* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: KATHA SAWALICHI
  • Availability : Available
  • ISBN : 9788171613243
  • Edition : 3
  • Publishing Year : FEBRUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : SHORT STORIES
  • Available in Combos :MADHAVI DESAI COMBO 11 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ALL THE 13 STORIES HAVE BEEN WRITTEN DURING MY STAY IN THE SERENE VICINITY OF GOMANTAK SINCE LAST FOUR YEARS. EACH WOMAN APPEARED TO SOLVE THE LIFE PUZZLE IN HER OWN UNIQUE WAY. THOUGH THE CHARACTERS ARE FICTITIOUS, THE QUESTIONS THAT THEY HAVE ARE TRUE TO THEIR FULLEST. A FEW OF THESE WOMEN HAVE FACED LIFE SENSIBLY AND IN SANE MANNER. INDEED, THEY WERE CONFRONTED WITH A VICIOUS TURN IN LIFE WHICH THEY CROSSED IN A POISED MANNER. I GUESS THIS WAS POSSIBLE BECAUSE OF THE EQUILIBRIUM WITH WHICH THEY LED THEIR LIVES AND ALSO BECAUSE THEY WERE BASICALLY MATURED IN ALL ASPECTS. ‘LADY DIANA’ AND ‘JASWANDI’ PORTRAY TYPICAL WOMEN FROM GOMANTAK HAVING COMPLETE FAITH UPON LOVE. THE OTHERS LIKE ‘ASAWARI’, ‘POORVA’, ‘RESHMA’, OR THOSE WHOM WE COME ACROSS IN STORIES LIKE ‘MOKAL ZAAD’, ‘LEKURWALA’ OR ‘HARAVALELA CHANDRA’ HAVE THE ABILITY TO ANSWER THE QUESTIONS THAT THEY HAVE COME ACROSS. THEY HAVE INDEED REACHED THEIR FINAL DESTINATION. THE CHARACTER IN ‘KATHA SAWALICHI’ IS THE ONE WHO HAS WILLINGLY ACCEPTED TO BE A SHADOW. TO BE A SHADOW OR TO HAVE A SEPARATE IDENTITY IS AFTER ALL INDIVIDUAL PERSPECTIVE. I HAVE TRIED MY BEST TO PORTRAY THESE CHARACTERS IN SHADES I UNDERSTOOD.
गेली चार वर्षे, गोमंतकातल्या निसर्गरम्य गावी वास्तव्य झाले व याच कालखंडातील या कथांचा जन्म! यामधल्या तेराही कथा स्त्री-जीवनकथा आहेत. कथेमधली प्रत्येक स्त्री ही मला पडलेल्या स्त्री-जीवनाचे कोडे सोडवणारी स्त्री बनली. सर्व पात्रे काल्पनिक आहेत पण त्यांचे जीवन व प्रश्न मात्र वास्तव आहेत. काही स्त्रिया विलक्षण समजूतदारपणाने जीवनाला सामऱ्या जातात. त्यांच्या जीवनाला आलेले वाईट वळण, समंजसपणाने त्यांनी ओलांडलेले असते, याचे कारण त्यांच्या विचाराची मूळ बैठकच प्रौढ, समंजस असावी, असे मला वाटते. ‘लेडी डायना’ आणि ‘जास्वंदी’ या खास गोमंतकीय स्त्रिया, प्रेमावर अतूट विश्वास बाळगणाNया, तर ‘आसावरी’, ‘पूर्वा’, ‘रेशमा’ या कथानायिका अगर ‘मोकळं झाड’ किंवा ‘लेकुरवाळा’, ‘हरवलेला चंद्र’मधल्या कथानायिका यांनी स्वत:समोरची प्रश्नचिन्हे... स्वत:च सोडवून त्या पूर्णविरामाला पोहोचल्या आहेत. ‘कथा सावलीची’ ही एका सावलीची भूमिका स्वीकारणारी स्त्रीकथा! आपण सावलीची भूमिका स्वीकारावी की स्वत:ची स्वतंत्र सावली निर्माण करावी, हा पुन्हा जिचा तिचा स्वतंत्र प्रश्न आहे. माझ्या मगदुराप्रमाणे मी त्यांना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MADHAVIDESAI #NIYATI #HAEVALELYAVATA #MANJIRI #KANCHANGANGA #PRARTHANA #DHUMARE #SAGAR #SHUKRACHANDANI #ASA MHANUNAKOS #KATHASAVALICHI #
Customer Reviews
  • Rating StarMAHARASHTRA TIMES 07-08-1994

    एकाकी स्त्रीच्या कथा... ‘मुळाचा आणि सावलीचा चिरप्रवास सुरु झाला होता एकमेकांना आधार देत! एक स्थितप्रज्ञ प्रवास! प्रकाशाच्या शोधार्थ, एक साधना सुरु झाली होती.’ या शोधापाशी माधवी देसाई यांची पहिली कथा संपते, परंतु त्याचक्षणी वाचकाच्या मनात ती सुरु होत. वरकरणी पारंपरिक वाटणारं वृक्ष व सावली हे रुपक वापरुन लेखिकेने असामान्य पुरुष व त्याच्या पाठीशी असणारी स्त्री यांच्यातील नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या शोधयात्रेत स्वाभाविकपणे स्वत:च्या अस्तित्वाविषयी, भोवतालच्या विश्वविषयी चिंतन येतं, असं चिंतन हा माधवी देसाई यांच्या कथांत वारंवार येणारा भाग आहे. ‘कथा सावलीची’ हा त्यांचा स्त्रीविषयक कथांचा संग्रह असल्यानं या चिंतनाला स्त्रियांच्या व्यथा, वेदनांचे संदर्भ आहेत. तरीही हे चिंतन स्त्रियांपुरतं मर्यादित राहत नाही, हे या कथांचं यश आहे. म्हणूनच ‘मोकळं झाड’ या कथेतील प्राचीचं सुरक्षित, संपन्न आयुष्य सोडून कामेरी गावी येणं, शाळा उभारण्याचं स्वप्न पाहणं हे कोणताही संवेदनशील वाचक समजून घेऊ शकतो. या कथेतील आजी व प्राची आणि कामेरी गाव व प्राची यांच्यातील भावबंध वाचकाला स्पर्शून जातात. समान सूत्र भोवतालच्या व्यवहारी जगापासून तुटलेल्या स्त्रिया, त्यातून येणारं एकाकीपण हे जवळपास साऱ्या कथांमधील समान सूत्र आहे. हे एकाकीपण ‘कमळाची कविता’मधील कमळाच्या आयुष्यात जोडीदाराच्या अकाली निधुनामुळं येतं, तर जीवन, व्यवहार आणि काव्य यांसारख्या कथांत संवेदनाहीन जोडीदारापायी येतं. काव्य शिकवणारे, पण व्यवहार जगणारे समेळ सर, व्यवहारी पती आणि स्त्रीपुरुष संबंधांतून काव्य साकार करु पाहणारे सहकारी अशी या कथेतील विभागणी मात्र ढोबळ वाटते. या एकाकी स्त्रियांना निसर्ग साद घालतो, त्यांच्याशी हितगुज करतो. म्हणून माणसांपेक्षाही त्यांना तो जवळचा वाटतो. म्हणूनच ‘लेकुरवाळा’ कथेतील उर्वशी म्हणते, ‘या वृक्षांचं आणि माझं नातं जन्मजन्मांतरीचं, म्हणूनच स्थिर आहे. ना तो बदलला, ना मी! म्हणून या नात्याचे संदर्भही स्थिरच आहेत.’ याच दृष्टीने ‘हरवलेला चंद्र’ ही कथा पाहता येते. यातील लीनाला लहानपणी तूप-साखरेचा घास भरवणारा चंद्र तरुणपणी मात्र हरवतो. पुढे तो अचानक निसर्गाच्या सहवासात भेटतो. या कथांमधील प्रेमभावना वेगवेगळ्या अवस्थात व वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त होते. ‘लेडी डायना’चं एकनिष्ठ प्रेम गोमांतकीय भूमीवर व खास पोर्तुगीज वातावरणात व्यक्त होतं, तर ‘जास्वंदी’ मधील प्रियकर प्रेयसी हे माणुसकी हाच धर्म मानणारे आहेत. अशाच उत्कंट प्रेमापायी ‘जिजींचं’ वर्चस्व झुगारुन उंच झेपावू पाहणारी रेशमा ‘आकाशझेप’ कथेत दिसते. आईच्या नेहमीच्या प्रतिमेशी विसंगत असे यातील जिजींचं व्यक्तिमत्व त्यातील वेगळेपणामुळं लक्षात राहतं. तारुण्यातील अविचारी प्रेमानंतर उत्तरावस्थेत अनुभवायला येणाऱ्या संयत, परिपक्व प्रेमानुभवामुळं ‘आसावरी’ कथा वेधक ठरते, तर उत्तुंग व्यक्तिमत्व रेखाटण्याचा प्रयत्न केलेला असूनही ‘स्वरमयी’ ही कथा सामान्य वाटते. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more