* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE CAN HEAR THE `SA` UP TO THE DEPTHS OF OUR LARYNX, THE `RE` UP TO THE DEPTH OF OUR HEART, `GA` UP TO THE DEPTHS OF OUR BELLY, BUT WE CANNOT HEAR IT ONCE IT REACHES THE DEPTHS OF OUR WOMB. THEN THE HEAVENLY VOICE CHANGES INTO A FAIRY. IF A CELESTIAL DIVINE FALLS ON THE EARTH, ALL OF A SUDDEN, THEN HIS SORROW KNOWS NO BOUNDS. HE TRIES TO GIVE AWAY AS MUCH AS HE CAN, HE EVEN INTENDS TO SHARE THE MOST THAT HE CAN, BUT NEITHER WE HUMANS NOR THE DIVINE BEINGS REALIZE THAT HUMANS ARE NOT CAPABLE OF HOLDING THE CELESTIAL THINGS.
कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पारावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते, पण आम्हा माणसांना–माणसांनाच कशाला - माणसातल्या गंधर्वानाही तरी ही कुठं कळतं!ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामथ्र्य आमच्यात कुठलं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GANDHARVI #GANDHARVI #गांधर्वी #FICTION #MARATHI #BANIBASU "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 29-10-2006

    गांधर्वी प्रकृती आणि मानवी मनातील संघर्ष... ‘गांधर्वी’ ही प्रसिद्ध बंगाली लेखिका बाणी बसू यांची कादंबरी आहे. डॉ. मृणालिनी गडकरी यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. डॉ. मृणालिनी गडकरी हे अनुवादित साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण असे नाव आहे. ‘ांधर्वी’ ही अभिजात संगीताची पार्श्वभूमी लाभलेली कादंबरी आहे. सुस्वर कंठ लाभलेल्या अपालाची ही कहाणी आहे. गाणं हाच तिचा श्वास होता. तिच्या जगण्याचा ध्यास होता. तिच्या रक्तातूनच गाण्याचा प्रवाह अविरतपणे वाहत होता. अपाला सोशिक, समजूतदार तितकीच जिद्दी होती. वडिलांच्या निधनामुळे पोरकी झालेली, काकांच्या दबावाखाली राहणारी, आईची अगतिकता समजून घेणारी, रामेश्वर ठाकूरांकडे मन लावून गाणे शिकणारी, सोहम दिपाली, मितूल यांच्याशी जिवाभावाची मैत्री करणारी, सासरच्या सर्वच लोकांना त्यांच्या स्वभावात दोषासह स्वीकारणारी, मुलांवर अपार प्रेम करणारी अशी ही अपाला सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व लाभलेली होती. तिच्यामध्ये आत्मविश्वास, जिद्द, महत्त्वाकांक्षा होती; पण तिच्यातील अहंकार कधीच टोकाला पोहोचलेला नव्हता. इतरांसाठी आपली ओंजळ रिती करणाऱ्या अपालाला काय मिळाले होते? संसार आणि संगीत या दोन्ही डगरींवर तोल सांभाळताना या कलावंत स्त्रीची घुसमट झाली होती. सासरच्या गाण्याबाबतच्या अज्ञानाला आणि उदासीनतेला मागे टाकून ती गात होती. म्युझिक कॉन्फरन्सला जात होती. चित्रपटांतून गात होती. घरातल्यांचे रोष पत्करून ती हे करत होती. तिच्या मनातली दु:खं तिच्या सुरातून बाहेर येत होती. सुरांच्या चढ-उतारातून, तालांच्या माध्यमातून तिची मनोव्यथा प्रगट होत होती. तिची सुखदु:खं, आनंद, संताप, अधीरता, अगतिकता या सगळ्या भावना गाण्यातून व्यक्त होत होत्या. एकीकडे गाणं होतं. ज्यात ती हरवली होती आणि दुसरीकडे भोवतालच्या माणसांचे पाश होते. ज्यांच्यात गुंतणं तिला क्लेषकारक होत होते. तिच्या आयुष्यात तिची गांधर्वी प्रकृती आणि मानवी मन यांच्यात इतका मर्मभेदक संघर्ष सुरू होतो, की त्याचा शेवट तिचा आवाज संपण्यात झाला. ती मूक झाली; पण तिच्यातला कलावंत मूक राहिला नाही. तो चित्रातून मुखर झाला. आवाज गेल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस तिने असंख्य चित्रे काढली. तिच्या हृदयातले गाणे तिने चित्रांच्या साह्याने कागदावर उतरवले. एका कलावंताची त्याच्या कलेशी असणाऱ्या बांधिलकीचे दर्शन या कादंबरीतून प्रत्ययाला येते. कलावंताचे मन आणि त्याच्या आजूबाजूचे वास्तव याचे वस्तुनिष्ठ चित्रण लेखिकेने या कादंबरीत केलेले आहे. त्यांच्या व्यक्तीचित्रणात, वातावरणनिर्मितीत, विषयाच्या मांडणीत सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता दिसून येते. ही उत्तम बंगाली कलाकृती अतिशय कौशल्याने मराठीत आणण्याचे श्रेय डॉ. मृणालिनी गडकरी यांच्याकडे जाते. -डॉ. जोत्स्ना आफळे ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-02-2007

    तरल सौंदर्यानुभव... ‘कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पाावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते. पण आम्हा माणसांना - माणसांनाच कशाला - माणसातल्या गंधर्वांनाही तरी कुठे कळतं! ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामर्थ्य आमच्यात कुठलं! हे सारं आहे गांधर्वीचं! एक अशी कादंबरी, जी संगीताच्या प्रदेशात घेऊन जाते. तेथील रागदारीने मनावर अजब मोहिनीचे जाळं पसरते. त्या अनवरत सुरात, एक प्रकारच्या बेहोषीत धुंद व्हायला होतं आणि हेच सूर या वास्तवाशी फारकत घेऊन दिव्य अद्भूतांचा साक्षात्कार घडवितात. ही कथा आहे अपालाची. कोलकत्याची अपाला एक सच्ची कलावंत. भिडस्त, पापभीरू, शांत, संयत, दिसायला फारच साधी, परंतु तिच्या बाह्य वर्णनाश आपण थबकतच नाही. देवदत्त किन्नर कंठ लाभलेल्या अपालात आपण इतकं गुंतून जातो की तिच्या साऱ्या घुसमटीला हे समाजवास्तवच जबाबदार आहे. हेच विसरतो. शापित गंधर्वकन्येसारखी अपालाची कहाणी. अलौकिक सूरांचा गळा लाभूनही लग्नानंतर तिचे गाणे येणाऱ्या-जाणाऱ्यांना रिझवण्यासाठी वा क्लास काढून. थोड्याशा रियाझावर जगण्यासाठी बंदिस्त होतं... अपालाची कुचंबणा सोहम व मितूलच्या प्रसिद्धी प्रवासाने ठसठशीत होते... विशेष क्षमता नसलेली मितूल ‘मितश्री ठाकूर’ म्हणून लोकांच्या गळ्यातील ताईत बनते. मानसिक असंतुलनाच्या धक्क्यातून केवळ अपालामुळे सुरांच्या सान्निध्यात परतलेला सोहम देश परदेशात मैफिली गाजवतो. प्रेम वा लग्नासाठी व्याकुळणारी दिपाली अपालामुळेच परदेशात लग्न करून राहू शकते. अपालाच्या पैशांमुळेच मध्यमवर्गीय दत्तगुप्तांचं घर सुस्थितीत येतं... वास्तवात ती एक परिस वाटू लागते. तिच्या आवाजाची किंमत कुणी पैशात मोजतं.. मात्र अपाला! तिच्या पदरात नियतीने दु:खाचाच प्याला का द्यावा? गाणं हाच तिचा श्वास, तोच तिचा सहवास. त्याच्याशी तडजोड नको, म्हणत लखनौला नाजनीन बेगमकडे जाण्याची संधी मिळताक्षणी आनंदणारी... आणि नाजनीन बेगमचा उल्लेख ‘तवायफ’ असा झाल्याक्षणी हादरणारी... अपालाच्या गुरूंची मुलगी मितूल, जिला अपालातील या अद्भूत आवाजाचे मार्केटिंग केले की काय धमाल उडू शकेल. याचं प्रोफेशनल भान आहे. ती अपालाला निर्व्याज हेतूतून पैसा मिळवून देते. प्रसिद्धीची कवाडं खुली करून देते. गाणं हा या दोघींचाही धर्म, फक्त काळानुरुप बदललेलं त्याचं रूप मितश्री पकडून ठेवते. वेगवान कथानक, रहस्यमय घटनांची विखुरलेली बीजे, काळजावर कोरले जावे असे कैक प्रसंग, संगीताच्या परिभाषेचा नितांत सुंदर वापर. अभिजात संगीतावर मन:पूत प्रेम करणाऱ्या गुरुंचा, गुरु-शिष्यांचा स्वरसोहळा वाचकाला स्तिमित करतो. वाचका का? कशामुळे? च्या फेऱ्यात घुसमटतो. पुन्हा त्याची सुटकाही होते. ‘गांधर्वी’ अनेक प्रश्न निर्माण करते. मात्र नातेसंबंधाची विविध रूपे सामोरी आणण्यात ही कादंबरी यशस्वी ठरते. निकोप-विशुद्ध मैत्री, मुलगी आणि आई यांच्यातील नात्यातूनच लिहिला गेलेला उपसंहार. त्यात मुलीचे आलेले ‘कन्फेशन’ हे इतकं सच्चं, अस्सल की या अडीचशे पृष्ठांमध्ये आपल्या सामान्यतत्वाची प्रत्यही जाणीव व्हावी... परिसस्पर्श करणाऱ्याच्या सान्निध्यात असूनही आपण कोरडे ठणठणीत व निब्बर राहतो याची खंत झाल्यावाचून राहात नाही. बाणी बसू या सिद्धहस्त लेखिकेच्या लेखणीतून उतरलेली, मूळ बंगाली कादंबरी ‘गांधर्वी’चा हा मराठी अनुवाद आहे. हा अनुवाद न वाटता विलक्षण प्रत्ययकारी रितीने तो मृणालिनी गडकरींनी वाचकांसमोर ठेवला. बंगाली वातावरण, कुटुंबपद्धती, चालीरिती, परंपरा, गाणं व संगीताबद्दल येणारे उल्लेख कादंबरीची उंची वाढवितात. तरल असा हा सौंदर्यानुभव आहे. यात संघर्ष आहे. छंदासाठी आयुष्य कवटाळण्याची धडपड आहे. व्यक्तिचित्रणातले वैविध्य, ते संस्मरणीय करण्यासाठी येणारे निवेदन, वापरलेले संवाद सारेच केवळ अनुभवण्यासारखे आहे. कलावंतातील माणूसपण व त्याला छेद देणारे सामाजिक वास्तव यांच्या संघर्षासाठी तसेच अपालाच्या अघटित जीवनकहाणीतल्या रोमांचक प्रवासासाठी ही कादंबरी वाचायलाच हवी. हे सारे अचूकपणे चंद्रमोहन कुलकर्णीनी मुखपृष्ठातून व्यक्त केले आहे. -वृन्दा भार्गवे ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 10-12-2006

    अभिजात संगीताचे तोषविणारे हृदय दर्शन… ‘गांधर्वी’ कादंबरीमध्ये जीवनाचे अधिष्ठानच संगीत असलेले अभिजात संगीताची जणू प्रत्यक्ष मैफलींना उपस्थित असल्याचा गहिरा आनंद वाचकांना गहिवरून टाकतो. मूळ बंगाली लेखिका बाणी बसू यांच्या मानवी मनाचा गुंता, कौटुंबिक अनबंध – स्तरांची वैशिष्ट्ये, संगीत, नृत्य, चित्रकला इ. कला, स्त्रीची मानसिकता इ. चा सखोल, सर्वंकष अभ्यासाची जाणीव ‘गांधर्वी’मध्ये होते. व्यक्तिचित्रण, वातावरण निर्मिती, विषय मांडणी, सामाजिक पार्श्वभूमी, स्वभाव भिन्नता, नियतीची खेळी इ. मधील सखोलता, सूक्ष्मता, तरलता, सहजता लेखिकेची खासियात ठरते. अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी पारदर्शकतेने बाणी बसू यांच्या प्रतिभासंपन्नतेचे, अभिजात अभिरुचीचे आणि संवेदनशीलतेचे सतेज दर्शन अनुवादाद्वारा घडविले आहे. मानवी स्वभावाच्या कंगोऱ्याचे, विविधतेचे, वास्तविकतेचे व संघर्षाचे मनोज्ञ दर्शन घडविताना समाजातील, कुटुंबातील कलानिपुण स्त्रीची तडफड, तळमळ, घुसमट अतिशय नेटकेपणाने, कोणत्याही कृत्रिम, अलंकारिक अतिशयोक्ती. इ. शैलीचा आधार न घेता भडकपणाच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठतेची कास लेखिकेने धरली आहे. अपाला, सोहेम, दीपाली, प्रशांत, विद्युत, मिताली, रामेश्वर ठाकूर, शिवनाथ इ. व्यक्तिरेखांमध्ये वाचक पूर्ण गुंततो. कलकत्ता, भारत, परदेश इ. कलावंताचे स्वत:ला असोशीने व्यक्त होणे, स्पर्धांतील राजकारण, योगायोग, स्वभावभिन्नतीचे परिणाम, कादंबरीची वाचनीयता वर्धित करतात. कलानैपुण्यप्राप्तीसाठी कलादर्शनासाठी, यशसिद्धीसाठी झोकून देणारे कलावंत, त्यांचे अपार कष्ट धडपड, प्रगल्भता, अपयश, अपमान ढासळणे... सगळेच अप्रतिम वाटते. माणसांतील गंधर्व, नृत्यनिपुन अप्सरा, तापसी गुरू ‘गांधर्वी’मध्ये भेटून थक्क करतात. स्वत:ची खास वैशिष्ट्ये, ढब, वकूब, आस, दृष्टिकोन, वृत्ती सावधपणे जपणारी, दुसऱ्यांमध्ये स्वत:चे अस्तित्व विरघळून टाकणारी पात्रे आपआपल्या पिढीचे ठसे गडद करतात, पात्रांच्या प्रीती, शृंगार, वासना, भावनिक गुंतवणूक, मनोभंग, प्रेमभंग, रक्तातून टाकणारी वंचना, वात्सल्य इ. भावनांचे आविष्कार वाचकाला कथानकाशी खिळवून ठेवतात. कादंबरीच्या पृष्ठापृष्ठांवर वाचकांना गुंतवणून टाकणारी जाळी जणू लेखिकेने लावली आहेत. स्वत:जवळचे जेवढे काही देता येण्यासारखे आहे ते देऊन टाकण्याचा लेखिकेचा प्रयत्न आवाक् करतो. मृणालिनी गडकरी त्या दातृत्वाचे दान अनुवादक म्हणून देत राहतात. शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला, चित्रपट दिग्दर्शन इ. च्या क्षेत्रांमध्ये नसणाऱ्या वाचकांनाही मैफली, प्रयोग इ. ची सुगम वर्णने रसमयतेमुळे आकलनक्षम वाटतात. मनहारी तोषविणारी ठरतात. ईश्वरी देणगीमुळे मधुर स्वरकंठ, प्रगल्भ आकलनशक्ती, अनोखी ताकद लाभलेल्या अपालाचे गाणे हाच धर्म-सर्वस्व-प्रकृती-संस्कृती-प्रेम, श्वासोच्छ्वास! स्वर्गीय आवाजाच्या अपालाला कोणत्या वणव्यातून कोणाच्या प्रेरणा-संरक्षण-साथ, आधारामुळे वाटचाल करावी लागली? समस्यांच्या निबीड अरण्यांमध्ये समस्यांशी मुकाबला करताना कोणते शिखर तिने गाठले? वाचकांना विलक्षण अविस्मरणीय, अतुलनीत अनुभूती लेखिकेच्या आविष्कार, आशय, अभिव्यक्तीद्वारा लाभते. तन-मन-चेतापेशींना संपूर्णतेने कवेत घेणारा चित्रपटच पाहात असल्याचा ‘गांधर्वी’ वाचनाने प्रत्यय येतो. मेहता पब्लिशिंगच्या खानदानामध्ये शोभावेच असे बाह्यांग/अंतरंग लेखक लाभलेली ‘गांधर्वी’ संग्राह्य वाटते! -प्रा. अनुराधा गुरव ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more