* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LENINGRAD STATE OF SIEGE
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788184983241
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 30 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
``ALL OFFERS OF SURRENDER FROM LENINGRAD MUST BE REJECTED,`` ORDERED ADOLF HITLER ON SEPTEMBER 22, 1941, AS OPERATION BARBAROSSA UNFOLDED. ``THE PROBLEM OF HOUSING AND FEEDING THE PEOPLE CANNOT AND SHOULD NOT BE SOLVED BY US. IN THIS STRUGGLE FOR SURVIVAL, WE HAVE NO INTEREST IN KEEPING EVEN A PROPORTION OF THE CITY`S POPULATION ALIVE.`` DURING THE 900-DAY SIEGE OF LENINGRAD, THE GERMAN HIGH COMMAND DELIBERATELY PLANNED TO ERADICATE THE CITY`S POPULATION THROUGH STARVATION. BY THE TIME THE SIEGE ENDED IN JANUARY 1944, MORE THAN A MILLION PEOPLE HAD DIED. THOSE WHO SURVIVED WOULD BE MARKED PERMANENTLY BY WHAT THEY ENDURED AS THE CITY DESCENDED INTO CHAOS. IN LENINGRAD, MILITARY HISTORIAN MICHAEL JONES TELLS THE HUMAN STORY OF THIS EPIC SIEGE. DRAWING ON NEWLY AVAILABLE EYEWITNESS ACCOUNTS AND DIARIES, HE EXPOSES THE TRUE HORROR OF THE ORDEAL - INCLUDING STORIES LONG-SUPPRESSED BY THE SOVIETS OF LOOTING, CRIMINAL GANGS, AND CANNIBALISM. BUT HE ALSO EXPLORES THE IMMENSE PSYCHOLOGICAL RESOURCES ON WHICH CITIZENS OF LENINGRAD DREW TO SURVIVE AGAINST DESPERATE ODDS. AT THE HEIGHT OF THE SIEGE, FOR INSTANCE, AN EXTRAORDINARY LIVE PERFORMANCE OF SHOSTAKOVICH`S SEVENTH SYMPHONY PROFOUNDLY STRENGTHENED THE CITY`S WILL TO RESIST. WHEN BESIEGING GERMAN TROOPS HEARD ITS DEFIANT BROADCAST ONE REMARKED: ``WE BEGAN TO UNDERSTAND WE WOULD NEVER TAKE LENINGRAD.`` A RIVETING ACCOUNT OF ONE OF THE MOST HARROWING SIEGES IN WORLD HISTORY, LENINGRAD PAYS TRIBUTE TO THE ASTONISHING POWER OF THE HUMAN WILL IN THE FACE OF EVEN THE MOST DIRE CATASTROPHE.
८ सप्टेंबर, १९४१. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणा-या हिटलरच्या फौजांनी सोव्हिएत महासंघाचा मानबिंदू असणा-या लेनिनग्राड शहराभोवती पक्का फास आवळला. यामागे होती, एक थंड डोक्यानं आखलेली क्रूर योजना आणि लोकांची उपासमार करून शहर नष्ट करण्याची निर्दयी नाझी विचारसरणी. सलग ८७२ दिवस पडलेला हा वेढा, हे मानवी इतिहासातलं एक भीषण पर्व आहे. विनाशासाठी टपलेलं शत्रूसैन्य आणि अत्यंत भ्रष्टाचारी नेत्यांची गलथान हुकूमशाही यांच्यात भरडले जाऊन, दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक भुकेनं तडफडून मेले. नैतिक अध:पतनाचं टोक गाठलं गेल्यानं नरमांसभक्षणासारखे अघोरी प्रकार घडले. पण लेनिनग्राडच्या काही नागरिकांनी आपल्यातलं माणूसपण मरू दिलं नाही आणि अखेर त्यांनी विजय मिळविला. लेनिनग्राडचा वेढा ही त्या विलक्षण झुंजीची, मन सुन्न करणारी कहाणी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SUNITIKANE #सुनीतिकाणे #PRAMODJOGALEKAR #लेनिनग्राडचा वेढा #LENINGRADCHAVEDHA #प्रमोदजोगळेकर #LENINGRAD STATE OF SIEGE
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    दुस-या महायुध्दाच्या आरंभी रशीया व जर्मनी मधे मैत्रीकरार झाला होता परंतु आठ सप्टेंबर 1941 रोजी जर्मनी ने रशीया विरुध्द युध्द पुकारले.रशीया चे लष्कर जवळ जवळ गुडघ्या वर टेकायची वेळ आलेली.शहरात न घुसता भोवती वेढा घालून कोंडी करायचे हिटलर व सेनानी यांनी रवले.रशीयाचे सैनिकी गोंधळ अन नागरीकांची उपासमार याने लेनिनग्राड शहर तंग झाले.प्रेतांचे ढीग पसरले.खायला काही नाही ,शेवटी प्रेता चे तुकडे खाणे भाग पडले.पण कांही सुद्न्य नागरीक व जुनाट तोफांच्या मदती ने हा वेढा उठवला आणि पारडे रशीया च्या बाजुने फिरले. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA

    इतिहासाचे एक पान... दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पूर्व आघाडीवरील भीषण वास्तवात दिसून आलेली विलक्षण ऐतिहासिक नोंद म्हणून ८ सप्टेंबर १९४१ रोजी चित्तथरारक सत्यकथा जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अगदी अधिकृत आहे. लोकांची उपासमार करून अतिशय थंड डोक्याने,क्रूपणे संपूर्ण शहर नष्ट करण्याची अघोरी योजना म्हणजे लेनिनग्राडचा वेढा! नाझीची ही निष्ठूर कार्यपद्धती ८७२ दिवस सुरू होती. अर्थात हरामखोर राजकारण्यांच्या भ्रष्ट हुकूमशाहीपाया सुमारे १० लाखांपेक्षा अधिक नागरिक अन्नपाण्याविना तडफडून गेले. अनैतिकतेचा हा अमानुष अत्याचार नरमांस खाण्यापर्यंतचे टोक गाठू शकला! त्यातही काही मानवतावादी देशभक्त लोक होत. त्यांनी या विलक्षण सामन्यात अंगावर झेलून अखेर विजय मिळवला हे सारेच अंगावर काटा आणणारे आहे. बळी पडलेल्या लोकांना वीर म्हटले तर? या प्रश्नाचे नकाशांस सचित्र उत्तर देणारी कादंबरी वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more