* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: THE AUTOBIOGRAPHY OF BENJAMIN FRANKLIN
  • Availability : Available
  • Translators : SAI SANE
  • ISBN : 9789353172503
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BENJAMIN FRANKLIN WAS AN EXCEPTIONAL MAN WHO EXCELLED IN ALL FIELDS HE EVER SET FOOT IN: POLITICS, SCIENCE, AND PHILOSOPHY. A WRITER, REFORMER, EDITOR, SCIENTIST, AND A WITTY, SARCASTIC AMERICAN CITIZEN, BENJAMIN FRANKLIN IS CONSIDERED ONE OF THE GREATEST AMERICANS OF ALL TIMES. FRANKLIN HAS A LOT OF THINGS TO SAY IN HIS AUTOBIOGRAPHY. THE AUTOBIOGRAPHY OF BENJAMIN FRANKLIN WAS INITIALLY WRITTEN TO GUIDE HIS SON, BUT DUE TO HIS UNIQUE AND ANIMATED STYLE OF WRITING, IT IS NOW AMONG THE MOST WIDELY READ CLASSIC IN WORLD LITERATURE. HIS WORDS ETCHED IN THESE PAGES ARE AN INSPIRATION TO HUMANS EVERYWHERE, MAKING THE AUTOBIOGRAPHY HIS BEST WORK.
‘बेंजामिन फ्रॅंकलिन’ हे बेंजामिन फ्रॅंकलिन यांचं आत्मचरित्र. सुरुवातीला त्यांनी वृत्तपत्रलेखन केले. फिलाडेल्फियाला गेल्यावर सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी केली. गव्हर्नरकडून त्यांना स्वत:चा छापखाना काढण्याचा सल्ला मिळाला आणि नंतर गव्हर्नरसाहेबांनी केलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आली. मग लंडनमध्ये एका मुद्रकाकडे नोकरी केली. मित्राबरोबर व्यापार केला. परत किमरकडे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांत विविध कामे केली. हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून त्यांना मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातील युद्धात सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्लेबांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#बेंजामिनफ्रॅंकलीन #लेविनलिअर #सईसाने #बोस्टन #फिलाडेल्फिया #अमेरिकनवसाहती #ज्युन्टो #पुअररिचर्डसअ‍ॅलमनॅक #विद्युतशक्ती #फ्रॅंकलीन #स्टोव्ह/शेगडी #डेबोरारीड #सॅम्युएलकिमर #फ्रेंचआणिइंडियनयुद्ध #पोस्टमास्तरजनरल #फिलाडेल्फिया #गॅझेट #आर्टऑफव्हर्च्यु #सद्गुण #असेंब्ली#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक#BENJAMINFRANKLIN #BENFRANKLIN #KEIMER #LEWISLEARY #PRESIDENT#DENNYSTANDREW #BRADFORDMRWHITEFIELD #PCOLLINSON #CAPTAINKENNEDY DRFOTHERGILL #PENN-PETERCOLLINSON #AUTOBIOGRAPHY #ASSEMBLY #POSTMASTERGENERAL #MILITIALAW #PHILADELPHIA-BOSTAN-QUAKER-JUNTO # NATURALPHILOSOPHY-PRESBYTERIAN-LANCASTER #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarRadhika

    very nice

  • Rating StarDAINIK LOKSATTA 01-12-2019

    फ्रँकलिन समजून घेण्यासाठी... मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सारवजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्र्याशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाट्यमय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळे बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्याचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन - एक आत्मचरित्र’ ...Read more

  • Rating Starदैनिक सामना १७-११-१९

    प्रेरणादायी चरित्र... काही माणसं अशी असतात की, जीवनाची निश्चित अशी रूपरेषा त्यांनी आखलेली नसते. जीवन जसं समोर येईल त्या पद्धतीने ती वागत जातात; पण जीवनाशी अशी टक्कर देताना ती बहुआयामी होतात. बेंजामिन फ्रँकलिन हे अशा लोकांपैकीच एक. ‘बेंजामिन फ्रँकलन’ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या बहुआयामित्वाचं दर्शन घडवतं. लेविस लिअरी यांनी हे आत्मचरित्र वाचकांसमोर आणलं आहे. मराठीत अनुवाद सई साने यांनी केला आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म १७०६ मध्ये बोस्टन येथे झाला. त्यांचे वडील साबण, मेणबत्त्या इत्यादी तयार करत असत. बेंजामिन हे जोशुआ फ्रँकलिन यांच्या १७ अपत्यांपैकी १५ वे अपत्य होते. अगदी लहान वयातच त्यांना त्यांच्या भावाच्या- जेम्स यांच्या- मुद्रणालयात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावे लागले; परंतु भावाशी न पटल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि ते फिलाडेल्फियाला निघून गेले. भावाच्या वृत्तपत्रात त्यांनी थोडे लेखन केले. ती त्यांची वृत्तपत्रलेखनाची सुरुवात होय. फिलाडेल्फियाला गेल्यावर त्यांनी सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी धरली. तिथे त्यांच्या अनेक ओळखी झाल्या. तरुण फ्रँकलिनच्या वृत्तीची धडाडी आणि चमक गव्हर्नरच्या नजरेत भरली आणि त्यांनी लहान वयातच फ्रँकलिनला स्वत:चा छापखाना काढण्याची कल्पना सुचवली. त्यासाठी लागेल ती मदत आपण करू असेही सुचवले. फ्रँकलिनच्या वडिलांचा त्यांच्या लहान वयामुळे या गोष्टीला विरोध होता. तरीही फ्रँकलिन इंग्लंडला गेले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गव्हर्नर साहेबांनी त्यांना फसवले. तिथे त्यांनी एका मुद्रकाकडे नोकरी केली. १७२६ मध्ये डनहॅम नावाच्या आपल्या ज्येष्ठ मित्राबरोबर त्यांचा व्यापार सांभाळावा या कल्पनेने ते परत आले; परंतु लवकरच डनहॅमचे निधन झाल्यावर त्यांनी परत किमरकडे नोकरी धरली. दोन वर्षांनी किमरचे पॅनसिल्व्हानिया गॅझेट ताब्यात घेऊन त्यांनी ते वृत्तपत्र यशस्वीरीत्या चालवले. त्यांची जुनी प्रेयसी डेबोरा रीड हिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. पहिला मुलगा विल्यम यालाच उद्देशून या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहिला आहे. १७३० च्या दशकात फ्रँकलिन यांनी अनेक छोटी-मोठी पदं भूषवली. सरकारचे छपाईचे काम त्यांच्याकडे होते. त्याच वेळी त्यांनी आपल्या ‘पुअर रिचर्ड्स अ‍ॅलमनॅक’ लिहायला सुरुवात केली. ते फिलाडेल्फियाचे पोस्टमास्तर बनले. या दशकाच्या शेवटी त्यांनी फ्रँकलिन स्टोव्हची निर्मिती केली. १७४० च्या दशकात त्यांनी अनेक कामं हातात घेतली, ज्यात अग्निशमन दल, पोलीस खातं, पॅनसिल्व्हानिया विश्वविद्यालय, रस्तेसफाई अभियान आणि इतर छोट्या सार्वजनिक कामांचा समावेश आहे. १७४८ मध्ये ते मुद्रणाच्या व्यवसायातून निवृत्त झाले आणि त्यांनी विद्युतशक्तीच्या वैज्ञानिक प्रयोगांवर आपले लक्ष केंद्रित केले. १७५३ मध्ये त्यांना हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. पुढल्या वर्षी जेव्हा इंग्लंड आणि फ्रांस यांच्यातील युद्ध सुरू झाले. (फ्रेंच आणि इंडियन युद्ध), तेव्हा वसाहतींच्या संरक्षणाकरता लागणारा निधी कसा गोळा करता येईल, त्याची योजना फ्रँकलिन यांनी आखायला सुरुवात केली. प्रत्यक्ष युद्धातही त्यांचा सहभाग मोठा आहे. सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्ले बांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या काळातील ते एक उत्तम राजनैतिक मुत्सद्दी होते. हे आत्मचरित्र १७५७ च्या घटनांपाशी येऊन अचानकच थांबतं. ते अपूर्णच राहिलं. हे आत्मचरित्र तीन वेगवेगळ्या काळात फ्रँकलिननी लिहिलं– १७७१ मध्ये इंग्लंड येथे, १७८३ मध्ये फ्रांस मध्ये आणि १७८८ मध्ये अमेरिकेत. ते पूर्ण करण्यापूर्वीच फ्रँकलिन यांचा १७९० मध्ये मृत्यू झाला. एक माणूस किती प्रकारची कामं करू शकतो, त्याचा प्रत्यय हे आत्मचरित्र वाचल्यावर येतो. अर्थातच हे आत्मचरित्र प्रेरणादायक आहे. - अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-10-2019

    मार्गदर्शक आत्मचरित्र... बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेच्या इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व! अठराव्या शतकात जगभरात होऊन गेलेल्या महनीय व्यक्तिंपैकी फ्रँकलिन हे एक महत्त्वाचं नाव. उत्तम अ‍ॅथलिट, चांगला लेखक, हजरजबाबी वक्ता आणि याशिवाय मुद्रक, शास्त्रजञ अशी त्यांची अनेक रूपं होती. एवढंच नाही, तर सार्वजनिक ग्रंथालय, अग्निशमन दल, पोलीस दल अशा महत्त्वाच्या बाबींची सुरुवातही त्यांनी केली. अशा या उत्तुंग माणसाने स्वत:चं आत्मचरित्र लिहिलं आहे आणि तेही स्वत:च्या मुलाला मार्गदर्शक ठरावं म्हणून. त्याचा मराठी अनुवाद ‘बेंजामिन फ्रँकलिन’ नुकताच प्रकाशित झाला आहे. – रसिक भोळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more