* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BENJAMIN FRANKLIN
  • Availability : Available
  • Translators : SAI SANE
  • ISBN : 9789353172503
  • Edition : 1
  • Publishing Year : AUGUST 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 168
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : AUTOBIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
BENJAMIN FRANKLIN WAS AN EXCEPTIONAL MAN WHO EXCELLED IN ALL FIELDS HE EVER SET FOOT IN: POLITICS, SCIENCE, AND PHILOSOPHY. A WRITER, REFORMER, EDITOR, SCIENTIST, AND A WITTY, SARCASTIC AMERICAN CITIZEN, BENJAMIN FRANKLIN IS CONSIDERED ONE OF THE GREATEST AMERICANS OF ALL TIMES. FRANKLIN HAS A LOT OF THINGS TO SAY IN HIS AUTOBIOGRAPHY. THE AUTOBIOGRAPHY OF BENJAMIN FRANKLIN WAS INITIALLY WRITTEN TO GUIDE HIS SON, BUT DUE TO HIS UNIQUE AND ANIMATED STYLE OF WRITING, IT IS NOW AMONG THE MOST WIDELY READ CLASSIC IN WORLD LITERATURE. HIS WORDS ETCHED IN THESE PAGES ARE AN INSPIRATION TO HUMANS EVERYWHERE, MAKING THE AUTOBIOGRAPHY HIS BEST WORK.
‘बेंजामिन फ्रॅंकलिन’ हे बेंजामिन फ्रॅंकलिन यांचं आत्मचरित्र. सुरुवातीला त्यांनी वृत्तपत्रलेखन केले. फिलाडेल्फियाला गेल्यावर सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी केली. गव्हर्नरकडून त्यांना स्वत:चा छापखाना काढण्याचा सल्ला मिळाला आणि नंतर गव्हर्नरसाहेबांनी केलेली फसवणूक त्यांच्या लक्षात आली. मग लंडनमध्ये एका मुद्रकाकडे नोकरी केली. मित्राबरोबर व्यापार केला. परत किमरकडे नोकरी केली. त्यानंतर त्यांनी विविध क्षेत्रांत विविध कामे केली. हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून त्यांना मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. इंग्लंड आणि फ्रान्स यांच्यातील युद्धात सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्लेबांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#बेंजामिनफ्रॅंकलीन #लेविनलिअर #सईसाने #बोस्टन #फिलाडेल्फिया #अमेरिकनवसाहती #ज्युन्टो #पुअररिचर्डसअ‍ॅलमनॅक #विद्युतशक्ती #फ्रॅंकलीन #स्टोव्ह/शेगडी #डेबोरारीड #सॅम्युएलकिमर #फ्रेंचआणिइंडियनयुद्ध #पोस्टमास्तरजनरल #फिलाडेल्फिया #गॅझेट #आर्टऑफव्हर्च्यु #सद्गुण #असेंब्ली#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक#BENJAMINFRANKLIN #BENFRANKLIN #KEIMER #LEWISLEARY #PRESIDENT#DENNYSTANDREW #BRADFORDMRWHITEFIELD #PCOLLINSON #CAPTAINKENNEDY DRFOTHERGILL #PENN-PETERCOLLINSON #AUTOBIOGRAPHY #ASSEMBLY #POSTMASTERGENERAL #MILITIALAW #PHILADELPHIA-BOSTAN-QUAKER-JUNTO # NATURALPHILOSOPHY-PRESBYTERIAN-LANCASTER #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC #TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarDAINIK LOKSATTA 01-12-2019

    फ्रँकलिन समजून घेण्यासाठी... मानवी आयुष्य सुखावह करण्यासाठी आवश्यक असणारे शक्य तितके सारे काही एकाच आयुष्यात साध्य करणारे बेंजामिन फ्रँकलिन हे एक जगप्रसिद्ध असं प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व. अमेरिकेत सार्वजनिक क्षेत्रातील अग्निशमन दल, पोलीस यंत्रणा, सारवजनिक ग्रंथालये अशा यंत्रणांपासून अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. खरं तर बेंजामिन यांचा जन्म एका गरीब कुटुंबातला. दारिद्र्याशी झगडत, पडेल ती कामं करत ते जीवन कंठत होते. मात्र या परिस्थितीपासून जगातील एक प्रभावशाली व्यक्ती बनेपर्यंतचा त्यांचा प्रवास खडतर होता. अनेक नाट्यमय वळणं त्यात आली. मात्र त्यामुळे बेंजामिन यांची जीवनदृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. वयाच्या बाराव्या वर्षापासून मुद्रक असलेल्या भावाच्या व्यवसायात मदत करताना त्यांनी जो अनुभव कमावला, त्यामुळेच पुढे ते मुद्रण व्यवसायातही यशाची भरारी मारू शकले. ‘नाही रे’पासून ‘आहे रे’पर्यंतचा त्याचा हा प्रवास समजून घेण्यासाठी ‘बेंजामिन फ्रँकलिन’ हे आत्मचरित्र उपयुक्त आहे. सई साने यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ‘बेंजामिन फ्रँकलिन - एक आत्मचरित्र’ ...Read more

  • Rating Starदैनिक सामना १७-११-१९

    प्रेरणादायी चरित्र... काही माणसं अशी असतात की, जीवनाची निश्चित अशी रूपरेषा त्यांनी आखलेली नसते. जीवन जसं समोर येईल त्या पद्धतीने ती वागत जातात; पण जीवनाशी अशी टक्कर देताना ती बहुआयामी होतात. बेंजामिन फ्रँकलिन हे अशा लोकांपैकीच एक. ‘बेंजामिन फ्रँकलन’ हे त्यांचं आत्मचरित्र त्यांच्या बहुआयामित्वाचं दर्शन घडवतं. लेविस लिअरी यांनी हे आत्मचरित्र वाचकांसमोर आणलं आहे. मराठीत अनुवाद सई साने यांनी केला आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म १७०६ मध्ये बोस्टन येथे झाला. त्यांचे वडील साबण, मेणबत्त्या इत्यादी तयार करत असत. बेंजामिन हे जोशुआ फ्रँकलिन यांच्या १७ अपत्यांपैकी १५ वे अपत्य होते. अगदी लहान वयातच त्यांना त्यांच्या भावाच्या- जेम्स यांच्या- मुद्रणालयात शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावे लागले; परंतु भावाशी न पटल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडून दिली आणि ते फिलाडेल्फियाला निघून गेले. भावाच्या वृत्तपत्रात त्यांनी थोडे लेखन केले. ती त्यांची वृत्तपत्रलेखनाची सुरुवात होय. फिलाडेल्फियाला गेल्यावर त्यांनी सॅम्युएल किमर नावाच्या माणसाकडे नोकरी धरली. तिथे त्यांच्या अनेक ओळखी झाल्या. तरुण फ्रँकलिनच्या वृत्तीची धडाडी आणि चमक गव्हर्नरच्या नजरेत भरली आणि त्यांनी लहान वयातच फ्रँकलिनला स्वत:चा छापखाना काढण्याची कल्पना सुचवली. त्यासाठी लागेल ती मदत आपण करू असेही सुचवले. फ्रँकलिनच्या वडिलांचा त्यांच्या लहान वयामुळे या गोष्टीला विरोध होता. तरीही फ्रँकलिन इंग्लंडला गेले आणि तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गव्हर्नर साहेबांनी त्यांना फसवले. तिथे त्यांनी एका मुद्रकाकडे नोकरी केली. १७२६ मध्ये डनहॅम नावाच्या आपल्या ज्येष्ठ मित्राबरोबर त्यांचा व्यापार सांभाळावा या कल्पनेने ते परत आले; परंतु लवकरच डनहॅमचे निधन झाल्यावर त्यांनी परत किमरकडे नोकरी धरली. दोन वर्षांनी किमरचे पॅनसिल्व्हानिया गॅझेट ताब्यात घेऊन त्यांनी ते वृत्तपत्र यशस्वीरीत्या चालवले. त्यांची जुनी प्रेयसी डेबोरा रीड हिच्याशी त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. पहिला मुलगा विल्यम यालाच उद्देशून या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहिला आहे. १७३० च्या दशकात फ्रँकलिन यांनी अनेक छोटी-मोठी पदं भूषवली. सरकारचे छपाईचे काम त्यांच्याकडे होते. त्याच वेळी त्यांनी आपल्या ‘पुअर रिचर्ड्स अ‍ॅलमनॅक’ लिहायला सुरुवात केली. ते फिलाडेल्फियाचे पोस्टमास्तर बनले. या दशकाच्या शेवटी त्यांनी फ्रँकलिन स्टोव्हची निर्मिती केली. १७४० च्या दशकात त्यांनी अनेक कामं हातात घेतली, ज्यात अग्निशमन दल, पोलीस खातं, पॅनसिल्व्हानिया विश्वविद्यालय, रस्तेसफाई अभियान आणि इतर छोट्या सार्वजनिक कामांचा समावेश आहे. १७४८ मध्ये ते मुद्रणाच्या व्यवसायातून निवृत्त झाले आणि त्यांनी विद्युतशक्तीच्या वैज्ञानिक प्रयोगांवर आपले लक्ष केंद्रित केले. १७५३ मध्ये त्यांना हार्वर्ड आणि येल विद्यापीठांकडून मानद पदव्या मिळाल्या. ते अमेरिकेचे पोस्टमास्तर जनरल बनले. पुढल्या वर्षी जेव्हा इंग्लंड आणि फ्रांस यांच्यातील युद्ध सुरू झाले. (फ्रेंच आणि इंडियन युद्ध), तेव्हा वसाहतींच्या संरक्षणाकरता लागणारा निधी कसा गोळा करता येईल, त्याची योजना फ्रँकलिन यांनी आखायला सुरुवात केली. प्रत्यक्ष युद्धातही त्यांचा सहभाग मोठा आहे. सैन्य जमवणे, प्रशिक्षित करणे, तोफखाना, किल्ले बांधणी इत्यादी अनेक गोष्टींत त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या काळातील ते एक उत्तम राजनैतिक मुत्सद्दी होते. हे आत्मचरित्र १७५७ च्या घटनांपाशी येऊन अचानकच थांबतं. ते अपूर्णच राहिलं. हे आत्मचरित्र तीन वेगवेगळ्या काळात फ्रँकलिननी लिहिलं– १७७१ मध्ये इंग्लंड येथे, १७८३ मध्ये फ्रांस मध्ये आणि १७८८ मध्ये अमेरिकेत. ते पूर्ण करण्यापूर्वीच फ्रँकलिन यांचा १७९० मध्ये मृत्यू झाला. एक माणूस किती प्रकारची कामं करू शकतो, त्याचा प्रत्यय हे आत्मचरित्र वाचल्यावर येतो. अर्थातच हे आत्मचरित्र प्रेरणादायक आहे. - अंजली पटवर्धन ...Read more

  • Rating StarMAHARASHTRA TIMES 06-10-2019

    मार्गदर्शक आत्मचरित्र... बेंजामिन फ्रँकलिन हे अमेरिकेच्या इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व! अठराव्या शतकात जगभरात होऊन गेलेल्या महनीय व्यक्तिंपैकी फ्रँकलिन हे एक महत्त्वाचं नाव. उत्तम अ‍ॅथलिट, चांगला लेखक, हजरजबाबी वक्ता आणि याशिवाय मुद्रक, शास्त्रजञ अशी त्यांची अनेक रूपं होती. एवढंच नाही, तर सार्वजनिक ग्रंथालय, अग्निशमन दल, पोलीस दल अशा महत्त्वाच्या बाबींची सुरुवातही त्यांनी केली. अशा या उत्तुंग माणसाने स्वत:चं आत्मचरित्र लिहिलं आहे आणि तेही स्वत:च्या मुलाला मार्गदर्शक ठरावं म्हणून. त्याचा मराठी अनुवाद ‘बेंजामिन फ्रँकलिन’ नुकताच प्रकाशित झाला आहे. – रसिक भोळे ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RESHIMREGHA
RESHIMREGHA by SHANTA J SHELAKE Rating Star
मीना कश्यप शाह

शांता शेळके या कवयित्री म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीच्या आहेतच. गीतकार म्हणूनही त्यांचे मोठे नाव झाले. रेशीमरेघा हे त्यांनी रचलेल्या गीतांचे पुस्तक. मुख्यतः त्यांनी चित्रपट आणि नाटक यासाठी गीते लिहिली आहेत. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात, गीते लििणे त्यांना अतिशय आकर्षक वाटत गेले आणि म्हणून केवळ चित्रपट आणि नाटकांसाठीच नाही, तर स्वानंदासाठीही, त्या गीतं लिहित राहिल्या. चालीवर गीते लिहिणे त्यांना आव्हानात्मक वाटायचे, बंधनकारक नाही. पुढे बंगाली, गुजराती अशा काही गीतांच्या चाली आवडल्या, तर त्या, त्या चालींवरही छंद म्हणून गीते लिहू लागल्या. त्यांच्या गीतांमध्ये लावण्या, गवळणी, नृत्यगीते आणि युगुलगीते (त्यांनी द्वंद्वगीते हा शब्द वापरला आहे, जो मला आवडत नाही) जास्त आहेत. ह्या पुस्तकात त्यांचे संकलन आढळून येतं. पुस्तकातील काही गीतांपेक्षा मला त्यांची प्रस्तावनाच जास्त आवडली. आपल्या गीतांबद्दल त्यांनी हळुवार होत लिहिलं आहे. प्रत्येक गाणं ध्वनिमुद्रीत होतानाचे क्षण त्यांना आठवतात. आणि ही गीतं प्रसिद्ध होण्यासाठी संगीतकार, गायक यांचा हातभार नक्कीच आहे याची त्या आठवण काढतात. गीतांचा अर्थ रसिकांपर्यंत पूर्णपणे पोहोचवण्यासाठी गायक-गायिकांचा खूपच मोठा वाटा आहे, त्यांच्याबद्दल त्या अपार कृतज्ञता व्यक्त करतात. हे पुस्तक त्यांनी लावणेसम्राज्ञी यमुनाबाईंना अर्पित केलेले आहे. त्यान्नी लिहिलेल्या "रेशमाच्या रेघांनी" या सर्वात जास्त प्रसिद्ध पावलेल्या लावणीच्या नावावर ह्या पुस्तकाचे नाव आधारित आहे. अनेक प्रसिद्ध गाणी या गीत संग्रहात आढळतात. रेशमाच्या रेघांनी, काय बाई सांगू, मनाच्या धुंदीत लहरीत, हे श्यामसुंदर, राजसा, शालू हिरवा पाच नि मरवा, चाल तुरू तुरू, मनाच्या धुंदीत लहरीत येना आणि अशी अनेक. शांताबाईंचं काव्य सामर्थ्य ह्या लावण्या/गीतांमध्ये देखील दिसून येतं... कळ्या आजच्या, शिळ्या उद्याला, ओठांशी न्याल का, आल्यावर जवळ मला घ्याल का.... अशी अनेक उदाहरणं! पुस्तकातील बहुतेक गाणी ही लावण्यांच्या स्वरूपातली आहेत. त्यामुळे त्याच त्याच भावना सारख्या सारख्या आढळून येतात. बोलावणे किंवा नको जाऊ म्हणणे, भेटी (गिफ्ट्स) घेणे, वाट पाहणे, विरह, सौंदर्याचे वर्णन, शृंगाराचे वर्णन, म्हणजे तुम्हाला काय मिळू शकेल याची कल्पना गीतातून देणे (उदा. कंबरपट्टा रेखून दावी, देहाचा आकार!!) अशा प्रकारचे विषय पुन्हा पुन्हा येत राहतात, पण (शांताबाई बीइंग शांताबाई) कुठेच तोचतोचपणा कंटाळवाणा होत नाही (वाचकाने जरा रोमँटिकपणा दाखवून वाचली ही गीतं तर फारच बहार!) शांताबाई नथ फारच आवडते असं दिसतं... नथ सर्जाची नाकी घालता हसेल डावा गाल किंवा सलगी करते नथ ओठांशी, तो तुमचा अधिकार अशा प्रकारे ती खुलून देखील दिसते ह्या गीतांमधे!! अनेकविध लावण्या आहेत ह्या पुस्तकात. पाडव्याची, रंगपंचमीची, श्रावणाची, अशा विविध दिवसांच्या लावण्या तर हिरव्या रंगाची लावणी देखील आहे. पाडव्याची लावणी म्हणजे पाडव्याला शालू मागते आहे, कारण ती रात्री एकांतात उभारणार आहे. 🙂 "मी सुंदर आहे तर आता मी काय करू?" अशी तक्रारही दिसून येते. "माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा" सांगणारीला स्वतःच्या सौंदर्याची पुरेपूर जाणीव आहे आणि त्यापेक्षाही, फक्त शारीरिक सौंदर्यावर विसंबून न राहता, त्याबरोबर तोरा दाखवत भुरळ पाडणे ह्यात ती माहीर आहे. पण त्याचबरोबर ती धोक्याची सूचना पण देते आहे... घटकाभर संग बसून घालवा वेळ, जमल्यास मनांचा जमून येईल मेळ, नाहीतर यायचा अंगाशी हा खेळ, पाय टाकण्याआधी इथे, विचार पुरता करा, माझ्या नखऱ्याच्या शंभर तऱ्हा!! एका लावणीत एका पुरुषाने फसवलंय अशा स्त्रीचे रूप आहे. जत्रेत एक जण भेटला आणि त्याने आपल्याशी फ्लर्ट केलं, जत्रा उलगडल्यावर दुसऱ्या दिवशी मात्र तो डोळ्याला डोळा भिडवत नाही, तोंड चुकवून पुढे जातो, ह्याची तक्रार ह्या लावणीत येते. किती विविधता! अशा लावणी कलाकाराच्या आयुष्याचं विदारक दृश्य देखील शांताबाईंनी दाखवले आहे. तिथे येणारा आज एक, तर उद्या दुसराही असू शकेल किंवा तिथे असणारी आज एक, तर उद्या दुसरीही असू शकेल. हे सांगून त्या म्हणतात... प्रीतीचे नीतीचे व्यर्थ सांगणे, भुकेल्या देहाचे सारे मागणे, जन्माच्या नात्याचे फुका बहाणे, कुणाला सतत इथे राहणे? इथल्या महाली घडीची वस्ती, सुखाचे हिंदोळे आभाळी चढती, घडीत वरती घडीत खालती ऐन विशीतल्या स्त्रीचं सौंदर्याचं अत्युत्तम वर्णन एका गीतात केलं आहे. अनेक गीतांमध्ये पुरुषांनी स्त्रीच्या देहाचे आणि मनाचे केलेले वर्णन दिसून येते. त्यातही नुसता देहच नाही तर स्त्रीचा तोरा (attitude) देखील पुरुषाला कशी भुरळ पाडतो हे दिसतच. "ही चाल तुरुतुरु" आपल्या सगळ्यांच्या आवडीचे आणि माहितीचे आहे. असंच "मनाच्या धुंदीत लहरीत ये ना" हे देखील. गीतांमध्ये श्रावण, पाऊस, विरह, वाट बघणे हे सर्व हमखास येतं. एक गीत आहे "लहरी सजण कुणी दावा" - मीना खडीकर यांचे संगीत, उषा मंगेशकर यांचा आवाज. हे गीत मला ना वाचायला आवडलं ना ऐकायला आवडलं 🫣 श्रीकृष्ण राधेच्या कथा तर आपण गवळणींमधे अनेक वेळा ऐकल्या आहेत. कृष्णाची धून ऐकल्यानंतर अगदी काहीही न सुचता तशीच्या तशी निघालेली राधा! त्यातही तिच्या शृंगारचं वर्णन येतंच. सजण्याची आवड असलेल्या स्त्रीचे वर्णन अतिशय खुबीने शांताबाईंनी केले आहे. मला स्वतःला नटण्या मुरडण्याची अतिशय हौस असल्यामुळे हे सगळं वर्णन वाचून, "हे पुस्तक आपण आधी का नाही वाचलं" याचं दुःख मात्र झालं. ही उदाहरणं बघा ना... माथ्यावर मोतियाची जाळी, भांगेत मोती सर, चंद्रकोर भाळी, कानात झुमके, केसांमध्ये वेल, नाकात नथ, नथित हिरे, बिल्वदळे, वज्रटिक, `बोलताना पाठीवर जिचे रेशमाचे गोंडे खालीवर होतील अशी` पाच पदरी मोहन माळ!! दंडात वाकी रुताव्या, शिंदेशाही तोडे असावेत आणि पायी सांध्यात सोनसळी, गळ्यात तन्मणी, कमरेला कंबरपट्टा, पायी पैंजण.... "शालू हिरवा, पाच नि मरवा, वेणी तीपेडी घाला" हे गीत तर फारच प्रसिद्ध झाले. शृंगार आणि सौंदर्य यांचे वर्णन या सगळ्या गीतांमध्ये अगदी खुलून आलेलं आहे. आणि प्रेम! त्याविषयी किती लिहावं आणि कशाप्रकारे लिहावं असा मोठाच प्रश्न पडला आहे. तरीही एका स्त्रीच्या मनाने वाचलेल्या ह्या चार ओळी लिहीतेच... काय वाजले प्रिय ते पाऊल, तो तर वारा तिची न चाहूल, भास हो फसवा वरचेवरी, शोधितो राधेला श्रीहरी!! ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
मीना कश्यप शाह

भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लागणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊनजात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more