* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386175410
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 296
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORY ABOUT A FAMILY AFFECTED BY HEMOPHILIA
या कादंबरीत चार पिढ्यांची कहाणी सांगितलेली आहे. हिमोफिलिया हा भयंकर रक्तदोषाचा आजार रमा, सुधा, अंजली या तीन वाहक स्त्रियांद्वारा पुढल्या पिढीकडे संक्रमित झाला आहे. आपल्या समाजातील एका संपन्न घराण्याची ही प्रातिनिधिक कहाणी आहे. या स्त्रिया या आजाराविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या लाडक्या मुलांच्या भयानक वेदनामय, दुःखी जीवनासाठी आपण कारणीभूत आहोत,या वास्तवाची त्यांना पुसटशी कल्पनाही नाही. श्रुतीच्या मातुल घराण्याच्या तीन पिढ्यांच्या तीन स्त्री-प्रतिनिधींची ही कथा आहे. ‘हिमोफिलिया’ नामक रोगाने, महाराक्षसाने, त्यांचे सुख-चैन खाऊन टाकले. पहिल्या दोन पिढ्या तर या भयंकर व्याधीविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होत्या. श्रुतीच्या आईची- अंजलीची प्रथम या वास्तवाशी ओळख झाली. त्याच वेळी तिच्या आजीलाही हे भयंकर कटू सत्य कळले आणि ती कोसळलीच! ‘हिमोफिलिया’ हा जरी या कथनाचा मुख्य विषय असला, तरी त्या अनुषंगाने प्रत्येक पिढीच्या, कालप्रवाहाच्या ओघात बदलणाNया सामाजिक, आर्थिक, भौतिक, मानसिक वातावरणाशीही वाचकांची ओळख व्हावी, त्या काळातसुद्धा, गाव आणि शहरी जीवनातील राहणी, सुखसोयींतला फरक कळावा, अशी लेखिकेची मनापासून इच्छा होती. म्हणूनच श्रुतीच्या पणजीचे, आजीच, आईचे बालपण, शालेय जीवन, लग्न, सासरची माणसे, सणवार, रूढी, परंपरांचे सविस्तर वर्णन रेखाटण्याचा प्रयत्न या कहाणीत करण्यात आला आहे. कादंबरीच्या शेवटी त्या अनुषंगाने सामान्य माणसालाही समजेल अशा सोप्या भाषेत या रोगाचा इतिहास, लक्षणे, खबरदारीचे उपाय, सामान्यांना सजग करणे हे सर्व कादंबरीमार्पÂत मोठ्या कौशल्याने लेखिकेने केले आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HEADIMAHEANTIMA #SUVARNA DHOBLE #HAEMOPHELIA #HAEMOPHELIAFEDERATIONOFINDIA #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarLOKPRABHA 13-07-2018

    कादंबरीच्या माध्यमातून हिमोफिलियाविषयी जागृती... हिमोफिलियाची शिकार ठरलेल्या चार पिढ्यांचा जीवनप्रवास म्हणजे ‘हे आदिमा हे अंतिमा’ ही कादंबरी! आदि आणि अंत हेच या सजीव सृष्टीमागचे सूत्र आहे. कादंबरीचे शीर्षक वाचकांचीच उत्सुकता वाढवते. लेखिका सुवर्णा ढबळे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक ही कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत चार पिढ्यांचा प्रवास वर्णन केला आहे. आणि तो प्रत्येक काळ त्यांनी उत्तमरीत्या उभा केला आहे. आपण ही कादंबरी वाचताना त्या-त्या काळात आपल्या नकळत कधी जाऊन पोहोचतो हेही उमगत नाही, इतकी सहज आणि ओघवती भाषा हे या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य. ही गोष्ट आहे ‘हिमोफिलिया’ या रोगाला बळी पडलेल्या चार पिढ्यातील स्त्रियांची. या हिमोफिलियाचे शिकार होतात पुरुष आणि त्याला कारणीभूत ठरतात स्त्रिया! स्त्रिया या रोगाच्या वाहक असतात आणि हा रोग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतो. रक्तदोष व्याधी मातुल पिढ्यांकडून येते. हा आजार अनुवंशिक आहे. या आजाराला राजवंशाचा आजार म्हणतात. याला कारण की राणी व्हिक्टोरिया हिच्या घराण्याकडून हा आजार इतर देशात अनुवंशिकतेने विस्तारित झाला. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे हिमोफिलिक रुग्णाला जखम झाल्यास त्याचे रक्त वाहणे लवकर थांबत नाही. कारण रक्त गोठण्यास लागणारे घटक त्यांच्या रक्तात नसतात. सांध्यांमध्ये किंवा मेंदूत रक्तस्त्राव झाल्यास ही व्याधी उग्र रूप घेते व त्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत होऊ शकते. ‘हिमोफिलिया’ या रोगाबद्दल लेखिकेने अतिशय अभ्यासपूर्वक व अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. लेखिकेचा ही कादंबरी लिहिण्याचा हेतू म्हणजे या रोगाची वाचकांना शास्त्रीय माहिती मिळावी आणि त्याचप्रमाणे हिमोफिलिक व्यक्तींनी योग्य उपचार घेतल्यास हा रोग एका मर्यादेपर्यंत ताब्यात ठेवता येतो हे सांगणे. हिमोफिलिया सोसायट्या या सर्वांसाठी मदतीला तयार आहेत. त्या योग्य प्रकारे समुपदेशन करून योग्य उपचारांचे ज्ञान देतात. त्यायोगे अशा रुग्णांचे मनोधैर्यही वाढते. योग्य मार्गदर्शनामुळे योग्य उपचारांचा मार्ग निवडता येऊन हिमोफिलिया आपण रोखू शकतो. रमा, सुधा, अंजली आणि श्रुती या चार पिढ्यांतील स्त्रिया! रमा, सुधा, अंजली या तीन वाहक स्त्रियांद्वारा हा आजार पुढच्या पिढीकडे संक्रमित झाला. रमा आणि सुधाला या आजाराविषयी कसलीही कल्पना नव्हती, तर अंजलीला ही कल्पना आली पण ती आपल्या कुटुंबाला हे सांगू शकली नाही. यामध्ये स्वत:बद्दलची वाटलेली भीती तर कारणीभूत होतीच, परंतु कुटुंबाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल की काय याची धास्तीही होती. पिढ्यानपिढ्या या रोगाचा वारसा चालवीत आलेल्या या स्त्रिया या आजाराविषयी अनभिज्ञ आहेत. आपल्या लाडक्या मुलांच्या भयानक, वेदनामयी जीवनासाठी आपण कारणीभूत आहोत या वास्तवाशी रमा आणि सुधा फार फार दूर होत्या. या चौघींचीही प्रातिनिधिक व्यक्तिचित्रणे लेखिकेने अतिशय बोलकी केली आहेत. या कादंबरीतील घटना, व्यक्तिरेखा यामुळे चार पिढ्यांतील बदललेल्या काळातील पात्रांबरोबर यातील प्रत्येकजण आपल्या आजूबाजूला वावरताना जाणवत राहत यातच लेखिकेचे शब्दसामर्थ्य व्यक्त झालं आहे. या स्त्रियांच्या विचारधारेतील प्रगतीही उत्तमपणे रेखाटली आहे. काळाप्रमाणे बदललेली परिस्थिती आणि त्याचप्रमाणे बदलत गेलेले राहणीमान, विचार लेखिकेने समर्थपणे उभे केले आहेत. कादंबरीत असे अनेक प्रसंग आहेत, जे वाचताना अंगावर काटा उभा राहतो. विजय, रवी आणि अंजूचा तान्हा यांचा बालवयातला मृत्यू ज्यांची कारणे सारखीच असली, तरी त्या तिघांनाही याची कल्पनाही नव्हती. अंजू हिमोफिलियाची वाहक नाही हे समजताच अंजूबरोबर आपण वाचकही सुस्कारा सोडतो. श्रुतीला आपल्या आईकडून चार पिढ्यांचा इतिहास समजतो आणि आपण वाहक असण्याची शक्यता आहे, असे समजताच तिच्या मनाची झालेली घालमेल, तिच्या मनात उडालेला मानसिक गोंधळ लेखिकेने अप्रतिमपणे पोहोचवला आहे. त्याचबरोबर या रोगाबद्दल लेकीला सांगताना आईने दाखवलेले धैर्य हे वाखाणण्याजोगेच आहे. वाहक स्त्रीने ‘अपत्यजन्माचा’ त्याग करणे हेच या रोगाला रोखण्याचा उपाय आहे हे लेखिकेने समर्पकपणे वाचकांपर्यंत पोहोचवले आहे. शेवटी श्रुतीने घेतलेला निर्णय! ती हिमोफिलियाची वाहक म्हणून पॉझिटिव्ह ठरते. त्याबरोबर तिचा निर्णय होता. हिमोफिलियाचा प्रारंभ कुणाच्याच हातात नाही, पण अंत मात्र त्या वाहक असणाऱ्या स्त्रीच्या हातात आहे. हेच श्र्रृती जाणते आणि ती नियतीला ठणकावून सांगते हे आदिमा, चार पिढ्यांपासून सुरू केलेला हिमोफिलियाचा हा क्रूर खेळ मी संपवणार! मी मातृत्व नाकारणार! तिचा हा निर्णय एखाद्या स्त्रीसाठी खरंच कठीण आहे, पण समाजाच्या दृष्टीने आणि रोगावर मात करण्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य असाच होता यात शंका नाही. हिमोफिलिया हा महाभयानक रोगाची माहिती देणारी ही कादंबरी सर्वांनी जरूर वाचावी अशीच आहे. -मनीषा फडके ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL SAPTRANG 1-1-2017

    हिमोफिलिया या असाध्य आजाराला बळी पडलेल्या चार पिढ्यांचा जीवनप्रवास सांगणारी ही कादंबरी सुवर्णा ढोबळे यांनी लिहिली आहे. हिमोफिलिया हा रक्तदोषातून निर्माण होणारा अनुवांशिक आजार. स्त्रिया या रोगाच्या वाहक असतात आणि पुरुषांना तो होतो, असा हा विचित्र आजार ढोबळे यांनी या आजाराची संपूर्ण माहिती घेऊन, संशोधन करून ही कादंबरी लिहिली आहे. मात्र, ती केवळ माहितीपर नाही, एका घराण्यातल्या तब्बल चार पिढ्यांवर या आजाराचं कसं सावट पडतं आणि त्यातून पुढं काय होत जातं, हे नाट्यमय पद्धतीनं त्या सांगतात. कादंबरीचा कालखंड बराच मोठा असल्यानं त्या त्या काळातल्या चालीरीती, परिस्थिती, वागण्याच्या तऱ्हा या गोष्टींचाही अभ्यास ढोबळे यांनी करून त्याला शब्दरूप दिलं आहे. वैद्यकीय विषयांवरच्या कादंबरी मराठीत तुलनेनं कमी असताना ढोबळे यांनी एक चांगला प्रयत्न केला आहे. ...Read more

  • Rating StarPRIYA DANDGE 9-12-2016

    मानवाचे आयुष्य हे अनेक धाग्यांनी बांधलेले असते. नियती ही मानवी जीवनावर प्रभाव टाकणारा सर्वांत ठळक घटक होय. आपल्या वाट्याला काय यावे याची निवड करण्याचे स्वातंत्र्य माणसाला नसते. माणसाला नियतीची आपल्यावरील ही पकड जेव्हा जाणवू लागते तेव्हा आयुष्य कदाचितअधिक निरर्थक किंवा अर्थपूर्ण जाणवू शकते. आनुवंशिक आजारामुळे वाट्यास आलेले दु:ख भोगणाऱ्या चार पिढ्यांतील चार स्त्रियांची कहाणी सांगणारी ‘हे आदिमा, हे अंतिमा’ ही कादंबरी वाचकांच्या भेटीस येते आहे. सुवर्णा ढोबळे लिखित या कादंबरीमध्ये ‘हिमोफिलिया’ या आनुवंशिक आजाराच्या वाहक असलेल्या, नात्यात बांधलेल्या चार स्त्रिया आहेत. हिमोफिलिया हा आजार फक्त पुरुषांना होतो; परंतु स्त्रिया त्याच्या वाहक असतात. स्त्रियांकडून त्यांच्या पुरुष अपत्यांना हा आजार होतो. हिमोफिलिया आजारात माणसाची रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही, त्यामुळे अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे रुग्ण मरण पावतो. रशियाचा राजा सार (शेवटचा) याच्या मुलाला हा आजार होता. त्याला अत्यंत जपावे लागे. एवढीशी जखम होऊ नये म्हणून पहारा द्यावा लागे. झार आणि राणी दोघेही आपल्या एकुलत्या वारसासाठी अखंड काळजीत असत. याच त्यांच्या भीतीचा गैरफायदा घेऊन रास्पुटीनने आपले बस्तान बसवले. झार आणि राणी दोघेही रास्पुटीनच्या तालावर नाचू लागले. पुढे रशियन राज्यक्रांती झाली आणि झारशाहीच नष्ट झाली, असा रक्तरंजित इतिहास असणाऱ्या आजाराची पार्श्वभूमी ‘हे आदिमा, हे अंतिमा’ या कादंबरीला लाभली आहे. रमाबाई, सुधा, अंजली आणि श्रुती या पणजी, आजी, आई आणि मुलगी या चार पिढ्या. त्या चौघीही हिमोफिलियाच्या वाहक. पहिल्या तीन पिढ्यांमधील स्त्रियांचे मुलगे या आजाराचे बळी ठरले आहेत. ‘पुत्रप्राप्तीशिवाय स्त्रीजन्म अपूर्ण’ अशा गाढ समजुतीचा पगडा असणाऱ्या काळातील या तिघीजणींना पुत्रपाप्ती तर होते; पण त्यांचे मुलगे दीर्घायुषी होत नाहीत, याचे कारण त्यांना दुर्दैवाने माहीत नाही. आपल्या घराण्यात पुरुष जगत नाहीत, या समजुतीत त्या नशिबाला दोष देत जगत राहतात. श्रुती या साखळीतील अंतिम कडी. तिला वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळतो. त्यानंतर त्या काळातील चालीरीती, जीवनशैली, समजुती ओघवत्या शैलीतून आपल्यासमोर येतात. त्याकाळचे स्त्रीजीवन, त्यातील बदल, स्त्रीचे समाजातील, कुटुंबातील स्थान, यात कसकसे बदल होत गेले हे तपशीलासह वाचकांना कळते. संबंधित काळातील जीवन आपल्यासमोर उभे राहते. कादंबरीत हिमोफिलिया आजाराची शास्त्रीय माहिती, त्यासंबंधाची जनजागृती, आजारासाठी सुरू असलेले काम याची विस्तृत माहिती कथानकाच्या ओघात येते. त्यामुळे कळण्यास सोपी जाते. अशा प्रकारच्या कादंबरीचा मराठीतील हा पहिलाच प्रयोग आहे. वाचकांना ही प्रयोगशील कादंबरी नक्कीच आवडेल. पिढ्यान् पिढ्या संक्रमित होणारा एखादा आजार माणसाची नियती कशी बदलून टाकतो, त्या आजाराविषयी अनभिज्ञ असणारी माणसं नशिबाला दोष देत राहतात. याची अभ्यासपूर्वक तरीही रंजक मांडणी करणारी ‘हे आदिमा, हे अंतिमा’ ही कादंबरी एक वेगळा विषय मांडते. ‘हिमोफिलिया’ हा आजार फक्त पुरुषांना होतो; पण त्याच्या वाहक असतात स्त्रिया. ‘हे आदिमा, हे अंतिमा’ ही सुवर्णा ढोबळे यांची कादंबरी चार पिढ्यांचा जीवनप्रवास मांडते. या रोगाच्या वाहक असणाऱ्या चार पिढ्यांतील चार स्त्रिया, त्यांचं जीवन, त्यांचं दु:ख, वेदना प्रभावीपणे या कादंबरीतून वाचकांच्या समोर येते. सामान्य वाचकांनाही ‘हिमोफिलिया’ या आजाराची माहिती, आजाराचे स्वरूप कळते. याचबरोबर चार पिढ्यांमधील चार स्त्रिया, ज्या नात्याच्या बंधात एकमेकींशी जोडल्या गेल्या आहेत. त्या या आजाराकडे कशा पाहतात, हेही वाचकांसमोर येते. ही कादंबरी चार पिढ्यांचे स्त्रीजीवन, समाजातील स्त्रियांचे समाजातील आणि कुटुंबातील त्यावेळचे स्थान याची विस्तृत मांडणी करते. एका आजाराचा मानवी जीवनावर होणारा विविधांगी परिणाम मांडणारी मराठीतील ही पहिली कादंबरी ठरावी. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more