* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789387789968
  • Edition : 1
  • Publishing Year : JULY 2018
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 172
  • Language : MARATHI
  • Category : HISTORICAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
NANA PHADNIS WAS A SHREWD POLITICIAN. MAHADAJI SHINDE WAS A GREAT BRAVE MARATHA WARRIOR. THEY BOTH WERE ABLE-MINDED PERSONS WITH HIGH CALIBER. THE MARATHAS GAINED CREDIT, PRESTIGE AND SUCCESS OWING TO THE WORK ACCOMPLISHED BY THESE TWO. FOR THESE TWO, THE WELFARE OF THEIR COUNTRY WAS GREATER THAN THEIR PERSONAL OPINION, DIFFERENCES, ASPIRATIONS, ETC. THIS NOVEL BRINGS INTO LIGHT THE JOINT EFFORTS BY THE SELFLESS DUO. THEIR POLITICAL CAREER SPANS ABOUT HALF CENTURY, OF WHICH THE NOVEL GIVES US JUST A GLIMPSE; THAT DURING 1772 TO 1784.
राजकारणमुत्सद्दी नाना फडणीस आणि समशेरबहाद्दर महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील कर्तबगार पुरुष होते. खरेतर या दोघांच्या कार्य-कर्तृत्वामुळेच संपूर्ण हिंदुस्थानात मराठे प्रबळ झाले व मराठेशाही कळसाला पोहोचली! या दोघांनी केवळ राष्ट्रहिताकरिता वैयाQक्तक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून बजावलेल्या संयुक्त कामगिरीला उजाळा देणारी कादंबरी! अर्थात, या दोघांची राजकीय कारकीर्द सुमारे पन्नास वर्षांइतकी प्रदीर्घ असल्याने, ही केवळ त्यांच्या कामगिरीची झलक म्हणावी लागेल. कारण या कादंबरीमध्ये सन १७७२ ते १७८४ असा एका तपाचाच काळ आला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#NANA#MAHADJI#THORLEMADHAVRAO#BALAJIVISHWANATHPAHILAPESHWA#CHIMAJIAPPA#RAGHOBADADA
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKMAT 08-NOV-2019

    गारद्यांनी नारायणराव पेशव्यांची हत्या केल्यानंतर पेशवाई रसातळाला जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली असताना नाना फडणवीस आणि महादजी शिंदे पेशवाईचे तारणहार ठरले. त्यांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे मराठेशाही कळसाला पोहोचली. त्यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा कुदन तांबे यांची ‘नाना आणि महादजी’ ही कादंबरी घेते. थोरल्या माधवराव पेशव्यांचा १९७२मध्ये वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी मृत्यू झाल्यानंतर त्यांचे धाकटे बंधू नारायणराव पेशवे गादीवर आले. मात्र काका रघूनाथरावांकडून भित्र्या स्वभावाच्या नारायणरावांची हत्या केली जाते. त्यासाठीची कटकारस्थाने, गारद्यांना लावलेली फूस यांनीच कादंबरीची सुरुवात होते. त्यानंतर गादीवर बसण्याचे रघुनाथराव उर्फ राघोबादादांचे मनसुबे नाना फडणवीस आणि रघूनाथरावांकडून कसे उधळले जातात याचे वर्णन आहे. नारायणरावांच्या हत्येनंतर राघोबादादांमुळे मराठेशाहीत फूट पडली, मात्र नाना फडवीसांच्या मुत्सद्देगिरीमुळे मराठेशाही तरली हे सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न लेखकाने या कादंबरीत केला आहे. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांमध्ये नाना फडणवीसांना अर्धे शहाणे समजले जाते. कारण तलवारबाजीत ते वाकबगार नसले तरी त्यांची चतुराई व मुत्सद्देगिरी वाखाण्याजोगी होती. प्रत्यक्ष युद्धात भाग न घेताही कुटनीतीमुळे अनेक लढाया त्यांनी जिंकलेल्या आहेत. राघोबादादांना रोखण्यासाठीचे त्यांचे राजकीय डावपेच या कादंबरीत उलगडून दाखवले आहेत. खरे म्हणजे नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांची कारकिर्द ५० वर्षांची. मात्र या कादंबरीने माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतरचा म्हणजे १७७२ ते १७८४ या एका तपाचा काळ वर्णिला आहे. रघुनाथरावांना पेशवाईपासून दूर ठेवण्यासाठी केलेले बारभाईचे कारस्थान या कादंबरीत सविस्तरपणे देण्यात आले आहे. या कादंबरीत नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्या कर्तृत्वाचा धांडोळा असला तरी कादंबरीतील बहुतेक भागांत नानांचे कर्तृत्व दाखवण्यात आले आहे, तरीही महादजी शिंदे यांची मुत्सद्दी आणि शौर्य यांचीही माहिती कादंबरीत देण्यात आली आहे. ही कादंबरी नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्यावर आधारित असली तरी पेशवाईच्या इतिहासातील अनेक व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे स्वभाववर्णन कादंबरीत देण्यात आले आहे. रघूनाथरावांची कपटनीती, साडेतीन शहाण्यांपैकी एक असलेले सखारामबापू बोकील यांची गोंधळलेली स्थिती, न्यायमूर्ती रामशास्त्री यांचा करारी बाणा, पतीच्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांच्या कूटनीतीत समील झालेल्या आनंदीबाई, पेशवाईतील गोंधळाचा फायदा घेण्यासाठी आतुर इंग्रज गव्हर्नर हॉर्नबी या विविध स्वभावांच्या व्यक्तींचा आढावाही या कादंबरीत घेण्यात आला आहे. सखारामबापू बोकील हे पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी एक मानले जातात. मात्र कठीण प्रसंगी त्यांचा झालेला गोंधळ लेखकाने उत्कृष्टरित्या मांडला आहे. सखारामबापूंना आपल्या बाजूने वळवण्यात नानांनी दाखवलेली चाणाक्षनीती लेखकाने मांडली आहे. बापूंच्या मनात इंग्रजांविषयी चीड निर्माण व्हावी यासाठी नाना त्यांना सांगतात, ‘‘पुण्यश्लोक अहिल्याबाईनी म्हटल्याप्रमाणे इंग्रज हा अस्वलासारखा महाभंयकर शत्रू आहे. एकवेळ वाघ परवडला कारण तो मर्दाप्रमाणे लढून मारेल! म्हणून आपण सर्वांनी मिळून टोपीकर इंग्रजांना नेस्तनाबूत केलं पाहिजे.’’ त्याशिवाय कोणाचीही भीड न बाळगणार्या न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभूणे यांच्या निष्पक्ष न्यायदानावर लेखकाने प्रकाशझोत टाकला आहे. हे चरित्र नसून कादंबरी असल्याने काल्पनिक प्रसंगांचा वापर केल्याची कबुली लेखकाने प्रस्तावनेतच दिली आहे. मात्र काही प्रसंग इतिहासाशी विसंगत असल्याचे जाणवते. ‘नारायणरावांना धरा’ असे आदेश रघूनाथरावांनी केल्यानंतर आनंदीबाईनी ‘ध’ चा ‘मा’ केला, असे इतिहास सांगतो. मात्र या कादंबरीत सुमेरसिंग गारद्याने रघुनाथरावांनी दिलेल्या चिठ्ठीत खाडाखोड करून ‘धरावे’च्या ऐवजी ‘मारावे’ केली, अशी नवी माहिती देते. कादंबरीतील काही काल्पनिक प्रसंग इतिहासाशी विसंगत वाटत असले तरी वस्तूस्थितीशी पूर्ण फारकत घेणारेही नाहीत. मराठेशाहीतील या दोन्ही कर्तबगार पुरुषांचे कर्तृत्व कादंबरीच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. इतिहासाशी विसंगत नाही घटना वगळता कादंबरी नाना आणि महादजी या दोन्ही कर्तबगार व्यक्तींना न्याय देणारी आहे. केवळ राष्ट्रहितासाठी वैयक्तिक मतभेद, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी बजावलेल्या संयुक्त कामगिरीला ही कादंबरी उजाळा देते. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 23-09-2018

    पेशवाई काळावरील ऐतिहासिक कादंबरी... आजवर इतिहासातील निरनिराळे कर्तबगार पुरुष आणि स्त्रिया, तसेच घटना-प्रसंग-युद्धे यांवर अनेक नाटके-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. याच प्रकारातील नुकतीच प्रकाशित झालेली ऐतिहासिक कादंबरी म्हणजे कुंदन तांबे यांची ‘नानाआणि महादजी’. मेहता पब्लिशिंग हाऊसने ही कादंबरी प्रकाशित केली असून, ती या दोन व्यक्तिमत्त्वांचा मागोवा घेते. नाना फडणीस व महादजी शिंदे हे पेशवाईच्या काळातील अत्यंत कर्तबगार पुरुष. जर हे दोघे नसते, तर थोरल्या माधवराव पेशव्यांच्या दुर्दैवी मृत्यूबरोबरच मराठेशाही संपुष्टात आली असती. या दोघांच्या अतुलनीय कर्तृत्वामुळे मराठेशाहीचा अंत नुसता लांबला नाही, तर मराठेशाही कळसाला पोहोचली. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये मराठे प्रबळ झाले. या इतिहासातील नानांच्या मुत्सद्देगिरीचे कौतुक त्यांच्या शत्रूंनीही करून ठेवले आहे; पण साहित्यात त्यांची म्हणावी अशी दखल घेतली गेली नाही. तसेच बादशाहीचा कारभार आपल्या हाती ठेवून मराठेशाहीवरील संकटप्रसंगी आपल्या तलवारीचे पाणी दाखविणाऱ्या महादजी शिंद्यांविषयीही फारसे काही लिहिले गेले नाही. काहींनी त्यांना अनुल्लेखाने मारले, तर काहींनी त्यांना एकमेकांचे शत्रू ठरवले. या कादंबरीत काल्पनिक प्रसंगांना भरपूर स्थान आहे. तरीही ती वाचनीय झाली आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
Ashwini Deshmukh, Pune.

This book holds a special place in my heart, especially because I come from Vidarbha, and the author`s writing resonates deeply with my roots. The stories are simple yet impactful, written in easy Marathi, making them accessible to all readers. What akes this book unique is how each story offers valuable life lessons—whether it`s about honesty, navigating real-life struggles, or the bonds we form with others. The humor woven throughout the stories adds a refreshing touch, making it enjoyable to read while also making you reflect on the deeper messages. The simplicity of the writing allows the book to flow seamlessly, leaving you eager to read the next story. It’s a perfect blend of life lessons, humor, and relatability. Overall, it`s a wonderful read that stays with you, reminding you of the little things that matter most in life. ...Read more

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
सौ. मिना जोशी, नागपूर.

`छाटितो गप्पा` वाचताना असे वाटते की रोजच्या जीवनातील साधे साधे प्रसंग अतिशय नेटक्या शब्दात गुंफलेले आहेत. छाटितो गप्पांची सहज सुलभ मांडणी खूपच भावली.