PRAMOD KAPOOR

About Author


PRAMOD KAPOOR, THE FOUNDER AND PUBLISHER OF ROLI BOOKS (ESTABLISHED IN 1978), HAS OVER THE COURSE OF HIS ILLUSTRIOUS CAREER, CONCEIVED AND PRODUCED AWARD-WINNING BOOKS THAT HAVE PROVEN TO BE GAME-CHANGERS IN THE WORLD OF PUBLISHING. BE IT THE HIT ‘THEN AND NOW’ SERIES AND THE SEMINAL MADE FOR MAHARAJAS, OR EVEN THE INTERNATIONALLY ACCLAIMED GANDHI: AN ILLUSTRATED BIOGRAPHY, WHICH IS PUBLISHED IN ELEVEN EDITIONS IN MOST MAJOR LANGUAGES WORLDWIDE. IN 2016, HE WAS CONFERRED WITH THE PRESTIGIOUS CHEVALIER DE LA LEGION D’HONNEUR (KNIGHT OF THE LEGION OF HONOUR), THE HIGHEST CIVIL AND MILITARY AWARD IN FRANCE, FOR HIS CONTRIBUTION TOWARDS PRODUCING BOOKS THAT HAVE CHANGED THE LANDSCAPE OF INDIAN PUBLISHING. HE IS ALSO A RECIPIENT OF THE PRESTIGIOUS MAHATMA AWARD 2021 (AN ADITYA BIRLA GROUP INITIATIVE) FOR LIFETIME ACHIEVEMENT FOR HIS CONTRIBUTION TO PUBLISHING AND LITERATURE IN INDIA. THIS BOOK IS A RESULT OF HIS YEARS OF RESEARCH AND DEEP INTEREST IN THE PERIOD AND PERSONALITIES WHO HAVE LEFT A MARK IN THE SUBCONTINENT’S HISTORY.

१९७८मध्ये स्थापित रोली बुक्सचे संस्थापक आणि प्रकाशक, प्रमोद कपूर, यांनी त्यांच्या चमकदार कारकिर्दीत, अशा पुरस्कारप्राप्त पुस्तकांची कल्पना आणि निर्मिती केली, जी प्रकाशनाच्या जगात आमूलाग्र बदल घडवून आणणारी ठरली. मग ती लोकप्रिय देन अ‍ॅन्ड नाऊ ही मालिका आणि परिणामकारक मेड फॉर महाराजाज असो, की आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणली गेलेली आणि जगभरातील अत्यंत महत्त्वाच्या भाषांमध्ये जिच्या अकरा आवृत्त्या प्रकाशित झाल्या ती गांधी : अ‍ॅन इलस्ट्रेटेड बायोग्राफी असो. भारतीय प्रकाशन क्षेत्राचा नकाशा बदलून ठेवण्याची क्षमता असलेल्या पुस्तकांच्या निर्मितीत त्यांच्या भरीव योगदानासाठी, २०१६ या वर्षी, फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान शेवेलिअर डी ला लेजन डीऑनर (नाइट ऑफ द लेजन ऑफ ऑनर) त्यांना बहाल करण्यात आला. महात्मा अवॉर्ड २०२१ (आदित्य बिर्ला ग्रुपचा एक उपक्रम) फॉर लाइफटाइम या पुरस्काराचेदेखील ते मानकरी आहेत, जो त्यांना त्यांच्या भारतातील प्रकाशन आणि साहित्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more