* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IGIN
  • Availability : Available
  • ISBN : 9788177664065
  • Edition : 2
  • Publishing Year : FEBRUARY 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORIES BY MAHADEV MORE HIGHLIGHT THE LIVES OF THE DOWNTRODDEN, OF THE LOWEST LOWER CLASS. SOME OF THEM HAVE A SERIOUS APPROACH WHILE SOME REFLECT HUMOUR. ON THE OUTSKIRTS OF THE VERY FEW MIDDLE CLASS PEOPLE LAYS THE VASE UNIVERSE OF THE WORKERS, DALIT, ETC. THESE STORIES ARE ALL ABOUT THEIR LIVES, THEIR STYLES, THEIR PROBLEMS, THEIR MOMENTS OF HAPPINESS, ETC. THE VERSATILITY OF SUBJECTS IS THE PECULIAR FEATURE OF THESE STORIES. THE AUTHOR HAS SPENT HIS LIFE WITH THEM, HE HAS LABORED ON THE FARMS, WORKED IN AN AUTOMOBILE WORKSHOP, DRIVEN A TAXI, RUN A FLOUR MILL. DURING THIS JOURNEY, HE CAME ACROSS MANY SEEDS FOR STORIES. HE HAS SOWN THEM AND NURTURED THEM. HIS STORIES ARE NOT JUST ENTERTAINING, THEY HAVE THE QUALITIES TO MAKE US STOP AND THINK ABOUT OTHERS. HE HAS NOT CAPTIVATED HIS LANGUAGE IN ANY OF THE ARTISTIC PRESENTATION. HIS WORDS ARE VERY SIMPLE. YET, HE HAS ADDED SUBSTANTIALLY TO THE MARATHI LITERATURE.
महादेव मोरे यांच्या ‘ईगीन’ या नव्या संग्रहातील कथा समाजाच्या तळागाळातील लोकांचे जीवन अधोरेखित करतात. काही गंभीर, तर काही गमतीदार अशा त्या कथा आहेत. मूठभर पांढरपेशांच्या सीमित जगाबाहेर दलितपददलितांचे, कष्टकयांचे एक विशाल जग आहे, तर ह्याच जगातील लोकांच्या हर्षखेदाच्या, व्यथाविवंचनांच्या ह्या कथा आहेत. विषय वैविध्य हे ह्या कथांचे वैशिष्ट्य आहे. रानामाळात मजुरांसह घाम गाळणे, मोटार वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायिंव्हग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे व आदी विविध कष्टाची कामे करीत आयुष्य घालविलेल्या लेखकाला आपल्या खडतर जीवनप्रवाहात जी कथाबीजं हाती लागली ती पूर्ण नजाकतीसह त्याने इथे फुलविलेली आढळतात. वाचनीयतेच्या अंगाने जाणाया ह्या कथा केवळ रंजकच नाहीत तर त्यापलीकडे जाऊन त्या आपला सकस व दर्जेदारपणाही सिद्ध करतात. वाचकाला गुंगविणाया, विचार करायला लावणाया व काही वेळा त्याच्या गालांवर स्मितहास्याची रेषा फुलविणाया ह्या कथांनी मराठी कथेचे दालन समृद्ध केले आहे. मराठी सीमा भागातील मातीचा गंध घेऊन आलेली खास भाषा व तीतून उमटलेली ठसठशीत व्यक्तिचित्रे हेही ह्या कथांचे सामथ्र्य आहे. उपमा, अलंकार, प्रतिमा आदींच्या जंजाळात न अडकता साध्या, सरळ व प्रवाही निवेदनशैलीने वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवण्याचे लेखकाचे कसबही दाद देण्यासारखे आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #EGIN #MATTIR # CHITAK #MANASA-ASHIHI #KONDVADA #PANIKUTHAVARALAAHE #MAHADEOMORE
Customer Reviews
  • Rating StarDAINIK SAKAL (NASIK) 08-08-2004

    वास्तवतेचा स्पर्श असलेला कथासंग्रह : ईगीन महादेव मोरे हे नाव मराठी साहित्यात विपुल लेखनामुळे चांगलेच परिचित झाले आहे. कथा, कादंबरी आणि ललित लेखन करणाऱ्या मोरे यांचा ‘ईगीन’ हा नवा कथासंग्रह आहे. शोषित समाजाच्या व्यथा व वेदना मांडणाऱ्या कथांचा समावेश सलेले हे पुस्तक ग्रामीण वाचकाला आपलेसे करून टाकणारे आहे. या कथांमधील पात्रं त्यांच्या भाषेत बोलतात आणि विशेष म्हणजे, या कथांमध्ये काल्पनिकता नसल्यामुळे या कथा एका वेगळ्या वास्तव जगात घेऊन जातात. एकूण पंधरा कथांचा समावेश असलेल्या या पुस्तकात बेळगाव भागातील कानडीमिश्रित हिंदी व मराठी भाषा असून, त्या प्रदेशातील खास शब्दांचा वापर आलेला आहे. समाजाच्या शेवटच्या स्तरातील माणसांच्या जीवनातील विविध बरे-वाईट अनुभव व अस्सल वास्तव जीवन चित्रित करतात. मोरे यांनी जीवनात बालपणी अनुभवलेल्या अनेक प्रसंगांना कथांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पण या कथांमध्ये कुणाचेही अनुकरण नसल्याचे स्पष्टपणे जाणवते. स्वत:चा वेगळा चेहरा घेऊन या कथा वाचकांपुढे प्रकट होतात. ग्रामीण भागातील चपखल शब्द, नवे नवे प्रयोग मराठी भाषेत मोरे यांनी या कथांमध्ये आणल्याचे दिसते. ‘पार्ट्या’ आणि ‘हिसका’ या दोन कथा ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नेमके चित्रण करतात. पार्ट्या ही कथा सरपंच व आबा नाना या दोन व्यक्तींमधून रंगत जाते. ‘बेत’ ही कथा केवळ दागिन्यांच्या लोभापायी एका परिचारिकेची हत्या होते, पण यातील गुन्हेगार मात्र पुराव्याअभावी निर्दोष सुटतो, असे कथानक असणारी ही कथा गुन्हेगाराला शिक्षा होईलच, याविषयी साक्षंकता व्यक्त करते. तळागाळातील माणसांचे दु:ख मांडणे, हा या कथांचा स्थायीभाव असून, ‘रुक्की’ ही कथा अशाच प्रकारची आहे. गरिबीत जीवन जगणाऱ्या स्त्री व पुरुषांचे हाल कसे होतात, ते अत्यंत सूक्ष्मपणे लेखकाने टिपले आहे. जीवनात एखाद्या घटनेमुळे माणसाच्या चारित्र्याला डाग लागला, की तो शेवटपर्यंत जात नाही, असे म्हणतात. एक व्यापारीही अशाच वाईट घटनेमुळे तुरुंगात जातो; पण त्याच्या मुलांनाही त्याच्या या कृत्याचा त्रास होतो, असे सांगणारी ही कथा वाचकाला विचार कराला लावते. याशिवाय ‘लग्गा’, ‘जिगर’, ‘छडीटांग’, ‘जीव’, ‘अजुनी चालतोचि वाट’ या कथाही चांगल्या झाल्या आहेत. काही कथांमध्ये असलेले विनोदी किस्सेही रंगतदार झाले आहेत. मोरे यांची या पुस्तकातील कथा स्वतंत्र विचार मांडणारी आहे. त्यात बऱ्याच कथा शेवटी अपेक्षित उंची गाठतात. अनोखे जग या कथांमध्ये वाचकांपुढे लेखकाने उभे केले असून, समाजातील उपेक्षित राहिलेल्या घटकांना मराठी साहित्यात या कथांच्या माध्यमातून आणले आहे. विशेषत: कथांमधील पात्रांची नागर भाषा हे या कथांचे वेगळे वैशिष्ट्य असून ही माणसं उपमा व अलंकारिक शब्द वापरून मनोरंजनही करतात. एकूणच ‘ईगीन’मधील कथा वास्तवतेच्या स्पर्शामुळे वाचनीय आणि विचारप्रवर्तक झाल्या आहेत. त्यामुळे नवीन कथा वाचू इच्छिणाऱ्यांनी हे पुस्तक वाचणे जरुरीचे आहे. -विलास पगार ...Read more

  • Rating StarDAINIK LOKSATTA 07-11-2004

    तळागाळाच्या समाजजीवनाचे प्रतिबिंब… महादेव मोरे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक असून आतापर्यंत त्यांचे १४ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या व दोन ललित गद्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. सांप्रतचा ‘ईगीन’ हा पंधरावा कथासंग्रह आहे. या कथासंग्रहात १५ कथा समाविष्ट केल्य आहेत. आतापर्यंत मराठी साहित्यात अपवाद वगळता पांढरपेशा वर्गाचे चित्रण झालेले आहे. याला धक्का दिला दलित साहित्याने. याबरोबर मग ग्रामीण साहित्यही आकार घेऊ लागले. परंतु खेड्यातील कष्टकरी जनतेचे एक विशाल जग असते याची जाण फार थोड्या मराठी साहित्यिकांना आहे. यामुळे अशा लोकांचे हर्ष खेद दु:ख यांचे चित्रण साहित्यात झालेले नाही. ‘ईगीन’ हा कथासंग्रह हे जीवन उभे करतो. लेखकाला मोटर वर्कशॉपमध्ये काम करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीतून राबणे यातून जो प्रत्यक्ष अनुभव आला त्याने तो आपल्या समर्थ लेखणीने कथांद्वारे फुलविला आहे. या कथांतील भाषा जिवंत व रसशीत आहे. लेखकाचे वास्तव बेळगाव जिल्ह्यात असल्यामुळे भाषेला कानडी-मराठीचा मृदगंध आहे. लेखकाने कथांमध्ये कलेचा संयम राखला असून कोठेही भडकपणा दाखविलेला नाही. तसेच तत्त्वज्ञान न सांगता ज्याला भावेल ते त्याने घ्यावे असे दर्शविले आहे. मराठीतील दुसरे एक साहित्यिक अनिल अवचट यांनीही आपल्या साहित्याद्वारे पीडित, शोषित लोकांची दु:खे मांडली आहेत. परंतु ती गद्यस्वरूपात आहेत. मोरे यांनी ती कथांद्वारे मांडली आहेत. दारिद्र्य आणि अज्ञान यामुळे खेड्यातील जनता तामसीवृत्तीची बनली आहे. आणि मग दारू पिणे, हाणामारी, फसवणूक आदी अनिष्ट गोष्टीत त्यांचा जीवनक्रम चालू असतो. ‘ईगीन’ आदी कथा याचे प्रत्यंतर आहे. लेखकाची शैली वैशिष्ट्यपूर्ण असून या कथातून उभी केलेली पात्रे स्वत:च्याच भाषेत बोलतात असे वाटते. व्यक्तिचित्रेही ठसठशीत आहेत. त्यामुहे हा कथासंग्रह तळागाळाच्या लोकांचा असूनही वाचावासा वाटतो. या ठिकाणी एक-दोन गोष्टींकडे लेखकाचे लक्ष वेधावेसे वाटते. ग्रामीण लोकांच्या दैनंदिन व्यवहारात मुखाद्वारे शिव्या सहजगत्या निघत असतात. या साहित्यात उमटाव्या का? कारण या कथांत दोन-तीन ठिकाणी अस्सल शिव्या वापरल्या आहेत, त्या टाळल्या असत्या तर बरे झाले असते. नाही तर कालांतराने मराठी साहित्यात शिव्या या ओव्या होऊन बसतील ही भीती. तसेच काही महत्त्वाच्या शब्दांना मराठी प्रतिशब्द जोडायला पाहिजे होते. मोरे यांनी उपेक्षित समाजातील लोकांवर आणखी कथा लिहाव्यात असे सुचवावेसे वाटते. संग्रहाला प्रा. अनंत मनोहर यांची मार्मिक प्रस्तावना लाभली आहे. कथासंग्रह केवळ वाचनीय नसून संग्राह्य असा आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 06-06-2004

    भणंग जगण्याच्या गोष्टी… अगदी सुरुवातीला मराठी लेखक हे पांढरपेशा मध्यमवर्गातले होते. त्यामुळे मराठी साहित्यात मध्यमवर्गाच्या जीवनाचे चित्रण होते. आपल्या लेखकांचे अनुभवविश्व खूपच मर्यादित आहे. हा आक्षेप सतत असायचा आणि काही अपवाद वगळता तो खराही होता. नतर मात्र मराठी साहित्यात अनेक नवे, जोरकस प्रवाह आले. ग्रामीण, दलित जीवन प्रतिबिंबित झाले आहे अशा अनेक चांगल्या कथा, कादंबऱ्या, आत्मकथने यांनी आपले भावविश्व व साहित्यविश्व समृद्ध केले. असे असूनही साहित्यावरचा ‘मध्यमवर्गीय’ हा छाप काही मिटत नाही. या प्रस्तावनचे कारण म्हणजे महादेव मोरे यांचा नवीन कथासंग्रह ‘ईगीन’. पंधरा कथासंग्रह, अठरा कादंबऱ्या इतके विपुल लेखन त्यांच्या नावावर आहे. ईगीनमधील कथा १९९२ ते १९९९ दरम्यान विविध मासिकांतून आधी प्रसिद्ध झालेल्या आहेत. महादेव मोरे यांनी स्वत: शेतमळ्यात मजुरी करणे, टॅक्सी ड्रायव्हिंग करणे, पिठाच्या गिरणीत राबणे अशा प्रकारे आपले आयुष्य झेललेले आहे. या खडतर जगण्यात जे अनुभव वाट्याला आहे. जे जगणे पहायला मिळाले, तेच या कथांमधून आपल्याला सांगितले आहे. काही कथा पात्राच्या आयुष्यातील एखाद्या अनुभवाचे चित्रण करतात तर काही कथा पूर्ण आयुष्याची चित्तरकथा रेखाटतात. ‘हौस’ या पहिल्या कथेत टुरिस्ट टॅक्सी चालवणाऱ्या बापलेकांच्या आयुष्यातील एक दिवस दाखवला आहे. पंधरा रुपयाच्या भाड्यासाठी हे बापलेक तीन ठिकाणी गाडी ओढ्यात टाकतात, रात्रभर उपाशी राहतात, धोका पत्करतात. परत येताना त्यांची गाडी ओढ्यात फसते, ती बाहेर काढायला त्यांना पंधरा रुपये लागतात. मिळालेले सगळे भाडे खर्च होते. हालअपेष्टा, मेहनत लक्षात घेतली तर तोटाच झाला. मग बाप मुलाला विचारतो, ‘हा असा धंदा आहे, आता हौस फिटली का?’ ‘अजुनी चालतेचि वाट’ ही तरल, भावस्पर्शी ग्रामीण कथा लिहिणाऱ्या एका लेखकाची गोष्ट. साहित्य वर्तुळातील लोकांना ती कोणावर आधारित आहे हे सांगता येईल. पण वाचकांना लेखनाचे एक तत्व माहित होते. लेखकांचे लिखाण त्यांच्या अनुभवावर आधारित असते. पण तो अनुभव गाळून घ्यावा लागतो. अनेक फेरफार करावे लागतात. खेड्यातील गटबाजी, आपापसातील भांडणे यावर आधारित ‘पार्ट्या’ व ‘हिसका’ या दोन कथा आहेत. दोन्ही कथेत भांडणारी विरुद्ध बाजूंची जी दोन प्रमुख पात्रे आहेत. त्यांचा मुलगा व मुलगी मात्र पळून जावून लग्न करतात आणि आपल्या वडिलांचे गावात हसे करतात. ठसठशीत व्यक्तिरेखा उभ्या करणे हे मोरे यांचे ठळक जाणवणारे वैशिष्ट्य. भाषाशैली चांगली आहे. नगर वा ग्रामीण दोन्ही भाषा वापरलेल्या आहेत. निवेदन बहुधा नागर वा ग्रामीण दोन्हा भाषा वापरलेल्या आहेत. निवेदना बहुधा नागर भाषेत आहे. ग्रामीण भाषाही आपल्याला समजणारी आहे. ‘ईगीन’ म्हणजे विघ्न-संकटे असा एखाद्या माहीत नसलेल्या शब्दाचा अर्थ पटकन कळतो. चार-पाच कथांचा अपवाद सोडला तर बाकी सर्व कथा आत्यंतिक दारिद्री माणसांच्याच आहेत. हे जगणेच निरर्थक, अगदी हीन पातळीचे जगणे ही शोकांतिका आणि मरण म्हणजे सुटका या व्यक्तिरेखांचे काय मनोव्यापार, मनोविश्लेषण रंगवणार? लेखकाने सर्व कथा, गोष्ट सांगणे या पातळीवर ठेवल्या आहेत. पात्रांच्या स्थितीचे, दु:खाचे कढ आणणारे वर्णन नाही. सामाजिक प्रश्नांची पात्रांकरवी चर्चा नाही. सामाजिक भाष्य नाही, जातीव्यवस्थेला दूषणे देणे नाही. तत्वचिंतन नाही, नैतिक मूल्यांचा बडेजाव नाही. डाव्या किंवा तत्सम विचारसणीचा पुरस्कार नाही. नियतीवाद नाही. पहिल्या परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे साहित्यावरचा मध्यमवर्गीय छाप कमी करायचा असेल तर आपण ईगीनमधील कथा अधिक समजून घेतल्या पाहिजेत. उदा. गंडगब्रु कथेतील हा कथानायक, कानातला मळ काढून देऊन त्यावर उपजीविका करणारे आपल्याला माहित आहे. याचा व्यवसाय ‘डोळ्यातलं खंड काढणं’ म्हणजे डोळ्यातील कचरा साफ करून देणे एवढी दारिद्री परिस्थिती त्यात आणखी वागणे सरकलेले. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more