* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS VOLUME SHEDS LIGHT ON AN ERA FROM THE PRE-PESHWA PERIOD TO THE DECLINE OF THE MARATHA EMPIRE. EVERYTHING FROM BALAJI VISHWANATH`S ENTRY INTO THE MARATHA KINGDOM, HIS RELATIONSHIP WITH SHAHUMAHARAJ, THE PESHWA ATTIRE HE RECEIVED, HIS ACHIEVEMENTS, THE JOURNEY FROM BALAJI VISHWANATH TO BAJIRAO II EXPLAINING THE RISE TO THE FALL OF PESHWA EMPIRE IS INCLUDED IN THIS VOLUME. BESIDES THIS, ACHIEVEMENTS OF THOSE PESHWAS, POLITICAL SITUATION DURING THEIR REIGN, BATTLES FOUGHT BY THEM, PESHWA-CHHATRAPATI RELATIONS, INTERNAL QUARRELS AMONG THE PESHWAS, BATTLE OF PANIPAT, BARBHAI`S MALICIOUS ACTIONS, OCCASIONAL BATTLES WITH THE BRITISH, TREATIES CONCLUDED, MAHADJI SHINDE`S ACHIEVEMENTS, HIS CLOSE FIGHT WITH THE BRITISH, SELF-CREATED HEGEMONY IN THE NORTH, HOLKAR`S PROWESS AND ON OCCASION TORN APART BY SELF-RIGHTEOUSNESS, POLITICS REVOLVING AROUND BADSHAHAS IN DELHI ETC. IS COVERED AS WELL. ALMOST A CENTURY OF HISTORY IS UNFOLDED IN THIS VOLUME THAT IS BACKED BY CONTINUITY, DEEP STUDY AND CONTEXT. SO THIS DOCUMENT OF ONE HUNDRED AND FIFTY YEARS OF HISTORY IS NOT ONLY USEFUL FOR SCHOLARS AND RESEARCHERS, BUT COMMON READERS WILL ALSO LIKE IT.
पेशवाईपूर्व कालखंडापासून ते मराठेशाहीच्या अस्तापर्यंतच्या कालखंडावर प्रकाश टाकणारा हा खंड आहे. बाळाजी विश्वनाथचा मराठेशाहीत प्रवेश, शाहूमहाराजांशी असलेले त्याचे संबंध, त्याला मिळालेली पेशवाईची वस्त्रे, त्याचं कर्तृत्व, बाळाजी विश्वनाथ ते दुसरा बाजीराव असा पेशवाईच्या उदयापासून ते अस्तापर्यंतचा प्रवास या खंडात अंतर्भूत केला आहे. त्या-त्या पेशव्याची कामगिरी, त्यांच्या कारकिर्दीतील राजकीय परिस्थिती, त्यांनी लढलेल्या लढाया, पेशवे-छत्रपती संबंध, पेशवाईतील अंतर्गत लाथाळ्या, पानिपतचे युद्ध, बारभाईचे कारस्थान, इंग्रजांशी वेळोवेळी झालेल्या लढाया, झालेले तह, महादजी शिंदे यांचे कर्तृत्व, त्यांनी इंग्रजांशी दिलेला निकराचा लढा, उत्तरेत स्वत:चा निर्माण केलेला दबदबा, होळकरांचा पराक्रम आणि प्रसंगी स्वामिनिष्ठेला फासलेला हरताळ, दिल्लीतील बादशहांभोवती फिरणारं राजकारण इ. जवळजवळ शंभर-सव्वाशे वर्षांचा इतिहास या खंडातून सलगतेने, अभ्यासपूर्णतेने आणि ससंदर्भ उलगडला आहे. तर शंभर-सव्वाशे वर्षांच्या इतिहासाचा हा दस्तावेज अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी तर उपयुक्त आहेच; पण सर्वसामान्य वाचकांनाही आवडेल असा आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीसाहित्य#मेहतापब्लिशिंगहाऊस#मराठीपुस्तके#ऐतिहासिक#मराठ्यांचाइतिहासखंड२पेशवाई #डॉजयसिंगरावपवार #MEHTAPUBLISHINGHOUSE#MARATHIBOOKS#HISTORICAL #MARATHYANCHAITIHASKHAND2PESHWAI#DRJAYSINGRAOPAWAR
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

वा. पां. जाधव अमरावती

`अमरावतीचे छप्पन स्वभाव एक मनोरंजक काव्यसंग्रह` `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे अमरावतीचे सुप्रसिद्ध साहित्यिक श्री जी. बी. देशमुख यांचे अमरावती नगरीचा सहज स्वभाव व ह्या नगरीच्या वेगळ्या ओळखीवर आधारित मनोरंजक पुस्तक वाचले. वाचून भरपूर मनोरंजन झाले. खर काय लिहावे या लेखकाबद्दल, मन गोंधळले. ऐतिहासिक असो, प्रवास वर्णन असो, व्यक्ती विशेष असो, अनुभवात्मक घटना घडामोडी असो कशावरही सहज लिखाण करणारा हा लेखक आहे. आता तर त्यांनी लेखनाला विनोद प्रचुर फोडणी देऊन `अमरावतीचे छप्पन स्वभाव` या काव्यसंग्रहातून अमरावतीकरांना मनोरंजनाची मेजवानीच दिली आहे. प्रत्येक शहराची व त्या शहरातील वैशिष्ट्यांची एक वेगळीच ओळख असते. दिवस जातात, काळ लोटतो, पिढ्या बदलतात मात्र जुन्या स्मृतीची चिन्हे नवीन येणाऱ्या पिढीच्या मनात गुढ निर्माण करत कायम हाक देत राहतात. अमरावतीही त्याला अपवाद नाही. बापट चौकात चौक नाही, त्या जागेवर चौरस्ता नसून टी-पॉइंट आहे, खापर्डे बगीचा म्हणून आजही ओळख आहे मात्र तेथे बगिचा नाही किंवा प्रसिद्ध गांधी चौकात गांधीचा पुतळा अथवा स्मृतीदर्शक चिन्ह अथवा उल्लेख नाही मात्र गांधी चौक अशीच ओळख जनमानसात आहे. अशा एक ना अनेक विसंगत नाम दर्शक ओळख असलेली उदाहरणे त्यात सप्रमाण आहेत. पण खरी गंमत म्हणजे कधी काळी घडलेला इतिहास त्यामध्ये दडलेला आहे हे निश्चित. या सोबतच अमरावतीकरांच्या स्वभावातला स्थायी मजेदारपणाच्या एक एका हटके गुण वैशिष्ट्याच्या गमती लेखकाने हुबेहूब अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यावरुन तत्सम रचनांचा उहापोह लेखकाने पुस्तकात केला असावा. विदेशात स्थाईक झालेल्या मूळ अमरावतीकरांना लेखकाने लिहिलेल्या गमती मनोरंजनात्मक वाटाव्या एवढी किमया जी.बी. च्या सहज लेखनाने दाखवली आहे. अमरावतीचे अग्रगण्य वृत्तपत्र दै. हिंदुस्थान मध्ये लेखकाने सतत ६ महीणे लिहीलेल्या काव्य सदरात अमरावतीच्या जनमानसाच्या हृदयाच्या ठाव घेणाऱ्या काव्य रचनांचा आठवणींनी महापूर ओसंडून गेला होता. विशेष म्हणजे ह्यात कुठेही अनावश्यक अभिनीवेष नव्हता. उलट गमतीत केलेले आत्मपरिक्षण मात्र काही प्रमाणात होते. वयस्क अमरावतीकर रसिकांना या रचना ताज्या करून त्यांच्या तारुण्यात घेऊन गेल्या हेच खरे. जी बी देशमुख या लेखकास मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रियां वरून दिसून येते. . सदर पुस्तकातील काव्यमय रचना वाचतांना अमरावतीच्या माणसाच्या वऱ्हाडभोळ्या स्वभावाची प्रचीती येते आणि वेगळाच आनंद देऊन जाते. निखळ मनोरंजन करत गुदगुल्या करणारा असा हा काव्यसंग्रह आहे. अमरावती शहराची ऐतिहासिक वैशिष्टे काव्यरूपात वाचण्याचा आनंद अमरावतीकरांना ते जिथं असतील त्या गावात, परगावात, परदेशात पुस्तक मागवून घेता येईल. ...Read more

ज्योती चेडे, मुंबई.

अमरावतीच्या वैशिष्ट्यांवर आधारीत खुमासदार छप्पन्न कवितांच्या संग्रहातील प्रत्येक कविता वाचत असताना अमरावतीच्या वातावरणाची धुंदी आपसुकच मनावर चढु लागली. सगळ्याच कविता सुंदर आहेत. एकेक कविता अमरावतीचे अप्रतिम वर्णन करते. प्रत्येक कवितेचा शेवट कुठेतरी गंभीर विचार करायला भाग पाडतो आणि मन गलबलून जाते. सगळ्याच कविता सुंदर आहेत पण माझ्या मनाला भावलेल्या व भिडलेल्या कविता आहेत `अमरावतीतल्या गमती`, `अमरावतीचे शिक्षण`, `अमरावतीचे हजरजबाबी`, `अमरावतीचे वेडे`, `अमरावतीच्या काकू` व बाकी सगळ्या. `अमरावतीचे वेडे` या कवितेत उल्लेखीत शेवटचा अश्रुंचा एक थेंब जरुर राखला जाईल. तसेच `अमरावतीच्या काकूं` ची उर्जा उरात भरून उरेल. जीवन देणाऱ्या विहीरीने कोणाचेही जीवन घेऊ नये, अशी सद्भावना मनात जागेल. अमरावतीकर जगात कुठेही असो त्यांच्या मनात एका कोपऱ्यात राजकमल चौक असतोच हे सत्य मनावर कोरले जाईल. प्रत्येक अमरावतीकराने ह्या कविता जगाव्यात. त्यासाठी हे पुस्तक संग्रही ठेवावे आणि परगावी राहणाऱ्या आपल्या अमरावतीकर आप्तेष्टांना भेटी दाखल द्याव्या. ...Read more