* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TO CUT A LONG STORY SHORT
  • Availability : Available
  • Translators : LEENA SOHONI
  • ISBN : 9788177662948
  • Edition : 3
  • Publishing Year : JULY 2002
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 256
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :JEFFREY ARCHER COMBO - 32 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THESE FOURTEEN STORIES SHOW JEFFREY ARCHER`S GREAT SKILLS WITH A WIDE VARIETY OF CHARACTER, OF SUBJECT AND OF SETTING, BUT ALL WITH THAT TRADEMARK TWIST IN THE TAIL. EVERY READER WILL HAVE THEIR OWN FAVOURITES: THE CHOICES RUN FROM LOVE AT FIRST SIGHT ACROSS THE TRAIN TRACKS TO THE CLEVEREST OF CONFIDENCE TRICKS, FROM THE QUIRKS OF THE LEGAL PROFESSION X AND THOSE WHO ARE ABLE TO MANIPULATE BOTH SIDES OF THE BAR X TO THE CREATIVE FINANCIAL TALENTS OF A MEMBER OF HER MAJESTY`S DIPLOMATIC SERVICE X BUT FOR A GOOD CAUSE. THE LAST STORY, `THE GRASS IS ALWAYS GREENER`, IS POSSIBLY THE BEST PIECE ARCHER HAS WRITTEN, AND WILL HAUNT YOU FOR THE REST OF YOUR LIFE.
पात्रयोजना, कथानक, विषय आणि पाश्र्वभूमी या सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरणा-या जेफ्री आर्चर यांच्या कथांचा हा संग्रह. या सर्वच कथांतून जेफ्री आर्चर यांच्या लेखणीचे कसब आणि लालित्य दिसून येते. प्रत्येक वाचकाला या कथासंग्रहात स्वतःच्या पसंतीची एकतरी कथा हमखास सापडेल. यात रेल्वेस्टेशनवर समोरासमोरच्या प्लॅटफॉर्मवर झालेली नजरानजर व त्यातून फुलून आलेली प्रेमकथा आहे; प्रचंड आत्मविश्वासाने खेळलेल्या बाजीची कथा आहे, कायद्याला हवे तसे वाकवणा-या कायदेतज्ज्ञाची कथा आहे. तसेच, एका तरुणीची अत्यंत विलक्षण, सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. शेवटची ‘द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर’ अर्थात ‘दुरून डोंगर साजरे’ ही सर्वोत्कृष्ट म्हणावी अशी कथा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटाला जेफ्री आर्चर यांनी एक नाट्यपूर्ण कलाटणी दिलेली आहे. म्हणूनच हा शेवट धक्कादायक वाटतो. यातील अनेक विस्मयकारक कथा या सत्यघटनेवर आधारित आहेत.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #जेफ्रीआर्चर #JEFFREYARCHER #ANJANINARAVANE #AJITTHAKUR #SUDHAKARLAWATE #LEENASOHONI #NOTAPENNYMORENOTAPENNYLESS #नॉटअपेनीमोअरनॉटअपेनीलेस #SONSOFFORTUNE #सन्सऑफफॉर्च्युन #FALSEIMPRESSION #फॉल्सइम्प्रेशन #APRISONEROFBIRTH #अप्रिझनरऑफबर्थ #KANEANDABLE #केनअँडएबल #CATONINETALES #कॅटओनाइनटेल्स #TOCUTALONGSTORYSHORT #टूकटअलाँगस्टोरीशॉर्ट #ANDTHEREBYHANGSATALE #अ‍ॅण्डदेअरबायहँग्जअटेल PATHS OF GLORY पाथ्स् ऑफ ग्लॉरी "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 08-06-2003

    विस्मयकारक ‘सत्य’ कथा... सशक्त कथासूत्र, विषयाची अचूक निवड, समर्पक पात्रयोजना आणि वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमी अशा सर्वच बाबतीत उल्लेखनीय ठरणाऱ्या जेफ्री आर्चर यांच्या कथांचा संग्रह ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ १४ उत्कंठावर्धक कथांचा समावेश या संग्रहातअसून ८ कथा सत्यघटनांवर आधारित असल्याचे म्हटले आहे. आर्चर यांच्या खास धक्कातंत्राच्या वैशिष्ट्याने प्रत्येक कथा समृद्ध असून मानवी स्वभावाचे असंख्य कंगोरे या कथासंग्रहातून समर्थपणे अनुभवास येतात. आर्चर यांच्या स्वत:ला भावलेली ‘मृत्यूदेवता बोलते’ ही कथा. अत्यंत साधी व सोपी आणि तरी परिणामकारक कथनशैली हे तिचे वैशिष्ट्य वाचकांना खिळवून ठेवल्याखेरीज राहात नाही. विशेष म्हणजे हे वैशिष्ट्य पुढील प्रत्येक कथेत तेवढ्याच ताकदीने प्रकट होते. ‘नृत्य’ या विषयाबद्दल माणसाच्या मनात असलेली भावना, तिची परिणीती नियती आणि तिचे जीवनातील अनिवार्य स्थान, बुद्धिमत्ता आणि चलाखी, गुण आणि स्वार्थ अशा विविध भावभावनांचा मुक्त आविष्कार या कथासंग्रहातून अनुभवास येतो. अगदी सहज घडणाऱ्या दैनंदिन घटनांच्या मालिकेतून जीवन कसे नाट्यमय वळण घेऊ शकते. याचा जिवंत प्रत्यय आर्चर यांच्या प्रत्येक कथेतून अनुभवास येतो. व्यक्तीच्या जीवनविषयक धारणांचा प्रभाव अपरिहार्यपणे त्याच्या जीवनावर पडत असतो, हे या कथांतील व्यक्तिचित्रणात प्रकर्षाने जाणवते. माणूस विचार एक करत असतो आणि प्रत्यक्षात घडते मात्र वेगळे. कधी कधी तर अगदीच अनपेक्षित! मानवी जीवनतील हे सत्य हेच आर्चर यांच्या लेखनशैलीचेही वैशिष्ट्य आहे, जी वाचकमनावरील आपली पकड कधीच सैल होऊ देत नाही. हे अद्भूताहून अद्भूत असते, प्रत्यंतर देणाऱ्या या कथा म्हणूनच ठरतात. या कथासंग्रहाच्या अनुवादाची जबाबदारी लीला सोहोनी यांनी उत्तम पार पाडली असून जेफ्री आर्चर शैलीची नेमकी नस त्यांना सापढली. विशेष म्हणजे पुस्तकाच्या शीर्षक कथांच्या शीर्षकापर्यंत कशाचेच भांषातर केलेले नाही. सा सर्वच कथांतून जेफ्री आर्चर लेखणीचे कौशल्य आणि स्पर्श करील, आवडेल अशी एकतर प्रत्येक वाचकाला या कथासंग्रहात हा सापडेल हे या कथासंग्रहाचे यश असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही -संतोष ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 08-12-2002

    बेस्ट सेलर लेखक लॉर्ड जेफ्री आर्चर ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ या चौथ्या कथासंग्रहाचा लीना सोहोनी यांनी मराठी अनुवाद केला आहे. या संग्रहातील १५ कथांपैकी ९ कथा सत्यघटनेवर आधारित आहेत, असे प्रस्तावनेत म्हटले आहे. तर पहिली कथा मूळ अरबी भाषेतून अनुवादित ोऊन आलेली आहे. नियतीला चुकविण्याचे मानवी प्रयत्न नियतीचं कसे विफल करते हे या छोट्य कथेचे सार आहे. लेखकाचे वैशिष्ट्य त्याच्या कुतूहलपूर्ण व्यक्तिदर्शनात व कथानकाला शेवटी अनपेक्षित कलाटणी देण्यात दिसून येते. कथेतील पात्रे ज्या वातावरणात असतात त्याला अनुसरून कथेतील प्रसंग घडत असताना त्या व्यक्तीच्या मनातील, कृतीत स्वाभावित वृत्तींना अनुसरून स्वभावचित्रे रेखाटली आहेत. बँक, कोर्ट, पोलिस चौकी, रेल्वे प्लॅटफॉर्म, चित्र प्रदर्शने व घरे ही घटना घडत असल्यावेळीची स्थळे तर उच्चभ्रू समाज, बिझिनेस मन, मध्यमवर्गीय, चोर, पोलिस इन्स्पेक्टर वकील अशा सर्व थरातील व्यक्ती ही पात्रे लेखकाचे खरे चातुर्य लक्षात येते ते कथानकाची गुंफण व कथेला मिळालेली कलाटणी. आयुष्यात येणारे मोहोच प्रसंग (समथिंग फॉर नथिंग) कधी कधी कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता त्याकरता कायदेकानूंनची बारकाव्यासह माहिती घेऊन त्यातील पळवाटांच्या आधारे करून घेतलेली सुटका (क्राइम पेज) कधी कधी यातून मोठा फायदाही उदा. मेनी कोईन्सिडन्सेस ही कथा रूक्ष ही अँगस नावाच्या प्रौढ माणसाची पत्नी मॅक्सच्या प्रेमात पडते. अँगसच्या अकाली मृत्यूनंतर त्याच्याशी लग्न करते. एक वर्ष तो तिच्या प्रेमात बुडून जातो; पण हळू हळू तिच्याकडे दुर्लक्ष करतो. ती कंटाळते. दुसऱ्याशी संबंध जोडण्याच्या कारणास्तव घटस्फोट देते. इथपर्यंत कथा सरळ जाते. पण अचानक मॅक्स जर्सीच्या कायद्यानुसार लग्नाला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर तिच्या (प्रथम) पतीच्या इस्टेटीतील तिसरा हिस्सा मिळावा म्हणून अर्ज करतो. त्याला तो मिळतोही आणि मग तिला गेल्या तीन वर्षातील घटना आठवतात. त्यांची लंडनमधील (बोगस) नोकरी. काही काळ हिच्याच घरी वास्तव्य संबंधित लोकांच्या ओळखी ह्यावरून तिची खात्री पटते की हा प्लॅनपे त्याने पूर्वीच शिजवला व योजनाबद्धतेने पार पाडून ६२ हजार पौंड मिळवले. मॅक्सचे चातुर्य रूथची भावनाप्रधानता व कायद्याचे अज्ञान या सर्वांचा मोठा सुरेख परिणाम लेखकाने साधला आहे. बँकेतील शेवटच्या कर्मचाऱ्यापासून चेअरमनपर्यंत प्रत्येकाला आपल्याला वरची जागा कशी मिळेल. ती किती सुखाची असेल असे वाटत असते. खालपासून वरपर्यंत सगळेच असंतुष्ट - मनुष्य स्वभावातील असे काही कंगोरे लेखकाने ‘ग्रास इज ऑलवेज ग्रीनर’ या कथेत दाखवून कथा एका वेगळ्याच अंगाने फुलवत नेली आहे. एकूणच हा संग्रह केवळ वाचनीय नव्हे तर बुद्धीला खाद्य पुरवणारा आहे. कथांची शीर्षके व पात्रांची नावे इंग्रजी नसती तर कथा मराठीतीलच आहेत. इतका अनुवाद सुरेख झाला आहे. -मधुमालती कोटिभास्कर ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 24-11-2002

    खिळवून ठेवणारी नाट्यमय कलाटणीची मालिका... वाचकाला खिळवून ठेवून शेवटपर्यंत शेवटाचा पत्ता न लागू देता गुंगवत ठेवायचे आणि अचानक संपूर्ण प्रसंगाला कलाटणी देऊन धक्कादायक शेवट करायचा, हे रहस्यमय कथा आणि चित्रपटाचे वैशिष्ट्य. या सूत्रावर कादंबरीकारांच्या ित्येक पिढ्या पोसल्या गेल्या आणि पोसल्या जात आहेत. या परंपरेतील एक ज्येष्ठ लेखक आणि रहस्यमयतेला ज्यांनी एक नवा आयाम दिला असे जेफ्री आर्चर यांचा ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ हा कथासंग्रह लीना सोहोनी यांनी त्याचा अनुवाद केला आहे. जेफ्री आर्चरची लिखाणाची पद्धत आणि वाचकांना खिळवून ठेवायची त्याची लकब ही जुनी नाही; त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्यांचे मराठीत विविध लेखकांनी धेडगुजरी अनुवाद आपल्या नावावर खपविले आहेत. स्थळ-काळाचे बंधन झुगारून कोणत्याही प्रकारच्या वाचकांपर्यंत पोहोचण्याची त्याची हातोटी असल्याने जगभरातील अनेक नव्या जुन्या रहस्यकथा लेखकांना त्याच्या कथांनी मोहिनी घातली आहे. हे ‘डुप्लीकेट’ आणि भाषा-संस्कृतीचा संकर करून केलेले वाचण्यापेक्षा लीना सोहोनी यांनी मराठी वाचकांना त्याच्या मूळ कथा वाचरृयाची संधी उपलब्ध करून दिली आहे. जाता जाता एवढेच सांगता येईल की जेफ्री आर्चरच्या ‘केन अँड एबल’सारख्या कादंबऱ्यांनी अनेक चित्रपटांनाही कथानके पुरविली असल्याने भारतीय वाचकाला त्याचे लिखाण नवे नाही. ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्टमध्ये आर्चरच्या चौदा निवडक कथांचा समावेश आहे. थोडीशी ओहेन्री आणि सॉमरसेट मॉम यांच्या अंगाने जाणारी शैली त्याने विशेषत: गुन्हेगारी कथानकांच्या अंगाने विकसित केली. ही शैली आज रहस्यमय कथांच्या जगातील माईल स्टोन झाली आहे. आर्चरची नसलेली कथा पहिल्यांदाच या संग्रहात त्याने घेतली आहे. याचा अनुभव देऊन जाते. सॉमरसेट मॉम यांच्या शेपी नाटकात आलेली ‘डेथ स्पिक’ ही कथा आर्चरने दिली आहे. एखादी कथा किती साध्या आणि सोप्या शैलीत परिणामकारक ठरू शकते, याचे उदाहरण त्याने या कथेवरून दिले आहे. त्याच्या पुढील साऱ्या कथा याच शैलीचे द्योतक ठरतात. क्राइम पेजसारखी कथा ज्यात प्रचंड आत्मविश्वास असलेल्या आणि दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये हे आव्हान स्वीकारून खेळलेल्या एका तरुणाच्या जिगरबाजीची कथा आहे. थंड डोक्याने केलेली गुन्हेगारी कृत्येही एखाद्याला कसे हीरो बनवितात, त्याचे हे उदाहरण आहे. ‘चॉक अँड चीझ’ सारखी संपूर्ण कौटुंबिक वळणाने जाणारी कथा, स्थलकाळाने बंध तोडून आपल्या मुलावर विद्वतेचा आरोप त्याचे जीवन दु:खदायी बनविणाऱ्या कोणत्याही आई-बापाला आपली वाटते. तर वर्णद्वेषाचा नाजूक विषय हाताळणारी ‘अ चेंझ् ऑफ हार्ट’ ही कथा जागतिक लढ्यात एका माणसाचा खारीचा वाटा कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतो. याचे दर्शन घडविते. ‘टू मेनी कोईन्सिडन्सेस’सारखी कथा सुष्ट आणि दुष्ट संघर्षात नियोजनबद्धपणे काम करून दृष्ट कशाप्रकारे एखाद्याचे आयुष्य नासवून टाकतो, याचे विदारक चित्रण घडविणारी, क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणाचा हे सूत्र सांगणारी ‘अ विक टू रिमेंबर’ ही कथा, प्रेमासाठी काल हे परिमाण नाही हे सांगणारी. धक्कादायक आणि कलाटणींच्या शेवटाचा परिपाक असणारी ‘समथिंग फॉर नथिंग’ सारखी कथा तर अविस्मरणीय. आर्चरच्या कथांविषयी खरे तर त्यातील तपशील सांगून त्याची मजा घालविण्यासारखे आहे. पात्रयोजना, कथानक, विषय आणि पार्श्वभूमी या सर्वच बाबातीत जगभरातील लेखकांनी ज्याचे पाय धरावेत, अशा या कथा मुळातून वाचण्यातच खरी गंमत आहे. केवळ शेवटाला नाट्यपूर्ण कलाटणी द्यायची म्हणून ‘आणि अखेर पडदा फाडून तो बाहेर आला’ अशाप्रकारचा शेवट पाहण्याची सवय असणाऱ्या मराठी वाचकांना रहस्यमयतेमध्येही लालित्य असू शकते, याचा प्रत्यय या कथा देतात. लीना सोहोनी यांनी अत्यंत समजून उमजून केलेल्या अनुवादात भाषेचे सौंदर्य आणि रहस्यमयतेची नजाकत कोठेही हरविली नाही, हे या अनुवादाचे वैशिष्ट्य आहे. -अविनाश थोरात ...Read more

  • Rating StarDAINIK GOMANTAK SHABDSOHALA 22-06-2014

    सत्यघटनांना कथेत गुंफण्याचा जेफ्री आर्चर यांना नादच. ‘टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट’ या कथासंग्रहातील पंधरा कथापैकी आठ कथा अशा सत्यघटनांवर आधारित आहेत. कमी अधिक लांबीच्या या कथा पात्रयोजना, कथानक विस्तार, कथाबीज, पार्श्वभूमी सर्वच बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठणाऱ्या आहेत. अर्थातच त्या वैशिष्ट्यांत जेफ्री आर्चरच्या लेखणीचे कसब, लालित्य, ओघवतेपणा यांचा सिंहाचा वाटा निश्चितच आहे. विषयांचे वैविध्य वाचकाला खिशवून ठेवण्यात पूर्णतया यशस्वी होते. यात रेल्वेस्टेशनवर समोरासमोरच्या प्लॅटफॉर्मवर झालेली नजरानजर व त्यातून फुलू आलेली प्रेमकथा आहे, प्रचंड आत्मविश्वासाने खेळलेल्या बाजीची कथा आहे, कायद्याला हवे तसे वाकवणाऱ्या कायदेतज्ज्ञाची कथा आहे, तसेच एका तरुणीची अत्यंत विलक्षण, सुरस आणि चमत्कारिक कथा आहे. शेवटची ‘द ग्रास इज ऑलवेज ग्रीनर’ ही सर्वोत्कृष्ट म्हणावी अशी कथा आहे. प्रत्येक कथेच्या शेवटी, विख्यात लेखक ‘ओ हेन्री’प्रमाणे धक्कातंत्र वापरले आहे. या अचानक कलाटणीपायी नाट्यपूर्णता चरमसीमेवर पोचते. यातील सर्वांत छोटी व पहिली कथा ‘डेथ स्पीक्स’ - लेखकाच्या काळजाला असा काही स्पर्श करून गेली की तिला या कथासंग्रहात अग्रक्रम मिळाला. अर्थात ही कथा त्याची स्वत:ची नाही. ही कथा मूळ अरबी भाषेतून अनुवादित करण्यात आली आहे. सखोल संशोधानानंतर सुद्धा या कथेच्या मूळ लेखकाचा नाव व पत्ता सापडू शकलेला नाही. (हीच कथा सॉमरसेट मॉमच्या ‘----’ नाटकात व नंतर जॉन ओहारा यांच्या ‘---’च्या प्रस्तावनेत व जी. ए. कुलकर्णी यांच्या एका कथेत सुवर्णगरूडाच्या माध्यमातून आलेली आहे.) एकूणच मेहता पब्लिशिकेशनने प्रकाशित केलेला व लीना सोहोनींनी उत्कृष्ट अनुवाद केलेला हा संग्रह विदेशी पात्रं-पार्श्वभूमी व कथानकं असूनही खूपच मनोरंजक झाला आहे. प्रत्येकाच्या आवडीची किमान वाटतो यातच या कथासंग्रहाचे यश व वैशिष्ट्य लपलेले आहे. चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठ नावीन्यपूर्ण व प्रभावित करणारे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more