* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: JUST MARRIED, PLEASE EXCUSE
  • Availability : Available
  • Translators : NEETA GADRE
  • ISBN : 9789386175397
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2016
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 228
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : HUMOUR
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
YASHODHARA, A QUICK-TEMPERED GAL FROM THE BIG CITY, IS HITCHED TO VIJAY, A LAIDBACK DESI BOY FROM A SMALL TOWN IN ONE WORD, TROUBLE! THE YOUNG COUPLE MUST LEARN TO ADJUST TO MARRIED LIFE AND TO EACH OTHER WHETHER IT IS YASHODHARA S TAMPER TANTRUMS OR VIJAY S FOOT-IN-MOUTH SYNDROME WITH A LITTLE HELP FROM THEIR IDIOSYNCRATIC STAFF ZARREENA AND VINOD, THEIR NUTTY FRIEND VIVI AND, OF COURSE, THEIR RESPECTIVE FAMILIES. WITH THE UNEXPECTED ARRIVAL OF BABY ANOUSHKA A.K.A PEANUT, THE BATTLES ESCALATE, FUELED BY THEIR VASTLY DIVERGENT VIEWS ON RAISING A CHILD. WILL THEIR MANY DIFFERENCES SO ENDEARING AT THE START OF THEIR ROMANCE ACTUALLY TURN OUT TO MEAN THAT THEY ARE JUST INCOMPATIBLE? WILL THEY EVER MANAGE TO AGREE ON ANYTHING? OR HAVE THEY JUST BITTEN OFF MORE THAN THEY CAN CHEW? A FRESH AND HONEST TAKE ON MARRIAGE AND PARENTHOOD, THIS IS A STORY OF SELF-DISCOVERY THAT WILL HAVE YOU LAUGHING OUT LOUD AND SYMPATHIZING WHOLEHEARTEDLY WITH ITS QUIRKY AND LIKEABLE CAST OF CHARACTERS.
यशोधरा. मोठ्या शहरात राहणारी एक तापट डोक्याची मुलगी. तुलनेने लहान शहरात वाढलेल्या पारंपरिक कुटुंबात वाढलेल्या विजय नावाच्या एका मुलाशी तिची गाठ बांधली जाते. एका शब्दात सांगायचं तर संकटच उद्भवतं. ते दोघं वैवाहिक जीवनाशी आणि एकमेकांशी जुळवून घ्यायला शिकण्याचा प्रयत्न करतात. मग तो यशोधराचा लहरीपणा असो की विजयचा वाटेल तसं बकण्याचा स्वभाव असो. आपापल्या स्वभावलकबीनुसार वागणारे झरीना, विनोद, त्यांची वात्रट मैत्रीण ‘विवि’आणि अर्थात त्या दोघांची कुटुंबं यांची मदत त्या दोघांना होतेच. अनुष्का ऊर्फ पिनट बाळाच्या अनपेक्षित आगमनामुळे दोघांच्यातला झगडा वाढतो. बाळाला कसं वाढवायचं. यासंबंधीच्या दोघांच्या मतभेदामुळं त्यात तेल ओतलं जातं. त्यांच्या प्रणयराधनाच्या सुरुवातीच्या काळात प्रिय वाटणारे त्यांच्यातले मतभेद शेवटी इतके विकोपाला जातात की ते दोघं एकमेकांना अनुरूप नाहीतच, असं वाटावं. त्यांचं एखाद्या तरी मुद्द्यावर एकमत होईल का, की ती एक आवाक्याबाहेरची गोष्ट ठरेल? लग्न आणि पालकत्व याविषयीचा आधुनिक आणि प्रामाणिक विचार असलेली, स्वत्त्वाचा शोध घेणारी ही एक कथा आहे. ती तुम्हाला खळखळून हसवेल आणि त्यातल्या विनोदी वाटणाऱ्या व्यक्तिरेखा तुम्हाला आकर्षित करतील.

No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #JUSTMARRIEDPLEASEEXCUSE #JUSTMARRIEDPLEASEEXCUSE #जस्टमॅरिडप्लीजएक्सक्यूज #HUMOUR #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #NEETAGADRE #YASHODHARALAL "
Customer Reviews
  • Rating StarSAPTAHIK SAKAL 16-06-2018

    गावाकडे राहणारा विजय आणि शहरी वळणाची यशोधरा यांची लग्न गाठ बांधली जाते आणि त्यांची संसारकथा सुरू होते. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना कशा प्रकारे एकमेकांशी जुळवून घ्यावे लागते. तसेच एकमेकांच्या कुटुंबीयांशी कसे सांभाळावे लागते. याची माहिती हलक्या फुल्या किश्श्यांमधून या पुस्तकात मांडण्यात आली आहे. नवीन लग्न झाल्यानंतर करावी लागणारी कसरत, परस्पर नातेसंबंध, मातृत्व अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकणारी ही कथा आहे. ...Read more

  • Rating StarDAINIK SAKAL (SAPTARANG) 04-06-2017

    लग्न जुळण्यापासून ते योग्य प्रकारे निभावण्यापर्यंतच्या काळात अनेक प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. एकमेकांच्या आवडीनिवडी जुळणं, जुळवून घेणं, मित्र-मैत्रिणींचा हस्तक्षेप, कौटुंबिक स्थिती, सामाजिक वर्तुळ यांचे धागे जुळणं, पाहुणे येणं, मुलांच्या गमनाची उत्सुकता, वेगवेगळे वाद अशा किती तरी गोष्टी या प्रवासात आपसूकच येतात. यशोधरा लाल यांनी आपल्या अशाच अनुभवांना विनोदी पद्धतीनं मांडलं आहे. यशोधरा या प्रवासात स्वत:चा शोध घेत जातात आणि निरीक्षणं मांडत जातात, त्यामुळं वाचकांनाही त्यात स्वत:चं प्रतिबिंब उमटताना दिसतं. नीता गद्रे यांनी मूळ इंग्लिश पुस्तकाचा अनुवाद केला आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

KHULBHAR DUDHACHI KAHANI
KHULBHAR DUDHACHI KAHANI by SUNANDA AMRAPURKAR Rating Star
श्रीपाद ब्रह्मे

नुकतंच असंच वेगानं वाचून संपवलेलं दुसरं पुस्तक म्हणजे सुनंदा अमरापूरकर यांचं ‘खुलभर दुधाची कहाणी’. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या त्या पत्नी. अर्थात ही काही त्यांची एकमेव ओळख नव्हे. एक चांगल्या अभिनेत्री, उत्तम अनुवादक म्हणूनही त्या ्रसिद्ध आहेत. त्यांनी ‘खुलभर दुधाची कहाणी’ या आत्मचरित्रवजा लेखनातून त्यांच्या जगण्याचा व्यापक पट अतिशय प्रांजळपणे उलगडला आहे. मला हे पुस्तक विशेष भावण्याचं कारण म्हणजे त्यात आलेलं नगरचं वर्णन. मी स्वत: नगरला फार प्रदीर्घ काळ राहिलो नसलो, तरी ते शेवटी माझ्या जिल्ह्याचं गाव. आणि वयाच्या १३ ते २२ अशा महत्त्वाच्या कुमार व तरुण वयातला माझा तिथला रहिवास असल्यानं नगरच्या आठवणी विसरणं शक्य नाही. सुनंदाताई माझ्या आईच्या वयाच्या. त्यामुळं त्यांच्या लहानपणच्या आठवणी जवळपास माझ्या जन्माच्या २०-२५ वर्षं आधीच्या. असं असलं तरी मी त्या वर्णनाशी, त्या काळातल्या नगरशीही रिलेट होऊ शकलो, याचं कारण मुळात गेल्या शतकात बदलांचा वेग अतिशय संथ होता. नगरसारख्या निम्नशहरी भागात तर तो आणखी संथ होता. त्यामुळं एकूण समाजजीवनात १९६० ते १९९० या तीस वर्षांत तपशिलातले फरक सोडले, तर फार मोठा बदल झाला नव्हता. सुनंदाताई माहेरच्या करमरकर. त्यांचं आजोळ‌ सातारा असलं, तरी त्या जन्मापासून नगरमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या. अगदी पक्क्या ‘नगरी’ म्हणाव्यात अशा. ( आजही त्या स्वत:ला अभिमानानं ‘नगरकर’च म्हणवून घेतात.) सुनंदाताईंचे वडील त्या दहा वर्षांच्या असतानाच गेले. त्यांना मामांचा आधार होता, पण आईनंच लहानाचं मोठं केलं. तेव्हाचं त्यांचं निम्न मध्यमवर्गीय जगणं, नगरमधले वाडे, तिथलं समाजजीवन, तिथल्या शाळा, शिक्षक, नगरमधील दुकानं, दवाखाने, तिथल्या गल्ल्या, बाजार हे सगळं सगळं सुनंदाताई अतिशय तपशीलवार उभं करतात. नगरसारख्या मध्यम शहरात वाढलेल्या महाराष्ट्रातील कुठल्याही शहरातील त्या काळातील व्यक्तीला अतिशय सहज रिलेट होईल, असं त्यांचं हे जगणं होतं. त्यात सुनंदाताईंचं लेखन अतिशय सहज, सोपं आणि प्रांजळ असल्यामुळं ते आपल्याला अगदी भिडतं. एका प्रख्यात अभिनेत्याची पत्नी असल्यानं त्यांचं जीवन इतर सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा वेगळं झालं असेल, अशी आपली अपेक्षा असते. सुनंदाताईंच्या लेखनातून या ‘वेगळ्या जीवना’ची काही तरी झलक मिळेल, अशीही आपली एक भूमिका तयार झालेली असते. सदाशिव अमरापूरकरांसारख्या मनस्वी अभिनेत्याशी लग्न झाल्यानंतर सुनंदाताईंचं जगणं बदललंही; मात्र ते वेगळ्या पद्धतीनं. सदाशिव अमरापूरकर ऊर्फ नगरकरांचा लाडका बंडू त्यांना नगरमध्ये शाळेपासून कसा भेटला, नंतर कॉलेजमध्ये दोघांनी एकाच ग्रुपमधील नाटकं कशी सादर केली, त्यात अगदी नकळतपणे त्यांचं प्रेम कसं जमलं आणि नंतर नगर सोडून त्या पतीच्या कारकिर्दीसाठी मुंबईत कशा आल्या हा सर्व नाट्यमय प्रवास सुनंदाताई अतिशय तन्मयतेनं मांडतात. अमरापूरकर मंडळींच्या घराविषयीचे तपशील त्यात येतात. अमरापूरकरांचे वडील दत्तोपंत हे नगरमधलं मोठं प्रस्थ. श्रीमंत घराणं. मोठा वाडा, नोकरचाकर वगैरे. त्या तुलनेत सुनंदाताईंची माहेरची परिस्थिती जेमतेम म्हणावी अशी. अशा परिस्थितीत हे लग्न झालं आणि त्या अमरापूरकरांची सून झाल्या, इथपर्यंत पुस्तकाचा निम्मा प्रवास (मध्यंतरच) होतो. पुढल्या दोनशे पानांत आपल्याला खऱ्या अर्थानं सदाशिव अमरापूरकर हे काय व्यक्तिमत्त्व होतं, हे उलगडत जातं. अमरापूरकरांनी शेवटपर्यंत त्यांची मध्यमवर्गीय राहणी व मध्यमवर्गीय मूल्यं सोडली नाहीत. ‘अर्धसत्य’सारख्या सिनेमामुळं एका रात्रीतून ते भारतभरात प्रसिद्ध झाले. या एका ओळखीमुळं अमरापूरकरांचं जीवन पूर्ण बदलून गेलं. तोपर्यंत असलेली आर्थिक ओढगस्तीही संपली. हिंदी चित्रपटसृष्टीत अगदी स्वप्नवत अशा रीतीनं ते मोठे स्टार झाले. एकापाठोपाठ एक खलनायकी भूमिका त्यांच्याकडं येऊ लागल्या. पैसा येऊ लागला. अशा परिस्थितीत एक मध्यमवर्गीय कुटुंब या सगळ्या धबधब्याला कसं तोंड देतं आणि आपली मूल्यं कायम जपत राहतं, हे सुनंदाताईंनी फार हृद्यपणे लिहिलं आहे. सुनंदाताईंनी अनेक वर्षं एलआयसीत नोकरी केली. पतीचं अस्थिर क्षेत्र असल्यानं त्यांनी सुरुवातीला नोकरी केलीच; पण नवरा हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार व्हिलन झाल्यावरही त्यांनी ही नोकरी सोडली नाही. त्यांच्या तिन्ही मुलींवर त्यांनी उत्तम संस्कार केले. एका सिनेमाच्या प्रीमियरनंतर हे सगळे कुटुंबीय कसे घरी जाऊन पिठलं-भाकरीचं जेवण तयार करून जेवले हे त्यांनी एका प्रसंगात अतिशय खेळकरपणे सांगितलं आहे. अमरापूरकरांचं नाटकवेड, भौतिक सुखांविषयीची काहीशी विरक्त वृत्ती, त्यांचा मित्रांचा गोतावळा, अनेक माणसांचा घरात राबता असा एकूण ‘देशस्थी’ कारभार यावर सुनंदाताई कधी गमतीत, तर कधी काहीसं वैतागून टिप्पणी करतात. अर्थात त्यांचं सदाशिव अमरापूरकरांवर अतिशय प्रेम होतं आणि त्यांनी हे शेवटपर्यंत उत्तम निभावलं. अशा आत्मचरित्रांत अनेकदा ‘आहे मनोहर तरी... गमते उदास’ असा सूर लागण्याचा धोका असतो. सुनंदाताईंच्या लेखनाचं वैशिष्ट्य म्हणजे, एखादा अपवाद वगळता, त्यांच्या या संपूर्ण पुस्तकात असा रडवा सूर कधीही लागलेला नाही. आपल्याला जे काही मिळालं, ते आपणच निवडलं आहे आणि त्यामुळं त्याविषयी तक्रार करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, अशी एक भूमिका त्यांनी घेतलेली दिसते. त्यांच्या या पुस्तकातून विसाव्या शतकातील मध्यमवर्गीय ब्राह्मण घरातील एका तरुणीच्या आशा-आकांक्षांचा, आयुष्यानं दिलेल्या आश्चर्याच्या धक्क्यांचा आणि त्याला सामोरं जाण्यातील धीट दिलदारपणाचा लोभस प्रवास दिसतो. आपली मध्यमवर्गीय मूल्यं जपत, प्रामाणिकपणे व उमेदीनं आयुष्य जगणाऱ्या अनेक महिलांना या पुस्तकात आपल्या जगण्याचं प्रतिबिंब सापडेल. तेच या ‘खुलभर दुधाच्या कहाणी’चं यश आहे. ...Read more

HITLER AANI BHARAT
HITLER AANI BHARAT by VAIBHAV PURANDARE Rating Star
प्रभाकर गावंडे, अमरावती

मी विकत घेऊन वाचले आहे हे पुस्तकं, चांगले आहे, नवीन माहिती वाचायला मिळाली.