* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: GIRLS OF RIYADH
  • Availability : Available
  • Translators : SNEHAL JOSHI
  • ISBN : 9788184981056
  • Edition : 2
  • Publishing Year : APRIL 2010
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 286
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY & TRUE STORIES
Quantity
Buying Options:
  • Print Books:
WHEN RAJAA ALSANEA BOLDLY CHOSE TO OPEN UP THE HIDDEN WORLD OF SAUDI WOMEN—THEIR PRIVATE LIVES AND THEIR CONFLICTS WITH THE TRADITIONS OF THEIR CULTURE—SHE CAUSED A SENSATION ACROSS THE ARAB WORLD. NOW IN ENGLISH, ALSANEA’S TALE OF THE PERSONAL STRUGGLES OF FOUR YOUNG UPPER-CLASS WOMEN OFFERS WESTERNERS AN UNPRECEDENTED GLIMPSE INTO A SOCIETY OFTEN VEILED FROM VIEW. LIVING IN RESTRICTIVE RIYADH BUT TRAVELING ALL OVER THE GLOBE, THESE MODERN SAUDI WOMEN LITERALLY AND FIGURATIVELY SHED TRADITIONAL GARB AS THEY SEARCH FOR LOVE, FULFILLMENT, AND THEIR PLACE SOMEWHERE IN BETWEEN WESTERN SOCIETY AND THEIR ISLAMIC HOME.
त्या गुप्त जगातील एक दृश्य : चार तरुण मुलींचा प्रेम, अभिलाषा आणि इस्लामिक रूढी ह्यांच्या अरुंद खाडीतून केलेला तो प्रवास. प्रत्येक आठवड्यात शुक्रवारची प्रार्थना संपल्यावर एक ई-मेल ऑनलाईन नेटवर्कवरील सदस्यांत प्रसारित केली जाते. रियाधमधील विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या गाम्राह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार उच्च स्तरीय विद्यार्थिनींच्या आयुष्यातील विदारक वास्तव वर्षभराच्या कालावधीत समोर आले. एकीकडे उच्च स्तरात आणि दुसरीकडे रूढींमध्ये अडकलेल्या या मुली आहेत. या पेचातून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या नकळत केलेले डेटिंग, अनुभवलेले शहरी जगणे, सेक्स आणि यातून त्यांच्या आयुष्याची झालेली पडझड आपल्यासमोर येते. एकविसाव्या शतकातील सुशिक्षित तरुणीला अजूनही जुन्या पद्धतीने जगणाऱ्या समाजात वाढत असताना, न संपणाऱ्या सांस्कृतिक मतभेदांना सामोरे जाताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या तरुण सौदी स्त्रियांच्या गुंतागुंतीच्या जीवनातून प्रकटलेली एक दुर्मीळ आणि अविस्मरणीय जाणीव म्हणजे ‘गर्ल्स ऑफ रियाध’! त्यांच्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ह्या आपल्याहून कितीतरी वेगळ्या असणाऱ्या संस्कृतीच्या समाजात प्रकट होत आहेत, ही एक लक्षणीय बाब म्हणावी लागेल.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #BIOGRAPHYA&TRUESTORIES #RAJJAALSANEA #SNEHALJOSHI #MYNAMEISSALMA #GIRLSODRIYADH #गर्ल्सऑफरियाध
Customer Reviews
  • Rating StarDAINIK NAVSHAKTI 20-6-10

    मुस्लीम जगतातील अनेक महिला लिहित्या होत आहेत तसतशा अनेक वेगवेगळ्या अनुभूती जगापुढे येत आहेत. या शृंखलेतील दोन लक्षवेधी प्रयत्न म्हणून `गर्ल्स ऑफ रियाध’ आणि `सर्कल ऑफ लाईट’ या अनुवादांकडे पाहता येतं. मध्यपूर्वेतील मुस्लिम समाज आजही स्त्रियांनामोकळेपण, स्वातंत्र्य द्यायला तयार नाही. इराण वगैरे देशात काही काळ स्त्रियांना शिक्षण, कलांची आराधना, नोकरी व्यवसायनिमित्त स्वतंत्र आणि एकटे राहण्याची मुभा वगैरे सुधारणावादी पर्व येऊन गेले; परंतु खोमेनीच्या अमदानीत पुन्हा जुने मूलतत्ववादी वातावरण स्त्रियांना घरातच बंदिस्त करण्याच्या दिशेने अधिकाधिक कडवे आणि कडक बनत गेले. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेने पुस्तक लिहून आपल्या व्यथा-वेदना मांडल्या आणि सौदी अरेबियातील सनातनी लोक खवळून उठले तर नवल नाही. `गर्ल्स ऑफ रियाध’ या मूळ अरेबिक भाषेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद २००७ मध्ये प्रसिद्ध झाला आणि आता त्याचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाऊसतर्फे बाजारात आला आहे. हे पुस्तक रजा अल्सानिया या महिलेने लिहिले आहे. सौदी स्त्रियांची प्रतिमा डागावण्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. पण तिने त्याला भीक घातली नाही. तिचे धाडस थक्क करणारे आहे. ती लिहिते, जिथे दाढीवाले शेख आपल्या तंबूत जनान्यातील सुंदर स्त्रियांच्या घोळक्यात शृंगार करत बसलेले असतात असा देश म्हणजे सौदी अरेबिया. पाश्चात्य माणसाच्या मनात अरेबियन नाइट्सचा देश, पेट्रोलच्या प्रचंड साठ्यांमुळे श्रीमंत झालेला देश अशी सौदी अरेबियाची प्रतिमा घट्ट स्थिरावली आहे. ही प्रतिमा बिन लादेनच्या दहशतवादाने काहीशी डळमळली खरी; पण स्त्रियांच्या बाबतीत कायमच राहावी अशीच सद्यस्थिती आहे. परंतु या सनातनी, कर्मठ राजवटीला आता खिंडार पडत आहेत हेही खरे आहे. रुढीवादी समाजातल्या मुली आता उच्च शिक्षणासाठी कॉलेज वसतिगृहात राहतात. गोषा वगैरे न पाळता तरुण मुलांबरोबर मोकळेपणाने वावरतात, नोकरी व्यवसाय करतात. पुरुषांच्या अधिपत्त्याखाली राहूनही आपली अस्मिता जपतात, प्रेमात पडू शकतात आणि प्रेमभंगाचाही सामना करु शकतात. `गर्ल्स ऑफ रियाध’ या कादंबरीतील गामराह, मिचैल्ली, सादीम आणि लामीस या चार श्रीमंत इस्लामी घराण्यातील तरुणी रियाध विद्यापीठात पाठ्यपुस्तकाबरोबर प्रेमाचे पाठही गिरवतात आणि आपल्या पालकांनाही कळवतात. हे करताना काही फासे उलटे पडतात आणि अनर्थही घडतात. परंतु पालकांच्या मनमानीला आव्हान देण्याचे आणि आपण केलेल्या कर्माची जबाबदारी घेण्याची परिपक्वताही दाखवतात. अरब राष्ट्रातील या बंडखोर तरुणी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा जीवनाच्या आणि कृतीच्या माध्यमातूनच प्रकट करतात. इस्लाममध्ये परिवर्तन होत आहे, असा निष्कर्ष या कादंबरीवरुन काढणे योग्य ठरेल असे नाही. पण ते होत आहे हे लक्षात येते एवढे खरे. या कादंबरीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे इंटरनेटयुगाला साजेसे तंत्र. ई-मेल्स सीदेहवेनफदाने सीदेहवेनफदा या याहू ग्रुपला १३ फेब्रुवारी २००४ ते १८ फेब्रुवारी २००५ या दरम्यान पाठवल्या आहेत. या ५० पत्रांतून चार मैत्रिणींच्या एका वर्षातील बऱ्यावाईट घटनांची नोंद घेतली गेली आहे. निझार या तरुणावर लामीस प्रेम करत होती. त्याच्याशी निकाह करुन ती कॅनडामध्ये छोट्या बाळासह पदवी परिक्षेची तयारी करत आहे. मिचैली बीएमडब्ल्यू कार दिमाखात चालवते. लामीसबरोबर शांपेनची मजा लुटते. पहिल्याच पत्रात गामराहच्या विवाहाचं वर्णन येतं. लग्नानंतर चुंबन घेण्याचा आग्रह होतो. इटलीत हनीमून. हनिमूनला जाण्याआधी आई तिला पुरुषांची आसक्ती पेटवण्याचा कानमंत्र देते. नवरा शिकागोला डॉक्टरेट करणारा, सादीम बिझनेस मॅनेजमेंटची पदवीधर. दिसायला सुंदर. बालीदशी तिचं लग्न होतं. नवऱ्याला सुख देण्यासाठी काहीही करण्याची प्रतिज्ञाच तिने केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षेत ती नापास होते. या ई-मेल पत्रांच्या विषयांवरुन या चौघां मैत्रिणींच्या जीवनातील घडामोडींची कल्पना येते. पहिल्याच पत्रात `मी माझ्या मित्रांबद्दल लिहिणार आहे असे स्पष्ट करुन हे संकेतस्थळ उघडे नागडे सत्य वाचण्याचं धैर्य असणाऱ्या आणि ह्या वेडेपणाच्या साहसात टिकून राहण्याची चिकाटी असणाऱ्या सहनशील सदस्यांसाठी आहे’ असे स्पष्ट केले आहे. मैत्रिणींचा सल्ला न घेता आपण या ई-मेल लिहिण्यास आरंभ केला आहे कारण, या मैत्रिणी पुरुषांच्या छायेत दबकून, घाबरुन कशाबशा जगत आहेत. कारागृहातल्या बंदिनीसारखं त्यांचं आयुष्य शुष्क झालं आहे. कुलूप लावून बंद केलेल्या जनानखान्यातल्या झगझगीत कपड्यात नटलेल्या बाहुल्यांप्रमाणं त्या वावरत आहेत. स्फटिकपात्रात मरणाऱ्या फुलपाखरांसारख्या गुदमरत आहेत. त्यांच्या घोट्याभोवती रक्ताळलेल्या साखळ्या बांधलेल्या आहेत. रात्री त्यांना पुरुषी विनवण्यांना इच्छेविरुध्द सामोरे जावे लागते. त्या सर्वांबद्दल या ई-मेल मध्ये मोकळेपणाने लिहिण्याचा इरादा पहिल्याच पत्रात स्पष्ट केला आहे. विनोदी, तिरकस, उपरोधपूर्ण शेरेबाजी करण्यात लेखिकेचा हातखंडा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more