BANI BASU

About Author

Birth Date : 11/03/1939


BANI BASU IS A PROLIFIC BENGALI INDIAN AUTHOR, ESSAYIST, CRITIC, POET, TRANSLATOR AND PROFESSOR.

श्राबणी बासू यांचा जन्म कोलकतामध्ये झाला, तर ढाक्का, काठमांडू आणि दिल्ली याठिकाणी त्यांचे बालपण गेले. दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेजमधून त्यांनी ‘इतिहास’ विषयात आपले पदवीचे शिक्षण घेतले. दिल्ली विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८३मध्ये मुंबईच्या ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. लंडनमध्ये १९८७ साली स्थलांतर केल्यानंतरही त्या कोलकताच्या ‘आनंद बझार पत्रिका’ आणि ‘टेलिग्राफ’ या वृत्तपत्रांच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या क्षेत्रात इतिहास आणि पत्रकारिता यांची उत्कृष्ट सांगड घातली होती. त्यांच्या अनेक पुस्तकांमध्येही भारत व ब्रिटनच्या इतिहासाचा संदर्भ आढळतो. ब्रिटनमध्येही त्या मुलाखती आणि विविध कार्यक्रम यांच्या माध्यमातून बीबीसी टेलिव्हिजनवर झळकल्या आहेत. देश-विदेशातील अनेक संमेलनात त्या वक्त्या म्हणूनही सहभागी झाल्या आहेत. श्राबणी यांनी २०१०मध्ये नूर इनायत खान मेमोरिअल ट्रस्टची स्थापना केली. नूर यांनी दुसNया महायुद्धात केलेल्या उल्लेखनीय कार्याची, त्यांच्या त्यागाची तरुणपिढीला ओळख व्हावी यासाठी हा ट्रस्ट कार्यरत आहे. लंडनमधील ‘गोल्डन स्क्वेअर’ मध्ये नूर यांचे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी मदतनिधी जमविण्याचे कामही ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ काळात त्यांनी बेनझीर भुट्टो, शेख हसिना, सलमान रसदी, निराद सी चौधरी, व्हिव रिचर्ड्स, सचिन तेंडुलकर, इस्माइल मर्चंट, मीरा नायर आणि शबाना आझमी अशा अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
Sort by
Show per page
Items 1 to 1 of 1 total
GANDHARVI Rating Star
Add To Cart INR 200

Latest Reviews

KULAMAMACHYA DESHAT
KULAMAMACHYA DESHAT by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ शिंदे निलेश, अमरावती

`कुलमामाच्या देशात` वाचून काढले. प्रत्येक कथा खुप वाचनीय आहे. `कपारीत वाघोबा` मध्ये रवींद्र वानखडे ह्यांनी पहाटे चार ते 10 नुसती भ्रमंती केली आहे.. सकाळची सूर्यकिरण अंगावर पडली असताना वाघ बघायला भेटणं ही एक अप्रूप वाटणारी गोष्ट आहे. `डरकाळीचा रार` वानखडे साहेबांनी बेलसरें सोबत अनुभवला आहे. `जिवाची पर्वा` न करता वानखडे साहेब पाळण्यात विसावले होते. गव्याच्या पिलावर वाघीणीने हल्ला केला नाही.. हे वानखडे साहेबांनी स्वतः बघितले व आम्हाला देखील समजले.. वाघाच्या पंजाची कशी प्रतिकृती तयार करतात हे सांगितले परंतू मला लक्षात आले नाही (मी प्रत्यक्ष बोलून जाणून घेईन). `मेहमान रह गया` या कथेत वाघाने माणसाची शिकार कशी केली त्यानंतर वनविभागाने बसची सोय करून मुलांना मदत कशी झाली हे देखील सांगितले व आपल्या सारखे वन अधिकारी काय करू शकतो हे प्रांजळ पणे नमूद केले आहे.. सेमडोह येथील गजराजाची कथा अजून देखील लोक सांगतात त्यातील तुम्ही त्याला वाचवयाचा प्रयत्न केला परंतू तो नियतीला मान्य नसेल. बाणा का घुंगरू- मधील हल्ला व घटना मन विचलित करणारी वाटली व मेळघाट मधील वन कर्मचारी किती कामसू आहेत हे त्या वरून दिसले.. मला बाणा ढाप प्रत्यक्ष बघायला आवडेल.. `रानगव्यांची कवायत` मध्ये रानगवे स्वतःच रक्षण कश्या पद्धतीनं करतात हे मला पहिल्यांदा समजले.. कोकटु इथं तीन दिवस आपण वाघ बघण्याची केलेली हॅट्रिक ही जंगलाने तुम्हा वनाधिकार्‍यास दिलेली सलामी आहे. `शिकार हो गया` - माहुल वेलीचा कसा उपयोग केला जातो व पोळी तयार करतात हे देखील वेगळी गोष्ट वाटली.. आपण सांबर शिकार कशी थांबवली व वन्यजीवनाची साखळी अबाधित राखली.. वाघ खेकडे मारून खातो हे ऐकून नवल वाटले.. असा सॉलिड वन अधिकारी मेळघाटला लाभला हे या कथां मधून मला समजलं व प्रत्येक वाचकाला हे जंगल, इथले लोक या विषयी कायम आकर्षण निर्माण करत राहील.. ...Read more

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
श्री. बाबाराव घोरमाडे, अमरावती

अमरावती जिल्हा मधील एका सामान्य खेड्यातील, एक अलौकिक असामान्य अशा फुटबॉल खेळाडूचे हे व्यक्तिचरित्र. १९४० ते १९५१ हा कालखंड म्हंजे तसाही भारतीया करीता त्यातल्या त्यात ग्रामीण भागाकरिता खडतर कालखंड. अशा विपरीत परिस्थितीत शैक्षणिक आर्थिक सामाजिक मारगदर्शन इत्यादी पाठबळ चा अभाव असताना सुद्धा आतंरराष्ट्रीय दर्जा चा खेळाडू निर्माण होणे हे ते चरित्र नायक चे असामान्य व्यक्तिमत्व अधोरेखित होते. समाधानाची आनंदाची बाब ही की हे पुस्तक रूपाने प्रसिध्द करण्याचे काम चरित्र नायक चे सुपुत्र श्री गजाननराव उर्फ जी बी देशमुख यांनी केले. हे सर्व काही अंशी कर्ज ओझे हलके करण्यासारखे आहे लेखकाला या करीता खूप मेहनत करून माहिती संकलित करावी लागली. एखादी थप्पड बनती थी........ बडे बेआबरू होकर घरी आलो........पण कहाणी मे ट्विस्ट अभि बाकी था..... प्रसंगी चे वाक्य रचना , कोसळणाऱ्या धबधबा सारखे निखळ आनंद देऊन गेले . मेहता पब्लिशिंग ने लॉन्च केले म्हणजे सर्वदूर मराठी माणसाचे पर्यंत पोहोचले आहे वाचनीय आहे प्रत्येकाने वाचावे.विसावा शतकातील पुर्वाध, विपरीत परिस्थितीतही किती कष्ट करावे लागले असतील? धन्य ते.. ...Read more