* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: BUDDHIBALACHA ONAMA
  • Availability : Available
  • ISBN : 9788177662245
  • Edition : 8
  • Publishing Year : JULY 1982
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 132
  • Language : MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
  • Available in Combos :N.R.VADNAP COMBO SET - 5 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
I AM WRITING THIS LETTER WITH A DEFINITE PURPOSE. I WANT TO THANK YOU FOR THE WONDERFUL BOOK, `BUDDHIBALACHA ONAMA.` I WAS ALWAYS CURIOUS ABOUT CHESS. BUT NO ONE IN MY FAMILY WAS FAMILIAR WITH THE GAME. WE KNEW ONLY THE BASIC THINGS ABOUT CHESS. SO WE STARTED PLAYING BY FOLLOWING THE BASIC RULES AND ENDING UP IN TRYING TO TAKE AWAY THE KING FROM THE BOARD. IT WAS THEN WE CAME ACROSS YOUR BOOK, WHICH GAVE US AN OPPORTUNITY TO LEARN THE GAME SCIENTIFICALLY. WHEN WE WENT THROUGH IT COMPLETELY, WE REALISED THAT WE WERE PLAYING VERY CHILDISHLY. YOU HAVE EXPLAINED THE BASIC RULES VERY SIMPLY. AN AMATEUR WILL ALSO BE ABLE TO FOLLOW THEM AND THEN PLAY ACCORDINGLY. EARLIER, I USED TO SEE THE GAMES AND MOVES IN THE DAILY `MAHARASHTRA TIMES`, BUT USED TO LIVE IT ASIDE AS IT WAS DIFFICULT FOR ME TO UNDERSTAND IT, BUT NOW AFTER GOING THROUGH YOUR BOOK, I ATTEMPT THE GAME, FINISH IT AND THEN ONLY RELAX. YOUR BOOK HAS TURNED THIS PAINFUL GAME INTO AN INTERESTING ONE. THANKS TO YOU. ONCE AGAIN I WOULD LIKE TO THANK YOU AND CONGRATULATE YOU FOR COMING UP WITH THIS INTERESTING BOOK. MAY GOD BLESS YOU AND GIVE YOU ENOUGH TIME AND ENERGY TO COME UP WITH MORE AND MORE BOOKS. SUNITA YADAV MHATRE (A STUDENT WHO IS JUST TAKING THE FIRST STEP IN THE WORLD OF CHESS).
प्रति, श्री. ना.रा. वडनप यांसी सादर प्रणाम ! ‘बुध्दिबळाचा ओनामा’ या आपल्या पुस्तकाबद्दल आपले आभार मानावे तितिके थोडेच ! बुध्दिबळाचा या खेळाविषयी मला फार उत्सुकता होती. परंतु नक्की तो कसा खेळावा याविषयी आमच्या घरात कोणालाच माहिती नव्हती. त्यामुळे बुध्दिबळाचा पट घरी आणल्यावर काही प्राथमिक गोष्टी माहित होत्या. म्हणजे सर्व बुध्दिबळाच्या चाली, त्यानुसार आम्ही आपले खेळू लागलो. शेवट फक्त राजाला कुठूनही मारण्यात होऊ लागला. बरोबरी माहितच नव्हती. पण ह्या खेळाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्यासाठी म्हणून जे पुस्तक मिळाले ते सुदैवाने आपलेच मिळाले आणि संपूर्ण पुस्तक वाचल्यावर आमच्या अगोदरच्या खेळाचे हसू यायला लागले. अगदी गंमत वाटायला लागली. खरचं, आपण इतक्या सोप्या तहेने हे नियम समजावून दिले आहेत की कोणीही ह्या खेळाला क्लिष्ट समजणार नाही. पहिले महाराष्ट्र टाईम्स मध्ये येणारे डाव मी पाहायचे, तेव्हा आपल्याला ह्यातलं काहीएक समजत नाही म्हणून दुर्लक्ष करायचे. आता तर सबंध डाव सोडवूनच उठते. हा खेळ अजिबात डोकेदुखी वाटत नाही; जो जो खेळावा तो तो अधिकच आवड उत्पन्न होते. पुन्हा एकदा आपले अभिनंदन व आभार तसेच ह्या खेळासंबंधी अधिक पुस्तके लिहिण्याचा आपला जो मानस आहे तो पार पाडावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना, कळावे. तुम्ही बुध्दिबळ खेळातले नवशिके असा किंवा नियमित खेळाडू असा वरील बोलका अभिप्राय सांगतो की, हे पुस्तक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला नित्य संग्रही ठेवावेसे वाटेल !
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#MEHTAPUBLISHINGHOUSE #MARATHIBOOKS #TRANSLATEDBOOKS #ONLINEBOOKS #NRVADNAP #BUDDHIBALSHIKA #DAAV #SHAT #CHALI #GATI #PALLA #MAAT #HUKUM #PARVA #LOPEZ #AAMISH #FRENCHBACHAV #VAJEER #SAPALE #RAJA #AADHARGRANTH #TANTRA #KHEL
Customer Reviews
  • Rating StarSourabh Kulkarni

    ना रा वडनप यांनी लिहिलेली बुद्धिबळ या खेळाविषयक पुस्तके . हा खेळ शिकण्यासाठी ही पुस्तके उपयुक्त आहेत . पुस्तके मराठीत आहेत .

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

SARTH
SARTH by DR. S. L. BHYRAPPA Rating Star
हेमंत सांबरे

गेल्या तीन दिवसांत ही कादंबरी वाचून पूर्ण झाली .. ही कादंबरी वाचून होताच मन अगदी सुन्न होऊन गेले आहे . त्याचबरोबर अनेक संमिश्र भावना मनात दाटून आल्या आहेत . #आवरण ही जगप्रसिद्ध कादंबरी वाचल्यानंतर भैरप्पा यांच्या बद्दल मनात खूप आदरभाव निर्माण झाला होा . त्यानंतर त्यांचे हे दुसरे पुस्तक म्हणजे #सार्थ आज वाचून पूर्ण केले. या कादंबरीची कथा सातव्या शतकात घडत असते . *नागभट्ट* हा कादंबरीचा नायक आहे . हा नागभट्ट तुमच्या माझ्या सारखा एक सर्वसामान्य मनुष्य आहे . भैरप्पा यांनी त्याच्या नजरेतून त्या काळात घडत असलेल्या अनेक घटनांचा सूक्ष्म आढावा आपल्या समोर अतिशय समर्थपणे मांडला आहे . हे सातवे शतक म्हणजे असे होते की वैदिक धर्माचा प्रभाव जरी जनमानसात असला तरी , बौद्ध धर्माने ही आपली पाळेमुळे पूर्ण निदान उत्तर भारत , पूर्व भारत या भागात पसरवली होती . एक सामान्य मनुष्य म्हणून नागभट्टच्या मनात सुरू असलेली विविध द्वंद , त्याची वैदिक धर्म की बौद्ध धर्म याविषयी झालेली द्विधा मनस्थिती ही लेखकाने अचूक टिपली आहे . अनेक चर्चांमधून बौद्ध तत्त्वज्ञान , वैदिक तत्त्वज्ञान यांची ओळख अतिशय सोप्या भाषेत लेखक आपल्याला करून देतात , ते वाचताना आपल्या चित्ताला एक वेगळेच समाधान मिळत राहते .. या सर्व तत्त्वज्ञानाची प्रदीर्घ चर्चा , नायकाला येत असलेले वेगवेगळे अनुभव यातून आपणही समृध्द होत जातो . मधल्या काळात नायक मथुरेला येऊन राहतो . तेव्हा तिथल्या एका नाटक मंडळींबरोबर ओळख होऊन नायकाला त्यांच्या एका नाटकात प्रत्यक्ष *कृष्णाची* भूमिका करायला मिळते . तेव्हा त्याचे नाव *कृष्णानंद* असे होते . या भूमिकेमुळे नायकाला त्या भागात प्रचंड प्रसिध्दी मिळते . या नाटकातील असलेली त्याची नायिका चंद्रिका या सुंदर स्त्री बरोबर त्याचा विशेष स्नेह होऊन त्यांचे प्रेम ही जुळते . एखादी गोष्टीचा प्रचंड अभ्यास करून त्याला मांडणे यात भैरप्पा यांचा हात कदाचित फार कमी लेखक धरू शकतील . ही कादंबरी वाचतानाही प्रत्यही जाणवत राहते . याच काळात आद्य शंकराचार्य व मंडणमिश्र यांच्यातील झालेल्या जगप्रसिद्ध वादावर दोन ते तीन प्रकरणे या पुस्तकात आली आहे . या दोन दिग्गज वैदिक ऋषी बद्दल मी इतर अनेक ठिकाणी खूप ओझरते उल्लेख ऐकले होते , पण या कादंबरीत विस्तृत माहिती मिळाली , व एक वेगळेच समाधान मिळाले . कादंबरीचा शेवट आपल्याला पुस्तकातील आधीच्या अनेक कथावस्तू पासून एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो .. याच सातव्या शतकात वायव्येकडून अरब लोकांची आक्रमणे सुरू झाली होती . तोपर्यंत भारतवर्षात लढली जाणारी युद्ध फक्त रणांगणावर लढली जात , त्याचा सामान्य जनतेला कुठलाही त्रास होत नसे . पण अरबांनी केलेल्या आक्रमण मुळे भारताचा सांस्कृतिक ढाचा कसा उद्ध्वस्त होऊ लागला याचे अचूक व सत्य वर्णन भैरप्पा यांनी केले आहे . ते वाचताना तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती ( अनावश्यक असलेली अती सहिष्णुता ) कशा प्रकारे हिंदूंचा नाश करते हे ही त्यांनी सांगितले आहे . ती सर्व शेवटची प्रकरणे आपण सर्व हिंदूंनी मुळातच वाचण्यासारखी व अभ्यास करण्यासारखी आहे . एका प्रसंगात जेव्हा काही राजे एकत्र येऊन अरबांवर आक्रमण करण्याचे योजतात , तेव्हा धूर्त अरब त्या गावातील सूर्यमंदीर भ्रष्ट करायची धमकी देऊन त्या गावातील लोकांना युद्ध करण्यापासून व बाहेरून आलेल्या सैनिकांना सहाय्य न करण्याचे वचन घेतात . त्यामुळे जे नको तेच होते , व हळूहळू तो प्रदेश अरबांच्या ताब्यात जाऊन तेथला बौद्ध , वैदिक हिंदू धर्म नष्ट होऊ लागतो , याचे विदारक वर्णन आपल्यासमोर येते . हे वाचताना मला १७५१ साली नानासाहेब पेशव्यांनी काशी वर आक्रमण करून ते क्षेत्र मुक्त करण्याच्या प्रसंगाची आठवण झाली . तेव्हाही काशी मधील जनतेने नानासाहेब पेशव्यांना रोखले होते , नाहीतर तेव्हाचा ज्ञानवापी मंदीर मुक्त झाले असते ... तेव्हाही हिंदूंची सद्गुण विकृती आड आली जशी ती सातव्या शतकात ही आड आली होती .. असो --- अनेक अद्भुत प्रसंगातून आपल्याला ही कादंबरी घेऊन जात राहते ..सातव्या शतकातील भारताचे वर्णन वाचून आपण त्यावेळच्या राजांची वृत्ती , जनतेचा स्वभाव , साधू तसेच बौद्ध भिक्खू यांचे स्वभाव, त्यांचे विचार आपल्याला कळत जातात . लेखक आपल्याला नालंदा विद्यापीठ देखील दाखवून आणतो . त्याकाळात तेथील अध्ययन कसे चालत असे , हेदेखील आपल्याला वाचायला मिळते . पुस्तकाला कादंबरीची मोकळीक असली तरी आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोन ही मिळतो , हे नक्की ! ही कादंबरी वाचून होताच, भैरप्पा यांच्या इतर सर्व कादंबऱ्या व पुस्तके वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे , व ती इच्छा ही लवकरच पूर्ण होईल ही आशा! ...Read more