* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: CHOUNDAKA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177666878
  • Edition : 5
  • Publishing Year : AUGUST 1985
  • Weight : 200.00 gms
  • Pages : 168
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS NOVEL REPRESENTS THE SADDENING STORY OF THE `DEVDASI` TRIBE. WHAT IS A DEVDASI? IT IS A TRADITION CREATED BY PEOPLE WITH EVIL INTENTIONS FOR THEIR OWN BENEFITS. SHE IS A VICTIM TO MISCONCEPTIONS, WRONG TRADITIONS, SO CALLED RELIGION, ALL CREATED IN THE NAME OF THE GOD. A DEVDASI IS OFFERED TO THE GOD AND THUS BECOMES A PUBLIC PROPERTY. ANY MALE MEMBER CAN CLAIM HER. SHE FALLS PREY TO THE HARASSMENT OF THE PEOPLE. THIS NOVEL PRESENTS A TRUE PICTURE OF HER TORTURE IN THE NAME OF TRADITIONS. THE AUTHOR HAS PRESENTED THE ANGUISH THROUGH `SULI`, THE MAIN CHARACTER. HE NEATLY AND IMMACULATELY PRESENTS THE VARIOUS ASPECTS OF A FEMALE MIND, THE LANGUAGE, THE FEELINGS, ETC. `CHAUNDAK` SHOULD BE RECOGNIZED AS A NOVEL PENETRATING THE REAL FACTS OF THE LIFE OF A `DEVDASI`.
आपल्या समाजातील देव, धर्म, अनिष्ट रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी. `जोगतीण देवाची, मालकी गावाची` ही आपल्या बोलीतील म्हण तिच्या जगण्याचं सार सांगते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ `चौंडकं` ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते. स्त्रीदु:खाचा नेमका वेध, बोलीची सर्व सामर्थ्य पचवून राजन गवस यांनी `चौंडकं`मध्ये घेतला आहे. `सुली`च्या व्यक्तिरेखेतून एक ठसठशीत वेदना आपल्यासमोर येते. देवदासीच्या जगण्यातील सर्व दु:ख आणि तिच्या समस्यांचा वेध घेणारी कादंबरी म्हणून `चौंडकं`ची नोंद विशेषत्वानं करावी लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJANGAVAS #DEVDASI# JOGTIN# DEV #YALLUBAI #SULI #SUBANA #BAYAJA #PARADI #LIMB #JAT #BABANYA #SHEWANTAKKA #LAGNA #MELA #NAVAS #HITNI #DONGAR #BHANDARBHOG #RIVANAVAYALIMUNGI #CHOUNDAKA #AAPANMANSATJAMANAHI
Customer Reviews
  • Rating StarVijay Nimbalkar

    दोन दोन आठवडे आंघोळ न करणाऱ्या सुलीच्या डोक्यात एक जट दिसते म्हणून आई व आजी तिला गावातल्या जोगतीणीकडे घेऊन जातात. `यल्लूमाई तुमच्या घरी आली!` जोगतीण `डोंगरावरच्या देवीला घरात आणायला` आणि `घरातल्या निष्पाप पोरीला देवीला वाहायला` सांगते. सुलीच बाप विरोध करतो म्हणून म्हातारी व सुलीची आई महिनाभर त्याच्याशी भांडतात आणि शेवटी सुलीला डोंगरावरच्या देवीला वाहतात. `देवीची जोगतीण` म्हणजे `गावातल्या सगळ्या पुरूषांची भोगवस्तू!` त्यात वयात आलेली देखणी सुली पाहून सगळ्यांच्या नजरा चळतात. `साऱ्या गावाखाली झोपण्यापेक्षा एक बाप्या बरा` म्हणून सुली बबन्याला पकडते. पहिल्यांदा त्या दोघांत प्रेम फुलतं मग सुलीचं पोट फुगतं आणि शेवटी सुली गर्भ वाढवायचा धाडसी निर्णय घेते. सुलीच्या आयुष्याचं वाटोळं करून म्हातारी अगोदरच उलथलेली असते. कालपर्यंत सुलीला `देवी` समजणारी तिचीच आई आता तिला `वेश्या` म्हणू लागते. सुली मात्र गर्भ ठेवायच्या निर्णयावर ठाम असते. आई सुलीच्या मामांना बोलावून घेते व `हिने घराची आब्रू घालवली. हिला एखाद्या डोंगरात नेऊन पुरा` म्हणून भावांचं पाय धरते. घरात परंपरेने पुजला जाणारा देव्हारा आणि देव असतानाही घरात अशी नवी `देवी` आणून बसवणारे, `केसांच्या गुंत्या`ल्या देवीची जट समजून जपणारे, हातात परडी घेऊन गावात पाच घरं मागणारे; घराजवळ कुणीतरी लिंबू-मिरची टाकून करणी केली म्हणून देवरूषाकडे जाणारे... श्रद्धा व अंधश्रद्धा यातला फरक न समजणाऱ्या अशिक्षित समाजाची केविलवाणी कहानी. राजन गवस यांची कादंबरी - चौंडकं. - विजय निंबाळकर ...Read more

  • Rating StarVijay Saravate

    हि कथा आहे एका देवदासी प्रथेवर. देवदासी म्हणजे देवाला अर्पित. पण खरा अर्थ आहे `गावाला अर्पित`..... म्हणजे त्या व्यक्ती वर कुणाचा ठाम अधिकार नाही तर ती व्यक्ती सर्व गावाची, कुणी यावं आणि भोगावं .... म्हणजे वेश्या ... किंबहुना त्याहून वाईट ... साधारणपण, मुलांना (मुलगा वा मुलगी) काहीही कळत नसतं त्यावेळी कधीतरी त्यांना देवाला वाहील जातं आणि एकदा का हा विधी झाला कि मग त्यातून सुटका नाही, अगदी मरेपर्यंत. ही प्रथा अडाणी आणि गरीब लोकांमध्येच पाळली जाते. तरी सुदैवाने, आता या प्रथेवर कायद्याने प्रतिबंध लावले आहेत. परंतु, आजही हजारो जोगते - जोगतिणी आहेत आणि अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहे आणि आजूबाजूचा सधन समाज त्यांचे लचके तोडतोच आहे. मुळात, देवदासी संस्कृतीची परंपरा ७ व्या शतकात, कदाचित चोल, चेला आणि पांड्या यांच्या काळात दक्षिण भारतात सुरु झाली असावी. त्यावेळी समाज त्यांच्याशी चांगली वागणूक व आदरभाव ठेवून होता आणि त्यांनी समाजात उच्च सामाजिक प्रतिष्ठा होती. त्यांना धार्मिक विधीस उपस्थित राहण्यास वा करण्यास कसलाच मज्जाव नव्हता. देवदासी, देवरडीयार, जोगतिणी, जोगते वगैरे म्हणजे `देवाचे सेवक`. हे लोक देवसमर्पित असत आणि त्यांचा देवासोबत विवाह केला जात असे, म्हणजेच ते कोणत्याही ‘नश्वर व्यक्ती’ बरोबर लग्न करू शकत नाहीत. तथापि, विवाहित आणि अविवाहित पुरुषांपैकी कुणालाही भागीदार निवडण्यास ते स्वतंत्र होते. ही नाती दीर्घ व स्थिर असू शकतात किंवा फक्त थोड्या काळासाठी असू शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे या महिला त्यांच्या भागीदारांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हत्या. त्यांना संगीत आणि नृत्य, आणि सुमारे ६४ प्रकारच्या कला शिकल्या जात. ते मंदिरात किंवा राजसभेत नृत्य-गायन करीत व बक्षीस म्हणून सोने व जमीन मिळवत असत. काहींनी स्वत:ला फक्त देवाला समर्पित करणे निवडले आणि संपूर्ण आयुष्यभर भागीदाराशिवाय राहिले. पण, कालौखात, हे सर्व मागे पडत गेले आणी त्याला आजचे हे अगदी ओंगळ स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे आजही यांना गोंधळ वगैरे साठी बोलावून बरंच काही नको ते केलं जातं. चौंडकं कथा: एक गरीब परिवार, सुबान, त्याची पत्नी बायजा, मुलगी सुली आणि म्हातारी आई असे कसेबसे करून खात असतात. त्यांना खूप समस्या असतात आर्थिक आणि शारीरिक, पण त्यातून त्यांना बाहेर काही पडता येत नाही. त्यातच, सुलीच्या केसात एक जट आढळते आणि गावातील जोगतीण सुलीला यल्लम्मा या देवाला तिला सोडायचा सल्ला देतात. हि जोगतीण सुली पुढं मोठी होते, बबन्याच्या प्रेमजालात अडकते, त्यातून तिला दिवस जातात आणि सरळ साध्या कुठूम्बाची पूर्ण वाताहात होते. विजय सरवते ...Read more

  • Rating Starश्रीजीवन तोंदले

    नमस्कार मित्रहो आज रविवार परत एक नवीन पुस्तक घेऊन तुमच्या भेटीला आलो आहे. एक अशा लेखकाचे पुस्तक ज्याच्या प्रत्येक पुस्तकास विविध पुरस्कार मिळालेले आहेत,कोल्हापुर शिवाजी विद्यापीठातुन एम.ए.,एम एड पर्यंत शिक्षण पूर्ण केले.भोवतालच्या परिस्थितीचे निरीक्ण करून ते प्रभावीरीत्या लोकांसमोर मांडणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य मानले जाते.त्याच प्रभावी आणि समाज्याच्या अशा एका घटकावर त्यांनी या कादंबरी मधुन प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. या कादंबरीला १९८५चा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा राज्य पुरस्कार,१९८५चा श्याम पानघंटी पुरस्कार-पुणे,Dr.अरुण लिमये ट्रस्ट,पुरस्कार-पुणे अश्या प्रकारचे पुरस्कार या कादंबरीला मिळाले आहेत.अशी ही कादंबरी म्हणजे राजन गवस लिखित चौंडकं. चौंडकं हे एक के वाद्य आहे जे देवदासी लोक वापरतात म्हणजे कोल्हापुर,कर्नाटक पासुन अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेथे जेथे जोगती-जोगतीणी लोक आहेत ते देवीचा जागर करताना हे वाजवतात. चौंडकं हे एक दुर्मीळ आणि पौराणिक वाद्य आहे, फार पूर्वी भगवान परशुरामाने बैट्यासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्या राक्षसाच्या शरीराच्या काही भागां पासुन भगवान परशुरामाने चौंडकं हे वाद्य बनवले.आणि स्वतः भगवान परशुरामाने पहिल्यांदा ते वाजवले. मग पुढे कालांतराने ते वाद्य लाकडाचे बनवण्यात आले आणि आज ही ते बनवलं जात आणि वाजवलं ही जात. हे वाध्य वाजविण्यास अत्यंत अवघड. एका हाताच्या आणि बोटांच्या साहाय्याने हे वाजविले जाते. चौंडकं या वाद्यांची माहिती मला भुयेवाडी चे श्री तानाजी बडेकर यांनी दिली ती हि फक्त एका message वर.मना मध्ये कोणताही किंतु-परंतु न ठेवता. त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार. आता थोडं या कादंबरी विषयी बोलुया,कादंबरी १६२ पानांची आहे, कादंबरीच्या मुखपृष्ठावर एका देवदासीचं चित्र आहे. ती देवदासी डोक्यावर देवीचा जग (जग म्हणजे एका मोठ्या टोपलीच्या मध्ये देवीची मोठी मूर्ती असती त्याच्या मागे मोरपिसांचे वर्तुळाकार मखर असते. देवीच्या मूर्तीला शालु नेसवलेला असतो टोपलीच्या काटावर छोट्या छोट्या विविध देवींच्या छोट्या छोट्या मूर्त्या असतात.) डोक्यावर घेऊन उभी आहे त्या देवदासीने कपाळाला भंडारा लावला आहे,गळ्यामध्ये कवड्याची माळ आहे. अंगामध्ये हिरवा शालु नेसलेला आहे. अशी ही देवदासी बघताच डोळ्यात भरते आणि मुखपृष्ठावरूनच कादंबरीचा विषय समजतो. कादंबरी मधील कथा साधारण १९८०-८५ च्या काळामधील आहे.(म्हणजे ही कादंबरी तेव्हाचीच आहे.) त्या वेळची समाजामधील अंधश्रद्धा म्हणजे एक असाध्य रोगच त्या रोगावर किती ही उपचार केला तरी तो न बरा होण्यासारखाच आणि अजून सुद्धा तो रोग आपल्या समाजात आहे. त्या काळी अगदी साधा आजार झाला तरी देवीचा भंडारा खा,देवी ची ओटी भरा हे आणि किती तरी उपाय वेड्या अंधश्रध्ये पोटी लोकांना करण्यास भाग पाडलं जायचं. अश्याच अंधश्रद्धेला बळी पडलेल्या छोट्या सुली ची कथा या कादंबरी मध्ये लेखकाने मांडली आहे. तिच्या हिंडण्या-खेळण्याच्या दिवसातच तिच्या कोवळ्या मनाचा विचार न करता तिला देवाला सोडल जात आणि तिथुन तिच्या आयुष्याची फरफट सुरु होते. ज्या कोवळ्या वया मध्ये तिने भातुकलीने खेळावे,मैत्रीणीन सोबत हिंडावं फिरावं त्याच कोवळ्या वयात तिला दारो-दारी जाऊन भिक्षा मागायला भाग पडलं जातं. देवदासी म्हणजे जोगतीण देवाची आणि मालकी गावाची हे वाक्य देवदासीं बद्दल म्हंटले जाते. सुलीच्या (देवदासी स्रियांच्या) आयुष्याची झालेली फरफट लेखक राजन गवस यांनी अगदी प्रभावीपणे या कादंबरी मध्ये मांडली आहे. कादंबरी वाचते वेळी असं वाटतं की आपण लेखकाचे बोट पकडून देवदासींचे खडतर जीवन जवळून पाहतो असा भास होतो. कादंबरीची भाषा आमच्या पश्चिम महाराष्ट्राकडची आहे आणि कादंबरी मध्ये उपमा अलंकार पद्धती मध्ये भरपुर वाक्य आहेत(काळीज केळी च्या पानागत फाटत गेल, उन्हा अंबिली गत पिवळी पडली होती) ते वाचते वेळी समजते कि लेखकाचे सभोवतालच्या परिसराविषयी किंवा सभोवतालच्या घटना,वस्तू,परिस्तिथी विषयीचे वर्णन करण्याची एक वेगळीच दृष्टी लेखकाकडे आहे . लेखक राजन गावास आपल्या प्रत्येक कादंबरीतुन समाजातील प्रत्येक घटकांवर एक वेगळाच प्रकाश टाकतात. त्यातुन वाचणाऱ्याच्या मनात त्या घटकांविषयी सहानुभुती आणि आदर या दोन्ही भावना निर्माण होतात आणि त्यांचे विचार बदलुन टाकतात. सहानुभुतीची दृष्टी असणाऱ्या आणि समाजातील वंचित घटकांविषयी वेगळ्या पद्धतीने जाणुन घेणाऱ्या आणि प्रत्येक वाचकाने जरूर वाचावी अशी कादंबरी लेखक राजन गवस लिखित चौंडकं. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more