* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: PARAMVEER
  • Availability : Available
  • Translators : JYOTSNA LELE
  • ISBN : 9788177666908
  • Edition : 4
  • Publishing Year : AUGUST 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 224
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PARAMVEER- OUR HEROES IN BATTLE IS A BOOK WRITTEN BY MAJOR GENERAL IAN CARDOZO, IN ENGLISH. MANY FAMOUS MILITARY PERSONNEL, LIKE SIR WINSTON CHURCHILL, AFTER RETIRING FROM ACTIVE MILITARY SERVICES HAVE WRITTEN ABOUT THE ACCOUNT OF WARS THEY FOUGHT, BATTLE FIELDS, THE MILITARY STRATEGIES ETC. THEY ARE REALLY THE MASTERPIECES OF THE LITERATURE. IN INDIA, VERY FEW HAVE TRIED THEIR HANDS ON PEN, AFTER GUITTING THE SWORDS AND MAJOR GENERAL IAN CARDOZO IS ONE OF THEM. ‘PARAMVEER CHAKRA’ IS THE HIGHEST HONOUR, THE HIGHEST AWARD IN THE ORDER OF MILITARY AWARDS GIVEN BY THE GOVT. OF INDIA, FOR THE ACT OF VALOUR, AND PATRIOTISM. THE BOOK GIVES ACCOUNT OF 21 "PARAMVEER` MEDAL RECIPIENTS WHICH WERE AWARDED FOR THE WARS WAGED ON THE SOIL OF INDIA NAMELY, JAMMU-KASHMIR WAR 1947-48, INDIA CHINA WAR 1962, INDIA PAKISTAN WARS, 1965, 1971 AND RECENT KARGIL WAR 1999 AND ALSO UNITED NATION`S PEACE KEEPING EXPEDITION AND SIACHEN WAR, EACH RECIPIENT`S STORY UNFOLDS A BREATH TAKING EXPERIENCE OF THE COURAGE, BRAVERY AND VALOUR . THE DESCRIPTION OF THE SIGHT, THE DIFFICULTIES FACED BY THE INCUMBENTS, THE DETERMINATION TO FIGHT AGAINST ALL ODDS AND SUCCEED IS SO GRIPPING THAT YOUR HEAD BOWS IN GRATITUDE FOR THEIR BRAVERY. MANY RECIPIENTS LAID THEIR LIVES TO SAVE THIS COUNTRY. FOR OUR TODAY THEY HAVE SPENT THEIR YESTERDAY. FOR GETTING THE INFORMATION ABOUT THE FAMILY BACKGROUND, BUILDING OT THE CHARACTER OF EACH RECIPIENT, THE WRITER HAS TAKEN LOTS OF EFFORTS. HE CONTACTED ARUN BATRA`S (THE THEN YOUNGEST RECIPIENT WHO LAID HIS LIFE) FATHER. THE STORY NARRATED BY THE FATHER IS MOST TOUCHING AND ABSORBING. THE DESIGNER OF THIS MEDAL IS A LADY. NAMELY MRS. KHANOLKAR, WHO WAS NOT INDIAN BY BIRTH. THIS BOOK IS QUITE INFORMATIVE, THERE IS A LETTER WRITTEN TO PANDIT NEHRU BY SARDAR PATEL, READING THIS YOU GET TO KNOW SARDAR PATEL’S FORESIGHT AND ACUMEN, INSIGHT. THIS BOOK IS HEARTWARMING, IT ENRICHES YOUR MIND. NOW IT IS AVAILABLE AS A TRANSLATION IN MARATHI.
आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी पेटून उठलेल्या हिंमतवान भारतीय सैनिकांच्या या कथा आहेत. त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडूनही तसेच प्रोत्साहन मिळाले. युद्ध ही जरी राष्ट्राने हाती घेतलेल्या राजनीतीची पुढील पायरी असली तरी, रणधुमाळीत तोलले जाते ते सैनिकांचे नशीब! भारतीय सैनिक, ज्यांच्या गळी ‘स्वत:आधी सेवा’ हे तत्त्व पूर्णपणे उतरलेले असते, युद्धातील सर्व आव्हाने अंगावर घेतात, प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग शोधतात आणि अशक्यप्राय वाटणारे यश हसतमुखाने खेचून आणतात. फार थोड्यांचे शौर्य पदकाने सन्मानित होते. बाकीच्यांची दखल घेतली जाणे गरजेचे आहे. हे सर्व योद्धे, जे असे निर्भीड होते, ते कशामुळे झाले? त्यांना कोणी घडविले? भारतीय सैनिकांचे कर्तृत्व, त्यांची ध्येयधारणा, त्यांनी भारतीय सैन्याची आणि आपल्या देशाची केलेली सेवा वाचकांपर्यंत पोहोचवायचे काम या पुस्तकाने केले आहे. ज्या भारतभूमीसाठी या जवानांनी आपले रक्त सांडले, त्या भारताचे सर्वार्थाने रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे परम कर्तव्य आहे. या शूर योद्ध्यांना तीच खरी श्रद्धांजली आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #REFERENCE #PARAMVEERCHAKRA #BIOGRAPHY #JYOTSNALELE #MAJORGENIANCARDOZO
Customer Reviews
  • Rating StarRajiv Lute

    कश्मिर मध्ये काहीतरी होणार! अफवांचे पेव फुटले आहे.अनेकांना आज झोप येत नाही...आपल्या देशाचा गंभीर प्रश्न सुटावा असे प्रत्येकाला वाटते...भारतीयांना आपल्या सैन्यावर पूर्ण विश्वास आहे. सरकारचा पाठिंबा असेल तर सैन्य काहीही करू शकते हा आतापर्यंत चा अनुभव आे...अश्याच महान परमवीर चक्र विजेत्या नाटकांची गाथा सांगणारे हे पुस्तक सर्वांना आवडेल! ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    लेखक स्वतः एक धाडसी अधिकारी म्हणून नावाजलेले आहेत .१९५७ च्या बांगलादेशातील सिल्हटच्या लढाईत त्यांचा एक पाय सुरुंगावर पडला तेव्हा त्यांनी स्वतः ची कुकरी काढून पाय तोंडाला .अपंग होऊनही त्यांनी पुढे सैन्यदलात राहून देशाची सेवा केली. परमवीर चक्र हा सैन्दलातील सर्वात श्रेष्ठ पुरस्कार समजला जातो .आतापर्यंत एकवीसजणांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे .त्या प्रत्येकाची माहिती आणि लढाईतील पराक्रम या पुस्तकात लेखकाने लिहिला आहे .इतकेच नव्हे तर परमवीर चक्राची माहिती . त्याचा इतिहास हेही लिहिले आहे .या पदकाचे डिझाईन एका स्त्रीने केले आहे हे विशेष आहे . पहिल्या पदकाच्या मानकऱ्यापासून ते कारगिल युद्धापर्यंत सर्वांचा इतिहास यात आहे .सर्वांनी आपल्या या शूरवीरांबद्दल वाचलेच पाहिजे ...Read more

  • Rating Starअरूण भट

    नुकतेच आपले ‘परमवीर च्रक’ हे अनुवादित पुस्तक वाचले व थरारून गेलो. मनोगतात लिहिल्याप्रमाणे मराठी वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचावे. सर्वसाधारण नागरीकांना सैन्याबद्दल कमी माहिती असते. सदर पुस्तके अधिक प्रमाणात आली तर सैनिक, आधुनिक युद्धे याबद्दल अधिक माहती वाचकांना मिळेल. पुस्तकाची छपाई, मुखपृष्ठ इत्यादी तांत्रीक बाबी उत्तम आहेत. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA 29-10-2006

    परमवीर चक्र हे आपल्या देशातलं सर्वोच्च लष्करी सन्मानचिन्ह आहे. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी अतुलनीय शौर्य, धैर्य, पराक्रम गाजवणाऱ्या रणमर्दाला राष्ट्रपतींच्या हस्ते हे पदक प्रदान करण्यात येतं. १९४७ साली आपला देश स्वतंत्र झाल्याझाल्या पाकिस्तानी सैन्यानेपठाणी टोळीवाल्यांच्या वेषात काश्मीरवर आक्रमण केलं होतं. त्या युद्धापासून १९९९ सालच्या कारगिल युद्धापर्यंतच्या विविध समरप्रसंगात पराक्रम गाजवणाऱ्या एकूण २१ योद्ध्यांना आजवर परमवीर चक्राने सन्मानीत करण्यात आलेलं आहे. कोण आहेत हे २१ परमवीर? त्यांचीच नावं आणि त्यांच्या पराक्रमकथा प्रस्तुत ‘परमवीर चक्र’ या पुस्तकात तपशीलवार देण्यात आल्या आहेत. या कथा सांगणारा लेखक हा स्वत:देखील एक बहाद्दर सैनिक आहे. लेखक मजर जनरल (निवृत्त) इयान कारडोझो हे हिंदुस्थानी सैन्यात ‘५ गुरखा रायफल्स’ या पलटणीत सेवा बजावत असताना, एका लढाईत त्यांचा पाय शत्रूने पेरलेल्या सुरुंगावर पडला. ते जबर जखमी झाले. त्याही स्थितीत या बहाद्दराने स्वत:च्या कमरेची कुकरी काढली आणि आपला चिंधड्या उडालेला पाय सरळ स्वत:च कापून टाकला. अपंग बनल्यावरही त्यांना उच्च सेनाधिकाऱ्यांची सेवेतून काढून न टाकता, त्यांच्या शौर्याची कदर करून त्यांची सेवा पुढे चालू ठेवली, असे ते पहिले सेनाधिकारी होत. १९९३ साली हिंदुस्थानी सैन्यदलाच्या पूर्वेकडील कोअरचे चीफ ऑफ स्टाफ अशा उच्च पदावरून ते निवृत्त झाले. शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानेच गायिला, की तो श्रोत्यांच्या काळजाला अधिकच भिडतो. त्याचप्रमाणे मेजर जनरल कारडोझोनी लिहिलेली परमवीर चक्राच्या मानकऱ्यांची ही पराक्रमगाथा मोठी वेधक, प्रेरक उतरली आहे. युद्धात पराक्रम गाजवणाऱ्यांना सन्मानीत करून त्यांचा व सर्वच सैनिकांचा उत्साह वाढवण्याची प्रथा, परंपरा फार प्राचीन काळापासून जगभर सर्व देशांमध्ये आहे. आपल्याकडेही ती होतीच. महाराजा शिवछत्रपती आपल्या बहाद्दर सैनिकांच्या हातात सोन्याचे तोडे घालीत. त्यांना सर्जेराव, हंबीरराव, प्रतापराव, विश्वासराव असे मानाचे किताब देत. पालखी, हत्ती, नौबत, निशाण अशी मानचिन्हे देऊन गौरवीत. इंग्रजी अमदानीत हिंदुस्थानी सैनिकांना इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट, व्हिक्टोरिया क्रॉस इत्यादी मानचिन्हे दिली जात. स्वतंत्र हिंदुस्थानात व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च लष्करी सन्मानाला समकक्ष असं परमवीर चक्र हे पदक अस्तित्वात आणलं गेलं. मध्यभागी अशोकस्तंभावरील चार सिंह आणि चार बाजूंना इंद्राच्या वज्राची चार चिन्हं, असं हे पदक सावित्रीबाई खानोलकर या संस्कृत साहित्याची प्रकांड पंडिता असणाऱ्या महिलेने सुचवलं. मेजर जनरल विक्रम खानोलकर या मराठी सेनाधिकाऱ्याची ही पत्नी मूळची स्वित्झर्लंडची होती. तिची आई रशियन आणि वडील हंगेरियन होते. योगायोग पाहा. पठाणी टोळीवाल्यांचा हल्ला उधळून लावून पाकिस्तानी सैन्याला थोपवून धरण्याचा अतुल पराक्रम गाजवल्याबद्दल ज्या मेजर सोमनाथ शर्मांना स्वतंत्र हिंदुस्थानचं पहिलं परमवीर चक्र मिळालं, ते मेजर शर्मा सावित्रीबार्इंच्या मुलीचे दीर होते. अशा अनेक रोमांचक हकीकतींनी पुस्तक अत्यंत वाचनीय बनलं आहे. मांडणी, मुद्रण, निर्मिती, मुखपृष्ठ सुबक. जोत्स्ना लेले यांचा मराठी अनुवाद ठीक. -मल्हार कृष्ण गोखले ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more