* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: APAN MANSAT JAMA NAHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788184980226
  • Edition : 4
  • Publishing Year : APRIL 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 180
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :RAJAN GAVAS COMBO SET - 4 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE STORIES BY RAJAN GAVAS HAVE THE NEW DIMENSIONS OF THE 80S. THEY EXPRESS THE NEW MODE IN WOMEN`S LIVES. THEY REVEAL THE CHANGES IN THE THOUGHTS AND EXPRESSIONS IN THEIR LIVES. MOST OF HIS STORIES HAVE THE RURAL BACKGROUND AND WHILE CREATING THE PICTURE OF A RURAL LIFE, HE DOES NOT IGNORE A SINGLE ASPECT OF IT. HE VERY MINUTELY DESCRIBES EVERY DETAIL IN HIS STORIES. HE SUCCEEDS TO PRESENT THE MENTALITY OF THE WHOLE VILLAGE AS SUCH. HE EXPRESSES THE LIFESTYLE OF A FARMER, HIS RELATIONS WITH OTHER MEMBERS OF THE SOCIETY, THE NEW POLITICS, THE CASTE SYSTEM, AND EVERY SUCH ASPECT RELATED TO A SOCIAL LIFE. OVER THE PERIOD, THE RURAL LIFE IS ALSO CHANGING. IT IS ALSO PRACTICING THE MODERN WAYS OF LIFE. DURING THESE LAST THREE DECADES, THE WHOLE OF MAHARASHTRA IS EXPERIENCING CHANGES; THE MODERN URBANIZATION IS SPREADING TOWARDS THE RURAL AREAS, INVADING IT SWIFTLY. WHILE PRESENTING THIS IN PERFECT STYLE, THE AUTHOR IS GIVING US A WARNING THAT THIS WILL IN TERM HARM THE PREVIOUS VALUES AND MORALE OF THE RURALITES. ALL THESE STORIES CONSTANTLY HAVE THE URBANIZATION AT THE CORE OF THEIR CULTURE. RANDHIR SHINDE:
राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगाड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविध तहेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. गेल्या तीनेक दशकभरातील महाराष्ट्रातील गावगाड्याचा बदलता अवकाश ही कथा चित्रित करते. आधुनिक काळातील शहरकेंद्रित मूल्यदृष्टीचे लोण हळूहळू ग्रामीण जीवनात कसे पसरते आहे व त्यामुळे या लोकमानसामध्ये घडलेल्या पालटाचे, स्थित्यंतराचे, त्यातील ताणाचे चित्रण ही कथा करते. या गोष्टींमुळे कृषिसंस्कृतीतील एकसंध सहजीवी जीवनदृष्टीला तडे बसत आहेत व स्वार्थार्थ, व्यवहारी, उपयोगितावादी जीवनदृष्टीची रुजवात होते आहे, याची सूचना ही कथा करते. या कथेत शहरी आक्रमणाचा ताण सतत केंद्रवर्ती राहिलेला आहे. नव्या कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. म्हणूनच राजन गवस यांची कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरते. तिच्यात जीवनार्थाच्या अनेक शक्यता सामावल्या आहेत. – रणधीर शिंदे
सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचेतर्फे ` पु.ना. पंडित पुरस्कार` २००९.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#RAJANGAVAS #DEVDASI# JOGTIN# DEV #YALLUBAI #SULI #SUBANA #BAYAJA #PARADI #LIMB #JAT #BABANYA #SHEWANTAKKA #LAGNA #MELA #NAVAS #HITNI #DONGAR #BHANDARBHOG #RIVANAVAYALIMUNGI #CHOUNDAKA #AAPANMANSATJAMANAHI
Customer Reviews
  • Rating Starविजय तानाजी पाटील (तासगाव )

    "ग्रामीण भागातून पोटासाठी शहराकडे वळणाऱ्या लोकांच्या वर्तनात होणारा स्वार्थी बदल आणि गावकुसातील विविध जातीधर्मातील लोकांनी एकमेकांबद्दल जपलेली आत्मीयता, बेरकी राजकारण,कुरघोडी व्यक्त करणारा कथासंग्रह " `पाझर`या कथेत टीव्ही बघून काही तरुणामध्ये जैतूनबी, बाबुलबद्दल निर्माण झालेला द्वेष,परंतु त्याला जुन्या पिढीच्या पाटील व जाणत्या मंडळींनी अजिबात थारा न दिल्याने गावात एकी राहिल्याचे दिसून आलं आहे. `तुटल्या प्रदेशाचा प्रवास` या कथेत मुलांना पोटाला चिमटा देऊन शिकवल्यानंतर, अप्पलपोटा विचार करून रक्ताच्या नात्यांना ती कसे विसरून जातात हे लेखकाने मार्मिकपणे दर्शवले आहे. पण यात त्या घरच्या म्हातारीची कुटुंब एकत्र राहावं ही तळमळ मात्र मनाला चटका लावून जाते. `बहुलकरांच्या मुलाची गोष्ट` या कथेत मास्तर आपल्या दिपूला, त्यांना परिस्थितीमुळे जे शिकता आले नाही ते दिपूने शिकावं यासाठी केलेली जोर-जबरदस्ती त्यांच्याच अंगलट येते अन दिपू घर सोडून निघून जातो. गुरुजींनी आपल्या गरीब भावंडांना अंतर दिलेलं असूनही अशा कठीण प्रसंगी भावाच्या मदतीला ती धावून येतात.शिकल्याने माणूस स्वार्थीच विचार करू लागतो त्यापेक्षा मायेचा पाझर असलेली अडाणी लोक बरी .कथेने आपल्या मुलावर अपेक्षांचे ओझं लादणाऱ्या पालकांच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातलं आहे. ` ठराव ` या ग्रामीण कथेत दूधसंघाच्या निवडणुकीतील गाव पातळीवरचे बेरकी आबा, तात्यांचे राजकारण, एकमेकांची जिरवाजिरवी समोर आणली आहे.गरज पडल्यावर एकमेकांच्या जीवावर उठणारं राजकारण मनात घृणा निर्माण करते. ` वळसंगे काका`या कथेत नायकाने आपल्या घराची परिस्थिती सुधारण्यासाठी, आपल्या स्वतःचा बळी देऊन घरच्यासाठी केलेली धडपड दर्शवली आहे. या त्यागाची भावंडांना जाण नसल्याने शेवटी काकालाही स्वतःचा विचार करण्यास परिस्थिती भाग पाडते. `लेखकराव` या कथेत लेखनकलेस धनिकांच्या दावणीस बांधण्याचा प्रकार नायकाने समोर आणला आहे. पिढी जात गर्भ श्रीमंत दादासाहेब आपल्या खानदानाचे अपेक्षित चरित्र लेखकास हवा तो मोबदला देऊन, लिहिण्यास सांगत आहेत. ` छळणारी गोष्ट ` ही एक गुढकथा तात्या ह्या गावकुसातील पुढाऱ्याची. पण कथेने एवढी वळणे घेतली आहेत की, शेवटपर्यंत तात्या नावाचं गुढ वाचकाला उकलतच नाही. `आपण माणसात जमा नाही` या कथेत नायक व त्याच्या आई-वडिलांस, त्यांचे आजोबा नेसत्या कपड्यांनीशी घरातून बाहेर काढतात. त्यानंतर त्यांचा सुरू होतो जगण्याचा संघर्ष.या काळात त्याच्या आईचे वडीलांकडे नायकास शिकवायला ठेवून घेतात.पण मामी व इतर नातलगांचा त्याला विरोध. आजोबांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे शिक्षण व्यवस्थित पूर्ण होतं. तो सरकारी नोकरी पदरात पाडून घेतो.उपकाराची परतफेड म्हणून आपल्या भाच्यास पुढे शिकवायचे असते.पण त्यावेळेस पत्नीने केलेला आकांडतांडव बघून नायकाला स्वतःचीच लाज वाटते अन तो ठरवतो `आता गावाची शीव नाही बघायची, कारण आपण माणसात जमा नाही` हा प्रसंग डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्यालाही नायक आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत आहे असं नक्कीच वाटतं. `तळ` या कथेत कल्लवा ही कथेची नायिका असून, ती एकहाती हातभट्टीचा व्यवसाय कुठल्याच पुरुषाला दाद न देता सांभाळते. तिला बाहेरख्यालीपणा खपत नसल्याने, आपल्या नवऱ्याशी फारकत घेऊनही त्याच्याशी प्रामाणिक राहणारी स्त्री कल्लवा. तिच्यावर हात टाकल्याचे कळल्यावर सत्यवाचे तिच्या पाठीशी उभ रहाणं मनात घर करून जाते. एकंदरीत या कथा मानवी स्वभावाचे विविध पैलू, अन त्याचे परिस्थिती अनुरूप बदलणारे वर्तन आपल्यासमोर उघडून दाखवतात.कोल्हापूर परिसरातील वर्णन वाचून आपल्या आसपास कथा घडत असल्याचा भास होतो. ...Read more

  • Rating StarB Poorva

    #पुस्तक_ओळख #आपण_माणसात_जमा_नाही #रिवणावायली_मुंगी #राजन_गवस कधी कधी काही काही पुस्तकं फार उशिराच हातात पडली असं वाटतं, त्यातलीच ही दोन. आजवर जरी पुस्तकं वाचली तरी पुस्तक वाचताना आपण पुस्तक वाचत आहोत ही जाणीव मनाच्या तळाशी जिवंत असाची पण राजन गवस यांचे कथासंग्रह त्या अर्थाने मला वेगळेच भासले. त्याच्या कथा एखाद्या चित्रपटाप्रमाणे मनःपटलावर जिवंत होतात,स्मृतीत रेंगाळत राहतात. हे कथासंग्रह प्रत्येक मनाचे आहेत.स्त्री आत्ताची असो वा ऐंशी नव्वदीच्या काळातली असो ,तिची जीवनमूल्ये,तिची घुसमट ,तिची बदलत जाणारी दृष्टी हे जितकं राजन गवस यांनी अस्सल पणे मांडलं आहे तितकंच प्रभावीपणे बदलत्या गावगाड्यातल्या माणसाचे औद्योगिकरण बदलत जाणारे राहणीमान,पालटत जाणारे दोन पिढ्यातील अंतर त्यातून होणारी मानवी मनाची उलाघाल याचे अतिशय प्रभावी चित्रण या कथासंग्रहातून केले आहे.एकसंघतेतून विस्कळीत होत व्यवहारी आणि भोगवादी बनत गेलेली पिढी आणि त्यातून जुन्या संस्कारातील मानवी मनावर येणारा ताण अशा मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर या कथा प्रकाश टाकतात. राजन गवस यांच्या कथा जितक्या श्रेष्ठ आहेत तितक्याच विविधांगी आहेत.वाचकाला चौकटीबाहेर विचार करायला लावून जीवनार्थाने समृद्ध करतात. -©पूर्वा बडवे ...Read more

  • Rating Starगोविंद पाटील

    साहित्य अकादमी विजेते मराठीतील आघाडीचे लेखक राजन गवस यांनी लिहलेल्या आणि प्रतिष्ठित दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ग्रामीण कथांचा " आपण माणसात जमा नाही..."हा संग्रह नुकताच वाचून काढला..संग्रहात एकूण तेरा कथा आहेत. खेड्यापाड्यात शिक्षण आलं...कमालीच्य गरीबीवर मात करून मुलं शिकायला लागली.त्यांच्या शिक्षणासाठी नात्यागोत्यातल्या माणसानी खूप हाल सोसले.प्रसंगी पडेल तो त्याग केला.हा त्याग करणार्यांमध्ये आई बाबा बहिण भाऊ आजी आजोबा चुलता काकू मावशी काका मामा मामी आत्या अशा गावगाडा संस्कृतीच्या आपल्या लोकांनी शिकवण्यासाठी आपलं योददान दिलं.. नव्याने शिक्षित झालेल्या या पिढिकडून मागच्यांच्या काही अपेक्षा होत्या पण नोकरीमुळे शहराचं वारं लागलेल्या या पांढरपेशानी त्यांच्या अपेक्षांना छेद दिला या मध्यवर्ती सुत्राला धरून या कथा लिहिल्या गेल्या आहेत..राजन गवस यांच्या कथांमधून बदलत निघालेला नवा गाव..गावातलं सडकं राजकारण..जातकारण...नातेसंबंधातले ताणतनाव..बदलणारे समूहमानस यांचे मर्मग्राही चित्रण आले आहे..मराठी कथा साहित्यात स्वताचे वेगळेपण सिद्ध करणारा हा संग्रह आपण नक्की वाचायला हवा... ...Read more

  • Rating StarJYOTI GRANTHVARTA MAGAZINE 15-8-2009

    राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा. त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून साकारला आहे. बदलत्या गावगड्याचे चित्र या कथेत पाहायला मिळते. कृषिसंस्कृतीतील विविधतऱ्हेचे संबंध, समूहमानस, नवे सत्तासंबंध, जातीयतेची उतरंड याबद्दलचा जीवनार्थ ही कथा व्यक्त करते. नव्या कृषिसंस्कृतीकडे पाहण्याची एक नवी मर्मदृष्टी ही कथा देते. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more