* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANDRA, THE SARASWATI SAMMAN WINNER FOR 2010, IS ONE OF THE MOST ACCLAIMED EPIC NOVELS OF BHYRAPPA. THOUGH IT TAKES ITS THEME FROM THE CLASSICAL QUESTION OF ART VERSUS MORALITY, MANY MORE SUBTLER AND COMPLEX ISSUES HAUNTING HUMAN LIFE ARE MARVELOUSLY INTERWOVEN. ROOTED DEEPLY IN THE HARSH REALITIES OF THE WORLD, THE GOVERNING THEME EVOLVES LIKE A BANYAN TREE IN ALL DIRECTIONS AND PICTURES MANY HOME-TRUTHS THAT ARE INSEPARABLE WITH ART, ARTIST, ART-TRADITION, ART-CRITICISM AND THE WORLD OF CONNOISSEURS.
किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, `कलेच्या क्षेत्रात यानं आपल्याला स्वर्ग भेटवला! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास?` ‘मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो!’ कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस्. एल्. भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून!
के.के.बिर्ला फौंडेशन तर्फे २० व सरस्वती सन्मान २०१०

No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarDarshana Chaphekar

    कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !

  • Rating StarPriyanka Deshpande

    #मंद्र -एस. एल. भैरप्पा. मी वाचलेलं एस. एल. यांचं पहिलं पुस्तक. खरं तर लायब्ररी मधून एस. एल. याचं असल्यामुळे, translated आणि मेहता पब्लिकेशन हे वाचून आणल. पहिली 2 3 पानं आणि मलपृष्ठ वाचलं की विषय काय आहे हे लगेच समजते. कलाकार म्हटल की त्याचा स्व्छंदी स्वभाव आलाच. नैतिकतेच्या चौकटीतून बाहेर पडल्यावरच कलाकार त्या कलेतील सर्वोत्कृष्ट होऊ शकतो का? आणि हे सगळं मर्जीने की मनाविरुद्ध? की एक गोष्ट मिळवताना काहीतरी देऊन ती मिळवली पाहिजे हा शुद्ध व्यवहार? एक गायक जो गुरूला दिलेला शब्द पाळत फक्त देवालयात स्वर साधना करतो. त्याचा शिष्य जो त्याच्या वेळचा सर्वोत्कृष्ट गायक बनतो पण नैतिकतेची चौकट सोडून वागतो. आणि एक शिष्या जीला स्वरज्ञानासाठी आपल सर्वस्व द्यावं लागत पण अंतिम टप्प्यावर गुरूकडून डावलली जाऊन स्वतः स्वरसाधना करून सर्वोत्कृष्ट होते. पुस्तकाचा विषय एकाच वर्तुळात असला तरीही नंतर काय होणार ही उत्सुकता आणि मधू या शिष्येच नंतर काय झालं हे कळण्यासाठी ही कादंबरी वाचली च पाहिजे. एकूणच कलाकार आणि त्याच जीवन हेच या कादंबरी मध्ये आहे. ...Read more

  • Rating StarJaideep Shinde

    मंद्र - एका मनस्वी गायकाची कहाणी ऐस एल भैरपा हे कन्नड साहित्यातील अत्यन्त अग्रगण्य नाव, या सिद्धहस्त लेखकाचं हे पुस्तक. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी एक मुलगा घराबाहेर पडतो , अनेक मान अपमान पचवून अनेक गुरूंच्या पायाशी डोकं ठेवतो पण खरा सांगीतिक गुरूमिळायला अनेक वर्षे जातात , पण राजेसाहेबांच्या रूपाने शेवटी त्या मुलाला म्हणजेच मोहनलालला शास्त्रीय संगीतातला मोठा गुरू मिळतो आणि त्याची गायकी बदलते , कुठल्याही घराण्याला बांधील अशी त्याची गायकी राहत नाही आणि सगळ्यातल चांगलं घेणारा हा गायक भारतातला सगळ्यात मोठा गायक होऊन जातो , पण राजे साहेबांच्याकडे शिक्षण घेत असताना त्याला कामभावना छळायला लागते आणि त्यातून त्याच्या आयुष्यात पहिली स्त्री येते ती म्हणजे चून्नी , आणि तिथून तपुढे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया म्हणजे मधू, मनोहारी, रामकुमारी, चंपा आणि मग ही कथा फक्त मोहनलाल ची राहत नाही तर हि या स्त्री पात्रांचीही हऊन जाते, मोहनलाल वर नाही त्याच्या कलेला समर्पण करणाऱ्या या स्त्रिया , त्यांचं भाव विश्व भैरप्पानी फारच सुक्ष्म पद्धतींनी उलगुडून दाखवलं आहे . नात्यामध्ये होणारी फसगत त्यातून येणारं दुःख ,होणारे वाद अनेकदा त्यातून होणारं कलेचं सर्जन ,त्यातून मिळणारी अनुभूती आपल्या कमालीच्या शैलीने भैरप्पानी मांडली आहे . कलाकाराचं वयक्तिक आयुष्य खूप मोठ्या विवंचना , राग , मोह, द्वेष यांनी भरलेलं असतं ,कदाचित ते चांगला मनूष्य या चौकटीत बसत नसेल पण म्हणून त्याची कला दुय्यम दर्जाची ठरत नाही. मानवी मनाचा खूप सूक्ष्म विचार मांडला गेला आहे. भैरप्पांची काठ , पर्व , वंशवृक्ष इत्यादी पुस्तके आहेत त्याबद्दल विस्ताराने लिहिनच . हा अप्रतिमअनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे . मानवी मनाचे पदर ज्यांना हळूवार पणे उलगडून समजून घ्यायचे असतील त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे . ...Read more

  • Rating StarNeha Joshi

    मंद्र मधे स्वतः गायक नसूनही गाण्यातले जे काही बारकावे भैरप्पानीं दिले आहेत, त्यातून त्यांचा अभ्यास किती दांडगा आहे, तेच दिसून येतं. मला मंद्र आवडली नाही ती त्यातील नायक मोहनलाल मुळे. पूर्ण कादंबरीमध्ये त्याने आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीचाएक भोगवस्तू म्हणून कसा वापर करून घेतला, ते वाचून मला उबग आला. अर्थात, हा राग त्या नायकाबद्दल आहे, पण एकूणच कादंबरी आणि लेखकांनी मनावर एक वेगळी छाप सोडली, हे नक्की! तुम्ही पर्व पण वाचून बघा, उत्तम कादंबरी आहे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more