* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
SUDHA MURTHY, A PROFESSOR, A SOCIAL WORKER AND BEST OF ALL AN AUTHOR WITH THE MOST INNOVATIVE AND SKILLFUL MIND. HER WRITING IS BASED ON TRUTH, AND PRESENTED IN A WONDERFUL MODE, TOUCHING US, GIVING US IMMENSE PLEASURE. WE OFTEN COME ACROSS UNEXPECTED SITUATIONS, SAY FOR EXAMPLE YOUR GRANNY WISHES TO OVERCOME HER ILLITERACY WITH YOUR HELP, OR MAY BE THE PRESIDENT OF INDIA WISH YOUR COMPANY WHILE TRAVELLING, OR YOUR TEACHER ALL OF A SUDDEN DECIDES TO GIVE YOU MORE MARKS THAN YOU DESERVE. WHAT WILL YOU DO IN THESE SITUATIONS? WHILE READING SUDHA TAI`S STORIES YOU WILL COME ACROSS THE SOLUTIONS FOR THESE ASTONISHING SITUATIONS. THIS BOOK IS A COLLECTION OF STORIES. ONE STORY HAS A NAUGHTY STUDENT AND BELIEVE ME, HIS NAUGHTINESS WILL KEEP YOU TOTALLY ABSORBED. THE OTHER STORY TELLS US ABOUT A WIFE WHO SAVES EVERY SINGLE PENNY FROM HER HOUSEHOLD EXPENSES WITH JUST ONE DREAM, HER HUSBAND`S DREAM OF SETTING UP A NEW BUSINESS. FOR THE AUTHOR, THIS BRINGS BACK HER MOTHER`S MEMORIES AND HER ADVICE. THE AUTHOR HAS ALSO WRITTEN ABOUT HER GRANDPA AND THE PROMISE THAT SHE HAD MADE TO HIM FOR DONATING BOOKS TO THE LIBRARY IN HER VILLAGE. ALL THESE STORIES HAVE FRESHNESS, THEY ARE HEALTHY AND THEY MAKE US SMILE. EACH AND EVERY STORY IMPARTS AN IMPORTANT LESSON, HOW TO ACCOMPLISH OUR GOALS WHICH HAVE TOUCHED OUR SOUL, WHICH WE FIND VERY LOGICAL, WHICH ARE BASED ON OUR PRINCIPLES.
तुमच्याच आजीनं तुमच्याजवळ बसून साक्षरतेचे धडे गिरवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तुम्ही काय कराल? किंवा जर समजा, भारताच्या राष्ट्रपतींनी प्रवासात तुम्हाला बरोबर घेऊन जायचं ठरवलं तर...? किंवा तुमच्या शिक्षकांनी तुमच्या योग्यतेपेक्षा जास्त गुण तुम्हाला दिले असले, तर...? सुधा मूर्ती यांनी लिहिलेल्या, सत्यघटनांवर आधारित असलेल्या या हलक्याफुलक्या, रोचक आणि मनोरंजक कथांमधून या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडतील. सुधा मूर्ती... प्राध्यापिका, समाजसेविका आणि त्याचबरोबर आपल्या आगळ्यावेगळ्या कथालेखनाच्या शैलीने वाचकांना मोहवून टाकणाया लेखिका! या कथासंग्रहात त्यांच्या एका खट्याळ, खोडकर विद्यार्थ्याची, वाचकांचं मन गुंतवून टाकणारी कथा आहे... एक नव्या व्यवसाय सुरु करण्याचं आपल्या पतीचं स्वप्न पार पाडण्यासाठी घरखर्चातून बाजूला काढून ठेवलेली गंगाजळी त्यांच्यापुढे आणून ठेवताना लेखिकेला आपल्या आईच्या उपदेशाची आठवण कशी होते, त्याची कहाणी आहे... `मोठेपणी आपल्या खेड्यातील वाचनालयाला पुस्तकांची देणगी देऊन ते टू समृद्ध कर,` असं वचन आपल्या नातीकडून घेणाया, लेखिकेच्या स्वत:च्याच आजोबांची गोष्टसुद्धा यात आहे. या गोष्टी हसवणाया, खेळकर, ताज्या आणि टवटवीत आहेत. जी गोष्ट आपल्या तत्त्वांना पटली असेल आणि आत्म्याला भावली असेल तीच करण्याचं धाडस आणि आपली स्वप्ने आपणच पूर्णत्वाला नेण्याचं साहस कसं करावं, हे यातील प्रत्येक कथा आपल्याला शिकवते.

No Records Found
No Records Found
Keywords
#SUDHA MURTY #N.R.NARAYANA MURTY #LEENA SOHONI #UMA KULKARNI #WISE & OTHERWISE #GOSHTI MANSANCHYA #PUNYABHUMI BHARAT #THAILIBHAR GOSHTI #SUKESHINI AANI ITAR KATHA #BAKULA #AYUSHYACHE DHADE GIRAVTANA #AAJICHYA POTADITALYA GOSHTI #MAHASHWETA #DOLLAR BAHU #SAMANYATALE ASAMANYA #PARIGH #PITRURHUN #ASTITVA #HARAVALELYA MANDIRACHE RAHASYA #TEEN HAJAR TAKE #SARPACHA SOOD #GARUDJANMACHI KATHA #TRISHANKU #A BETTER INDIA A BETTER WORLD #NARAYAN MURTY : MULYA JAPNARA EK ADWITIYA AAYUSHYA #सुधा मूर्ती #एन.आर.नारायण मूर्ती #लीना सोहोनी #उमा कुलकर्णी #वाइज अँड अदरवाइज #गोष्टी माणसांच्या #पुण्यभूमी भारत #थैलीभर गोष्टी #सुकेशिनी #बकुळा #आयुष्याचे धडे गिरवताना #आजीच्या पोतडीतल्या गोष्टी #महाश्वेता #डॉलर बहू सामान्यांतले असामान्य #परीघ पितृऋण #अस्तित्व #हरवलेल्या मंदिराचे रहस्य #तीन हजार टाके #सर्पाचा सूड #गरुडजन्माची कथा #त्रिशंकू #अ बेटर इंडिया अ बेटर वर्ल्ड : नारायण मूर्ती #नारायण मूर्ती : मूल्यं जपणारं एक अद्वितीय आयुष्य #वयाची अट नाही #रशियामधील लागनसोहळा #आज आपण त्यांना घासू म्हणतो पण उद्या... # लाल भाताची कणगी #श्री. अब्दुल कलाम #खरा दागिना #आपरो जे.आर.डी. #इतिहासाचं अगाध ज्ञान # ए फॉर ऑनेस्टी #अम्मा हे तुजे कर्तव्य नाही का? #वाटणी #निदान एकातरी वाचनालयासाठी पुस्तकं #वाळवंटातील प्रवास #यांच्यातील महान कोण? # आम्ही ते करून दाखवला #
Customer Reviews
  • Rating Starमुक्ता नंदकिशोर कुंभार

    आदरणीय लीनाजी, स.न.वि.वि. मी इयत्ता ९वी वर्गात शिकणारी विद्यार्थीनी आहे. मी तुम्ही मराठीतून अनुवाद केलेले पुस्तक वाचले. त्या पुस्तकाचे नाव आहे ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचले. तुम्ही पुस्तक मराठीमध्ये अनुवाद केल्यामुळ मन:पूर्वक आभार मानते. मी अनेक पुस्तके वाचली. त्यातून जास्त आवडलेलं पुस्तक ‘गोष्टी माणसांच्या’ हे पुस्तक माझ्या जीवनाचं सार्थक करणारं आहे, हे मला कळालं. त्यातील मला आवडलेला प्रसंग म्हणजे संकटातली हसा त्यात असं लिहिलं आहे, की परीक्षेत नापास झालं तरी त्याला कधी ना कधी यश नक्की मिळते. जीवनात अपयश हे आवश्यक असते, जर माणसाच्या जीवनात सतत यश मिळत गेले, तर त्याच्यामध्ये उद्धटपणा वाढतो. क्वचित तरी अपयश मिळणे आवश्यक आहे. हे वाचल्यानंतर मला कळालं, की संकटांना हसून तोंड देण्यासाठी शिकलं पाहिजे. माझी तुम्हाला अशी विनंती आहे, की तुम्ही आमच्या शाळेस एकदा तरी भेट द्यावी, ही विनंती. आपली विश्वासू, मुक्ता नंदकिशोर कुंभार ...Read more

  • Rating StarKedar Joglekar

    सुधा मूर्ती यांना परिचयाची काहीही आवश्यकता नाही परंतु त्यांच्या `गोष्टी माणसांच्या` ह्या पुस्तकाविषयी फार ऐकायला मिळत नाही म्हणून हा परिचय. ह्या कथासंग्रहात सुधा मूर्तींनी त्यांच्या आयुष्यात त्यांना भेटलेल्या व्यक्ती आणि तेव्हा घडलेल्या लहान सहान रंतु मोठा प्रभाव पाडणाऱ्या प्रसंगांचं अगदी ओघवतं वर्णन केलेलं आहे. त्यांचं बालपण, कर्नाटकातल्या लहानशा खेड्यातलं त्यांचं घर, त्यांची आज्जी, त्यांचे शिक्षिका असतानाचे अनेक अनुभव इथपासून ते समाजातल्या थोर व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतरचे त्यांचे अनुभव इत्यादींची फार छान मोट त्यांनी बांधली आहे. सुधा मूर्तींच्या प्रत्येक अनुभवाच्या मांडणीत अत्यंत खरेपणा नेहमीच अधोरेखित होतो तसाच एक बारीकसा उपदेश हलकेच त्या वाचकापर्यंत पोहचवतात. ३२ अनुभव कथनांच्या ह्या संग्रहात कोणताही विवक्षित कथाक्रम नाही त्यामुळेच कोणत्याही क्रमात त्या कथा वाचता येतात. नक्की वाचा! ...Read more

  • Rating Starएकनाथ मा. डुमणे

    आपल्या वतीने प्रकाशित ‘गोष्टी माणसांच्या’ या पुस्तकाचे आमच्या प्रशालेत आम्ही ‘श्रावण अभिवाचन उपक्रमात’ वाचन घेतले. दररोज एक कथा विद्यार्थ्यांना वाचून दाखवायची. सुधा मुर्तींनी इंग्रजीत लिहिलेल्या कथा लिना सोहोनी यांनी मराठीत अनुवादित करताना त्यांच्यातल गोडवा कायम राखला आहे. या कथांचे वाचन ऐकताना विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन जायचे. कथा कधी संपली हे त्यांना कळायचेच नाही. कथा ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावर प्रसंगानुरूप बदलत जाणारे भावही टिपण्यासारखेच असायचे. कथा संपायची अन् विद्यार्थी भारावल्यासारखे होऊन जायचे. ‘वयाची अट नाही’, ‘लाल भाताची कणगी’, ‘खरा दागिना’, ‘वाटणी’ अशा कथातर खूपच खोलवर उतरल्या. या संग्रहाच्या रूपाने सुधातार्इंनी स्वार्थी वातावरणात दुर्मिळ होत चाललेली आजीच्या संस्काराची कुस पुस्तकाच्या माध्यमातून गोष्टीरूपाने उपलब्ध करून दिलीय. ही संस्कार शिदोरी विद्यार्थी व बालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शाळा व ग्रंथालयाची आहे. काल्पनिक कथांपेक्षा चलत फिरत वेचलेल्या अनुभवातून प्रकटलेल्या या कथा आपल्याच घर, परिसरातल्या वाटतात. त्या हृदयात उतरून कधी संस्कार करून जातात. तेच कळत नाही. हे मात्र नक्की! अभिवाचन उपक्रमातून वाचन सुधाराला गती मिळाली. ...Read more

  • Rating StarSunetra Potnis

    अतिशय उत्तम पुस्तक ...माझ्या संग्रही आहे...

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more