* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177665697
  • Edition : 5
  • Publishing Year : JANUARY 1989
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RANJEET DESAI COMBO SET- 42 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF 18 OF DESAI`S SHORT STORIES. THE STORIES WERE PUBLISHED EARLIER. BUT MEHTA CATEGORISED THE STORIES SUBJECTWISE AND PUBLISHED THEM UNDER THE HEADING OF ASHADH IN JAN. 1989. THESE STORIES HAVE A RURAL BACKGROUND. THE LANGUAGE IS USED VERY APPROPRIATELY. IT TAKES US TO THE VILLAGE LIFE IMMEDIATELY. EACH STORY HAS A DIFFERENT STORY TO TELL. THEY ALL REVEAL DIFFERENT MOODS, DIFFERENT ASPECTS OF HUMAN MIND. THIS HUMAN MIND IS SOMETIMES VERY SOFT, SOMETIMES DIFFICULT, YET SOMETIMES IT HANDLES THINGS DELICATELY. THE MORE YOU READ THE MORE DIFFICULT IT BECOMES TO UNDERSTAND THE NATURE OF VILLAGE PEOPLE. WHEN YOU FEEL THAT THEY ARE CONCERNED ABOUT EACH OTHER THEY STOOD TO BE DIFFERENT, WHEN YOU FEEL THAT THEY HARDLY BOTHER ABOUT ANYONE ELSE, THEY REVEAL THE SOFTEST CORNER OF THEIR MIND. THEY REVEAL THE SIMPLICITY, THEY UNMASK DIPLOMACY OF UNIMAGINED TURNS, THEY BETRAY US, THEY CONFIDE IN US.
निसर्ग आणि माणूस यांच्यात एक अनोखे नाते आहे. निसर्गाच्या ऋतूंप्रमाणेच माणसाचे मनही रंग बदलत असते. हीच कल्पना उचलून रणजित देसाई यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक कथा लिहिल्या आणि त्यांना ऋतूंची नावे दिली. जसे वैशाख, आषाढ, मेघ. ग्रामीण पाश्र्वभूमीवर चितारलेल्या या कथा माणसातल्या सर्व भावभावनांचं प्रत्ययकारी दर्शन घडवतात. निसर्गाच्या ऋतुचक्राचे माणसांच्या दैनंदिन जीवनावर आणि मनावरही जे पडसाद उमटतात ते लेखकाने आपल्या लेखणीत अचूक पकडले आहेत. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#8 APRIL # SWAMI # SHRIMAN YOGI # RADHEYA # MAZA GAON # ABHOGI # BARI # PRATIKSHA # SAMIDHA # PAVANKHIND # LAKSHYAVEDH # SHEKARA # MORPANKHI SAVALYA # SANKET # ASHADH # MADHUMATEE # MEKH MOGARI # KATAL # ROOPMAHAL # MEGH # PRAPAT # VAISHAKH # KAMODINI # GANDHALI # BABULMORA # AALEKH # KANCHANMRUG # SHRIMANYOGI (NATAK)# SANGEET TANSEN (NATAK)# SAVALI UNHACHI (NATAK)# HE BANDH RESHMACHE (NATAK)# PANKH JAHALE VAIRI (NATAK)# DHAN APURE (NATAK)# RAMSHASTRI (NATAK)# LOKNAYAK (NATAK)# SWAMI (NATAK)# VAARSA (NATAK)# TUZI VAT VEGALI (NATAK)# PANGULGADA (NATAK)# GARUDZEP (NATAK)# SNEHADHARA (NATAK)# (NATAK)# SANCHIT (NATAK) #८ एप्रिल #स्वामी (राज्य पुरस्कार १९६२,ह.ना. आपटे पुरस्कार १९६३) #साहित्य अकादमी पुरस्कार १९६४) #श्रीमान योगी #राजा रविवर्मा #राधेय #माझा गाव #अभोगी #बारी #प्रतिक्षा #समिधा #पावनखिंड #लक्ष्यवेध #शेकरा #मोरपंखी सावल्या #संकेत #आषाढ #मधुमती #मेख मोगरी #कातळ #रुपमहाल #रुपमहाल #मेघ #प्रपात #वैशाख #कमोदिनी #गंधाली #बाबुलमोरा #आलेख #कांचनमृग #श्रीमानयोगी-नाटक #संगीत तानसेन-नाटक #सावली उन्हाची –नाटक #हे बंध रेशमाचे –नाटक #पंख जाहले वैरी –नाटक #रामशास्त्री –नाटक #धन अपुरे –नाटक #लोकनायक –नाटक #स्वामी –नाटक #वारसा –नाटक #तुझी वाट वेगळी –नाटक #पांगुळगाडा –नाटक #पांगुळगाडा –नाटक #गरुडझेप –नाटक #स्नेहधारा –नाटक #संचित -नाटक
Customer Reviews
  • Rating StarSagar Kasalkar

    Nicee

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 09-04-1989

    रणजित देसाई हे मराठीतील एक मातबर लेखक. स्वामी आणि श्रीमान योगी या त्यांच्या कादंबऱ्यांनी ते जवळपास प्रत्येक मराठी वाचकापर्यंत पोचले. या दोन कादंबऱ्यांना व्यावहारिक यशही खूप लाभलं. या कादंबऱ्याखेरीजही त्यांनी काही कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली आणि थासुद्धा लिहिल्या. परंतु एवढं चौफेर लेखन करूनही आज ते जास्त परिचित आहेत ते स्वामीकार म्हणूनच! खरं तर स्वामीकारांच्या कथा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. अगदी या माती संस्कृतीमधली त्यांची अस्सल माणसं, त्यांची सुखं-दु:खं, त्यांचं जीवन याचे अत्यंत सुरेख चित्रण देसाई करतात. त्यांची कथाकथनाची शैली सरळ पण फार आकर्षक आहे. तिला उपमा-अलंकाराचा फाजील सोस नाही. जे त्यांना दिसलं भावलं त्याचं चित्रमय शैलीमध्ये अत्यंत वाचनीय असं चित्रण देसाई करतात. काही वेळा त्यांच्या कथा या त्या-त्या प्रदेशापुरत्या न राहता त्या सर्वव्यापी बनतात. अलीकडेच देसाई यांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. हे कथासंग्रह देसाई यांच्या कथा लेखनाची सारी वैशिष्ट्य ठळकपणे दर्शविणारे आहेत. या तीन कथासंग्रहांमध्ये एकंदर चोपन्न कथा (प्रत्येकी अठरा) आहेत. यापूर्वी जाण आणि कणव हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. याच संग्रहातील कथांची विषयदार (देसाई यांच्या म्हणण्यानुसार) निवड करून त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या चोपन्न कथांमधील काही कथा खरोखरच लघुकथा म्हणता येतील अशा आहेत. आणि तरीही परिणामकारकतेत त्या कमी पडत नाही. भोग, दुष्काळ यासारख्या कथा परिस्थितीचा किती जबरदस्त काच माणसाला असतो याचं दर्शन घडवणाऱ्या आहेत. तर मी आमदारकी का सोडली? भांडवलदार का राहिले? या अगदी वेगळ्या धाटणीच्या कथा आहेत. पूर नावाच्याच दोन कथा वैशाख आणि मेघ या कथासंग्रहात आहेत. दोन्हींची शीर्षके एक असली तरी मांडणी आणि परिणाम वेगवेगळा आहे. वैशाख संग्रहातील रक्त, मरण, शाळा या कथा अधिक स्मरणात रहाणाऱ्या आहेत. हे तीनही संग्रह रणजित देसाई यांच्या कथांचे सार विशेष उत्तमपणे मांडणारे आहेत. हे नक्की. -अनिरुद्ध शांडिल्य ...Read more

  • Rating StarDarshana Chaphekar

    निसर्ग आणि माणूस यांच्यात एक अनोखे नाते आहे. निसर्गाच्या ॠतूंप्रमाणे माणसाचे मनही रंग बदलत असते. हीच कल्पना उचलून रणजित देसाईयांनी अनेक कथा लिहिल्या आणि त्यांना ॠतूंची नावे दिली. ग्रामीण पार्श्वभूमीवर चितारलेल्या या कथा माणसातल्या सर्व भावभावनांचं प्त्ययकारी दर्शन घडवतात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 9-4-1989

    वैशाख, मेघ, आषाढ दूरदर्शनसारख्या दूरगामी माध्यमातून रामायण, महाभारतासारख्या प्राचीन, सांस्कृतिक वारसांचा जीर्णोद्धार होण्याचे हे दिवस आहेत. व्यक्तिवेध, काव्यविचार, जीवनदर्शन इ. अनेक बाबतीत हे नवे दर्शन ढोबळ, अपुरे असले तरी ते निखालस खोटे विंâवा पूरण निरुपयोगी असू शकत नाही. औद्योगिक संस्कृतीची कठोर गती आणि असह्य दडपण याखाली चिरडून मूल्यविचाराबाबत गोंधळून गेलेल्या समाजापुढे अध्र्या कच्च्या रूपात का होईना पण निखळ प्रामाणिकपणाचे महत्त्व, सचोटीची विंâमत, धैर्याचे मूल्य, मूढ आत्मसंतुष्टतेपेक्षा विशाल, निरागस त्यागातले साफल्य अशा गोष्टी ठेवल्या जाणे अगत्याचे आहे. अगदी अशाच पद्धतीने तीस-पस्तीस वर्षापूर्वी मावळत आलेल्या, परंपरागत सदाचाराची कास धरू पाहणाऱ्या सत्त्वशील पिढीच्या काही गोष्टी ‘आषाढ’, ‘वैशाख’ या कथासंग्रहाद्वारे वाचकांसमोर येतात. या कथा पुनर्मुद्रित आहेत आणि लेखकाचे नावही नवे नाही. महाराष्ट्राचे लाडके लेखक ‘स्वामी’कार रणजित देसाई यांच्या लेखणीतून उतरलेल्या या कथा आहेत. जीवनाबद्द्ल प्रेम या कथांच्या वाटा आणि वळणे गुंतागुंतीची आणि दुर्बोध नाहीत. कथांचे संदर्भ केवळ प्रासंगिक आहेत, व्याप्तीही मर्यादित आहे, पण कथांच्या अभिव्यक्तीमध्ये त्या त्या लेखकांचे जीवनाबद्दलचे प्रेम आणि कुतुहल अत्यंत प्रांजळपणे, थेटपणाने प्रगट झाले आहे. रणजित देसार्इंच्याबाबतीत हे प्रेम खूपदा सौजन्याच्या चौकटींवर अधिक आहे. माणुसकीचा, उमदेपणाचा गौरव करणारी त्यांची प्रतिभा, खानदानी, अब्रुदार, सज्जन, सुसंस्कृत, लोकलाजेला भिणाNया व्यक्तिशेषांची प्रभावी चित्रे अत्यंत सहज कौशल्याने रंगवते. या चित्रांचे रंग खूपदा नको इतके झगझगीत असतात. म्हणजे अमावस्येचे चित्रही निळ्या रंगाने रंगविण्याकडे कल असतो. दरोडेखोरही विशाल अंत:करणाचे असतात. तिथे इनामदार, पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे? खूपदा परीकथांशी साम्य सांगणाऱ्या या कथांच्या चौकटी आहेत. काही ठराविक टप्पे आणि कल्पनाबंध त्यात जाणवतात. त्यातून नकळत एक संदेश मिळतो. त्यांच्या प्रकाशात वाचणाNयांचं माणुसपण उजळून निघतं. या एकाच सामथ्र्यामुळे आपल्या सर्व तथाकथित मर्यादा ओलांडून या कथा मोठ्या होतात. गंभीर जीवनदर्शन परंतु यापलिकडे झेप घेणारे काही सूक्ष्म तपशील गंभीर जीवनदर्शनाचीही चूणूक दाखवून जातात. रिकामटेकडा आणि नालायक असा धाकटा भाऊ सापासारखा घरात शिरताना असहायपणे डोळे गाळणाNया विठूचे कासावीस हृदय (साप). स्रीत्वाच्या मादक आकर्षणात सापडून एका लहानशाच मर्यादेत पण अस्वस्थ भिरभिरत राहणारे मामाचे मन (चमेली). चारशे रुपये गाठीला घेऊन निघालेल्या म्हाताऱ्याबरोबर अपरात्री प्रवास करत चालत असताना दुर्दैवी जोतिबाच्या डोक्यात फिरणारा विचित्र विचारांचा भोवरा (भोवरा). आपल्याच एकेकाळच्या बायकोच्या आजारी नवऱ्याला वाचविण्यासाठी म्हणून भर पुरात डोण घालणाऱ्या एकाकी सखाच्या मेंदूत माजलेले वादळी काहूर (पूर). अशा कित्येक ठिकाणी त्या सामान्य असूनही जीवनाच्या असामान्य प्रेरणा अनुभवणाNया व्यक्तींच्या जगण्यातली तडफड अगदी सहज व्यक्त झाली आहे. या व्यक्तींना द्यावा लागलेला संघर्ष हा नेहमीच दारिद्र्य, आजार, संकटे अशा ढोबळ संदर्भातला नाही. अनेकदा तो मूल्यांचा संघर्ष आहे. माणसांनीच माणसाला टाकावं, एकाकी करून सोडावं, या प्रकारात जो भीतीदायक एकटेपणा आहे तो प्रत्येकाच्या काळजात ओसाड माळरानाप्रमाणे पसरलेला असतो. तो तुडवताना जी दमछाक होते त्या दमछाकीच्या खुणा या कथांनी वारंवार दाखविल्या आहेत, मात्र यावर उतारा म्हणजे मनाचा मोठेपणा, वैराला प्रेमाने उत्तर असा लेखकाचा विश्वास आहे. नितळ मराठी शैली या दोन संग्रहाची शैली नितळपणे अस्सल मराठी आहे. संस्कृतप्रचुरतेचा तिला वास नाही की ती इंग्रजाळलेलीही नाही. बोली भाषेचा वंâटाळवाणा अतिरेक नाही. ती शुद्ध, निर्भेळ मराठी आहे. अदावत, पावलट, बुकाणा, दाडवान, लेकावळा, गत्या असल्या खास मराठी शब्दांनी रुजलेली ही शैली प्रतिमारुपकांच्या अवघड वाटेला जात नाही. पण अभिव्यक्तीचे तिचे म्हणून एक सामथ्र्य आणि सौंदर्य आहे. या कथांनी ज्यांच्या कहाण्या सांगितल्या त्या सुसंस्कृत व्यक्तीविशेषांना शोभावी अशी ही शैली आहे. डोईवरला पदर हलू न देण्यातला शालीनपणा जपण्यात तिला रस आहे. रणजित देसार्इंच्या या कथासारख्या कथा आता कोणी लिहिणार नाही. कोणत्याच अर्थाने तसे वातावरण आता राहिले नाही. पण मागे वळून पाहताना थोडंसं रेंगाळायला हरकत नाही असा दिलासा देणाऱ्या या जुन्या कथा नव्याने वाचण्यासारख्या आहेत, यात शंका नाही. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more