* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IGIN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664065
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEV MORE COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORIES BY MAHADEV MORE HIGHLIGHT THE LIVES OF THE DOWNTRODDEN, OF THE LOWEST LOWER CLASS. SOME OF THEM HAVE A SERIOUS APPROACH WHILE SOME REFLECT HUMOUR. ON THE OUTSKIRTS OF THE VERY FEW MIDDLE CLASS PEOPLE LAYS THE VASE UNIVERSE OF THE WORKERS, DALIT, ETC. THESE STORIES ARE ALL ABOUT THEIR LIVES, THEIR STYLES, THEIR PROBLEMS, THEIR MOMENTS OF HAPPINESS, ETC. THE VERSATILITY OF SUBJECTS IS THE PECULIAR FEATURE OF THESE STORIES. THE AUTHOR HAS SPENT HIS LIFE WITH THEM, HE HAS LABORED ON THE FARMS, WORKED IN AN AUTOMOBILE WORKSHOP, DRIVEN A TAXI, RUN A FLOUR MILL. DURING THIS JOURNEY, HE CAME ACROSS MANY SEEDS FOR STORIES. HE HAS SOWN THEM AND NURTURED THEM. HIS STORIES ARE NOT JUST ENTERTAINING, THEY HAVE THE QUALITIES TO MAKE US STOP AND THINK ABOUT OTHERS. HE HAS NOT CAPTIVATED HIS LANGUAGE IN ANY OF THE ARTISTIC PRESENTATION. HIS WORDS ARE VERY SIMPLE. YET, HE HAS ADDED SUBSTANTIALLY TO THE MARATHI LITERATURE.
महादेव मोरे यांच्या ‘ईगीन’ या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखित करतात. काही गंभीर, तर काही गमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलितपददलितांचे, कष्टकऱ्यांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्षखेदाच्या, व्यथाविवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायिंव्हग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे व आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणाऱ्या ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या व काही वेळा त्याच्या गालांवर स्मितहास्याची रेषा फुलविणाऱ्या ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तिचित्रे हेही ह्या कथांचे सामर्थ्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 08-08-2004

    वास्तवतेचा स्पर्श असलेला कथासंग्रह : ईगीन महादेव मोरे हे नाव मराठी साहित्यात विपुल लेखनामुळे चांगलेच परिचित झाले आहे. कथा, कादंबरी आणि ललित लेखन करणाऱ्या मोरे यांचा ‘ईगीन’ हा नवा कथासंग्रह आहे. शोषित समाजाच्या व्यथा व वेदना मांडणाऱ्या कथांचा समावेश सलेले हे पुस्तक ग्रामीण वाचकाला आपलेसे करून टाकणारे आहे. या कथांमधील पात्रं त्यांच्या भाषेत बोलतात आणि विशेष म्हणजे, या कथांमध्ये काल्पनिकता नसल्यामुळे या कथा एका वेगळ्या वास्तव जगात घेऊन जातात. एकूण पंधरा कथांचा समावेश असलेल्या या पुस्तकात बेळगाव भागातील कानडीमिश्रित हिंदी व मराठी भाषा असून, त्या प्रदेशातील खास शब्दांचा वापर आलेला आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरातील माणसांच्या जीवनातील विविध बरे-वाईट अनुभव व अस्सल वास्तव जीवन चित्रित करतात. मोरे यांनी जीवनात बालपणी अनुभवलेल्या अनेक प्रसंगांना कथांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण या कथांमध्ये कुणाचेही अनुकरण नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. स्वत:चा वेगळा चेहरा घेऊन या कथा वाचकांपुढे प्रकट होतात. ग्रामीण भागातील चपखल शब्द, नवे नवे प्रयोग मराठी भाषेत मोरे यांनी या कथांमध्ये आणल्याचे दिसते. ‘पार्ट्या’ आणि ‘हिसका’ या दोन कथा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नेमके चित्रण करतात. पार्ट्या ही कथा सरपंच व आबा नाना या दोन व्यक्तींमधून रंगत जाते. ‘बेत’ ही कथा केवळ दागिन्यांच्या लोभापायी एका परिचारिकेची हत्या होते, पण यातील गुन्हेगार मात्र पुराव्याअभावी निर्दोष सुटतो, असे कथानक असणारी ही कथा गुन्हेगाराला शिक्षा होईलच, याविषयी साक्षंकता व्यक्त करते. तळागाळातील माणसांचे दु:ख मांडणे, हा या कथांचा स्थायीभाव असून, ‘रुक्की’ ही कथा अशाच प्रकारची आहे. गरिबीत जीवन जगणाऱ्या स्त्री व पुरुषांचे हाल कसे होतात, ते अत्यंत सूक्ष्मपणे लेखकाने टिपले आहे. जीवनात एखाद्या घटनेमुळे माणसाच्या चारित्र्याला डाग लागला, की तो शेवटपर्यंत जात नाही, असे म्हणतात. एक व्यापारीही अशाच वाईट घटनेमुळे तुरुंगात जातो; पण त्याच्या मुलांनाही त्याच्या या कृत्याचा त्रास होतो, असे सांगणारी ही कथा वाचकाला विचार कराला लावते. याशिवाय ‘लग्गा’, ‘जिगर’, ‘छडीटांग’, ‘जीव’, ‘अजुनी चालतोचि वाट’ या कथाही चांगल्या झाल्या आहेत. काही कथांमध्ये असलेले विनोदी किस्सेही रंगतदार झाले आहेत. मोरे यांची या पुस्तकातील कथा स्वतंत्र विचार मांडणारी आहे. त्यात बऱ्याच कथा शेवटी अपेक्षित उंची गाठतात. अनोखे जग या कथांमध्ये वाचकांपुढे लेखकाने उभे केले असून, समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकांना मराठी साहित्यात या कथांच्या माध्यमातून आणले आहे. विशेषत: कथांमधील पात्रांची नागर भाषा हे या कथांचे वेगळे वैशिष्ट्य असून ही माणसं उपमा व अलंकारिक शब्द वापरून मनोरंजनही करतात. एकूणच ‘ईगीन’मधील कथा वास्तवतेच्या स्पर्शामुळे वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाल्या आहेत. त्यामुळे नवीन कथा वाचू इच्छिणाऱ्यांनी हे पुस्तक वाचणे जरुरीचे आहे. -विलास पगार ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 07-11-2004

    तळागाळाच्या समाजजीवनाचे प्रतिबिंब… महादेव मोरे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक असून आतापर्यंत त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या व दोन ललित गद्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सांप्रतचा ‘ईगीन’ हा पंधरावा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहात १५ कथा समाविष्ट केल्य आहेत. आतापर्यंत मराठी साहित्यात अपवाद वगळता पांढरपेशा वर्गाचे चित्रण झालेले आहे. याला धक्का दिला दलित साहित्याने. याबरोबर मग ग्रामीण साहित्यही आकार घेऊ लागले. परंतु खेड्यातील कष्टकरी जनतेचे एक विशाल जग असते याची जाण फार थोड्या मराठी साहित्यिकांना आहे. यामुळे अशा लोकांचे हर्ष खेद दु:ख यांचे चित्रण साहित्यात झालेले नाही. ‘ईगीन’ हा कथासंग्रह हे जीवन उभे करतो. लेखकाला मोटर वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीतून राबणे यातून जो प्रत्यक्ष अनुभव आला त्याने तो आपल्या समर्थ लेखणीने कथांद्वारे फुलविला आहे. या कथांतील भाषा जिवंत व रसशीत आहे. लेखकाचे वास्तव बेळगाव जिल्ह्यात असल्यामुळे भाषेला कानडी-मराठीचा मृदगंध आहे. लेखकाने कथांमध्ये कलेचा संयम राखला असून कोठेही भडकपणा दाखविलेला नाही. तसेच तत्त्वज्ञान न सांगता ज्याला भावेल ते त्याने घ्यावे असे दर्शविले आहे. मराठीतील दुसरे एक साहित्यिक अनिल अवचट यांनीही आपल्या साहित्याद्वारे पीडित, शोषित लोकांची दु:खे मांडली आहेत. परंतु ती गद्यस्वरूपात आहेत. मोरे यांनी ती कथांद्वारे मांडली आहेत. दारिद्र्य आणि अज्ञान यामुळे खेड्यातील जनता तामसीवृत्तीची बनली आहे. आणि मग दारू पिणे, हाणामारी, फसवणूक आदी अनिष्ट गोष्टीत त्यांचा जीवनक्रम चालू असतो. ‘ईगीन’ आदी कथा याचे प्रत्यंतर आहे. लेखकाची शैली वैशिष्ट्यपूर्ण असून या कथातून उभी केलेली पात्रे स्वत:च्याच भाषेत बोलतात असे वाटते. व्यक्तिचित्रेही ठसठशीत आहेत. त्यामुहे हा कथासंग्रह तळागाळाच्या लोकांचा असूनही वाचावासा वाटतो. या ठिकाणी एक-दोन गोष्टींकडे लेखकाचे लक्ष वेधावेसे वाटते. ग्रामीण लोकांच्या दैनंदिन व्यवहारात मुखाद्वारे शिव्या सहजगत्या निघत असतात. या साहित्यात उमटाव्या का? कारण या कथांत दोन-तीन ठिकाणी अस्सल शिव्या वापरल्या आहेत, त्या टाळल्या असत्या तर बरे झाले असते. नाही तर कालांतराने मराठी साहित्यात शिव्या या ओव्या होऊन बसतील ही भीती. तसेच काही महत्त्वाच्या शब्दांना मराठी प्रतिशब्द जोडायला पाहिजे होते. मोरे यांनी उपेक्षित समाजातील लोकांवर आणखी कथा लिहाव्यात असे सुचवावेसे वाटते. संग्रहाला प्रा. अनंत मनोहर यांची मार्मिक प्रस्तावना लाभली आहे. कथासंग्रह केवळ वाचनीय नसून संग्राह्य असा आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 06-06-2004

    भणंग जगण्याच्या गोष्टी… अगदी सुरुवातीला मराठी लेखक हे पांढरपेशा मध्यमवर्गातले होते. त्यामुळे मराठी साहित्यात मध्यमवर्गाच्या जीवनाचे चित्रण होते. आपल्या लेखकांचे अनुभवविश्व खूपच मर्यादित आहे. हा आक्षेप सतत असायचा आणि काही अपवाद वगळता तो खराही होता. नतर मात्र मराठी साहित्यात अनेक नवे, जोरकस प्रवाह आले. ग्रामीण, दलित जीवन प्रतिबिंबित झाले आहे अशा अनेक चांगल्या कथा, कादंबऱ्या, आत्मकथने यांनी आपले भावविश्व व साहित्यविश्व समृद्ध केले. असे असूनही साहित्यावरचा ‘मध्यमवर्गीय’ हा छाप काही मिटत नाही. या प्रस्तावनचे कारण म्हणजे महादेव मोरे यांचा नवीन कथासंग्रह ‘ईगीन’. पंधरा कथासंग्रह, अठरा कादंबऱ्या इतके विपुल लेखन त्यांच्या नावावर आहे. ईगीनमधील कथा १९९२ ते १९९९ दरम्यान विविध मासिकांतून आधी प्रसिद्ध झालेल्या आहेत. महादेव मोरे यांनी स्वत: शेतमळ्यात मजुरी करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे अशा प्रकारे आपले आयुष्य झेललेले आहे. या खडतर जगण्यात जे अनुभव वाट्याला आहे. जे जगणे पहायला मिळाले, तेच या कथांमधून आपल्याला सांगितले आहे. काही कथा पात्राच्या आयुष्यातील एखाद्या अनुभवाचे चित्रण करतात तर काही कथा पूर्ण आयुष्याची चित्तरकथा रेखाटतात. ‘हौस’ या पहिल्या कथेत टुरिस्ट टॅक्सी चालवणाऱ्या बापलेकांच्या आयुष्यातील एक दिवस दाखवला आहे. पंधरा रुपयाच्या भाड्यासाठी हे बापलेक तीन ठिकाणी गाडी ओढ्यात टाकतात, रात्रभर उपाशी राहतात, धोका पत्करतात. परत येताना त्यांची गाडी ओढ्यात फसते, ती बाहेर काढायला त्यांना पंधरा रुपये लागतात. मिळालेले सगळे भाडे खर्च होते. हालअपेष्टा, मेहनत लक्षात घेतली तर तोटाच झाला. मग बाप मुलाला विचारतो, ‘हा असा धंदा आहे, आता हौस फिटली का?’ ‘अजुनी चालतेचि वाट’ ही तरल, भावस्पर्शी ग्रामीण कथा लिहिणाऱ्या एका लेखकाची गोष्ट. साहित्य वर्तुळातील लोकांना ती कोणावर आधारित आहे हे सांगता येईल. पण वाचकांना लेखनाचे एक तत्व माहित होते. लेखकांचे लिखाण त्यांच्या अनुभवावर आधारित असते. पण तो अनुभव गाळून घ्यावा लागतो. अनेक फेरफार करावे लागतात. खेड्यातील गटबाजी, आपापसातील भांडणे यावर आधारित ‘पार्ट्या’ व ‘हिसका’ या दोन कथा आहेत. दोन्ही कथेत भांडणारी विरुद्ध बाजूंची जी दोन प्रमुख पात्रे आहेत. त्यांचा मुलगा व मुलगी मात्र पळून जावून लग्न करतात आणि आपल्या वडिलांचे गावात हसे करतात. ठसठशीत व्यक्तिरेखा उभ्या करणे हे मोरे यांचे ठळक जाणवणारे वैशिष्ट्य. भाषाशैली चांगली आहे. नगर वा ग्रामीण दोन्ही भाषा वापरलेल्या आहेत. निवेदन बहुधा नागर वा ग्रामीण दोन्हा भाषा वापरलेल्या आहेत. निवेदना बहुधा नागर भाषेत आहे. ग्रामीण भाषाही आपल्याला समजणारी आहे. ‘ईगीन’ म्हणजे विघ्न-संकटे असा एखाद्या माहीत नसलेल्या शब्दाचा अर्थ पटकन कळतो. चार-पाच कथांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व कथा आत्यंतिक दारिद्री माणसांच्याच आहेत. हे जगणेच निरर्थक, अगदी हीन पातळीचे जगणे ही शोकांतिका आणि मरण म्हणजे सुटका या व्यक्तिरेखांचे काय मनोव्यापार, मनोविश्लेषण रंगवणार? लेखकाने सर्व कथा, गोष्ट सांगणे या पातळीवर ठेवल्या आहेत. पात्रांच्या स्थितीचे, दु:खाचे कढ आणणारे वर्णन नाही. सामाजिक प्रश्नांची पात्रांकरवी चर्चा नाही. सामाजिक भाष्य नाही, जातीव्यवस्थेला दूषणे देणे नाही. तत्वचिंतन नाही, नैतिक मूल्यांचा बडेजाव नाही. डाव्या किंवा तत्सम विचारसणीचा पुरस्कार नाही. नियतीवाद नाही. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे साहित्यावरचा मध्यमवर्गीय छाप कमी करायचा असेल तर आपण ईगीनमधील कथा अधिक समजून घेतल्या पाहिजेत. उदा. गंडगब्रु कथेतील हा कथानायक, कानातला मळ काढून देऊन त्यावर उपजीविका करणारे आपल्याला माहित आहे. याचा व्यवसाय ‘डोळ्यातलं खंड काढणं’ म्हणजे डोळ्यातील कचरा साफ करून देणे एवढी दारिद्री परिस्थिती त्यात आणखी वागणे सरकलेले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more