* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
AT TIMES, I FIND MYSELF TO BE TOO GLOOMY. ALL THE IDEAS ABOUT NEW STORIES REMAIN IDLE IN MY MIND, RESEMBLING AN INACTIVE TOAD SITTING ON A STONE, DOING NOTHING. SOMEWHERE, I DO GET THE FEELING THAT I AM CARRYING MANY SINGLE BURDENS OVER MY HEAD, AND NOW THESE ALL HAVE TURNED INTO A HUGE, HEAVY LOAD. WRITING IS THE FIRST AND FOREMOST THING, OTHER THINGS ARE SECONDARY. HENCE, WHATEVER TRIES TO BLOCK THE PATH OF WRITING SHOULD BE DISCARDED FIRMLY. YET, AT TIMES, IT BECOMES IMPOSSIBLE. THE REASONS ARE VARIED. SOMETIMES, IT IS LACK OF COMPETENCY AND AT OTHER IT IS THE THOUGHT THAT PREVAILS IN MIND, SUGGESTING THAT I MYSELF AM SPOILING MY STRENGTHS, FOR REASONS UNKNOWN. DEEP IN MY MIND, I HAVE NEVER ONCE FELT THAT I HAVE ACHIEVED GREAT MANY THINGS IN THE CAPACITY OF AN AUTHOR. WOULD IT NOT HAVE BETTER TO BELIEVE IT THOUGH? AT LEAST, MY MIND WOULD HAVE BEEN ENTITLED TO THE SOLACE THAT AN INNOCENT EXPERIENCES! BUT THEN, THIS IS AGAIN YET ANOTHER THOUGHT. ALL OF A SUDDEN, MY MIND BOUNCES OFF, WANTS TO THROW AWAY EVERYTHING AND GUSH OUT. GOD KNOWS, WHAT IS GOING TO TAKE PLACE NOW!
कधीकधी मी फार निरुत्साही होतो. खडकावर बेडके बसून राहावीत तशा लेखनकल्पना मनातच राहतात. आपण एक-एक म्हणता अनेक ओझी डोक्यावर घेऊन चालतो आहोत, अशी जाण मध्येच येते. सर्वांत प्रथम लेखन, बाकी सर्व दुय्यम. त्याच्या वाटेत येणारी कोणतीही गोष्ट घट्ट मनाने बाजूला केली पाहिजे; पण तसे सामथ्र्य नसते आणि आपणच आपल्या शक्ती नासवून टाकतो. असा विचार मनात येतो, लेखक म्हणून आजवर जे मिळवले ते मोठे आहे, असे मला मनोमनी कधी वाटत नाही. तसे वाटले असते, तरी एका परीने बरे होते. भाबड्याला मिळते ती शांतता तरी मिळाली असती. मध्येच कधी मन उसळी मारते. उडी घेऊ वाटते. काय घडेल ते खरे!
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HASTACHA PAUS# VYANKTESH MAGDULKAR# DEVA SATAVA MAHAR# VADARVADICHYA VASTIT# PADAK KHOPAT# KALYA TONDACHI# EKTA# POKALI# VASAN# VIPRIT BHADALE NAHI# HASTACHA PAUS# MAYLEKARACHA MAKA!# ASACH…# TYACHI GAY VYALI #हस्ताचा पाऊस# व्यंकटेश माडगूळकर# देवा सटवा महार# वडरवाडीच्या वस्तीत# पडकं खोपटं # काळ्या तोंडाची# एकटा# पोकळी# वसाण# विपरीत घडले नाही!# हस्ताचा पाऊस#मायलेकराचा मळा!. असंच...#त्याची गाय व्याली
Customer Reviews
  • Rating StarHemant Latkar

    हस्ताचा पाऊस हे व्यंकटेश माडगूळकर यांचे कथासंग्रह छान आहे.

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

रुपाली सोनवणे

#रुक #जाना #नही लेखक: Dr. भावेश भाटिया शब्दांकन: Dr: सचिन पाचोरकर अनुवाद: सुप्रिया वकील ​अंथरून पाहून पाय पसरावे... अह्ह.. त्या निर्जीव अंथरुणासाठी आपल्या सजीव पावलांना का त्रास द्यावा? असेच एक जबरदस्त आत्मचरित्र वाचून संपवलं आणि एक ऊर्जा निर्माणकरून गेलं, पुस्तकाचं नाव आहे `रुक जाना नहीँ ​डॉ. भावेश भाटिया यांची ही प्रेरणादायी कहाणी. शाळेत असताना आलेलं अकाली अंधत्व आणि त्यानंतर खडखडीत खडतर जीवनाचा सुरू झालेला प्रवास, पण या प्रवासात खचलेल्या बालमनाला त्यांच्या आईने दिलेलं बळ, प्रेरणा व आत्मसन्मानाची शिकवण आणि स्वाभिमानाचे धडे लेखकास पुरे होते. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. चांगल्या धडधाकट व्यक्तीवर संकट आल्यावर दूर दूर पळणारे नातलग, मित्र परिवार, जातभाई... दृष्टी गेलेल्या व्यक्तीस कितपत आधार देतील? पण एक ऑपरेटर ते एक उद्योजक, `सनराईज कॅण्डल`चा विस्तार आणि स्वतःबरोबर अनेक दृष्टिहीन व्यक्तींना स्वतःच्या पायावर उभं करून रोजगार देणारा हा अवलिया किती अडथळे पार करून आलाय हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचायला हवंच. ​कुठलाही वशीला नाही की कोणाची सहानुभूती नाही, स्वबळावर विविध प्रयोग करत उद्योग यशस्वी करणं सोपं नाही. यात ज्या ज्या देवमाणसांनी हातभार लावला त्यांचा पण उल्लेख आहे, पण त्या देवमाणसांनी देखील कधीच उपकारिक भाषा न करता व स्वाभिमान न दुखावता कशी मदत करता येऊ शकते हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिलंय. लेखक फक्त उद्योग उभारून थांबले नाहीत तर त्यांनी सामाजिक जाणीवेचं भान देखील ठेवलंय. महाबळेश्वरमध्ये सनराईज कॅण्डल नावाने त्यांनी भव्य असा उद्योग परिसर आणि म्युझियम सुरू केलंय, तेथे अनेक दृष्टिहीन व्यक्तींना रोजगार मिळाला आहे त्याचबरोबर सर्वजण स्वाभिमानाने कष्ट करून जगत आहेत. हजारो आयुष्य त्यांनी उजळून टाकली आहेत. दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार सह एकून 46 पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.विशेष म्हणजे सर्व पुरस्कार त्यांच्या योग्यतेनुसार दिले आहेत.. आणी अशा हजारो पुरस्कारांचे ते मानकरी आहेत असंच वाटत..त्यांच्या कामाची दखल रिलायन्स ग्रुप ने देखील घेतली आहे.व त्यांच्या पुस्तकास प्रस्तावना देखील नीता अंबानी यांनी दिली आहे.उद्योग करताना छोट्या छोट्या गोष्टी कसा प्रभाव करतात याच वर्णन देखील त्यांनी लिहिल आहे.. ​या कार्यात महत्त्वाचं योगदान त्यांच्या धर्मपत्नी नीता भाटिया यांनी दिलं आहे. दूरदृष्टी ठेवून आपल्या पतीस प्रोत्साहन देऊन, नवीन कल्पनेसह पाठिंबा देऊन त्यांना हुरूप देण्याचं काम त्यांनी केलंय. नीता भाटिया यांचं कर्तृत्व, त्यांचं पवित्र निस्वार्थी प्रेम या पुस्तकातून वाचताना आंतरिक वेगळी ऊर्जा मिळते. कलियुगातील देवी हा शब्द व मान त्यांना समर्पक वाटतो. पुस्तक सर्व वयोगटातील वाचक वाचू शकतात. मनाने खचलेल्या पण शरीराने धडधाकट असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वरील पुस्तक नक्की वाचावं आणि आत्मसात करावं. एवढ्या उंचीवर असूनही जमिनीवर पाय असलेल व्यक्तिमत्व आहे. अगदी प्रेमळ पणे वागण बोलण सन्मान देण..ही दैवी देणगी त्यांच्या जवळ आहे. ...Read more