* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789386454997
  • Edition : 7
  • Publishing Year : JANUARY 1994
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 176
  • Language : MARATHI
  • Category : HUMOUR
  • Available in Combos :SHYAM BHURKE COMBO SET - 12 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
PUNE, A CITY OF CULTURE, EDUCATION AND HISTORY; A PLACE OF HAPPENINGS; A PLACE WITH HISTORICAL MONUMENTS, MEMORIES OF MANY FAMOUS PERSONALITIES FROM VARIOUS AREAS OF LIFE-INDEPENDENCE TO POLITICS. GREAT LEADERS LIKE TILAK, AGARKAR AND GOKHALE WERE BORN AND BROUGHT UP IN PUNE. THEY MADE THIS CITY THEIR WORKPLACE AND DEVELOPED AN EVER-LASTING IMPRESSION ON GENERATIONS TO COME. THEY PUBLISHED NEWSPAPERS, THEY TAUGHT THE PEOPLE ABOUT PATRIOTISM AND DEDICATION, THEY STRUGGLED FOR THE BETTERMENT OF SOCIETY. PUNE, A PLACE WHERE WOMEN STROVE HARD TO EDUCATE THEMSELVES AND STAND FIRMLY ON THEIR OWN TWO FEET WHEN ALL OVER INDIA THE PICTURE WAS NOT VERY IMPRESSIVE OR HOPEFUL. PUNE, A PLACE SHOW-CASING THE HIGH INTELLIGENCE IN MANY FORMS; A PLACE FAMOUS FOR THE TYPICAL CHARACTERISTICS OF BEING A PUNEITE, A PLACE WHERE DRAMA, THEATRE, MOVIES, MUSIC SHOWS, STREET FOOD… ALL HAVE SPECIAL IMPORTANCE. PUNE, FAMOUS AS THE EDUCATION HUB. TODAY, PUNE IS ALSO ACQUIRING NAME AND FAME IN THE INDUSTRY AREA, INFORMATION TECHNOLOGY AND MANY MORE. GLOBALISATION HAS OPENED NEW VISTAS FOR PEOPLE IN PUNE AND ENTREPRENEUR FROM ALL OVER THE WORLD. PUNE IS ACCEPTING EVERYONE’S PRESENCE IN ITS VAST ENVIRONMENT AND HELPING ALL TO LEARN MORE ABOUT ANYTHING AND EVERYTHING. RESEARCH, ARTS AND STUDIES ARE A FEW OF THE AREAS ATTRACTING MANY TO PUNE. THE WRITER OF THIS BOOK, MR. SHYAM BHURKE IS IMPRESSED BY THE CAPACITIES AND SHADES OF PUNE WITH ITS MANY EDUCATIONAL INSTITUTIONS, MANY COMPANIES-A FEW TO NAME ARE THE PRABHAT COMPANY, BALGANDHARV NATYA MANDIR, PUNE UNIVERSITY, ETC. APPA BALWANT CHOWK, THE NAGNATH PAAR, THE LAKADI POOL ARE A FEW OF THE NAMES ABOUT WHICH THE AUTHOR EXPRESSES HIS AMUSEMENT AND TRIES TO FIND OUT THE HISTORY BEHIND THESE NAMES. HE ALSO TRIES TO FIND THE ROOTS OF VARIOUS CULTURAL PROGRAMS LIKE SAWAI GANDHARV MAHOTSAV, VASANT VYAKHYANMALA, TILAK SMARAK MANDIR, BHARAT NATY MANDIR, BALGANDHARV MANDIR, ETC. HE EXPLORES THE CITY AND HELPS US TO KNOW MORE ABOUT THE EMINENT PERSONALITIES IN THE WORLD OF LITERATURE. THIS INCLUDES PULA, GADIMA (MADGULKAR), ACHARYA ATRE, ETC. A BOOK WHICH WOULD HELP US TO KNOW PUNE IN DETAIL. IRRESISTIBLE PUNE; HOW CAN I NOT LOVE YOU?
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच पुणे या शहराभोवती, तेथील ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटना, तेथील ऐतिहासिक वास्तूंची वैशिष्ट्यं, स्वातंत्र्यचळवळीतील नेत्यांचा- टिळक, आगरकर, गोखले वगैरे बिनीच्या नेत्यांचा वावर, त्या काळात त्यांची ओळख बनलेली वर्तमानपत्रे, त्यांचे वाडे, पुराण काळापासूनच प्रबळ आत्मविश्वास घेऊन वावरणारा सुधारक-शिक्षित स्त्री वर्ग, खास ओळख असणारा बुद्धिजीवी माणूस, त्याच्या वागणुकीच्या तऱ्हा या गोष्टींचं लखलखीत वलय या शहराला लाभलं आहे. नाटक-सिनेमा, गाणं, खाद्यजीवन, या प्रत्येक क्षेत्रातील त्या शहराचं खास व्यत्तिमत्त्व लक्षात घ्यावं लागतंच. विद्येचं माहेरघर म्हणवणारं हे शहर आजही शिक्षण क्षेत्राबरोबरच, उद्योग-तंत्रज्ञान क्षेत्रातही विविधांगांनी झपाट्यानं रूप पालटत आहे. ग्लोबलायझेशनच्या या युगात भारतातूनच नव्हे, तर जगातील सर्व भागांतून पुण्याकडे शिक्षणासाठी, कलासाधनेसाठी, संशोधनासाठी माणसांचा ओघ वाढला आहे. त्या त्या कारणानुसार निर्माण झालेल्या संस्था-विद्यापीठे, जसे प्रभात कंपनी, बालगंधर्व रंगमंदिर याविषयी सर्वांनाच लेखक श्याम भुर्के यांच्याप्रमाणेच कुतूहल वाटतं. ‘पुस्तकंÂ मिळणाऱ्या चौकास अप्पा बळवंतांचं नाव का?`, ‘नागनाथ पारातला हा नागनाथ कोण?’ लकडी पुलावरून जाताना ‘या सिमेंटच्या पुलाला लकडी पूल का म्हणतात?` मॅजेस्टिक गप्पा, वसंत व्याख्यानमाला, सवाई गंधर्व महोत्सव, कसे सुरू झाले, टिळक स्मारक मंदिर, भरत नाट्य मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर हे कुणाच्या पुढाकारानं उभे राहिले; तर इथं साहित्यविश्व बहरलं असेल, इथं पु.ल. राहतात, इथं ग.दि.मां.नी गीतरामायण लिहिलंय, तर कुठं अत्र्यांचं भाषण गाजलं असेल, अशा जागा अगदी गवयाच्या सुराप्रमाणे आळवत त्यांच्या मनात रुंजी घालत येतात. याविषयी जाणून घेताना गप्पांच्या ओघात अन् पुस्तकांच्या पानांत त्यांची उत्तरंही लेखकास सापडली. अशा आठवणींचं हे शब्दांकन!
पुणे मराठी ग्रंथालयातर्फे कै. ना.ह. आपटे स्मृती साहित्य पुरस्कार २००८

No Records Found
No Records Found
Keywords
PUNE EK SATHVAN# SHYAM BHURKE# SARSWATI NADI# GUPT# SILENT# BAKARWADI# AMBA BARFI# CHITALE# HEMAMALINI# VADE# NATAKALA JA# SAMBHAJI PARK# TUPACHI INITIAL# LEKHANI# VASTARYACHI DHAR# KALIDAS# SARWJANIK KAKA# NARO APPAJI# TULSHIBAG# NAGNATH PAR# RAJA KELKAR VASTUSANGRAHALAY# S.P.ATRE
Customer Reviews
  • Rating StarSneha Lolayekar

    नक्की वाचा छान मन प्रसन्न करणारे पुस्तक

  • Rating StarPravin Shirsundar

    पुणेकर आहात व त्यातुन पुण्यात राहूनच पन्नाशीला आलात? किंवा कामानिमित्त खुप पुर्वी पुणे सोडलेय मग हे वाचाच, आठवणींना उजाळा... पुणेकर नसल्यास जरूर वाचा,

  • Rating StarDAINIK SAMANA 08-01-2018

    सुरस पुणेरी बाणा... पुणे आणि पुणेकर हा विषय (पुण्यातल्या) लेखकांचा आवडता विषय आहे. त्यांचा पुणेरी बाणा हा ऐतिहासिक असून दानशूरता हा आध्यात्मिक स्वभाव आहे. बसवाले आणि रिक्षावाले (हमालसुद्धा) यांच्याशी पैशांबाबत तात्त्विक घासाघीस करणे आणि पगडीपासून दगी बंगल्यापर्यंत (स्वत:च्या) जाहीर कौतुक करणे ही स्वभावनिष्ठ सवय आहे. वस्तुनिष्ठ समस्या शब्दनिष्ठ पद्धतीने कशा सोडवाव्यात याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे पुणे आणि पुणेकर. प्रा. श्याम भुर्के (अर्थात पुणेकर) यांनी प्रस्तुत पुस्तकात हेच दिलखुलास (नवल आहे ना?) सांगितले आहे. पहाटे पुण्यातील बागांमधून रामदेवबाबांचे अनुयायी ‘प्राणायाम’ करताना दिसतात. यावर एक विनोद प्रसिद्ध आहे. एकाने मित्राला प्रश्न केला, ‘तू व्यायाम काय करतोस?’ ‘पहाटे फिरायला जातो शुद्ध हवेत.’ ‘त्याचा काही उपयोग नाही.’ ‘का?’ ‘त्यावेळी बाबांचे अनुयायी हवेतला सगळा प्राणवायू खेचून घेतात. मग तुला कुठून मिळणार? असे अनेक किस्से मोठे मजेदार आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळ अन् स्वातंत्र्योत्तर काळातील गमतीदार आठवणी आहेतच. आधुनिक काळातील ‘चितळ्यांच्या दुकानाच्या वेळा’ हा चर्चेचा विषयही इतर विषयांप्रमाणेच (पुणेकरांच्या फक्त) जिव्हाळ्याचा आहे. हा दुर्मिळ माहितीचा खजिना न-पुणेकरांनाही आवडेल असा सुरस अन् (चमत्कारिक) अद्भुत आहे. –अरुण मालेगांवकर ...Read more

  • Rating StarDAINIK AIKYA 03-09-2017

    मम सुखाची ठेव... ‘पेन्शन घ्यावं अन् पुण्यात रहावं.’ अशा सुख कल्पनेतलं हे गाव. इंग्रजीमध्ये म्हण आहे, ‘वेल बिगन इज हाफ डन.’ तसं पुण्यात राहायला मिळालं म्हणजे सुखाचा अर्धा टप्पा गाठल्यासारखंच आहे. शिवरायांनी सोन्याच्या नांगरानं भूमिपूजन केलेली ही पुनवी! निसर्गानं मुळा-मुठे सारख्या नद्या बहाल करून पुण्याला देखणं केलं तर पर्वती, हनुमान टेकडी, वेताळ टेकडी अशा मध्यमवर्गीय टेकड्यांनी या गुलजार पुण्यात सकाळ-संध्याकाळ स्वच्छ हवेचा आस्वाद त्या एकदम महाकाय पर्वतासारख्या नाहीत की ‘आम्ही मधूनमधूनच परत आलो’ असं खचून जाणारं कोणी बोलेल. त्या इतक्याही लिंबू टिंबू नाही की थोडीसुद्धा धाप लागत नाही. पुणेकरांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात यासाठी किती उंचीवर चढून आलं म्हणजे माफक व्यायाम होईल याचा हिशोब करूनही अगदी ‘मेड टू ऑर्डर’ अशा या टेकड्या निसर्गानं बनविल्या. ‘अ‍ॅटॅच्ड गार्डन’ असं फ्लॅटवाले जसं कौतुकानं सांगतात तसं पुणेकर अगदी ‘घराजवळ पर्वती’ असं भरल्या मनानं सांगतात. पंधरा वर्षांपूर्वी रुपया फुटानं जागा घेतली. आता विकायला काढली तर दहा लाख रुपये सहज येतील, हे सुखही बऱ्याच पुणेकरांच्या वाट्याला आलं हे त्यांनी होऊन दिलेल्या माहितीमुळं कळतं. विद्येच्या या माहेरघरात एक नव्हे तर दोन विद्यापीठे आहेत. शिवाय एक एक शिक्षणसंस्था म्हणजे एका एका विद्यापीठासारखंच. शाळेत जर्मन विषय घेतात हे मी इथंच पाहिलं. आमच्या लहानपणी अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांना जर्मनची भांडी म्हणायचे. तेवढाच या शब्दाशी आलेला माझा संबंध. मी मुलीला म्हटलं, ‘तू जर्मन घेतलंस ना? जसं काय ती आता जर्मनीला जाणार अशा कौतुकानं भारावलेलं ते वाक्य. त्यावर ती म्हणाली, ‘जमन’ म्हणायचं. आपल्याकडे जशी सरस्वती नदी गुप्त आहे तसा हा ‘र’ म्हणजे सायलेंट असतो. आता मी मनातच म्हटलं, ‘अरेरे!’ हे मी मनातच म्हटल्यामुळं त्यातले बहुसंख्येने असलेले ‘र’ हे शांतच बसले असणार. पुण्यात जेवढे म्हणून अभ्यासक्रम शिकवले जातात त्या सर्वांची एकत्र माहिती घेण्याचा एखादा अभ्यासक्रम आहे का याची तेवढी चौकशी करायची बाकी आहे. पुणं म्हणजे सुखाची गुरुकिल्ली म्हणायचं कारण म्हणजे इथं कोणाला कशामुळं आनंद होईल सांगता येत नाही. पण आनंदच होतो. रडगाणी कमी. जीवनगाणी, आनंदगाणी जास्त. कुणाला टेल्को, बजाज, कमिन्ससारखी आधुनिक तीर्थक्षेत्रं आहेत म्हणून आवडेल. ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांशिवाय लग्नासाठी भरपूर स्थळं मिळणारं गाव म्हणजे पुणं. आमच्या सातारच्या बहुतेक मुली पुण्यात लग्नानंतर लहान मुलांना घेऊन फिरताना दिसायच्या. एखादी पुढ्यातच भेटली तर त्या मुलाला ‘हा तुझा मामा बघ’ अशी ओळख करून देणार आणि आपला भर रस्त्यात मामा करणार. ओळखीची माणसं दिसणारं गाव म्हणूनही कुणाला पुणं आपलंसं वाटत असणार. दूरदर्शनवर मराठी बातम्यांत ‘जिल्हा वार्तापत्र’ असा दूरदर्शनच्या प्रतिभेला साजेलसा कंटाळवाणा भाग असतो. त्यामध्ये पाणीटंचाई, लोकन्यायालये, रोजगार योजना, विंझणविहीरी असल्या उजाड बातम्या असतात. पण पुणे जिल्ह्याच्या वार्तापत्रात मात्र साहित्यिक गप्पा, व्याख्यानमाला असा आनंददायी भागही आढळतो. पुणेकर म्हणजे आनंदयात्री. मुंबईत दंगलीनं संचारबंदी होते तर त्याच वेळी पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी पंधरा हजार लोक एकत्र गाण्याच्या मौफिलीत रंगलेले असतात. गणेशोत्सव पाहावा तर पुण्याचाच. व्याख्यानं, चर्चामंडळं, गप्पांचे कार्यक्रम, हास्य कविसंमेलन, रोषणाई, श्रीमंत दगडूशेठ गणपतीजवळ नारळाचे डोंगर. सारा गावच या उत्सवात सामावलेला. पुण्याची लांबी, रुंदी जशी वाढलीय तशी उंचीही, इमातींनाही अरोरा टॉवर्स,पर्वती टॉवर्स, इंदिरा हाइट्स अशी नांव आलीत. तरीही जरा आतल्या बाजूला नजर वळली की ‘श्रमसाफल्य’,‘लताविश्व’ अशी बिनगर्दीच्या भागात निंवातपणा अनुभवणारी निवासस्थानं आहेतच. मुख्य रस्त्यावर आलं की सिटी दिसणारं हे शहर, कॉलनीत गेलं की निसर्गरम्य. चार चौघांची विचारपूस करणारं पुणं वाटतं. जगाच्या गतीत आपणही मागं नाही हे दाखवून देणारं हे पुणं वेगवान झालंय. पूर्वी घरोघरी सायकली होत्या. आता मोपेड्स व स्कूटर्सची गर्दी झालीय. रस्ता क्रॉस करायलाही रिक्षा करायला हवी असं मजेनं म्हणायची वेळ आलीय. पूर्वी दुकानदार समोरच्या हॉटेलातून बोटांच्या इशाऱ्यावर चहा मागवायचे. आता इशारे ऐकू जात नाहीत अन् दिसूही शकत नाहीत. रस्ता क्रॉस करून सांगायला जायची कसरत केली तरी चहावाला मुलगा इकडे येईपर्यंत चहा थंडगार व्हायचा. यावर उपाय म्हणून आपल्या दुकानाच्या बाजूचाच चहावाला शोधायचा. अशा कितीही अडचणींचे डोंगर असले तरी ‘पुण्यावाचून जमेना, पुण्यावाचून करमेना’ अशीच स्थिती होते. ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ या न्यायाने पुण्याबाहेरचे लोक पुणेकरांची अगदी चवीनं थट्टा करीत असतात. ‘पुण्याचे लोक इतके चेंगट की, ‘या हं एकदा चहाला!’ असं आमंत्रण करत पण नक्की केव्हा यायचं हे सांगत नाहीत. यावर दुसरा म्हणाला, ‘अहो, पुण्यात नेने आणि लेले नावाचे दोन गृहस्थ आपण कसे काटकसरीने राहातो ते सांगत होते. नेने म्हणाले, ‘मी सुपारी बरेच दिवस वापरता यावी म्हणून ती न कापता दोरीने टांगून ठेवली आहे. सुपारी खावी वाटली, तर मी फक्त चाटतो.’ यावर लेले म्हणाले, ‘मी माझ्या नावाचा शिक्का बनविताना फक्त ‘ले’ या एकाच अक्षराचा बनविला व तोच दोनदा वापरतो. तिसऱ्याने लगेच सरसावून एक किस्सा सांगितला. ‘एका गृहस्थाकडे एक पुणेकर गप्पा मारत असताना बाहेर जोराचा पाऊस पडायला लागला. पाऊस थांबायची काही चिन्हे दिसेना. अंधार पडायला लागलेला. तेव्हा मित्र म्हणाला, आता जेऊनच जा. नंतर त्यानं आत जाऊन बायकोला जरा दचकतच सांगितलं, ‘अगं मी त्याला जेवायला थांबवून घेतलंय. बाहेर जोराचा पाऊस पडतोय, तेव्हा तयारी कर हं!’ बायकोच्या पूर्व संमतीशिवाय मित्राला जेवायला थांबविल्यामुळे बायकोची आत समजूत काढून तो बाहेरच्या खोलीत आला. तर या पुणेकर मित्राचा पत्ताच नाही! हा गेला कुठं? अशा विचारात असतानाच हा पुठ्ठया धापा टाकत पूर्ण भिजलेला असा आला. कुठे गेला होता विचारताच, ‘घरी जेवायला येणार नाही हे सांगून आलो! असा खुलासा त्यांनी केला. अशी पुणेकरांची थट्टा करण्याची हॅटट्रिक पूर्ण झाली असतानाही एकानं आणखी एक चौकार ठोकला, एकदा नागपूरच्या गृहस्थांना आपल्या मुलानं उधळेपणा कमी करावा, काटकसरीनं राहावं असं वाटल्यानं त्यांनी मुलाला काही दिवस पुण्याला काकांकडे जाऊन राहायला सांगितलं. मुलगा पुण्याला आला. काकांच्या घराशी आल्यावर दारावर बेल दिसली नाही. कडी वाजवावी तर लक्षात आलं की, दार काही लावलेलं नाही. नुसतंच लोटलेलं आहे. त्यानं दार ढकललं. आत काका बसलेलेच होते. ते म्हणाले, ‘ये बाळ, मी कडी का लावली नाही माहीत आहे? ती झिजेल, म्हणून कमीत कमी वेळा लावतो! थोड्या वेळात वीज गेल्यामुळे त्यांनी मेणबत्ती लावून त्या प्रकाशात दोघांनी भोजन घेतलं. भोजनानंतर आता तर नुसतेच ऐकण्याचे काम आहे म्हणून त्यांनी मेणबत्ती विझवली. पुतण्या त्यांना म्हणाला, ‘आता अंधार असल्यामुळे मी पंचाही काढून ठेवला आहे, तोही झिजयला नको!’ अशी पुण्याला नावं ठेवणारी माणसं जेव्हा पुण्यात येऊन काही दिवस राहतात. तेव्हा मात्र त्यांना पुण्यातच स्थानिक व्हावं असं वाटतं. पुण्यात राहायला जागा मिळणं व मुलांना शाळेत प्रवेश मिळणं हे महाकठीण काम. पण एकदा का ते जमलं की मग अगदी ‘पुणं तिथं काय उणं’ अशीच प्रतिक्रिया यायला लागते. पुण्याचा इतिहास प्रेरणादायी आहे. इथं साहित्यिकांची मांदियाळी आहे. यशस्वी उद्योजकांचं कर्तृत्वपूर्ण वास्तव्य आहे. एकाहून एक सरस नाट्यगृहं आहेत. क्रीडा संकुलं आहेत. अशा पुण्याचा फेरफटका मारायचा आहे आपल्याला. सुरुवात करू या लकडी पुलावरून! ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
परेश जयश्री मनोहर

मराठी बालसाहित्याचा गेल्या काही दशकांचा अवकाश हा सातत्याने प्रबोधनपर, उद्बोधनपर आणि कोणत्याही कथेच्या शेवटी एका वाक्यात तात्पर्य सांगणाऱ्या बाळबोधकथांचा राहिलेला आहे. या बाल साहित्यामध्ये प्रामुख्याने येणारे पात्र ही मध्यमवर्गीय, उच्च जातीय मराठी घरतील मुलं मुली असतात आणि जेव्हा केव्हा वंचित समाजातील, शोषित समाजातील, गरीब ग्रामीण घरातील मुलांचे चित्रण येतं तेव्हा ते अति दुःखी आणि बिचारे, ज्यांना मदतीची गरज आहे आणि अशी मदत करण्याची जबाबदारी मोठ्या घरातील उच्चवर्णीय, उच्चवर्गीय नायक मुला मुलींची असते. त्यातूनही प्रामुख्याने काय करावे काय करू नये किंवा तत्सम उपदेशच प्रामुख्याने कथेच्या शेवटी केलेले दिसतात. आणि हा लेखक वर्ग ही प्रामुख्याने पुणे मुंबई भागात स्थिरावलेला राहणारा तिथल्या अनुभूती आणि तिथल्या जगण्याचा अवकाश सोबत घेऊन येणारा असतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यात अनकढाळ सारख्या एका छोट्या गावात राहणारा फारुक काझी हा लेखक जेव्हा गेलं दशकभर कवितांमधून, कथांमधून बालविश्व चितारण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जास्त करून ग्रामीण भागातील मातीशी जोडलेलं असतं. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या मुलांमुलींच्या भावविश्वाच्या जवळ जाणारं चित्रण त्याच्या कथांमधून आपण सातत्याने बघत असतो. त्याचे "शिकण्याच्या वाटेवरील आनंदवन" हे पहिले पुस्तक एका प्रयोगशील शिक्षकाच्या शाळेतील अनुभवांवर आधारलेले आहे. त्यांचे आजवर मित्र, प्रिय अब्बू, चुटकीचे जग हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. या सगळ्याच पुस्तकातून त्याने सातत्याने ग्रामीण, निमशहरी भागातील कनिष्ठ मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबातील बहुजन आणि वंचित घटकातील, मुस्लिम कुटुंबातील मुलांच्या नजरेने दिसणाऱ्या गोष्टी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यात कुठेही गरिबीचे गोडवे नाहीत की काठोकाठ पसरलेलं बिचारेपण नाही. तर या आर्थिक दृष्ट्या नागवलेल्या लोकांच्या घरातील मुलांच्या कथा आहेत, ज्यात प्रेम, उत्सुकता, जिद्द, समजून घेणे आणि अनुभवातून आलेलं शहाणपण हे प्रामुख्याने जाणवते. अभावग्रस्तता, एखाद्या गोष्टीचे नसणे, तरीही नातेसंबंधांवरील विश्वास, प्रेम आणि एकमेकांबद्दलचा आदर, काळजी घेऊन जपणारी कुटुंबं फारुकच्या लिखाणात सातत्याने येत राहतात. त्याचा आत्ता आलेला हाटूमुटूचा चंद्र हा एक अफलातून कथासंग्रह आहे. यामध्ये फारुकने वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत जे त्याच्या नेहेमीच्या लेखन शैलीपेक्षा जरा वेगळ्या अंगाने जाणारे आहेत आणि ते उत्तम जमून आलेले आहेत. या दहा कथांमधल्या पहिल्या तीन कथा या मुलांच्या नजरेतून होणारा पर्यावरण विनाश, निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मुलांचा प्रयत्न आणि नुसते समजून घेणे नाही तर मुलानी आपले हे जग आपण नीट ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न असे ही आहे. यात आनंद शोधण्याचे मार्ग, जबाबदारीचे असणारे भान आणि काल्पनिक ग्रहाची भेट करवून आणणारी समायरा आपल्याला भेटते, तर मोकळ्या हवेत असणारा आनंद भरुन कसा घेणार असा प्रश्न विचारणारा अर्पित ही भेटतो आणि तसेच टेकडी स्वच्छ करण्यासाठी न थकता प्रयत्न करणारे ओजस आणि रेहान ही भेटतात. लहानपणी न कळत्या वयात चिंचेवरच्या माकडाला तोटा फेकून मारणारा आणि त्या माराची मनावर झालेली जखम मोठा झाल्यावरही मनावर कोरलेला योगेश, आपल्या लाडक्या लहानग्या मैत्रिणीसाठी व्याकुळ होऊन रोज दारावर धडका देणारे शाहताब अस्वल आपल्याला अस्वस्थ करुन जातात. एका कथेत तर चक्क सायकल ही कथेची नायिका आहे आणि तिच्या सुखाच्या आणि नाराज होण्याच्या अनुभवातून आपणही तिच्यासोबत प्रवास करतो. इथे आपण बाबांच्या अपघाताने अस्वस्थ असणाऱ्या सारंगा सोबत त्या दवाखान्याच्या बाहेर येरझारा घालत असतो आणि अमृताच्या मैतरासोबत मेंढक्या बनून रानावनात चालत असतो. गावात फिरताना, गावाला पडणारं हिरवं स्वप्न अनुभवणारा मंदार आपल्या भेटतो आणि सोबतच गावात राहणारी आणि तुमच्या शहरालाही स्वप्न पडतच असेल की रे? काय असेल ते स्वप्नं? असा प्रश्न विचारणारी चंदा हाच प्रश्न आपल्यालाही विचारते असा भास आपल्याला होतोच होती. शाळेच्या ट्रीपला जायला हजार रुपये नाहीत म्हणून रुसलेल्या साक्षीला बघताना आपणही आपल्या लहानपणी अशा बुडालेल्या शाळेच्या सहली, आणि त्यावेळी आपल्या आईबाबांनी आपल्याला काय सांगितलं होतं आणि कशी आपली समजूत काढलेली हे आठवून आपलेही डोळे ओलसर होताना अनुभवतो. पण याही कथेत निंबोणीच्या पानांमधून दिसणारा, भासणारा तो चंद्र जो हाटूमुटूचा आहे पण त्याला बघून होणारा आनंद मात्र अस्सल आणि खराखुरा आहे. या सगळ्या कथांमधून फारुक ने आजच्या मुलामुलींना आपल्यासमोर उभं केलं आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धती आणि त्याचं अस्वस्थ असणं अगदी नेमकेपणाने आपल्यासमोर येतं. ही मुलं कोणत्याही एका शहरातली, एका भागातली किंवा एकसारख्या घरातली नाहीत पण त्यांचे जगणे हे आजच्या मुलांचे जगणे आहे. फक्त एक प्रश्न मनाला पडतो की आपल्या भोवतालच्या प्रश्नांनी, आपल्या गरिबीने किंवा अभावाने काळवंडलेली मुलं जेव्हा समजूतदारपणे स्वतः शहाणे बनत पुढे निघतात तेव्हा, ही सगळं कोणामुळे, आणि माझ्याच वाट्याला का? याचे जबाबदार कोण असा एखादा प्रश्न एकाही मुलाला पडू नये याची काळजी वाटते. येत्या काळात फारुक च्या कथांतील ही मुलं तुम्हाला मला हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे आणि मी त्या दिवसाची वाट ही बघतो आहेच. या पुस्तकातील चित्रांचा विशेष उल्लेख करणे फारच महत्वाचे आहे. चंद्रमोहन कुलकर्णी ज्या ताकदीने कथेची भावना नेमक्या कुंचल्यात पकडतात ते बघताना आपण निव्वळ थक्क होतो. इतकी सुंदर आणि मनाला धरुन ठेवणारी चित्रं या पाना आपल्याला भेटत राहतात. इतक्या ताकदींच्या कथांचे पुस्तक मेहता प्रकाशनाने अत्यंत प्रेमाने आणि उत्तम निर्मितीमूल्य जपत काढलेले आहे. आज आपला भोवताल इतका जातधर्म, पर्यावरणीय नाश आणि भविष्याच्या चिंतांनी कुरतडलेला असताना अशा खऱ्याखुऱ्या मुलांच्या कथा आपल्यासमोर येणं हाच आपल्याला दिलासा देणारा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे...हा असाच राहो... परेश जयश्री मनोहर ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
बालाजी मदन इंगळे

संवेदनशीलतेने लिहिलेल्या तरल बालकथा : हाटुमुटूचा चंद्र मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बालसाहित्य लिहिणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. बालसाहित्य आणि बाल मानसशास्त्र यांचा विचार करून आपली प्रतिभा त्यासाठी वापरणाऱ्या मोजक्या बालसाहित्यिकांमध्य फारूक एस. काझी यांचे नाव समाविष्ट करावे लागेल. त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या मुलांसाठीच्या ‘हाटूमुटूचा चंद्र’ या कथासंग्रहातून ही बाब ठळकपणे अधोरेखित होते. कथा म्हणजे केवळ प्रसंगानंतर प्रसंग किंवा घटनेनंतर घटना मांडणे नसते. त्यामध्ये लेखकाच्या प्रतिभेने वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख संगम घडवून आणावा लागतो. कुठलीही कथा लेखकाला त्याच्या अनुभव विश्वातूनच सापडलेली असते. पण ते अनुभव विश्व मांडत असताना त्यात आपल्या प्रतिभेने काही साहित्य गुण समाविष्ट करावे लागतात. तेव्हा ती कथा साहित्यिकदृष्ट्या अभिजात व साहित्य गुणांनी युक्त अशी कथा होते. या संग्रहातील कथांमध्ये अशा साहित्यिक प्रतिभांच्या बऱ्याच जागा आहेत. आणि म्हणूनच फारूक एस. काझी यांच्या कथा रोजच्या जगण्यातीलच असल्या तरी त्यातील साहित्य गुणांमुळे या कथा आपले वेगळेपण सिद्ध करतात. कथेमध्येही काव्यात्मकता असते. प्रतिकात्मकता असते. आणि त्यामुळेच ती कथा वैश्विक ठरत असते. हे सर्व गुण ‘हाटुमूटुचा चंद्र’ मधील कथांमध्ये आढळून येतात. म्हणून ही कथा महत्त्वाची आहे. अद्भुतरम्यता, काल्पनिकता आणि धक्का तंत्र याने लिहिलेल्या कथा नेहमीच मुलांना आवडतील असे नाही. आपल्याच अवतीभवती घडणाऱ्या घटना इतक्या सुंदर असू शकतात हे मुलांना वाचायला आवडते. नेमके तेच या कथांमध्ये आहे. या बालकथा या मातीतल्या आहेत. या संस्कृतीतल्या आहेत. म्हणून त्या महत्त्वाच्या आहेत. या संग्रहात एकूण दहा कथा आहेत. सर्वच कथा सुंदर आणि हृदयस्पर्शी आहेत. ‘फिकर नॉट’ या कथेमध्ये दोन मित्रांचे काही प्रसंग आहेत. रेहान आणि त्याचा मित्र अर्पित. दोघे एका टेकडीवर जातात. रेहानसाठी टेकडीवरील अनुभव नवीन असतो. दोघे खूप गप्पा मारतात. तळ्यात पाय सोडून बसतात. तिथे बसल्यानंतर त्या तळ्यातील काही मासे आपण बाटलीत घेऊन जावे असे रेहानला वाटते. पण अर्पित त्याला सांगतो की आपण या टेकडीवरून काय घेऊन जायला हवं तर या टेकडीवरील वातावरण, टेकडीवरील दृश्य, इथे आपण घेतलेला आनंद हे सगळे मनात भरून घेऊन जायला हवे. असं मुक्या प्राण्यांना त्रास द्यायचा नाही, हे नकळतपणे तो रेहानला सांगतो. रेहानलाही ते पटतं आणि मग तो खोल श्वास घेऊन इथल्या सगळ्या आनंदाच्या आठवणी मनात भरून घेतो. आणि निघतो. एखादा कोणी अन्य बालकथा लेखक असता तर या दोघांचं बोलणं, टेकड्यावरील वर्णन, दोघांनी केलेली मज्जा, त्यांनी केलेल्या गमती याचे वर्णन करून कथा संपवली असती पण फारूक काझी यांनी इथून काय घेऊन जायचं? हे लिहून जे एक नवीन वळण कथेला दिलेले आहे, इथेच या कथेतील साहित्यगुणाची जागा आहे. तिथेच कथा लेखक म्हणून फारूक काझी यांची प्रतिभा आपल्याला दिसून येते. आणि बालसाहित्यिक म्हणून त्यांचं वेगळेपणही इथेच आपल्याला दिसतं. ‘कर के देखो’ या कथेमध्ये ट्रेकला गेलेली मुले स्वच्छता दूत कशी बनतात हे मुळातून वाचण्यासारखे आहे. ‘जखम’ या कथेमध्ये इयत्ता तिसरीत शिकत असताना एका माकडीनीला आपण इजा पोहोचवल्याचं मोठं झाल्यावर कथेतील नायकाला आठवतं. आणि तो मोठा असूनही लहानांसारखं रडत रडत ती चूक आपल्या आईकडे कबूल करतो. ही कथा वाचताना पाषाणहृदयी माणूसही भावनिक होऊन जातो. कडूनिंबाच्या झाडाचे खाली पडलेले पान चंद्राची प्रतिमा म्हणून म्हणजेच हाटुमूटुचा चंद्र म्हणून कथेत वापरणे. आणि तो चंद्र कथेतील साक्षीच्या चेहऱ्यावर आनंदाचे प्रतिक म्हणून येणे. आणि त्याद्वारे सहलीला जाण्यासाठी पैसे न मिळाल्याच्या दुःखातून स्वतःला सावरणे ही सगळीच मांडणी भन्नाट झाली आहे. अशा भरपूर जागा या पुस्तकांमध्ये आहेत. ‘हिरवं सपान’ या कथेमध्ये शहरातला मंदार गावाकडे येतो. आणि गावातील चंदा सोबत शेत-शिवारात फिरतो. या शेत-शिवारातील भरपूर झाडे पाहून बी, रोपटं, मग त्याचं झाड ही क्रिया किती महत्त्वाची आहे. आणि या क्रियेचं स्वप्न नेहमीच गावाला पडतं. तसंच हिरवं स्वप्न शहराला का पडत नाही? हा प्रश्न खरंतर लहान-मोठ्या प्रत्येक वाचकाला अस्वस्थ करून जातो. ‘स्वप्न’ ही आणखी एक सुंदर कथा या संग्रहामध्ये आहे. माणसाला अभावातूनच वस्तूंची किंमत कळत असते. ज्याच्याकडे सर्व काही आहे अशा मुलाकडे जेव्हा सायकल येते, तेव्हा तिची काळजी घेतली जात नाही. पण स्वप्नातही ज्याच्या कधी सायकल मिळेल असं वाटत नव्हतं अशा अंकितला जेव्हा सायकल मिळते, तेव्हा तो तिची किती काळजी घेतो आणि हेच त्या सायकलचे स्वप्न होते. आणि अंकितचेही तेच स्वप्न होते ही स्वप्नांची सरमिसळ वाचकांना खूपच आवडून जाते. ‘मैतर’ ही आणखीन एक अनोळखी नातेसंबंध घट्ट करणारी कथा. फक्त काही दिवसांसाठी आलेल्या मेंढक्या काकाची आणि अमृत ची मैत्री होते. आणि ती मैत्री त्या दोघांमध्ये इतकी घट्ट होते की, मेंढक्या काका आपली मेंढरं घेऊन परत निघाल्यावर दोघांनाही एकमेकांचा निरोप घ्यावा असे वाटत नाही. निरोपावेळी दोघांच्याही डोळ्यात पाणी येते. दोघेही निरोपावेळी एकमेकांना भेटवस्तू देतात. हा प्रसंग लेखकाने स्थानिक संदर्भ, संस्कृती, भाषा आणि चित्रदर्शी स्वरूपात असा उभा केला आहे की, वाचक कथा संपली तरी त्या मेंढरांच्या कळपामध्ये आणि अमृतच्या घराच्या आसपासच घुटमळत राहतो. ‘जाऊ दे त्याला’ ही आणखीन एक भावस्पर्शी कथा. जंगली प्राण्यांनाही जीव लावला तर ते माणसांशी प्रेमाने वागतात हे सांगणारी ही कथा वाचकाच्या काळजाचा ठाव घेते. निधी आणि फॉरेस्ट ऑफिसर असलेले तिचे बाबा यांची ही कथा जंगलाच्या दुनियेत वाचकाला घेऊन जाते. पण तिथेही मानवी भावना कशी श्रेष्ठ ठरते हे अतिशय रंजक पद्धतीने लेखकाने लिहिले आहे. ‘बाबांची भाषा’ ही आणखी एक हृदयाला स्पर्श करणारी कथा! शाळेत शिकणारा सारंग अपघातात ऐकणं आणि बोलणं कायमचं गमावलेल्या आपल्या बाबांसाठी हातवाऱ्याची भाषा शिकून घेतो. हे जेव्हा वाचकाला कळतं तेव्हा वाचक जागच्याजागी स्थिर होऊन जातो. ‘एस पी १३’ ही आधुनिक तंत्रज्ञानात घेऊन जाणारी कथा! छोटीशी समायरा स्पेसशीप घेऊन एका नव्या प्लॅनेटवर जाते. आणि त्या नव्या प्लॅनेटवर असलेली माणसं कशी निसर्गाची काळजी घेतात हे पाहून समायरा तिथेच राहण्याचा निर्णय घेते. तेव्हा तिच्या सायंटिस्ट मामासह वाचक ही अचंबित होऊन जातात. निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुरेख आणि अफलातून संगम या कथेमध्ये लेखकाने घडवून आणला आहे. या पुस्तकाची महत्त्वाची बाजू म्हणजे यातील चित्रे! चंद्रमोहन कुलकर्णी यांची चित्रे या कथेला एक वेगळा आणि नवा आयाम देतात. ही चित्रे या कथेशी एवढी एकरूप झालेली आहेत की ही चित्रे वेगळी काढली तर या कथा अपूर्ण वाटतील! कथेला अनपेक्षित वळण देण्यामध्ये लेखक पटाईत आहेत. हे प्रत्येक कथेतून आपल्याला जाणवतं. आपण सरळ कथा वाचत जातो. आणि कथा देखील आता सरळ या वाटेने जाईल असे वाटत असताना ती कथा असं काही वळण घेते की वाजक स्तंभित होऊन जातो. आणि हीच खरे तर फारूक एस. काझी यांची खरी ताकद आहे. त्यांच्या सर्व कथांमधील पात्र आणि त्यांची नावे पाहिली तर ती विशिष्ट अशी पात्रे किंवा नावे नाहीत. तर सर्वसमावेशक अशी सर्व पात्रे आहेत. त्यामुळे किती तीव्र सामाजिक भान लेखकाला आहे हेही आपल्याला जाणवते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात नातेसंबंध दूरावत असताना, नातेसंबंध दृढ करणाऱ्या या कथा प्रत्येक वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या कथांमध्ये कल्पनाशक्ती आहे. वास्तवता आहे. पण याच्या जोडीला कथालेखक म्हणून जी एक संवेदनशीलता लागते, जी एक तरलता लागते आणि मुलांच्या कथांमध्ये जो एक हळुवारपणा आणि नाजूकता आवश्यक असते ते सगळे गुण या कथेमध्ये ओतप्रोत भरलेले आहेत. म्हणून या कथा फक्त लहानच नाही तर मोठ्यांनाही गुंतवून ठेवणाऱ्या आहेत. स्थळ आणि काळानुसार बदलणारी भाषा आणि प्रसंगानुसार बदलणारं वर्णन या कथेच्या जमेच्या बाजू आहेत. यामुळे या कथा वाचकाला पकडून ठेवतात. आणि काही एक सामाजिक भान आणि साहित्यिक जाण या कथा देतात. आणि हेच या कथेचे मोठे यश आहे. - बालाजी मदन इंगळे ...Read more