ERIC LOMAX

About Author

Birth Date : 30/05/1919


ERIC LOMAX WAS BORN IN 1919. DURING THE SECOND WORLD WAR HE WAS CAPTURED AND TORTURED BY THE JAPANESE ARMY AND FORCED TO WORK ON THE NOTORIOUS BURMA-SIAM RAILWAY. HE MET AND FORGAVE HIS TORTURER IN 1995. HE DIED IN OCTOBER 2012.

एरिक सुदरलॅन्ड लोमॅक्सचा जन्म ३० मे 1919 रोजी झाला. सोळाव्या वर्षी तो सॉर्टिंग क्लार्क आणि टेलिग्राफिस्ट या पदावर पोस्ट ऑफिसात कामाला लागला. तीन वर्षे तेथे नोकरी करून वयाच्या १९ व्या वर्षी तो ब्रिटिश लष्कराच्या रॉयल कोर ऑफ सिग्नल्स मध्ये रुजू झाला. सेकंड लेफ्टलंट म्हणून त्याला सिंगापूरच्या मोहिमेवर पाठवण्यात आले. सिंगापूरमधील ब्रिटिश फौजाच्या शरणागतीनंतर जपानी सैन्याने त्याला युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले. बर्मा रेल्वेच्या बांधकामासाठी नेण्यात आलेल्या लाखो युद्धकैद्यांपैकी तो एक होता. त्याने स्वतःसाठी बनवलेला त्याच्या छावणी परिसराचा व एकूण सियाम बर्मा सरहद्दीचा नकाशा जपान्यांच्या हाती लागला. शिवाय त्याने चोरून बनवलेला एक रेडिओ देखील त्यांना सापडला. जपान्यांच्या विरुद्ध बंड करण्याच्या कारस्थानाचा व छावणी बाहेरील काही फुटीरवादी गटांशी संगनमताचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. जपान्यांनी त्याला बेदम मारहाण केली व त्याचा नृशंस छळ केला. त्यांनी अपेक्षित असलेले सत्य त्याच्याकडून वदवून घ्यायचे होते. पाण्यात गुदमरवून टाकण्याचा देखील त्यानी लोमॅक्सवर प्रयोग केला. त्यानंतर सिंगापूरच्या औटराम रोड जेल मध्ये त्याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा एका जपानी मिलिटरी कोर्टाने केली. जपानच्या युद्धातील पराजयानंतर लोमॅक्स इंग्लंडला परतला व काही काळ कोलोनियल सव्र्हिसच्या अखत्यारीत त्याने धाना येथे नोकरी केली. ऐरिक लोमॅक्सचे लग्न १९४५ ला त्याच्या प्रथम पत्नीसोबत झाले. त्यांना तीन मुले झाली. १९८० मध्ये एरिकने वॅÂनेडियन नर्स पॅटीसोबत दुसरा विवाह केला. पॅटीच्या मदतीने एरिकची आपल्या जपानी छळकत्र्यांशी भेट घडून आली.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
THE RAILWAY MAN Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

CHHATITO GAPPA
CHHATITO GAPPA by G.B. DESHMUKH Rating Star
रत्ना सुदामे, ठाणे

`छाटितो गप्पा` हे पुस्तक मी एका बैठकीत वाचून काढले, अप्रतिम लेखन आहे. प्रत्येक प्रसंगाचे वर्णन वाचून प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एक तर अमरावती , नागपूर आणि इतर विदर्भातील गावे परिचित आहेत, त्यात मणीबाई गुजराती हायस्कूल ही अत्यंत आवडती शाळा तसेच `महाुद्र` हे पुस्तक वाचले असल्याने अनेक प्रसंग ओळखीचे वाटत होते. अनगळ मॅडम, झा काका, निरागस स्पर्धा, या गोष्टी मनाला भिडल्या. `सारी दुनिया का बोझ हम उठाते है ` पण मस्त. खूप सुंदर पुस्तक आहे. ...Read more

KAHANI PAHILYA AAGINGADICHI
KAHANI PAHILYA AAGINGADICHI by RAJENDRA AKLEKAR Rating Star
Sainath Chawali

श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more