* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LENINGRAD STATE OF SIEGE
  • Availability : Available
  • Translators : PRAMOD JOGLEKAR
  • ISBN : 9788184983241
  • Edition : 2
  • Publishing Year : JANUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 268
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
  • Available in Combos :PRAMOD JOGLEKAR COMBO SET - 30 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Print Books:
``ALL OFFERS OF SURRENDER FROM LENINGRAD MUST BE REJECTED,`` ORDERED ADOLF HITLER ON SEPTEMBER 22, 1941, AS OPERATION BARBAROSSA UNFOLDED. ``THE PROBLEM OF HOUSING AND FEEDING THE PEOPLE CANNOT AND SHOULD NOT BE SOLVED BY US. IN THIS STRUGGLE FOR SURVIVAL, WE HAVE NO INTEREST IN KEEPING EVEN A PROPORTION OF THE CITY`S POPULATION ALIVE.`` DURING THE 900-DAY SIEGE OF LENINGRAD, THE GERMAN HIGH COMMAND DELIBERATELY PLANNED TO ERADICATE THE CITY`S POPULATION THROUGH STARVATION. BY THE TIME THE SIEGE ENDED IN JANUARY 1944, MORE THAN A MILLION PEOPLE HAD DIED. THOSE WHO SURVIVED WOULD BE MARKED PERMANENTLY BY WHAT THEY ENDURED AS THE CITY DESCENDED INTO CHAOS. IN LENINGRAD, MILITARY HISTORIAN MICHAEL JONES TELLS THE HUMAN STORY OF THIS EPIC SIEGE. DRAWING ON NEWLY AVAILABLE EYEWITNESS ACCOUNTS AND DIARIES, HE EXPOSES THE TRUE HORROR OF THE ORDEAL - INCLUDING STORIES LONG-SUPPRESSED BY THE SOVIETS OF LOOTING, CRIMINAL GANGS, AND CANNIBALISM. BUT HE ALSO EXPLORES THE IMMENSE PSYCHOLOGICAL RESOURCES ON WHICH CITIZENS OF LENINGRAD DREW TO SURVIVE AGAINST DESPERATE ODDS. AT THE HEIGHT OF THE SIEGE, FOR INSTANCE, AN EXTRAORDINARY LIVE PERFORMANCE OF SHOSTAKOVICH`S SEVENTH SYMPHONY PROFOUNDLY STRENGTHENED THE CITY`S WILL TO RESIST. WHEN BESIEGING GERMAN TROOPS HEARD ITS DEFIANT BROADCAST ONE REMARKED: ``WE BEGAN TO UNDERSTAND WE WOULD NEVER TAKE LENINGRAD.`` A RIVETING ACCOUNT OF ONE OF THE MOST HARROWING SIEGES IN WORLD HISTORY, LENINGRAD PAYS TRIBUTE TO THE ASTONISHING POWER OF THE HUMAN WILL IN THE FACE OF EVEN THE MOST DIRE CATASTROPHE.
८ सप्टेंबर, १९४१. राक्षसी महत्त्वाकांक्षा असणा-या हिटलरच्या फौजांनी सोव्हिएत महासंघाचा मानबिंदू असणा-या लेनिनग्राड शहराभोवती पक्का फास आवळला. यामागे होती, एक थंड डोक्यानं आखलेली क्रूर योजना आणि लोकांची उपासमार करून शहर नष्ट करण्याची निर्दयी नाझी विचारसरणी. सलग ८७२ दिवस पडलेला हा वेढा, हे मानवी इतिहासातलं एक भीषण पर्व आहे. विनाशासाठी टपलेलं शत्रूसैन्य आणि अत्यंत भ्रष्टाचारी नेत्यांची गलथान हुकूमशाही यांच्यात भरडले जाऊन, दहा लाखांपेक्षा जास्त नागरिक भुकेनं तडफडून मेले. नैतिक अध:पतनाचं टोक गाठलं गेल्यानं नरमांसभक्षणासारखे अघोरी प्रकार घडले. पण लेनिनग्राडच्या काही नागरिकांनी आपल्यातलं माणूसपण मरू दिलं नाही आणि अखेर त्यांनी विजय मिळविला. लेनिनग्राडचा वेढा ही त्या विलक्षण झुंजीची, मन सुन्न करणारी कहाणी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #SUNITIKANE #सुनीतिकाणे #PRAMODJOGALEKAR #लेनिनग्राडचा वेढा #LENINGRADCHAVEDHA #प्रमोदजोगळेकर #LENINGRAD STATE OF SIEGE
Customer Reviews
  • Rating StarAnil Udgirkar

    दुस-या महायुध्दाच्या आरंभी रशीया व जर्मनी मधे मैत्रीकरार झाला होता परंतु आठ सप्टेंबर 1941 रोजी जर्मनी ने रशीया विरुध्द युध्द पुकारले.रशीया चे लष्कर जवळ जवळ गुडघ्या वर टेकायची वेळ आलेली.शहरात न घुसता भोवती वेढा घालून कोंडी करायचे हिटलर व सेनानी यांनी रवले.रशीयाचे सैनिकी गोंधळ अन नागरीकांची उपासमार याने लेनिनग्राड शहर तंग झाले.प्रेतांचे ढीग पसरले.खायला काही नाही ,शेवटी प्रेता चे तुकडे खाणे भाग पडले.पण कांही सुद्न्य नागरीक व जुनाट तोफांच्या मदती ने हा वेढा उठवला आणि पारडे रशीया च्या बाजुने फिरले. ...Read more

  • Rating StarDAINIK SAMANA

    इतिहासाचे एक पान... दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पूर्व आघाडीवरील भीषण वास्तवात दिसून आलेली विलक्षण ऐतिहासिक नोंद म्हणून ८ सप्टेंबर १९४१ रोजी चित्तथरारक सत्यकथा जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अगदी अधिकृत आहे. लोकांची उपासमार करून अतिशय थंड डोक्याने,क्रूपणे संपूर्ण शहर नष्ट करण्याची अघोरी योजना म्हणजे लेनिनग्राडचा वेढा! नाझीची ही निष्ठूर कार्यपद्धती ८७२ दिवस सुरू होती. अर्थात हरामखोर राजकारण्यांच्या भ्रष्ट हुकूमशाहीपाया सुमारे १० लाखांपेक्षा अधिक नागरिक अन्नपाण्याविना तडफडून गेले. अनैतिकतेचा हा अमानुष अत्याचार नरमांस खाण्यापर्यंतचे टोक गाठू शकला! त्यातही काही मानवतावादी देशभक्त लोक होत. त्यांनी या विलक्षण सामन्यात अंगावर झेलून अखेर विजय मिळवला हे सारेच अंगावर काटा आणणारे आहे. बळी पडलेल्या लोकांना वीर म्हटले तर? या प्रश्नाचे नकाशांस सचित्र उत्तर देणारी कादंबरी वाचनीय आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो