* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: END GAME
  • Availability : Available
  • Translators : UDAY KULKARNI
  • ISBN : 9788184985641
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2014
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 508
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
JULY 5 2018, MASINDI, UGANDA: 218 PEOPLE ARE MASSACRED WHEN THE LORD`S RESISTANCE ARMY ATTACK AN UNDEFENDED HOSPITAL. AMONGST THE DEAD ARE 32 AMERICAN MEDICAL VOLUNTEERS. SEPTEMBER 12, UN SECURITY COUNCIL: THE US ANNOUNCES ITS PLAN TO ERADICATE THE LORD`S RESISTANCE ARMY ONCE AND FOR ALL. BUT IT WILL MEAN MILITARY INTERVENTION IN CHINA`S AFRICAN SPHERE OF INFLUENCE. THE MESSAGE FROM THE CHINESE IS KEEP OUT. OCTOBER 17, WALL STREET: STOCK PRICES TUMBLE AS A WAVE OF UNCERTAINTY SWEEPS THE US MARKETS. MEMORIES OF THE COLLAPSE A DECADE AGO ARE STILL FRESH, AND WASHINGTON IS PREPARED TO DO WHAT IT TAKES TO PROP UP AMERICA`S BANKS. BUT THE GOVERNMENT`S CONCERN IS THAT THIS TIME THE TURMOIL IS ORCHESTRATED. THAT SOMEONE IS DELIBERATELY UNDERMINING THE US MARKETS. THREE UNRELATED INCIDENTS, OR THE OPENING MOVES IN A MUCH LARGER CONFRONTATION BETWEEN TWO SUPERPOWERS?
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची हजारो-लाखो कोटींची गुंतवणूक आहे. ह्या आर्थिक सामथ्र्याच्या जोरावर चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अक्षरश: उलथापालथ घडवू शकते. त्यातून मग ह्या दोन महासत्तांमधील लष्करी संघर्षाला सुरुवात होईल का? ह्या दोघांत युद्ध भडकले, तर संपूर्ण जगच त्या वणव्यात होरपळणार हे नक्की.चीन व अमेरिकेच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्याही क्षणी भडका उडेल, अशी परिस्थिती आहे. पण हा केवळ आर्थिक किंवा लष्करी संघर्ष आहे का की, त्या मागे काही मूलभूत कारणे आहेत? जगाला भेडसावणा-या ह्या प्रमुख समस्या सर्वव्यापी आहेत, मग प्रत्येक राष्ट्राने त्या केवळ आपल्या हिताचा विचार करून सोडवायचा प्रयत्न केला, तर हितसंबंधाचा संघर्ष अटळ आहे.थ्रिलरचा रोमांचकारी अनुभव देतानाच विचारप्रवृत्त करणारी कादंबरी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #ENDGAME #ENDGAME #एन्डगेम #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #UDAYKULKARNI #MATHEWGLASS "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA SATARA 11-1-2015

    अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत चीनची हजारो-लाखो कोटींची गुंतवणूक आहे. ह्या आर्थिक सामर्थ्याच्या जोरावर चीन अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत अक्षरश: उलथापालथ घडवू शकतो. त्यातून मग दोन महासत्तांमधील लष्करी संघर्षाला सुरूवात होईल का? ह्या दोघांत युद्ध भडकले, तर संपर्ण जगच त्या वणव्यात होरपळणार हे नक्की. चीन आणि अमेरिकेच्या युद्धनौका समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. कोणत्याही क्षणी भडका उडले, अशी परिस्थिती आहे. पण हा केवळ आर्थिक किंवा लष्करी संघर्ष आहे की त्या मागे काही मूलभूत कारण आहेत? जगाला भेडसावणाऱ्या ह्या प्रमुख समस्या सर्वव्यापी आहेत, मग प्रत्येक राष्ट्राने त्या केवळ आपल्या हिताचा विचार करून सोडवायचा प्रयत्न केला तर हितसंबंधांचा संघर्ष अटळ आहे. थ्रिलरचा रोमांचकारी अनुभव देतानाच विचारप्रवृत्त करणारी कादंबरी. ...Read more

  • Rating StarSAMNA 23-8-2015

    चीन आणि अमेरिका यांच्यातील दुश्मनी जगजाहीर आहे. त्यांच्यातील सुप्त संघर्षाची ही कादंबरी राजकीय डावपेचाची क्रूर कहाणी आहे. लेखक मॅथ्यू ग्लास हा एका अज्ञात ठिकाणी ब्रिटनमध्ये राहतो. हे त्याचे टोपणनाव आहे. या कादंबरीत अर्थातच अनेक पात्रे आहेत. राजकीय पा्श्वभूमीच्या कथानकात हे अपरिहार्य असते. युद्धपिपासू संरक्षणमंत्री एका भल्यामोठ्या देशाचे भवितव्य धोक्यात आणू शकतो. अमेरिकन राजदूत एक स्त्री असेल तर काय होऊ शकते. याचा भावी इतिहास नोंदविणारी ही वेगवान कहाणी घटनांना अधिक महत्व देऊन फुलविली आहे. भविष्यकाळात बुद्धिमत्तेच्या बळावर शहकाटशह देत मोठे देश एकमेकांवर कशी मात करु शकतील त्याचा अंदाज द्रष्टेपणाने इथे दिलेला आहे. डॉ. स्ट्रॅनगेलव्ह आणि गार्डन गेको ही महत्वाची पात्रे कोणता विध्वंस करु शकतील? वॉल स्ट्रीट, व्हाईट हाऊस, पेंटगॉन यांच्यातील संघर्ष अटळ आहे का? बरं, एकमेकांशी संघर्ष करणारी ही बलवान स्थळे जिंकतात का? बड्यांच्या झगड्यात छोटे हकनाक बळी का जातात? इसवी सन २०१८ मध्ये असे काही घडू शकते. पन्नास वर्षांपूर्वी क्युबा येथील बेटावर क्षेपणास्त्राचा एक पेच निर्माण झाला होता. त्यावरुन कादंबरीचा अखेरचा भाग रंगलेला आहे. भौगोलिक राजकीय कादंबरी हा प्रकार या कादंबरीची उल्लेखनीय बाजू आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.