ADALJA VARSHA

About Author

Birth Date : 10/04/1940


VARSHA MAHENDRA ADALJA IS A GUJARATI WRITER. SHE WAS BORN IN MUMBAI. FATHER IS A WRITER. DEBUT ON STAGE AT THE AGE OF TEN. CENTRAL ROLES IN CLASSICAL PLAYS. AWARDS FOR SOME ROLES. B.A IN LANGUAGE FROM MUMBAI UNIVERSITY AND M.A IN SOCIOLOGY. WORKED AS AN ANNOUNCER ON ALL INDIA RADIO.

वर्षा महेंद्र अडालजा या गुजराती साहित्यिक आहेत. त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. वडील लेखक. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण. अभिजात नाटकांमध्ये मध्यवर्ती भूमिका. काही भूमिकांसाठी पुरस्कार. मुंबई विद्यापीठातून भाषा या विषयांत बी. ए. आणि समाजशास्त्र या विषयात एम. ए., ऑल इंडिया रेडिओवर उद्घोषक म्हणून काम. अन्सार या कादंबरीचं नाट्यरूपांतर, आकाशवाणीवरून क्रमश: वाचन. या कादंबरीच्या गुजरातीमध्ये अनेक आवृत्त्या प्रकाशित. राजस्थानी भाषेत अनुवाद. दिल्लीच्या साहित्य अकादमीकडून नुकताच इंग्रजी भाषेत अनुवाद. या कादंबरीसाठी दिल्लीचा साहित्य अकादमी पुरस्कार, गुजरात विद्या सभेचा पुरस्कार, कोलकत्त्याच्या भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार प्राप्त. अनेक कादंबऱ्यावर दूरदर्शन मालिकांची निर्मिती. त्यातील काहींना पुरस्कार प्राप्त. कादंबऱ्या, लघुकथा संकलनं, नाटकं, निबंध, प्रवासवर्णनं, संपादित पुस्तकं अशी जवळपास ५० पुस्तकं नावावर जमा. चाळीस वर्षांपासून गुजराती साहित्य परिषदेच्या निर्वाचित सदस्य. गुजराती साहित्य अकादमीच्या सल्लागार, गुजराती साहित्य परिषदेच्या उपाध्यक्ष इ. पदे भूषविली. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे भरलेल्या साहित्यविषयक परिषदेत आणि लंडनच्या बुक फेअरमध्ये सहभाग. साहित्यातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार, पत्रकारितेतील योगदानासाठी गुजरातच्या पत्रकार संघाचा पुरस्कार. लघुकथा संकलनासाठी, कादंबऱ्यासाठी गुजराती साहित्य अकादमी, महाराष्ट्र-गुजराती साहित्य अकादमी, गुजरात सरकार तर्फे विविध पुरस्कार. गुजरात गव्हर्नमेन्ट फिल्म बोर्डाचा पुरस्कार, के. एम. मुन्शी पुरस्कार, सोव्हिएत लॅन्ड नेहरू पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित. नुकत्याच प्रकाशित क्रॉसरोड पुस्तकास दर्शक अ‍ॅवॉर्ड.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
ANSAR Rating Star
Add To Cart INR 350

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more