RAM PRADHAN

About Author

Birth Date : 27/06/1928
Death Date : 31/07/2020


DURING THE PERIOD 1960 TO 1965, RAM PRADHAN GOT THE OPPORTUNITY TO PARTICIPATE IN THE CONSTRUCTION OF THE NEW MAHARASHTRA WHILE WORKING AS THE SECRETARY TO YASHWANTRAO CHAVAN, THE FIRST CHIEF MINISTER OF MAHARASHTRA. ALSO, WHEN YASHWANTRAOJI WAS THE DEFENSE MINISTER, HE PARTICIPATED IN IMPORTANT WORK LIKE RESTRUCTURING OF THE INDIAN DEFENSE FORCE.

१९६० ते १९६५ या काळात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सचिव म्हणून काम करत असताना नवीन महाराष्ट्राच्या जडणघडण कार्यात सहभागी होण्याची संधी राम प्रधान यांना मिळाली. तसेच यशवंतरावजी संरक्षणमंत्री असताना भारतीय संरक्षण दलाची पुनर्रचना यासारख्या महत्त्वाच्या कार्यात त्यांनी भाग घेतला होता. १९६६ ते १९७७ या काळात त्यांनी जिनिव्हा येथे भारताचे प्रतिनिधित्व केले. १९७२ ते १९७७ या काळात युनोमध्ये संचालक पदावर असताना अविकसित देशांना वाणिज्य व विकास क्षेत्रांमध्ये सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. १९७७-१९८१ या काळात ते महाराष्ट्र राज्याचे गृहसचिव आणि १९८२-१९८५मध्ये राज्याचे मुख्यसचिव होते. तद्नंतर १९८५-८६ साली त्यांनी भारताचे गृहसचिवपद सांभाळले. त्याच काळात पंजाब, आसाम व मिझोराम हे महत्त्वाचे करार त्यांनी केले. भारतीय प्रशासकीय सेवेत ३४ वर्षे सेवा करून ३० जून, १९८६ रोजी ते निवृत्त झाले. कर्तृत्वसंपन्न लोकसेवेबद्दल १९८७ च्या प्रजासत्ताकदिनी त्यांना पद्मभूषण हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना अरुणाचलचे राज्यपाल म्हणून नेमण्यात आले. १९९०-१९९२ या वर्षांत महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य होते. त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके : राजीव गांधींच्या सहवासात वादळ माथा शब्दांचे सामर्थ्य यशवंतराव चव्हाण यांची संसदेतील भाषणे (४ खंड) बंधनाचे ऋण पहिली फेरी? - १९६५ भारत-पाक युद्ध
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
MAZI VATACHAL : METCALFE HOUSE TE RA... Rating Star
Add To Cart INR 500
PAHILI PHERI? Rating Star
Add To Cart INR 150
VADAL MATHA TE 1965 BHARAT-PAK YUDDHA Rating Star
Add To Cart INR 395

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more