* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MANDRA, THE SARASWATI SAMMAN WINNER FOR 2010, IS ONE OF THE MOST ACCLAIMED EPIC NOVELS OF BHYRAPPA. THOUGH IT TAKES ITS THEME FROM THE CLASSICAL QUESTION OF ART VERSUS MORALITY, MANY MORE SUBTLER AND COMPLEX ISSUES HAUNTING HUMAN LIFE ARE MARVELOUSLY INTERWOVEN. ROOTED DEEPLY IN THE HARSH REALITIES OF THE WORLD, THE GOVERNING THEME EVOLVES LIKE A BANYAN TREE IN ALL DIRECTIONS AND PICTURES MANY HOME-TRUTHS THAT ARE INSEPARABLE WITH ART, ARTIST, ART-TRADITION, ART-CRITICISM AND THE WORLD OF CONNOISSEURS.
किती तरी वेळानंतर भोसलेचा आवाज ऐकू आला, `कलेच्या क्षेत्रात यानं आपल्याला स्वर्ग भेटवला! पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच असतं. का हा विरोधाभास?` ‘मलाही हाच प्रश्न अनेकदा छळत असतो!’ कुलकर्णी म्हणाले. कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस्. एल्. भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून!
के.के.बिर्ला फौंडेशन तर्फे २० व सरस्वती सन्मान २०१०

No Records Found
No Records Found
Keywords
#TADA #DR.S.L.BHYRAPPA #UMAKULKARNI #PARV #VANSHVRUKSHA #KAATH #AAVARAN #20JULY1931 #MANDRA #SAKSHI #UTTARKAND
Customer Reviews
  • Rating StarDarshana Chaphekar

    कला आणि कलाकार यामधील अनाकलनीय नात्याचा परखड शोध... डॉ. एस.एल.भैरप्पा यांच्या प्रतिभासंपन्न नजरेतून !

  • Rating StarPriyanka Deshpande

    #मंद्र -एस. एल. भैरप्पा. मी वाचलेलं एस. एल. यांचं पहिलं पुस्तक. खरं तर लायब्ररी मधून एस. एल. याचं असल्यामुळे, translated आणि मेहता पब्लिकेशन हे वाचून आणल. पहिली 2 3 पानं आणि मलपृष्ठ वाचलं की विषय काय आहे हे लगेच समजते. कलाकार म्हटल की त्याचा स्व्छंदी स्वभाव आलाच. नैतिकतेच्या चौकटीतून बाहेर पडल्यावरच कलाकार त्या कलेतील सर्वोत्कृष्ट होऊ शकतो का? आणि हे सगळं मर्जीने की मनाविरुद्ध? की एक गोष्ट मिळवताना काहीतरी देऊन ती मिळवली पाहिजे हा शुद्ध व्यवहार? एक गायक जो गुरूला दिलेला शब्द पाळत फक्त देवालयात स्वर साधना करतो. त्याचा शिष्य जो त्याच्या वेळचा सर्वोत्कृष्ट गायक बनतो पण नैतिकतेची चौकट सोडून वागतो. आणि एक शिष्या जीला स्वरज्ञानासाठी आपल सर्वस्व द्यावं लागत पण अंतिम टप्प्यावर गुरूकडून डावलली जाऊन स्वतः स्वरसाधना करून सर्वोत्कृष्ट होते. पुस्तकाचा विषय एकाच वर्तुळात असला तरीही नंतर काय होणार ही उत्सुकता आणि मधू या शिष्येच नंतर काय झालं हे कळण्यासाठी ही कादंबरी वाचली च पाहिजे. एकूणच कलाकार आणि त्याच जीवन हेच या कादंबरी मध्ये आहे. ...Read more

  • Rating StarJaideep Shinde

    मंद्र - एका मनस्वी गायकाची कहाणी ऐस एल भैरपा हे कन्नड साहित्यातील अत्यन्त अग्रगण्य नाव, या सिद्धहस्त लेखकाचं हे पुस्तक. शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी एक मुलगा घराबाहेर पडतो , अनेक मान अपमान पचवून अनेक गुरूंच्या पायाशी डोकं ठेवतो पण खरा सांगीतिक गुरूमिळायला अनेक वर्षे जातात , पण राजेसाहेबांच्या रूपाने शेवटी त्या मुलाला म्हणजेच मोहनलालला शास्त्रीय संगीतातला मोठा गुरू मिळतो आणि त्याची गायकी बदलते , कुठल्याही घराण्याला बांधील अशी त्याची गायकी राहत नाही आणि सगळ्यातल चांगलं घेणारा हा गायक भारतातला सगळ्यात मोठा गायक होऊन जातो , पण राजे साहेबांच्याकडे शिक्षण घेत असताना त्याला कामभावना छळायला लागते आणि त्यातून त्याच्या आयुष्यात पहिली स्त्री येते ती म्हणजे चून्नी , आणि तिथून तपुढे त्याच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रिया म्हणजे मधू, मनोहारी, रामकुमारी, चंपा आणि मग ही कथा फक्त मोहनलाल ची राहत नाही तर हि या स्त्री पात्रांचीही हऊन जाते, मोहनलाल वर नाही त्याच्या कलेला समर्पण करणाऱ्या या स्त्रिया , त्यांचं भाव विश्व भैरप्पानी फारच सुक्ष्म पद्धतींनी उलगुडून दाखवलं आहे . नात्यामध्ये होणारी फसगत त्यातून येणारं दुःख ,होणारे वाद अनेकदा त्यातून होणारं कलेचं सर्जन ,त्यातून मिळणारी अनुभूती आपल्या कमालीच्या शैलीने भैरप्पानी मांडली आहे . कलाकाराचं वयक्तिक आयुष्य खूप मोठ्या विवंचना , राग , मोह, द्वेष यांनी भरलेलं असतं ,कदाचित ते चांगला मनूष्य या चौकटीत बसत नसेल पण म्हणून त्याची कला दुय्यम दर्जाची ठरत नाही. मानवी मनाचा खूप सूक्ष्म विचार मांडला गेला आहे. भैरप्पांची काठ , पर्व , वंशवृक्ष इत्यादी पुस्तके आहेत त्याबद्दल विस्ताराने लिहिनच . हा अप्रतिमअनुवाद उमा कुलकर्णी यांनी केला आहे . मानवी मनाचे पदर ज्यांना हळूवार पणे उलगडून समजून घ्यायचे असतील त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे . ...Read more

  • Rating StarNeha Joshi

    मंद्र मधे स्वतः गायक नसूनही गाण्यातले जे काही बारकावे भैरप्पानीं दिले आहेत, त्यातून त्यांचा अभ्यास किती दांडगा आहे, तेच दिसून येतं. मला मंद्र आवडली नाही ती त्यातील नायक मोहनलाल मुळे. पूर्ण कादंबरीमध्ये त्याने आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीचाएक भोगवस्तू म्हणून कसा वापर करून घेतला, ते वाचून मला उबग आला. अर्थात, हा राग त्या नायकाबद्दल आहे, पण एकूणच कादंबरी आणि लेखकांनी मनावर एक वेगळी छाप सोडली, हे नक्की! तुम्ही पर्व पण वाचून बघा, उत्तम कादंबरी आहे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो