* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BHARATIYA SAHITYIK
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668445
  • Edition : 4
  • Publishing Year : SEPTEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 148
  • Language : MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IF WE WANT TO MAINTAIN OUR POSITION IN THIS GLOBALIZATION, THEN WE HAVE TO TAKE SPECIFIC CARE OF OUR LANGUAGE, CULTURE AND LITERATURE. OTHERWISE, WE WILL NOT BE ABLE TO HAVE INDIVIDUAL EXISTENCE IN THIS WORLD. TODAY, OUR LITERATURE IS AIMING AT ACQUIRING KNOWLEDGE AT THE WORLD LEVELS. THERE IS NOTHING WRONG IN THIS, BUT WE MUST ALSO WIDEN THE HORIZONS OF OUR KNOWLEDGE, LITERATURE, CULTURE, AND LANGUAGE. THE AIM OF OUR LITERATURE FOR THE 21ST CENTURY SHOULD BE CREATING ALL INDIA ACADEMY SOCIETY. FOR THIS, WE NEED TO HAVE A CONSOLIDATED FORM OF INDIAN LANGUAGES AND LITERATURE. THIS CAN BE ACHIEVED ONLY IF WE HAVE THE BASIC KNOWLEDGE OF THE INDIAN LANGUAGES AND LITERATURE. THIS CAN BE FULFILLED BY READING THIS BOOK. INDIA IS A MULTI-LINGUISTIC, AND MULTICULTURAL COUNTRY, AND THIS BOOK WILL HELP YOU TO UNDERSTAND IT BETTER.
आजच्या जागतिकीकरणाच्या रेट्यात जोवर आपण आपली भाषा, संस्कृती, साहित्य टिकवून धरू तोवरच आपले स्वतंत्र अस्तित्व आणि अस्मिता सुरक्षित राहील. जागतिक स्तरावरील ज्ञानाचे संपादन हे आज आपल्या समग्र भाषा व साहित्य व्यवहाराचे उद्दिष्ट होऊ पाहत आहे. ते उद्दिष्ट साध्य करताना आपणापुढे भारतीय ज्ञान, साहित्य, संस्कृती, भाषा जपण्याचे व ते सारे समृद्ध करण्याचेही आव्हान आहे. अखिल भारतीय अकादमीक समाजनिर्मिती हे एकविसाव्या शतकातील आपले साहित्यिक लक्ष्य आहे. त्यासाठी भारतीय भाषा व साहित्याचे एकसमन्वायी, समेकित (CONSOLIDATE) रूप तयार करणे आवश्यक झाले आहे. त्याकरिता प्रत्येकात भारतीय भाषा व साहित्याची समृद्ध जाण हवी. अशी जाण ‘भारतीय साहित्यिक’ हे पुस्तक तुमच्यात निर्माण करील. भारतासारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देशात ‘भारतीय साहित्यिक’सारखं पुस्तक आपल्या संग्रही असणं म्हणजे भारतीयतेचं स्पंदन आपल्या हृदयाशी जपण्यासारखंच!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #DR.SUNILKUMARLAVATE #डॉ.सुनीलकुमारलवटे #भारतीयसाहित्यिक #BHARATIYASAHITYIK
Customer Reviews
  • Rating StarSAKAL 16-12-2007

    डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी आपल्या ‘भारतीय साहित्यिक’ या पुस्तकात पंचवीस ‘भारतीय साहित्यिक’ या पुस्तकात पंचवीस भारतीय साहित्यिकांचा आस्वादक शैलीत परिचय घडविला आहे. यात हिंदू, उर्दू, मराठी, पंजाबी, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भाषांतील साहित्यिकांचा समाेश आहे. यात सर्वाधिक जास्त असे चौदा साहित्यिक हिंदीतील आहेत.‘सकाळ’ (कोल्हापूर आवृत्ती) मध्ये यातील बहुतेक लेख प्रकाशित झाले आहेत. यातील लेख बहुधा प्रासंगिक कारणांनी लिहिलेले आहेत. तरीही ते लेखकाचे जीवन, व्यक्तित्व आणि साहित्यविशेष यांचे नेमकेपणाने दर्शन घडवतात. स्वत: लेखक हिंदीचे प्राध्यापक असल्यामुळे हिंदीतील लेखकांवरील लेख अधिक अभ्यासपूर्ण उतरले आहेत. त्यात लेखकांच्या कलाकृतींची ओळख घडवून देताना वाचकांना लेखकाचे वाङ्मयीन परंपरेतील स्थान लक्षात आणून देण्याची भूमिकाही आहे. ‘‘मैथिलीशरण गुप्तांची साहित्यसाधना ही एकविसाव्या शतकातील भारताला अंतर्मुख होण्याची एक संधी आहे,’’ हे डॉ. लवटे यांचे भाष्य मार्मिक आहे. यात महादेवी वर्मा, अमृता प्रीतम, निर्मल वर्मा, यू.आर.अनंतमूर्ती अशा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यकारांबरोबर पटकथाकार डॉ. राही मासूम रझा, परदेशी हिंदी कवी ओदोलेन स्मेकल, रस्त्यावरचा रंगकर्मी सफदर हाश्मी, ‘मराठी कबीर’ नारायण सुर्वे अशा महत्त्वाच्या लेखकांचाही समावेश आहे. डॉ. लवटे यांची संवेदनशीलता विविध विचारसरणींच्या साहित्यिकांचे वाङ्मयीन कर्तुत्व जाणून घेण्यासाठी आवश्यक असलेली लवचिकता धारण करू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. मात्र ‘भारतीय साहित्यिक’ या शीर्षकाखालील पुस्तकात सुधाकर प्रभूंचा समावेश खटकतो. खरे तर यात इतर भारतीय भाषांमधील राष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण स्थान असलेले काही साहित्यिक समाविष्ट करायला हवे होते. त्यांच्या अनुवादित साहित्याबाबतची सूचीही दिली असती तर पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढले असते. आहे त्या स्वरूपात हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांची जिज्ञासा वाढवणारे आणि अनुवादकांना मार्गदर्शक ठरणारे म्हणून महत्त्वाचे आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more