* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: SANSMARANE
  • Availability : Available
  • ISBN : 9788171618309
  • Edition : 5
  • Publishing Year : 1990
  • Weight : 50.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :SHANTA SHELKE COMBO SET - 21 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF THE ARTICLES BY SHANTABAI. SHE HAS APPRECIATED VARIOUS STORIES BY VARIOUS AUTHORS. SHE WRITES HER VIEWS ABOUT `CHANGING`, THE AUTOBIOGRAPHICAL ARTICLE BY THE FAMOUS ACTRESS LEEV ULMAN. SHE ALSO DESCRIBES THE VERY OLD AUTOBIOGRAPHICAL NOVEL `DAIVLEELA` BY A MARATHI AUTHOR. SHE HAS WRITTEN ABOUT GANDHIJI, MADHAV JULIEN, TAMBE, Y. G. JOSHI, SHARATCHANDRA PUNARVASU, AND G. D. MADGULKAR. SHE DOES NOT SPARE HERSELF. SHE WRITES ABOUT HER WRITING IN DETAIL. SHE DESCRIBES THE WAY THROUGH WHICH SHE GOT FAMILIAR WITH THE SANSKRIT DRAMA `UTTAR RAM CHARIT`. SHE ALSO JOTS DOWN ABOUT THE BOOKS SHE READ AT THE VERY TENDER AGE.THESE ARTICLES WILL SHOW THE READERS THE VARIOUS PLACES IN THE FIELD OF LITERATURE OF WHICH THEY WERE NOT AWARE TILL TODAY. ALL THESE ARTICLES REVEAL SHANTABAI`S LOVE FOR LITERATURE AND HER CURIOSITY ABOUT IT.
शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह. शांताबाईंचा हा आणखी एक लेखसंग्रह. इथे लिव उलमन या नामवंत चित्रपटतारकेच्या `चेंजिंग` या आत्मकथनाचे रसग्रहण आहे. त्याप्रमाणे `दैवलीला` या अगदी जुन्या काळातील एका मराठी लेखिकेच्या आत्मनिवेदनपर कादंबरीचा हृद्य परिचय आहे. गांधीजी आणि माधव जुलियन, तांबे आणि य.गो.जोशी, शरदचंद्र पुनर्वसू आणि ग. दि. माडगुळकर अशा भिन्न भिन्न प्रकारच्या व्याक्तीन्विशायीचे लेखन इथे आहे. त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या वेगवेगळ्या लेखानाबाद्दळी शांताबाई इथे मनमोकळेपणाने लिहितात. " उत्तर रामचरित " या सुप्रसिद्ध संस्कृत नात्याकृतीशी आपली हळूहळू होत गेलेली ओळख जशी त्यांनी इथे रसाळ पाने सांगितली आहे. त्याप्रमाणे बाळपणी वाचनात आलेल्या नाना प्रकारच्या पुस्तकांबद्दलही त्यांनी इथे निवेदन केले आहे. साहित्य आणि जीवन डोहोन्बाद्धाल्चे शांताबाईंचे उत्कट कुतूहल आणि त्यांची सर्वस्पर्शी रसिकता यांचा उत्तम प्रत्यय " संस्मरणे " मधील लेखांमधून वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarManasi Swapnil Javal

    संस्मरणें .. शांत शेळके यांनी लिहलेलं हे पुस्तक त्यांच्या वेगवेगळ्या लेखांचा संच आहे .. साहित्यप्रेम काय असते याचा एक उत्तम नमुना हे पुस्तक आहे .. वाचन माणसाला किती प्रगल्भ , समृद्ध आणि समाधानी बनवत हे जाणवलं हे पुस्तक वाचून .. त्यांनी या पुस्तात व्यक्ती आणि साहित्य यांच्या वेगवेगळ्या अनुभवनाचे तरल चित्रण केले आहे .. साधी आणि सरळ भाषाशैली हे एक विशेष आहे या पुस्तकाचे .. सगळे लेख जणू शांताजी आपल्याला सांगतच आहेत असे वाटते .. पाऊलवाटा आणि जुनीओळख हे लिखाण साहित्याची ओळख कशी झाली, वाचनाची आवड , दिशांहीन वाचन याबद्दल आहे .. ना झालेल्या भेटी मध्ये एका साहित्यकाला भेटण्याची ओढ इतकी सुंदर वर्णिली आहे जणू आपण पण त्यास भेटावे असेच वाटते .. गांधी माझे माझ्यापुरते यात असामान्य व्यक्तींचा सामान्य व्यक्तींवर काळात नकळत कसा परिणाम होतो हे दाखवून दिले आहे .. कवितांबद्दल असलेली त्यांची आत्मिक ओढ , अनुवाद करताना मूळ लेखक व कविला त्यांनी किती समजून घेतले ते समजते .. बेथ या लेखात एका साधारण मुलीमधले साधेपण त्यांना कसे भुरळ घालते , माझ्या कवितांची जन्मकथा हाही एक सुंदर लेख आहे .. त्यातील कवितेच्या ओळी मोहक आहेत .. एक गाव आठवणीतले यातून आपण सुद्धा आपल्या बालपणातल्या उन्हाळी सुट्टीत गावी जातो असेच वाटते .. ज्या कोणाला ललित लिखाण वाचायला आवडते त्याने हे पुस्तक जरूर वाचावे .. ...Read more

  • Rating StarSAPTAHIK SINHASAN 07-03-1999

    शांता शेळके यांच्या समृद्ध भावजीवनाशी वाचकांना सलगी साधू देणारा लेखसंग्रह... शांता शेळके यांच्या ‘संस्मरण’ या पुस्तकातील आठवणींचा खजिना सर्वात जास्त वाचकांना दिपवून टाकील तो त्यांच्या कमालीच्या नितळ आत्मीय शैलीमुळे! शांताबाई प्रत्यक्ष आपल्याशी मोकळेणानं बोलत आहेत, आपल्या अंतरीच्या सुख-दु:खात आपल्याला जीवाभावाच्या मित्राप्रमाणे सामील करुन घेत आहेत, आपल्याशी बरोबरीच्या नात्याने संवाद साधत आहेत, असे वाचकाला पानोपानी वाटत राहते आणि त्या सलगीची भूलही पडते. या पुस्तकात शांताबार्इंनी आपल्या वाचनाच्या वेडाबद्दल सांगितले आहे, आपल्या घरच्या पुस्तक संग्रहाबद्दल सांगितले आहे. नाट्यवेडाबद्दल, स्त्रियांच्या ओव्या-लोकगीते-गाणी यांच्याबद्दल सांगितले आहे. आपल्या पाठांतराच्या शक्तीचे अनेक दाखले देऊन वाचकांना चकित करून सोडण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे. कांदबरी या प्रकारात थोडीफार प्रयोगशीलता दाखवूनही हा एक आपल्याला न जमलेला वाङ्मय प्रकार आहे, याची कबुली दिली आहे. काव्याचा अनुवाद करताना जो आनंद मिळाला त्याचेही काही नमुने दिले आहेत. चिनी कविता आणि जपानी हायवूâ यांचे अनुवाद करताना कोणकोणत्या अडचणी आल्या यांचीही माहिती दिली आहे. हिमवर्षात ही चँग वू चिएन या चिनी कवीची कविता शांताबार्इंनी तिचा अनुवाद असा केला आहे. मी तुला दिलेला लाल भडक गुलाब तू खुशाल धुळीत पडू दिलास मी तो उचलला आता तो पांढराफटक दिसत होता त्या एका निमिषात आपल्या प्रितीवर हिमवर्षाव झाला होता. लालभडक गुलाबाप्रमाणे आपल्या प्रेमाची दिलेली हाक प्रियकराने नाकारली आणि तो गुलाब खाली जमिनीवर टाकला या त्याच्या नकारात्मक भूमिकेवर निसर्गानेही जणू हिम वर्षाव करून शिक्कामोर्तब केले. त्या फुलाला पांढरेफटक रुप देऊन, ‘पांढऱ्या कपाळाची’ हा संकेतही येथे भारतीय पार्श्वभूमीवर आणखी एक अर्थाचा पदर या शब्दयोजनेला देऊन जातो. हायकू तीन ओळींचा असतो. शांताबार्इंनी त्यांचे अनुवाद करताना कधी कधी चार ओळीही वापरल्या. उदा. एकेक चार ओळी वेड भरविले कसले चंद्रा शेजारच्या उरी? खुळा रात्रभर बसला होता वाजवीत बासरी! ज्ञानेश्वरांची एक ओवीही त्यांना हासकूसारखी वाटते तीही त्यांनी दिली आहे. कमळावर भ्रमर पाय ठेवती हळुवार कुचंबैल केसर इया शंका।। अनुवाद करताना अनेक प्रश्न त्यांना पडतात. अडचणी जाणवतात. त्याबद्दल त्या म्हणतात, ‘अनुवाद शब्दश: करावा की भावानुवाद करावा? कधी कधी शब्दश: अनुवाद करण्यापेक्षा मूळ कवितचा आत्मा (स्पिरिट) शब्दातून व्यक्त करणे जास्त आवश्यक असते. आपण आपल्या भाषासरणीत पक्क रुजलेले असतो. वेगळ्या भाषेतील कविता मराठीत अनुवादित करताना आपली भाषा मोडणे आवश्यक ठरते, पण हे नेहमी जमतेच असे नाही. संस्कृतमधील समासप्राचुर्यामुळे थोड्या जागेत खूप काही सांगितलेले असते. मराठीत त्या वृत्तांत तेवढा आशय आणणेच शक्य नाही. मेघदूतसारख्या काव्याचा समश्लोकी अनुवाद करणे जवळजवळ अशक्यच आहे. अनुवाद का करावेसे वाटतात? कधी कधी मूळ कविता अगदी आपलीच वाटते. मनात येते, अरे हे तर सारे माझेच! मग ती खंत निवारण्यासाठी त्या कवितेचा मराठीत अनुवाद करावा, असे वाटते. प्रसंगी त्या कवितेत आपले स्वत:चेही आपण खूप घालतो. मग तो मुक्त किंवा स्वैर भावानुवाद होतो. आपल्या काही कवितांच्या जन्मकथाही त्या सांगतात. नॅशनल जिऑग्रॉफिक हे मासिक चाळताना गडद निळा समुद्र आणि त्यातून वर आलेले हिरवेगार वनराईने नटलेले एक देखणे चिमुकले बेट असे चित्र त्यांना दिसते. त्या मंत्रमुग्ध होतात. आपण त्या बेटावर उभ्या आहोत असे त्यांना वाटते आणि एकदम कवितेच्या ओळी सुचतात.’ निळा निळा समुद्र आणि बेट पाचुचे मध्ये तिथेच मी, तिथेच मी मनात कोणीसे वदे उभा समोर वृद्ध माड हालवीत झावळी जळात गाई अप्सास उदास धून सावळी! पुराण शिंपल्यामधून गाज तीच ये पुन्हा तलात खोल जागल्या अनंत जन्मीच्या खुणा रितेच हात राहिल स्मृति कितीक वेचुनी निळा निळा समुद्र गूढमिटूनी जाय लोचनी कविता अशा प्रकारे चित्रे पाहून सुचतात, विशिष्ट स्थळे पाहून सुचतात, काही व्यक्तींमुळे सुचतात. कवितेवरुनही सुचतात. प्रतिमांवरुन सुचतात. माणसामाणसातले तुटलेले संबंध, परस्परांशी जवळीक साधताना येणारे अपयश - शब्द व स्पर्श यांच्या मर्यादा - या सर्वांमुळेही कविता सुचतात. पूर्वी आपल्या कविता वर्णनपर, स्पष्टिकोणात्मक असत, आता त्या प्रतिमेच्या आश्रयाने निर्माण होतात असे त्या म्हणतात. ‘परंतु प्रत्यक्ष निर्मितीचा भाग बराचसा बहेतुक आणि गुढताच गुरफटलेला असतो’ असेही त्यांना वाटते. अनेक कविता व गीते अर्धवट सुचतात आणि मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहतात. त्या पूर्ण कधी होतील - हे कळत नाही, त्यांची साद पुन्हा कधी येते याची केवळ वाट बघायची असते असे त्यांना वाटते. ‘घोडेगाव’ या गावी त्यांचे आजोबा सबरजिस्ट्रार होते. त्या गावातले आपले घर, आपले शेजारी, नायकांच्या घरची पुस्तके, उंच धिप्पाड, टोप पदरी लुगडे नेसलेली हौसा मावशी (मुली आहेत पण मुलगा नाही हे तिचे दु:ख), घोडेगावातली शेवटची दिवाळी या सर्वांच्या आठवणी सांगून शांताबाई म्हणतात, ‘एखाद्या सुंदर स्वप्नासारखे घोडेगाव माझ्या आयुष्यात आले आणि स्वप्नांसारखेच ते पुन्हा अदृश्य झाले.’ याशिवाय कथाकार य. गो. जोशी, गीतकार ग. दि. माडगूळकर, कवी माधव ज्युलियन, शशिकांत पुनर्वसू, भा. रा. तांबे यांची कविता, लिव उलमनचे आत्मकथन (चेंजिग) यांच्यावरही शांताबाईनी भरभरून लिहिले आहे. आपल्या आणि माधव ज्युलियन याच्या वयात खूप अंतर आहे आणि माधव ज्युलियन यांना आपण पाहिलेले नाही असे सांगूनही शांताबाई त्यांच्याबद्दल वाटणारे ममत्व प्रकट करतात. ‘त्यांच्या काव्यात्मक, तडफदार, मानी व्यक्तिमत्वाचे एक सुंदर अपार्थिव चित्र मनात तयार झाले. ते चित्र अजूनही अभंग, निर्मळ, अकलंकित आहे. तरुण, स्वप्नाळू, भावूक वयात माधव ज्युलियन हे मला नि:संकोच प्रीतीचा निर्भय आविष्कार करणाऱ्या, स्त्रियांचा कैवार घेणाऱ्या, अन्यायाविरुद्ध तडपेâने झुंजणाऱ्या एखाद्या मध्ययुगीन शूर शिलेदारासारखे वाटत, आज मला ते तसे वाटत नाहीत... आजचा शब्द वापरायचा तर ते त्यांच्या काळातले आऊसायडर होते, त्यांचे हे रूप मला विशेष आवडते, जवळचेहि वाटते... आजही त्यांच्या कविता मी वाचते. जुन्या धुंदीचा, ध्येयवादाचा, स्वप्नरंजनाचा आनंद अनुभवते.’ ‘’‘साहित्य आणि नितिमत्ता’ या लेखात शांताबाई कलावंतांच्या नैतिक अनैतिकतेचे निकष वेगळे आहेत असे म्हणून नैतिक व लैगिक प्रमादांपेक्षा त्याचे चरित्र्य त्या कलात्मक निकषांवर ठरवणे योग्य आहे. असे प्रतिपादन करतात. सर्जनाची ऊर्मी, तीव्र कल्पनाशक्ती... यामुळे त्याच्या काही शारीर गरजा इतरांपेक्षा अधिक मोठ्या असतात याची निदान जाणीव ठेवणे तरी आवश्यक आहे. शारीर गोष्टीशी निगडीत असणाऱ्या आपल्या नीतिकल्पना या कालसापेक्ष, परिवर्तनशील असतात. त्यामुळे त्यावरून कलावंतांचे चारित्र्य जोखणे योग्य नाही. साहित्यनिष्ठा आणि कलेची अव्यभिचारी साधना या गोष्टी त्यांच्या लैंगिक प्रमादापेक्षा श्रेष्ठ मानायला हव्या असा त्यांच्या प्रतिपादनाचा आशय. महात्मा गांधीजींची आपल्या बालमनात निर्माण झालेली तेजोमूर्ती पुढे प्रसंगानुरूप कशी अधिकाधिक तेजस्वी होत गेली आणि त्यांच्या हत्येने विलक्षण व्याकुळ मन:स्थिती झाली, त्याचा हृदयस्पर्शी आलेख ‘गांधीजी माझे, माझ्यापुरते’ या लेखात शांताबार्इंनी काढला आहे. एकूणच शांताबार्इंच्या भावविश्वाशी वाचकांना जवळीक साधू देणारा हा सगळा ऐवज आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more