* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: UNDER THE BANYAN TREE & OTHER STORIES
  • Availability : Available
  • Translators : NANDINI DESHMUKH
  • ISBN : 9789353173067
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :R. K. NARAYAN BIRTHDAY COMBO OFFER
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A DELIGHTFUL COLLECTION FROM INDIA`S FOREMOST STORYTELLER, UNDER THE BANYAN TREE ADDS TWENTY-EIGHT TALES OF THE RICH AND COLORFUL HERITAGE OF R K NARAYAN`S FICTIONAL SOUTH INDIAN CITY, MALGUDI. NARAYAN`S CHARACTERS, OBSERVED WITH A WRY AND COMPASSIONATE EYE, COME FROM EVERY AREA OF INDIAN SOCIETY - MERCHANTS, BEGGARS, HERDSMEN, HERMITS, TEACHERS, ROGUES - AND REPRESENT IN MINIATURE A WEALTH OF HUMAN EXPERIENCE. A REBELLIOUS YOUNG MAN REFUSES TO HONOUR A VOW MADE BY HIS PARENTS IN AN ANCESTRAL TEMPLE LONG AGO IN NITYA. A SHOPKEEPER IS MADE BANKRUPT BY A CHARMING STRANGER IN A CAREER. IN OTHER TALES, A SCHOOLTEACHER INDULGES FOR ONE TRAUMATIC DAY IN THE LUXURY OF TELLING THE TRUTH; A NERVOUS SMALL BOY, FORCED TO SLEEP ALONE TO PROVE HIS COURAGE, CATCHES A BURGLAR; A BROWBEATEN CLERK TRIUMPHS OVER HIS STARS, AND A GHOST IS LAID TO REST. OUTSTANDING IN THIS SUPERB BOOK IS THE MASTERPIECE A HORSE AND TWO GOATS, DRAWN FROM A COLLECTION NOW NO LONGER AVAILABLE, AND THE MARVELOUS TITLE STORY, ABOUT THE DIVINE GIFT OF STORYTELLING ITSELF. LIKE THE STORYTELLER IN UNDER THE BANYAN TREE, R K NARAYAN IS AN ENCHANTER, A WEAVER OF WORDS WHO KEEPS HIS AUDIENCE SPELLBOUND WITH THE RHYTHMS AND HAUNTING IMAGES OF HIS TALES. DRAWN FROM THE MARKET-PLACE, THE MOUNTAINSIDE, THE DUSTY STREET, THE RIVER BANK, THESE GENTLE, IRONIC, FINELY OBSERVED STORIES OF VILLAGE AND CITY LIFE DEMONSTRATE THE POWER OF FICTION AT ITS BEST
एक बंडखोर तरुण त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या लहानपणी पूर्वापार कुठल्यातरी देवळात जाऊन केलेला जुना नवस फेडण्याचा आदर करण्याऐवजी त्यांना नकार देतो... एक चलाख, चुणचुणीत दिसणारा तरुण मुलगा सगळ्यांवर छाप पडून विश्वास संपादन करतो आणि नंतर एका दुकानदाराचे दिवाळे काढतो... एक शिक्षक पालकांनी लाडावलेल्या लहान मुलाकडून अभ्यास करून घ्यायला येतो, पण तो मुलगा त्या शिक्षकाला अजिबात दाद न देता दुसऱ्याच गोष्टीत भरकटत ठेवतो...खुसखुशीत विनोदाची फोडणी असणाऱ्या आणि भोवतालाशी घट्ट वीण सांगणाऱ्या मालगुडीस्टाइल रम्य कथांचा संग्रह ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा.’
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आरकेनारायण #अंडरदबनयनट्रीअँडअदर स्टोरीज #अनुवादनंदिनीदेशमुख #वडाच्याझाडाखालीआणि इतरगोष्टी #नित्या #एकघोडाआणिदोनबक ऱ्या #चिप्पी # गवतामधलासाप #नारळाचावास #अण्णामलाई #वडाच्याझाडाखाली #सैतानाचाश्वास # मुकासोबती # अनावश्यकबोलणे #दोडू #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक#UNDERTHEBANYANTREE&OTHERSTORIES #VADACHAZADAKHALIANIETHARGOSHTI #RKNARAYAN #NANDINIDESHMUKH #MUKASOBATI #ANNAMALAI #VADACHAZADAKHALI #CHIPPI #NITYA #EKGHODAANIDONBAKRYA #GAVTAMADHALASAAP #NARALACHAVASS #DODU #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarVijay Bhadane

    पुस्तक परिचय पुस्तक :- वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा लेखक ;- आर के नारायण अनुवाद:- नंदिनी देशमुख आर के लक्ष्मणांच्या प्रभावशाली कथा ! "मालगुडी डेज" या गाजलेल्या दूरदर्शन मालिकेचे विख्यात कथालेखक आर के लक्ष्मण यांच्या "Under The Banyan Tee And Other Stories" या इंग्रजी पुस्तकाचा नंदिनी देशमुख यांनी केलेला मराठी अनुवाद "वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा हे पुस्तक वाचनात आले.28 कथांचा हा संग्रह वाचताना वाचक झपाटून जातो.आर के लक्ष्मण हे वेगळ्या धर्तीचे लेखक होते.आयुष्याच्या पूर्वार्धात रमताराम होउन ते इतस्ततः खुप भटकले. नदी,तलाव,बाजार,डोंगर दऱ्या,गर्दीची ठिकाणे इथे ते माणसांचे निरीक्षण करत.त्यांचे संवाद ऐकत,देवघेवीचे व्यवहार बघत. तिथे त्यांना कथासूत्र सापडे.म्हणून अनुभवाची विपुलता,समृद्धता त्यांच्या लिखाणात ठायी ठायी दृष्टीस पडते.साधीसरळ,संवादत्मक भाषाशैली,लयबद्धता यामुळेच त्यांच्या कथा मोहक,उत्कंठावर्धक,कसदार ठरतात. सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनाचे प्रतिनिधित्व करतात.परिस्थितीने पिचलेली तरी तीच्याशी नेटाने संघर्ष करीत जगणारी,भोळीभाबडी दयाळू व सर्वच वर्गातील आहे.लेखकाला मनमुराद भटकंतीत,सहज निरिक्षणातुन आपले कथानायक,पात्रे व कथाबीज सापडतात. प्रस्तुत पुस्तक" वडाच्या झाडाखाली" याच्या अनुवादक नंदिनी देशमुख यांनी खुप मेहनत घेउन वाचकाहाती मौल्यवान कथासंग्रह सुपूर्द केला आहे. अनुवाद करताना आर.कें च्या भाषेच ओघवतेपण जपुन दाक्षिणात्य संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पेलले आहे. उत्तम अनुवादीका ही ओळख निर्माण केली आहे. या साऱ्याच कथामध्ये विषयातील वैविध्य,हलकेफुलकेपणा, विनोद,गांभीर्य असे वैशिष्ट्य आढळते.नित्या ही पहिलीच कथा आधुनिकता व पारंपारिकता या दोन विचारसरणींचा संघर्ष दर्शविते.आपल्या जुन्या तत्वावर श्रध्दा, विश्वास असलेले नित्याचे आईवडील मुलाच्या सुधारित विचारांशी टक्कर देता देता मेटाकुटीला येतात त्यांची बाजू घ्यावी तर हे असे का? त्याला काही पुरावा आहे का? असे तर्कशुद्ध बोलणारा नित्याही वाचकांची मने जिंकून घेतो.दोन पिढ्यातील विचारमूल्यांचा संघर्ष लेखकाने छान रंगविला आहे. अर्ध्या रुपयांची किंमत या कथेत शोषक व शोषित,लोभी व गरजु या दोन प्रवृत्तीच दर्शन घडते.तांदळाचा अमाप साठा करून ठेवलेला,पैसे ठेवण्यास जागा नसलेला सुबय्या हा तांदळाचा व्यापारी तांदुळा अभावी भुकेने तडफडत असलेल्या एका गरिबाला केवळ अर्धा रुपया चे तांदूळ नाखुषीनेच देत असताना गोडाऊन मध्ये तांदुळाची थप्पी अंगावर पडून मरून पडतो शेवटी करावे तसे भरावे लागते हे लेखकाने या कथेत दाखविले आहे.अशा कितीतरीं मनाच्या ठाव घेणाऱ्या कथा या संग्रहात आहे शेवटची शीर्षक कथा या कथासंग्रहाची कळसाध्याय ठरावी अशी आहे.नंबी या वरदानप्राप्त व्यक्तीला वार्धक्यात मात्र गावकऱ्यांना गोष्टी सांगता येत नाही.एकाकी ती शक्ती नाहीशी होते.लेखकाला त्यामधून हेच सुचवायचे आहे की कुठल्याही प्रथितयश कलावंतांला कुठे थांबावे याचे तारतम्य,भान हवे अन्यथा इतर कोणी त्यास थांब म्हणतील हे खुप वाईट ठरेल ! विजय रघुनाथ भदाणे 686 रविवार पेठ नाशिक 9552213340 ...Read more

  • Rating StarPriyanka Tupe

    निखळ निर्मळतेचा शोध ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह अनुवादित साहित्यातील एक मौल्यवान ठेवा आहे. प्रियांका तुपे priyanka.tupe@expressindia.com ‘स्वामी अँड फ्रेंड्स’, ‘मालगुडी डेज’अशा अजरामर कथामालिका लिहिणारे आर. के. नाराण हे भारतीय भाषांतील प्रभावशाली कथाकारांपैकी एक आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह अनुवादित साहित्यातील एक मौल्यवान ठेवा आहे. या कथासंग्रहातील २८ कथा या काही दशकांपूर्वी लिहिलेल्या असल्या तरी सदाबहार आणि टवटवीत आहेत. भरपूर रंजन करणारी कथांमधली जिवंत पात्रं, खुमासदार शैलीतलं निवेदन, निखळ विनोद आणि दैनंदिन जगण्यातल्या गमतींसह टिपलेला विरोधाभास ही या कथांची ठळक वैशिष्टय़े आहेत. ‘नित्या’ ही यातील पहिलीच कथा आजच्या पिढीची वाटते. कथेचा नायक नित्या त्याच्या आई-वडिलांना प्रश्न विचारून भंडावून सोडतो. खरं तर नित्याच्या लहानपणी, त्याची प्रकृती सुधारण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी एक नवस केला होता. परंतु नित्या २० वर्षांचा झाला तरी नवस फेडणं काही शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आता त्याचे आई-वडील नवस फेडण्याची तयारी करत होते. नवसासाठी एका टेकडीवरच्या देवळात नेऊन त्याचं मुंडण करावं लागणार होतं. नित्याला हे कळताच तो खट्टू झाला. मुंडण करणं त्याला मान्य नव्हतं. त्यावरून त्याने आई-वडिलांना भरपूर प्रश्न विचारले. आई-वडिलांसोबत देवळात जाणं टाळण्यासाठी त्यानं भरपूर क्लृप्त्या केल्या. नवसाची गोष्ट कळल्यावर नित्या काय काय करामती करतो, आई-वडिलांना कसा चकवा देतो, याची ही कथा! वरवर पाहता अत्यंत साधीशीच. परंतु नित्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीतून लेखकाला अधोरेखित करायचा आहे तो – विवेकवाद. कोणतीही गोष्ट केवळ ज्येष्ठांनी सांगितली म्हणून करण्यापेक्षा प्रश्न विचारणं, संवाद करणं, तर्कबुद्धीचा वापर करणं अशा कित्येक बाबींची सुरेख गुंफण कथाकार चटकदार संवाद नि हलक्याफुलक्या विनोदाच्या आधारे करतो. कोणतीही गोष्ट सरधोपटपणे स्वीकारण्याऐवजी, असं का? असे प्रश्न विचारण्याची नित्याची वृत्ती आणि खूप निरागसपणे या कथेतून समोर येते. माणसातला निरागसपणा, सहजता नारायण यांच्या सर्वच कथांमध्ये दिसते. या कथा म्हणजे बोधकथा नव्हेत, तरीही विचार-मूल्यांचा संघर्ष त्यात आहे. माणसांचे विविध मनोव्यापार त्यात सहजपणे येतात. नैतिक-अनैतिकतेच्या चौकटी ठरवण्यापेक्षा माणसाच्या दैनंदिन जीवनात काय घडतं, याची दृश्य चित्रणं यात केलेली आहेत. ‘अर्ध्या रुपयाची किंमत’सारखी कथा सुबय्या या धनदांडग्या तांदूळ विक्रेत्याच्या क्रूरपणावर भाष्य करते. अर्धा रुपया कमी आहे म्हणून अन्नान्नदशा झालेल्या एका व्यक्तीला तांदळांसाठी तिष्ठत ठेवणाऱ्या सुबय्याचा, त्याच तांदळाच्या गोदामात, धान्याच्या गोण्या अंगावर पडून होणारा मृत्यू चटका लावून जातो. नुकताच चाळिशीत पदार्पण केलेला रामा राव स्वत:च्या वाढदिवसाची खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात जातो. पण घेतलेल्या नवीन कपडय़ांचे पैसे देताना त्याच्या लक्षात येतं, की त्याचं पाकीटच खिशात नाही. बहुतेक बसमधल्या गर्दीत पाकीट मारलं गेलं असावं, असा विचार करून तो निराशेनेच ते कपडे दुकानदाराला परत करतो. घरी जाण्यासाठी बसच्या तिकिटापुरतेही पैसे त्याच्याकडे उरत नाहीत, त्यामुळे त्याला चालत घरी जावं लागतं. दुसऱ्या दिवशी, सुटी घेतलेली असूनही तो कामावर हजर होतो. वाढदिवसाचा बेत सफल न झाल्याची घटना विसरून तो काम करू लागतो. सामान्य माणसाला, श्रमिक वर्गातील लोकांना साध्यासुध्या इच्छाही अनेकदा मारून टाकाव्या लागतात. जीवनाचा वेग, अभावग्रस्तता, असुरक्षितता यामुळे दु:ख करत बसणं त्यांना परवडत नाही. आनंद साजरा करणं आणि दु:ख करणं दोन्ही गोष्टी न परवडल्यानं कोटय़वधी सामान्य माणसं दररोज दिवस पुढे ढकलत राहतात. ती जिवंत असतात पण ‘जगत’ नाहीत. भांडवली जगातलं हे प्रखर वास्तव नारायण ‘चाळिशीतील फलप्राप्ती’ या कथेत अगदी सहजरीत्या सांगतात. संवेदनशीलपणे पाहिलेला भवताल उपहासगर्भ शैलीत रेखाटणं, माणसांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्या प्रसंगांमधील अंतर्विरोध विनोदी शैलीत प्रकट करणं, ही नारायण यांच्या एकंदर सर्वच लघुकथांमध्ये आढळणारी लेखनशैली आहे. माणसांच्या वर्तनव्यवहारांचं बारकाईने केलेल निरीक्षण, अनुभवांना कथात्मकतेची जोड देण्याची अफाट क्षमता यामुळे नारायण यांच्या कथा प्रचंड वाचनीय आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ या संग्रहातील कथांमधली पात्रं जितकी जिवंत, तितकंच रसरशीत वर्णन येतं ते यातल्या भौगोलिक प्रदेशांचं, प्राण्यांचं. कुत्रा, माकड, साप हे प्राणी या कथांमधून वेगळ्याप्रकारे भेटतात. दाक्षिणात्य समाज, तेथील भू-सांस्कृतिक प्रदेशांची वर्णनं निव्वळ वाचनीय आहेत. या कथांमधील अण्णामलाई, सुबय्या, रामा रावसारख्या व्यक्तिरेखा मनात घर करून राहतात. या कथा अनुवादित करताना त्यातलं ओघवतेपण अबाधित राखण्याचं मोठं आव्हान नंदिनी देशमुख यांनी यशस्वीरीत्या पेललं आहे. कथांमधील वर्णनं, संदर्भ दाक्षिणात्य संस्कृतीशी संबंधित असले तरीही ते परके वाटत नाहीत. उत्तम अनुवादानं ही किमया साधली आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 26-01-2020

    ‘मालगुडी’च्या पुनर्भेटीचा प्रत्यय... काही वर्षांपूर्वी ‘दुरदर्शन’वर ‘मालगुडी डेज’ नावाची मालिका प्रसारित व्हायची. खासगी वाहिन्या, दैनंदिन मालिका नसलेल्या त्या काळात ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. दक्षिण भारतातल्या मालगुडी या काल्पनिक; पण समृद् गावातल्या साध्याभोळ्या लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या घटनांवरील कथांवर आधारित ही मालिका होती. प्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांनी सन १९३५ मध्ये लिहिलेल्या या कथा मानवी स्वभाव, भावभावनांचं दर्शन घडवणाऱ्या आणि वास्तववादी असल्यानं प्रेक्षकांना भावल्या होत्या. आर. के. नारायण यांच्याच लेखणीतून साकारलेला ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा कथासंग्रह वाचताना ‘मालगुडी डेज’ची आठवण नक्कीच होते. या पुस्तकातल्या कथांनाही मालगुडी गाव आणि परिसराची पार्श्वभूमी लाभलेली आहे. कथेतली पात्रं साधीभोळी, काहीशी चित्रविचित्र स्वभावाची; पण तरीही आपलीशी वाटणारी आहेत. जगण्याची लढाई लढत असताना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर आधारित या कथा आहेत. कथांचं मूळ हे वैयक्तिक अनुभव, निरीक्षण आणि ऐकलेलं एखादं संभाषण यात असल्याचं लेखकानं प्रस्तावनेत म्हटलं आहे. या कथांमध्ये कुठंही मोठं नाट्य नाही, की धक्कादायक शेवट नाही... पण तरीही लेखकाची भाषा, ओघवती शैली यामुळे त्या गुंतवून ठेवतात. कथेतल्या पात्राच्या सुखदु:खाशी नकळतपणे वाचकाला जोडून घेतात. पुस्तकात एकूण २८ कथा आहेत. कथेतली पात्रं ही छोटी मुलं, तरुण, ज्येष्ठ अशी विविध वयोगटांतली आहेत, त्याचबरोबर शेतकरी, मेंढपाळ, व्यापारी, शिक्षक, पहारेकरी, मजूर, भिकारी अशी वेगवेगळ्या सामाजिक स्तरांतली आहेत. एका कथेत तर कुत्रा हीच मुख्य व्यक्तिरेखा आहे. अंधश्रद्धेविरुद्ध बंड करणारा नित्या आहे, तसाच आत्महत्या करणाऱ्या मुलीला आपण त्यापासून परावृत्त करू शकलो, ही खंत बाळगणारा आणि अनेक वर्षांनंतर ती जिवंत असल्याचा साक्षात्कार झालेला पहारेकरी आहे. जातीय दंगलीत होरपळणारा मित्र आहे. शेखरला सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागते, तर अनावश्यक बोलणं टाळून शास्त्री वाईट ग्रहांवर विजय मिळवतो. पैशांच्या लालसेनं दुकानमालकाला फसवून देशोधडीला लावणाऱ्या रामूला त्याच्या कर्माची फळं भोगावी लागतात, तर मालकाप्रती कर्तव्यदक्ष राहूनही शंकर चोरीच्या आरोपानं होरपळतो. एकटा झोपायला घाबरणारा छोटा स्वामी आणि पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करणारा आठ वर्षांचा दोडू... या दोघांच्या कथांतून छोट्यांची मानसिकता दिसते. भाषेच्या गोंधळामुळे एका परदेशी व्यक्तीला गावातल्या घोड्याचा पुतळा विकणाऱ्या मुनीची कथा मजेशीर आहे. मुनी त्या व्यक्तीला दोन बकऱ्या विकत देतो, प्रत्यक्षात ती व्यक्ती घोड्याच्या पुतळ्याचा व्यवहार करून त्याला पैसे देते. बकऱ्या मुनीच्या मागं पुन्हा घरी येतात, तेव्हा त्याची पत्नी त्याच्यावर अविश्वास दाखवून चोरी केल्याचा संशय घेते. असाच संशय रंगाची पत्नीही घेते, जेव्हा तो एका श्रीमंत कुटुंबाला त्यांचा विहिरीत पडलेला मौल्यवान हंडा काढून देऊन पैसे मिळवतो. या दोन्ही कथांमध्ये नायक जास्त पैसे मिळवण्याचे स्वप्न पाहत असतो, त्याचवेळी त्यांच्या बायका मात्र अचानक धनप्राप्ती अशक्य आहे, असा वास्तववादी विचार करत असतात. मालगुडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे, हे सिद्ध करण्याचा खटाटोप करणाऱ्या संशोधकाची कथाही मजेशीर आहे. चिप्पीची कथा प्राण्यांच्या भावभावनांचं दर्शन घडवते. मालकानं दुसरा छोटा कुत्रा आणला म्हणून चिडून हा चिप्पी घरातून निघून गेलेला असतो. मुका सामीच्या कथेतलं माकड त्याला अर्थार्जनासाठी मदत करत असतं. माकडाचे खेळ करून सामी पैसे मिळवतो; पण तेच माकड संधी मिळताच स्वत:ची सुटका करून घेऊन त्याला सोडून निघून जातं. डोळ्यांच्या ऑपरेशननंतर परिचारकाच्या मदतीनं परावलंबी जिणं लेखकाला जगावं लागतं. त्या दिवसांतले अनुभव लेखकानं ‘सैतानाचा श्वास’ कथेत लिहिले आहेत. बंगल्यावर अनेक वर्षं पहारेकरी, माळी म्हणून कामाला असलेल्या अण्णामलाईचं व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटलं आहे. शेवटची कथा आहे वडाच्या झाडाखाली गोष्ट सांगणाऱ्या म्हाताऱ्याची... थांबावं कधी आणि कुठं हे सांगणारी... साऱ्या कथा साध्याच; पण माणसाच्या स्वभावाचे कंगोरे टिपणाऱ्या, भोवतालच्या परिस्थितीचं सूक्ष्म निरीक्षण करणाऱ्या, प्रसंगी उपरोधिक भाष्य करणाऱ्या... कथांचा काळ जुना आहे. तसे अनेक संदर्भ ओघानं येतात; पण तरीही ती कथा आजची, तितकीच ताजीतवानी वाटते. नंदिनी देशमुख यांनी अनुवाद करताना लेखकाची शब्दांची गुंफण आणि ओघवती शैली कायम ठेवल्यानं या कथा खिळवून ठेवतात. – नयना निर्गुण ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 26-01-2020

    निखळ निर्मळतेचा शोध… ‘स्वामी अँड फ्रेंड्स’, ‘मालगुडी डेज’अशा अजरामर कथामालिका लिहिणारे आर. के. नारायण हे भारतीय भाषांतील प्रभावशाली कथाकारांपैकी एक आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ हा त्यांचा कथासंग्रह अनुवादित साहित्यातील एक मौल्यवान ठेवा आहे. या कथासंग्रहातील २८ कथा या काही दशकांपूर्वी लिहिलेल्या असल्या तरी सदाबहार आणि टवटवीत आहेत. भरपूर रंजन करणारी कथांमधली जिवंत पात्रं, खुमासदार शैलीतलं निवेदन, निखळ विनोद आणि दैनंदिन जगण्यातल्या गमतींसह टिपलेला विरोधाभास ही या कथांची ठळक वैशिष्टय़े आहेत. ‘नित्या’ ही यातील पहिलीच कथा आजच्या पिढीची वाटते. कथेचा नायक नित्या त्याच्या आई-वडिलांना प्रश्न विचारून भंडावून सोडतो. खरं तर नित्याच्या लहानपणी, त्याची प्रकृती सुधारण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी एक नवस केला होता. परंतु नित्या २० वर्षांचा झाला तरी नवस फेडणं काही शक्य झालं नव्हतं. त्यामुळे आता त्याचे आई-वडील नवस फेडण्याची तयारी करत होते. नवसासाठी एका टेकडीवरच्या देवळात नेऊन त्याचं मुंडण करावं लागणार होतं. नित्याला हे कळताच तो खट्टू झाला. मुंडण करणं त्याला मान्य नव्हतं. त्यावरून त्याने आई-वडिलांना भरपूर प्रश्न विचारले. आई-वडिलांसोबत देवळात जाणं टाळण्यासाठी त्यानं भरपूर क्लृप्त्या केल्या. नवसाची गोष्ट कळल्यावर नित्या काय काय करामती करतो, आई-वडिलांना कसा चकवा देतो, याची ही कथा! वरवर पाहता अत्यंत साधीशीच. परंतु नित्याच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीतून लेखकाला अधोरेखित करायचा आहे तो – विवेकवाद. कोणतीही गोष्ट केवळ ज्येष्ठांनी सांगितली म्हणून करण्यापेक्षा प्रश्न विचारणं, संवाद करणं, तर्कबुद्धीचा वापर करणं अशा कित्येक बाबींची सुरेख गुंफण कथाकार चटकदार संवाद नि हलक्याफुलक्या विनोदाच्या आधारे करतो. कोणतीही गोष्ट सरधोपटपणे स्वीकारण्याऐवजी, असं का? असे प्रश्न विचारण्याची नित्याची वृत्ती आणि खूप निरागसपणे या कथेतून समोर येते. माणसातला निरागसपणा, सहजता नारायण यांच्या सर्वच कथांमध्ये दिसते. या कथा म्हणजे बोधकथा नव्हेत, तरीही विचार-मूल्यांचा संघर्ष त्यात आहे. माणसांचे विविध मनोव्यापार त्यात सहजपणे येतात. नैतिक-अनैतिकतेच्या चौकटी ठरवण्यापेक्षा माणसाच्या दैनंदिन जीवनात काय घडतं, याची दृश्य चित्रणं यात केलेली आहेत. ‘अर्ध्या रुपयाची किंमत’सारखी कथा सुबय्या या धनदांडग्या तांदूळ विक्रेत्याच्या क्रूरपणावर भाष्य करते. अर्धा रुपया कमी आहे म्हणून अन्नान्नदशा झालेल्या एका व्यक्तीला तांदळांसाठी तिष्ठत ठेवणाऱ्या सुबय्याचा, त्याच तांदळाच्या गोदामात, धान्याच्या गोण्या अंगावर पडून होणारा मृत्यू चटका लावून जातो. नुकताच चाळिशीत पदार्पण केलेला रामा राव स्वत:च्या वाढदिवसाची खरेदी करण्यासाठी उत्साहाने बाजारात जातो. पण घेतलेल्या नवीन कपडय़ांचे पैसे देताना त्याच्या लक्षात येतं, की त्याचं पाकीटच खिशात नाही. बहुतेक बसमधल्या गर्दीत पाकीट मारलं गेलं असावं, असा विचार करून तो निराशेनेच ते कपडे दुकानदाराला परत करतो. घरी जाण्यासाठी बसच्या तिकिटापुरतेही पैसे त्याच्याकडे उरत नाहीत, त्यामुळे त्याला चालत घरी जावं लागतं. दुसऱ्या दिवशी, सुटी घेतलेली असूनही तो कामावर हजर होतो. वाढदिवसाचा बेत सफल न झाल्याची घटना विसरून तो काम करू लागतो. सामान्य माणसाला, श्रमिक वर्गातील लोकांना साध्यासुध्या इच्छाही अनेकदा मारून टाकाव्या लागतात. जीवनाचा वेग, अभावग्रस्तता, असुरक्षितता यामुळे दु:ख करत बसणं त्यांना परवडत नाही. आनंद साजरा करणं आणि दु:ख करणं दोन्ही गोष्टी न परवडल्यानं कोटय़वधी सामान्य माणसं दररोज दिवस पुढे ढकलत राहतात. ती जिवंत असतात पण ‘जगत’ नाहीत. भांडवली जगातलं हे प्रखर वास्तव नारायण ‘चाळिशीतील फलप्राप्ती’ या कथेत अगदी सहजरीत्या सांगतात. संवेदनशीलपणे पाहिलेला भवताल उपहासगर्भ शैलीत रेखाटणं, माणसांच्या दैनंदिन जीवनातल्या साध्या प्रसंगांमधील अंतर्विरोध विनोदी शैलीत प्रकट करणं, ही नारायण यांच्या एकंदर सर्वच लघुकथांमध्ये आढळणारी लेखनशैली आहे. माणसांच्या वर्तनव्यवहारांचं बारकाईने केलेल निरीक्षण, अनुभवांना कथात्मकतेची जोड देण्याची अफाट क्षमता यामुळे नारायण यांच्या कथा प्रचंड वाचनीय आहेत. ‘वडाच्या झाडाखाली आणि इतर कथा’ या संग्रहातील कथांमधली पात्रं जितकी जिवंत, तितकंच रसरशीत वर्णन येतं ते यातल्या भौगोलिक प्रदेशांचं, प्राण्यांचं. कुत्रा, माकड, साप हे प्राणी या कथांमधून वेगळ्याप्रकारे भेटतात. दाक्षिणात्य समाज, तेथील भू-सांस्कृतिक प्रदेशांची वर्णनं निव्वळ वाचनीय आहेत. या कथांमधील अण्णामलाई, सुबय्या, रामा रावसारख्या व्यक्तिरेखा मनात घर करून राहतात. या कथा अनुवादित करताना त्यातलं ओघवतेपण अबाधित राखण्याचं मोठं आव्हान नंदिनी देशमुख यांनी यशस्वीरीत्या पेललं आहे. कथांमधील वर्णनं, संदर्भ दाक्षिणात्य संस्कृतीशी संबंधित असले तरीही ते परके वाटत नाहीत. उत्तम अनुवादानं ही किमया साधली आहे. -प्रियांका तुपे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more

I HAVE A DREAM
I HAVE A DREAM by RASHMI BANSAL Rating Star
Krishna Diwate

‘स्टे हंग्री स्टे फूलीश’ आणि ‘कनेक्ट द डॉटस’ या बेस्ट सेलर पुस्तकाच्या लेखिका ‘समाजातल्या परंपरागत समस्या सोडवण्याचा नवा मार्ग शोधून काढणार्‍या वीस सामाजिक उद्योजकांच्या प्रेरणादायी कहाण्या’ हे वाक्य पुस्तकाचे पहिले पान उघडले आणि दिसले. त्यामुळे माझ कुतुहल चाळवले आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. मनोगतात लेखिका म्हणतात की, आता नव्या दमाचे, डोक्याने आणि मनाने ही विचार करणारे काही जण एखाद्याच्या नजरेतील दुःख ओळखतात, पेटून उठतात; पण ते त्याच्यावर विचार एखाद्या उद्योजकाप्रमाणे करतात. म्हणून ते ‘सामाजिक उद्योजक.’ नफा मिळविण्याचा हव्यास नसला तरी ते बिझनेस मधील तत्वे वापरून ती गोष्ट साध्य करतात. हे काही तरी वेगळे आपण वाचत आहोत असे मला वाटले. त्यामुळेच ते पुस्तक वाचायला घेतले. ह्या मध्ये वीस लोकांची चरीत्रे आहेत. ते सर्व भारतीय, उच्चशिक्षित तरूण तरूणी आहेत. कोणी त्यातील शास्त्रज्ञ आहेत तर कोणी मरिन बायोलॉजिस्ट, आयआयटी, आयआयएम ग्रॅज्युएट आहेत पण कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नाने ते अस्वस्थ झाले आणि नेहमीच्या मार्गाने न जाता वेगळीच वाट पकडली. पुस्तकात ‘रेनमेकर्स,’ ‘चेंजमेकर्स’ व ‘स्पिरिच्युअल कॅपिटॅलिस्ट’ असे तीन भाग आहेत. प्रत्येकात अनुक्रमे अकरा,सहा व तीन व्यक्तीमत्वांची ओळख करून दिली आहे. ‘सुलभ’ ही आधुनिक टॉयलेटस उभारणारे बिंदेश्वर पाठक ह्याच्या चरित्राने पुस्तकाची सुरुवात होते. जातीने बिहारमधील ब्राह्मण. पण लहानपणी टॉयलेटस साफ करणार्‍याला हात लावला त्यामुळे आजीने अक्षरशः शेण, गोमुत्र खायला लावले. पण त्याच बिंद्रेश्वरांनी अगदी योगायोगाने ह्याच क्षेत्रात काम करण्याचे ठरविले. अर्थात ही वाट निश्चितच सोपी नव्हती. अनेक हालअपेष्टा सोसत, जगाचे धक्के खात, अनेक समस्यांना तोंड देत आपले स्वप्न ‘सुलभ शौचालयाच्या’ माध्यमातून सुरु केले. तो सगळा खडतर प्रवास अर्थात पुस्तकातूनच वाचायला हवा. त्यासाठी त्यांनी केवळ ती यंत्रणा तयार केली नाही तर ती टॉयलेटस बांधून, त्यासाठी लागणारी प्रेरणा, शिक्षण, संभाषण, ट्रेनिंग, पाठपुरावा अशा सर्वच गोष्टी ‘सुलभ’ तर्फेच संभाळल्या जातात. सध्या ही संस्था स्वबळावर चालते. 100 ते 125 कोटी इतके तिचे वर्षाचे उपन्न आहे. इतकेच नाही पूर्वी जे लोक सफाईचे काम करत असत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च संस्था करत आहे. ‘सुलभ पब्लिक स्कूल’ नावाने शाळा सुरु केली आहे. तरूणांसाठी व्होकेशनल क्लासेस चालवले जातात. म्हणजे मिळालेला नफा पुन्हा त्याच सफाई कामगारांच्या कल्याणासाठी वापरला जातो. टॉयलेटस बांधून भरपूर पैसा मिळवता येतो हे वाक्य पचायला जरा जडच जाते. अनिता आहुजा ही दिल्लीत सुखवस्तू कुटूंबात रहाणारी सामान्य स्त्री. पण कचरा वेचणार्‍या मुलांचे हाल पाहून त्यांच्यासाठी काही तरी करावे असे तिने ठरविले. तिने 1998 मध्ये कॉन्झर्व्ह नावाची संस्था उभी केली. व त्यातून पहिला प्रोजेक्ट सुरु केला तो म्हणजे आजुबाजूच्या परिसरातील कचरा उचलून त्याचे कंपोस्टखत तयार करणे. कचरा गोळा करण्यासाठी चांगल्या ढकलगाड्या आणल्या, युनिफॉर्म, आय कार्डची सोय केली. 2002 पर्यंत एक पूर्ण वेळ काम करणारी मोठी संस्था बनली. त्याचवेळी त्यांनी प्लॅस्टीकच्या कचर्‍यावर प्रयोग सुरु केले. तिचे पती शलभ ह्यांनी बिटस पिलानी मधून इंजिनिअरींग केले आहे. त्यांच्या मदतीने तिने फॅक्टरी सुरु करण्याचे ठरविले. शलभने मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक शीटस निर्मिती करू शकेल असे मशीन तयार केले. त्यासाठी अर्थातच अनेक प्रश्न समोर उभॆ राहिले. चुका झाल्या, ठोकरा खाल्या पण त्यातून वाट काढत त्यांनी चिकाटीने प्रयत्न सुरुच ठेवले. आज दोघे मिळून कचर्‍यातील प्लॅस्टिक पिशव्या वापरून आकर्षक अशा हॅडबॅगस तयार करण्याचा कारखाना चालवतात. जे लोक सुरुवातीला केवळ कचरा उचलण्याचे काम करत होते, त्यांच्या काही कौशल्य दिसले की त्यांना वेगळे काढून ट्रेनिंग दिले जाते. मशीनवर असिस्टंटचे काम करू लागतात त्यातून काही लोक तर ग्रुप लिडर ही झाले आहेत. कटींग करणॆ, क्वालिटी तपासणॆ, फिनिंशींग, पॅकिंग अशी सर्व महत्वाची कामे ते करतात. आता ते कामगार झाल्यामुळॆ त्यांना चांगला पगार, प्रॉव्हिडंट फंड, ओव्हरटाईम अशा सुविधा मिळू लागल्या त्यापेक्षा ही जास्त त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळाली. त्यांच्या साठी हे नवीनच आहे. अनिता व शलभ दोघॆही मेहनत घेतात पण एनजीओ असून ही भरपूर पैसा कमावणे त्यांना चुकीचे वाटत नाही. कारण आज ह्या एका उद्योगामुळे कित्येक कुटूंबाची आर्थिक स्थिती बदलून गेली आहे. अशीच अजून एक प्रेरणादायी कथा दिल्लीतील रंगसूत्र कंपनी चालविणार्‍या सुमिता घोस ह्यांची. स्वतः ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर मास्टर इन इकॉनॉमिक्स ची पदवी घेतल्यावर संजॉय घोस ह्या या आय आर एम मधून शिक्षण घेतलेल्या ध्येयवादी तरूणाशी लग्न केले. पण दुर्दैवाने आसाममध्ये काम करत असताना त्यांची 1998 मध्ये उल्फाच्या अतिरेक्यांनी हत्या केली. त्यानंतर अनेक टक्केटोणपे खात, दोन लहान मुलांचा संभाळ करत सुमिताने ‘रंगसूत्र’ नावाची कंपनी काढली. त्याच्या मार्फत ती खॆडॆगावातल्या लोकांकडून कापड, शोभॆच्या वस्तू, बनवून घेते आणि त्या फॅब ईंडीयासारख्या प्रसिध्द कंपन्यांना विकते. जैसलमेर, बारमेर जिल्ह्यातले कारागिर तिच्यासोबत काम करत आहेत. अजून एक अशीच ध्येयवादी तरूणी म्हणजे इशिता खन्ना. डेहराडून मध्ये जन्म झालेली एक सर्वसामान्य मुलगी. पण निसर्गसंवर्धन आणि भूगोल या विषयांची आवड असलेली. म्हणूनच तिने आपल्या ग्रॅज्युएशन नंतर टाटा इंन्स्टीट्यूट मधून मास्टर्स केले. पर्यावरण क्षेत्रातच काम करायचे आहे हे निश्चित ठरवून तिने काही वर्षे नोकरी केली. त्यानंतर 2002 मध्ये नोकरी सोडून आपल्या दोन मित्रांसोबत स्पिती व्हॅलीमध्ये मूस नावाची एन्जीओ सुरु केली. तेथील स्थानिक महिलांचे ग्रुपस करून त्यांना तिथे असणार्‍या सीबक थॉर्न ह्या फळांच्या लागवडीचे ट्रेनिंग दिले. त्यावर प्रक्रिया करायला शिकवले. ही झाडॆ मातीला धरून ठेवतात त्यामुळे धूप रोखली जाते, शिवाय नायट्रोजन ही धरून ठेवत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. त्यामुळे ह्या फळांवर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे तिथल्या बायकांना चांगला रोजगार मिळू लागला. त्याचबरोबर तिने स्थानिक तरूणांना पर्यटकांना ट्रेक किंवा जीप सफारीसाठी नेणे, कॅम्प लावणे, गरज पडल्यास प्रथमोपचार करणे ही कामे ही करायला शिकवले. कारण हळूहळू तिथे पर्यटन वाढू लागले. ते इको-फ्रेंडली करण्याकडॆ तिच्या इकोस्पियर संस्थेचा भर आहे. आता दरवर्षी पर्यटनातून 35 ते 40 लाखाचे उत्पन्न मिळते.आणि त्यातून नफा ही मिळतो. इकोस्पियर संस्थेने शेजारच्य़ा ‘लाहुल’ व्हॅलीमध्ये ही विकास कामे सुरु केली आहेत. पर्वतावर तयार होणार्‍या कचर्‍याच्या समस्येवरही तिला काहीतरी करायचे आहे. तिची संस्था लोकांना मुद्दाम तिथले लोक किती अवघड परिस्थितीत रहातात हे दाखवते. अतिशय थंडीत तिथे तापमान मायनस 35 पर्यंत खाली गेल्यावर हॅंडपंपने पाणी काढणे सुध्दा किती कठीण होते हे सांगितले जाते. तेव्हा आपल्यासारख्य़ा पर्यटकांना काय काय करता येईल याबद्दल ती जागरूकता निर्माण करते. मूळात हे पुस्तक 2012 साली लिहिलेले आहे. त्यामुळे आता ह्या वेगवेगळ्या प्रकारचे काम करणार्‍या संस्थेचे काम या दहा वर्षात खूपच वाढले असेल यात काही शंका नाही. दीनबंधू साहू हे मरिन बायोलॉजिस्ट आहेत पण ते प्रयोगशाळेतून बाहेर पडून समाजासाठी काम करतात. ‘प्रोजेक्ट चिलका’ ह्या त्यांच्या संस्थेमार्फत ओरिसातील लोकांना समुद्राची शेती करायला शिकवतात. ओरिसा मधील पुरी येथे जन्म झालेल्या दीनबंधूनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत एमएसीला ॲडमिशन घेतली. परंतु योगायोगाने १९८७ मध्ये अंटार्क्टिक वर जाण्याची संधी मिळाली. नंतर पीएचडी पूर्ण केल्यानंतर अनेक देशांमध्ये नोकरी निमित्ताने फिरले. पण तरीही शेवटी दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये प्रोफेसर म्हणून काम सुरू केले. त्यांना समुद्री वनस्पती बद्दल विशेष आस्था होती; पण त्या बद्दल आपल्या देशात फारशी जागरूकता नव्हती. ही लागवड पर्यावरण पूरक असते शिवाय त्यातून स्थानिक लोकांना उत्पन्नाचे साधन मिळते. त्यासाठी डिएसटीने निधी मंजूर केला. मग त्यांनी चिल्का सरोवराची पहाणी केली, त्यामध्ये वाढू शकतील अशा चार जातींची निवड करून स्थानिक लोकांना समजेल अशा सोप्या भाषेत माहिती दिली. प्रात्यक्षिके दाखवली, वर्कशॉप्स घेतली. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांना रोजगार मिळू लागला. यातूनच पर्यावरण संरक्षण ही होऊ लागले. यातून त्यांना प्रत्यक्ष कांहीं आर्थिक फायदा होत नसला तरी ते म्हणतात, की आम्हाला दोघांना दिल्लीत चांगली नोकरी आहे. त्यामुळे पैसे कमावणे हा उद्देश नाही; पण अजून तीस वर्षांनंतर मला मी काही तरी काम केलेले दिसेल. असे जर काहीच तुम्हाला दिसणार नसेल तर जगायचे कशाला? भूषण पुनानी हे असेच अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी. मेडीकलची ॲडमिशन हुकल्यामुळे डेअरी कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. तिथे ही विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला. नंतर पीएचडी केले. ग्रामविकास शिकण्यासाठी आयआयएम मध्ये एमबीए केले. हे झाल्यावर 1979 मध्ये ब्लाईंड स्कूल मध्ये दोन वर्षांसाठी नोकरी सुरु केली ती सुधा ह्याच हेतूने की मॅनेजमेंट शिकताना जी थेअरी शिकलो ती विकासाच्या क्षेत्रात वापरता येईल का? हळूहळू त्यांना अनेक लोक मिळत गेले. सर्वांनी मिळून आज संस्था खूप मोठी केली आहे.त्यांनी काम सुरु केले तेव्हा फक्त एक कॅपस होता, आज गुजरात मध्ये आठ कॅपस आहेत. दहा लाख मूल्य असलेली संस्था आज दोन कोटी रुपयांची आहे. अपंग लोकांनी स्वावलंबी व्हावे ह्यासाठी संस्था काम करते. दृष्टीहीन मुली ब्यूटी पार्लरसारखे कोर्स चालवतात, फिजिओथेरपी शिकून सेंटर मध्ये काम करतात. विकास साधण्यासाठी योग्य व्यवस्थापनेची गरज असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हजारो लोकांच्या आयुष्यात नवा प्रकाश निर्माण करून त्यांना सामान्य आयुष्य जगण्याची संधी मिळवून दिली आहे. अशी ही एकापेक्षा एक वेगवेगळ्या प्रकारची माणसे. कोणत्या तरी ध्येयाने पछाडलेली . सामाजिक कार्य करत असतानाच त्या लोकांचे कल्याण कसे होईल असा विचार करणारी. लेखिकेने त्या सर्वांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या आहेत, त्यांचे काम प्रत्यक्ष पाहून जाणून घेतले आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित गोळा करून आपल्यासमोर मांडली आहे. त्यामुळेच त्या मनोगतात म्हणतात, ‘तुमचं आयुष्य कसे ही असले तरी इतरांसाठी एखादा क्षण द्या. इतरांना प्रेम, आनंद, चांगुलपण द्या. जितकं द्याल तितकं तुम्हाला परत मिळेल.’ हेच वाक्य मलाही अतिशय उर्जा देऊन गेले. माझ्याकडे जे आहे, जे मला देणे शक्य आहे ते निरपेक्षपणे ज्यांना गरज आहे त्याला देणे ह्या सारखा आनंद अजून काय असणार? ह्याच वाक्याने मी आपली ह्या आठवड्यात रजा घेते. उद्या पासून सुरु होणार्‍या नवीन सत्रासाठी सारिका ताईंना हार्दिक शुभेच्छा. ...Read more