* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GANDHARVI
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666991
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WE CAN HEAR THE `SA` UP TO THE DEPTHS OF OUR LARYNX, THE `RE` UP TO THE DEPTH OF OUR HEART, `GA` UP TO THE DEPTHS OF OUR BELLY, BUT WE CANNOT HEAR IT ONCE IT REACHES THE DEPTHS OF OUR WOMB. THEN THE HEAVENLY VOICE CHANGES INTO A FAIRY. IF A CELESTIAL DIVINE FALLS ON THE EARTH, ALL OF A SUDDEN, THEN HIS SORROW KNOWS NO BOUNDS. HE TRIES TO GIVE AWAY AS MUCH AS HE CAN, HE EVEN INTENDS TO SHARE THE MOST THAT HE CAN, BUT NEITHER WE HUMANS NOR THE DIVINE BEINGS REALIZE THAT HUMANS ARE NOT CAPABLE OF HOLDING THE CELESTIAL THINGS.
कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पारावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते, पण आम्हा माणसांना–माणसांनाच कशाला - माणसातल्या गंधर्वानाही तरी ही कुठं कळतं!ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामथ्र्य आमच्यात कुठलं!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #GANDHARVI #GANDHARVI #गांधर्वी #FICTION #MARATHI #BANIBASU "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL 29-10-2006

    गांधर्वी प्रकृती आणि मानवी मनातील संघर्ष... ‘गांधर्वी’ ही प्रसिद्ध बंगाली लेखिका बाणी बसू यांची कादंबरी आहे. डॉ. मृणालिनी गडकरी यांनी त्याचा मराठीत अनुवाद केलेला आहे. डॉ. मृणालिनी गडकरी हे अनुवादित साहित्य क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण असे नाव आहे. ‘ांधर्वी’ ही अभिजात संगीताची पार्श्वभूमी लाभलेली कादंबरी आहे. सुस्वर कंठ लाभलेल्या अपालाची ही कहाणी आहे. गाणं हाच तिचा श्वास होता. तिच्या जगण्याचा ध्यास होता. तिच्या रक्तातूनच गाण्याचा प्रवाह अविरतपणे वाहत होता. अपाला सोशिक, समजूतदार तितकीच जिद्दी होती. वडिलांच्या निधनामुळे पोरकी झालेली, काकांच्या दबावाखाली राहणारी, आईची अगतिकता समजून घेणारी, रामेश्वर ठाकूरांकडे मन लावून गाणे शिकणारी, सोहम दिपाली, मितूल यांच्याशी जिवाभावाची मैत्री करणारी, सासरच्या सर्वच लोकांना त्यांच्या स्वभावात दोषासह स्वीकारणारी, मुलांवर अपार प्रेम करणारी अशी ही अपाला सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व लाभलेली होती. तिच्यामध्ये आत्मविश्वास, जिद्द, महत्त्वाकांक्षा होती; पण तिच्यातील अहंकार कधीच टोकाला पोहोचलेला नव्हता. इतरांसाठी आपली ओंजळ रिती करणाऱ्या अपालाला काय मिळाले होते? संसार आणि संगीत या दोन्ही डगरींवर तोल सांभाळताना या कलावंत स्त्रीची घुसमट झाली होती. सासरच्या गाण्याबाबतच्या अज्ञानाला आणि उदासीनतेला मागे टाकून ती गात होती. म्युझिक कॉन्फरन्सला जात होती. चित्रपटांतून गात होती. घरातल्यांचे रोष पत्करून ती हे करत होती. तिच्या मनातली दु:खं तिच्या सुरातून बाहेर येत होती. सुरांच्या चढ-उतारातून, तालांच्या माध्यमातून तिची मनोव्यथा प्रगट होत होती. तिची सुखदु:खं, आनंद, संताप, अधीरता, अगतिकता या सगळ्या भावना गाण्यातून व्यक्त होत होत्या. एकीकडे गाणं होतं. ज्यात ती हरवली होती आणि दुसरीकडे भोवतालच्या माणसांचे पाश होते. ज्यांच्यात गुंतणं तिला क्लेषकारक होत होते. तिच्या आयुष्यात तिची गांधर्वी प्रकृती आणि मानवी मन यांच्यात इतका मर्मभेदक संघर्ष सुरू होतो, की त्याचा शेवट तिचा आवाज संपण्यात झाला. ती मूक झाली; पण तिच्यातला कलावंत मूक राहिला नाही. तो चित्रातून मुखर झाला. आवाज गेल्यानंतर आयुष्याच्या अखेरीस तिने असंख्य चित्रे काढली. तिच्या हृदयातले गाणे तिने चित्रांच्या साह्याने कागदावर उतरवले. एका कलावंताची त्याच्या कलेशी असणाऱ्या बांधिलकीचे दर्शन या कादंबरीतून प्रत्ययाला येते. कलावंताचे मन आणि त्याच्या आजूबाजूचे वास्तव याचे वस्तुनिष्ठ चित्रण लेखिकेने या कादंबरीत केलेले आहे. त्यांच्या व्यक्तीचित्रणात, वातावरणनिर्मितीत, विषयाच्या मांडणीत सखोलता, सूक्ष्मता आणि तरलता दिसून येते. ही उत्तम बंगाली कलाकृती अतिशय कौशल्याने मराठीत आणण्याचे श्रेय डॉ. मृणालिनी गडकरी यांच्याकडे जाते. -डॉ. जोत्स्ना आफळे ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 25-02-2007

    तरल सौंदर्यानुभव... ‘कंठात वैखरी, हृदयात मध्यमा, स्वाधिष्ठानात पश्यंती. त्यापुढे गभीरात गेल्यावर ती वाणी माणसाला ऐकू येत नाही. ती मग होते परा. सूरलोकांच्या मार्गावरून चालता चालता एखादा अन्यमनस्क देवगंधर्व मत्र्यलोकात येऊन पडला तर त्याच्या दु:खाला पाावार राहत नाही. त्याला जेवढं देता येईल तेवढं तो देऊन जातो. त्याला आणखीही द्यायची इच्छा असते. पण आम्हा माणसांना - माणसांनाच कशाला - माणसातल्या गंधर्वांनाही तरी कुठे कळतं! ईश्वरी वस्तू धरून ठेवण्याचं सामर्थ्य आमच्यात कुठलं! हे सारं आहे गांधर्वीचं! एक अशी कादंबरी, जी संगीताच्या प्रदेशात घेऊन जाते. तेथील रागदारीने मनावर अजब मोहिनीचे जाळं पसरते. त्या अनवरत सुरात, एक प्रकारच्या बेहोषीत धुंद व्हायला होतं आणि हेच सूर या वास्तवाशी फारकत घेऊन दिव्य अद्भूतांचा साक्षात्कार घडवितात. ही कथा आहे अपालाची. कोलकत्याची अपाला एक सच्ची कलावंत. भिडस्त, पापभीरू, शांत, संयत, दिसायला फारच साधी, परंतु तिच्या बाह्य वर्णनाश आपण थबकतच नाही. देवदत्त किन्नर कंठ लाभलेल्या अपालात आपण इतकं गुंतून जातो की तिच्या साऱ्या घुसमटीला हे समाजवास्तवच जबाबदार आहे. हेच विसरतो. शापित गंधर्वकन्येसारखी अपालाची कहाणी. अलौकिक सूरांचा गळा लाभूनही लग्नानंतर तिचे गाणे येणाऱ्या-जाणाऱ्यांना रिझवण्यासाठी वा क्लास काढून. थोड्याशा रियाझावर जगण्यासाठी बंदिस्त होतं... अपालाची कुचंबणा सोहम व मितूलच्या प्रसिद्धी प्रवासाने ठसठशीत होते... विशेष क्षमता नसलेली मितूल ‘मितश्री ठाकूर’ म्हणून लोकांच्या गळ्यातील ताईत बनते. मानसिक असंतुलनाच्या धक्क्यातून केवळ अपालामुळे सुरांच्या सान्निध्यात परतलेला सोहम देश परदेशात मैफिली गाजवतो. प्रेम वा लग्नासाठी व्याकुळणारी दिपाली अपालामुळेच परदेशात लग्न करून राहू शकते. अपालाच्या पैशांमुळेच मध्यमवर्गीय दत्तगुप्तांचं घर सुस्थितीत येतं... वास्तवात ती एक परिस वाटू लागते. तिच्या आवाजाची किंमत कुणी पैशात मोजतं.. मात्र अपाला! तिच्या पदरात नियतीने दु:खाचाच प्याला का द्यावा? गाणं हाच तिचा श्वास, तोच तिचा सहवास. त्याच्याशी तडजोड नको, म्हणत लखनौला नाजनीन बेगमकडे जाण्याची संधी मिळताक्षणी आनंदणारी... आणि नाजनीन बेगमचा उल्लेख ‘तवायफ’ असा झाल्याक्षणी हादरणारी... अपालाच्या गुरूंची मुलगी मितूल, जिला अपालातील या अद्भूत आवाजाचे मार्केटिंग केले की काय धमाल उडू शकेल. याचं प्रोफेशनल भान आहे. ती अपालाला निर्व्याज हेतूतून पैसा मिळवून देते. प्रसिद्धीची कवाडं खुली करून देते. गाणं हा या दोघींचाही धर्म, फक्त काळानुरुप बदललेलं त्याचं रूप मितश्री पकडून ठेवते. वेगवान कथानक, रहस्यमय घटनांची विखुरलेली बीजे, काळजावर कोरले जावे असे कैक प्रसंग, संगीताच्या परिभाषेचा नितांत सुंदर वापर. अभिजात संगीतावर मन:पूत प्रेम करणाऱ्या गुरुंचा, गुरु-शिष्यांचा स्वरसोहळा वाचकाला स्तिमित करतो. वाचका का? कशामुळे? च्या फेऱ्यात घुसमटतो. पुन्हा त्याची सुटकाही होते. ‘गांधर्वी’ अनेक प्रश्न निर्माण करते. मात्र नातेसंबंधाची विविध रूपे सामोरी आणण्यात ही कादंबरी यशस्वी ठरते. निकोप-विशुद्ध मैत्री, मुलगी आणि आई यांच्यातील नात्यातूनच लिहिला गेलेला उपसंहार. त्यात मुलीचे आलेले ‘कन्फेशन’ हे इतकं सच्चं, अस्सल की या अडीचशे पृष्ठांमध्ये आपल्या सामान्यतत्वाची प्रत्यही जाणीव व्हावी... परिसस्पर्श करणाऱ्याच्या सान्निध्यात असूनही आपण कोरडे ठणठणीत व निब्बर राहतो याची खंत झाल्यावाचून राहात नाही. बाणी बसू या सिद्धहस्त लेखिकेच्या लेखणीतून उतरलेली, मूळ बंगाली कादंबरी ‘गांधर्वी’चा हा मराठी अनुवाद आहे. हा अनुवाद न वाटता विलक्षण प्रत्ययकारी रितीने तो मृणालिनी गडकरींनी वाचकांसमोर ठेवला. बंगाली वातावरण, कुटुंबपद्धती, चालीरिती, परंपरा, गाणं व संगीताबद्दल येणारे उल्लेख कादंबरीची उंची वाढवितात. तरल असा हा सौंदर्यानुभव आहे. यात संघर्ष आहे. छंदासाठी आयुष्य कवटाळण्याची धडपड आहे. व्यक्तिचित्रणातले वैविध्य, ते संस्मरणीय करण्यासाठी येणारे निवेदन, वापरलेले संवाद सारेच केवळ अनुभवण्यासारखे आहे. कलावंतातील माणूसपण व त्याला छेद देणारे सामाजिक वास्तव यांच्या संघर्षासाठी तसेच अपालाच्या अघटित जीवनकहाणीतल्या रोमांचक प्रवासासाठी ही कादंबरी वाचायलाच हवी. हे सारे अचूकपणे चंद्रमोहन कुलकर्णीनी मुखपृष्ठातून व्यक्त केले आहे. -वृन्दा भार्गवे ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 10-12-2006

    अभिजात संगीताचे तोषविणारे हृदय दर्शन… ‘गांधर्वी’ कादंबरीमध्ये जीवनाचे अधिष्ठानच संगीत असलेले अभिजात संगीताची जणू प्रत्यक्ष मैफलींना उपस्थित असल्याचा गहिरा आनंद वाचकांना गहिवरून टाकतो. मूळ बंगाली लेखिका बाणी बसू यांच्या मानवी मनाचा गुंता, कौटुंबिक अनबंध – स्तरांची वैशिष्ट्ये, संगीत, नृत्य, चित्रकला इ. कला, स्त्रीची मानसिकता इ. चा सखोल, सर्वंकष अभ्यासाची जाणीव ‘गांधर्वी’मध्ये होते. व्यक्तिचित्रण, वातावरण निर्मिती, विषय मांडणी, सामाजिक पार्श्वभूमी, स्वभाव भिन्नता, नियतीची खेळी इ. मधील सखोलता, सूक्ष्मता, तरलता, सहजता लेखिकेची खासियात ठरते. अनुवादक मृणालिनी गडकरी यांनी पारदर्शकतेने बाणी बसू यांच्या प्रतिभासंपन्नतेचे, अभिजात अभिरुचीचे आणि संवेदनशीलतेचे सतेज दर्शन अनुवादाद्वारा घडविले आहे. मानवी स्वभावाच्या कंगोऱ्याचे, विविधतेचे, वास्तविकतेचे व संघर्षाचे मनोज्ञ दर्शन घडविताना समाजातील, कुटुंबातील कलानिपुण स्त्रीची तडफड, तळमळ, घुसमट अतिशय नेटकेपणाने, कोणत्याही कृत्रिम, अलंकारिक अतिशयोक्ती. इ. शैलीचा आधार न घेता भडकपणाच्या आहारी न जाता वस्तुनिष्ठतेची कास लेखिकेने धरली आहे. अपाला, सोहेम, दीपाली, प्रशांत, विद्युत, मिताली, रामेश्वर ठाकूर, शिवनाथ इ. व्यक्तिरेखांमध्ये वाचक पूर्ण गुंततो. कलकत्ता, भारत, परदेश इ. कलावंताचे स्वत:ला असोशीने व्यक्त होणे, स्पर्धांतील राजकारण, योगायोग, स्वभावभिन्नतीचे परिणाम, कादंबरीची वाचनीयता वर्धित करतात. कलानैपुण्यप्राप्तीसाठी कलादर्शनासाठी, यशसिद्धीसाठी झोकून देणारे कलावंत, त्यांचे अपार कष्ट धडपड, प्रगल्भता, अपयश, अपमान ढासळणे... सगळेच अप्रतिम वाटते. माणसांतील गंधर्व, नृत्यनिपुन अप्सरा, तापसी गुरू ‘गांधर्वी’मध्ये भेटून थक्क करतात. स्वत:ची खास वैशिष्ट्ये, ढब, वकूब, आस, दृष्टिकोन, वृत्ती सावधपणे जपणारी, दुसऱ्यांमध्ये स्वत:चे अस्तित्व विरघळून टाकणारी पात्रे आपआपल्या पिढीचे ठसे गडद करतात, पात्रांच्या प्रीती, शृंगार, वासना, भावनिक गुंतवणूक, मनोभंग, प्रेमभंग, रक्तातून टाकणारी वंचना, वात्सल्य इ. भावनांचे आविष्कार वाचकाला कथानकाशी खिळवून ठेवतात. कादंबरीच्या पृष्ठापृष्ठांवर वाचकांना गुंतवणून टाकणारी जाळी जणू लेखिकेने लावली आहेत. स्वत:जवळचे जेवढे काही देता येण्यासारखे आहे ते देऊन टाकण्याचा लेखिकेचा प्रयत्न आवाक् करतो. मृणालिनी गडकरी त्या दातृत्वाचे दान अनुवादक म्हणून देत राहतात. शास्त्रीय संगीत, नृत्य, चित्रकला, चित्रपट दिग्दर्शन इ. च्या क्षेत्रांमध्ये नसणाऱ्या वाचकांनाही मैफली, प्रयोग इ. ची सुगम वर्णने रसमयतेमुळे आकलनक्षम वाटतात. मनहारी तोषविणारी ठरतात. ईश्वरी देणगीमुळे मधुर स्वरकंठ, प्रगल्भ आकलनशक्ती, अनोखी ताकद लाभलेल्या अपालाचे गाणे हाच धर्म-सर्वस्व-प्रकृती-संस्कृती-प्रेम, श्वासोच्छ्वास! स्वर्गीय आवाजाच्या अपालाला कोणत्या वणव्यातून कोणाच्या प्रेरणा-संरक्षण-साथ, आधारामुळे वाटचाल करावी लागली? समस्यांच्या निबीड अरण्यांमध्ये समस्यांशी मुकाबला करताना कोणते शिखर तिने गाठले? वाचकांना विलक्षण अविस्मरणीय, अतुलनीत अनुभूती लेखिकेच्या आविष्कार, आशय, अभिव्यक्तीद्वारा लाभते. तन-मन-चेतापेशींना संपूर्णतेने कवेत घेणारा चित्रपटच पाहात असल्याचा ‘गांधर्वी’ वाचनाने प्रत्यय येतो. मेहता पब्लिशिंगच्या खानदानामध्ये शोभावेच असे बाह्यांग/अंतरंग लेखक लाभलेली ‘गांधर्वी’ संग्राह्य वाटते! -प्रा. अनुराधा गुरव ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHASAMRAT RANKHAINDAL
MAHASAMRAT RANKHAINDAL by VISHWAS PATIL Rating Star
गंधार

नमस्ते सर, काल रात्री मी रणखैनदळ मध्ये आपण लिहलेला पावनखिंडीतील थरार वाचून काढला. कालची रात्र मी कधीच विसरणार नाही. जणू काही मीच महाराजांसोबत प्रवास करणारा एक मावळा आहे. महाराज थकल्यावर त्यांच्या तळपायांना राईचं तेल चोळून देतो आहे, त्यांच्यासह नाचणीच भाकर खातो आहे असं मला वाटतं होतं. सर, एखाद्या लहान मुलाला आकाशातल्या तारका दाखवाव्यात त्याचप्रमाणे आपण इतिहासाच्या नभांगणातील असंख्य तारकांचं दर्शन घडवून आणता आणि छत्रपती शिवराय हा अर्थातच ताऱ्यांमधील तारा असा ध्रुवतारा आहे ज्याचं अनोखं असं दर्शन महासम्राट मधून घडतंय. सर, माझी केवळ मागच्या जन्मीची पुण्याई म्हणून मी आपल्याला भेटू शकलो. ...Read more

FOUR SEASONS
FOUR SEASONS by SHARMILA PHADKE Rating Star
लोकसत्ता १०.९.२०२३ (लोकरंग) वंदना बोकील-कुलकर्णी

माणसांवाचून रिकामी गावं, रस्ते, घरं न पाहवणारी, अंजनमाळावरच्या नागदेवीच्या कातळावर रणरण उन्हात सर्वागाने उन्हं पिऊन घेणारी, आपली उन्हात तापून दग्ध तांबूस झालेली देहाकृती व्हिन्सेंटने (व्हान गॉग) पाहावी आत्ता या क्षणी आणि तिच्या मोहात पडून त्यानेती आपल्या कॅनव्हासवर रेखाटावी असं आसुसून वाटणारी एक अतिसंवेदनशील तरुणी कामायनी ही शर्मिला फडके यांच्या ‘फोर सीझन्स’ या कादंबरीची नायिका. या नायिकेची चार प्रदेशात, चार ऋतूंमध्ये, चार पुरुषांच्या सहवासात घडणारी कहाणी म्हणून तिचं शीर्षक ‘फोर सीझन्स’. ‘फोर सीझन्स’ ही खऱ्या अर्थाने आत्ताची कादंबरी आहे. कदाचित पहिली ब्लॉग कादंबरी. कारण लेखिकेने कादंबरीच्या नायिकेच्या नावाने ‘टय़ुलिप्स अॅण्ड ट्वायलाइट’ या ब्लॉगवर पोस्ट्स लिहिल्या. ‘कादंबरीने बऱ्यापैकी आकार घेतल्यावर, व्यक्तिरेखा सुस्पष्ट झाल्यावर’ मग हा ब्लॉग तिने बंद केला. ‘ब्लॉग अर्काइव्हमध्ये जमा झालेल्या शेकडो पोस्ट्सवरून मॅपिंग करत’ कादंबरीचा आत्ताचा आकार तिने सिद्ध केला. हिची निर्मितीप्रक्रिया आत्ताच्या तंत्रसाहाय्याने, समाजमाध्यमांचा शहाणा उपयोग करून घेऊन झाली आहे. या अर्थाने ही आत्ताची कादंबरी. अलीकडे म्हणजे साधारण गेल्या दहा वर्षांत नव्याने लिहू लागलेल्या लेखकांत हिरिरीने आपली भूमिकावाहक पात्रे निर्माण करण्याची जी वृत्ती दिसते तिच्यात न अडकता आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहत आणि तरी कथनात्म साहित्याच्या मागण्या नीट कळून घेत लेखन करणाऱ्यांमध्ये शर्मिला फडके ही लेखिका लक्ष वेधून घेते. मोजके लेखन आहे तिचे पण खरेच लक्षात राहणारे. गेल्या पाच-सहा वर्षांत विविध दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झालेल्या तिच्या कथा पाहिल्या तरी हे पटेल. ‘ये शहर बडा पुराना है’ ही कथा वाचकांना ताबडतोब आठवेल. याशिवाय विविध ठिकाणी कलाइतिहास, कलासमीक्षा, प्रवास याही विषयांवर तिचे लेखन सातत्याने चालू आहे. तिचे मूळ शिक्षण वनस्पतीशास्त्र या विषयातलं. नंतर पत्रकारिता आणि कलाइतिहास यांचेही पदव्युत्तर शिक्षण तिने घेतले. ही तिन्ही क्षेत्रं भटकंतीला पूरक. शर्मिला फडके यांना प्रवासाचीही आवड आहे. फॅशनेबल पर्यटन नव्हे, प्रवास. खरीखुरी हवा, माती, झाडंझुडं, पाणी, नद्या अंगावर घेत केलेला प्रवास. आणि हे करताना त्यांच्या संवेदना तल्लखपणे आजूबाजू टिपून घेत असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनाचे विषय अनोखे आणि साहजिकपणे त्यांच्या अभ्यासविषयाशी आतून नातं सांगणारे असले तरी आजूबाजूला असलेलं वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी यांचं भान असलेल्या एका डोळस कलाप्रेमी स्त्रीचं अनुभवविश्व त्यातून आकाराला येतं. ‘फोर सिझन्स’ ही त्यांची कादंबरी लेखक म्हणून त्यांचे जे वृत्तिविशेष आहेत त्यांचा प्रत्यय देणारी आहे. स्त्रियांनी लिहायचे ते खास त्यांच्याच रूढ अनुभवविश्वाविषयी असा जणू पायंडा पडलेला असताना ही लेखिका मात्र अशा विश्वाचा पसारा मांडते की जे खरंच अनवट आहे. या कथनाची नायिका कामायनी मुंबई, सुंदरबन, युरोप आणि माळरान अशा भूप्रदेशांमध्ये काही काळ वावरते. नुसती वावरत नाही तर जिवेभावे तिथे गुंतते. चार भूप्रदेश, तिथे भेटलेले चार पुरुष- तेही भिन्न विचारसरणीचे, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम होऊन कच्च्या वयापासून वैचारिक, भावनिक आणि मानसिक गोंधळात वाढत गेलेली ही तीव्र बुद्धिमत्ता आणि कमालीची संवेदनशील असणारी मुलगी. मुंबईमध्ये वडिलांच्या वयाचा त्यांचा मित्र आणि तिला अगदी जन्मापासून ओळखणारा तिचा पालक म्हणावा असा जोसेफ, अनिर्बन बॅनर्जीच्या प्रभावाखाली सुंदरबनात दाखल, पण तिथे मनासारखे काहीच घडत नाही. उलट प्रेमात आणि कामात अपयश घेऊन पळून येणं. मग काही काळ पुन्हा मुंबई. मग जोसेफ तिला युरोपात पाठवतो. तिथे भेटतो इटालियन एरिक. तिथेही तेच घडते. विझून गेलेली, हरलेली आणि आत्मविश्वास गमावून बसलेली ती पुन्हा मुंबईत जोसेफच्या वळचणीला येते. तो तिला एक काम देऊन अंजनमाळ या माळरानावर पाठवतो. तिथे भेटतो विहान. माणूस आहे तिथे मतं आणि मतभेद आहेत, गुंतणं-गाठी बसणं आहे, संघर्ष तर आहेतच. पण या माळरानावर तेवढी ती तिची आहे. ती माळरानाच्याच प्रेमात पडते. कादंबरीत पात्रे म्हणाल तर कामायनीचे आईबाबा, त्यांच्याच बंगल्याच्या दुसऱ्या भागात राहणारे बानिदा, इरादी बॅनर्जी आणि त्यांचा मुलगा अनिर्बन, जोसेफ, एरिक, माळरानावर संशोधन करणारा विहान आणि त्याचे काका आस्ताद, रघु, मधोक हे मित्र आणि ती जिथे काम करते तिथले श्रीरंजन, निर्मल, नाडकर्णी वगैरे सहकारी. गेस्ट हाऊसची राखण करणारे राणू व लाखी आणि दहाबारा वर्षांची त्यांची मुलगी मणी. मरून गेलेली मार्गारेट फिलीप ग्रॅहम ही वनस्पतींची अभ्यासक, तिच्याशी एकनिष्ठ असलेला येशा हा तिचा मदतनीस पोरगा- ज्याची आता शंभरी उलटून गेली आहे. बस्स. माणसांचा आणि त्यांच्या नात्यांचा मोठा पसारा नाही मांडत लेखिका. या सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात जिवंत आहे तो निसर्ग. तोही तुमच्या आमच्या नेहमीच्या सवयीचा, चकचकीत, कॅमेरा किंवा तत्सदृश शब्दांतून दिसणारा, जणू काय आपलं मनोरंजन करण्याच्या डय़ुटीवर नेमलेला नव्हे. इथे त्याची जिवंत स्पंदनं आपल्याला जाणवतात. आपण उन्हात तापतो, आपल्याला उन्हाचा खरपूस वास येऊ लागतो. आपण सुंदरबनातल्या काळय़ा पाण्यात आणि दलदलीत पाय टाकायला कचरतो.. हा असा साक्षात अनुभव लेखिका तुम्हाला देते. अतिशय वैशिष्टय़पूर्ण रचना आहे या कादंबरीची. कधी प्रथमपुरुषी निवेदन, कधी तृतीयपुरुषी. कधी दैनंदिनीतल्या नोंदी. कधी नायिकेने स्वत:शीच केलेले विचार, कधी तिला पडणारी स्वप्नं तर कधी मार्गारेटच्या दैनंदिनीतल्या नोंदी. मुख्य प्रकरणं चार. ऋतू पहिला, ऋतू दुसरा.. अशा शीर्षकांची. त्यात उपशीर्षके असलेले लहान लहान परिच्छेद. कदाचित आधी ब्लॉग लिहून मग त्यातून कादंबरीचे कथानक रचल्यामुळे असेल, पण ही रचना एकाच वेळी अनेक पातळय़ांवर फिरते. त्यामुळे अनेक दिशीय, अनेक स्तरीय वास्तवाचा अनुभव वाचतावाचता येत राहतो. कादंबरीच्या आशयाशी इतकं थेट संलग्न असलेलं विविध पातळय़ांवर फिरणारं निवेदनतंत्र वाचकांच्या सवयीचे नाही. पण एकदा का तुम्ही या नायिकेबरोबर तिच्या पावलांनी चालू लागलात की.. आणि तसे चालताच तुम्ही.. की मात्र या निवेदनाची जादू आणि गंमत समजते. नायिकेची गोष्ट कधी ती सांगते तर कधी निवेदिका सांगते. निवेदनतंत्र इतक्या ताकदीने वापरणं आणि ते ‘वापरलं आहे’ याची जाणीव होऊ न देणं, यात या कादंबरीचं बरंच यश सामावलं आहे. उत्तम भाषाशैली आणि प्रतिमांचा फार नेमका वापर यांचाही त्यात वाटा आहेच. नायिका जशी जगते आहे, निसर्गाच्या चक्रातून स्वत:चे आयुष्य समजून घेते आहे तसं हे लेखन आहे. आखीव नाही, असं वाटणारं. तिची नजर जाते तो तो निसर्गाचा आविष्कार ती सांगते. नायिकेच्या रंग, गंध आणि स्पर्शाच्या संवेदना विशेष तल्लख आहेत. त्यामुळे तिच्या वर्णनांत चित्रकाराच्या पॅलेटवरचे रंग आणि त्यांच्या अगणित छटा येत-जात राहतात. व्हान गॉग, मोने वगैरे चित्रकारांच्या चित्रांचे संदर्भ येतात. सुंदरबन आणि युरोपातल्या आठवणी त्यात आपले धागे मिसळत राहतात. ती मनातले गोंधळ उघड करते. ते गोंधळ का निर्माण झाले, याचा वाचकांच्या साक्षीने शोध घेते. पहिल्याच मोठय़ा प्रकरणात आता लेखिका हे सारे कसे सोडवणार, म्हणून उत्सुकता आणि काळजीही वाटते कारण सरधोपट निवेदनाचा रस्ता तिने सोडून दिला आहे. या कादंबरीत आहे तसं रखरख माळरान कुणी कधी शब्दांतून क्वचितच मांडलं असेल. उन्हाच्या सुया डोळय़ांत घुसत असताना ही एका आंतरिक हट्टानं तिथे राहते. जगते. त्या उन्हात तिच्या आतले बर्फाचे गोठलेले प्रदेश वितळून वहाते होतात. तिची ती तिला सापडत जाते. ज्या प्रश्नांपासून ती पळत होती, त्या प्रश्नांना भिडण्याचे बळ ते ऊन तिला देते. अवघ्या तीस वर्षांच्या तिच्या आयुष्यात झालेले गुंते, गाठी हळूहळू सुटत जातात, सुरुवातीची ‘टय़ुलिपचे फूल वाटणारी ती अखेरीस एखादे रानफूल वाटू लागते.’ त्या प्रवासाची ही कहाणी आहे. या नायिकेला मिथक, लोककथा, झाडं-पानं-फुलं-पक्षी या सगळय़ांत रस आहे. नागदेवीच्या कातळाची कहाणी, आदिवासी तिथे करत असलेले विधी समजून घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. राणू, त्याचा शंभरी पार केलेला वृद्ध बाप येशा, यांच्याशी संवाद साधण्याची, त्यांच्याकडून जुनी घटितं जाणून घेण्याची आणि ते ठिपके जोडत सलग चित्र पूर्ण करण्याची तिला निकड वाटते. मणी तर तिची छोटी मैत्रीण होऊन जाते. या कादंबरीच्या गाभ्याकडे अनेक वाटांनी जावं लागतं.. नायिकेच्या आई-वडिलांचं नातं विस्कटलेलं असणं, तिचं आईशिवाय मोठ होणं, वडिलांनी कामात बुडवून घेणं, अडनिडय़ा वयातल्या एकटेपणात बॅनर्जीकडे रमणं, त्यांच्या तरुण मुलाच्या प्रेमात पडणं. बाबांना दुखवायचं म्हणून वडीलधारेपण निभावणाऱ्या जोसेफकडे ओढा वाढणं, तरी त्याला जे नको वाटतं तेच तिनं निवडणं, अनिर्बनकडे जाणं. मग तिथून पळून युरोपात. तिथे एरिकच्या प्रेमात पडणं, करियरची वाट लागून, पूर्ण खचून मुंबई- पुन्हा जोसेफ आणि मग माळरान. हा सगळा प्रवास एका स्तरावर आहे. दुसऱ्या पातळीवर, माणसाचा जागतिक स्तरावरचा वावर, त्याला भेटणारी विविध देशीविदेशी माणसं, परदेशातील वास्तव्याची संधी, त्यामुळे होणारी भावनिक-शारीरिक जवळीक, त्यातून निर्माण होणाऱ्या वैयक्तिक जीवनातल्या समस्या आहेत. तिसऱ्या पातळीवर पर्यावरण आणि विकास यासंबंधीचे असंख्य स्थूल-सूक्ष्म धागे आहेत. नायिका जाहिरात क्षेत्रात करियर असणारी. ते क्षेत्र आणि पर्यावरण कायम विरोधी गटात. दोन्ही बाजू जनसामान्यांची करत असलेली अशुद्ध दिशाभूल, विस्थापितांचे पुनर्वसनाचे प्रश्न, ‘विस्थापितांचा प्रश्न केवळ जमिनी गमावण्याचा नसतो, तो मुळं उखडलं जाण्याचा असतो’, याविषयी असणारी कमालीची असंवेदनशीलता, प्रश्नांचा समग्र विचार न करता एकेका सुटय़ा घटकांचा विचार करून योजलेले तात्कालिक उपाय, हत्ती आणि सहा आंधळय़ांच्या प्राचीन गोष्टीतून आपण काहीच शिकलो नसल्याची चरचरीत जाणीव.. हे सगळं ही कादंबरी स्वत:त गुंफून घेते. म्हणजेच कालसमांतर आशय ती आपल्या पदरात घालते. नायिका ज्या जाहिरात क्षेत्रात काम करतेय तिथे येणारे कडवट अनुभव, स्वत:च केलेले सगळे नियम धाब्यावर बसवणाऱ्या सरकारी व्यवस्था, हिरव्या रंगाच्या ‘वॉश’खाली भयानक प्रदूषण करणाऱ्या उत्पादनांना मिळणाऱ्या परवानग्या आणि त्याविषयी उदासीन असणारी विविध पदांवरची माणसं. निकराने त्याला विरोध करणारे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते आणि संस्था, याविषयी विचार करायला लावते ही कादंबरी. ही सगळी वीण गच्च विणली आहे. म्हणूनच ती वाचायला मजा येते. म्हणजे हिच्यात काही कमतरता वा त्रुटी नाहीत का? नाहीत कशा.. पण दुर्लक्ष कराव्यात अशा नक्कीच. उदा. जोसेफ, रघु, मधोक, आस्ताद, विहान यांच्या आयुष्यात कोणीच स्त्रिया कशा नाहीत? इतक्या जवळिकीच्या आणि प्रदीर्घ काळाच्या नात्यात कधीतरी त्या व नायिका आमनेसामने येऊ शकल्या असत्या. अशा तिढय़ांना सफाईने बगल दिली आहे. त्यामुळे समग्र चित्रात फटी राहिल्या आहेत. सहसा लेखिका ज्या तऱ्हेचं लेखन करत नाहीत तसं वाचायला मिळालं की सुखद वाटतं. स्त्री असण्याच्या परीघरेषा ओलांडून ही नायिका व्यक्ती म्हणून वेगळे आयुष्य जगते. सहजधर्मानं, अभिनिवेशानं नव्हे म्हणून आणखी बरं वाटतं. लेखिका, संपादक, संवादक, समीक्षक आणि कथा अभ्यासक अशा अनेक भूमिकांमध्ये सतत कार्यरत. ‘संवादसेतू’ या लक्षवेधी दिवाळी अंकाचे संपादन. कथक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्यावरील ‘रोहिणी निरंजनी’ हा गाजलेला ग्रंथ, ‘मंगला गोडबोले यांच्या निवडक कथां’ यासह अनेक पुस्तकांच्या संपादिका. ...Read more