* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANSMARANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618309
  • Edition : 5
  • Publishing Year : 1990
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF THE ARTICLES BY SHANTABAI. SHE HAS APPRECIATED VARIOUS STORIES BY VARIOUS AUTHORS. SHE WRITES HER VIEWS ABOUT `CHANGING`, THE AUTOBIOGRAPHICAL ARTICLE BY THE FAMOUS ACTRESS LEEV ULMAN. SHE ALSO DESCRIBES THE VERY OLD AUTOBIOGRAPHICAL NOVEL `DAIVLEELA` BY A MARATHI AUTHOR. SHE HAS WRITTEN ABOUT GANDHIJI, MADHAV JULIEN, TAMBE, Y. G. JOSHI, SHARATCHANDRA PUNARVASU, AND G. D. MADGULKAR. SHE DOES NOT SPARE HERSELF. SHE WRITES ABOUT HER WRITING IN DETAIL. SHE DESCRIBES THE WAY THROUGH WHICH SHE GOT FAMILIAR WITH THE SANSKRIT DRAMA `UTTAR RAM CHARIT`. SHE ALSO JOTS DOWN ABOUT THE BOOKS SHE READ AT THE VERY TENDER AGE.THESE ARTICLES WILL SHOW THE READERS THE VARIOUS PLACES IN THE FIELD OF LITERATURE OF WHICH THEY WERE NOT AWARE TILL TODAY. ALL THESE ARTICLES REVEAL SHANTABAI`S LOVE FOR LITERATURE AND HER CURIOSITY ABOUT IT.
शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह. शांताबाईंचा हा आणखी एक लेखसंग्रह. इथे लिव उलमन या नामवंत चित्रपटतारकेच्या `चेंजिंग` या आत्मकथनाचे रसग्रहण आहे. त्याप्रमाणे `दैवलीला` या अगदी जुन्या काळातील एका मराठी लेखिकेच्या आत्मनिवेदनपर कादंबरीचा हृद्य परिचय आहे. गांधीजी आणि माधव जुलियन, तांबे आणि य.गो.जोशी, शरदचंद्र पुनर्वसू आणि ग. दि. माडगुळकर अशा भिन्न भिन्न प्रकारच्या व्याक्तीन्विशायीचे लेखन इथे आहे. त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या लेखानाबाद्दळी शांताबाई इथे मनमोकळेपणाने लिहितात. " उत्तर रामचरित " या सुप्रसिद्ध संस्कृत नात्याकृतीशी आपली हळूहळू होत गेलेली ओळख जशी त्यांनी इथे रसाळ पाने सांगितली आहे. त्याप्रमाणे बाळपणी वाचनात आलेल्या नाना प्रकारच्या पुस्तकांबद्दलही त्यांनी इथे निवेदन केले आहे. साहित्य आणि जीवन दोहोंबद्दलचे शांताबाईंचे उत्कट कुतूहल आणि त्यांची सर्वस्पर्शी रसिकता यांचा उत्तम प्रत्यय " संस्मरणे " मधील लेखांमधून वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarManasi Swapnil Javal

    संस्मरणें .. शांत शेळके यांनी लिहलेलं हे पुस्तक त्यांच्या वेगवेगळ्या लेखांचा संच आहे .. साहित्यप्रेम काय असते याचा एक उत्तम नमुना हे पुस्तक आहे .. वाचन माणसाला किती प्रगल्भ , समृद्ध आणि समाधानी बनवत हे जाणवलं हे पुस्तक वाचून .. त्यांनी या पुस्तात व्यक्ती आणि साहित्य यांच्या वेगवेगळ्या अनुभवनाचे तरल चित्रण केले आहे .. साधी आणि सरळ भाषाशैली हे एक विशेष आहे या पुस्तकाचे .. सगळे लेख जणू शांताजी आपल्याला सांगतच आहेत असे वाटते .. पाऊलवाटा आणि जुनीओळख हे लिखाण साहित्याची ओळख कशी झाली, वाचनाची आवड , दिशांहीन वाचन याबद्दल आहे .. ना झालेल्या भेटी मध्ये एका साहित्यकाला भेटण्याची ओढ इतकी सुंदर वर्णिली आहे जणू आपण पण त्यास भेटावे असेच वाटते .. गांधी माझे माझ्यापुरते यात असामान्य व्यक्तींचा सामान्य व्यक्तींवर काळात नकळत कसा परिणाम होतो हे दाखवून दिले आहे .. कवितांबद्दल असलेली त्यांची आत्मिक ओढ , अनुवाद करताना मूळ लेखक व कविला त्यांनी किती समजून घेतले ते समजते .. बेथ या लेखात एका साधारण मुलीमधले साधेपण त्यांना कसे भुरळ घालते , माझ्या कवितांची जन्मकथा हाही एक सुंदर लेख आहे .. त्यातील कवितेच्या ओळी मोहक आहेत .. एक गाव आठवणीतले यातून आपण सुद्धा आपल्या बालपणातल्या उन्हाळी सुट्टीत गावी जातो असेच वाटते .. ज्या कोणाला ललित लिखाण वाचायला आवडते त्याने हे पुस्तक जरूर वाचावे .. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SINHASAN 07-03-1999

    शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह... शांता शेळके यांच्या ‘संस्मरण’ या पुस्तकातील आठवणींचा खजिना सर्वात जास्त वाचकांना दिपवून टाकील तो त्यांच्या कमालीच्या नितळ आत्मीय शैलीमुळे! शांताबाई प्रत्यक्ष आपल्याशी मोकळेणानं बोलत आहेत, आपल्या अंतरीच्या सुख-दु:खात आपल्याला जीवाभावाच्या मित्राप्रमाणे सामील करुन घेत आहेत, आपल्याशी बरोबरीच्या नात्याने संवाद साधत आहेत, असे वाचकाला पानोपानी वाटत राहते आणि त्या सलगीची भूलही पडते. या पुस्तकात शांताबार्इंनी आपल्या वाचनाच्या वेडाबद्दल सांगितले आहे, आपल्या घरच्या पुस्तक संग्रहाबद्दल सांगितले आहे. नाट्यवेडाबद्दल, स्त्रियांच्या ओव्या-लोकगीते-गाणी यांच्याबद्दल सांगितले आहे. आपल्या पाठांतराच्या शक्तीचे अनेक दाखले देऊन वाचकांना चकित करून सोडण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. कांदबरी या प्रकारात थोडीफार प्रयोगशीलता दाखवूनही हा एक आपल्याला न जमलेला वाङ्मय प्रकार आहे, याची कबुली दिली आहे. काव्याचा अनुवाद करताना जो आनंद मिळाला त्याचेही काही नमुने दिले आहेत. चिनी कविता आणि जपानी हायवूâ यांचे अनुवाद करताना कोणकोणत्या अडचणी आल्या यांचीही माहिती दिली आहे. हिमवर्षात ही चँग वू चिएन या चिनी कवीची कविता शांताबार्इंनी तिचा अनुवाद असा केला आहे. मी तुला दिलेला लाल भडक गुलाब तू खुशाल धुळीत पडू दिलास मी तो उचलला आता तो पांढराफटक दिसत होता त्या एका निमिषात आपल्या प्रितीवर हिमवर्षाव झाला होता. लालभडक गुलाबाप्रमाणे आपल्या प्रेमाची दिलेली हाक प्रियकराने नाकारली आणि तो गुलाब खाली जमिनीवर टाकला या त्याच्या नकारात्मक भूमिकेवर निसर्गानेही जणू हिम वर्षाव करून शिक्कामोर्तब केले. त्या फुलाला पांढरेफटक रुप देऊन, ‘पांढऱ्या कपाळाची’ हा संकेतही येथे भारतीय पार्श्वभूमीवर आणखी एक अर्थाचा पदर या शब्दयोजनेला देऊन जातो. हायकू तीन ओळींचा असतो. शांताबार्इंनी त्यांचे अनुवाद करताना कधी कधी चार ओळीही वापरल्या. उदा. एकेक चार ओळी वेड भरविले कसले चंद्रा शेजारच्या उरी? खुळा रात्रभर बसला होता वाजवीत बासरी! ज्ञानेश्वरांची एक ओवीही त्यांना हासकूसारखी वाटते तीही त्यांनी दिली आहे. कमळावर भ्रमर पाय ठेवती हळुवार कुचंबैल केसर इया शंका।। अनुवाद करताना अनेक प्रश्न त्यांना पडतात. अडचणी जाणवतात. त्याबद्दल त्या म्हणतात, ‘अनुवाद शब्दश: करावा की भावानुवाद करावा? कधी कधी शब्दश: अनुवाद करण्यापेक्षा मूळ कवितचा आत्मा (स्पिरिट) शब्दातून व्यक्त करणे जास्त आवश्यक असते. आपण आपल्या भाषासरणीत पक्क रुजलेले असतो. वेगळ्या भाषेतील कविता मराठीत अनुवादित करताना आपली भाषा मोडणे आवश्यक ठरते, पण हे नेहमी जमतेच असे नाही. संस्कृतमधील समासप्राचुर्यामुळे थोड्या जागेत खूप काही सांगितलेले असते. मराठीत त्या वृत्तांत तेवढा आशय आणणेच शक्य नाही. मेघदूतसारख्या काव्याचा समश्लोकी अनुवाद करणे जवळजवळ अशक्यच आहे. अनुवाद का करावेसे वाटतात? कधी कधी मूळ कविता अगदी आपलीच वाटते. मनात येते, अरे हे तर सारे माझेच! मग ती खंत निवारण्यासाठी त्या कवितेचा मराठीत अनुवाद करावा, असे वाटते. प्रसंगी त्या कवितेत आपले स्वत:चेही आपण खूप घालतो. मग तो मुक्त किंवा स्वैर भावानुवाद होतो. आपल्या काही कवितांच्या जन्मकथाही त्या सांगतात. नॅशनल जिऑग्रॉफिक हे मासिक चाळताना गडद निळा समुद्र आणि त्यातून वर आलेले हिरवेगार वनराईने नटलेले एक देखणे चिमुकले बेट असे चित्र त्यांना दिसते. त्या मंत्रमुग्ध होतात. आपण त्या बेटावर उभ्या आहोत असे त्यांना वाटते आणि एकदम कवितेच्या ओळी सुचतात.’ निळा निळा समुद्र आणि बेट पाचुचे मध्ये तिथेच मी, तिथेच मी मनात कोणीसे वदे उभा समोर वृद्ध माड हालवीत झावळी जळात गाई अप्सास उदास धून सावळी! पुराण शिंपल्यामधून गाज तीच ये पुन्हा तलात खोल जागल्या अनंत जन्मीच्या खुणा रितेच हात राहिल स्मृति कितीक वेचुनी निळा निळा समुद्र गूढमिटूनी जाय लोचनी कविता अशा प्रकारे चित्रे पाहून सुचतात, विशिष्ट स्थळे पाहून सुचतात, काही व्यक्तींमुळे सुचतात. कवितेवरुनही सुचतात. प्रतिमांवरुन सुचतात. माणसामाणसातले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधताना येणारे अपयश - शब्द व स्पर्श यांच्या मर्यादा - या सर्वांमुळेही कविता सुचतात. पूर्वी आपल्या कविता वर्णनपर, स्पष्टिकोणात्मक असत, आता त्या प्रतिमेच्या आश्रयाने निर्माण होतात असे त्या म्हणतात. ‘परंतु प्रत्यक्ष निर्मितीचा भाग बराचसा बहेतुक आणि गुढताच गुरफटलेला असतो’ असेही त्यांना वाटते. अनेक कविता व गीते अर्धवट सुचतात आणि मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहतात. त्या पूर्ण कधी होतील - हे कळत नाही, त्यांची साद पुन्हा कधी येते याची केवळ वाट बघायची असते असे त्यांना वाटते. ‘घोडेगाव’ या गावी त्यांचे आजोबा सबरजिस्ट्रार होते. त्या गावातले आपले घर, आपले शेजारी, नायकांच्या घरची पुस्तके, उंच धिप्पाड, टोप पदरी लुगडे नेसलेली हौसा मावशी (मुली आहेत पण मुलगा नाही हे तिचे दु:ख), घोडेगावातली शेवटची दिवाळी या सर्वांच्या आठवणी सांगून शांताबाई म्हणतात, ‘एखाद्या सुंदर स्वप्नासारखे घोडेगाव माझ्या आयुष्यात आले आणि स्वप्नांसारखेच ते पुन्हा अदृश्य झाले.’ याशिवाय कथाकार य. गो. जोशी, गीतकार ग. दि. माडगूळकर, कवी माधव ज्युलियन, शशिकांत पुनर्वसू, भा. रा. तांबे यांची कविता, लिव उलमनचे आत्मकथन (चेंजिग) यांच्यावरही शांताबाईनी भरभरून लिहिले आहे. आपल्या आणि माधव ज्युलियन याच्या वयात खूप अंतर आहे आणि माधव ज्युलियन यांना आपण पाहिलेले नाही असे सांगूनही शांताबाई त्यांच्याबद्दल वाटणारे ममत्व प्रकट करतात. ‘त्यांच्या काव्यात्मक, तडफदार, मानी व्यक्तिमत्वाचे एक सुंदर अपार्थिव चित्र मनात तयार झाले. ते चित्र अजूनही अभंग, निर्मळ, अकलंकित आहे. तरुण, स्वप्नाळू, भावूक वयात माधव ज्युलियन हे मला नि:संकोच प्रीतीचा निर्भय आविष्कार करणाऱ्या, स्त्रियांचा कैवार घेणाऱ्या, अन्यायाविरुद्ध तडपेâने झुंजणाऱ्या एखाद्या मध्ययुगीन शूर शिलेदारासारखे वाटत, आज मला ते तसे वाटत नाहीत... आजचा शब्द वापरायचा तर ते त्यांच्या काळातले आऊसायडर होते, त्यांचे हे रूप मला विशेष आवडते, जवळचेहि वाटते... आजही त्यांच्या कविता मी वाचते. जुन्या धुंदीचा, ध्येयवादाचा, स्वप्नरंजनाचा आनंद अनुभवते.’ ‘’‘साहित्य आणि नितिमत्ता’ या लेखात शांताबाई कलावंतांच्या नैतिक अनैतिकतेचे निकष वेगळे आहेत असे म्हणून नैतिक व लैगिक प्रमादांपेक्षा त्याचे चरित्र्य त्या कलात्मक निकषांवर ठरवणे योग्य आहे. असे प्रतिपादन करतात. सर्जनाची ऊर्मी, तीव्र कल्पनाशक्ती... यामुळे त्याच्या काही शारीर गरजा इतरांपेक्षा अधिक मोठ्या असतात याची निदान जाणीव ठेवणे तरी आवश्यक आहे. शारीर गोष्टीशी निगडीत असणाऱ्या आपल्या नीतिकल्पना या कालसापेक्ष, परिवर्तनशील असतात. त्यामुळे त्यावरून कलावंतांचे चारित्र्य जोखणे योग्य नाही. साहित्यनिष्ठा आणि कलेची अव्यभिचारी साधना या गोष्टी त्यांच्या लैंगिक प्रमादापेक्षा श्रेष्ठ मानायला हव्या असा त्यांच्या प्रतिपादनाचा आशय. महात्मा गांधीजींची आपल्या बालमनात निर्माण झालेली तेजोमूर्ती पुढे प्रसंगानुरूप कशी अधिकाधिक तेजस्वी होत गेली आणि त्यांच्या हत्येने विलक्षण व्याकुळ मन:स्थिती झाली, त्याचा हृदयस्पर्शी आलेख ‘गांधीजी माझे, माझ्यापुरते’ या लेखात शांताबार्इंनी काढला आहे. एकूणच शांताबार्इंच्या भावविश्वाशी वाचकांना जवळीक साधू देणारा हा सगळा ऐवज आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more