* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: TATA – THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND
  • Availability : Available
  • Translators : VIDULA TOKEKAR
  • ISBN : 9788184982992
  • Edition : 4
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 232
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
A SERIES OF HIGH-PROFILE ACQUISITIONS, INCLUDING JAGUAR LAND ROVER AND CORUS STEEL, TOGETHER WITH THE LAUNCH OF THE NANO (THE WORLD S FIRST RS. 1 LAKH/ BELOW US$ 2500 CAR), IS SET TO CHANGE OUR PERCEPTION OF INDIA`: ON THE THRESHOLD OF BECOMING A TRULY GLOBAL BRAND.*S OLDEST AND MOST RESPECTED CORPORATE BRAND. WITH A MAJOR INTERNATIONAL PRESENCE, IN A VARIETY OF AREAS INCLUDING STEEL, TEA, CHEMICALS, COMMUNICATIONS AND SOFTWARE, TATA NOW STANDS 65TH IN THE WORLD BRAND VALUATION LEAGUE. BUT WHAT IS THE TATA BRAND ALL ABOUT? WHAT ARE ITS VALUES? HOW DO PEOPLE PERCEIVE IT, IN INDIA AND AROUND THE WORLD? IN THIS ABSORBING AND INFORMED BOOK MORGEN WITZEL DIGS INTO THE HEART OF THE TATA ENTERPRISE, DESCRIBES ITS ORIGINS, HOW TATA`S REPUTATION AND IMAGE EVOLVED, AND HOW THE GROUP HAS WORKED TO TRANSFORM THAT IMAGE INTO A POWERFUL AND VALUABLE BRAND. TATA: THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND GOES TO THE CORE OF THE TATA ETHOS TO EXPLORE THE UNIQUE RELATIONSHIP BETWEEN THE TATA GROUP AND THE INDIAN PEOPLE, A RELATIONSHIP THAT GOES BEYOND THE ACHIEVEMENTS OF A SUCCESSFUL BUSINESS TO ITS SOCIAL CONTRIBUTIONS FOR ITS EMPLOYEES AND THE SOCIETY AT LARGE. FINALLY IT ASKS HOW THAT REPUTATION WILL BE PERCEIVED AND UNDERSTOOD AS TATA MOVES INTO GLOBAL MARKETS. WHETHER YOU RE AN ENTREPRENEUR, A MANAGER, A MARKETER, OR AN INTERESTED TATA LOYALIST THIS BOOK WILL HELP YOU UNDERSTAND THE DURABILITY OF THE BRAND AND INSPIRE YOU WITH THE VALUES IT HOLDS ONTO IN THE GLOBAL ECONOMY.
टाटा ब्रांड म्हणजे आहे तरी काय ? काय आहेत त्यांची मुल्ये ? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजते? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मोर्गेन विट्झेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात,त्याचे मूळ समजावून सांगतात,टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली, आणि या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रांड मध्ये करण्यासाठी या उद्योगसमूहाने काय केलं,याचं वर्णन करतात.

No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #MORGEN WITZEL #VIDULA TOKEKAR #टाटा-एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती #TATA – THE EVOLUTION OF A CORPORATE BRAND #BIOGRAPHY
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 21-05-2017

    यशस्वी उद्योगाची यशोगाथा... जगातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये ‘टाटा’ ही विशेष आहे. केवळ आर्थिक नफा हे त्यांचे ध्येय नसून, ते सामाजिक आणि आर्थिक दोन्हीही आहे. ‘टाटा’ १४० वर्षांहून अधिक जुनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधि देशांमध्ये त्यांचा कारभार आहे आणि पंचाऐंशीहून अधिक देशांमध्ये ते आपल्या वास्तू आणि सेवा निर्यात करतात. भारतात उद्योगाची छोटीशी सुरुवात केलेले ‘टाटा’, आता मोठ्या प्रमाणावर आंरराष्ट्रीय क्षेत्रात पोहोचले आहेत. समुहाच्या एकूण उत्पन्नापैकी ६५ टक्के उत्पन्नाचा भाग हा भारताबाहेरून येतो. सर्वांत अलीकडचा ताळेबंद ३१ मार्च २००९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत ७०.८ कोटी डॉलर्सचे उत्पन्न दाखवतो. तरीही ‘टाटा : एका कॉर्पोरेट ब्रँडची उत्क्रांती’ ही केवळ एका बलाढ्य आर्थिक संस्थेची यशोगाथा नाही. ही कहाणी आहे, टाटांच्या मूल्यांची : रोजच्या कामकाजाच्या मागे काय आहे; त्याचा डीएन आणि आपले सामाजिक ध्येय पूर्ण करताना ते आर्थिक कशाला दुय्यम प्राधान्य देतात’, त्याची. टाटा ब्रँडचे स्थान आणि त्याची मूल्य समजून घेताना चार महत्त्वाचे घटक लक्षात घ्यावे लागतील. एक म्हणजे, अगदी सुरुवातीपासून हे स्पष्ट होते की, टाटा समुहामध्ये काम करणाऱ्या विविध कंपन्यांचे ध्येय आणि काम हे सामाजिक असेल. मला माहीत असलेल्या जगातल्या सर्व कंपन्यांमध्ये ‘टाटा’ या बाबतीत एकमेव आहे. उद्योजकांनी स्थापन केलेल्या, मोठी आर्थिक संपत्ती मिळवलेल्या इतर मोठ्या कंपन्यांनी हे केले, पण त्यांनी आर्थिक संपत्ती निर्माण करण्यावर प्राधान्याने लक्ष केंद्रीत केले; समाजाला परतफेड करण्याचा निर्णय त्यानंतर आला. सहसा निवडलेले एकच सामाजिक कार्य करण्यासाठी या कंपन्यांच्या संस्थापकांनी सेवाभावी संस्था निर्माण केल्या. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये एक कळीचा मुद्दा आहे. टाटांची कंपनी जिथे काम करते. त्या प्रदेशातल्या सामाजिक गरजा टाटा शोधून काढतात. प्रत्येक सुटी कंपनी ज्या समाजात काम करतो, तो समाज कशावर उभा आहे, ते शोधून काढतात आणि हेही शोधतात, की कशामुळे समाजात आशा आणि मूल्ये निर्माण होतील. तसेच भागधारक आणि कर्मचारी, भागीदार आणि नंतर सहयोगी घटकांसाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती कशी होईल हेही बघितले जाते. इतर बहुतेक जागतिक कंपन्या ज्या मुद्द्यांवर जोखल्या जातात. त्या मुद्द्यांकडे लक्ष पुरवणे; हे या सुस्थापित, आंतरराष्ट्रीय संस्थेत सातत्याने चालू असते. आपण जेव्हा टाटांचे घोषवाक्य बघतो आणि प्रत्यक्ष कंपनीच्या अंतर्गत व्यवहाराकडे लक्षपूर्वक पाहतो. तेव्हा आपल्याला दिसते, की त्यांचा हेतू हा खरोखरच सामाजिक आहे. आणि संस्थेच्या आर्थिक पैलूंवर काम करतानासुद्धा हाच हेतू साहाय्यकारी ठरत आहे. त्यांचे वेगळेपण यातच आहे. बहुतेकशा पाश्चात्य देशांमध्ये संस्थेचा मोठा भाग हा आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी, ‘धंदा म्हणजे धंदा’ या तत्त्वावर काम करत असतो. हे फार संकुचित आहे. पाश्चात्य कंपन्यांनी आता हे समजून घेतले पाहिजे, की सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयाचा एक भाग आहे. स्थानिक समाजातून स्थानिक बुद्धिमत्ता विकास पावते, हे पाश्चात्य जगाने समजून घेण्याची वेळ आली आहे. या कल्पनेशी टाटांनी स्वीकारलेली बांधिलकी दाखवणारे एक उदाहरण तामिळनाडूमधल्या दुर्गम भागातल्या होसूर गावी दिसून येते. १९८७ मध्ये टाटांनी स्थानिक सरकारबरोबर भागीदारीने व्यवसाय सुरू केला आणि टायटन घड्याळांचा पहिला कारखाना उभारला. कारखान्याठी लागणारे मनुष्यबळ कुठून आणायचे हा निर्णय ताबडतोब व्हायला हवा होता. बंगलोरहून व्यावसायिक अभियंते आणणे हा एक पर्याय होता. हे टाटांच्या बाण्याला अगदीच शोभण्याजोगे नव्हते. होसूरच्या आसपासचा प्रदेश अगदी गरीब! शेती हा जवळजवळ एकच उद्योग आणि स्थानिक पातळीवर कुशल कामगारांची अनुपलब्धता असली, तरीही कंपनीला हे पक्के ठाऊक होते, की हा प्रदेश आणि तिथली माणसे ही त्यांची जबाबदारी होती. गरिबी असली तरी प्राथमिक प्रदेश आणि तिथली माणसे ही त्यांची जबाबदारी होती. गरीबी असली तरी प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था चांगली होती आणि ती भरपूर सुशिक्षित मुले-मुली तयार करत होती. या नवीन भरतीतून जागतिक दर्जाचे घड्याळजी बनणार होते. चारशे तरुण लोकांना भरती करून होसूरमध्ये आणले गेले. टायटनने तात्काळ आवश्यक ती मदत दिली. कित्येकांनी यापूर्वी शहर कधी पाहिले नव्हते, की झोपडीशिवाय दुसरे घर पाहिले नव्हते. घरे बांधली गेली आणि ‘दत्तक पालक’ त्यांच्याबरोबर राहून शहरी वळणाचे, राहणीचे संस्कार त्यांच्यावर करू लागले. टायटनने क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम सुरू केले आणि कामानंतरच्या वेळात कामगारांना पदवीपर्यंतच नव्हे, तर पदव्युत्तर शिक्षणासाठीही मदत करायला सुरुवात केली. कारखान्यात प्रशिक्षक आणि अभियंते यांना अचूक यंत्र - प्रिसिजन मशिनरी - कशी वापरायची हे शिकवत होते. ‘टायटन’ हा आता एक अत्यंत यशस्वी उद्योग आहे आणि त्यात तामिळनाडूमधले हजारो लोक काम करतात. एकट्या होसूरमध्येच टायटनचे तीन कारखाने आहेत आणि तिथले बहुतांश कामगार आसपासच्या खेड्यांमधले आहेत. घड्याळाचे पट्टे आणि इतर आनुषंगिक गोष्टी बनवणाऱ्या उद्योगांमध्ये आणखी हजारोजणांना अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळाला आहे. २००१ मध्ये टायटनची ‘भारताचा सर्वांत प्रशंसनीय ब्रँड’ म्हणून निवड झाली आणि तिने आपले ‘सामाजिक संस्था’पण पुन्हा एकदा सिद्ध केले. शेवटी, टाटांनी हे एकदाच ठरवून टाकले आहे आणि ते त्यांच्या आर्थिक आणि बाजारातल्या कामागिरीवरून दिसून येते, की सामाजिक हेतू असल्यामुळे स्पर्धेची आणि जिंकण्याची तीव्रता जराही कमी होत नाही. खर तर, उलटेच घडते. उघडच आहे, की टाटा केवळ निवडलेल्या बाजारपेठेत सर्वोच्च स्थान मिळवतात आणि टिकवतात एवढेच नव्हे, तर भागधारकांसह सर्व घटकांसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यात अव्वल आहेत. त्याचवेळी ते सामाजिकदृष्ट्या जबाबदार, अतिशय गुणवान व्यवस्थापक आणि नेते घडवून भारतात आणि बाहेरच्या देशात निर्यातही करतात. या सगळ्या कल्पना ‘विश्वास’ या तीन अक्षरी शब्दांत सामावलेल्या आहेत. पुष्कळ कंपन्यांच्या उक्तीत तो असतो, पण कृतीत नसतो. टाटामध्ये काम करणाऱ्यांच्या रक्तातच तो आहे. ती एक वृत्ती आहे. वेगळेपण आहे. भविष्यात सर्व कंपन्यांसाठी ते एक मानक आहे, आणि ते ‘टाटा’ आहे. माझ्या व्यावसायिक कामानिमित्ताने मला युरोप आणि अमेरिकेत अशा सीईओची नावे विचारली जातात. ज्यांना युरोपियन आणि अमेरिकन संचालक मंडळावर घेता येईल. रतन टाटांचे नाव नेहमीच पहिले येते. नम्र, विनयी, विचारी, पाश्चात्य समाजासाठी दुर्मीळ अशा अनुभवाने समृद्ध असे त्यांचे वर्णन केले जाते. भविष्यात नेतृत्व करू शकतील अशांमध्ये हेच तर सारे अपेक्षित असते. मॉर्गन विट्झेल यांनी कष्टपूर्वक आणि सांगोपांग रीतीने हे संशोधन पूर्ण केले आहे. त्यांच्या निरीक्षणातून त्यांनी हे दाखवून दिले आहे, की टाटांचा सामाजिक हेतू हा टाटा ब्रँडमध्ये परावर्तित झाला आहे आणि हा एक ‘प्रसिद्धी’चा दिखावा नसून सत्य आहे. तो स्फूर्तिदायक आहे. तो प्रत्यक्ष आहे. मला वाटते ही कहाणी म्हणजे इतर संस्थांसाठी एक आव्हान आहे. या पुस्तकात ही सर्व कहाणी आहे. -राम चरण ...Read more

  • Rating StarDAINIK SAGAR 05-06-2016

    टाटा ब्रँड म्हणजे आहे तरी काय? काय आहेत त्याची मूल्यं? जगातील आणि भारतातील लोकांना त्यातून काय समजतं? या रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकात मॉर्गन विटझेल टाटांच्या हृदयाचा ठाव घेतात, त्याचे मूळ समजावून सांगतात. टाटांच नाव आणि प्रतिमा कशी निर्माण होत गेली णि या प्रतिमेचं रुपांतर एका बलवान आणि मौल्यवान ब्रँडमध्ये करण्यासाठी या उद्यांगसमूहाने काय केलं, याचं वर्णन करतात. ‘टाटा’ १४० वर्षाहून अधिक जूनी आहे. त्यांच्या २८ पब्लिक लिमिटेड कंपन्या आहेत. ऐंशीहून अधिक देशामध्ये त्यांचा बारभार आहे. आणि पंच्याऐंशीहून अधिक देशामध्ये ते आपल्या वस्तू आणि सेवा निर्यात करतात. टाटांचे वेगळेपण यात आहे की, त्यांचे सामाजिक कार्य हे त्यांच्या एकूण ध्येयामध्ये समाविष्ट आहे. कंपनीच्या स्थानिक परिस्थितीची गरज लक्षात घेऊन ते भागधारक, कर्मचारी, भागीदार यांच्यासाठी आर्थिक मूल्यांची निर्मिती करतात. मराठी अनुवाद विदुला टोकेकर यांनी केला असून प्रस्तावना राम चरण यांनी लिहिली आहे. एका आदर्श कंपनीचे अंतरंग वाचनीय असे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more