* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IT IS THROUGH DIFFERENT STORIES THAT ALL SORT OF PEOPLE COME TO MEET US, PEOPLE WHOM WE WON`T BE MEETING OTHERWISE IN OUR LIFE. THESE ARE RIGHT FROM THE KINGS AND QUEENS, PRINCES AND PRINCESSES, THEIR PALACES, THE MISERS, THE POOREST OF ALL, THE WISEST OF ALL, THE WITTIEST OF ALL, THE STUPIDEST OF ALL, MYSTERIOUS PEOPLE TO THE MAJESTIC EXPERIENCES. IN ONE STORY WE MEET A VERY INTELLIGENT PRINCESS WHO WANTS A MORE INTELLIGENT HUSBAND, SO SHE ALLOWS THE EAGER WOULD BE HUSBANDS TO ASK HER 9 QUESTIONS EACH, AT THE END SHE MEETS SOMEONE WHO IS DASHING AND MORE INTELLIGENT THAN HER. IN ANOTHER STORY, AN ORPHAN CHILD PUNISHES HIS WICKED UNCLE; IN ONE STORY A DRUM HELPS THE OLD COUPLE TO COME OUT OF A DISASTER. SOME OF THESE STORIES WERE TOLD TO SUDHA MURTHY, BY HER GRANDPARENTS WHEN SHE HERSELF WAS A KID, SOME OF THE STORIES WERE HEARD DURING HER VOYAGES AROUND THE WORLD AND SOME OF THE STORIES ARE THE RESULT OF HER INNOVATIVE MIND. FOR AGES, ALL THESE STORIES WERE LINGERING IN HER MIND. SHE HAD BEEN TELLING THEM TO ALL THE YOUNG MINDS WHO HAD COME IN HER LIFE. THIS IS FOR THE FIRST TIME THAT SHE HAS PENNED THEM DOWN AND MADE THEM AVAILABLE TO ALL.
राजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात. एका कथेतील बुद्धिमान राजकन्येला आपल्यापेक्षा हुशार पती हवा असतो, म्हणून ती सर्व विवाहोत्सुक तरुणांना प्रत्येकी नऊ प्रश्न विचारण्याची संधी देते, पण अखेर तिलाही निरुत्तर करणारा कोणीतरी भेटतोच... एक अनाथ मुलगा आपल्या दुष्ट काकांना चांगली अद्दल घडवतो... आणि संकटात सापडलेल्या एका वृद्ध जोडप्याला उपयोगी पडतो तो एक ढोल! यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजीआजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या... या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा गेली कित्येक वर्षं लेखिकेच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या सहवासात आलेल्या लहान मुलामुलींना, आपल्या विद्याथ्र्यांना त्यांनी त्या सांगितल्या आहेत. आज या कथासंग्रहाच्या रूपाने या सर्व कथा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत.
आपटे वाचन मंदिराचा उत्कृष्ट अनुवाद पुरस्कार २००८

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य
Customer Reviews
  • Rating StarManali Powar

    Mast..Sudha Murtinchi pustke khupch chan astat...tyanchya थैलीभर गोष्टी पण छान आहेत.

  • Rating StarDAINIK PUDHARI 16-12-2007

    किशोरवयीन मुलांसाठी रोचक, वेगळ्या कथा... संवेदनशील मनाने टिपलेले जीवनानुभव अत्यंत प्रांजळपणे रसाळ वाणीने कथन करणाऱ्या सिद्धहस्त लेखिका सुधामूर्ती यांनी जाणीवपूर्वक काही कथा किशोरवयीन मुलांसाठी लिहिल्या आहेत. ‘थैलीभर गोष्टी’ आणि ‘सुकेशिनी आणि इतर कथा या दोन पुस्तकांत त्या समाविष्ट आहेत. बालवयातच नैतिकतेचे संस्कार होणे गरजेचे असते. ही संस्कारांची शिदोरी जन्मभर पुरते असे सुधातार्इंना वाटते म्हणूनच त्यांनी बाल्यावस्था संपवून किशोरावस्थेत प्रवेश केलेल्या मुला-मुलींसाठी या वेगळ्या प्रकारच्या कथा लिहिल्या आहेत. या कथांसाठी सुधातार्इंनी मुद्दामच राजा-राणी अशी पौराणिक पार्श्वभूमी निवडली आहे, ज्यामुळे आपली संस्कृती आणि आपण लहानपणी ऐकलेल्या कथांचे पुर्नकथन स्वत:च्या शैलीत करणे त्यांना सुलभ झाले आहे. ‘थैलीभर गोष्टी’ या पुस्तकातील बेचाळीस कथा माणसाने श्रद्धेने कष्ट करावे, सत्याबद्दल, ज्ञानाबद्दल आवड असावी, ज्ञानाचा कधीही गर्व करू नये, अज्ञानी भोळ्या माणसांना लोक फसवतात, रूढी पाळतानासुद्धा बुद्धीचा वापर करावा, अनुभवाने समृद्ध असणाऱ्या वडीलधाऱ्यांचा आदर करावा. बुद्धीच्या चतुराईने वापर करून अडचणीतून मार्ग काढावा. बुद्धी आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठीच वापरावी, असे अनेकविध संस्कार या कथा देतात. मात्र, त्यासाठी लेखिकेने कुठेही भाष्य करून तत्त्वज्ञान सांगितलेले नाही. कथेतील पात्रांच्या वागण्या-बोलण्याचा सहजस्वाभाविक परिणामच त्या प्रकारचा होतो, हेच या कथांचे यश आहे. संग्रहातल्या वीसेक कथा बुद्धिमान मुलांच्या कल्पकतेच्या आहेत. ‘अलकावतीचा सम्राट’ या पहिल्या कथेतील सुमंत सामान्य माणसांना फसवून युक्ती-प्रयुक्तीने सुवर्णमुद्रा, घोडा, मिठाई, हत्ती असं बरंच काही मिळवतो. ‘कृष्णकांत’ हा राजदरबारातला हुशार मंत्री चलाख कामेशची चोरी पकडून गरीब व प्रामाणिक रामचंद्रला न्याय मिळवून देतो (साक्षीदार) ‘चतुर निरंजन’ आपल्या गरीब मित्राला चतुराईने काम करून भरपूर पैसे मिळवून देतो. सुशेनने आपल्या हुशारीने आणि प्रसंगावधानाने स्वत:सकट सर्वांची खुनाच्या आरोपातून कशी सुटका केली याची मनोरंजक कथा ‘चतुर व्यापारी’मध्ये आहे. सुखासीन आयुष्यासाठी लागणारं धन कष्ट करूनच मिळवलं पाहिजे. ऐषारामाने माणूस उद्धट आणि आळशी होतो हा बोध ‘धैर्यवन धीरेंद्र’च्या वागण्यातून सहजच होतो. स्वत:च्या हितापेक्षा भावाचे कल्याण देवाकडे मागणारा मुलगा ‘जादूचं झाड’मध्ये भेटतो. लोभीपणा, हावरटपणा सर्वनाशाला कारणीभूत होतो असा संस्कार ‘लोभ, जादूच्या खडावा, सोन्याचा पाऊस, कनवाळू सावत्र आई’ इ. कथा देतात. ‘केळीतली राजकन्या’ ‘तांदळाचे तीन दाणे’ अश कल्पनारम्य कथाही या संग्रहात आहेत तसेच ‘फणस’ सारखी खुमासदार फजिती कथा आहे. कंजुष माणसांच्या फजितीच्या गोष्टी आहेत. एकंदरीत, किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या या कथा आबालवृद्धांना आनंद देणाऱ्या, मनोरंजनाबरोबरच मनाचे उद् बोधन करणाऱ्या, रसाळ वाणीच्या छान गोष्टी आहेत. त्यातील घटनांची मांडणी वेधक असून मानवी स्वभावाचे नमुने अचूकपणे टिपून कथांची रचना केलेली आहे. अनेक कथापात्रांचे तर्कशुद्ध बोलणे, गणिती बुद्धी मनाला भावते. काहीत आलेली शेवटची कलाटणी सुंदर वाटते. सर्वच कथा सुंदर आहेत. -डॉ. विभा शहा ...Read more

  • Rating StarDAINIK TARUN BHARAT 15-06-2008

    कथांची मेजवानी… `थैलीभर गोष्टी` हा बेचाळीस गोष्टींचा १८२ पानांचा संग्रह ही किशोरवाचकांना सुधा मूर्ती यांनी दिलेली एक गोड, चविष्ट मीजवानी आहे. लहान वयाच्या वाचकांसाठी मराठीत साहित्य, साहित्यिक वा प्रकाशक नाहीत, असे नाही परंतु `बोक्या सातबंडे` सारखे अवाद सोडले तर शिशु - बाल - कुमार वाचकांसाठी प्रसिध्द होणारे साहित्य तसे बेतास बेत असते. सुधा मूर्ती यांनी कुमारवाचकांना सादर केलेला संग्रह खुपच समाधानकारक आहे आणि लीना सोहोनी यांनी अनुवादही चांगला केला आहे. सुधा मूर्ती यांनी `थैलीभर गोष्टी` मध्ये मौखिक परंपरेने संक्रमित झालेल्या कथा दिल्या आहेत. काही गोष्टी थोड्या बदलून दिल्या आणि मंगोल, रशियन, चिनी लोककथाही धुंडाळल्या आहेत. जावईबापूंची एखादी गोष्ट, एखादा परिचित किस्सा हेही थोडेफार बदल करुन त्यांनी कुमारवाचकांसाठी पेश केले आहेत. या गोष्टी सुरस आहेत, कालातीत आहेत आणि दिशांचीही मर्यादा ओलांडणाऱ्या आहेत. म्हणजेच अमेरीकेत मुलाकडे गेल्यावर तिथे गोष्टींचा हट्ट धरणाऱ्या नातवंडाला भाषांतर करुन यातल्या गोष्टी सांगितल्या तरी तो `वॉव, वॉट ए स्टोरी, थँक्यू ग्रँड पॉ` म्हणेल. दंतकथा - कल्पकथा - कहाण्या - चातुर्यकथा - फेबल्स अँड पॅराबल्स सर्वांना ऐकाव्याशा वाटतात. जगात सर्व देशात, सर्व भाषांत गोष्टी आहेत. अगदी वेद - भारत - भागवत - पुराणे - बायबल - बुध्द व जैन धर्मातील ग्रंथ - महानुभाव साहित्य यातूनही गोष्टी भेटतात. वि. कृ. श्रोत्रीय यांनी वेदातील सुंदर गोष्टी सांगितल्या, त्या तेव्हा वाचकप्रिय झाल्या होत्या. इसाप - बिरबल - तेनालीराम यांच्या चातुर्यकथा काय किंवा पंचतंत्रातील गोष्टी काय, त्या वाचकप्रिय ठरतात. गुणाढ्याचे कथासरित्सागर, विक्रम वेताळ कथा, सिंहासनबत्तीशी यातील गोष्टी अजून कालबाह्य झालेल्या नाहीत. या गोष्टीची निवड करताना सुधा मूर्ती यांनी मनाशी काही निकश पक्के केलेले आहेत. कुमारवाचकांवर ज्या गोष्टी त्यांचे मनोरंजन करताना नितिमूल्यांचे संस्कार करतील, अशा गोष्टी मूर्तींनी निवडल्या आहेत. त्यांनी भक्तांच्या उध्दारासाठी, त्याला संकटमुक्त करण्यासाठी ईश्वराला धावत यायला लावलेले नाही. म्हणूनच या गोष्टीतून चमत्कार, शाप, उ:शाप, आशीर्वाद, वरदान, स्वर्गप्राप्ती, नरकाची शिक्षा यांचा वापर मूर्तींनी केलेला नाही. या गोष्टींच वास्तवाशी नातं आहे. यात अद्भुतता नाही. अतिशयोक्ती टाळली आहे. मुख्य म्हणजे या गोष्टींचा खऱ्या खुऱ्या मानवी भावभावनांशी संबंध थेटपणे येतो. माणसाचे गुणदोष, त्याचे स्वभावदोष यांच्याशी संबंध येतो. कंजूषपणा, असूया - मत्सर - लोभीपणा - परोपकारी वृत्ती, भामटेगिरी - हावरटपणा - दयाळूपणा, न्यायी वृत्ती यांच्याशी गोष्टींची नाळ जोडली आहे. कथा, परकीय असली तरी त्याला भारतीय पाश्र्वभूमी दिली आहे. सुधा मूर्तींनी काळ मात्र राजेराण्यांचा निवडला आहे. त्याकाळी आजचे तंत्रज्ञान नव्हते. एक आवर्जुन सांगितले पाहिजे की, या गोष्टी खऱ्या अर्थाने गोष्टी आहेत. त्यात कथानक आहेत आणि त्याचे निवेदक आकर्षक आहे. बोध आणि उपदेश गोष्टीच्या अंगाने येतात आणि त्यांचा योग्य तेवढाच उपयोग केलेला आहे. गोष्टीचे गोष्ट हे रुपडे हरवणार नाही याबद्दल मूर्ती दक्षता घेतात. एका गोष्टीचा खुलासा करायला हवा. राजेराण्यांचा कालखंड घेतलेला असल्यामुळे या गोष्टीत पुरुषप्रधान आहे. कारण तेव्हाची स्त्री आजच्या सारखी स्वतंत्र नव्हती. प्राण्यांवर सुधा मूर्ती मानवी भावना लादत नाहीत. गरीब मनाने चांगले असतात तर श्रीमंत लोक स्वभावाने चांगले नसतात, व्यापारी गिऱ्हाईकांना नेहमी लबाडीने वागवतात असेही येथे गृहीत धरलेले आहे. ते तितकेसे खरे नाही, हे आपण जाणतो. `थैलीभर गोष्टी` या अखेर गोष्टी आहेत. वाचनीयता, श्रवणीयता, हा त्यांचा मुख्य गुण, या विना अधिक उच्च अपेक्षा त्यापासून करायची नसते. गोष्ट म्हणजे फावल्या वेळेची करमणूक एवढेच. सुधा मूर्ती या आता प्रतिथयश लेखिका झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचे हे दोन्ही संग्रह आवर्जून वाचले जातील. करमणुकीची वाचकांची अपेक्षा ह्या गोष्टी नक्की पूर्ण करु शकतात. बायप्रॉडक्ट म्हणून यात वाचकावर कळतनकळत सुसंस्कार घडावेत, म्हणून गोष्टींचे सार, मूलतत्व सांगितले आहे. सरळसरळ उपदेश करण्यापेक्षा हे चांगले. - अनंत मनोहर ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more