* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KATHA SAWALICHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171613243
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL THE 13 STORIES HAVE BEEN WRITTEN DURING MY STAY IN THE SERENE VICINITY OF GOMANTAK SINCE LAST FOUR YEARS. EACH WOMAN APPEARED TO SOLVE THE LIFE PUZZLE IN HER OWN UNIQUE WAY. THOUGH THE CHARACTERS ARE FICTITIOUS, THE QUESTIONS THAT THEY HAVE ARE TRUE TO THEIR FULLEST. A FEW OF THESE WOMEN HAVE FACED LIFE SENSIBLY AND IN SANE MANNER. INDEED, THEY WERE CONFRONTED WITH A VICIOUS TURN IN LIFE WHICH THEY CROSSED IN A POISED MANNER. I GUESS THIS WAS POSSIBLE BECAUSE OF THE EQUILIBRIUM WITH WHICH THEY LED THEIR LIVES AND ALSO BECAUSE THEY WERE BASICALLY MATURED IN ALL ASPECTS. ‘LADY DIANA’ AND ‘JASWANDI’ PORTRAY TYPICAL WOMEN FROM GOMANTAK HAVING COMPLETE FAITH UPON LOVE. THE OTHERS LIKE ‘ASAWARI’, ‘POORVA’, ‘RESHMA’, OR THOSE WHOM WE COME ACROSS IN STORIES LIKE ‘MOKAL ZAAD’, ‘LEKURWALA’ OR ‘HARAVALELA CHANDRA’ HAVE THE ABILITY TO ANSWER THE QUESTIONS THAT THEY HAVE COME ACROSS. THEY HAVE INDEED REACHED THEIR FINAL DESTINATION. THE CHARACTER IN ‘KATHA SAWALICHI’ IS THE ONE WHO HAS WILLINGLY ACCEPTED TO BE A SHADOW. TO BE A SHADOW OR TO HAVE A SEPARATE IDENTITY IS AFTER ALL INDIVIDUAL PERSPECTIVE. I HAVE TRIED MY BEST TO PORTRAY THESE CHARACTERS IN SHADES I UNDERSTOOD.
गेली चार वर्षे, गोमंतकातल्या निसर्गरम्य गावी वास्तव्य झाले व याच कालखंडातील या कथांचा जन्म! यामधल्या तेराही कथा स्त्री-जीवनकथा आहेत. कथेमधली प्रत्येक स्त्री ही मला पडलेल्या स्त्री-जीवनाचे कोडे सोडवणारी स्त्री बनली. सर्व पात्रे काल्पनिक आहेत पण त्यांचे जीवन व प्रश्न मात्र वास्तव आहेत. काही स्त्रिया विलक्षण समजूतदारपणाने जीवनाला सामऱ्या जातात. त्यांच्या जीवनाला आलेले वाईट वळण, समंजसपणाने त्यांनी ओलांडलेले असते, याचे कारण त्यांच्या विचाराची मूळ बैठकच प्रौढ, समंजस असावी, असे मला वाटते. ‘लेडी डायना’ आणि ‘जास्वंदी’ या खास गोमंतकीय स्त्रिया, प्रेमावर अतूट विश्वास बाळगणाNया, तर ‘आसावरी’, ‘पूर्वा’, ‘रेशमा’ या कथानायिका अगर ‘मोकळं झाड’ किंवा ‘लेकुरवाळा’, ‘हरवलेला चंद्र’मधल्या कथानायिका यांनी स्वत:समोरची प्रश्नचिन्हे... स्वत:च सोडवून त्या पूर्णविरामाला पोहोचल्या आहेत. ‘कथा सावलीची’ ही एका सावलीची भूमिका स्वीकारणारी स्त्रीकथा! आपण सावलीची भूमिका स्वीकारावी की स्वत:ची स्वतंत्र सावली निर्माण करावी, हा पुन्हा जिचा तिचा स्वतंत्र प्रश्न आहे. माझ्या मगदुराप्रमाणे मी त्यांना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 07-08-1994

    एकाकी स्त्रीच्या कथा... ‘मुळाचा आणि सावलीचा चिरप्रवास सुरु झाला होता एकमेकांना आधार देत! एक स्थितप्रज्ञ प्रवास! प्रकाशाच्या शोधार्थ, एक साधना सुरु झाली होती.’ या शोधापाशी माधवी देसाई यांची पहिली कथा संपते, परंतु त्याचक्षणी वाचकाच्या मनात ती सुरु होत. वरकरणी पारंपरिक वाटणारं वृक्ष व सावली हे रुपक वापरुन लेखिकेने असामान्य पुरुष व त्याच्या पाठीशी असणारी स्त्री यांच्यातील नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या शोधयात्रेत स्वाभाविकपणे स्वत:च्या अस्तित्वाविषयी, भोवतालच्या विश्वविषयी चिंतन येतं, असं चिंतन हा माधवी देसाई यांच्या कथांत वारंवार येणारा भाग आहे. ‘कथा सावलीची’ हा त्यांचा स्त्रीविषयक कथांचा संग्रह असल्यानं या चिंतनाला स्त्रियांच्या व्यथा, वेदनांचे संदर्भ आहेत. तरीही हे चिंतन स्त्रियांपुरतं मर्यादित राहत नाही, हे या कथांचं यश आहे. म्हणूनच ‘मोकळं झाड’ या कथेतील प्राचीचं सुरक्षित, संपन्न आयुष्य सोडून कामेरी गावी येणं, शाळा उभारण्याचं स्वप्न पाहणं हे कोणताही संवेदनशील वाचक समजून घेऊ शकतो. या कथेतील आजी व प्राची आणि कामेरी गाव व प्राची यांच्यातील भावबंध वाचकाला स्पर्शून जातात. समान सूत्र भोवतालच्या व्यवहारी जगापासून तुटलेल्या स्त्रिया, त्यातून येणारं एकाकीपण हे जवळपास साऱ्या कथांमधील समान सूत्र आहे. हे एकाकीपण ‘कमळाची कविता’मधील कमळाच्या आयुष्यात जोडीदाराच्या अकाली निधुनामुळं येतं, तर जीवन, व्यवहार आणि काव्य यांसारख्या कथांत संवेदनाहीन जोडीदारापायी येतं. काव्य शिकवणारे, पण व्यवहार जगणारे समेळ सर, व्यवहारी पती आणि स्त्रीपुरुष संबंधांतून काव्य साकार करु पाहणारे सहकारी अशी या कथेतील विभागणी मात्र ढोबळ वाटते. या एकाकी स्त्रियांना निसर्ग साद घालतो, त्यांच्याशी हितगुज करतो. म्हणून माणसांपेक्षाही त्यांना तो जवळचा वाटतो. म्हणूनच ‘लेकुरवाळा’ कथेतील उर्वशी म्हणते, ‘या वृक्षांचं आणि माझं नातं जन्मजन्मांतरीचं, म्हणूनच स्थिर आहे. ना तो बदलला, ना मी! म्हणून या नात्याचे संदर्भही स्थिरच आहेत.’ याच दृष्टीने ‘हरवलेला चंद्र’ ही कथा पाहता येते. यातील लीनाला लहानपणी तूप-साखरेचा घास भरवणारा चंद्र तरुणपणी मात्र हरवतो. पुढे तो अचानक निसर्गाच्या सहवासात भेटतो. या कथांमधील प्रेमभावना वेगवेगळ्या अवस्थात व वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त होते. ‘लेडी डायना’चं एकनिष्ठ प्रेम गोमांतकीय भूमीवर व खास पोर्तुगीज वातावरणात व्यक्त होतं, तर ‘जास्वंदी’ मधील प्रियकर प्रेयसी हे माणुसकी हाच धर्म मानणारे आहेत. अशाच उत्कंट प्रेमापायी ‘जिजींचं’ वर्चस्व झुगारुन उंच झेपावू पाहणारी रेशमा ‘आकाशझेप’ कथेत दिसते. आईच्या नेहमीच्या प्रतिमेशी विसंगत असे यातील जिजींचं व्यक्तिमत्व त्यातील वेगळेपणामुळं लक्षात राहतं. तारुण्यातील अविचारी प्रेमानंतर उत्तरावस्थेत अनुभवायला येणाऱ्या संयत, परिपक्व प्रेमानुभवामुळं ‘आसावरी’ कथा वेधक ठरते, तर उत्तुंग व्यक्तिमत्व रेखाटण्याचा प्रयत्न केलेला असूनही ‘स्वरमयी’ ही कथा सामान्य वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more