* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GIRLS OF RIYADH
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184981056
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 286
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN RAJAA ALSANEA BOLDLY CHOSE TO OPEN UP THE HIDDEN WORLD OF SAUDI WOMEN—THEIR PRIVATE LIVES AND THEIR CONFLICTS WITH THE TRADITIONS OF THEIR CULTURE—SHE CAUSED A SENSATION ACROSS THE ARAB WORLD. NOW IN ENGLISH, ALSANEA’S TALE OF THE PERSONAL STRUGGLES OF FOUR YOUNG UPPER-CLASS WOMEN OFFERS WESTERNERS AN UNPRECEDENTED GLIMPSE INTO A SOCIETY OFTEN VEILED FROM VIEW. LIVING IN RESTRICTIVE RIYADH BUT TRAVELING ALL OVER THE GLOBE, THESE MODERN SAUDI WOMEN LITERALLY AND FIGURATIVELY SHED TRADITIONAL GARB AS THEY SEARCH FOR LOVE, FULFILLMENT, AND THEIR PLACE SOMEWHERE IN BETWEEN WESTERN SOCIETY AND THEIR ISLAMIC HOME.
त्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारची प्रार्थना संपल्यावर एक ई-मेल ऑनलाईन नेटवर्कवरील सदस्यांत प्रसारित केली जाते. रियाधमधील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गाम्राह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार उच्च स्तरीय विद्यार्थिनींच्या आयुष्यातील विदारक वास्तव वर्षभराच्या कालावधीत समोर आले. एकीकडे उच्च स्तरात आणि दुसरीकडे रूढींमध्ये अडकलेल्या या मुली आहेत. या पेचातून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नकळत केलेले डेटिंग, अनुभवलेले शहरी जगणे, सेक्स आणि यातून त्यांच्या आयुष्याची झालेली पडझड आपल्यासमोर येते. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणीला अजूनही जुन्या पद्धतीने जगणाऱ्या समाजात वाढत असताना, न संपणाऱ्या सांस्कृतिक मतभेदांना सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या तरुण सौदी स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या जीवनातून प्रकटलेली एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय जाणीव म्हणजे ‘गल्र्स ऑफ रियाध’! त्यांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणाऱ्या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #RAJJAALSANEA #SNEHALJOSHI #MYNAMEISSALMA #GIRLSODRIYADH #गर्ल्सऑफरियाध
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 20-6-10

    मुस्लीम जगतातील अनेक महिला लिहित्या होत आहेत तसतशा अनेक वेगवेगळ्या अनुभूती जगापुढे येत आहेत. या शृंखलेतील दोन लक्षवेधी प्रयत्न म्हणून `गर्ल्स ऑफ रियाध’ आणि `सर्कल ऑफ लाईट’ या अनुवादांकडे पाहता येतं. मध्यपूर्वेतील मुस्लिम समाज आजही स्त्रियांनामोकळेपण, स्वातंत्र्य द्यायला तयार नाही. इराण वगैरे देशात काही काळ स्त्रियांना शिक्षण, कलांची आराधना, नोकरी व्यवसायनिमित्त स्वतंत्र आणि एकटे राहण्याची मुभा वगैरे सुधारणावादी पर्व येऊन गेले; परंतु खोमेनीच्या अमदानीत पुन्हा जुने मूलतत्ववादी वातावरण स्त्रियांना घरातच बंदिस्त करण्याच्या दिशेने अधिकाधिक कडवे आणि कडक बनत गेले. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेने पुस्तक लिहून आपल्या व्यथा-वेदना मांडल्या आणि सौदी अरेबियातील सनातनी लोक खवळून उठले तर नवल नाही. `गर्ल्स ऑफ रियाध’ या मूळ अरेबिक भाषेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद २००७ मध्ये प्रसिद्ध झाला आणि आता त्याचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे बाजारात आला आहे. हे पुस्तक रजा अल्सानिया या महिलेने लिहिले आहे. सौदी स्त्रियांची प्रतिमा डागावण्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. पण तिने त्याला भीक घातली नाही. तिचे धाडस थक्क करणारे आहे. ती लिहिते, जिथे दाढीवाले शेख आपल्या तंबूत जनान्यातील सुंदर स्त्रियांच्या घोळक्यात शृंगार करत बसलेले असतात असा देश म्हणजे सौदी अरेबिया. पाश्चात्य माणसाच्या मनात अरेबियन नाइट्सचा देश, पेट्रोलच्या प्रचंड साठ्यांमुळे श्रीमंत झालेला देश अशी सौदी अरेबियाची प्रतिमा घट्ट स्थिरावली आहे. ही प्रतिमा बिन लादेनच्या दहशतवादाने काहीशी डळमळली खरी; पण स्त्रियांच्या बाबतीत कायमच राहावी अशीच सद्यस्थिती आहे. परंतु या सनातनी, कर्मठ राजवटीला आता खिंडार पडत आहेत हेही खरे आहे. रुढीवादी समाजातल्या मुली आता उच्च शिक्षणासाठी कॉलेज वसतिगृहात राहतात. गोषा वगैरे न पाळता तरुण मुलांबरोबर मोकळेपणाने वावरतात, नोकरी व्यवसाय करतात. पुरुषांच्या अधिपत्त्याखाली राहूनही आपली अस्मिता जपतात, प्रेमात पडू शकतात आणि प्रेमभंगाचाही सामना करु शकतात. `गर्ल्स ऑफ रियाध’ या कादंबरीतील गामराह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार श्रीमंत इस्लामी घराण्यातील तरुणी रियाध विद्यापीठात पाठ्यपुस्तकाबरोबर प्रेमाचे पाठही गिरवतात आणि आपल्या पालकांनाही कळवतात. हे करताना काही फासे उलटे पडतात आणि अनर्थही घडतात. परंतु पालकांच्या मनमानीला आव्हान देण्याचे आणि आपण केलेल्या कर्माची जबाबदारी घेण्याची परिपक्वताही दाखवतात. अरब राष्ट्रातील या बंडखोर तरुणी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जीवनाच्या आणि कृतीच्या माध्यमातूनच प्रकट करतात. इस्लाममध्ये परिवर्तन होत आहे, असा निष्कर्ष या कादंबरीवरुन काढणे योग्य ठरेल असे नाही. पण ते होत आहे हे लक्षात येते एवढे खरे. या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे इंटरनेटयुगाला साजेसे तंत्र. ई-मेल्स सीदेहवेनफदाने सीदेहवेनफदा या याहू ग्रुपला १३ फेब्रुवारी २००४ ते १८ फेब्रुवारी २००५ या दरम्यान पाठवल्या आहेत. या ५० पत्रांतून चार मैत्रिणींच्या एका वर्षातील बऱ्यावाईट घटनांची नोंद घेतली गेली आहे. निझार या तरुणावर लामीस प्रेम करत होती. त्याच्याशी निकाह करुन ती कॅनडामध्ये छोट्या बाळासह पदवी परिक्षेची तयारी करत आहे. मिचैली बीएमडब्ल्यू कार दिमाखात चालवते. लामीसबरोबर शांपेनची मजा लुटते. पहिल्याच पत्रात गामराहच्या विवाहाचं वर्णन येतं. लग्नानंतर चुंबन घेण्याचा आग्रह होतो. इटलीत हनीमून. हनिमूनला जाण्याआधी आई तिला पुरुषांची आसक्ती पेटवण्याचा कानमंत्र देते. नवरा शिकागोला डॉक्टरेट करणारा, सादीम बिझनेस मॅनेजमेंटची पदवीधर. दिसायला सुंदर. बालीदशी तिचं लग्न होतं. नवऱ्याला सुख देण्यासाठी काहीही करण्याची प्रतिज्ञाच तिने केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षेत ती नापास होते. या ई-मेल पत्रांच्या विषयांवरुन या चौघां मैत्रिणींच्या जीवनातील घडामोडींची कल्पना येते. पहिल्याच पत्रात `मी माझ्या मित्रांबद्दल लिहिणार आहे असे स्पष्ट करुन हे संकेतस्थळ उघडे नागडे सत्य वाचण्याचं धैर्य असणाऱ्या आणि ह्या वेडेपणाच्या साहसात टिकून राहण्याची चिकाटी असणाऱ्या सहनशील सदस्यांसाठी आहे’ असे स्पष्ट केले आहे. मैत्रिणींचा सल्ला न घेता आपण या ई-मेल लिहिण्यास आरंभ केला आहे कारण, या मैत्रिणी पुरुषांच्या छायेत दबकून, घाबरुन कशाबशा जगत आहेत. कारागृहातल्या बंदिनीसारखं त्यांचं आयुष्य शुष्क झालं आहे. कुलूप लावून बंद केलेल्या जनानखान्यातल्या झगझगीत कपड्यात नटलेल्या बाहुल्यांप्रमाणं त्या वावरत आहेत. स्फटिकपात्रात मरणाऱ्या फुलपाखरांसारख्या गुदमरत आहेत. त्यांच्या घोट्याभोवती रक्ताळलेल्या साखळ्या बांधलेल्या आहेत. रात्री त्यांना पुरुषी विनवण्यांना इच्छेविरुध्द सामोरे जावे लागते. त्या सर्वांबद्दल या ई-मेल मध्ये मोकळेपणाने लिहिण्याचा इरादा पहिल्याच पत्रात स्पष्ट केला आहे. विनोदी, तिरकस, उपरोधपूर्ण शेरेबाजी करण्यात लेखिकेचा हातखंडा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more