* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
`TRIVENI` A CONFLUENCE OF THREE RIVERS, THESE POEMS ARE UNIQUE IN THEIR STYLE. NO ONE HAS EVER TRIED THIS FORM. GULJAR IS THE FIRST TO DO SO. THE FIRST TWO LINES OF EACH OF HIS POEM MEET EACH OTHER GIVING COMPLETE MEANING TO THE POEM, BUT THE THIRD LINE? IT SECRETLY MEETS THIS CONFLUENCE, UNDERGROUND; AWAY FROM OUR SIGHT. ALL THESE POEMS MARK THE PROMINENT SILENCE IN GULJAR`S POETRY. THIS SILENCE HAS IMMENSE POWER. IT IS EXPRESSED VERY STRONGLY. HIS POETRY HAS VERY FEW WORDS, BUT EACH HAS TONS OF MEANINGS. EACH ONE IS VERY SUBTLE. IT SOMETIMES IS AGITATED WITH THE PARTING OF THE NEAR AND DEAR, IT SOMETIMES REGRET THE CONTROVERSIES IN THE SOCIETY. KEEPING IN TOUCH WITH IT IS THE ETERNAL TRUTH AND THE UNDERSTANDING.
`त्रिवेणी` ही तीन नद्यांचा संगम आहे, या कविता त्यांच्या शैलीत अद्वितीय आहेत. कोणीही कधीही या स्वरूपात प्रयत्न केलेला नाही. गुलजार हे असे करणारे पहिले आहेत. त्याच्या प्रत्येक कवितेच्या पहिल्या दोन ओळी एकमेकांना भेटतात, कवितेला पूर्ण अर्थ देतात, पण तिसरी ओळ? ती गुप्तपणे या संगमाला भेटते, जमिनीखाली; आपल्या नजरेपासून दूर. या सर्व कविता गुलजारच्या कवितेतील प्रमुख शांतता दर्शवतात. या शांततेत अफाट शक्ती आहे. ती खूप जोरदारपणे व्यक्त केली जाते. त्याच्या कवितेत खूप कमी शब्द आहेत, परंतु प्रत्येकाचे अर्थ भरपूर आहेत. प्रत्येकी खूप सूक्ष्म आहे. कधीकधी जवळच्या आणि प्रिय व्यक्तींच्या विभक्तीमुळे ते चिघळते, कधीकधी समाजातील वादांबद्दल पश्चात्ताप होतो. त्याच्याशी संपर्कात राहणे हे शाश्वत सत्य आणि समज आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#आंधळी#कॅथरिन ओवेन्स पिअर#कादंबरी# शान्ता ज.शेळके#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%#THE HELENKELLERSTORY #CATHERINEOWENSPEARE #SHANTAJ.SHELKE #ANDHALI #ANDHALYACHE DOL #ANOLAKH #ANUBANDH #CHAUGHIJANI #GAVATI SAMUDRA #GONDAN #KAVITA SMARANATALYA #KINARE MANACHE #LEKHAK ANI LEKHANE #MEGHDUT #NIMITTA NIMITTANE #PAVSAAADHICHAPAUS #PURVASANDHYA #RANGRESHA #RESHIMREGHA #SANGAVESEVATALEMHANUN #SANSMARNE #SUVARNAMUDRA #VARSHA
Customer Reviews
  • Rating StarDhananjay Gore

    हे त्रिवेणी पुस्तक छान आहे. अगदी बेलाच्या पानासारखे आहे. जपान मध्ये याला `हायकू` असे संबोधीले जाते. मेघना साने यांचा त्रिवेणी काव्यसंग्रह वीस वर्षांपूर्वी आणि गुलजार यांचा काव्यसंग्रह पाच वर्षांपूर्वी माझ्या खजिन्यात दाखल झाले. वात, पित्त आणि कफ यासाखे मनातील त्रिदोष हरण करणा-या त्रिवेणी संगमातील या काव्यसरीता असतात जणु! छोट्या पण आशय मोठा असतो अन् त्यामुळे वाचतांना कंटाळा येत नाही. ...Read more

  • Rating StarTanmay Keluskar

    लेखनाची पद्धत भन्नाट आहे ह्यात आणि गर्भितार्थ तर अफलातून

  • Rating StarNitin Lokhande

    अप्रतिम ......तीन ओळींत पूर्ण कविता ...म्हणुन त्रिवेणी ....पहील्या दोन ओळी म्हणजे गंगा आणि यमूनेचा संगम तर ....तीसरी ओळ म्हणजे सरस्वती प्रमाणे गुप्त आणि सुप्त विचारानीं समांतर वाहत जाणारी .....

  • Rating StarDAINIK SAKAL 17-11-2002

    गुलजारांच्या ‘त्रिवेणी’चा सारस्वत अनुवाद... गुलजार संवेदनशील कवी, तर शांता शेळके भावग्राही अनुवादक. या सुरेख संगमामुळेच साकारली उर्दू, हिंदी नि मराठीची त्रिवेणी. त्रिवेणी हा गुलजारांनी घडवलेला त्रिपदी छंद. तीन दशकांच्या निरंतर रियाजानंतर तो समृद्ध झला. शांता शेळके यांना हिंदी, उर्दूची चांगली जाण होती, हे गुलजारांच्या मूळ हिंदीत लिहिलेल्या ‘त्रिवेणी’ या त्रिपदी गझल संग्रहाचा मराठी अनुवाद वाचत असताना लगेच लक्षात येते. त्यात त्यांचा पिंड कवयित्रींचा त्यामुळे भाव नि भाषेचा सुरेख संगम या अनुवादात पदोपदी लक्षात येतो. हा अनुवाद हिंदी-मराठीस जोडणारा दुग्धशर्करा योग होय. फाळणीनंतर जी माणसं पाकिस्तान सोडून भारतात आली, त्यापैकी गुलजार एक होत. फाळणीच्या वेदनांनी त्यांचं काव्य ओथंबलेलं आहे. ते अशा त्रिपदी गझल वाचताना तीव्रतेनं जाणवतं. मी आपले सारे समान घेऊन आलो होतो बॉर्डरच्या अलीकडे माझे मस्तक मात्र कुणी कापून ठेवून दिले तिकडेच माझ्यापासून अलग होणे रुचले नसेल तिला कदाचित! गुलजारांची त्रिवेणी नामक त्रिपदी अल्पाक्षरी गझल होय. पहिल्या दोन ओळींचा शेर असतात गंगा-यमुना. हा असतो विषय विस्तार. तिसरी ओळ असते सरस्वती. तीत गझलचा आशय अमूर्त, अव्यक्त असतो. सरस्वतीसारखा गुप्त. काव्य वाचकांनी स्वानुभवांच्या समृद्धीवर स्वविवेक नि स्वतर्क इत्यादीच्या बळावर तो जाणून घ्यायचा त्यामुळे ‘त्रिवेणी’ समजायची तर कवी नि वाचक यांच्यात अद्वैत भाव, भाषा, भंगिमांचा त्रिवेणी संगम होणं पूर्वअट असते. गुलजारांची कविता अनुभवाच्या समृद्धीसह भाषांतरित करायची तर अनुवादकामध्ये ते सारस्वत कौशल्य ती साहित्य प्रतिभा असणे अनिवार्य. ती शांता शेळकेमध्ये होती. ज्या मराठी वाचकांना त्यांच्या कॉफी हाऊस प्रत्येक टेबलावर नवा पाऊस! सारख्या हायकूचं त्रिपदीचं सौंदर्य पेलता आलं, त्यांना या त्रिवेणी म्हणजे नवी पर्वणीच वाटल्याशिवाय राहणार नाही. त्रिवेणी अनुभवजन्य तशीच भावसमृद्ध! मराठी अनुवाद करताना शांता शेळके यांनी मूळ त्रिवेणीतील आशयास धक्का लावू न देता त्यांचा अनुवाद केला आहे. काही ठिकाणी तर हा अनुवाद मूळ रचनेच्या बरहुकूम झालेला आढळतो. वह जिससे साँस का रिश्ता बंधा हुआ था मेरा दबा के दाँत तले साँस काट दी उसने कटी पतंग का माझा मुहल्ले भर ते लुटा! सारख्या या हिंदी त्रिवेणीचा शांता शेळकेंनी केलेला खालील मराठी अनुवाद याचा ठळक पुरावा म्हणून सांगता येईल. जिच्याबरोबर श्वासाचे धागे जोडले होते मी ते नातेच, दातांनी धागा तोडावा तसे तोडले तिने! आणि... आता काटलेल्या पतंगाचा तुटका मांजा लुटला जातो आहे मोहल्यात! ही गोष्ट अलाहिदा की ‘जोडले’च्या ठिकाणी ‘जडले’ नि ‘मोहल्ल्यात’च्या ठिकाणी ‘गल्लीत’ शब्दांची रचना चपखल ठरली असती. ‘त्रिवेणी’ या गुलजारांच्या नवरचित छंदांच्या संग्रहाचा मराठी अनुवाद ही शांता शेळके यांनी मराठी साहित्यास दिलेली शेवटची देणगी नि म्हणून तिचं ऐतिहासिक मूल्य राहिल. हा अनुवाद गुलजारना इतका भावला की, त्यांनी तो खालील शब्दांत शांताबार्इंना समर्पित केला. शान्ताबाई, आप सरस्वती की तरह मिली। और सरस्वती की तरह गुम हो गयी। ये ‘त्रिवेणी’ आप ही को अर्पित कर रहा हूँ। - गुलजार मूळ रचनाकरानं अनुवादकाचा केलेला असा सन्मानही माझ्यासारख्या अन्य अनुवादक, अभ्यासकास वैश्विक घटना वाटल्यावाचून राहणार नाही. अशी दर्दी कलाकारच देऊ जाणे! सरस्वतीच्या प्रतीकात्मक चिन्हाचं साधं परंतु आशयघन मुखपृष्ठ लाभलेला हा मराठी भाषांतरित काव्यसंग्रह मूळ हिंदी ग्रंथाच्या एक तृतीयांश किमतीत मराठी काव्यरसिकांना त्यांच्या बोलीत उपलब्ध करून देऊन मराठी प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊसने ‘मराठी पुस्तके महाग असतात’ हा आरोप अपवादाने खोटा ठरवला आहे. तो नियम होईल. तर मराठी साहित्याचा प्रसार होण्यास साह्य होईल. ‘त्रिवेणी’ या भाषांतरित गझल संग्रहात विषय वैविध्य आहे. प्रेम, प्रणय, विरह, मीलन, फाळणी, जगणं, शोषण, नाती, इच्छा, आकांक्षा, पर्यावरण सारे विषय समावून घेण्याची कुवत असलेल्या या त्रिपदीत मनुष्य निसर्ग व जीवनसंघर्षाचा त्रिवेणी संगम आहे. उर्दू, अरबी, फारसी शब्दांजागी समर्पक मराठी शब्दरचना करून शांता शेळके यांनी मराठी त्रिवेणी मूळ हिंदी इतक्याच दर्जेदार बनवल्या आहेत. या त्रिवेणीत जीवनाचा सुस्कारा जसा आहे, तशी जीवन सुसह्य करण्याची शक्तीपण. जे लिहाल त्याची साक्ष देईन मी बिनचूक सारख्या ओळीतून शांताबार्इंच्या मनातील अनुवादकाचा आत्मविश्वासच एका अर्थाने प्रकट झाला आहे. हा आत्मविश्वासच या अनुवादाचं आत्मबळ होय. हिंदी ‘त्रिवेणी’चा मराठी अनुवाद मात्र शब्दांची टांकसाळ नसून भावनेनं गुंफलेली ती मोहनमाळ होय! गुलजार नि शांता शेळके यांच्या काव्यातील भावबंधांचा धांडोळा घेणाऱ्यांना हा अनुवाद भाव नि भाषा सेतू ठरल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास वाटतो. -सुनीलकुमार लवटे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more