* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS THROUGH DIFFERENT STORIES THAT ALL SORT OF PEOPLE COME TO MEET US, PEOPLE WHOM WE WON`T BE MEETING OTHERWISE IN OUR LIFE. THESE ARE RIGHT FROM THE KINGS AND QUEENS, PRINCES AND PRINCESSES, THEIR PALACES, THE MISERS, THE POOREST OF ALL, THE WISEST OF ALL, THE WITTIEST OF ALL, THE STUPIDEST OF ALL, MYSTERIOUS PEOPLE TO THE MAJESTIC EXPERIENCES. IN ONE STORY WE MEET A VERY INTELLIGENT PRINCESS WHO WANTS A MORE INTELLIGENT HUSBAND, SO SHE ALLOWS THE EAGER WOULD BE HUSBANDS TO ASK HER 9 QUESTIONS EACH, AT THE END SHE MEETS SOMEONE WHO IS DASHING AND MORE INTELLIGENT THAN HER. IN ANOTHER STORY, AN ORPHAN CHILD PUNISHES HIS WICKED UNCLE; IN ONE STORY A DRUM HELPS THE OLD COUPLE TO COME OUT OF A DISASTER. SOME OF THESE STORIES WERE TOLD TO SUDHA MURTHY, BY HER GRANDPARENTS WHEN SHE HERSELF WAS A KID, SOME OF THE STORIES WERE HEARD DURING HER VOYAGES AROUND THE WORLD AND SOME OF THE STORIES ARE THE RESULT OF HER INNOVATIVE MIND. FOR AGES, ALL THESE STORIES WERE LINGERING IN HER MIND. SHE HAD BEEN TELLING THEM TO ALL THE YOUNG MINDS WHO HAD COME IN HER LIFE. THIS IS FOR THE FIRST TIME THAT SHE HAS PENNED THEM DOWN AND MADE THEM AVAILABLE TO ALL.
राजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात. एका कथेतील बुद्धिमान राजकन्येला आपल्यापेक्षा हुशार पती हवा असतो, म्हणून ती सर्व विवाहोत्सुक तरुणांना प्रत्येकी नऊ प्रश्न विचारण्याची संधी देते, पण अखेर तिलाही निरुत्तर करणारा कोणीतरी भेटतोच... एक अनाथ मुलगा आपल्या दुष्ट काकांना चांगली अद्दल घडवतो... आणि संकटात सापडलेल्या एका वृद्ध जोडप्याला उपयोगी पडतो तो एक ढोल! यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजीआजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या... या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा गेली कित्येक वर्षं लेखिकेच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या सहवासात आलेल्या लहान मुलामुलींना, आपल्या विद्याथ्र्यांना त्यांनी त्या सांगितल्या आहेत. आज या कथासंग्रहाच्या रूपाने या सर्व कथा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत.
आपटे वाचन मंदिराचा उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार २००८

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarManali Powar

    Mast..Sudha Murtinchi pustke khupch chan astat...tyanchya थैलीभर गोष्टी पण छान आहेत.

  • Rating StarDAINIK PUDHARI 16-12-2007

    किशोरवयीन मुलांसाठी रोचक, वेगळ्या कथा... संवेदनशील मनाने टिपलेले जीवनानुभव अत्यंत प्रांजळपणे रसाळ वाणीने कथन करणाऱ्या सिद्धहस्त लेखिका सुधामूर्ती यांनी जाणीवपूर्वक काही कथा किशोरवयीन मुलांसाठी लिहिल्या आहेत. ‘थैलीभर गोष्टी’ आणि ‘सुकेशिनी आणि इतर कथा या दोन पुस्तकांत त्या समाविष्ट आहेत. बालवयातच नैतिकतेचे संस्कार होणे गरजेचे असते. ही संस्कारांची शिदोरी जन्मभर पुरते असे सुधातार्इंना वाटते म्हणूनच त्यांनी बाल्यावस्था संपवून किशोरावस्थेत प्रवेश केलेल्या मुला-मुलींसाठी या वेगळ्या प्रकारच्या कथा लिहिल्या आहेत. या कथांसाठी सुधातार्इंनी मुद्दामच राजा-राणी अशी पौराणिक पार्श्वभूमी निवडली आहे, ज्यामुळे आपली संस्कृती आणि आपण लहानपणी ऐकलेल्या कथांचे पुर्नकथन स्वत:च्या शैलीत करणे त्यांना सुलभ झाले आहे. ‘थैलीभर गोष्टी’ या पुस्तकातील बेचाळीस कथा माणसाने श्रद्धेने कष्ट करावे, सत्याबद्दल, ज्ञानाबद्दल आवड असावी, ज्ञानाचा कधीही गर्व करू नये, अज्ञानी भोळ्या माणसांना लोक फसवतात, रूढी पाळतानासुद्धा बुद्धीचा वापर करावा, अनुभवाने समृद्ध असणाऱ्या वडीलधाऱ्यांचा आदर करावा. बुद्धीच्या चतुराईने वापर करून अडचणीतून मार्ग काढावा. बुद्धी आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठीच वापरावी, असे अनेकविध संस्कार या कथा देतात. मात्र, त्यासाठी लेखिकेने कुठेही भाष्य करून तत्त्वज्ञान सांगितलेले नाही. कथेतील पात्रांच्या वागण्या-बोलण्याचा सहजस्वाभाविक परिणामच त्या प्रकारचा होतो, हेच या कथांचे यश आहे. संग्रहातल्या वीसेक कथा बुद्धिमान मुलांच्या कल्पकतेच्या आहेत. ‘अलकावतीचा सम्राट’ या पहिल्या कथेतील सुमंत सामान्य माणसांना फसवून युक्ती-प्रयुक्तीने सुवर्णमुद्रा, घोडा, मिठाई, हत्ती असं बरंच काही मिळवतो. ‘कृष्णकांत’ हा राजदरबारातला हुशार मंत्री चलाख कामेशची चोरी पकडून गरीब व प्रामाणिक रामचंद्रला न्याय मिळवून देतो (साक्षीदार) ‘चतुर निरंजन’ आपल्या गरीब मित्राला चतुराईने काम करून भरपूर पैसे मिळवून देतो. सुशेनने आपल्या हुशारीने आणि प्रसंगावधानाने स्वत:सकट सर्वांची खुनाच्या आरोपातून कशी सुटका केली याची मनोरंजक कथा ‘चतुर व्यापारी’मध्ये आहे. सुखासीन आयुष्यासाठी लागणारं धन कष्ट करूनच मिळवलं पाहिजे. ऐषारामाने माणूस उद्धट आणि आळशी होतो हा बोध ‘धैर्यवन धीरेंद्र’च्या वागण्यातून सहजच होतो. स्वत:च्या हितापेक्षा भावाचे कल्याण देवाकडे मागणारा मुलगा ‘जादूचं झाड’मध्ये भेटतो. लोभीपणा, हावरटपणा सर्वनाशाला कारणीभूत होतो असा संस्कार ‘लोभ, जादूच्या खडावा, सोन्याचा पाऊस, कनवाळू सावत्र आई’ इ. कथा देतात. ‘केळीतली राजकन्या’ ‘तांदळाचे तीन दाणे’ अश कल्पनारम्य कथाही या संग्रहात आहेत तसेच ‘फणस’ सारखी खुमासदार फजिती कथा आहे. कंजुष माणसांच्या फजितीच्या गोष्टी आहेत. एकंदरीत, किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या या कथा आबालवृद्धांना आनंद देणाऱ्या, मनोरंजनाबरोबरच मनाचे उद् बोधन करणाऱ्या, रसाळ वाणीच्या छान गोष्टी आहेत. त्यातील घटनांची मांडणी वेधक असून मानवी स्वभावाचे नमुने अचूकपणे टिपून कथांची रचना केलेली आहे. अनेक कथापात्रांचे तर्कशुद्ध बोलणे, गणिती बुद्धी मनाला भावते. काहीत आलेली शेवटची कलाटणी सुंदर वाटते. सर्वच कथा सुंदर आहेत. -डॉ. विभा शहा ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-06-2008

    कथांची मेजवानी… `थैलीभर गोष्टी` हा बेचाळीस गोष्टींचा १८२ पानांचा संग्रह ही किशोरवाचकांना सुधा मूर्ती यांनी दिलेली एक गोड, चविष्ट मीजवानी आहे. लहान वयाच्या वाचकांसाठी मराठीत साहित्य, साहित्यिक वा प्रकाशक नाहीत, असे नाही परंतु `बोक्या सातबंडे` सारखे अवाद सोडले तर शिशु - बाल - कुमार वाचकांसाठी प्रसिध्द होणारे साहित्य तसे बेतास बेत असते. सुधा मूर्ती यांनी कुमारवाचकांना सादर केलेला संग्रह खुपच समाधानकारक आहे आणि लीना सोहोनी यांनी अनुवादही चांगला केला आहे. सुधा मूर्ती यांनी `थैलीभर गोष्टी` मध्ये मौखिक परंपरेने संक्रमित झालेल्या कथा दिल्या आहेत. काही गोष्टी थोड्या बदलून दिल्या आणि मंगोल, रशियन, चिनी लोककथाही धुंडाळल्या आहेत. जावईबापूंची एखादी गोष्ट, एखादा परिचित किस्सा हेही थोडेफार बदल करुन त्यांनी कुमारवाचकांसाठी पेश केले आहेत. या गोष्टी सुरस आहेत, कालातीत आहेत आणि दिशांचीही मर्यादा ओलांडणाऱ्या आहेत. म्हणजेच अमेरीकेत मुलाकडे गेल्यावर तिथे गोष्टींचा हट्ट धरणाऱ्या नातवंडाला भाषांतर करुन यातल्या गोष्टी सांगितल्या तरी तो `वॉव, वॉट ए स्टोरी, थँक्यू ग्रँड पॉ` म्हणेल. दंतकथा - कल्पकथा - कहाण्या - चातुर्यकथा - फेबल्स अँड पॅराबल्स सर्वांना ऐकाव्याशा वाटतात. जगात सर्व देशात, सर्व भाषांत गोष्टी आहेत. अगदी वेद - भारत - भागवत - पुराणे - बायबल - बुध्द व जैन धर्मातील ग्रंथ - महानुभाव साहित्य यातूनही गोष्टी भेटतात. वि. कृ. श्रोत्रीय यांनी वेदातील सुंदर गोष्टी सांगितल्या, त्या तेव्हा वाचकप्रिय झाल्या होत्या. इसाप - बिरबल - तेनालीराम यांच्या चातुर्यकथा काय किंवा पंचतंत्रातील गोष्टी काय, त्या वाचकप्रिय ठरतात. गुणाढ्याचे कथासरित्सागर, विक्रम वेताळ कथा, सिंहासनबत्तीशी यातील गोष्टी अजून कालबाह्य झालेल्या नाहीत. या गोष्टीची निवड करताना सुधा मूर्ती यांनी मनाशी काही निकश पक्के केलेले आहेत. कुमारवाचकांवर ज्या गोष्टी त्यांचे मनोरंजन करताना नितिमूल्यांचे संस्कार करतील, अशा गोष्टी मूर्तींनी निवडल्या आहेत. त्यांनी भक्तांच्या उध्दारासाठी, त्याला संकटमुक्त करण्यासाठी ईश्वराला धावत यायला लावलेले नाही. म्हणूनच या गोष्टीतून चमत्कार, शाप, उ:शाप, आशीर्वाद, वरदान, स्वर्गप्राप्ती, नरकाची शिक्षा यांचा वापर मूर्तींनी केलेला नाही. या गोष्टींच वास्तवाशी नातं आहे. यात अद्भुतता नाही. अतिशयोक्ती टाळली आहे. मुख्य म्हणजे या गोष्टींचा खऱ्या खुऱ्या मानवी भावभावनांशी संबंध थेटपणे येतो. माणसाचे गुणदोष, त्याचे स्वभावदोष यांच्याशी संबंध येतो. कंजूषपणा, असूया - मत्सर - लोभीपणा - परोपकारी वृत्ती, भामटेगिरी - हावरटपणा - दयाळूपणा, न्यायी वृत्ती यांच्याशी गोष्टींची नाळ जोडली आहे. कथा, परकीय असली तरी त्याला भारतीय पाश्र्वभूमी दिली आहे. सुधा मूर्तींनी काळ मात्र राजेराण्यांचा निवडला आहे. त्याकाळी आजचे तंत्रज्ञान नव्हते. एक आवर्जुन सांगितले पाहिजे की, या गोष्टी खऱ्या अर्थाने गोष्टी आहेत. त्यात कथानक आहेत आणि त्याचे निवेदक आकर्षक आहे. बोध आणि उपदेश गोष्टीच्या अंगाने येतात आणि त्यांचा योग्य तेवढाच उपयोग केलेला आहे. गोष्टीचे गोष्ट हे रुपडे हरवणार नाही याबद्दल मूर्ती दक्षता घेतात. एका गोष्टीचा खुलासा करायला हवा. राजेराण्यांचा कालखंड घेतलेला असल्यामुळे या गोष्टीत पुरुषप्रधान आहे. कारण तेव्हाची स्त्री आजच्या सारखी स्वतंत्र नव्हती. प्राण्यांवर सुधा मूर्ती मानवी भावना लादत नाहीत. गरीब मनाने चांगले असतात तर श्रीमंत लोक स्वभावाने चांगले नसतात, व्यापारी गिऱ्हाईकांना नेहमी लबाडीने वागवतात असेही येथे गृहीत धरलेले आहे. ते तितकेसे खरे नाही, हे आपण जाणतो. `थैलीभर गोष्टी` या अखेर गोष्टी आहेत. वाचनीयता, श्रवणीयता, हा त्यांचा मुख्य गुण, या विना अधिक उच्च अपेक्षा त्यापासून करायची नसते. गोष्ट म्हणजे फावल्या वेळेची करमणूक एवढेच. सुधा मूर्ती या आता प्रतिथयश लेखिका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे हे दोन्ही संग्रह आवर्जून वाचले जातील. करमणुकीची वाचकांची अपेक्षा ह्या गोष्टी नक्की पूर्ण करु शकतात. बायप्रॉडक्ट म्हणून यात वाचकावर कळतनकळत सुसंस्कार घडावेत, म्हणून गोष्टींचे सार, मूलतत्व सांगितले आहे. सरळसरळ उपदेश करण्यापेक्षा हे चांगले. - अनंत मनोहर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more