* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: IMAGINING INDIA – IDEAS FOR A NEW CENTURY
  • Availability : Available
  • Translators : APARNA VELANKAR
  • ISBN : 9788184984262
  • Edition : 3
  • Publishing Year : NOVEMBER 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 744
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : REFERENCE AND GENERAL
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
IMAGINING INDIA OFFERS A VISIONARY OUTLOOK ABOUT INDIA AND ITS BURGEONING FUTURE THROUGH THE EYES OF ITS AUTHOR NANDAN NILEKANI, WHO IS AN ACCOMPLISHED BUSINESS LEADER. AN ORIGINAL AND BALANCED PERSPECTIVE ON INDIA’S PAST, PRESENT, AND FUTURE IS PRESENTED IN AN ENGAGING MANNER. THE CENTRAL IDEAS THAT HAVE SHAPED INDIA’S GROWTH ARE REVIEWED STRONGLY INIMAGINING INDIA. INDIA’S EARLIER SOCIALIST POLICIES, WHICH STUNTED ITS GROWTH, IS LOOKED AT CRITICALLY. THE BOOK TRACES THE POLICIES AND EFFORTS OF THE PAST AND PRESENT LEADERS, WHEREIN THEY TRIED TO DEVELOP NEW FRAMEWORKS TO SUIT INDIA’S CHALLENGES. THE AUTHOR LAYS EMPHASIS ON THE ROLE PLAYED BY THE YOUTH OF THE COUNTRY IN ITS DEVELOPMENT. FURTHER, HE THROWS LIGHT ON THE IMPACT OF INFORMATION TECHNOLOGY ON BUSINESS AND GOVERNANCE. OTHER TOPICS COVERED INCLUDE LABOUR REFORM, CASTE POLITICS, URBANISATION, INFRASTRUCTURE, HIGHER EDUCATION, ENGLISH LANGUAGE, AND GLOBALISATION. HE CHARTS IDEAS THAT ARE PIVOTAL TO INDIA’S FUTURE GROWTH, AND STRESSES THAT NEW IDEAS FOR SOCIAL SECURITY, ENVIRONMENT, PUBLIC HEALTH, ETC. ARE REQUIRED TO SECURE INDIA’S FUTURE.
समकालीन संदर्भात अत्यंत महत्त्वाच्या अशा या पुस्तकात भारताचा प्रदीर्घ इतिहास, गुंतागुंतीचे वर्तमान आणि अनेक शक्यतांना जन्माला घालणारे भविष्य यांचा एक सुसंगत असा अन्वय लावण्याचा प्रयत्न नंदन निलेकणी यांनी केला आहे. स्वातंत्र्योत्तर काळातल्या समाजवादी धोरणांमागचे तत्कालीन उद्देश कितीही चांगले असले, तरी प्रत्यक्ष व्यवहारात मात्र या धोरणांची परिणती लोकशाही खिळखिळी करणाNया कुचंबल्या वर्तमानात कशी आणि का झाली, याचे सखोल विवेचन निलेकणी यांनी केले आहे. वर्तमान आणि भविष्य यांचा खंबीर आधार म्हणून उदयाला आलेली भारतातील तरुण लोकसंख्येची दमदार शक्ती हा कळीचा मुद्दा का आहे; याचे विश्लेषण हा या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झपाट्याने होत जाणाNया क्रांतीमुळे केवळ व्यापार, उद्योग आणि सरकारी कारभारातच नव्हे; तर बहुसंख्य भारतीयांच्या आयुष्यात किती रोमांचक परिवर्तन घडते आहे; याचे अत्यंत रोचक वर्णन या पुस्तकात आहे. जातीच्या गणितांवर बेतलेले राजकारण, कामगार क्षेत्रात दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या सुधारणा, पायाभूत सुविधांची उभारणी, उच्च शिक्षणाचे क्षेत्र आणि भारतातला इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव यांसारख्या कळीच्या वादग्रस्त मुद्द्यांचे नंदन निलेकणी यांनी विस्ताराने आणि संपूर्णत: नव्या दृष्टिकोनांसह विस्तृत विवेचन केले आहे.
उत्कृष्ट अनुवादासाठी महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुरस्कार २०१६ .
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #IMAGININGINDIA #IMAGININGINDIA–IDEASFORTHENEWCENTURY #इमॅजिनिंगइंडिया #REFERENCEANDGENERAL #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #APARNAVELANKAR #अपर्णावेलणकर #NANDANNILEKANI "
Customer Reviews
  • Rating StarDAINIK AIKYA 12-6-16

    नंदन निलेकणी हे नाव आधारकार्डमुळे आपल्या प्रत्येकाला माहीत आहे. कारण ती संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय नि:संशयपणे त्यांचेच आहे. मात्र ते इन्फोसिसचे सहसंस्थापक काही काळ सी.ई.ओ. अध्यक्ष होते. आंतराष्ट्रीय आर्थिक संबंधाच्या संशोधन संस्थेच्या कौन्सिचे सदस्य आणि एनसीएईआर चे अध्यक्ष ही त्यांची ओळख अनेकांना माहित नसेल, एक यशस्वी उद्योजक विचारवंत म्हणूनही ते आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्तीप्राप्त आहेत. लौकिकार्थाने यशस्वी असूनही भारताच्या उज्वल भवितव्याचाच विचार सातत्याने ते करीत आले आहेत. त्यासाठी प्रत्यक्षातही त्याच विविधप्रकारे निर्लोभी वृत्तीने मोठे काम केले आहे या त्यांच्या अनुभवातूनच त्यांनी भारताच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि प्रशासनाच्या स्थिती स्थित्यंतरे आणि भावी दिशा असा सर्वंकष आढावा घेणारे ‘इमॅजिनिंग इंडिया’ हे पुस्तक प्रदीर्घ अभ्यास करून २००८ साली लिहिले. त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिशादर्शक म्हणून खूप कौतुकही झाले. त्याचा सुरेख मराठी अनुवाद अपर्णा वेलणकर यांनी त्याच नावाने केला असून मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. हे पुस्तक १) उत्क्रांत भारत २) नव्या प्रवासाला निघताना ३) वाद आणि निवास आणि ४) किस रास्ते जाना है अशा चार भागात विभागला असून शेवटी १५ पानांचे निष्कर्ष हे प्रकरण आहे. पहिल्या भागांत स्वातंत्र्यानंतर पं. नेहरूंचे औद्योगिक धोरण, समाजवादाचे आकर्षण सार्वजनिक क्षेत्राला उत्तेजन, खाजगी क्षेत्राकडे पाहण्याचा नफेखोर दृष्टिकोन त्यावरील बंधने यांचा उहापोह आहे. नोकरशाहीची बाबूगिरी आणि तिचे अडथळे यांचाही त्यांनी आढावा घेतला आहे. इंग्रजीचा प्रारंभी दुस्वास, तिचे महत्त्व, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा उदय, त्याला झालेला विरोध आणि नंतरचा सहर्ष स्वीकार, तरूणांची लक्षणीय संख्या आणि सुस्थिर झालेली लोकशाही यांची मार्गक्रमणा आणि त्यावरील विचार आहेत. दुसऱ्या आणि तिसऱ्या भागात बदलत्या शैक्षणिक संकल्पना, ग्रामीण लोकसंख्येचे मोठ्याप्रमाणात शहरांकडे स्थलांतर, त्याचे तोटे आणि फायदे इन्फ्रास्ट्रक्चरची प्रगती सरकारी आणि खाजगी क्षेत्रांचे सहकार्य करकायद्यातील सुधारणा, खुले आर्थिक धोरण आणि त्याचे फायदे तोटे या सर्वावर साधक बाधक चर्चा आहे. चौथ्या भागात भारताचे रक्षण, कुपोषणाचा प्रश्न, समाजातील आर्थिक विषमता, सामाजिक सुरक्षा, ऊर्जेची कमतरता आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांचा विचार आणि त्या सर्वांसाठी आवश्यक असलेले सत्ता आणि संपत्ती आणि सुबत्तेचेही विकेंद्रीकरण यांची सूक्ष्म निरीक्षणे, वस्तुस्थिती आणि त्यावरील उपाययोजना विस्ताराने मोडली गेली आहे. शेवटच्या निष्कर्ष या प्रकरणात त्यांनी भारताची स्थिती सर्वंकष सुधारून तो महासत्ता बनण्याच्या दिशेने कसा गतिमान होईल याचे निष्कर्ष सकारात्मक पद्धतीने मांडले आहेत. त्याचा सकारात्मक शेवट करताना ते त्यांनी लिहिले आहे. एका नैराश्याच्या क्षणी पं. नेहरू विषादाने म्हणाले होते, ‘‘आपण सारे भारतीय नि:सत्व दुर्बल, निर्जीव इतके शांत आहोत की, आपल्याला कशाचेच काही वाटेनासे झाले आहे कां?’’ पण नव्याने उदयाला आलेला भारत आज असा नाही. तो याच्या पूर्ण विरूद्ध आहे, तरूण, अस्वस्थ अधीर चैतन्याने शिगोशीग भरलेला आणि टक्क जागा! हे लिहिताना त्यांनी अनेक क्षेत्रातील दिग्गज विचारवंतांशी विचारविनिमय चर्चा केल्या आणि त्यांचे संदर्भ ठिकठिकाणी आले आहेत. ‘‘Hole in the Wall’’ सारख्या प्रयोगातून झोपडपट्टीतील सामान्य मुलांनी संगणकीय ज्ञान कसे झपाट्याने प्राप्त केले अशी अनेक उदाहरणे ही आहेत. शेवटी संदर्भसूची आणि अनुवादात मराठी प्रतिशब्द असल्याने उपयुक्तता वार्धिष्कसाठी आहे. अपर्णा वेलणकर या सिद्धहस्त लेखिकेने त्याचा अप्रतिम आणि प्रवाही अनुवाद केला आहे. त्यामुळे मराठी वाचकांना हा ज्ञान ठेवा उपलब्ध झाला आहे. त्यासाठी त्यांचे आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे विशेष अभिनंदन करावयास हवे. ज्याला भारताच्या आर्थिक, औद्योगिक यशाच्या वाटचालीला रस आहे. अशा प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. सहज जाता जाता दोन हलक्या फुलक्या गोष्टी आठवल्या, पहिलं म्हणजे २००८ मध्ये मूळ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्याची सुरूवात त्यांना तुमच्यासारखी चांगली माणसे राजकारणात का जात नाहीत? या प्रश्नाने झाली. त्याला त्यांनी दिलेल्या ‘‘मी उद्योजक असल्याने त्या आखाड्यात मी अस्पृश्य आहे आणि ते केलं तर टीकेचा धनी होईन.’’ या उत्तराने झाली आहे. प्रत्यक्षात पुढे २०१४ मध्ये त्यांनी बंगलोरमधून लोकसभेची निवडणूक लढविली आणि त्याचा त्यांना पराभूत होऊन प्रत्ययही आला. आणि दुसरी म्हणजे त्यांच्या पत्नी सौ. रोहिणी, पूर्वाश्रमीच्या सोमण असल्याचा उल्लेख आला आहे. म्हणजेच ते आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो