* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANSMARANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618309
  • Edition : 5
  • Publishing Year : 1990
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF THE ARTICLES BY SHANTABAI. SHE HAS APPRECIATED VARIOUS STORIES BY VARIOUS AUTHORS. SHE WRITES HER VIEWS ABOUT `CHANGING`, THE AUTOBIOGRAPHICAL ARTICLE BY THE FAMOUS ACTRESS LEEV ULMAN. SHE ALSO DESCRIBES THE VERY OLD AUTOBIOGRAPHICAL NOVEL `DAIVLEELA` BY A MARATHI AUTHOR. SHE HAS WRITTEN ABOUT GANDHIJI, MADHAV JULIEN, TAMBE, Y. G. JOSHI, SHARATCHANDRA PUNARVASU, AND G. D. MADGULKAR. SHE DOES NOT SPARE HERSELF. SHE WRITES ABOUT HER WRITING IN DETAIL. SHE DESCRIBES THE WAY THROUGH WHICH SHE GOT FAMILIAR WITH THE SANSKRIT DRAMA `UTTAR RAM CHARIT`. SHE ALSO JOTS DOWN ABOUT THE BOOKS SHE READ AT THE VERY TENDER AGE.THESE ARTICLES WILL SHOW THE READERS THE VARIOUS PLACES IN THE FIELD OF LITERATURE OF WHICH THEY WERE NOT AWARE TILL TODAY. ALL THESE ARTICLES REVEAL SHANTABAI`S LOVE FOR LITERATURE AND HER CURIOSITY ABOUT IT.
शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह. शांताबाईंचा हा आणखी एक लेखसंग्रह. इथे लिव उलमन या नामवंत चित्रपटतारकेच्या `चेंजिंग` या आत्मकथनाचे रसग्रहण आहे. त्याप्रमाणे `दैवलीला` या अगदी जुन्या काळातील एका मराठी लेखिकेच्या आत्मनिवेदनपर कादंबरीचा हृद्य परिचय आहे. गांधीजी आणि माधव जुलियन, तांबे आणि य.गो.जोशी, शरदचंद्र पुनर्वसू आणि ग. दि. माडगुळकर अशा भिन्न भिन्न प्रकारच्या व्याक्तीन्विशायीचे लेखन इथे आहे. त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या लेखानाबाद्दळी शांताबाई इथे मनमोकळेपणाने लिहितात. " उत्तर रामचरित " या सुप्रसिद्ध संस्कृत नात्याकृतीशी आपली हळूहळू होत गेलेली ओळख जशी त्यांनी इथे रसाळ पाने सांगितली आहे. त्याप्रमाणे बाळपणी वाचनात आलेल्या नाना प्रकारच्या पुस्तकांबद्दलही त्यांनी इथे निवेदन केले आहे. साहित्य आणि जीवन डोहोन्बाद्धाल्चे शांताबाईंचे उत्कट कुतूहल आणि त्यांची सर्वस्पर्शी रसिकता यांचा उत्तम प्रत्यय " संस्मरणे " मधील लेखांमधून वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarManasi Swapnil Javal

    संस्मरणें .. शांत शेळके यांनी लिहलेलं हे पुस्तक त्यांच्या वेगवेगळ्या लेखांचा संच आहे .. साहित्यप्रेम काय असते याचा एक उत्तम नमुना हे पुस्तक आहे .. वाचन माणसाला किती प्रगल्भ , समृद्ध आणि समाधानी बनवत हे जाणवलं हे पुस्तक वाचून .. त्यांनी या पुस्तात व्यक्ती आणि साहित्य यांच्या वेगवेगळ्या अनुभवनाचे तरल चित्रण केले आहे .. साधी आणि सरळ भाषाशैली हे एक विशेष आहे या पुस्तकाचे .. सगळे लेख जणू शांताजी आपल्याला सांगतच आहेत असे वाटते .. पाऊलवाटा आणि जुनीओळख हे लिखाण साहित्याची ओळख कशी झाली, वाचनाची आवड , दिशांहीन वाचन याबद्दल आहे .. ना झालेल्या भेटी मध्ये एका साहित्यकाला भेटण्याची ओढ इतकी सुंदर वर्णिली आहे जणू आपण पण त्यास भेटावे असेच वाटते .. गांधी माझे माझ्यापुरते यात असामान्य व्यक्तींचा सामान्य व्यक्तींवर काळात नकळत कसा परिणाम होतो हे दाखवून दिले आहे .. कवितांबद्दल असलेली त्यांची आत्मिक ओढ , अनुवाद करताना मूळ लेखक व कविला त्यांनी किती समजून घेतले ते समजते .. बेथ या लेखात एका साधारण मुलीमधले साधेपण त्यांना कसे भुरळ घालते , माझ्या कवितांची जन्मकथा हाही एक सुंदर लेख आहे .. त्यातील कवितेच्या ओळी मोहक आहेत .. एक गाव आठवणीतले यातून आपण सुद्धा आपल्या बालपणातल्या उन्हाळी सुट्टीत गावी जातो असेच वाटते .. ज्या कोणाला ललित लिखाण वाचायला आवडते त्याने हे पुस्तक जरूर वाचावे .. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SINHASAN 07-03-1999

    शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह... शांता शेळके यांच्या ‘संस्मरण’ या पुस्तकातील आठवणींचा खजिना सर्वात जास्त वाचकांना दिपवून टाकील तो त्यांच्या कमालीच्या नितळ आत्मीय शैलीमुळे! शांताबाई प्रत्यक्ष आपल्याशी मोकळेणानं बोलत आहेत, आपल्या अंतरीच्या सुख-दु:खात आपल्याला जीवाभावाच्या मित्राप्रमाणे सामील करुन घेत आहेत, आपल्याशी बरोबरीच्या नात्याने संवाद साधत आहेत, असे वाचकाला पानोपानी वाटत राहते आणि त्या सलगीची भूलही पडते. या पुस्तकात शांताबार्इंनी आपल्या वाचनाच्या वेडाबद्दल सांगितले आहे, आपल्या घरच्या पुस्तक संग्रहाबद्दल सांगितले आहे. नाट्यवेडाबद्दल, स्त्रियांच्या ओव्या-लोकगीते-गाणी यांच्याबद्दल सांगितले आहे. आपल्या पाठांतराच्या शक्तीचे अनेक दाखले देऊन वाचकांना चकित करून सोडण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. कांदबरी या प्रकारात थोडीफार प्रयोगशीलता दाखवूनही हा एक आपल्याला न जमलेला वाङ्मय प्रकार आहे, याची कबुली दिली आहे. काव्याचा अनुवाद करताना जो आनंद मिळाला त्याचेही काही नमुने दिले आहेत. चिनी कविता आणि जपानी हायवूâ यांचे अनुवाद करताना कोणकोणत्या अडचणी आल्या यांचीही माहिती दिली आहे. हिमवर्षात ही चँग वू चिएन या चिनी कवीची कविता शांताबार्इंनी तिचा अनुवाद असा केला आहे. मी तुला दिलेला लाल भडक गुलाब तू खुशाल धुळीत पडू दिलास मी तो उचलला आता तो पांढराफटक दिसत होता त्या एका निमिषात आपल्या प्रितीवर हिमवर्षाव झाला होता. लालभडक गुलाबाप्रमाणे आपल्या प्रेमाची दिलेली हाक प्रियकराने नाकारली आणि तो गुलाब खाली जमिनीवर टाकला या त्याच्या नकारात्मक भूमिकेवर निसर्गानेही जणू हिम वर्षाव करून शिक्कामोर्तब केले. त्या फुलाला पांढरेफटक रुप देऊन, ‘पांढऱ्या कपाळाची’ हा संकेतही येथे भारतीय पार्श्वभूमीवर आणखी एक अर्थाचा पदर या शब्दयोजनेला देऊन जातो. हायकू तीन ओळींचा असतो. शांताबार्इंनी त्यांचे अनुवाद करताना कधी कधी चार ओळीही वापरल्या. उदा. एकेक चार ओळी वेड भरविले कसले चंद्रा शेजारच्या उरी? खुळा रात्रभर बसला होता वाजवीत बासरी! ज्ञानेश्वरांची एक ओवीही त्यांना हासकूसारखी वाटते तीही त्यांनी दिली आहे. कमळावर भ्रमर पाय ठेवती हळुवार कुचंबैल केसर इया शंका।। अनुवाद करताना अनेक प्रश्न त्यांना पडतात. अडचणी जाणवतात. त्याबद्दल त्या म्हणतात, ‘अनुवाद शब्दश: करावा की भावानुवाद करावा? कधी कधी शब्दश: अनुवाद करण्यापेक्षा मूळ कवितचा आत्मा (स्पिरिट) शब्दातून व्यक्त करणे जास्त आवश्यक असते. आपण आपल्या भाषासरणीत पक्क रुजलेले असतो. वेगळ्या भाषेतील कविता मराठीत अनुवादित करताना आपली भाषा मोडणे आवश्यक ठरते, पण हे नेहमी जमतेच असे नाही. संस्कृतमधील समासप्राचुर्यामुळे थोड्या जागेत खूप काही सांगितलेले असते. मराठीत त्या वृत्तांत तेवढा आशय आणणेच शक्य नाही. मेघदूतसारख्या काव्याचा समश्लोकी अनुवाद करणे जवळजवळ अशक्यच आहे. अनुवाद का करावेसे वाटतात? कधी कधी मूळ कविता अगदी आपलीच वाटते. मनात येते, अरे हे तर सारे माझेच! मग ती खंत निवारण्यासाठी त्या कवितेचा मराठीत अनुवाद करावा, असे वाटते. प्रसंगी त्या कवितेत आपले स्वत:चेही आपण खूप घालतो. मग तो मुक्त किंवा स्वैर भावानुवाद होतो. आपल्या काही कवितांच्या जन्मकथाही त्या सांगतात. नॅशनल जिऑग्रॉफिक हे मासिक चाळताना गडद निळा समुद्र आणि त्यातून वर आलेले हिरवेगार वनराईने नटलेले एक देखणे चिमुकले बेट असे चित्र त्यांना दिसते. त्या मंत्रमुग्ध होतात. आपण त्या बेटावर उभ्या आहोत असे त्यांना वाटते आणि एकदम कवितेच्या ओळी सुचतात.’ निळा निळा समुद्र आणि बेट पाचुचे मध्ये तिथेच मी, तिथेच मी मनात कोणीसे वदे उभा समोर वृद्ध माड हालवीत झावळी जळात गाई अप्सास उदास धून सावळी! पुराण शिंपल्यामधून गाज तीच ये पुन्हा तलात खोल जागल्या अनंत जन्मीच्या खुणा रितेच हात राहिल स्मृति कितीक वेचुनी निळा निळा समुद्र गूढमिटूनी जाय लोचनी कविता अशा प्रकारे चित्रे पाहून सुचतात, विशिष्ट स्थळे पाहून सुचतात, काही व्यक्तींमुळे सुचतात. कवितेवरुनही सुचतात. प्रतिमांवरुन सुचतात. माणसामाणसातले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधताना येणारे अपयश - शब्द व स्पर्श यांच्या मर्यादा - या सर्वांमुळेही कविता सुचतात. पूर्वी आपल्या कविता वर्णनपर, स्पष्टिकोणात्मक असत, आता त्या प्रतिमेच्या आश्रयाने निर्माण होतात असे त्या म्हणतात. ‘परंतु प्रत्यक्ष निर्मितीचा भाग बराचसा बहेतुक आणि गुढताच गुरफटलेला असतो’ असेही त्यांना वाटते. अनेक कविता व गीते अर्धवट सुचतात आणि मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहतात. त्या पूर्ण कधी होतील - हे कळत नाही, त्यांची साद पुन्हा कधी येते याची केवळ वाट बघायची असते असे त्यांना वाटते. ‘घोडेगाव’ या गावी त्यांचे आजोबा सबरजिस्ट्रार होते. त्या गावातले आपले घर, आपले शेजारी, नायकांच्या घरची पुस्तके, उंच धिप्पाड, टोप पदरी लुगडे नेसलेली हौसा मावशी (मुली आहेत पण मुलगा नाही हे तिचे दु:ख), घोडेगावातली शेवटची दिवाळी या सर्वांच्या आठवणी सांगून शांताबाई म्हणतात, ‘एखाद्या सुंदर स्वप्नासारखे घोडेगाव माझ्या आयुष्यात आले आणि स्वप्नांसारखेच ते पुन्हा अदृश्य झाले.’ याशिवाय कथाकार य. गो. जोशी, गीतकार ग. दि. माडगूळकर, कवी माधव ज्युलियन, शशिकांत पुनर्वसू, भा. रा. तांबे यांची कविता, लिव उलमनचे आत्मकथन (चेंजिग) यांच्यावरही शांताबाईनी भरभरून लिहिले आहे. आपल्या आणि माधव ज्युलियन याच्या वयात खूप अंतर आहे आणि माधव ज्युलियन यांना आपण पाहिलेले नाही असे सांगूनही शांताबाई त्यांच्याबद्दल वाटणारे ममत्व प्रकट करतात. ‘त्यांच्या काव्यात्मक, तडफदार, मानी व्यक्तिमत्वाचे एक सुंदर अपार्थिव चित्र मनात तयार झाले. ते चित्र अजूनही अभंग, निर्मळ, अकलंकित आहे. तरुण, स्वप्नाळू, भावूक वयात माधव ज्युलियन हे मला नि:संकोच प्रीतीचा निर्भय आविष्कार करणाऱ्या, स्त्रियांचा कैवार घेणाऱ्या, अन्यायाविरुद्ध तडपेâने झुंजणाऱ्या एखाद्या मध्ययुगीन शूर शिलेदारासारखे वाटत, आज मला ते तसे वाटत नाहीत... आजचा शब्द वापरायचा तर ते त्यांच्या काळातले आऊसायडर होते, त्यांचे हे रूप मला विशेष आवडते, जवळचेहि वाटते... आजही त्यांच्या कविता मी वाचते. जुन्या धुंदीचा, ध्येयवादाचा, स्वप्नरंजनाचा आनंद अनुभवते.’ ‘’‘साहित्य आणि नितिमत्ता’ या लेखात शांताबाई कलावंतांच्या नैतिक अनैतिकतेचे निकष वेगळे आहेत असे म्हणून नैतिक व लैगिक प्रमादांपेक्षा त्याचे चरित्र्य त्या कलात्मक निकषांवर ठरवणे योग्य आहे. असे प्रतिपादन करतात. सर्जनाची ऊर्मी, तीव्र कल्पनाशक्ती... यामुळे त्याच्या काही शारीर गरजा इतरांपेक्षा अधिक मोठ्या असतात याची निदान जाणीव ठेवणे तरी आवश्यक आहे. शारीर गोष्टीशी निगडीत असणाऱ्या आपल्या नीतिकल्पना या कालसापेक्ष, परिवर्तनशील असतात. त्यामुळे त्यावरून कलावंतांचे चारित्र्य जोखणे योग्य नाही. साहित्यनिष्ठा आणि कलेची अव्यभिचारी साधना या गोष्टी त्यांच्या लैंगिक प्रमादापेक्षा श्रेष्ठ मानायला हव्या असा त्यांच्या प्रतिपादनाचा आशय. महात्मा गांधीजींची आपल्या बालमनात निर्माण झालेली तेजोमूर्ती पुढे प्रसंगानुरूप कशी अधिकाधिक तेजस्वी होत गेली आणि त्यांच्या हत्येने विलक्षण व्याकुळ मन:स्थिती झाली, त्याचा हृदयस्पर्शी आलेख ‘गांधीजी माझे, माझ्यापुरते’ या लेखात शांताबार्इंनी काढला आहे. एकूणच शांताबार्इंच्या भावविश्वाशी वाचकांना जवळीक साधू देणारा हा सगळा ऐवज आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more