N.R.NARAYANA MURTY

About Author

Birth Date : 20/08/1946


N.R. NARAYAN MURTHY IS THE FOUNDER-CHAIRMAN OF INFOSYS TECHNOLOGIES LIMITED, A BANGALORE-BASED GLOBAL SOFTWARE CONSULTANCY. SHRI. IDOLS ARE WORKING.

एन.आर. नारायण मूर्ती हे इन्फोसिस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या बेंगळुरूस्थित – जागतिक सॉफ्टवेअर सल्लागार कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. UNILEVER, HSBC, NDTV, FORD FOUNDATION आणि UN FOUNDATION या संस्थांच्या संचालक मंडळांवर, तसेच कॉर्नेल युनिव्हर्सिटी, व्हार्टन स्कूल, सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी, इंडियन स्कूल ऑफ बिझनेस – हैदराबाद, इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी – बेंगळुरु आणि INSEAD याही संस्थांच्या संचालक मंडळांवर श्री. मूर्ती कार्यरत आहेत. द इकॉनॉमिस्टने २००५ मध्ये, जगातील सर्वाधिक आदरणीय व्यावसायिकांत पहिल्या दहामधील एक म्हणून श्री. नारायण मूर्ती यांची नोंद केली आहे. २००४ ते २००६ अशा सलग तीनही वर्षी, द इकॉनॉमिक टाइम्सनं श्री. मूर्ती यांना भारतातील सर्वाधिक प्रभावशाली CEO म्हणून गौरवलं आहे. भारत सरकारकडून पद्मविभूषण, फ्रान्स सरकारकडून LÉGION DHONNEUR आणि ब्रिटिश सरकारकडून CBE ने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. ERNST AND YOUNG WORLD ENTREPRENEUR OF THE YEAR JE MAX SCHMIDHEINY LIBERTY हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले ते पहिले भारतीय आहेत. INDIA TODAY, BUSINESS STANDARD, FORBES, BUSINESS WEEK, TIME, CNN, FORTUNE आणि FINANCIAL TIMES तर्फे त्यांना BUSINESSMEN AND INNOVATORS मध्ये गौरवाचं स्थान दिलं गेलं आहे.
Sort by
Show per page
Items 1 to 3 of 3 total
A BETTER INDIA A BETTER WORLD Rating Star
Add To Cart INR 375
N. R. NARAYANA MURTY COMBO SET- 2 BOOKS Rating Star
Add To Cart INR 515
26 %
OFF
SUDHA MURTY AND N. R. MURTY COMBO SE... Rating Star
Add To Cart INR 7060 INR 5207

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more