BATTA BINDU

About Author

Birth Date : 18/09/1954


BINDU BHAT IS A GUJARATI LANGUAGE NOVELIST, STORYWRITER, CRITIC AND TRANSLATOR FROM GUJARAT, INDIA. HER NOVEL AKHEPATAR (1999) RECEIVED THE SAHITYA AKADEMI AWARD FOR THE YEAR 2003. HER OTHER SIGNIFICANT WORKS INCLUDE MIRA YAGNIKNI DAYARI (1992) AND BANDHANI

बिन्दु भट्ट, या गुजरात विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अहमदाबादच्या एका कॉलेजमध्ये हिंदीच्या प्राध्यापिका आहेत. हिंदी वाङ्मयाचा अभ्यास करून त्यांनी एम.ए.,पीएच.डी. केले आहे. वयाच्या पन्नाशीला पोहोचेपर्यंतच त्यांनी लघुकथा, टीकात्मक लेख, कादंबरी लेखन, अनुवाद अशा विविध स्वरूपाचे विपुल लेखन केले आहे. दोन स्त्रियांच्या समलिंगी संबंधाचा विषय हाताळणारी त्यांची पहिली कादंबरी म्हणजे ‘मीरा याज्ञिकनी डायरी’. ‘अखेपातर’ या दुसNयाच कादंबरीला साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला, ही खरोखर विशेष कौतुकास्पद गोष्ट आहे. याचा हिंदी, सिंधी, मराठी, कच्छी अशा अनेक भाषांतून अनुवाद झाला आहे. त्यांनी लघुकथा (बांधणी-२००९) हा साहित्यप्रकारही हाताळला असून, अनुवाद प्रकारात गुजराती साहित्याचा हिंदी अनुवाद- अपभ्रंश व्याकरण,आंधळी गली, तसेच ‘फणीश्वरनाथ रेणू’ यांच्यावरील सुरेंद्र चौधरी यांचा व दादू दयाळ यांच्यावरील राम बक्श यांनी लिहिलेल्या प्रबंधांचा गुजराती अनुवादही केला आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
AKSHAYPATRA Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more