* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789968
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NANA PHADNIS WAS A SHREWD POLITICIAN. MAHADAJI SHINDE WAS A GREAT BRAVE MARATHA WARRIOR. THEY BOTH WERE ABLE-MINDED PERSONS WITH HIGH CALIBER. THE MARATHAS GAINED CREDIT, PRESTIGE AND SUCCESS OWING TO THE WORK ACCOMPLISHED BY THESE TWO. FOR THESE TWO, THE WELFARE OF THEIR COUNTRY WAS GREATER THAN THEIR PERSONAL OPINION, DIFFERENCES, ASPIRATIONS, ETC. THIS NOVEL BRINGS INTO LIGHT THE JOINT EFFORTS BY THE SELFLESS DUO. THEIR POLITICAL CAREER SPANS ABOUT HALF CENTURY, OF WHICH THE NOVEL GIVES US JUST A GLIMPSE; THAT DURING 1772 TO 1784.
राजकारणमुत्सद्दी नाना फडणीस आणि समशेरबहाद्दर महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील कर्तबगार पुरुष होते. खरेतर या दोघांच्या कार्य-कर्तृत्वामुळेच संपूर्ण हिंदुस्थानात मराठे प्रबळ झाले व मराठेशाही कळसाला पोहोचली! या दोघांनी केवळ राष्ट्रहिताकरिता वैयाQक्तक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून बजावलेल्या संयुक्त कामगिरीला उजाळा देणारी कादंबरी! अर्थात, या दोघांची राजकीय कारकीर्द सुमारे पन्नास वर्षांइतकी प्रदीर्घ असल्याने, ही केवळ त्यांच्या कामगिरीची झलक म्हणावी लागेल. कारण या कादंबरीमध्ये सन १७७२ ते १७८४ असा एका तपाचाच काळ आला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANA#MAHADJI#THORLEMADHAVRAO#BALAJIVISHWANATHPAHILAPESHWA#CHIMAJIAPPA#RAGHOBADADA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 08-NOV-2019

    गारद्यांनी नारायणराव पेशव्यांची हत्या केल्यानंतर पेशवाई रसातळाला जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली असताना नाना फडणवीस आणि महादजी शिंदे पेशवाईचे तारणहार ठरले. त्यांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे मराठेशाही कळसाला पोहोचली. त्यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा कुदन तांबे यांची ‘नाना आणि महादजी’ ही कादंबरी घेते. थोरल्या माधवराव पेशव्यांचा १९७२मध्ये वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे गादीवर आले. मात्र काका रघूनाथरावांकडून भित्र्या स्वभावाच्या नारायणरावांची हत्या केली जाते. त्यासाठीची कटकारस्थाने, गारद्यांना लावलेली फूस यांनीच कादंबरीची सुरुवात होते. त्यानंतर गादीवर बसण्याचे रघुनाथराव उर्फ राघोबादादांचे मनसुबे नाना फडणवीस आणि रघूनाथरावांकडून कसे उधळले जातात याचे वर्णन आहे. नारायणरावांच्या हत्येनंतर राघोबादादांमुळे मराठेशाहीत फूट पडली, मात्र नाना फडवीसांच्या मुत्सद्देगिरीमुळे मराठेशाही तरली हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने या कादंबरीत केला आहे. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांमध्ये नाना फडणवीसांना अर्धे शहाणे समजले जाते. कारण तलवारबाजीत ते वाकबगार नसले तरी त्यांची चतुराई व मुत्सद्देगिरी वाखाण्याजोगी होती. प्रत्यक्ष युद्धात भाग न घेताही कुटनीतीमुळे अनेक लढाया त्यांनी जिंकलेल्या आहेत. राघोबादादांना रोखण्यासाठीचे त्यांचे राजकीय डावपेच या कादंबरीत उलगडून दाखवले आहेत. खरे म्हणजे नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांची कारकिर्द ५० वर्षांची. मात्र या कादंबरीने माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतरचा म्हणजे १७७२ ते १७८४ या एका तपाचा काळ वर्णिला आहे. रघुनाथरावांना पेशवाईपासून दूर ठेवण्यासाठी केलेले बारभाईचे कारस्थान या कादंबरीत सविस्तरपणे देण्यात आले आहे. या कादंबरीत नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा असला तरी कादंबरीतील बहुतेक भागांत नानांचे कर्तृत्व दाखवण्यात आले आहे, तरीही महादजी शिंदे यांची मुत्सद्दी आणि शौर्य यांचीही माहिती कादंबरीत देण्यात आली आहे. ही कादंबरी नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्यावर आधारित असली तरी पेशवाईच्या इतिहासातील अनेक व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे स्वभाववर्णन कादंबरीत देण्यात आले आहे. रघूनाथरावांची कपटनीती, साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले सखारामबापू बोकील यांची गोंधळलेली स्थिती, न्यायमूर्ती रामशास्त्री यांचा करारी बाणा, पतीच्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांच्या कूटनीतीत समील झालेल्या आनंदीबाई, पेशवाईतील गोंधळाचा फायदा घेण्यासाठी आतुर इंग्रज गव्हर्नर हॉर्नबी या विविध स्वभावांच्या व्यक्तींचा आढावाही या कादंबरीत घेण्यात आला आहे. सखारामबापू बोकील हे पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक मानले जातात. मात्र कठीण प्रसंगी त्यांचा झालेला गोंधळ लेखकाने उत्कृष्टरित्या मांडला आहे. सखारामबापूंना आपल्या बाजूने वळवण्यात नानांनी दाखवलेली चाणाक्षनीती लेखकाने मांडली आहे. बापूंच्या मनात इंग्रजांविषयी चीड निर्माण व्हावी यासाठी नाना त्यांना सांगतात, ‘‘पुण्यश्लोक अहिल्याबाईनी म्हटल्याप्रमाणे इंग्रज हा अस्वलासारखा महाभंयकर शत्रू आहे. एकवेळ वाघ परवडला कारण तो मर्दाप्रमाणे लढून मारेल! म्हणून आपण सर्वांनी मिळून टोपीकर इंग्रजांना नेस्तनाबूत केलं पाहिजे.’’ त्याशिवाय कोणाचीही भीड न बाळगणार्या न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे यांच्या निष्पक्ष न्यायदानावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे. हे चरित्र नसून कादंबरी असल्याने काल्पनिक प्रसंगांचा वापर केल्याची कबुली लेखकाने प्रस्तावनेतच दिली आहे. मात्र काही प्रसंग इतिहासाशी विसंगत असल्याचे जाणवते. ‘नारायणरावांना धरा’ असे आदेश रघूनाथरावांनी केल्यानंतर आनंदीबाईनी ‘ध’ चा ‘मा’ केला, असे इतिहास सांगतो. मात्र या कादंबरीत सुमेरसिंग गारद्याने रघुनाथरावांनी दिलेल्या चिठ्ठीत खाडाखोड करून ‘धरावे’च्या ऐवजी ‘मारावे’ केली, अशी नवी माहिती देते. कादंबरीतील काही काल्पनिक प्रसंग इतिहासाशी विसंगत वाटत असले तरी वस्तूस्थितीशी पूर्ण फारकत घेणारेही नाहीत. मराठेशाहीतील या दोन्ही कर्तबगार पुरुषांचे कर्तृत्व कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. इतिहासाशी विसंगत नाही घटना वगळता कादंबरी नाना आणि महादजी या दोन्ही कर्तबगार व्यक्तींना न्याय देणारी आहे. केवळ राष्ट्रहितासाठी वैयक्तिक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी बजावलेल्या संयुक्त कामगिरीला ही कादंबरी उजाळा देते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 23-09-2018

    पेशवाई काळावरील ऐतिहासिक कादंबरी... आजवर इतिहासातील निरनिराळे कर्तबगार पुरुष आणि स्त्रिया, तसेच घटना-प्रसंग-युद्धे यांवर अनेक नाटके-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. याच प्रकारातील नुकतीच प्रकाशित झालेली ऐतिहासिक कादंबरी म्हणजे कुंदन तांबे यांची ‘नानाआणि महादजी’. मेहता पब्लिशिंग हाऊसने ही कादंबरी प्रकाशित केली असून, ती या दोन व्यक्तिमत्त्वांचा मागोवा घेते. नाना फडणीस व महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील अत्यंत कर्तबगार पुरुष. जर हे दोघे नसते, तर थोरल्या माधवराव पेशव्यांच्या दुर्दैवी मृत्यूबरोबरच मराठेशाही संपुष्टात आली असती. या दोघांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे मराठेशाहीचा अंत नुसता लांबला नाही, तर मराठेशाही कळसाला पोहोचली. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मराठे प्रबळ झाले. या इतिहासातील नानांच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक त्यांच्या शत्रूंनीही करून ठेवले आहे; पण साहित्यात त्यांची म्हणावी अशी दखल घेतली गेली नाही. तसेच बादशाहीचा कारभार आपल्या हाती ठेवून मराठेशाहीवरील संकटप्रसंगी आपल्या तलवारीचे पाणी दाखविणाऱ्या महादजी शिंद्यांविषयीही फारसे काही लिहिले गेले नाही. काहींनी त्यांना अनुल्लेखाने मारले, तर काहींनी त्यांना एकमेकांचे शत्रू ठरवले. या कादंबरीत काल्पनिक प्रसंगांना भरपूर स्थान आहे. तरीही ती वाचनीय झाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more