* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ONE NIGHT @ THE CALL CENTRE
  • Availability : Available
  • Translators : SUPRIYA VAKIL
  • ISBN : 9788184980813
  • Edition : 7
  • Publishing Year : NOVEMBER 2009
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 264
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : FICTION
Quantity
Buying Options:
  • Print Books:
...PITCH-PERFECT... KEENLY FOCUSED ON NUANCES AND DETAIL ... ONE NIGHT @ THE CALL CENTER HAS STRUCK A CHORD WITH INDIA`S YOUNG...` IN THE WINTER OF 2004, A WINTER MET A YOUNG GIRL ON AN OVERNIGHT TRAIN JOURNEY. TO PASS THE TIME, SHE OFFERED TO TELL HIM A STORY. HOWEVER, SHE HAD ONE CONDITION THAT HE MAKE IT INTO HIS SECOND BOOK. HE HESITATED, BUT ASKED WHAT THE STORY WAS ABOUT. THE GIRL SAID THE STORY WAS ABOUT SIX PEOPLE WORKING IN A CALL CENTER, SET IN ONE NIGHT. SHE SAID IT WAS THE NIGHT THEY HAD GOT A PHONE CALL. THAT PHONE CALL WAS FROM GOD.
लेखकाला रात्रीच्या प्रवासात एक तरुण, देखणी मुलगी सहप्रवासी म्हणून भेटते. वेळ घालविण्यासाठी , ती त्याला एक गोष्ट सांगू इच्छिते, मात्र ती त्याला अट घालते, की त्या गोष्टीवर त्यानं दुसरं पुस्तक लिहायचं. लेखक सुरुवातीला ते मान्य करायला धजत नाही; पण त्याला ती गोष्ट जाणून घ्यायचं औत्सुक्यही असतंच. त्यानंतर ती मुलगी लेखकाला कॉल सेन्टरमध्ये काम करणाऱ्या सहा लोकांच्या एका रात्रीची कथा सांगते. `फाईव्ह पॉइन्ट समवन ` नंतर चेतन भगत यांचं तितकंच चर्चेत आलेलं हे पुस्तक वाचकांना निश्चितच निराळ्या अनुभवविश्वाची सफर घडवेल. नर्मविनोदाचा सुखद शिडकावा देणारी ही कादंबरी सद्य:स्थितीवर भेदकपणे प्रकाश टाकत वाचकांना नक्कीच अंतर्मुख करेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #ONENIGHT@THECALLCENTRE #FIVEPOINTSOMEONE #THE 3 MISTAKES OF MY LIFE #फाईव्हपॉइंटसमवन #FICTION #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #SUPRIYAVAKIL #सुप्रियावकील #CHETANBHAGAT #चेतनभगत
Customer Reviews
  • Rating StarRohini Londhe

    The Marathi translation of this book is awesome.I just love it.

  • Rating StarDAINIK SAGAR 18-04-2010

    ‘कॉल सेंटर’चं यथार्थ दर्शन घडविणारी कादंबरी… ‘द कॉल सेंटर’ ही चेतन भगत यांची अत्यंत गाजलेली कादंबरी. तिचा मनोज्ञ अनुवाद केलाय सुप्रिया वकील यांनी. मॉडर्न तरुणतरुणींच्या जीवनाचा अविभाज्य घटक ठरलेल्या कॉल सेंटरचं यथार्थ दर्शन जसं प्रस्तुत कादंबरीत तसं त्या तरुणपिढीच्या भावभवनांचा आलेख नजरेसमोर उभा राहतो. एका वेगळ्याच अनुभवविश्वाची रोमांचक सफर घडविण्यात लेखक कमालीचा यशस्वी ठरला आहे. हसत खेळत सत्याचं विदारक दर्शन घडविण्याची त्याची वेगळीच शैली प्रभावशाली वाटते. प्रत्येक तरुण-तरुणीनं वाचावं, असचं हे पुस्तक. प्रस्तुत कादंबरीतील सर्व घटना एकाच रात्रीत घडत असल्यानं तिचा वेग हा देखील चक्रावून टाकणारा आहे. ...Read more

  • Rating StarPUNYANAGARI 24-01-2010

    चेतन भगत यांच्या वास्तवदर्शी कादंबऱ्या… चेतन भगत हे नाव त्यांच्या उल्लेखनीय कादंबऱ्यांमुळे इंग्रजी साहित्यजगतात सुप्रसिद्ध झाले आहे. केवळ लेखक म्हणून पाहण्यापेक्षा भगत यांच्याकडे आज `युथ आयकॉन` म्हणून पाहिले जाते. भगत यांनी भारतातील लहानथोरांना वाचनची आवड लावली आहे. कादंबरीबरोबरच हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रातून ते स्तंभलेखन करतात. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर संसदेत चर्चा झाली आहे. आयआयटीमधून पदवी घेतलेले चेतन भगत यांनी इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँकिंग करिअर सोडून लेखनाला पूर्ण वेळ दिला आहे. २००९ पासून त्यांनी अक्षरधनाची महती वाचकांपुढे आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत मांडली आहे. भारताची सद्यस्थिती बदलण्यासाठी काही तरी करणे आवश्यक आहे आणि ते भगत आपल्या लिखाणातून करतात. `वन नाईट अ‍ॅट द कॉल सेंटर` आणि `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` या दोन कादंबऱ्या त्यांच्या या हेतूचे सर्वार्थाने समर्थन आणि प्रतिपादन करतात. `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` यात उद्योग, व्यवसाय, क्रिकेट आणि धर्म याभोवती गुंफलेली कहाणी आपल्यापुढे उलगडत जाते. तीन मित्रांची ही कथा असून स्वत:च्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने घेऊन ती समाजात स्वत:चे अस्तित्व अधोरेखित करू इच्छितात, परंतु वास्तवात येणाऱ्या संकटांना, अडचणींना तोंड देणे किती अवघड आहे आणि कल्पना तसेच वास्तवात किती फरक आहे हे त्यांना अनुभवातून समजून येते. स्वप्नपूर्तीसाठी ते जीवनाच्या धगीचा सामनाही करतात. तो कसा करतात हे भगत यांच्या `द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ` या पुस्तकातून उलगडते. विलक्षण सहजसोपी लिखाणाची शैली हे भगत यांचे वैशिष्ट्य आहे. ही शैली तशीच ठेवण्यात अनुवादिका सुप्रिया वकील यशस्वी झाल्या आहेत. दोन्ही पुस्तकांची भाषांतरे सुप्रिया वकील यांनी भगत यांच्या शैलीस धक्का न लागेल अशा पद्धतीने केली आहेत. त्यामुळे लेखकाचा हेतू थेट वाचकांपर्यंत पोहोचतो. `वन नाईट अ‍ॅट द कॉल सेंटर` यामध्येही आजच्या भारताची आणि त्यातील युवकांची मनोभूमिका लेखकाने स्पष्ट केली आहे. रेल्वेतील एका रात्रीच्या प्रवासात एका मुलीने सांगितलेली ही कहाणी वाचकांना खिळवून ठेवते आणि आयटी क्षेत्रातल्या वास्तवाचे भान देते. ...Read more

  • Rating StarSAMANA 25-04-2010

    तरुणाईची जीवनशैली… चेतन भगत हे नाव आज ‘युथ आयकॉन’ म्हणून घेतलं जातं. ‘सर्वोच्च खपाच्या इंग्रजी कादंबऱ्यांचे लेखक’ म्हणूनही त्यांच्याकडे हिंदुस्थानी अभिमानानं पाहतात. ‘फाईव्ह पॉर्इंट समवन’ आणि ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ अशी त्यांची दोन्ही पुस्तकंगाजली, त्यांची विक्रमी विक्री झाली. या पुस्तकांपाठोपाठ आता त्यांचं तिसरं पुस्तक ‘वन नाईट द कॉल सेंटर’ हे पुस्तक आलं. गाजलं. विक्रमी खपाचं ठरलं. आधीच्या दोन कादंबऱ्यांचा अनुवाद सुप्रिया वकील यांनी केला होता. ‘वन नाईट... ’चा अनुवादही सुप्रिया वकील यांनी केलाय. ‘वन नाईट... ’चा विषय, त्यातील अनुभवविश्व, त्यातील जीवन त्यातून निर्माण होणारे प्रश्न, समस्या, त्यातील तारुण्यातील होणारी घुसमट हे सारं आजच्या तरुण वाचकांना आकर्षित करणारं आहे. मुळात चेतन भगत त्यांनी मांडण्याची शैली, भाषाशैली ही साधी, सरळ, वाचकांशी थेट संवाद साधाणारी आहे. अनलंकृत भाषेमुळे त्यात नैसर्गिकता जाणवते. अगदी क्वचितच त्यात उपमा येतात. पण त्याही मजेशीर अन् नेमका आशय व्यक्त करणारी आहेत. उदा. ‘सुयोग्य मुलं ही धोक्यात आलेल्या प्रजातींसारखी दुर्मिळ झाली आहेत’ किंवा ‘मोनालिसाचं चित्र पूर्ण झाल्यावर दा विन्सीच्या चेहऱ्यावर जसा अभिमान फुलला असेल तसेच भाव बक्षीच्या चेहऱ्यावर फुलले होते.’ यातून बक्षीच्या हेतूंबद्दल असणारी साशंकता, त्यातून ध्वनित होणाऱ्या शक्यताही भगत यांनी स्पष्ट केल्या आहेत. ‘कॉल सेंटर’चे विश्व आजच्या तरुणाईला आकर्षित करतंय. पण या कॉल सेंटरचे, त्याच्या कार्यपद्धतीचे, त्याच्या वेळेचे दुष्परिणाम हिंदुस्थानी तरुणपिढीवर कसे विदारक होताहेत याचं अंतर्मुख करणारं चित्रण भगत यांनी अत्यंत परिणामकारकतेनं केलंय. ‘कॉल सेंटर....’चं क्षेत्र स्वीकारलं की प्रथम त्या एजंटसना आपली ‘ओळख’ विसरायला लागते आणि त्यांच्या क्लाएंट्ससाठी नवं नाव, ‘ओळख’ स्वीकारावी लागते. आपलंच व्यक्तिमत्व मारून, केवळ पैशासाठी नवं व्यक्तिमत्व तेही नोकरीच्या कालावधीसाठी घ्यायचं हे भयानक आहे. ही कहाणी सहा तरुण एजंट्सशी संबंधित असली तरीही ती प्रातिनिधिक आहे. राधिका, ईशा, व्रूम, प्रियंका, श्याम, मिलिटरी अंकल आणि त्यांचा बॉस बक्षी अशी आणि त्यांच्याशी संबंधित इतर पात्रं. पण या साऱ्याच पात्रांचे व्यक्तिमत्व भगत यांनी कमालीची सजीव चितारली आहेत. अत्यंत पारदर्शी, स्वाभाविक अन् तरुणाईच्या आयुष्याचं नेमकं चित्रण व्यक्त करणारी आहेत. ‘तुमच्या पाकिटात पैसे असतील तर जग तुम्हाला जरासा मान देतं आणि तुम्हाला श्वासोच्छवास करू देतं.’ हे त्यांचं वास्तव आहे. व्यावहारिक जगातील तरुणाईचं वास्तव! कॉल सेंटरमधील जीवन, तिथलं राजकारण, तरुणाईवर होणारा परिणाम, त्यांच्या प्रेमासारख्या नाजूक भावनांची होणारी शोकांतिका, त्यांच्या आकांक्षांचं पानिपत... यावर तोडगा काढण्यासाठी जो ‘देवा’शी मोबाईलवरचा संवाद या कादंबरीच्या अखेरीस आलाय, त्यात भगत जीवनाचंच तत्त्वज्ञान सांगतात, ‘प्रगती म्हणजे भविष्यासाठी काहीतरी टिकाऊ घडवणं’ आणि शेवटी देवाच्या तोंडून भगत जे सांगतात, ते भरकटलेल्या तरुणाईसाठी अत्यंत महत्त्वाचं! ‘माणसाला यशस्वी होण्यासाठी चार गोष्टी आवश्यक असतात. पहिली मध्यम प्रमाणात बुद्धिमान, दुसरी थोडीफार कल्पकता, तिसरी आत्मविश्वास... यश भरारी घेण्यात असतं, गुरगुटून पडून राहण्यात नाही.’ या कादंबरीची ही मोठीच शिकवण. इतर दोन कादंबऱ्यांप्रमाणेच सुप्रिया वकील यांनी या कादंबरीचा अनुवाद अप्रतिम केलाय. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ कादंबरीच्या आशयाशी सुसंगत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो