ADALJA VARSHA

About Author

Birth Date : 10/04/1940


VARSHA MAHENDRA ADALJA IS A GUJARATI WRITER. SHE WAS BORN IN MUMBAI. FATHER IS A WRITER. DEBUT ON STAGE AT THE AGE OF TEN. CENTRAL ROLES IN CLASSICAL PLAYS. AWARDS FOR SOME ROLES. B.A IN LANGUAGE FROM MUMBAI UNIVERSITY AND M.A IN SOCIOLOGY. WORKED AS AN ANNOUNCER ON ALL INDIA RADIO.

वर्षा महेंद्र अडालजा या गुजराती साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. वडील लेखक. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण. अभिजात नाटकांमध्ये मध्यवर्ती भूमिका. काही भूमिकांसाठी पुरस्कार. मुंबई विद्यापीठातून भाषा या विषयांत बी. ए. आणि समाजशास्त्र या विषयात एम. ए., ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून काम. अन्सार या कादंबरीचं नाट्यरूपांतर, आकाशवाणीवरून क्रमश: वाचन. या कादंबरीच्या गुजरातीमध्ये अनेक आवृत्त्या प्रकाशित. राजस्थानी भाषेत अनुवाद. दिल्लीच्या साहित्य अकादमीकडून नुकताच इंग्रजी भाषेत अनुवाद. या कादंबरीसाठी दिल्लीचा साहित्य अकादमी पुरस्कार, गुजरात विद्या सभेचा पुरस्कार, कोलकत्त्याच्या भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार प्राप्त. अनेक कादंबऱ्यावर दूरदर्शन मालिकांची निर्मिती. त्यातील काहींना पुरस्कार प्राप्त. कादंबऱ्या, लघुकथा संकलनं, नाटकं, निबंध, प्रवासवर्णनं, संपादित पुस्तकं अशी जवळपास ५० पुस्तकं नावावर जमा. चाळीस वर्षांपासून गुजराती साहित्य परिषदेच्या निर्वाचित सदस्य. गुजराती साहित्य अकादमीच्या सल्लागार, गुजराती साहित्य परिषदेच्या उपाध्यक्ष इ. पदे भूषविली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे भरलेल्या साहित्यविषयक परिषदेत आणि लंडनच्या बुक फेअरमध्ये सहभाग. साहित्यातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार, पत्रकारितेतील योगदानासाठी गुजरातच्या पत्रकार संघाचा पुरस्कार. लघुकथा संकलनासाठी, कादंबऱ्यासाठी गुजराती साहित्य अकादमी, महाराष्ट्र-गुजराती साहित्य अकादमी, गुजरात सरकार तर्फे विविध पुरस्कार. गुजरात गव्हर्नमेन्ट फिल्म बोर्डाचा पुरस्कार, के. एम. मुन्शी पुरस्कार, सोव्हिएत लॅन्ड नेहरू पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित. नुकत्याच प्रकाशित क्रॉसरोड पुस्तकास दर्शक अ‍ॅवॉर्ड.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ANSAR Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more