* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GIRLS OF RIYADH
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184981056
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 286
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN RAJAA ALSANEA BOLDLY CHOSE TO OPEN UP THE HIDDEN WORLD OF SAUDI WOMEN—THEIR PRIVATE LIVES AND THEIR CONFLICTS WITH THE TRADITIONS OF THEIR CULTURE—SHE CAUSED A SENSATION ACROSS THE ARAB WORLD. NOW IN ENGLISH, ALSANEA’S TALE OF THE PERSONAL STRUGGLES OF FOUR YOUNG UPPER-CLASS WOMEN OFFERS WESTERNERS AN UNPRECEDENTED GLIMPSE INTO A SOCIETY OFTEN VEILED FROM VIEW. LIVING IN RESTRICTIVE RIYADH BUT TRAVELING ALL OVER THE GLOBE, THESE MODERN SAUDI WOMEN LITERALLY AND FIGURATIVELY SHED TRADITIONAL GARB AS THEY SEARCH FOR LOVE, FULFILLMENT, AND THEIR PLACE SOMEWHERE IN BETWEEN WESTERN SOCIETY AND THEIR ISLAMIC HOME.
त्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारची प्रार्थना संपल्यावर एक ई-मेल ऑनलाईन नेटवर्कवरील सदस्यांत प्रसारित केली जाते. रियाधमधील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गाम्राह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार उच्च स्तरीय विद्यार्थिनींच्या आयुष्यातील विदारक वास्तव वर्षभराच्या कालावधीत समोर आले. एकीकडे उच्च स्तरात आणि दुसरीकडे रूढींमध्ये अडकलेल्या या मुली आहेत. या पेचातून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नकळत केलेले डेटिंग, अनुभवलेले शहरी जगणे, सेक्स आणि यातून त्यांच्या आयुष्याची झालेली पडझड आपल्यासमोर येते. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणीला अजूनही जुन्या पद्धतीने जगणाऱ्या समाजात वाढत असताना, न संपणाऱ्या सांस्कृतिक मतभेदांना सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या तरुण सौदी स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या जीवनातून प्रकटलेली एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय जाणीव म्हणजे ‘गल्र्स ऑफ रियाध’! त्यांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणाऱ्या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #RAJJAALSANEA #SNEHALJOSHI #MYNAMEISSALMA #GIRLSODRIYADH #गर्ल्सऑफरियाध
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 20-6-10

    मुस्लीम जगतातील अनेक महिला लिहित्या होत आहेत तसतशा अनेक वेगवेगळ्या अनुभूती जगापुढे येत आहेत. या शृंखलेतील दोन लक्षवेधी प्रयत्न म्हणून `गर्ल्स ऑफ रियाध’ आणि `सर्कल ऑफ लाईट’ या अनुवादांकडे पाहता येतं. मध्यपूर्वेतील मुस्लिम समाज आजही स्त्रियांनामोकळेपण, स्वातंत्र्य द्यायला तयार नाही. इराण वगैरे देशात काही काळ स्त्रियांना शिक्षण, कलांची आराधना, नोकरी व्यवसायनिमित्त स्वतंत्र आणि एकटे राहण्याची मुभा वगैरे सुधारणावादी पर्व येऊन गेले; परंतु खोमेनीच्या अमदानीत पुन्हा जुने मूलतत्ववादी वातावरण स्त्रियांना घरातच बंदिस्त करण्याच्या दिशेने अधिकाधिक कडवे आणि कडक बनत गेले. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेने पुस्तक लिहून आपल्या व्यथा-वेदना मांडल्या आणि सौदी अरेबियातील सनातनी लोक खवळून उठले तर नवल नाही. `गर्ल्स ऑफ रियाध’ या मूळ अरेबिक भाषेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद २००७ मध्ये प्रसिद्ध झाला आणि आता त्याचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे बाजारात आला आहे. हे पुस्तक रजा अल्सानिया या महिलेने लिहिले आहे. सौदी स्त्रियांची प्रतिमा डागावण्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. पण तिने त्याला भीक घातली नाही. तिचे धाडस थक्क करणारे आहे. ती लिहिते, जिथे दाढीवाले शेख आपल्या तंबूत जनान्यातील सुंदर स्त्रियांच्या घोळक्यात शृंगार करत बसलेले असतात असा देश म्हणजे सौदी अरेबिया. पाश्चात्य माणसाच्या मनात अरेबियन नाइट्सचा देश, पेट्रोलच्या प्रचंड साठ्यांमुळे श्रीमंत झालेला देश अशी सौदी अरेबियाची प्रतिमा घट्ट स्थिरावली आहे. ही प्रतिमा बिन लादेनच्या दहशतवादाने काहीशी डळमळली खरी; पण स्त्रियांच्या बाबतीत कायमच राहावी अशीच सद्यस्थिती आहे. परंतु या सनातनी, कर्मठ राजवटीला आता खिंडार पडत आहेत हेही खरे आहे. रुढीवादी समाजातल्या मुली आता उच्च शिक्षणासाठी कॉलेज वसतिगृहात राहतात. गोषा वगैरे न पाळता तरुण मुलांबरोबर मोकळेपणाने वावरतात, नोकरी व्यवसाय करतात. पुरुषांच्या अधिपत्त्याखाली राहूनही आपली अस्मिता जपतात, प्रेमात पडू शकतात आणि प्रेमभंगाचाही सामना करु शकतात. `गर्ल्स ऑफ रियाध’ या कादंबरीतील गामराह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार श्रीमंत इस्लामी घराण्यातील तरुणी रियाध विद्यापीठात पाठ्यपुस्तकाबरोबर प्रेमाचे पाठही गिरवतात आणि आपल्या पालकांनाही कळवतात. हे करताना काही फासे उलटे पडतात आणि अनर्थही घडतात. परंतु पालकांच्या मनमानीला आव्हान देण्याचे आणि आपण केलेल्या कर्माची जबाबदारी घेण्याची परिपक्वताही दाखवतात. अरब राष्ट्रातील या बंडखोर तरुणी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जीवनाच्या आणि कृतीच्या माध्यमातूनच प्रकट करतात. इस्लाममध्ये परिवर्तन होत आहे, असा निष्कर्ष या कादंबरीवरुन काढणे योग्य ठरेल असे नाही. पण ते होत आहे हे लक्षात येते एवढे खरे. या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे इंटरनेटयुगाला साजेसे तंत्र. ई-मेल्स सीदेहवेनफदाने सीदेहवेनफदा या याहू ग्रुपला १३ फेब्रुवारी २००४ ते १८ फेब्रुवारी २००५ या दरम्यान पाठवल्या आहेत. या ५० पत्रांतून चार मैत्रिणींच्या एका वर्षातील बऱ्यावाईट घटनांची नोंद घेतली गेली आहे. निझार या तरुणावर लामीस प्रेम करत होती. त्याच्याशी निकाह करुन ती कॅनडामध्ये छोट्या बाळासह पदवी परिक्षेची तयारी करत आहे. मिचैली बीएमडब्ल्यू कार दिमाखात चालवते. लामीसबरोबर शांपेनची मजा लुटते. पहिल्याच पत्रात गामराहच्या विवाहाचं वर्णन येतं. लग्नानंतर चुंबन घेण्याचा आग्रह होतो. इटलीत हनीमून. हनिमूनला जाण्याआधी आई तिला पुरुषांची आसक्ती पेटवण्याचा कानमंत्र देते. नवरा शिकागोला डॉक्टरेट करणारा, सादीम बिझनेस मॅनेजमेंटची पदवीधर. दिसायला सुंदर. बालीदशी तिचं लग्न होतं. नवऱ्याला सुख देण्यासाठी काहीही करण्याची प्रतिज्ञाच तिने केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षेत ती नापास होते. या ई-मेल पत्रांच्या विषयांवरुन या चौघां मैत्रिणींच्या जीवनातील घडामोडींची कल्पना येते. पहिल्याच पत्रात `मी माझ्या मित्रांबद्दल लिहिणार आहे असे स्पष्ट करुन हे संकेतस्थळ उघडे नागडे सत्य वाचण्याचं धैर्य असणाऱ्या आणि ह्या वेडेपणाच्या साहसात टिकून राहण्याची चिकाटी असणाऱ्या सहनशील सदस्यांसाठी आहे’ असे स्पष्ट केले आहे. मैत्रिणींचा सल्ला न घेता आपण या ई-मेल लिहिण्यास आरंभ केला आहे कारण, या मैत्रिणी पुरुषांच्या छायेत दबकून, घाबरुन कशाबशा जगत आहेत. कारागृहातल्या बंदिनीसारखं त्यांचं आयुष्य शुष्क झालं आहे. कुलूप लावून बंद केलेल्या जनानखान्यातल्या झगझगीत कपड्यात नटलेल्या बाहुल्यांप्रमाणं त्या वावरत आहेत. स्फटिकपात्रात मरणाऱ्या फुलपाखरांसारख्या गुदमरत आहेत. त्यांच्या घोट्याभोवती रक्ताळलेल्या साखळ्या बांधलेल्या आहेत. रात्री त्यांना पुरुषी विनवण्यांना इच्छेविरुध्द सामोरे जावे लागते. त्या सर्वांबद्दल या ई-मेल मध्ये मोकळेपणाने लिहिण्याचा इरादा पहिल्याच पत्रात स्पष्ट केला आहे. विनोदी, तिरकस, उपरोधपूर्ण शेरेबाजी करण्यात लेखिकेचा हातखंडा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो