा समाजातच काही स्त्रिया अशासुद्धा होऊन गेल्या ज्यांनी आपल्या कार्याने, आपल्या धाडसाने, शौर्याने महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भर टाकली. समाजाचा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच काही निवडक स्त्रियांचे चरित्र रेखाटन गोपाळ देशमुख यांनी ‘मराठी दौलतीचे नारी शिल्प’ या पुस्तकात केले आहे. जिजाऊमातेने बालशिवाजींची जडणघडण केली. अशा कर्तृत्ववान जिजाबाईंचे व्यक्तिचरित्र ‘राजमाता जिजाऊ’ या प्रकरणामध्ये सारांशरूपाने रेखाटण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनात ज्या आठ राण्या आल्या त्यांच्या जीवनकार्याचे वर्णन ‘राणीवसा’ या प्रकरणात येते. ‘महाराणी येसूबाई’ या प्रकरणात त्यांची स्वराज्यनिष्ठा व दूरदृष्टी कशी दिसून येते याचे वर्णन केले आहे. संकटसमयी संभाजी राजांना दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांच्या कार्यात मदत कशी झाली याचेही वर्णन आले आहे. ताराबाई, उमाबाई दाभाडे, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी युद्धभूमीवर शत्रूला तोंड कसे दिले. दर्याबाई निंबाळकर, पेशवा पत्नी गोपिकाबाई, रमाबाई, गंगाबाई यांनाही व्यक्तिगत सुखदु:खाबरोबरच मराठी दौलतीच्या वाटचालीत आपली भूमिका कशी पार पाडावी लागली याचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे. दौलतीचा कारभार करताना अहिल्याबाईंना तीस वर्षे वैयक्तिक दु:खांना सामोरे जावे लागले. या साऱ्या दु:खांना बाजूला सारून उत्कृष्ट कार्य करून त्या ‘साध्वी पुण्यश्लोक अहिल्या’ कशा झाल्या याचा थोडक्यात आढावा घेतला आहे ‘अहिल्याबाई होळकर’ या प्रकरणात. तसेच पुतळाबाई आणि रमाबाई यांचे पतिनिष्ठेचे वर्णनही वाचायला मिळते. या सर्व व्यक्तिचरित्रांपैकी ‘राणी लक्ष्मीबाई’ यांचे चरित्र वाचताना त्यांची धाडसी वृत्ती, चिकाटी, येईल त्या प्रसंगाला न घाबरता शौर्याने सामोरे जाण्याची वृत्ती व शेवटी त्यांचा झालेला शोकात्मक शेवट आपल्या मनाला चटका लावून गेल्याशिवाय राहात नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर आपल्या मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर शोक करत न बसता ही वीरांगना आपला दत्तक मुलगा दामोदर याला घेऊन ब्रिटिशांच्या कटू कारस्थानांना तोंड देण्यास सज्ज झाली होती. यातच तिला वीरमरण आले. हे वीरमरण येतानासुद्धा ती मोठय़ा शौर्याने अखेरच्या क्षणापर्यंत लढली आणि जेव्हा आपला देह आपल्याला साथ देत नाही हे लक्षात आले तेव्हा तिने आपल्या अनुयायांना आपला देह शत्रूच्या हातात पडता कामा नये, त्याला अग्नी द्या, असे सांगितले. अशा या वीरांगनेची गर्जना ‘मै मेरी झांसी नही दूंगी’ ही आजही अनेक स्त्रियांना आपल्या कामात प्रेरणा देणारी अशी आहे. राणी लक्ष्मीबाईच्या मरणाविषयी अनेक हकीकती उपलब्ध आहेत. त्यांचा उल्लेखही या पुस्तकात आला आहे. या पुस्तकातील स्त्रिया इतिहासकालीन असल्याने काही ठिकाणी ऐतिहासिक संदर्भाची पुनरावृत्ती झाल्यासारखे वाटते; पण ते येणेसुद्धा गरजेचे आहे. साध्या सोप्या भाषेत ही स्त्री चरित्रे आपल्याला वाचायला मिळतात. थोडक्यात असे म्हणता येईल की, इतिहासकाळातील थोर महिला विभूतींच्या जीवनकार्याचा अल्पांशाने सार वाचकांपुढे मांडण्याचा प्रयत्न लेखक गोपाळ देशमुख यांनी केला आहे, तो कौतुकास्पद आहे. ...Read more