* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9788177668575
  • Edition : 2
  • Publishing Year : NOVEMBER 2007
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 120
  • Language : MARATHI
  • Category : FICTION
  • Available in Combos :UMESH KADAM COMBO SET- 8 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
STORY OF RUDOLPH REIKMAN- CLOSE AIDE OF ADOLF HITLER
जर्मनीमध्ये दुसर्‍या महायुद्धादरम्यान लक्षावधी निरपराध ’ज्यू’ वंशाच्या लोकांचा आणि युद्ध कैद्यांचा अनन्वित छळ केला गेला. त्यापैकी बहुतांशी लोकांची हत्या करण्यात आली. ’ज्यू’ वंशाच्या या लोकांना वेगवेगळ्या छळछावण्यांमध्ये ठेवले जात असे. या छळछावण्यांपैकी एक ’ऑशवित्झ.’ मृत्यूचे माहेरघर अशी ओळख असणारे ’ऑशवित्झ’ आज स्मारक व संग्रहालय म्हणून पोलंड येथे जतन केले आहे. हिटलरचा उजवा हात असणारा क्रूरकर्मा ’रुडॉल्फ’ राईकमन हा ’ऑशवित्झ’ या छळछावणीचा प्रमुख हा या छळछावण्यांमध्ये युद्धकैदी जखमी आणि ज्यू यांची वाढणारी संख्या मोठी समस्या होती. अनेक ’अमानुष’ मार्गांचा अवलंब करूनही हे मार्ग तितकेसे पुरे पडत नव्हते. त्यावेळी ’राईकमन’ने या युद्धकैद्यांना आणि ज्यू लोकांना मोठ्या संख्येने आणि कमी वेळात मारण्यासाठी गॅसचेंबर्स तयार करवले. छळछावण्यात आलेल्या युद्धातून बचावलेल्या ज्यू लोकांना आणि युद्धकैद्यांना सुखी संपन्न जीवनाचे स्वप्न दाखवणारे भाषण राईकमन करीत असे. त्यांच्या आशा पल्लवित केल्यानंतर त्यांची रवानगी गॅसचेंबर्समध्ये केली जात असे. दारे, खिडक्या बंद करून झडपांमधून ’झिकलॉन-बी’ हा अत्यंत विषारी वायू सोडला जात असे. एकावेळी सुमारे पाचशे लोक या गॅसचेंबरमध्ये मावत असत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना ठार करण्याची ही कल्पना राईकमनचीच होती. त्याच्या या योजनेमुळेच तो हिटलरचा ’खास माणूस’ होता. युद्धसमाप्तीनंतर जर्मनीच्या पराभवानंतर राईकमन पळून गेला. आपली ओळख बदलून तो ब्राझिल येथे राहू लागला. इस्त्रायलच्या ’मोसाद’ या गुप्तहेर संघटनेने सापळा रचून त्याची पाळेमुळे खणून काढली. त्याला अत्यंत गुप्ततेने इस्त्रायलला आणले आणि फाशीची शिक्षा दिली.’रुडॉल्फ राईकमन’ या युद्ध गुन्हेगाराला त्याच्या शेवटापर्यंत पोहचवणारी ही उत्कंठावर्धक थरारक कथा वाचकांना शेवटच्या पानापर्यंत खिळवून ठेवेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #SANHARSANHAR #संहार #FICTION #MARATHI #UMESHKADAM #उमेशकदम "
Customer Reviews
  • Rating Starराजेंद्र घोडके, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

    नमस्कार आदरणीय श्री उमेश कदम साहेब, मी आपल्या साहित्याचा चाहता आहे. आपली मेहता प्रकाशनाने प्रकाशित केलेली सहा पुस्तके (संहार, केवळ मैत्रीसाठी, उध्वस्त, एक होता मित्र, स्थलांतर, झांझिबारी मसाला) गेल्या महिन्याभरात मी वाचून पूर्ण ेली. आपल्या साहित्याच्या वाचनातून खूप आनंद तर मिळालाच पण ज्ञानात ही खूप भर पडली. आपली लेखन शैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. आपल्या लेखनाच्या वाचनातून वाचकाला जगाच्या एका मोठ्या भागाची सफर घडते. आपली उर्वरित पुस्तकेही मिळवून मी लवकरच ती वाचणार आहे. ...Read more

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    क्रूरकर्मा… दुसरे महायुद्ध मित्रराष्ट्रांनी जिंकल्यानंतर हिटलरच्या आणि त्याच्या सहकारी क्रूरकर्म्यांच्या अमानुष कहाण्या प्रसिद्ध होऊ लागल्या, हिटलरसारख्या हुकूमत गाजविण्याच्या महत्त्वाकांक्षेनं झपाटलेला अन् वंशवादाच्या आंधळेपणात पृथ्वीवरून ज्यूंचं सूळ उच्छेदन करण्याच्या ईर्षेने वेडावलेला असा अनेक पुराव्यानिशी जगापुढे आला. मराठीतही ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’, ‘गुडबाय हिटलर’, ‘वॉर्सा ते हिरोशिमा’ सारखी पुस्तकं आली. तशी ज्यूंच्या आत्मकहाण्यांतूनही त्या अमानुष, काळ्या दिवसांचं चित्रण आलं. उदा. ‘डायरी ऑफ अ‍ॅना फ्रॅंक’, ‘ऑपरेशन डे ब्रेक’, ‘शिंडलर्स लिस्ट’ सारखे चित्रपटही त्यातील क्रौर्य अधोरेखित करतात. हिटलरच्या इच्छेनुसार काम करणाऱ्या सहकाऱ्यांमध्ये रूडॉल्फ राईकमन या जर्मन सैन्यातील कर्नलन ‘ऑशविल्झ’ या छळछावणीमध्ये किती अमानुषप्रकारे ज्यूचं हत्याकांड केलं आणि हिटलरची मर्जी संपादली त्याचं वर्णन रक्त गोठविणार आहे. ज्यूंनी ‘इस्त्रायल’ची स्थापना केल्यावर त्यांच्या ‘मोसाद’ या गुप्तहेर संघटनेतील एका हुशार अन् कर्तबगार अधिकाऱ्यानं राईकमनचा किती कल्पकतेनं शोध घेतला आणि त्याला त्याच्या अतिअमानुश कर्माची शिक्षा दिली. याचा अत्यंत मनोवेधक आलेख उमेश कदम यांनी त्यांच्या ‘संहार’ या पुस्तकात काढला आहे. ज्यूचं हत्याकांड गॅसचेंबर्समध्ये करण्यामागे याच राईकमनचा मेंदू होता. त्याचं ज्ञान त्यानं विधायक कार्याऐवजी विध्वंसक आणि माणुसकीला काळिमा आणणाऱ्या कामासाठी वापरलं. जर्मनी युद्धात वरचढ होती तोपर्यंत राईकमनची कृष्णकृत्यं बिनबोभाट सुरू होती. पण जर्मनीचा पाडाव होऊ लागताच आणि मित्रराष्ट्राच्या सैन्याने ‘ऑशवित्झ’ला वेढा घालताच राईकमन शिताफीने पसार झाला. अन् लपत-छपत तो दुसऱ्या राष्ट्रात, आपली ओळख न देता दुसऱ्या नावानं एकाकी जीवन जगू लागला. पण ‘उपरवाले के पास देर है, अंधेर नही’ या उक्तीनुसार राईकमन केलेल्या अत्याचार गुन्ह्यांची शिक्षा त्याला याच जन्मात मिळाली राईकमनची शोधमोहीम आणि त्याला झालेलं शासन इथपर्यंतचा भाग ‘संहार’मध्ये येतो. उमेश कदम याचं हे पहिलच पुस्तक, पण हा सारा कथाभाग अत्यंत ओघवता, उत्कंठापूर्ण झाला आहे. चित्रपटाची पटकथा लिहावी, तसं ‘संहार’च लेखन, मांडणी झाली आहे. हे लिखाण मूळ इंग्रजीतून करून त्याचा अनुवाद मराठीत केल्यासारखे संवाद या कादंबरीत अधून-मधून डोकावतात तरीही प्रसंग उभारण्याचे त्यांचं कसब अथवा व्यक्तिमत्व फुलविण्यातील त्यांची शैली लक्षणीय यातील सारी पात्रं वाचकासमोर नेमकेपणा स्पष्ट होतात. उमेश कदम यांच्या लेखनाचेच यश आहे. ‘संहार’ हे दुसऱ्या महायुद्धातील एका क्रूरकर्म्यांचं अंगावर शहारे आणणारा कथानक माणुसकीला काळिमा फासणारा मानवजातीवर, माणुसकीवर प्रेम-श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक संवेदनशील वाचकानं ‘संहार’ असणाऱ्या प्रत्येक संवेदनशील वाचकांना ‘संहार’ अवश्य वाचायला हवं. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं मुखपृष्ठ कल्पक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more