* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
"AFTER THE DEMISE OF SHIV CHHATRAPATI, AURANGZEB DECIDED TO END THE MARATHA REGIME FOR ONCE AND ALL. WITH A HUGE ARMY HE ATTACKED THE MARATHAS. THIS LED TO THE FAMOUS ‘FREEDOM FIGHT OF MARATHAS’. UNDER THE ABLE LEADERSHIP OF CHHATRAPATI SAMBHAJI, CHHATRAPATI RAJARAM AND QUEEN TARABAI, THE MARATHAS FOUGHT FOR 26 LONG YEARS. IN THE END, THE ONCE GREAT MUGHAL EMPEROR WAS DEFEATED. HE HAD TO BE BURROWED IN THE SOIL OF MAHARASHTRA. DR. JAISING PAWAR, THE GREAT HISTORIAN, HAS TAKEN A REVIEW OF SOME EVENTS THAT TOOK PLACE DURING THIS FREEDOM FIGHT. A FEW TO NAME ARE: • CAPTURING CAPITAL RAIGAD- SURYAJI PISAL’S ROLE IN IT • CHHATRAPATI RAJARAM’S DANGEROUS JOURNEY TO JINJI • MARATHA’S VITALITY 1681 A.D. • MARATHA’S AMBITION TO WIN DELHI • THE TRAGEDY OF SENAPATI SANTAJI GHORPADE • THE SO-CALLED CROWN CEREMONY OF KING KARNA; CHHATRAPATI RAJARAM’S SON FROM A MAID • EVALUATION OF SWATANTRYA SAUDAMINI QUEEN TARABAI’S WORK • MARATHA’S FREEDOM FIGHT- A WIDE SEARCH AND UNDERSTANDING "
"शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेब बादशहा आपल्याअफाट लष्करी शक्तिनिशी मराठ्यांची सत्ता समूळ नष्टकरण्याच्या महत्त्वाकांक्षेने दक्षिणेत धावून आला आणि त्यातून इतिहासप्रसिद्ध ‘मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध’ सुरू झाले. छ. संभाजी, छ. राजाराम व महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठे २६ वर्षे लढले आणि अखेर बादशहास या मराठ्यांनी पराभूत करून आपल्या दफनभूमीचा शोध याच महाराष्ट्रात घ्यावयास लावला. अशा या स्वातंत्र्ययुद्धातील काही घटनांचा ज्येष्ठ इतिहाससंशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी घेतलेला हा शोध. या ग्रंथात आपण वाचाल... राजधानी रायगडचा पाडाव - सूर्याजी पिसाळची भूमिका छ. राजारामांचा जिंजीचा जीवावरचा प्रवास इ. स. १६८१ ची मराठ्याची मसलत मराठ्याची दिली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा सेनापती संताजी घोरपडे याची शोकांतिका छ. राजारामांचा दासीपुत्र राजा कर्ण याचे तथाकथित राज्यारोहण स्वातंत्र्यसौदामिनी महाराणी ताराबार्इंच्या कार्याचे मूल्यमापन मराठ्यांचा स्वातंत्र्ययुद्धाचा शोध आणि बोध "

No Records Found
No Records Found
Keywords
# MARATHYANCHE SWATANTRA YUDHA# DR. JAYSINGRAO PAWAR# SHIVCHATRAPATI# SAMBHAJIRAJE# YESUBAI# RAJARAM# DHANAJI JADHAV# SANTAJI GHORPADE# #TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध# डॉ. जयसिंगराव पवार# शिवछत्रपती# संभाजीराजे# येसूबाई# राजाराम# धनाजी जाधव# संताजी घोरपडे# खंडो बल्लाळ# हंबीरराव मोहिते# रामचंद्रपंत# औरंगजेब# जुाल्फकारखान# अब्दुर्रहीमखान# रायगड# विशाळगड# सूर्याजी पिसाळ# जिंजी# देशमुखी# बखर# मसलत# गनिमी कावा #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50%
Customer Reviews
  • Rating StarVijay Pawar

    #मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध लेखक- डॉ.जयसिंगराव पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात महाराष्ट्राने स्वराज्य स्थापनेचा सुवर्णकाळ अनुभवला , शुन्यातून सुरुवात करुन जगभरातील इतिहासकारांना दखल घ्यायला भाग पाडणार्या दैदिप्यमान स्वराज्याचा गाड डौलाने चालत होता पण अचानक नजर लागावी त्याप्रमाणे शिवाजी महाराज गेले आणि स्वराज्य पोरकं झालं , पण म्हणतात ना कार्यकर्तृत्वाचा वारसा हा एका पिढीतून दुसर्या पिढीत आपोआप जातो त्याप्रमाणेच थोरल्या महाराजानंतर एका वादळाच्या हाती स्वराज्याची कमान आली , एक कुटुंबप्रमुख , एक राज्यकर्ता , एक पालक म्हणून रयतेचा सांभाळ करणारे स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजांनी अलौकिक कारकिर्दीने स्वराज्याला सर्वोच्च स्थानी पोचवलं , महाराजानंतर स्वराज्य तेवढ्याच ताकदीनं सांभाळलं , वाढवलं ! पण अवघ्या काही वर्षातच महाराष्ट्राला पुन्हा ग्रहण लागलं छत्रपती संभाजीराजांचा फितुरांनी घात केला आणि औरंगजेबाने महाराजांना कैद करुन अनन्वित छळ करत मृत्युलाही लाजवेल अशा दुर्दैवी पद्धतीने स्वराज्याच्या धाकल्या धन्याचा खून केला, शंभुराजांच्या वादळी कारकिर्दीत इतिहासाच्या पानापानांना अमरत्व बहाल केलं . छत्रपती संभाजी राजांच्या दुर्दैवी मृत्यूपासून ते औरंगजेबाच्या अंतापर्यंतच्या धगधगत्या अग्नीकुंडाची पुराव्यानिशी केलेली उकल म्हणजे डॉ.जयसिंगराव पवारांचं #मराठ्यांचं_स्वातंत्र्ययुद्ध` हे पुस्तक ! शंभुराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात माजलेली अनागोंदी मोडीत काढत महाराणी येसूबाई बाईसाहेबांनी अमोल त्याग करत स्वराज्याचा अमृतकलश राजाराम महाराजांच्या हाती सोपवला , त्यावेळी झालेली `मराठ्यांची मसलत` लेखकाने पुराव्यानिशी मांडली आहे. सुर्याजी पिसाळाची अतुलनीय अशी गद्दारी रायगडाने अनुभवली , लेखकाने हा प्रसंग जिताजागता उभा केला आहे. सुर्याजी पिसाळाची पुराव्यानिशी चिकीत्सा यापूर्वी निश्चीतच कधी झाली नसेल . राजाराम महाराजांचा जिंजी प्रवास , रायगडाने दिलेली लढत , महाराणी येसुबाई साहेबांची निर्णयक्षमता , स्वराज्यापुढे वैयक्तिक भावभावनेला दिलेली मूठमाती , बाळ शाहूराजांसह औरंगजेबाच्या कैदेतील काळ , जिवंत उभा केला आहे लेखकाने. अरजोजी गिरजोजी यादवांचा खटला , नागोजी मानेंचा स्वार्थीपणा , धनाजी संताजीच्या सुवर्णीय कारकिर्दीची वाटचाल , राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील पडद्याआड राहिलेल्या अमूल्य घटना ,राजकारण सारं काही डोळ्यासमोर घडतंय याचीच अनुभूती लेखकाच्या प्रत्येक वाक्यातून होते. संताजी धनाजींचा वाद , त्यातून स्वार्थी लोकांनी साधलेली वेळ, संताजी आणि राजाराम महाराज यांच्यात आलेले वितुष्ट त्यातूनच राजाराम महाराजाविरुद्ध संताजीने लढलेले युद्ध त्यातील महाराजांचा झालेला पराभव आणि त्यानंतर संताजीची झालेली मनस्थिती तसेच संताजी घोरपड्यांचा दुर्दैवी खून यावर लेखकाने केलेला उहापोह मनाला चटका लावून जातो. जिंजीला सात वर्षे दिलेला झुल्फिकारखानाचा वेढा त्यातून सुटून राजाराम महाराजांनी महाराष्ट्रात केलेला प्रवास आणि सिंहगडावर झालेल्या राजाराम महाराजांच्या अकस्मात मृत्यूनंतर राजा कर्णाच्या कहानीचा केलेला उहापोह वाचकांना नवी दृष्टी देतो. राजारामपुत्र द्वितीय शिवाजीराजे यांना गादीवर बसवून महाराणी ताराबाईसाहेबांचं राजकारण, धगधगती कर्तृत्व शैली , याचकाळात उफाळून आलेल्या तोतया शाहूराजांचा बिमोड , थोरल्या शाहूराजांची सुटका, त्यानंतर झालेली मराठा गादींची शकलं , या घटना पुराव्यानिशी लेखकाने मांडून त्यावेळची महाराष्ट्राची परिस्थिती जिवंत करून दाखवली. भद्रकाली ताराराणींच्या कारकीर्दीत स्वराज्याला मिळालेली नवसंजीवनी प्रत्येक मावळ्याच्या ह्रदयात मशाल पेटवून गेली आणि उभ्या महाराष्ट्राच्या तीन पिढ्यांना नडणार्या औरंग्याला इथंच कबर खोदावी लागली. शिवरायांनी स्थापन केलेल्या आणि वाढवलेल्या स्वराज्याला राजारामकाळात नर्मदेच्या पार पोचवण्यात आणि ताराराणी काळात तापीपार पोचवण्यात मराठा मावळ्यांना यश आले होते. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध केवळ साम्राज्य वृद्धीसाठी नव्हते तर दीर्घकाळ चाललेली ती एक अस्मितेची लढाई होती. शिवशाही किंवा मराठ्यांचा इतिहास केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीएवढाच नाही तर त्यानंतरच्या इतिहासाची पुराव्यानिशी सांगोपांग चर्चा या पुस्तकाच्या माध्यमातून होते आणि इतिहास वाचकांना पुढच्या घडामोडींची ओळख या पुस्तकाच्या माध्यमातून होते. ...Read more

  • Rating StarRahul Kanakdande

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्य घशात घालायला आलेल्या औरंगझेबाला 25 वर्ष लढून मराठ्यांनी महाराष्ट्रातच गाडले, आधी राजाराम महाराज,मग त्यांच्या पत्नी ताराराणी यांच्या नेतृत्वात संताजी घोरपडे, धनाजी जाधव , रामचंद्रपंत अमात्य आणि बाक सर्व सरदार कसे लढले त्या काळातील उपलब्ध पत्रांच्या आधारे डॉ जयसिंगराव पवार यांचे `मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध` हे पुस्तक नक्की वाचा ...Read more

  • Rating StarPrashant Patil

    मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध - डॉ जयसिंगराव पवार शिवछत्रपतींच्या निधनानंतर आलमगीर बादशहा आपल्या अवाढव्य सेना सामर्थ्यानिशी हिंदवी स्वराज्य कायमचे उखडून टाकण्यासाठी दख्खनेत उतरला. या प्रचंड अशा मोगली वावटळी मध्ये कुतुबशाही आणि आदिलशाही पालापाचोळ सारख्या उडाल्या. पण मराठ्यांनी मात्र शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रयत्नांची शर्थ केली. छत्रपती शंभुराजे, छत्रपती राजाराम व ताराबाई साहेब यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तब्बल पंचवीस वर्ष लढा देऊन मोगल साम्राज्य खिळखिळे केले. औरंगजेबाला चिरविश्रांती घेण्यासाठी इथल्याच मातीत जागा शोधावी लागली. छत्रपती शिवरायांची स्वराज्य स्थापना व शंभूराजांचे बलिदान या तेजस्वी इतिहास समोर मराठ्यांचा हा लढा तसा झाकोळून जातो. प्रस्तुत पुस्तक हे याच कालखंडावर प्रकाश टाकते. पुस्तकात या लढ्याचा समग्र व सलग इतिहास मांडला नसून यातील महत्त्वाच्या घटनांवरचे स्फुट लेख आहेत. राजधानी रायगडचा पाडाव व त्यात सूर्याजी पिसाळ ची भूमिका; छत्रपती राजारामांचा जिंजी पर्यंतचा रोमहर्षक प्रवास; संताजी, धनाजी, रामचंद्रपंत व शंकराजी नारायण यांनी एकत्र येऊन केलेला सर्जाखानाचा दारुण पराभव; संताजी घोरपडे यांची शोकांतिका; मराठ्यांची दिल्ली जिंकण्याची महत्त्वाकांक्षा इत्यादी बऱ्याच विषयावरती रोचक माहिती या पुस्तकात वाचावयास मिळते. साधारण दोनशे पानांचे हे पुस्तक इतिहासप्रेमींना एका महत्त्वाच्या कालखंडाचा परिचय करून देते. ...Read more

  • Rating StarChetan Jivarak

    हे पुस्तक आज वाचून झालं खूप छान डॉ. जयसिंगराव पवार यांनी हे पुस्तक लिहल आहॆ. या पुस्तकात छत्रपती राजाराम महाराज , महाराणी ताराबाई यांनी दिलेला मोगलांशी लढा याच सविस्तर वर्णन केले आहॆ छत्रपती संभाजी महाराजचा हत्या नंतर 26 ते 27 वर्ष या भूमीत औरंगजेबला गनिमी काव्याचा युद्ध नीती ने छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांनी लढा देत राहिला. छत्रपती राजाराम महाराज यांची पहिली राणी जानकीबाई (सरसेनापती प्रतापराव गुजर याची कन्या) दुसरा राणी ताराबाई (सरसेनापती हंबीरराव मोहिते याची कन्या) तिसरी राणी राजसबाई व संभाजी महाराज राणी येसूबाई व मुलगा शाहू महाराज हे रायगड वर होते जेव्हा संभाजी महाराज कैद केली व पुढे बादशाही कैदेतच हत्या केली . दरम्यान, रायगडवर राणी येसूबाई यांनी राजाराम महाराज यांना सिंहासनारुड केले व स्वराज्यचे नवे छत्रपती घोषित केले . रायगड ला मोगलांनी वेढा दिला या वेढ्यातून राजाराम महाराज व ते त्याचा सहकार्ऱ्यानीशी गुप्तपणे बाहेर पडले त्यांचा बरोबर त्याचा पत्नी ताराबाई व राजसबाई या दोघी रायगडाबाहेर पडला . राजाराम महाराज पन्हाळा गडावरून जिजीकडे पलायन केले व पुढील 8 वर्ष स्वराज्यची राजधानी जिजी होती रायगडच्या पाडावानंतर राणी येसूबाई व मुलगा शाहू आणि राजाराम महाराज पहिली राणी जानकीबाई हे मोगलांच्या कैदी बनुन बादशाही छावणीत गेल्या . जिजीवरून महाराजांनी स्वराज्याची कामे 8ते 9 वर्ष बघितली त्यानंतर राजाराम महाराज पुन्हा स्वराज्यात आले पन्हाळा - विशाळगडास आले राजाराम महाराज स्वराज्यात आल्यावर राजधानी ही सातारा झाली साताऱ्याच्या तुलनेने विशाळगड हा फार सुरक्षित होता महाराजांनी आपला कुटुंब ला विशाळगड वर हलवले राजाराम महाराजाचा अकाली मृत्यू झाला त्यावेळेस त्याचे वय अवघे 30 वर्ष चे होते आता परत स्वराज्याची दशा ना छत्रपती ना राजा झाली होती त्यात वैधव्याचे दुःख बाजूस ठेवून ताराबाईंनी मराठ्यांच्या गादीवर आपला पुत्र शिवाजीराजे यास बसविले व लष्करी मोहिमेची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली महाराणी ताराबाई ने पुढे मोगलांशी 7/8 वर्ष आपल्या नेतृत्वाखाली संघर्षं देत राहिला महाराणी ताराबाई च्या कालखंडात मराठे नर्मदा ओलांडून मावळव्यात स्वारी करून खंडण्या वसूल लागले औरंगजेब 27 वर्ष स्वराज्यात लढ्यात राहिला पण त्याला हे स्वराज काबीज करता आलं नाही कारण हे स्वराज्य कोणी राजाच नव्हत हे स्वराज्य या रयतेचा होत 27 वर्ष चा युद्धाचा कालखंडात मराठ्यांचा राज्यात अशा तीन कारकिर्दी झाला :1 संभाजी कारकीर्द 2 राजाराम कारकीर्द 3 ताराबाई कारकीर्द यांनी औरंगजेब सघे युद्ध केले पण त्याला स्वराज्य पूर्ण काबीज करू दिले नाही ताराबाई चा नेतृत्वाखाली मराठ्याने माळवा ,गुजरात,कर्नाटक इ सुभ्यावर राजरोस प्रहार चालू ठेवला दिल्लीपती औरंगजेब बादशाह शेवटी याच महाराष्ट्रचा मातीत त्याने जगाचा निरोप घेतला ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more