* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: VIKASAN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662511
  • Edition : 3
  • Publishing Year : SEPTEMBER 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 136
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :V.S KHANDEKAR COMBO SET-119 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS COLLECTION INCLUDES V. S. KHANDEKAR`S SHORT STORIES WRITTEN DURING 1971 TO 1973. THEY ARE A PURE MIXTURE OF IMAGINATION, FEELINGS AND THOUGHTS. THE STORIES IN "VIKASAN`` HAVE A PURE YET SACRED STRENGTH OF ENTERTAINMENT. THEY LINGER INTO OUR MINDS FOR A LONG PERIOD OF TIME. THEY MAKE US VERY INTROSPECTIVE. THESE STORIES REFLECT NOT ONLY KHANDEKAR`S ARTISTIC DEVELOPMENTAL APPROACH BUT ALSO REFLECT HIS DEEP PONDERING OVER LIFE. THESE STORIES PICTURE THE CHARACTERS THAT ARE NOW QUITE OLD.THEY HAVE ACCEPTED THE DUALITY OF THEIR PRESENT LIVES UNWILLINGLY, BUT THE MEMORIES OF THEIR SWEET PAST LIVES LINGER IN THEIR MINDS. IN A WAY, THESE STORIES ARE THE LIGHT HOUSE FOR THE FUTURE GENERATION, BURNING WITH THE OIL OF EXPERIENCE AND MEMORIES OF THE OLDER GENERATION. THESE STORIES TRY TO TEACH US THAT `GRIHASTA DHARMA` WHICH IS THE THIRD STAGE OF LIFE IS ACTUALLY REBIRTH.NOBODY EVER REMEMBERS PAST LIFE. BEFORE MARRIAGE, OUR LIVES ARE CAREFREE LIKE THAT OF BUTTERFLIES, MARRIAGE CHANGES US INTO BIRDS, BUILDING NESTLES FOR THE YOUNG ONES, CARING FOR THEM. WE GET INVOLVED INTO THE ADJUSTMENTS WHILE TRYING TO GET THROUGH OUR NEW ROLES, AUTOMATICALLY FORGETTING OUR PAST LIVES. IS NOT MARRIAGE A REBIRTH AS IT MAKES US FORGET OUR PAST LIFE?
‘विकसन’ वि. स. खांडेकरांच्या सन १९७१ ते १९७३च्या काळात लिहिलेल्या भावकथांचा संग्रह. या कथांत कल्पना, भावना नि विचारांचा सुरेख संगम आढळून येतो. ‘विकसन’मधील कथांची सात्त्विक रंजनाची स्वत:ची अशी आगळी शक्ती आहे. या कथा वाचकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळत रहातात, त्या कथांतील वाचकांना अंतर्मुख करण्याच्या क्षमतेमुळे. खांडेकरांनी आपल्या जीवनाच्या उत्तरार्धात काहीशा स्वास्थ्यानी लिहिलेल्या ‘विकसन’मधील कथांत कला विकासाबरोबर गहरं असं जीवन चिंतनही आहे. जीवनातील वानप्रस्थाचं चित्रण करणाऱ्या या कथांतील पात्रांचं जीवन गतकालातील मधुर स्मृतींना जागवत वर्तमानाचं वैषम्य, कटु सत्य स्वीकारतं. येणाया नव्या पिढीला आपलं जीवनसंचित बहाल करणाया या संग्रहातील कथा भूतकाळाने वर्तमानास दिलेलं जीवन पाथेय होय. गृहस्थजीवन पुनर्जन्म असतो असं समजाविणाऱ्या या कथा सांगतात की पुढच्या जन्मात माणसास मागच्या जन्माचं थोडंच आठवतं ? लग्नापूर्वी आपण फुलपाखरं असतो... लग्नानंतर पाखरं होतो... पाखरांना घरटी बांधावी लागतात... पिलांना सांभाळावं लागतं... एका मागून एक तडजोडीत पूर्व जीवन विस्मरून नव्या जीवनात रममाण होतो. पूर्व जीवन विसरायला लावणारं लग्न पुनर्जन्मच नाही का ?
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
# 11TH JANUARY #YAYATI #AMRUTVEL #RIKAMA DEVHARA #SONERI SWAPNA- BHANGALELI #SUKHACHA SHODH #NAVI STRI #PAHILE PREM #JALALELA MOHAR #PANDHARE DHAG #ULKA #KRAUNCHVADH #HIRVA CHAPHA #DON MANE #DON DHRUV #ASHRU #SARTYA SARI #ABOLI #SWAPNA ANI SATYA #PHULE AANI KATE #JEEVANKALA #PAKALYA #USHAAP #SAMADHIVARLI PHULE #VIKASAN #PRITICHA SHODH #DAVABINDU #CHANDERI SWAPNE #STREE AANI PURUSH #VIDYUT PRAKASH #PHULE ANI DAGAD #SURYAKAMLE #SURYAKAMLE #DHAGAADACHE CHANDANE #DHAGAADACHE CHANDANE #PAHILI LAT #HASTACHA PAUS #SANJVAT #AAJCHI SWAPNE #PRASAD #CHANDRAKOR #KALACHI SWAPNE #ASHRU ANI HASYA #GHARTYABAHER #KAVI #MURALI #BUDDHACHI GOSHTA #BHAUBIJ #SURYASTA #ASTHI #GHARATE #MADHYARATRA #YADNYAKUNDA #SONERI SAVLYA #VECHALELI PHULE #KALIKA #MRUGAJALATIL KALYA #KSHITIJSPARSH #SUVARNAKAN #VANDEVATA #DHUKE #KALPALATA #MANDAKINI #AJUN YETO VAS FULANA #TISARA PRAHAR #VASANTIKA #RANPHULE #AVINASH #HIRWAL #MANJIRYA #SANJSAVLYA #MUKHAVATE #VAYULAHARI #MANZADHAR #CHANDANYAT #SAYANKAL #ZIMZIM #PAHILE PAN #ADNYATACHYA MAHADWARAT #VANHI TO CHETVAVA #GOKARNICHI PHULE #DUSARE PROMETHEUS : MAHATMA GANDHI #RANG ANI GANDH #RESHA ANI RANG #VAMAN MALHAAR JOSHI : VYAKTI ANI VICHAR #GOPAL GANESH AGARKAR : VYAKTI ANI VICHAR #KESHAVSUT : KAVYA ANI KALA #RAM GANESH GADAKARI : VYAKTI ANI VANGAMAY #PRADNYA ANI PRATIBHA #SAHITYA PRATIBHA : SAMARTHYA ANI MARYADA #GADHAVACHI GEETA ANI GAJRACHI PUNGI #SASHACHE SINHAVALOKAN #PAHILI PAVALA #EKA PANACHI KAHANI #RUTU NYAHALANARE PAN #SANGEET RANKACHE RAJYA # V. S. KHANDEKARANCHI KAVITA #TEEN SAMELANE #SAHA BHASHANE #ABHISHEK #SWAPNASRUSHTI #TE DIVAS TEE MANASE #SAMAJSHILPI #JEEVANSHILPI #SAHITYA SHILPI # AASTIK #SUSHILECHA DEV #RAGINI #MUKYA KALYA #INDRADHANUSHYA #ANTARICHA DIVA #NAVE KIRAN #AGNINRUTYA #KAVYAJYOTI #TARAKA #RANGDEVTA #ययाति # (ज्ञानपीठ पुरस्कार १९७६) #अमृतवेल #रिकामा देव्हारा #सोनेरी स्वप्नं-भंगलेली #सुखाचा शोध #नवी स्त्री #पहिले प्रेम #जळलेला मोहर #पांढरे ढग #उल्का #क्रौंचवध #हिरवा चाफा #दोन मने #दोन ध्रुव #विकसन
Customer Reviews
  • Rating StarDAINIK PUDHARI 17-11-2002

    आठवणीत राहणाऱ्या वास्तवकथा ‘विकसन’... वि. स. खांडेकरांच्या कथा वाचणे हा एक सात्विक आनंदाचा भाग असतो. जीवनसंदेश देणाऱ्या, मनावर सुसंस्कारांचा ठसा उमटविणाऱ्या अशा १९७१ ते १९७३ या तीन वर्षांतील काळात त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘विकसन’च्या नव्या रपात आपणासमोर येत आहे. या कथांचे संपादन डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी खूप परिश्रम घेऊन केले आहे. वि. स. खांडेकरांच्यावर त्यांची श्रद्धा, भक्ती त्यांच्या मनोगतामधून व्यक्त होते. मेहता पब्लिशिंग हाऊसने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणतात त्याप्रमाणे या कथासंग्रहातील कथा वाचून झाल्यानंतर खरोखर मनात रेंगाळत राहतात. यामध्ये भावना आविष्कार, कल्पना आणि विचार यांचा सुंदर मेळ घातलेला दिसून येतो. ‘जीवनासाठी कला’ हे ध्येय जोपासण्यासाठी वि. स. खांडेकरांनी उत्तमोत्तम कथा लिहिल्या. समाजप्रबोधन करण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले, याची साक्ष या कथांतून पुन्हा मिळते. या कथासंग्रहात एकूण बारा कथा आहेत. प्रत्येक कथा स्वतंत्र आणि संपन्न आशय घेऊन उभी ठाकते. ‘शरीर’ या कथेत नोकरीसाठी मुंबईला गेलेल्या आपल्या मुलाची दिनूची वाट पाहणाऱ्या आई-वडिलांच्या व्यथेची कथा साकारली आहे. शंकरभाऊ आणि गिरिजाबाई यांच्या आशेचा किरण दिनू असतो. फुटलेला थर्मामीटर टाकून दुसरा आणण्याचे धैर्य त्यांना होत नाही. टाचगं वस्त्र नेसून एखाद्या बाईने आपली लाज सांभाळण्याचा प्रयत्न करावा, तसा त्यांचा संसार सुरू असतो. दिनू येणार म्हटल्यावर दोघांना चैतन्य येते. मुलाच्या बॅगमध्ये त्याच्या मैत्रिणीचा ब्लाऊज सापडतो तोही तुकारामांच्या गाथेशेजारी, साप दिसावा तसे ते दचकतात. योग आणि भोग यांच्या प्रतिकांचा उत्तम मेळ कथेत दिसतो. ‘मनोरा’ ही कथा ही सामाजिक कार्यांचे पोकळ ढोंग उघडकीस करते. मध्यमवर्गीयांची बेगडी सहानुभूती कशी कुचकामी असते ते दाखवून देते. समाजातील ताळागाळातील मुलींनी शिकावे. आता आग्रह धरणाऱ्या सरोजिनीबाई प्रत्यक्षात मात्र अंजली आजगावकरला मदत करू शकत नाही. अध्यात्माची जीवनाशी सांगड घालणारी ‘मुंगी उडाली आकाशी’ ही कथा समाजातील उच्चभ्रू वर्गाचे खरे रूप प्रकट करते. स्मगलर, कॉन्ट्रॅक्टर, डॉक्टर ही सर्व पात्रं आजच्या समाजाचे खरे रूप समोर ठेवतात. ‘स्फोट’ ही कथा सध्याच्या घसरलेल्या नैतिक मूल्यावर प्रकाश टाकते. मालमत्तेवर कर बसू नये यासाठी पती-पत्नी घटस्फोटाचे नाटक करतात. ‘प्रीती’ ही कथा केवळ प्रेमकथा न राहता मानवाच्या मनाचा वेध घेणारी, विचार करावयास लावणारी दर्जेदार कथा आहे. तशीच ‘पुनर्जन्म’ हीसुद्धा एक प्रेमकथाच आहे. विवाहानंतर पूर्वजीवनातील प्रेम विसरून नवा संसार नव्या उमेदीनं थाटावा लागतो. लग्नानंतर त्याचा पुनर्जन्म होतो, असा सूर या कथेचा आहे. ‘विकसन’ ही कथा आई-मुलगा-आजी यांच्या प्रेमाचे भावबंधनाचे चित्रण करणारी आहे. आजीची खरी माया कळताच नातवाला आपली आजी रूपानेही सुंदर दिसू लागते. ‘तिला नोकरी कशी मिळाली’ ही कथा आजही मार्गदर्शक ठरते. जतुभाऊ आणि भाऊसाहेब उषाच्या वडिलांचे मित्र; पण ते तिला नोकरी देत नाहीत, प्रयत्नही करीत नाहीत. अभिनेत्री सुलक्षणा तिला नोकरी मिळवून देते. त्याचे श्रेय मात्र जतुभाऊ आणि भाऊसाहेब घेऊ पाहतात. जग हे ‘मयसभा’ कसे ठरते ते दाखवून देणारी ही वास्तव कथा ठरते. अशा या जगरहाटीच्या, ढोंगीपणाच्या, लबाडीच्या अनुभवातून नवजीवनासाठी जागृती देणाऱ्या कथा आहेत. वि. स. खांडेकरांच्या या कथा सोज्वळ, सुबोध आहेत. त्या बेगडी किंवा चटपटी नाहीत. जे जे जगात चालते त्याचे नेमके रूप टिपण्याचा प्रामाणिक प्रयत्न या कथात दिसतो. आजच्या काळात अशाच मूल्यांचे शिकवण देऊन समाजप्रबोधन करणारे साहित्य हवे आहे. ती कामगिरी ‘विकसन’ मधून उत्तम प्रकारे पार पाडली आहे. हेच या पुस्तकाचे मूल्य होय. -ज्ञानेश्वर म. कुलकर्णी ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL 03-04-2005

    परिणतप्रज्ञ प्रतिभेचा आविष्कार : विकसन... वि. स. खांडेकरांनी कादंबऱ्यांसोबतच अनेक कथाही लिहिल्या. त्या सर्व कथांचे संग्रहही वेळोवेळी प्रकाशित झाले. १९७२ मध्ये प्रकाशित झालेला ‘ढगाआडचं चांदण’ हा त्यांचा शेवटचा कथासंग्रह. तथापि त्यानंतरही त्यांनी आणखीकाही कथा लिहिल्या आहेत. दृष्टी अधू झाल्यामुळे त्यांचे कथालेखन काहीसे मंदावले होते; परंतु दिवाळी अंकांच्या संपादकांच्या आग्रहाखातर त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या पर्वातही काही कथा लिहिल्या. असंकलित स्वरूपात विखुरलेल्या त्या कथा डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी ‘विकसन’ या कथासंग्रहाच्या रूपाने संकलित केल्या आहेत व त्या संग्रहाला मार्मिक प्रस्तावनेची जोडही दिली आहे. हा कथासंग्रह वाचताना एक बाब ठळकपणे लक्षात येते की, या कथासंग्रहातील प्रत्येक कथा हा खांडेकरांच्या परिणतप्रज्ञ प्रतिभेचा आविष्कार आहे. इतकी वर्षे सातत्याने कथा, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इत्यादी स्वरूपाचे विपुल लेखन करणाऱ्या लेखकाने आयुष्यात जे अनेक अनुभव घेतले, ज्या वाटा धुंडाळल्या, त्यातून त्याला जे सत्य गवसले आणि त्या निमित्ताने त्याचे जे चिंतन झाले, त्याचे पाठबळ या कथांना आहे. त्या दृष्टीने या कथासंग्रहाचे शीर्षकही बोलके आहे, असे म्हणावे लागेल. अर्थात त्या शीर्षकाची एक कथा या संग्रहात आहेच. उदाहरणार्थ : पहिल्याच ‘शरीर’ या कथेत आई-वडील आणि मुले यांच्यातील भावनिक संबंधांचे ताणतणाव चित्रित केले जातात. एका अर्थानेही दोन पिढ्यांमध्ये कसे मानसिक अंतर पडत गेलेले असते, हे दर्शविणारी चिंतनशील कथा आहे. मुलांकडून आपल्या अपेक्षांची पूर्ती व्हावी ही प्रत्येकच आई-वडिलांची इच्छा असते; परंतु प्रत्येक वेळी तसे घडतेच असे नाही. उलट अशी अपेक्षा बाळगणे हेच काही वेळा अनाठायी ठरते; परंतु प्रत्येकाला हे कळतेच असे नाही. त्यामुळे अपेक्षाभंग पदरात पडतो. अशा अपेक्षाभंगाचे चित्रण खांडेकरांनी या कथेत केले आहे. खांडेकरांच्या साहित्यातून प्राध्यान्याने मध्यमवर्गीय समाजाचे, त्याच्या आशा-आकाक्षांचे आणि जाणिवांचे चित्रण येते. हा कथासंग्रही त्याला अपवाद नाही. मध्यमवर्गीयांच्या जाणिवांना असणाऱ्या मर्यादांचेही त्यांनी फार चांगले चित्रण काही कथांतून केले आहे. मध्यमवर्गीय माणसे आदर्शांच्या, ध्येयवादाच्या मोठमोठ्या गोष्टी करतात; परंतु प्रत्यक्ष कृतीची वेळ आली की, भित्रेपणा दाखवतात. ‘मनोरा’ या कथेतील शाळानिरीक्षक सरोजिनीबाई या एका शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलीला शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात; परंतु ती एका वेश्येची मुलगी आहे व तिलाही शारीरविक्रय करावा लागतो, हे त्यांना माहीत नसते. एके दिवशी ती मुलगी बाईच्या घरी येण्याची व पडेल ते काम करत शिक्षण करण्याची इच्छा व्यक्त करते. त्या वेळी मात्र त्या गडबडतात व तिच्याकडे कायमची पाठ फिरवतात. ‘प्रीती’, ‘पुनर्जन्म’ या थोड्या वेगळ्या कथा आहेत. विवाह हा मनुष्याच्या जीवनातील पुनर्जन्म आहे अशी कल्पना ‘पुनर्जन्म’ या कथेत त्यांनी मांडली आहे. विवाहापूर्वी फुलपाखरासारखे जगणारा माणूस विवाहानंतर पाखरू बनतो म्हणजे घरटे बनवितो. पूर्वीचे आयुष्य विसरून नव्या जोडीदाराबरोबर नवे आयुष्य जगू पाहतो. एका अर्थाने हा त्याचा पुनर्जन्मच असतो, असे खांडेकरांना वाटते. समाजवास्तव इतके भीषण आहे की शिक्षणाने मिळविलेली योग्यता आणि नोकरी यांचा काही संबंध उरलेला नाही. ‘तिला नोकरी कशी मिळाली?’ या कथेत या वास्तवाचे चित्रण खांडेकरांनी केले आहे. आलेल्या कडवट अनुभवांमुळे नोकरी मिळाल्यानंतर उषेला वाटते की, आपल्या पुस्तकी स्वप्नाळूपणाचे राई-राई एवढे तुकडे होत आहेत. जगाविषयी आपण केलेल्या साऱ्या कल्पना कोसळून पडत आहेत आणि हजारो वेडीवाकडी वळणे असलेले जीवन अत्यंत सत्य; पण दाहक स्वरुपात आपल्यापुढे प्रकट होत आहे. ‘विकसन’, ‘गोफ’ या कथांतून त्यांनी वृद्धांच्या मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी कथेत हे फारसे घडलेले नाही. ‘मनुष्य, पशू आणि दगड’ ही एका अर्थाने रूपककथाच आहे. खांडेकरांच्या एकूणच साहित्याला पडलेली मध्यमवर्गीय जाणिवांची आणि जीवनचित्रणाची मर्यादा या कथासंग्रहालाही आहेच असे असले तरी खांडेकरांचे असंकलित साहित्य संकलित करून ते एकत्रितपणे वाचकांना उपलब्ध करून देणे हा उपक्रम चांगला आहे. त्याबद्दल डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे अभिनंदन केले पाहिजे. -डॉ. रवींद्र ठाकूर ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 03-11-2002

    वि. स. खांडेकरांनी १९७१ ते ७३ या काळात लिहिलेल्या कथांचा संग्रह ‘विकसन’ या नावाने प्रकाशित झाला आहे. खांडेकरांनी लिहिलेल्या या कथा बहुतेक दिवाळी अंकांतून प्रकाशित झालेल्या असल्या तरी आजही त्या तितक्याच ताज्या वाटतात याचं कारण त्यातील भावना आणि विचार ांचा सुरेख मेळ हे आहे. ‘विकसन’ ही शीर्षक कथा एक लहान तीन-चार वर्षांचा मुलगा, त्याची कडक शिस्तीची आई, तिच्या मनाप्रमाणे वागणारे वडील आणि आजी या चार पात्रांभोवती गुंफलेली आहे. त्यातही वडिलांविषयी अवघा एकदाच उल्लेख आहे. आई, आजी आणि मूल यांच्या भावबंधांचं चित्रण करणारी ही कथा आहे. आजीकडे पाहण्याचा मुलाचा दृष्टीकोन कसा बदलत जातो ते अगदी बारकाव्यांसह खांडेकर लिहितात. ‘पुनर्जन्म’ ही एक प्रेमाच्या त्रिकोणाची कथा आहे. लग्न हा एका अर्थाने पती-पत्नी दोघांचा पुनर्जन्म असतो. लग्नानंतर पूर्वजीवन विसरून माणूस संसारात रमला पाहिजे, असे खांडेकर सांगतात. शरीर या कथेत मुलाच्या लग्नाची स्वप्नं पाहणारे आई-वडील आणि आर्थिक परिस्थितीमुळे लग्नाच्या बंधनात न पडू शकणारा मुलगा अखेर एका मुलीबरोबर खंडाळ्याच्या हॉटेलमध्ये राहतो हे समजल्यावर वृद्ध आईवडिलांना धक्का बसतो. प्रीती या कथेत शरीरापलीकडे जाऊन केलेले प्रेम कसे श्रेष्ठ ते लेखक सांगतात. खांडेकरांच्या लेखनामध्ये कोणत्याही गोष्टीची चांगली बाजू ते दाखवतात. बऱ्याचदा त्यांचे लेखन आदर्शवादाकडे जाणारे असते ही टीका होते. पण सामान्य माणसे आजही नीतिमूल्ये सांभाळून प्रामाणिकपणे जगणारी असतात. त्यामुळे ही टीका बरोबर नाही. पण ‘मनोरा’मधील सरोजिनीबार्इंसारख्या दांभिक व्यक्तीही समाजात असतात. त्यांचे चित्रण तर खांडेकरांनी केले आहे. ‘मुंगी उडाली’ मध्ये नैतिक अध:पाताचे चित्रण करताना खांडेकर अध्यात्म्य समजावतात. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more