* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: ANITA GETS BAIL
  • Availability : Available
  • Translators : UDAY BHIDE
  • ISBN : 9789353174354
  • Edition : 1
  • Publishing Year : FEBRUARY 2020
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 324
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
  • Available in Combos :ARUN SHOURIE COMBO SET-9 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
MR. ARUN SHOURIE IS A EX-CENTRAL MINISTER, WELL KNOWN NATIONALIST, UPHOLDING INDIVIDUAL CITIZEN’S FREEDOM AT THE SAME TIME. IN THIS BOOK HE STARTS WITH NARRATING HIS OWN EXPERIENCE WITH THE JUDICIARY ARM OF THE DEMOCRATIC SET UP IN OUR COUNTRY, LATER EXPANDING THE SCOPE OF DISCUSSION TO A TOPIC OF LARGER INTEREST AND CONCERN, I.E. WHETHER THE JUDICIARY SYSTEM, WHICH IS, BY AND LARGE, THE ONLY PILLAR OF DEMOCRACY HAVING SOMEWHAT CREDIBILITY AND RELIABILITY, IS ON ITS’ DOWNTREND.
कायदेमंडळे आणि सरकार म्हणजे लोकशाहीचे दोन आधारस्तंभ. पण या व्यवस्थांमधला गलथान कारभार अनेकदा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचीच पायमल्ली करतो. याचा अनुभव खुद्द माजी मंत्री असलेल्या अरुण शौरी यांनी घेतला. त्यांनी अनुभवलेल्या या मनस्तापजनक घटनेची कारणमीमांसा करत शौरी यांनी भारतीय न्यायव्यवस्थेच्या कारभारावरच या पुस्तकात प्रकाश टाकला आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#ANITALAJAMINMILTO #ARUNSHOURIE #UDAYBHIDE #ANUBHAVKATHAN #ANITASHOURIE #INDIANJUDICIARYSYSTEM #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #TRANSLATEDMARATHIBOOKS #TBC# TRANSLATEDBOOKS@50% #अनितालाजामीनमिळतो #अरुणशौरी #उदयभिडे #अनुभवकथन #मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #भारतीयन्यायव्यवस्था #अऩिताशौरी #अनुवादितपुस्तके
Customer Reviews
  • Rating StarDhanesh Dangat

    श्री. अरुण शौरी हे राष्ट्रीय हिताचा विचार करणारे विचारवंत असून, ते प्रत्येक नागरिकाच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचादेखील तितक्याच हिरिरीने पुरस्कार करतात. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल ते जागरूकपणे विचार करतात आणि देशातील सध्याच्या राजकीय-सामाजि परिस्थितीचेदेखील त्यांना उत्तम भान आहे. घटना आणि परिस्थितीचे विश्लेषण करून त्यात सुधारणा होण्यासाठी ते वाचकासमोर करण्यायोग्य कृतीदेखील मांडतात आणि वाचकाला कृती करण्यास उद्युक्तदेखील करतात. आणि याच तळमळीने त्यांनी ‘अनिता गेट्स बेल’ पुस्तकात व्यवस्थेसमोर काही प्रश्न उभे केले आहेत. त्यांना स्वतःला आलेल्या न्यायपालिकेच्या कामकाजाबाबतच्या अनुभवाच्या वर्णनाने त्यांनी या पुस्तकाची सुरुवात केली आहे. जो त्यांचा नव्हताच अशा जमिनीच्या तुकड्यावर, त्यांनी जे कधी बांधलेच नाही अशा घरासंदर्भात, जी कधी दिलीच गेली नाहीत अशी समन्स घेणे चुकवल्याबद्दल, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या अरुण शौरींच्या पत्नी, अनिता, यांच्यावर अ-जामीनपात्र वॉरन्ट्स बजावण्यात आली… न्याय व्यवस्थेच्या या भोंगळ कारभारामुळे एक प्रकारे त्यांचा मानसिक छळच झाला. पुस्तकाची सुरुवात अनिता शौरी यांच्यावरील या आपबितीने होते. शौरी यांच्या वैयक्तिक अनुभवातूनच भारतीय न्यायव्यवस्थेतील त्रुटी स्पष्टपणे समोर येतात; पण नंतर चर्चा-विषयाचा विस्तार करताना ते लोकशाही राज्यपद्धतीच्या, अद्याप सन्मान आणि विश्वासपात्रता थोड्या प्रमाणात का होईना, पण टिकून असलेल्या एकमेव आधारस्तंभाच्या, म्हणजेच न्यायपालिकेच्या संदर्भात त्यांच्या मनात असलेल्या काळजीच्या भावनेचा उच्चार करतात.. न्यायव्यवस्था ही शासनकर्त्यांच्या दडपशाही कारभारापासून आपणा सर्वांचे संरक्षण करणारी भिंतच मानली जाते; परंतु या अभेद्य वाटणाऱ्या भिंतीतदेखील फटी पडल्या असल्याचे अलीकडच्या काळातील काही घटना पाहता दिसून येते. प्रत्येक व्यक्तीच्या कार्यशैलीच्या दर्जाव्यतिरिक्त न्यायदान संस्थेची शुचिता आणि स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी प्रस्थापित केल्या गेलेल्या – न्यायपीठांची रचना, न्यायनिवाड्यासाठी न्यायाधीशांकडे खटले सोपवले जाण्यासंदर्भात निश्चित केलेली कार्यपद्धती, यांसारख्या संस्थात्मक… कार्य-व्यवस्थादेखील विस्कळीत झाल्या आहेत. अशा फटींमुळे राजकीय शासनकर्त्यांना या संस्थेवर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळत राहते, याची सोदाहरण माहिती या पुस्तकात पाहायला मिळते. निम्न श्रेणी न्यायालये, उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय – या ठिकाणी झालेल्या खटल्यांच्या माध्यमातून अरुण शौरी ‘लोकशाहीचा हा शेवटचा स्तंभ’ किती दुर्बळ आणि असहाय झाला आहे हे आपल्याला दाखवतात. धडधडीत निर्लज्जपणा दाखवत वस्तुस्थितीमध्ये बदल करून एक न्यायाधीश एका प्रसिद्ध राजकीय पुढाऱ्याला गुन्ह्याच्या आरोपातून सोडवतो… घडलेल्या घटना आणि निकालपत्राचा फायदा घेऊन गुन्हा शाबीत झालेली व्यक्ती खटल्याच्या पुढील कामकाजासाठी त्याच्या पसंतीच्या व्यक्तीची सरकारी वकील म्हणून निवड कशी करू शकते… नगण्य गोष्टींमध्ये गुंतून राहून जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या गंभीर सुधारणांकडे न्यायालये कसे अक्षम्य दुर्लक्ष करतात… मैलाचा दगड ठरणारे निकाल देणारी न्यायालयेदेखील त्या निकालांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीकडे कसे दुर्लक्ष करतात… न्यायालयाचा कालापव्यय आणि खोटी साक्ष देऊन न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल तसे करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा करण्याची टाळाटाळ न्यायालयेच कशी करतात… न्यायालये आपण देत असलेल्या निकालाच्या संभाव्य परिणामांबद्दल पूर्वानुमान करण्याचे कष्टदेखील घेत नाहीत… आपल्यासारखाच दुसरा एखादा न्यायाधीश संशयाच्या भोवऱ्यात अडकला, तर त्याला पाठबळ देण्याऐवजी आपण त्या गावचेच नाही, असे भासवणारे पलायनवादी न्यायाधीश… मानसिक संतुलन नसल्याचे ढळढळीतपणे दिसत असलेला एखादा न्यायाधीश, ज्यांचे अगदी प्राथमिक स्वरूपाच्या वैज्ञानिक गोष्टींबद्दलचे ज्ञानदेखील हास्यास्पद वाटेल, असे न्यायाधीश, नक्की काय म्हणायचे आहे, हे ज्याच्या निकालपत्रातून सर्वोच्च न्यायालयालादेखील समजू नये अशा अगम्य भाषेत लिहिणारा न्यायाधीश – हे आणि असे सर्वजण, हजारो नागरिकांच्या भवितव्यावर दूरगामी परिणाम करणारे निकाल देतच राहिले आहेत… न्यायाधीशांनीच इतक्या प्रच्छन्नपणे सुस्थापित न्यायिक तत्त्वांची पायमल्ली करावी, की त्यांच्यासारख्या इतर न्यायाधीशांना त्यांच्या अशा चका सार्वजनिकरीत्या उघड करायला लागाव्या… असे असंख्य संदर्भ वाचकांना थक्क करतात. आपले मुद्दे स्पष्ट करण्यासाठी अरुण शौरी यांनी काही प्रचंड मोठ्या रकमांच्या अफरातफरीच्या, आरक्षण धोरणाबाबतच्या आणि अगदी खूनच असावा अशा स्वरूपाच्या घटनेसंदर्भातील खटल्यांची मदत घेतली आहे. तसेच कामकाजाच्या साचेबद्ध पद्धतींचा कसा कल्पक उपयोग केला जातो आणि त्याद्वारे न्यायप्रक्रिया कशी प्रदीर्घ काळ लांबवली जाते; आणि परिणामी सामान्य नागरिकाला कसे न्यायापासून वंचित ठेवले जाते हेदेखील त्यांनी अगदी स्पष्टपणे दाखवले आहे. राज्यातील उच्च न्यायालये आणि देशातील सर्वांत वरिष्ठ म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांच्या खालावत चाललेल्या दर्जावरदेखील या पुस्तकाने प्रकाश टाकला आहे; तसेच न्यायाधीश राष्ट्रीय हिताचा विचार करत नाहीत किंवा आपण देणार असलेल्या निकालाचे कोणते आणि किती व्यापक स्तरावर परिणाम होऊ शकतील याचादेखील विचार करत नाहीत आणि त्यातून असंख्य नव्या कज्जे-खटल्यांची सुरुवात होईल, याचादेखील विचार करत नाहीत, याबाबत देखील हे पुस्तक टीकात्मक भाष्य करते. लोकशाहीचे दुसरे दोन आधारस्तंभ, म्हणजे कायदेमंडळे आणि सरकारे, हे भ्रष्टाचाराने आणि अन्य दोन्ही आधारस्तंभांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या वेड्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले असल्यामुळे निदान न्यायपालिकेची अजूनही थोडीफार तरी शिल्लक असलेली विश्वासपात्रता आणि सन्मान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सरतेशेवटी श्री. शौरी या पुस्तकाद्वारे या देशाच्या सर्वसामान्य नागरिकालाच सकारात्मकरीत्या काम करण्याचे आवाहन करतात. ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT 16-02-2020

    नाते व न्यायव्यवथेवरचं अभ्यासपूर्ण भाष्य... देशाची लोकशाही ज्या चार स्तंभावर उभी असते त्यात न्यायालय हे एक आहे. कुठल्याही पक्षाच्या सरकार किंवा समाजातील कुणाकडून कुणावरही अन्याय होणार नाही, तसेच समता, बंधुतेची रुजवण कायम ठेवण्याची जबाबदारी ही न्यायवयवस्थेवरच्या विश्वासावर टिकून असते. पण लोकशाहीचा हा शेवटचा स्तंभ किती दुर्बल आणि असाहाय झाला असल्याचे लेखक अरुण शौरी या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आणतात. तसेच त्यांच्या पत्नी अनिता या दुर्धर आजाराने त्रस्त असतानादेखील त्यांना अजामीनपात्र वॉरन्ट्स बजावण्यात येते. अत्यंत तटस्थपणे व काटेकोर अभ्यास करून नाते, समाज, न्याय यांपैकी कुठल्याही एका व्यवस्थेवरचं नियंत्रण ढळू न देता भाष्य करण्याचा कौतुकास्पद प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे. कधी विनोदी तर कधी संतापाने उद्विग्न करणाऱ्या भावनांचा हा कल्लोळ नक्की वाचकांना खडबडून जागे करणारा आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RAZOR SHARP
RAZOR SHARP by ASHWIN SANGHI Rating Star
सुनील माने, पुणे

लेखक अश्विन सांघी “द रोझाबल लाइन” या पहिल्याच कादंबरीने खूप लोकप्रिय झाला. प्राचीन भारतीय दंतकथा/ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्याच्याभोवती आजच्या काळात रहस्यपूर्ण कथा लिहिणारा अश्विन. Chanakya’s Chant, The Krishna Key, The Sialkot Saga, Keepers of the Kalacakra, The Vault of Vishnu, The Magicians of Mazda अशा एकापेक्षा एक सुंदर रहस्य कादंबर्या “भारत सिरीज़” नावाने खूप प्रसिद्ध झाल्या. या सर्व कादंबऱ्या मी इंग्लिश मधेच वाचल्या. यांचा मराठी अनुवाद मेहता पब्लिशिंग हाउस यांच्याकडे उपलब्ध आहे. अश्विन सांघीने या भारत सिरीज शिवाय एक नवीन थ्रिल्लर सिरीज (कुत्ता कदम) सुरू केली आहे. त्यांतील पहिली कादंबरी Razor Sharp. एक सिरियल किलर मुंबईत एकानंतर एक खून पाडतोय. पोलिस चक्रावले आहेत. 1. रविवार दि २ फेब्रुवारी , गोरेगाव पश्चिममधे रवि मेहराचा खून होतो. त्याची बायको खुशी कॅाल सेंटरचा जॅाब करून रात्री ११.३० ला परत येते. खूप वेळा बेल वाजवून दार न उघडल्यामुळे ती उघडून आत येते तर रवि रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला असतो. त्याचे हात पाठीमागे नायलॅान दोरीने बांधलेले असतात. त्याच्या छातीत सुरा खुपसलेला असतो. त्याच्या तोंडात काहीतरी खाद्य पदार्थ असतो. 2. सोमवार दि १० फेब्रुवारी , लोअर परळमधे सुचंद्रा अग्रवालचा खून. तिची कामवाली आल्यावर दार न उघडल्यामुळे सोसायटीवाले दार तोडतात. आत सुचंद्राचा खून झालेला. हात नायलॅान दोरीने मागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात काहीतरी खाद्यपदार्थ. पोलिस चक्रावलेले. मग पोलिसखाते जागे होते. त्यांचा नावाजलेला अधिकारी जो सस्पेंड झालेला आहे, त्या प्रकाश कदम, DCP याला बोलावले जाते. राज्याचे गृहमंत्री ओंकार लोखंडे, त्यांचा माणूस कमिशनर चव्हाण आणि उपगृहमंत्री जयंत गायकवाड व त्यांचा माणूस SCP राणे, मुंबईचा डॅान भाऊ पाटील जो लोखंडेचाच माणूस असतो, हे सर्व या केसच्या मागावर लागतात. कदम हा राणेंच्या ओळखीचा खास ऑफिसर असतो म्हणून त्यालाही इन्व्हेस्टीगेशनला बोलावले जाते. 3. मंगळवार दि १८ फेब्रुवारी , ठाणे येथे मंगला शहाचा खून. तिच्या शेजारणीमुळे हे कळते. मंगलाचे हात नायलॅान दोरीने पाठीमागे बांधलेले, छातीमधे चाकू खुपसलेला, तोंडात खाद्यपदार्थ. पोलिस अधिकारी शिंदे कदमबरोबर येतात. मंगलाच्या चेहऱ्याजवळ कदमला पेस्टिसाईडचा वास येतो. चेहरा निळसर झालेला. खून झाल्यावर बॅाडीला हलवलेले दिसते. तो ऑफिसमध्ये जुन्या खूनांचे फोटो तपासतो. त्यांचीही बॅाडी खून केल्यावर हलवलेली दिसते. चेहऱ्यावर निळसर झाक दिसते. तिन्ही खून “फिनेक” ब्रॅंडच्या चाकूने केलेले असतात. हे समान धागे कदम त्याची मुलगी केतुल बरोबर चर्चा करतो. केतुलची आई काही वर्षांपूर्वी कदमला सोडून गेलेली असते. ती भाऊ पाटीलची सावत्र बहीण असते. पण सध्या ती कुठे आहे व काय करते हे माहित नसते. केतुल कोर्टात काम करत असते तसेच ती “शक्ती” या NGO मधेही काम करते. शक्ती हे सोनापूरमधुन सुटका केलेल्या वेश्यांचे पुनर्वसन करत असते. निर्मल नावाचा तिचा मित्र एथिकल हॅकर असतो. तिच्यावर प्रेम करत असतो. कदमला हार्ट अटॅक येऊन गेलेला व स्टेंट बसवलेला असतो. Depression मुळे त्याची सायकॅालॅाजिस्टकडे ट्रिटमेंट चालू असते. कदमला या तिन्ही केसमधे आणखी एक धागा सापडतो. हे खून आठ दिवसांच्या अंतरावर झालेले असतात. म्हणजे पुढचा खून बुधवारी होणार असल्याचे तो राणे व शिंदेला सांगतो. 4. बुधवार दि २६ फेब्रुवारी, कांदिवली पश्चिम, लक्ष्मी बुधीराजाचा खून. तोच पॅटर्न. 5. गुरुवार दि ५ मार्च, खार पश्चिम, गुरुराज अदवानीचा खून सेम पॅटर्न. गुरूराज हा युट्युबवरचा प्रसिद्ध सिंगर असतो. 6. शुक्रवार दि १३ मार्च, ताडदेव, दिव्या शुक्रपाणीवर खूनी हल्ला होतो. पण ती जबर जखमी होते. ती फिटनेस ट्रेनर असल्यामुळे खुन्याबरोबर झटापट करते. पण चाकू पोटात घुसल्यामुळे ती जबर जखमी होते. हात बांधलेले असतानाही ती फोनवर “सिरी” ला तिच्या भावाला, ध्रुवला फोन लावायला सांगते. फोन लागतो व ती “हेल्प हेल्प” एव्हढेच बोलून बेशुद्ध होते. म्हणून खुनी पळून जातो. ध्रुव तिथे पोहोचून तिला हॅास्पिटलमधे ॲडमिट करतो. पोलिसांना तिथे खुन्याची बॅग सापडते. त्यांत नायलॅानची दोरी, बेगॅान स्प्रे व राजमाच्या बिया सापडतात. तिसऱ्या खुनाआधी पोलिस संशयित म्हणून राजू दाभाडेला अटक करतात. पण चौथ्या खूनाच्या वेळेस तो कस्टडीतच असतो. मग खूनी कोण? 7. शनिवार दि २१ मार्च, बान्द्रा पश्चिम, शनिया डिसौजाचा खून होतो. सेम मोडस ऑपरेंडी . 8. शनिवार दि २८ मार्च, चेंबूर, ७१ वर्षांच्या राहुल सिंह नावाच्या सिख व्यक्तिचा खून होतो. तीच पध्दत. यानंतर एक दिवस कदम KBC बघत असताना अमिताभ बच्चन एका सिनेमाचं गाणं लावून त्याचा पिक्चर ओळखायला सांगतात. ते गाणं असते- “सोमवार को हम मिले मंगलवार को नयन बुध को मेरी निंद खुली जुम्मेरात को चैन अरे शुक्र शनी कटे मुश्किलसे आज है इतवार सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार” आणि कदमच्या डोक्यात एकदम प्रकाश पडतो… अरे, हे सर्व खून असेच रविवार ते शनिवार एक एका वारी घडलेत! पण शनिवारी दोन खून कसे? याच्या मागे काही खगोलशास्त्र किंवा भविष्याचा तर संबंध नाही? कदमला आठवतं की शेजारी राहणारा डॉ. देसाईला पण भविष्य-खगोलशास्त्राची आवड व माहिती आहे. ( डॅाक्टर कडे सापडलेल्या नायलॅानचे रंगीत दोर व फिनेक कंपनीचा चाकू यामुळे एक संशयित म्हणून कदमने त्याला अटक करून पुछताछ केलेली असते) कदम लगेच डॅाक्टरांकडे जातो. त्यांची माफी मागून त्यांना या प्रश्नांत मदत करायला सांगतो. तो या सर्व खुनांचा सिक्वेन्स सांगतो. ते प्रत्येक वारी का घडले? मग शनिवारी दोन का? यापुढे कोणता वार? कुणाचा खून? डॅाक्टर सांगतात की भारतीय भविष्य व खगोल शास्त्रात नवग्रहांना खूप महत्व आहे. रवि, सोम(चंद्र), मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनि, राहू आणि केतु. यांचे रंग व धान्य वेगवेगळे असतात. त्या त्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ते वापरले जातात. कदम ही माहिती लिहून घेतो. त्यावरून प्रत्येक खुनात वापरण्यात आलेले फिनेक कंपनीचे चाकू, वेगवेगळ्या रंगांचे नायलॅान दोर व तोंडातील पदार्थ यांचा संबंध जोडून एक तख्ता तयार करतोः- “रवि मेहरा-रविवार-सोनेरी दोर- तोंडात गहू-दिशा पूर्व सुचंद्रा-सोमवार-चंदेरी दोर-तोंडात तांदूळ-दिशा पश्चिम मंगला शाह-मंगळवार-लाल दोर-तोंडात तूर डाळ- दिशा दक्षिण लक्ष्मी बुधीराजा-बुधवार-हिरवा दोर-तोंडात हिरवे मूग-दिशा उत्तर गुरुराज अदवानी-गुरूवार-पिवळा दोर-तोंडात हरबरा डाळ-दिशा उत्तर पूर्व(ईशान्य) दिव्या शुक्रपाणी-शुक्रवार-पांढरा दोर-राजमा-दिशा दक्षिण पूर्व शनिया डिसौजा-शनिवार-काळा दोर-तोंडात काळे तिळ-दिशा उत्तर पश्चिम राहुल सिंग-शनिवार-निळा दोर-तोंडात उडीद दाळ-दिशा दक्षिण पश्चिम” आता उरला एकच ग्रह-केतु. केतुचा वार मंगळवार. ग्रे रंग, चना दाळ, दिशा दक्षिण पश्चिम. “केतु”म्हणजे कदमची मुलगी केतुलचा नंबर लागणार? आज तर मंगळवारच आहे! कदम घाबरून जातो! तो केतुलला फोन करतो पण तो बंद लागतो. ती सध्या कुठे आहे? कोर्टात? कदम आपल्या मुलीला वाचवतो का? खरा खुनी कोण असतो? तो पकडला जातो का? त्याचे यामागचा उद्देश काय असतो? याच्यामध्ये अजून कोण सामिल असतं का? याची उत्तरे मिळण्यासाठी वाचावी लागेल अश्विन सांघी यांची कादंबरी Razor Sharp. ...Read more

BANGARWADI
BANGARWADI by VYANKATESH MADGULKAR Rating Star
Sameer Kazi

सुंदर अशी कादंबरी माणदेशी बनगरवाडी तशी कोरडी रखरखती पण, यातील पात्रात मायेचा करुणेचाओलावा मनात घर करुन जातो