* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL THE 13 STORIES HAVE BEEN WRITTEN DURING MY STAY IN THE SERENE VICINITY OF GOMANTAK SINCE LAST FOUR YEARS. EACH WOMAN APPEARED TO SOLVE THE LIFE PUZZLE IN HER OWN UNIQUE WAY. THOUGH THE CHARACTERS ARE FICTITIOUS, THE QUESTIONS THAT THEY HAVE ARE TRUE TO THEIR FULLEST. A FEW OF THESE WOMEN HAVE FACED LIFE SENSIBLY AND IN SANE MANNER. INDEED, THEY WERE CONFRONTED WITH A VICIOUS TURN IN LIFE WHICH THEY CROSSED IN A POISED MANNER. I GUESS THIS WAS POSSIBLE BECAUSE OF THE EQUILIBRIUM WITH WHICH THEY LED THEIR LIVES AND ALSO BECAUSE THEY WERE BASICALLY MATURED IN ALL ASPECTS. ‘LADY DIANA’ AND ‘JASWANDI’ PORTRAY TYPICAL WOMEN FROM GOMANTAK HAVING COMPLETE FAITH UPON LOVE. THE OTHERS LIKE ‘ASAWARI’, ‘POORVA’, ‘RESHMA’, OR THOSE WHOM WE COME ACROSS IN STORIES LIKE ‘MOKAL ZAAD’, ‘LEKURWALA’ OR ‘HARAVALELA CHANDRA’ HAVE THE ABILITY TO ANSWER THE QUESTIONS THAT THEY HAVE COME ACROSS. THEY HAVE INDEED REACHED THEIR FINAL DESTINATION. THE CHARACTER IN ‘KATHA SAWALICHI’ IS THE ONE WHO HAS WILLINGLY ACCEPTED TO BE A SHADOW. TO BE A SHADOW OR TO HAVE A SEPARATE IDENTITY IS AFTER ALL INDIVIDUAL PERSPECTIVE. I HAVE TRIED MY BEST TO PORTRAY THESE CHARACTERS IN SHADES I UNDERSTOOD.
गेली चार वर्षे, गोमंतकातल्या निसर्गरम्य गावी वास्तव्य झाले व याच कालखंडातील या कथांचा जन्म! यामधल्या तेराही कथा स्त्री-जीवनकथा आहेत. कथेमधली प्रत्येक स्त्री ही मला पडलेल्या स्त्री-जीवनाचे कोडे सोडवणारी स्त्री बनली. सर्व पात्रे काल्पनिक आहेत पण त्यांचे जीवन व प्रश्न मात्र वास्तव आहेत. काही स्त्रिया विलक्षण समजूतदारपणाने जीवनाला सामऱ्या जातात. त्यांच्या जीवनाला आलेले वाईट वळण, समंजसपणाने त्यांनी ओलांडलेले असते, याचे कारण त्यांच्या विचाराची मूळ बैठकच प्रौढ, समंजस असावी, असे मला वाटते. ‘लेडी डायना’ आणि ‘जास्वंदी’ या खास गोमंतकीय स्त्रिया, प्रेमावर अतूट विश्वास बाळगणाऱ्या , तर ‘आसावरी’, ‘पूर्वा’, ‘रेशमा’ या कथानायिका अगर ‘मोकळं झाड’ किंवा ‘लेकुरवाळा’, ‘हरवलेला चंद्र’मधल्या कथानायिका यांनी स्वत:समोरची प्रश्नचिन्हे... स्वत:च सोडवून त्या पूर्णविरामाला पोहोचल्या आहेत. ‘कथा सावलीची’ ही एका सावलीची भूमिका स्वीकारणारी स्त्रीकथा! आपण सावलीची भूमिका स्वीकारावी की स्वत:ची स्वतंत्र सावली निर्माण करावी, हा पुन्हा जिचा तिचा स्वतंत्र प्रश्न आहे. माझ्या मगदुराप्रमाणे मी त्यांना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 07-08-1994

    एकाकी स्त्रीच्या कथा... ‘मुळाचा आणि सावलीचा चिरप्रवास सुरु झाला होता एकमेकांना आधार देत! एक स्थितप्रज्ञ प्रवास! प्रकाशाच्या शोधार्थ, एक साधना सुरु झाली होती.’ या शोधापाशी माधवी देसाई यांची पहिली कथा संपते, परंतु त्याचक्षणी वाचकाच्या मनात ती सुरु होत. वरकरणी पारंपरिक वाटणारं वृक्ष व सावली हे रुपक वापरुन लेखिकेने असामान्य पुरुष व त्याच्या पाठीशी असणारी स्त्री यांच्यातील नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या शोधयात्रेत स्वाभाविकपणे स्वत:च्या अस्तित्वाविषयी, भोवतालच्या विश्वविषयी चिंतन येतं, असं चिंतन हा माधवी देसाई यांच्या कथांत वारंवार येणारा भाग आहे. ‘कथा सावलीची’ हा त्यांचा स्त्रीविषयक कथांचा संग्रह असल्यानं या चिंतनाला स्त्रियांच्या व्यथा, वेदनांचे संदर्भ आहेत. तरीही हे चिंतन स्त्रियांपुरतं मर्यादित राहत नाही, हे या कथांचं यश आहे. म्हणूनच ‘मोकळं झाड’ या कथेतील प्राचीचं सुरक्षित, संपन्न आयुष्य सोडून कामेरी गावी येणं, शाळा उभारण्याचं स्वप्न पाहणं हे कोणताही संवेदनशील वाचक समजून घेऊ शकतो. या कथेतील आजी व प्राची आणि कामेरी गाव व प्राची यांच्यातील भावबंध वाचकाला स्पर्शून जातात. समान सूत्र भोवतालच्या व्यवहारी जगापासून तुटलेल्या स्त्रिया, त्यातून येणारं एकाकीपण हे जवळपास साऱ्या कथांमधील समान सूत्र आहे. हे एकाकीपण ‘कमळाची कविता’मधील कमळाच्या आयुष्यात जोडीदाराच्या अकाली निधुनामुळं येतं, तर जीवन, व्यवहार आणि काव्य यांसारख्या कथांत संवेदनाहीन जोडीदारापायी येतं. काव्य शिकवणारे, पण व्यवहार जगणारे समेळ सर, व्यवहारी पती आणि स्त्रीपुरुष संबंधांतून काव्य साकार करु पाहणारे सहकारी अशी या कथेतील विभागणी मात्र ढोबळ वाटते. या एकाकी स्त्रियांना निसर्ग साद घालतो, त्यांच्याशी हितगुज करतो. म्हणून माणसांपेक्षाही त्यांना तो जवळचा वाटतो. म्हणूनच ‘लेकुरवाळा’ कथेतील उर्वशी म्हणते, ‘या वृक्षांचं आणि माझं नातं जन्मजन्मांतरीचं, म्हणूनच स्थिर आहे. ना तो बदलला, ना मी! म्हणून या नात्याचे संदर्भही स्थिरच आहेत.’ याच दृष्टीने ‘हरवलेला चंद्र’ ही कथा पाहता येते. यातील लीनाला लहानपणी तूप-साखरेचा घास भरवणारा चंद्र तरुणपणी मात्र हरवतो. पुढे तो अचानक निसर्गाच्या सहवासात भेटतो. या कथांमधील प्रेमभावना वेगवेगळ्या अवस्थात व वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त होते. ‘लेडी डायना’चं एकनिष्ठ प्रेम गोमांतकीय भूमीवर व खास पोर्तुगीज वातावरणात व्यक्त होतं, तर ‘जास्वंदी’ मधील प्रियकर प्रेयसी हे माणुसकी हाच धर्म मानणारे आहेत. अशाच उत्कंट प्रेमापायी ‘जिजींचं’ वर्चस्व झुगारुन उंच झेपावू पाहणारी रेशमा ‘आकाशझेप’ कथेत दिसते. आईच्या नेहमीच्या प्रतिमेशी विसंगत असे यातील जिजींचं व्यक्तिमत्व त्यातील वेगळेपणामुळं लक्षात राहतं. तारुण्यातील अविचारी प्रेमानंतर उत्तरावस्थेत अनुभवायला येणाऱ्या संयत, परिपक्व प्रेमानुभवामुळं ‘आसावरी’ कथा वेधक ठरते, तर उत्तुंग व्यक्तिमत्व रेखाटण्याचा प्रयत्न केलेला असूनही ‘स्वरमयी’ ही कथा सामान्य वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more