* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: LEFT TO TELL
  • Availability : Available
  • Translators : JYOTSNA LELE
  • ISBN : 9788184983470
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2012
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 240
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Print Books:
IMMACULEE ILIBAGIZA GREW UP IN A COUNTRY SHE LOVED, SURROUNDED BY A FAMILY SHE CHERISHED. BUT IN 1994 HER IDYLLIC WORLD WAS RIPPED APART AS RWANDA DESCENDED INTO A BLOODY GENOCIDE. IMMACULEE’S FAMILY WAS BRUTALLY MURDERED DURING A KILLING SPREE THAT LASTED THREE MONTHS AND CLAIMED THE LIVES OF NEARLY A MILLION RWANDANS. INCREDIBLY, IMMACULEE SURVIVED THE SLAUGHTER. FOR 91 DAYS, SHE AND SEVEN OTHER WOMEN HUDDLED SILENTLY TOGETHER IN THE CRAMPED BATHROOM OF A LOCAL PASTOR WHILE HUNDREDS OF MACHETE-WIELDING KILLERS HUNTED FOR THEM. IT WAS DURING THOSE ENDLESS HOURS OF UNSPEAKABLE TERROR THAT IMMACULEE DISCOVERED THE POWER OF PRAYER, EVENTUALLY SHEDDING HER FEAR OF DEATH AND FORGING A PROFOUND AND LASTING RELATIONSHIP WITH GOD. SHE EMERGED FROM HER BATHROOM HIDEOUT HAVING DISCOVERED THE MEANING OF TRULY UNCONDITIONAL LOVE—A LOVE SO STRONG SHE WAS ABLE SEEK OUT AND FORGIVE HER FAMILY’S KILLERS. THE TRIUMPHANT STORY OF THIS REMARKABLE YOUNG WOMAN’S JOURNEY THROUGH THE DARKNESS OF GENOCIDE WILL INSPIRE ANYONE WHOSE LIFE HAS BEEN TOUCHED BY FEAR, SUFFERING, AND LOSS.
अफ्रिकेतील रवांडा या देशात १९९४ साली ‘हूतू’ आणि ‘तुत्सी’ या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठीत धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या इम्माकुली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणीवांना आवाहन करणारी ही इम्माकुली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
"#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #LEFTTOTELL #लेफ्टटूटेल # #BIOGRAPHY #JYOTSNALELE #IMMACULEEILIBAGIZA #STEVEERVIN"
Customer Reviews
  • Rating StarSandip Darwade

    आफ्रिकेतील रवांडा या देशात 1994 साली `हुतु` आणि `तुतसी` या जमातींमध्ये भीषण हत्याकांड घडून आले. जवळपास दहा लाखाहून अधिक माणसांचा बळी घेतलेल्या या दंगलीने देशात अराजकाचे सत्र निर्माण झाले. या भयावह कत्तलीच्या काळ्या सावलीत एक लहानशी मुलगी जीव मुठी धरून तो हिंसाचार डोळ्यात साठवत होती. या नरसंहारात आपलं कुटुंब गमावूनही त्याबद्दल संयतपणे बोलणाऱ्या ईमाकुल्ली इलिबागिझाची ही कहाणी. माणसांमधील असीम कुरूपता आणि कौर्य पाहूनही त्यांच्यामधील ईश्वराचे अस्तित्व शोधणारी आणि माणसांच्या जगातील प्रेम, दया, शांती या जाणिवांना आवाहन करणारी ही ईमाकुल्ली पुस्तकाच्या प्रत्येक पानागणिक वाचकाला अधिकाअधिक अंतर्मुख बनवत जाणारी आहे... ...Read more

  • Rating StarKiran Borkar

    रवांडा या आफ्रिकेतील छोट्या देशात वर्षानुवर्षे हुतु आणि तुत्सीया जमातीत वंशभेद होता .शेवटी 1994 साली या दोन्ही जमातीमध्ये भीषण हत्याकांड घडून आले.जवळजवळ दहा लाख लोक या हत्याकांडात बळी पडले .कोणताही देश त्यांच्या मदतीला आला नाही .लेखिका इम्माकुली इलिबगिझा ही तुत्सी जमातीची तरुणी.या हत्याकांडात तिचे दोन भाऊ आईवडील मारले गेले . हुतु जमातीच्या मुरिंझी नावाच्या इसमाने तिला आणि इतर सात महिलांना आपल्या बेडरूनमधील चार बाय तीनच्या बाथरूममध्ये लपविले . तिथे त्या सर्व नव्वद दिवस राहिल्या . त्या नव्वद दिवसात ती पूर्ण वेळ देवाचा धावा करीत होती . देवावर असीम श्रद्धा असली की चमत्कार घडू शकतो हे तिने सिद्ध केले .या नव्वद दिवसात तिने खूप काही अनुभवले. मृत्यूची टांगती तलवार सतत त्यांच्या डोक्यावर होती. नव्वद दिवस ते धड बसू शकत नव्हते ..झोपू शकत नव्हते..,एकमेकांशी बोलू शकत नव्हते. त्या नव्वद दिवसात त्यांनी कपडेही बदलले नाही की आंघोळही केली नाही . या दंगलीत शेजारीही त्यांचे शत्रू झाले .ज्यांच्याबरोबर ती खेळली मोठी झाली त्यांच मित्रांनी मैत्रिणींनी तिच्याकडे पाठ फिरवली .त्याही परिस्थितीत ती तगली . आपले सर्व अनुभव तिने लिहून काढले .अंगावर काटा आणणारी इम्माकुलीची ही सत्यकहाणी . ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RADHEYA
RADHEYA by RANJEET DESAI Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

राधेय.... लेखक रणजित देसाई... मित्र कसा असावा...कर्णासारखा दातृत्व कसं असावं...कर्णासारखं असा हा कर्ण... त्याला अंगराज म्हणावं, दान देणारा दाता म्हणावं, राधेय म्हणावं कि कौतेय... काहीही म्हणा पण कर्णासारखा दाता कर्णानंतर कधी झाला नाही आणि कधी होणरही नाही... रणजित देसाई लिखीत कर्णचरीत्र राधेय आज हातावेगळं झालं ते अश्रुभरल्या नयनांनी...ज्याचा अंत करायला स्वतः देवाधिदेव कृष्णाला अर्जुनाचं सारथ्य करावं लागलं यातच अंगराज कर्णांचं विरत्व अधोरेखीत होत आहे. जन्मापासुन ज्याला केवळ सुतपुत्र म्हणुन वागणुक मिळाली असा तो कर्ण स्वतःच्या बळावर इतका महान लढवय्या बनला. पुस्तकाच्या प्रास्ताविकात देसाईंनी म्हटलं आहे की राधेय मधला कर्ण महाभारतात शोधायची गरज नाही. प्रत्येकाच्या मनातच तो दडलेला असतो, कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत, तर त्यात हा कर्ण दिसेल. त्याचं दु:खं, पोरकेपण आणि त्यातून पार होवून एक अनोखी ऊंची गाठणारं त्याचं दातृत्व, व्यक्तित्व याचं एक भव्य, शोकात्म चित्र राधेय मधून उभं राहतं. राधेय या कादंबरीत रणजित देसाईंच्या शब्दांनी कर्णाची अनेक रुपे अनुभवता आली. त्यामध्ये राधाई आणि वृषाली सोबतचा कर्ण, दुर्यौधनासोबतचा कर्ण, कृष्णासोबतचा कर्ण, रणांगणावरचा कर्ण आणि नदीकाठी पाठमोरा ऊभा राहत दान करत असलेला कर्ण अशा अनेक रुपांनी प्रत्येकवेळी वेगळा भासला. वृषसेन आणि चक्रधराच्या मृत्युने हळवा झालेला कर्णही वाचकाच्या डोळ्यातही पाणी आणवतो... समोर मृत्यु दिसत असताना सुध्दा केवळ दिलेल्या वचनामुळे हातातील धनुष्याचा त्याग करुन शस्त्रहिन हेणारा कर्ण रणजित देसाईंच्या शब्दांमुळे आजन्म लक्षात राहील. कर्णासारखं होणं कुणालाही कदापि शक्य नाही पण त्यातला एखादा जरी चांगला गुण अंगी बाळगण्याचा प्रयत्न प्रत्येकाने नक्कीच केला पाहीजे... प्रत्येकाच्या संग्रही असावं आणि एकदा तरी वाचावं असं पुस्तक रणजित देसाई लिखीत...राधेय... © विश्वजित शिंत्रे. ...Read more

BAJIND
BAJIND by PAHILWAN GANESH MANUGADE Rating Star
विश्वजीत श्रीपती शिंत्रे.

काही पुस्तकं अशी असतात कि कितीही वेळा वाचली तरीही त्या पुस्तकाचा कंटाळा येत नाही. पुन्हा पुन्हा वाचावं असं वाटतं आणि त्याची पारायणं होतचं राहतात. असचं एक पुस्तक म्हणजे *पै.गणेश मानुगडे* लिखीत *बाजिंद.* *बाजिंद* हे एक असं रसायन आहे जे प्रत्ेकाला अक्षरशः वेड लावतं. साधारण चार पाच वर्षांपुर्वी पहील्यांदा वाचलं होतं, त्यानंतर बर्‍याचवेळा आणि आज पुन्हा एकदा. त्याबद्दलची एक सुंदर आठवण म्हणजे माझ्या बहिणीच्या गरोदरपणाच्या दिवसात ग्रहण लागलं होतं आणि त्या ग्रहणकाळात तिला मी *बाजिंद* वाचुन दाखवलं होतं, असं हे पुस्तक. कुस्ती, प्रेमकथा, हेरगिरी, गुढ रहस्यमय बाजिंदचं जंगल, पशु-पक्षी व हिंस्र जनावरांची भाषा, बहीर्जी नाईक आणि अवघ्या हिंदुस्थानाचे आणि मराठी मनाचे आराध्यदैवत *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज* असा या पुस्तकाचा प्रवास. शेवटाला अंगावर काटा आला कि समजावं आपण या पुस्तकाच्या प्रेमात पडलोय. रायगडच्या डोंगरदरीत वसलेल्या धनगरवाडीचा सखाराम धनगर आणि त्याच्यासोबत मल्हारी, सर्जा आणि नारायण निघालेत छत्रपती शिवरायांना भेटायला. कारण टकमक टोकावरुन ज्या गद्दारांचा कडेलोट व्हायचा ती प्रेतं येऊन पडायची ती थेट धनगरवाडीच्या आसपासच्या जंगलात आणि त्यामुळे आसपासच्या परीसरात जंगली जनावरांचा सुळसुळाट खुप वाढला होता. त्यांची मेजवानी व्हायची पण जर कधी कडेलोट नसायचा तेव्हा ती हिंस्त्र जनावरं आसपासच्या लोकवस्तीत शिरायची. हिच कैफियत मांडायला सखाराम धनगर आणि इतर मंडळी रायगडी निघतात. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आणि कथा वाचकाला इतकी गुरफटवुन टाकते कि शेवटच्या पानावरची शेवटची ओळ कधी वाचुन संपते, कळतही नाही. त्यांची स्वराज्यहेर खंडोजीची भेट मग सावित्री, वस्तादकाका, वाचतानाही भितीदायक दिसणारं जंगल, कधीही न पाहीलेलं महादेवाचं मंदीर, खंडोजीचा असणारा ट्विस्ट आणि मग बहिर्जी नाईक आणि मग थेट रायगड आणि महाराज, सगळं प्रत्यक्षात आपल्यासमोर घडतयं कि असा भास निर्माण करणारं असं हे पुस्तक. एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशी कथा, एकदा वाचली कि पुन्हा एकदा वाचण्याचा मोह आवरता येत नाही अशी कथा, ज्यामध्ये असं बरचं काही जे वाचल्याशिवाय कळणार नाही. अजुन एक असं कि सातासमुद्रापार जगातील अव्वल गणली जाणारी इस्त्राईलची गुप्तहेर संघटना मोसाद यांच्या अभ्यासक्रमात बहिर्जी नाईक आणि आपलं हेरखातं शिकवलं जातं अशी अभिमान वाटणारी घटना आपल्या राज्यात घडलीय त्याचीच हि गोष्ट...बाजिंद... ...इकडे खंडोजीने सावित्रीला उचलुन जंगलातुन बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतुट होती आणि हजारो हात खोल फेसाळणार्‍या नदीचे विशाल पात्र...खंडोजीने एकदा मागे पाहीले आणि ताडले कि शिर्क्यांची फौज पाठलाग करत आहे...त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतुट वरुन त्या विशाल नदीच्या पात्रात झोकुन दिले...आणि... त्यासाठी वाचा *पै.गणेश मानुगडे* लिखीत...*बाजिंद..!!!* © विश्वजीत श्रीपती शिंत्रे. मु.पो.इंचनाळ, ता.गडहिंग्लज,जि.कोल्हापुर ०९९२२३१३९१९ ...Read more