* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789357201414
  • Edition : 2
  • Publishing Year : 2011
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 116
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MAHADEV MORE COMBO SET - 27 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BATTASHI IS THE WIFE OF A CONSTABLE FROM MANG-GARUDI COMMUNITY IN THE STORY `BATTASHI`. ONCE THE CONSTABLE GETS FIRED AND THE SUSPICION IS RAISED ON BATTASHI. BATTASHI LEAVES. FAKIRYA WANTS TO MARRY BATTASHI. WHAT HAPPENS NEXT? SHARI`S FATHER IN THE STORY `CHHADITANG` EARNS MONEY BY ARRANGING HER MARRIAGE; BUT SHARI KILLS HIM AND HANGS HIM. FROM `VASTI`, THE EMOTIONAL PICTURE OF THE PEOPLE IN THE GHETTO IS CREATED. IN THE STORY `MODKYA GOPALA`, A MAN LIVING WITH LONELINESS MEETS MODKYA GOPALA. JANU IN THE STORY `BHOOL` STAYS AWAY FROM HIS WIFE WITH THE SOUND OF PAHLWANKI; BUT HE HAS DOUBTS ABOUT HIS WIFE`S CHARACTER. IT IS BECAUSE OF THAT SUSPICION THAT HE COMMITS MURDER. THE YOUNG MAN IN THE STORY `AKULWANTI` THROWS HIS GIRLFRIEND AWAY AFTER FILLING HIS EARS WITH ALCOHOL AND LATER REGRETS IT. HER JOURNEY IN THE STORY `JOGATIN` IS FROM DEVADASI TO PROSTITUTE; BUT THE NARRATOR CAN`T GET HER OUT OF THAT TASK...A COLLECTION OF AUTHENTIC STORIES DEPICTING THE REALITY OF MAN`S DISORDERS, THE SOCIETY AROUND HIM, THE ENVIRONMENT. MAHADEV MORE`S EPIC STORY SET IN A RURAL BACKGROUND.
‘बत्ताशी’ कथेतील मांग-गारुडी समाजातील बत्ताशी ही हवालदार् याची बायको. एकदा हवालदार्या भाजतो आणि त्यावरून शंका घेतली जाते बत्ताशीवर. बत्ताशी माहेरी निघून जाते. फकिर्याला लग्न करायचंय बत्ताशीशी. काय होतं पुढे? ‘छडीटांग’ कथेतील शारीचा बाप तिच्या लग्नाचा बाजार मांडून पैसे कमवत असतो; पण शारी मारते त्याला टांग. ‘वस्ती’मधून साकारतं वस्तीवरील माणसांचं भावव्यामिश्र चित्र. एकटेपणाची व्यथा सोसत जगणारा मोडक्या गोपाळा भेटतो ‘मोडक्या गोपाळा’ या कथेत. ‘भूल’ कथेतील जानू पहिलवानकीच्या नादाने बायकोपासून राहतो दूर; पण बायकोच्या चारित्र्याचा येतो त्याला संशय. त्या संशयातूनच त्याच्या हातून होतो खून. ‘अकुलवंती’ कथेतील तरुण एका दारुड्याने कान भरल्यावर प्रेमिकेला दूर लोटतो आणि नंतर पस्तावतो. ‘जोगतीण’ कथेतील तिचा प्रवास होतो तो देवदासी ते वेश्या असा; पण त्या कर्दमातून कथानायक तिला बाहेर काढू शकत नसतो...माणसाच्या विकारांचं, त्याच्या अवतीभवतीच्या समाजाचं, वातावरणाचं वास्तव चित्रण करणार्या अस्सल कथांचा संग्रह. महादेव मोरे यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीवरील व्यामिश्र कथा.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#बत्ताशी #महादेव मोरे #ग्रामीणकथा #मराठीसाहित्य #मराठी पुस्तके #मेहता पब्लिशिंग हाऊस #BATTASHI #MAHADEOMORE #GRAMINKATHA #MARATHILITERATURE #MARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE "
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more