* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IMAGINING INDIA – IDEAS FOR A NEW CENTURY
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788184984262
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 744
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IMAGINING INDIA OFFERS A VISIONARY OUTLOOK ABOUT INDIA AND ITS BURGEONING FUTURE THROUGH THE EYES OF ITS AUTHOR NANDAN NILEKANI, WHO IS AN ACCOMPLISHED BUSINESS LEADER. AN ORIGINAL AND BALANCED PERSPECTIVE ON INDIA’S PAST, PRESENT, AND FUTURE IS PRESENTED IN AN ENGAGING MANNER. THE CENTRAL IDEAS THAT HAVE SHAPED INDIA’S GROWTH ARE REVIEWED STRONGLY INIMAGINING INDIA. INDIA’S EARLIER SOCIALIST POLICIES, WHICH STUNTED ITS GROWTH, IS LOOKED AT CRITICALLY. THE BOOK TRACES THE POLICIES AND EFFORTS OF THE PAST AND PRESENT LEADERS, WHEREIN THEY TRIED TO DEVELOP NEW FRAMEWORKS TO SUIT INDIA’S CHALLENGES. THE AUTHOR LAYS EMPHASIS ON THE ROLE PLAYED BY THE YOUTH OF THE COUNTRY IN ITS DEVELOPMENT. FURTHER, HE THROWS LIGHT ON THE IMPACT OF INFORMATION TECHNOLOGY ON BUSINESS AND GOVERNANCE. OTHER TOPICS COVERED INCLUDE LABOUR REFORM, CASTE POLITICS, URBANISATION, INFRASTRUCTURE, HIGHER EDUCATION, ENGLISH LANGUAGE, AND GLOBALISATION. HE CHARTS IDEAS THAT ARE PIVOTAL TO INDIA’S FUTURE GROWTH, AND STRESSES THAT NEW IDEAS FOR SOCIAL SECURITY, ENVIRONMENT, PUBLIC HEALTH, ETC. ARE REQUIRED TO SECURE INDIA’S FUTURE.
समकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा या पुस्तकात भारताचा प्रदीर्घ इतिहास, गुंतागुंतीचे वर्तमान आणि अनेक शक्यतांना जन्माला घालणारे भविष्य यांचा एक सुसंगत असा अन्वय लावण्याचा प्रयत्न नंदन निलेकणी यांनी केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातल्या समाजवादी धोरणांमागचे तत्कालीन उद्देश कितीही चांगले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या धोरणांची परिणती लोकशाही खिळखिळी करणाNया कुचंबल्या वर्तमानात कशी आणि का झाली, याचे सखोल विवेचन निलेकणी यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्य यांचा खंबीर आधार म्हणून उदयाला आलेली भारतातील तरुण लोकसंख्येची दमदार शक्ती हा कळीचा मुद्दा का आहे; याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत जाणाNया क्रांतीमुळे केवळ व्यापार, उद्योग आणि सरकारी कारभारातच नव्हे; तर बहुसंख्य भारतीयांच्या आयुष्यात किती रोमांचक परिवर्तन घडते आहे; याचे अत्यंत रोचक वर्णन या पुस्तकात आहे. जातीच्या गणितांवर बेतलेले राजकारण, कामगार क्षेत्रात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च शिक्षणाचे क्षेत्र आणि भारतातला इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यांसारख्या कळीच्या वादग्रस्त मुद्द्यांचे नंदन निलेकणी यांनी विस्ताराने आणि संपूर्णत: नव्या दृष्टिकोनांसह विस्तृत विवेचन केले आहे.
उत्कृष्ट अनुवादासाठी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #IMAGININGINDIA #IMAGININGINDIA–IDEASFORTHENEWCENTURY #इमॅजिनिंगइंडिया #REFERENCEANDGENERAL #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #APARNAVELANKAR #अपर्णावेलणकर #NANDANNILEKANI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 12-6-16

    नंदन निलेकणी हे नाव आधारकार्डमुळे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. कारण ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय नि:संशयपणे त्यांचेच आहे. मात्र ते इन्फोसिसचे सहसंस्थापक काही काळ सी.ई.ओ. अध्यक्ष होते. आंतराष्ट्रीय आर्थिक संबंधाच्या संशोधन संस्थेच्या कौन्सिचे सदस्य आणि एनसीएईआर चे अध्यक्ष ही त्यांची ओळख अनेकांना माहित नसेल, एक यशस्वी उद्योजक विचारवंत म्हणूनही ते आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्तीप्राप्त आहेत. लौकिकार्थाने यशस्वी असूनही भारताच्या उज्वल भवितव्याचाच विचार सातत्याने ते करीत आले आहेत. त्यासाठी प्रत्यक्षातही त्याच विविधप्रकारे निर्लोभी वृत्तीने मोठे काम केले आहे या त्यांच्या अनुभवातूनच त्यांनी भारताच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासनाच्या स्थिती स्थित्यंतरे आणि भावी दिशा असा सर्वंकष आढावा घेणारे ‘इमॅजिनिंग इंडिया’ हे पुस्तक प्रदीर्घ अभ्यास करून २००८ साली लिहिले. त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक म्हणून खूप कौतुकही झाले. त्याचा सुरेख मराठी अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी त्याच नावाने केला असून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. हे पुस्तक १) उत्क्रांत भारत २) नव्या प्रवासाला निघताना ३) वाद आणि निवास आणि ४) किस रास्ते जाना है अशा चार भागात विभागला असून शेवटी १५ पानांचे निष्कर्ष हे प्रकरण आहे. पहिल्या भागांत स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंचे औद्योगिक धोरण, समाजवादाचे आकर्षण सार्वजनिक क्षेत्राला उत्तेजन, खाजगी क्षेत्राकडे पाहण्याचा नफेखोर दृष्टिकोन त्यावरील बंधने यांचा उहापोह आहे. नोकरशाहीची बाबूगिरी आणि तिचे अडथळे यांचाही त्यांनी आढावा घेतला आहे. इंग्रजीचा प्रारंभी दुस्वास, तिचे महत्त्व, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उदय, त्याला झालेला विरोध आणि नंतरचा सहर्ष स्वीकार, तरूणांची लक्षणीय संख्या आणि सुस्थिर झालेली लोकशाही यांची मार्गक्रमणा आणि त्यावरील विचार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात बदलत्या शैक्षणिक संकल्पना, ग्रामीण लोकसंख्येचे मोठ्याप्रमाणात शहरांकडे स्थलांतर, त्याचे तोटे आणि फायदे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रगती सरकारी आणि खाजगी क्षेत्रांचे सहकार्य करकायद्यातील सुधारणा, खुले आर्थिक धोरण आणि त्याचे फायदे तोटे या सर्वावर साधक बाधक चर्चा आहे. चौथ्या भागात भारताचे रक्षण, कुपोषणाचा प्रश्न, समाजातील आर्थिक विषमता, सामाजिक सुरक्षा, ऊर्जेची कमतरता आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा विचार आणि त्या सर्वांसाठी आवश्यक असलेले सत्ता आणि संपत्ती आणि सुबत्तेचेही विकेंद्रीकरण यांची सूक्ष्म निरीक्षणे, वस्तुस्थिती आणि त्यावरील उपाययोजना विस्ताराने मोडली गेली आहे. शेवटच्या निष्कर्ष या प्रकरणात त्यांनी भारताची स्थिती सर्वंकष सुधारून तो महासत्ता बनण्याच्या दिशेने कसा गतिमान होईल याचे निष्कर्ष सकारात्मक पद्धतीने मांडले आहेत. त्याचा सकारात्मक शेवट करताना ते त्यांनी लिहिले आहे. एका नैराश्याच्या क्षणी पं. नेहरू विषादाने म्हणाले होते, ‘‘आपण सारे भारतीय नि:सत्व दुर्बल, निर्जीव इतके शांत आहोत की, आपल्याला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे कां?’’ पण नव्याने उदयाला आलेला भारत आज असा नाही. तो याच्या पूर्ण विरूद्ध आहे, तरूण, अस्वस्थ अधीर चैतन्याने शिगोशीग भरलेला आणि टक्क जागा! हे लिहिताना त्यांनी अनेक क्षेत्रातील दिग्गज विचारवंतांशी विचारविनिमय चर्चा केल्या आणि त्यांचे संदर्भ ठिकठिकाणी आले आहेत. ‘‘Hole in the Wall’’ सारख्या प्रयोगातून झोपडपट्टीतील सामान्य मुलांनी संगणकीय ज्ञान कसे झपाट्याने प्राप्त केले अशी अनेक उदाहरणे ही आहेत. शेवटी संदर्भसूची आणि अनुवादात मराठी प्रतिशब्द असल्याने उपयुक्तता वार्धिष्कसाठी आहे. अपर्णा वेलणकर या सिद्धहस्त लेखिकेने त्याचा अप्रतिम आणि प्रवाही अनुवाद केला आहे. त्यामुळे मराठी वाचकांना हा ज्ञान ठेवा उपलब्ध झाला आहे. त्यासाठी त्यांचे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे विशेष अभिनंदन करावयास हवे. ज्याला भारताच्या आर्थिक, औद्योगिक यशाच्या वाटचालीला रस आहे. अशा प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. सहज जाता जाता दोन हलक्या फुलक्या गोष्टी आठवल्या, पहिलं म्हणजे २००८ मध्ये मूळ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याची सुरूवात त्यांना तुमच्यासारखी चांगली माणसे राजकारणात का जात नाहीत? या प्रश्नाने झाली. त्याला त्यांनी दिलेल्या ‘‘मी उद्योजक असल्याने त्या आखाड्यात मी अस्पृश्य आहे आणि ते केलं तर टीकेचा धनी होईन.’’ या उत्तराने झाली आहे. प्रत्यक्षात पुढे २०१४ मध्ये त्यांनी बंगलोरमधून लोकसभेची निवडणूक लढविली आणि त्याचा त्यांना पराभूत होऊन प्रत्ययही आला. आणि दुसरी म्हणजे त्यांच्या पत्नी सौ. रोहिणी, पूर्वाश्रमीच्या सोमण असल्याचा उल्लेख आला आहे. म्हणजेच ते आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more