* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IMAGINING INDIA – IDEAS FOR A NEW CENTURY
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788184984262
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 744
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IMAGINING INDIA OFFERS A VISIONARY OUTLOOK ABOUT INDIA AND ITS BURGEONING FUTURE THROUGH THE EYES OF ITS AUTHOR NANDAN NILEKANI, WHO IS AN ACCOMPLISHED BUSINESS LEADER. AN ORIGINAL AND BALANCED PERSPECTIVE ON INDIA’S PAST, PRESENT, AND FUTURE IS PRESENTED IN AN ENGAGING MANNER. THE CENTRAL IDEAS THAT HAVE SHAPED INDIA’S GROWTH ARE REVIEWED STRONGLY INIMAGINING INDIA. INDIA’S EARLIER SOCIALIST POLICIES, WHICH STUNTED ITS GROWTH, IS LOOKED AT CRITICALLY. THE BOOK TRACES THE POLICIES AND EFFORTS OF THE PAST AND PRESENT LEADERS, WHEREIN THEY TRIED TO DEVELOP NEW FRAMEWORKS TO SUIT INDIA’S CHALLENGES. THE AUTHOR LAYS EMPHASIS ON THE ROLE PLAYED BY THE YOUTH OF THE COUNTRY IN ITS DEVELOPMENT. FURTHER, HE THROWS LIGHT ON THE IMPACT OF INFORMATION TECHNOLOGY ON BUSINESS AND GOVERNANCE. OTHER TOPICS COVERED INCLUDE LABOUR REFORM, CASTE POLITICS, URBANISATION, INFRASTRUCTURE, HIGHER EDUCATION, ENGLISH LANGUAGE, AND GLOBALISATION. HE CHARTS IDEAS THAT ARE PIVOTAL TO INDIA’S FUTURE GROWTH, AND STRESSES THAT NEW IDEAS FOR SOCIAL SECURITY, ENVIRONMENT, PUBLIC HEALTH, ETC. ARE REQUIRED TO SECURE INDIA’S FUTURE.
समकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा या पुस्तकात भारताचा प्रदीर्घ इतिहास, गुंतागुंतीचे वर्तमान आणि अनेक शक्यतांना जन्माला घालणारे भविष्य यांचा एक सुसंगत असा अन्वय लावण्याचा प्रयत्न नंदन निलेकणी यांनी केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातल्या समाजवादी धोरणांमागचे तत्कालीन उद्देश कितीही चांगले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या धोरणांची परिणती लोकशाही खिळखिळी करणाNया कुचंबल्या वर्तमानात कशी आणि का झाली, याचे सखोल विवेचन निलेकणी यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्य यांचा खंबीर आधार म्हणून उदयाला आलेली भारतातील तरुण लोकसंख्येची दमदार शक्ती हा कळीचा मुद्दा का आहे; याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत जाणाNया क्रांतीमुळे केवळ व्यापार, उद्योग आणि सरकारी कारभारातच नव्हे; तर बहुसंख्य भारतीयांच्या आयुष्यात किती रोमांचक परिवर्तन घडते आहे; याचे अत्यंत रोचक वर्णन या पुस्तकात आहे. जातीच्या गणितांवर बेतलेले राजकारण, कामगार क्षेत्रात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च शिक्षणाचे क्षेत्र आणि भारतातला इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यांसारख्या कळीच्या वादग्रस्त मुद्द्यांचे नंदन निलेकणी यांनी विस्ताराने आणि संपूर्णत: नव्या दृष्टिकोनांसह विस्तृत विवेचन केले आहे.
उत्कृष्ट अनुवादासाठी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #IMAGININGINDIA #IMAGININGINDIA–IDEASFORTHENEWCENTURY #इमॅजिनिंगइंडिया #REFERENCEANDGENERAL #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #APARNAVELANKAR #अपर्णावेलणकर #NANDANNILEKANI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 12-6-16

    नंदन निलेकणी हे नाव आधारकार्डमुळे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. कारण ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय नि:संशयपणे त्यांचेच आहे. मात्र ते इन्फोसिसचे सहसंस्थापक काही काळ सी.ई.ओ. अध्यक्ष होते. आंतराष्ट्रीय आर्थिक संबंधाच्या संशोधन संस्थेच्या कौन्सिचे सदस्य आणि एनसीएईआर चे अध्यक्ष ही त्यांची ओळख अनेकांना माहित नसेल, एक यशस्वी उद्योजक विचारवंत म्हणूनही ते आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्तीप्राप्त आहेत. लौकिकार्थाने यशस्वी असूनही भारताच्या उज्वल भवितव्याचाच विचार सातत्याने ते करीत आले आहेत. त्यासाठी प्रत्यक्षातही त्याच विविधप्रकारे निर्लोभी वृत्तीने मोठे काम केले आहे या त्यांच्या अनुभवातूनच त्यांनी भारताच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासनाच्या स्थिती स्थित्यंतरे आणि भावी दिशा असा सर्वंकष आढावा घेणारे ‘इमॅजिनिंग इंडिया’ हे पुस्तक प्रदीर्घ अभ्यास करून २००८ साली लिहिले. त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक म्हणून खूप कौतुकही झाले. त्याचा सुरेख मराठी अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी त्याच नावाने केला असून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. हे पुस्तक १) उत्क्रांत भारत २) नव्या प्रवासाला निघताना ३) वाद आणि निवास आणि ४) किस रास्ते जाना है अशा चार भागात विभागला असून शेवटी १५ पानांचे निष्कर्ष हे प्रकरण आहे. पहिल्या भागांत स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंचे औद्योगिक धोरण, समाजवादाचे आकर्षण सार्वजनिक क्षेत्राला उत्तेजन, खाजगी क्षेत्राकडे पाहण्याचा नफेखोर दृष्टिकोन त्यावरील बंधने यांचा उहापोह आहे. नोकरशाहीची बाबूगिरी आणि तिचे अडथळे यांचाही त्यांनी आढावा घेतला आहे. इंग्रजीचा प्रारंभी दुस्वास, तिचे महत्त्व, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उदय, त्याला झालेला विरोध आणि नंतरचा सहर्ष स्वीकार, तरूणांची लक्षणीय संख्या आणि सुस्थिर झालेली लोकशाही यांची मार्गक्रमणा आणि त्यावरील विचार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात बदलत्या शैक्षणिक संकल्पना, ग्रामीण लोकसंख्येचे मोठ्याप्रमाणात शहरांकडे स्थलांतर, त्याचे तोटे आणि फायदे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रगती सरकारी आणि खाजगी क्षेत्रांचे सहकार्य करकायद्यातील सुधारणा, खुले आर्थिक धोरण आणि त्याचे फायदे तोटे या सर्वावर साधक बाधक चर्चा आहे. चौथ्या भागात भारताचे रक्षण, कुपोषणाचा प्रश्न, समाजातील आर्थिक विषमता, सामाजिक सुरक्षा, ऊर्जेची कमतरता आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा विचार आणि त्या सर्वांसाठी आवश्यक असलेले सत्ता आणि संपत्ती आणि सुबत्तेचेही विकेंद्रीकरण यांची सूक्ष्म निरीक्षणे, वस्तुस्थिती आणि त्यावरील उपाययोजना विस्ताराने मोडली गेली आहे. शेवटच्या निष्कर्ष या प्रकरणात त्यांनी भारताची स्थिती सर्वंकष सुधारून तो महासत्ता बनण्याच्या दिशेने कसा गतिमान होईल याचे निष्कर्ष सकारात्मक पद्धतीने मांडले आहेत. त्याचा सकारात्मक शेवट करताना ते त्यांनी लिहिले आहे. एका नैराश्याच्या क्षणी पं. नेहरू विषादाने म्हणाले होते, ‘‘आपण सारे भारतीय नि:सत्व दुर्बल, निर्जीव इतके शांत आहोत की, आपल्याला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे कां?’’ पण नव्याने उदयाला आलेला भारत आज असा नाही. तो याच्या पूर्ण विरूद्ध आहे, तरूण, अस्वस्थ अधीर चैतन्याने शिगोशीग भरलेला आणि टक्क जागा! हे लिहिताना त्यांनी अनेक क्षेत्रातील दिग्गज विचारवंतांशी विचारविनिमय चर्चा केल्या आणि त्यांचे संदर्भ ठिकठिकाणी आले आहेत. ‘‘Hole in the Wall’’ सारख्या प्रयोगातून झोपडपट्टीतील सामान्य मुलांनी संगणकीय ज्ञान कसे झपाट्याने प्राप्त केले अशी अनेक उदाहरणे ही आहेत. शेवटी संदर्भसूची आणि अनुवादात मराठी प्रतिशब्द असल्याने उपयुक्तता वार्धिष्कसाठी आहे. अपर्णा वेलणकर या सिद्धहस्त लेखिकेने त्याचा अप्रतिम आणि प्रवाही अनुवाद केला आहे. त्यामुळे मराठी वाचकांना हा ज्ञान ठेवा उपलब्ध झाला आहे. त्यासाठी त्यांचे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे विशेष अभिनंदन करावयास हवे. ज्याला भारताच्या आर्थिक, औद्योगिक यशाच्या वाटचालीला रस आहे. अशा प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. सहज जाता जाता दोन हलक्या फुलक्या गोष्टी आठवल्या, पहिलं म्हणजे २००८ मध्ये मूळ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याची सुरूवात त्यांना तुमच्यासारखी चांगली माणसे राजकारणात का जात नाहीत? या प्रश्नाने झाली. त्याला त्यांनी दिलेल्या ‘‘मी उद्योजक असल्याने त्या आखाड्यात मी अस्पृश्य आहे आणि ते केलं तर टीकेचा धनी होईन.’’ या उत्तराने झाली आहे. प्रत्यक्षात पुढे २०१४ मध्ये त्यांनी बंगलोरमधून लोकसभेची निवडणूक लढविली आणि त्याचा त्यांना पराभूत होऊन प्रत्ययही आला. आणि दुसरी म्हणजे त्यांच्या पत्नी सौ. रोहिणी, पूर्वाश्रमीच्या सोमण असल्याचा उल्लेख आला आहे. म्हणजेच ते आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

A-AMITABHCHA
A-AMITABHCHA by G.B. DESHMUKH Rating Star
प्रा. डॉ . वैशाली रवी देशमुख, अमरावती

वाचनाचे फायदे सांगताना प्रसिद्ध इंग्रजी लेखक फ्रान्सिस बेकन म्हणतो `रीडिंग मेकेथ अ फुल मॅन`. वाचनामुळे माणूस परिपूर्ण होतो. क्वचित एखादं असं पुस्तक हाती येतं जे वाचल्यानंतर ह्या परिपूर्णतेची , आत्यंतिक समाधानाची जाणीव होते . नुकतंच जी. बी. देशुख यांचं `अ- अमिताभचा` हे पुस्तक हाती पडलं एका बैठकीत ते वाचून संपवलं आणि काहीतरी माहितीपर तरीही दर्जेदार आणि साहित्यिक मूल्य असणारं पुस्तक वाचण्याचा आनंद प्राप्त झाला. सीमा आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागात काम करून निवृत्त झालेल्या जीबी देशमुखांनी २०२० मध्ये अमिताभ बच्चनच्या कारकिर्दीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त त्यांच्या विविध ५० सिनेमातील भूमिकांचे विश्लेषण करणारे साप्ताहिक सदर दैनिक सकाळ मध्ये प्रकाशित केले. कोरोना काळात लिहिलेल्या या लेखमालेला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ ज्येष्ठच नाही तर तरुण वाचकांनीही या लेखमालिकेला पसंतीची पावती दिली. २०२२ मध्ये मेहता पब्लिकेशनने अमिताभ बच्चनच्या एकूण ६२ सिनेमांवर आधारित लेख `अ अमिताभचा` या पुस्तक रूपाने प्रकाशित केले. १९६९ पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीला पाच दशकांपेक्षा अधिक काळ लोटला तरीही त्याचे सिनेरसिकांच्या भावविश्वावर असलेले अधिराज्य कायम आहे. ती जादू कमी ओसरण्याचं नावच घेत नाही तर ती दिवसेंदिवस वाढत आहे . किरकोळ शरीरयष्टी, भरमसाठ उंची आणि सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येत न बसणारा चेहरा असलेला अमिताभ आणि त्याला मिळालेली अफाट लोकप्रियता याची सांगड घालणे सर्वसामान्य व्यक्तीच्या आकलनापलीकडचे आहे. अमिताभ बच्चनचे प्रचंड चाहते असलेले जी . बी देशमुख यांच्यासाठी `अ` हा अमिताभचाच आहे. परंतु केवळ एक चाहते म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं नाही तर अमिताभ बच्चनचे जे गारुड कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर आहे त्यामागची नेमकी कारणे कोणती असू शकतात हे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न त्यांनी या पुस्तकात केलेला आहे. एक रसिक, चोखंदळ प्रेक्षक, अभ्यासक आणि समीक्षक म्हणून या पुस्तकात लेखक आपल्या समोर येतात. `बेमिसाल` पासून `झुंड` या चित्रपटा पर्यंत अमिताभ बच्चनच्या कारकीर्दीतील उत्तमोत्तम ६२ सिनेमांचा लेखकांनी या पुस्तकात परामर्ष घेतलेला आहे. या चित्रपटांमधील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित सर्व बाबींचे अत्यंत अभ्यास पूर्वक रसग्रहण केलेले आहे. `अमिताभ बच्चन चांगला कलाकार आहे` किंवा `अमुक अमुक चित्रपट चांगला आहे` असं जेव्हा एखादा सर्वसामान्य प्रेक्षक म्हणतो त्यावेळेस हे आवडणं किंवा चांगलं असणं नेमकं का आहे याची उत्तरं देण्याचा प्रयत्न लेखकाने प्रत्येक लेखात केलेला आहे. प्रत्येक चित्रपटातील अमिताभ बच्चनच्या भूमिकेशी संबंधित हायलाइट्स जसे की, एखादा उत्कट प्रसंग, गाणे, नृत्य, मारामारीचे दृश्य यावर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे. आपण जर तो चित्रपट पाहिला असेल तर लेखकाने वर्णन केलेले प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात आणि बघितला नसेल तर तो चित्रपट आपण पाहिलाच पाहिजे अशी तीव्र इच्छा मनात निर्माण होते. उदाहरणार्थ, शोले या चित्रपटातील रसग्रहणात ,चेहऱ्यावरचे रेषाही ढळू न देता अमिताभने फेकलेले वन लाइनर्स, बुद्धीची चमक दाखवणारे शांतपणे केलेले विनोद, हळुवार प्रेमासाठी त्याचं आतल्या आत झुरणं , मित्राच्या मांडीवर प्राणत्यागाचे उत्कट दृश्य, आणि पिढ्यानपिढ्या लक्षात राहिलेला मावशी लीला मिश्रा सोबतचा विनोदी संवाद यांचे परिणामकारक वर्णन करून त्यांनी अमिताभची उत्तुंग अभिनय क्षमता उलगडून दाखवली आहे. या पुस्तकाला वाचनीय बनवणारा एक घटक म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. अत्यंत साध्या, सोप्या आणि अनुभवातून आलेल्या शब्दातून लेखकाने अमिताभ बच्चन भूमिकांचा उत्तरोत्तर चढत जाणारा आलेख शब्दांकित केला आहे. लेखकाच्या भाषा प्रभुत्वाचे साक्ष देणारी अनेक वाक्य पुस्तकांमध्ये जागजागी आढळतात. एका ठिकाणी ते लिहितात, `अमिताभने सिनेमातील विनोदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून विनोदी कलाकारांवर जणू बेकारीचं संकट कोसळलं होतं. प्रेक्षकांना दिलेल्या मनोरंजनाच्या वचनाशी `नमक हलाली` करणाऱ्या प्रकाश मेहरा आणि अमिताभ या जोडीने प्रेक्षकांना `और हम नाचे बिन घुंगरू के` असा आनंद दिला होता. असेच एक सुंदर वाक्य- `अमिताभचा उंट मनोरंजनाचा अख्खा तंबू व्यापून बसला होता`. लेखकाच्या ओघवत्या आणि मनाला भिडणाऱ्या भाषा शैलीचं एक उदाहरण मिली चित्रपटाच्या रसग्रहणातील या परिषदेतून दिसून येत: "शेखरच्या मनावर चढलेली उदासीची पुटं अमिताभच्या कसदार अभिनयामुळे आपल्याला अस्वस्थ,उदास करून सोडतात. दारूच्या नशेतील अमिताभचं एक दृश्य मस्त जमलं होतं . मोबाईल, टीव्ही इत्यादी आधुनिक साधनं व्यवहारात येण्याच्या आधीचा तो काळ होता. मिली आजारामुळे घरात बंदिस्त झाल्यानंतर त्या दोघात नोकराच्या माध्यमातून जो पत्र व्यवहार होतो तो आजच्या मोबाईल चॅटिंग पेक्षाही प्रभावी वाटतो. रोज मिलीला वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर गुलदस्ता पाठवणारा अमिताभ एका चिठ्ठीत लिहितो `जो गुलदस्ता बनके खुद आ जाऊ तो कहा रखुं . ` हे रोमँटिसिझम खूप वरच्या स्तराचं होतं. अमर्याद दुःखाची वीण घट्ट करत जाताना किशोर कुमारच्या दर्दभऱ्या स्वरात `बडी सुनी, सुनी है जिंदगी ये जिंदगी` आणि `आये तुम याद मुझे गाने लगी हर धडकन` ही दोन गाणी वातावरण औदासिन्यानं भरून टाकतात. मनाचा चांगला पण लहानपणी आई वडिलांच्या बाबतीत घडलेल्या घटनेने आणि लोकांनी त्याकरिता डिवचल्यानं कच खाल्लेला, प्रेमाची आस लागलेला एक तरुण अमिताभने लाजवाब रंगवला होता. या पुस्तकाच्या रंजकतेत भर टाकणारा आणखी एक घटक म्हणजे लेखकाचे आत्मचरित्रात्मक निवेदन. प्रत्येक चित्रपटाच्या बाबतीत तो चित्रपट त्यांनी केव्हा पाहिला, कुणाबरोबर पाहिला,त्यावेळी ते किती वर्षांचे होते आणि त्या चित्रपटाचा त्यांच्या भावविश्वावर कसा परिणाम झाला याचा उल्लेख जागजागी केलेला आहे. लेखकाच्या पिढीतील वाचकांना यातून पुनः प्रत्ययाचा आनंद मिळतो. आणि आजच्या पिढीतील इतर वाचकांसाठीही ही बाब रंजक ठरते. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक म्हणतात, `1973 साली आम्ही पाचवीत असताना आम्हाला प्रथमच हिंदी सिनेमातील नायकाची `ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही`, अशी आगळीवेगळी मिजास पडद्यावर बघायला मिळाली आणि आता निवृत्तीला आलो तर हाच अद्भुत माणूस आम्हाला `पिंक` या महिलाप्रधान सिनेमात `ना का मतलब सिर्फ ना होता है`, असं ठणकावतो, `बदला` ह्या रहस्यपटात तितक्याच जोरकसपणे `सबका सच अलग अलग होता है ,` असं तत्वज्ञान मांडतो आणि अगदी अलीकडच्या `झुंड` मध्ये झोपडपट्टीतील धटिंगण मुलांच्या घोळक्याला `झुंड नाही, टीम... `म्हणायची शिकवण देतो तेव्हा आजही त्याचं म्हणणं आमच्या हृदयात थेट उतरतं .` पुस्तक वाचत असताना लेखकाच्या अफाट निरीक्षणशक्तीचे आणि अभ्यासू वृत्तीचे दर्शन घडते . विविध दिग्दर्शकांनी अमिताभच्या अभिनयक्षमतेचा केलेला वापर , अमिताभच्या डोळ्यातून सशक्तपणे व्यक्त झालेले हृदयस्पर्शी भाव, वेगवेगळ्या चित्रपटात त्याने केलेला लाथेचा उपयोग, त्याची वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आणि भारदस्त आवाजातील संवाद आणि गाणी यांचं वर्णन वाचत असताना लेखकाची संशोधक वृत्ती तर जाणवतेच परंतु आपणही हे चित्रपट पाहून हा रसास्वाद घ्यायलाच हवा ही इच्छा वाचकांच्या मनात प्रकर्षाने निर्माण होते.यातच या पुस्तकाचे फार मोठे यश सामावले आहे हे नक्की! ...Read more

SAAD GHALATO KALAHARI
SAAD GHALATO KALAHARI by MARK & DELIA OWENS Rating Star
मोहन देशपांडे नागपुर

cry of kalahari ह्या पुस्तके अनुवाद हिंदी सर्वोत्तम (RD) मध्ये कित्येक वर्षापूर्वी वाचले होते. माझ्याजवळ, जपून ठेवलेल्या पुस्तकामधे ते पुस्तक गहाळ झाले. मग 4 वर्षापूर्वी हे पुस्तक मिळाले व विकत घेतले. ते अनेक वेळा वाचून काढले, तरी प्रत्येकवेळी वेगळा नंद होतो. ती तुमची रसाळ भाषेची किमया. ह्या मुळेच Deceiption valley एकदा तरी बघता यावी ही इच्छा तुमचे अभिनंदन व धन्यवाद... ...Read more