* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: WHITE MUGHALS LOVE AND BETRAYAL IN EIGHTEENTH CENTURY INDIA
  • Availability : Available
  • Translators : SUDHA NARAVANE
  • ISBN : 9788177667097
  • Edition : 2
  • Publishing Year : AUGUST 2006
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 476
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HISTORICAL
  • Sub Category : INDIAN
  • Available in Combos :WILLIAM DALRYMPLE BIRTHDAY OFFER
    WILLIAM DALRYMPLE COMBO SET
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
WHITE MUGHALS IS THE LOVE STORY OF LOVERS JAMES ACHILLES KIRKPATRICK AND KHAIR UN-NISSA, TWO PEOPLE BELONGING TO DIVERSE CULTURES AND RACES AT A TIME WHEN INDIA WAS UNDER THE COLONIAL RULE OF THE BRITISH. THEIR LOVE TRANSCENDED ALL THE POLITICAL, SOCIAL AND CULTURAL BARRIERS AS JAMES MARRIED NISSA AND CONVERTED TO ISLAM. BUT IS THIS THE HAPPY ENDING OF THEIR STORY OR THERE IS A DARK SIDE TO IT IS THE THEME OF THE STORY. ALTHOUGH WHITE MUGHALS AT THE CRUX IS A LOVE STORY, THERE IS MORE TO IT IN THE SENSE THAT IT GIVES A DETAILED PICTURE OF THE SOCIO-POLITICAL-CULTURAL LIFE IN INDIA IN THE LATE 18TH AND EARLY 19TH CENTURY. IT IS FILLED WITH INTERESTING DETAILS AS TO HOW SOME OF THE BRITISH PEOPLE IN INDIA IMBIBED A LOT OF OUR CULTURE, OUR CLOTHES AND OUR LANGUAGE. AND HOW BECAUSE OF THE EAST MEETING WEST AND THE CONSEQUENT RELATIONSHIPS BETWEEN BRITISH MEN AND INDIAN WOMEN, A NEW BREED OF ANGLO-INDIAN COMMUNITY FORMED.
’व्हाइट मुघल्स’ हे सुधा नरवणे यांचे पुस्तक मूळ लेखक विल्यम डॅलरिंपल यांच्या याच नावाच्या इंठाजी कादंबरीवर आधारित आहे. खैरुन्निसा, एक असामान्य रूपवान महिला, जेम्स कर्कपॅट्रिकची लाडकी प्रियतमा आणि हेन्री रसेलने त्याग केलेली प्रेयसी, अशा खैरुन्निसाचा हा जीवनप्रवास आहे. तिचं आयुष्य म्हणजे पराकोटीची दुःखगाथाच होती. अत्यंत कोवळ्या, निरागस वयात तिने सर्वांचा विरोध पत्करून आपल्याला आवडलेल्या तरुणाशी लग्न केलं; पण अकाली वैधव्य तिच्या वाट्याला आलं. बदनामीला तोंड द्यावं लागलं, हद्दपार व्हावं लागलं आणि अखेर परित्यक्तेचं जीवन कंठावं लागलं. इंठाज सरकारने ते हिंदुस्थानात राज्य करत असताना हैदराबादमध्ये रेसिडेन्ट म्हणून जेम्स कर्कपॅट्रिक याची नेमणूक केली होती. तो एक कर्तव्यदक्ष, निःपक्षपाती न्यायबुद्धी असलेला आणि सत्यप्रिय अधिकारी होता. हिंदुस्थानातील मुस्लीम सौंदर्यवती बेगम खैरुन्निसा अशा रुबाबदार व गोर्या तरुण अधिकार्याच्या प्रेमात पडली. जेम्सलाही मनापासून खैरुन्निसा आवडली होती. तो काळ असा होता की, जेव्हा स्त्रियांपुढे फारच थोडे पर्याय होते; आवडीनिवडीला विशेष वाव नव्हता. स्वतःच्या आयुष्यावरही त्यांचा हक्क नव्हता, अशा काळात खैरुन्निसाने रूढीरिवाजाविरुद्ध बंड केले आणि जेम्सशी लग्न करण्यासाठी आत्महत्येची धमकी दिली, आपले सर्वस्व पणाला लावले. जेम्स हा वेगळ्या संस्कृतीत वाढलेला, दुसर्या वंशाचा आणि प्रारंभी दुसर्या धर्माचा होता. त्यानेही खैरुन्निसाशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला. आपलं स्वप्न साकार झाल्याच्या आनंदात ती मश्गुल असताना तिची मुलं साहिब अलम ऊर्फ विल्यम जॉर्ज कर्कपॅट्रिक व साहिब बेगम ऊर्फ कॅथरिन ऑरोरा शिक्षणासाठी जेम्सच्या मायदेशात गेली. त्यानंतर जेम्सचं अवघ्या 41व्या वर्षी निधन झालं. त्या वेळी खैरुन्निसा केवळ 19 वर्षांची होती. तिच्या प्रेमप्रकरणामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये दुही निर्माण झाली आणि ती, तिची आई आणि आजी तिघींचाही सर्वनाश व्हायची वेळ आली. अशा वेळी सहानुभूती दाखवून, अनेक प्रसंगी मदत करणारा हेन्री रसेल हा एक अधिकारी तिच्या आयुष्यात आला. मात्र, रसेल जेम्सपेक्षा खूपच वेगळ्या स्वभावाचा होता. तो अतिशय अहंकेंद्री, घमेंडखोर आणि संवेदनशीलतेचा अभाव असलेला असा होता. एकदा खैरुन्निसाला आपलंसं केल्यावर त्याने तिला नंतर दिलेल्या वागणुकीवरून त्याच्या स्वभाववैशिष्ट्यांचं दर्शन घडतं. जेम्स मरण पावल्यावर खैरुन्निसा खूपच एकाकी झाली होती. पुढे आठ वर्षांनी ती मृत्यू पावली. शारीरिक विकाराने तिचा मृत्यू झाला असला तरी हृदयभंग, उपेक्षा आणि दुःख यामुळेही तिची जीवनेच्छा संपुष्टात आली असावी.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#WHITE MUGHALS #LOVEANDBETRAYALINEIGHTEENTHCENTURYINDIA # WILLIAMDALRYMPLE # SUDHA NARAWANE #JAMESACHILLESKIRKPATRICK #KHAIRUN-NISSA #BRITISHHYDERABAD #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50% #MAJOR-GENERALCHARLESSTUART #PAMAR #ARTHUR WEASLEY #LORD JOHN HENRY WELLESLEY #CHARLS RUSSEL
Customer Reviews
  • Rating StarAnuradha Joshi

    जेम्सचा एक सहकर्मी होता हेन्री रसेल. तो खैरला बेगम म्हणायचा. त्याच्यासोबत खैर आणि तिची आई , सगळा लवाजमा कोलकात्याला गेला. दुःखात बुडालेली खैर रोज जेम्सच्या थडग्यावर जाऊन रडत बसे. दोनेक महिने हे असेच चालू राहिले. मग मात्र तिला कळून चुकले की आता रडण्याे जेम्स काही परत येणार नाही. तिथे जेम्सची पुतणी इझाबेला बुकर होती. तिच्यासोबत खैरचे खूप मधुर नाते बनले. तसेच जनरल पामर आणि फैज हेपण तिला अधुन मधुन भेटायला येत. पण तिला ह्या काळात कोणी खरंच मदत केली तर ती हेन्री रसेलने. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more