* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: INDIA@70:SNAPSHOTS SINCE INDEPENDENCE
  • Availability : Available
  • Translators : JOSEPH TUSKANO
  • ISBN : 9789353173203
  • Edition : 1
  • Publishing Year : OCTOBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 400
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
ENTER THE PORTAL THAT WILL EXPORT YOU ALL THE WAY TO THAT HISTORIC STROKE OF THE MIDNIGHT HOUR! THE YEAR 1947 WAS ONE OF CHANGE. AFTER ALMOST 200 YEARS OF BRITISH RULE, INDIA BECAME A UNITED POLITICAL ENTITY. ONLY ONE QUESTION RANG LOUD: WHAT TYPE OF NATION WOULD THE NEW INDIA BE? THIS BOOK TRACES THE COUNTRY’S WHIRLWIND JOURNEY, GIVING US A LOOK AT THE LAST SEVENTY YEARS. AGAINST A POLITICAL BACKDROP, IT PROVIDES GLIMPSES OF INDIA’S VAST AND RICH CULTURE, ITS MANY LANGUAGES AND REMARKABLE DIVERSITY, ITS EMINENT PERSONALITIES AND NOTABLE ACHIEVEMENTS IN ALL SPHERES. FEATURING BITE-SIZED INFORMATION, FUN FACTS, CHARMING ILLUSTRATIONS AND DETAILED MAPS, THIS SPECIAL BOOK SUMS UP THE LOGS OF INDIA’S INDEPENDENCE IN A FITTING WAY.
स्वतंत्र भारताचा सखोल समीक्षात्मक आढावा.. देशाचा सत्तर वर्षांतला झंझावाती प्रवास... फाळणीपासून ते १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामांची छाप, लोकपाल विधेयक ते नोटाबंदीचे धोरण; या साऱ्या आठवणींचा लेखाजोखा यात समाविष्ट आहे. त्यातून भारत देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होते.

No Records Found
No Records Found
Keywords
#INDIA AT70 #ROSHENDALAL #JOSEPHTUSKANO # COUNTINGOF PEOPLE #EMERGENCY #ISRO #LIBERATIONOFGOA #KHALISTAN #इंडियाअॅटसेव्हन्टी #सत्तरीतलाभारत #रोशनदलाल #जोसेफतुस्कानो #संदर्भग्रंथमाहितीपर #आणीबाणी #इस्रो #गोवामुक्ती #खलिस्तान
Customer Reviews
  • Rating Star महाराष्ट्र टाइम्स संवाद

    सत्तरीच्या लेखाजोखा.... डॉ. रोशन दलाल या इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफीन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तक गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्या `INDIA AT 70` या पुस्तकाचा देखील समावेश करवा लागेल. याच नव्या पुस्तकाचा जेष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतील भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्ष भारत खंडात ज्या ज्या राजकीय सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य, व कला- क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे हि सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने सत्तरीची हि घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आलं आहे. भारतातील राजकीय पार्शवभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तदनंतर निवडक व्यक्ती आणि त्या यावर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. हि सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटीपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपना दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबोधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. ...Read more

  • Rating StarMaharashtra times 24th May 2020

    सत्तर वर्षांचा लेखाजोखा... ... डॉ. रोशन दलाल या प्रसिद्ध इंग्रजी लेखिका असून त्यांची `पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया`, `पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड` आणि `रीलिजन्स ऑफ इंडिया` ही अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक पुस्तकं गाजली आहेत. पुस्तकांच्या याच रांगेत त्यांच्य `India at 70` या पुस्तकाचादेखील समावेश करावा लागेल. याच नव्या पुस्तकाचा ज्येष्ठ विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी केलेला मराठी अनुवाद `सत्तरीतला भारत` नुकताच प्रसिद्ध झाला आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजी मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियन जॅक जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षं भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, ऐतिहासिक, आर्थिक, आरोग्य व कला-क्रीडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत, त्या साऱ्यांचा या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या प्रत्येक क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे घेण्यात आलेला आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची सत्तरी पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखादया देशाने सत्तरीची घोडदौड करणं खूप अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातील भव्य-दिव्य समृद्ध संस्कृती, ख्यायकीर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रातील यशोगाथा यांचा मागोवा अभ्यासू वृत्तीने घेतलेला आहे. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षीच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्ती आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, कला-क्रीडा विषयक घटना उद्धृत केल्या आहेत. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख केला आहे आणि त्याचबरोबर समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. ही सारी माहिती पेश करताना लेखिकेने पानोपानी तळटिपेच्या रूपात संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सुज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जिज्ञासू व अभ्यासू वाचक अधिक माहितीसाठी मूळ स्रोताकडे जाऊ शकतात. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि चित्रकला अशा विविध क्षेत्रात घडलेल्या घटनांतून अधोरेखित होत असते. त्या घटनांतून संबंधित राष्ट्राची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेल्या वाटचालीचाच प्रत्यय येत असतो. या पुस्तकातील अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवे ते पान उघडावे आणि त्या त्या वर्षी घडलेल्या मनोवेधक घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरावे, वर्तमानकाळाच्या प्रकाशात भविष्याचा वेध घेत राहावे. साध्या सोप्या ओघवत्या, पण लालित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. तिथे अनुवादकाचे कसब नजरेत भरते. प्रस्तुत पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, लेखक, पत्रकार, पालक, साऱ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच आयएएस, आपीएस, यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्यांसाठीही ते मार्गदर्शक ठरू शकते. -जॉन गोन्सालविस ...Read more

  • Rating StarDAINIK LOKMAT (MANTHAN) 03-NOV-2019

    राष्ट्राच्या वैशिष्टपूर्ण इतिहासाचा आढावा १९४७ हे साल स्थित्यंतराचं ठरलं. सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर भारत देशाला एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व मिळाले. त्यावेळी एक प्रश्न भेडसावत होता. हा नवा भारत देश कुठल्या प्रकारचे राज्य असेल? या प्रश्ाचं उत्तर हवं असेल, तर या पुस्तकाचं एकेक पान चाळत जा म्हणजे गेल्या सत्तर वर्षातला झंझावती प्रवास तुमच्या नजरेस पडेल. फाळणीपासून १९६२ सालचं चीनचं आक्रमण, आणीबाणीपासून ते कलामची छापे, लोकपाल बिलापासून ते नोटबंदीचे धोरण, या सार्या आठवणी या पुस्तकातील पाना-पानांतून दर्शनास येतात. त्यातून आपल्या देशाची विस्तीर्ण अन् समृद्ध संस्कृती, भिन्न भाषांतील वेगळेपण आणि उल्लेखनीय विविधता, राजकीय घडामोडी, भारदस्त व्यक्तिमत्त्वे आणि नजरेत भरणारी सार्वभौम प्रगती यांची ओळख होती. सत्याची कास धरून थोडक्यात मजकूरात पेश केलेली ही माहिती चित्रे आणि आलेख यांनी सजवलेली आहे व स्वतंत्र भारताची ओळख करून देण्यास ती समर्थ आहे. भारतवर्षाची ही कहाणी स्वातंत्र्योत्तर काळातली, गेल्या ७० वर्षांची कहाणी आहे. थोडक्यात काय तर, या ग्रथांत सातत्यानं नवे रूप घेत गेलेल्या आवेशपूर्ण भारतवर्षाचे रुप प्रतिबिंबीत झालेले दिसेल. ...Read more

  • Rating Starजॉन गोन्सालविस

    सत्तर वर्षांचा जोखालेखा ऐवज... डॉ. रोशन दलाल या उच्चविद्याविभूषित असून शाळांपासून ते विश्वविद्यालयापर्यंत त्यांनी शिक्षिका म्हणून ज्ञानदानाची भूमिका बजावली आहे. त्याच वेळी त्यांनी ‘पुफिन हिस्टरी ऑफ इंडिया’, ‘दी पुफिन हिस्टरी ऑफ वर्ल्ड’, दी रिलिजन्स फ इंडिया’ ही त्यांची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मार्गदर्शक अशी गाजलेली पुस्तके नजरेआड करता येणार नाहीत. ‘India At 70’ या इंग्रजी पुस्तकाचाही त्यात समोवश करावा लागेल. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘सत्तरीला भारत’ या नावाने विज्ञान लेखक जोसेफ तुस्कानो यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊस या ख्यातनाम प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. १४ ऑगस्ट १९४७ रोजीच्या मध्यरात्री ब्रिटिशांचा युनियक जॅक झेंडा जाऊन भारताचा तिरंगी झेंडा अस्मानात विहार करू लागला. त्या रोमहर्षक, ऐतिहासिक दिवसापासून गेली ७० वर्षे भारत खंडात ज्या ज्या राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य व क्रिडा विषयक घडामोडी घडलेल्या आहेत. या प्रत्येक क्षेत्रात भारत देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा या पुस्तकात प्रामाणिकपणे होण्याचा प्रयत्न स्पृहणीय आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या वयाची ‘सत्तरी’ पार करणे ही सर्वसामान्य घटना असते; मात्र एखाद्या देशाने ‘सत्तरी’ची घोडदौड करणे हे खूप अभूतपूर्व, ऐतिहासिक घटना असते. या पुस्तकात गेल्या सत्तर वर्षातल्या काळातील प्रत्येक वर्षी घडलेल्या घटनांवर दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. भारतातील राजकीय पार्श्वभूमीवर या देशातली भव्य, दिव्य, समृद्ध, संस्कृती वैविध्यपूर्ण विविधता, विविध भाषा, ख्यातकिर्त व्यक्ती आणि सर्व क्षेत्रांतली यशोगाथा यांचा मागोवा प्रामाणिकपणे व अभ्यासू मनोवृत्तीने घेतलेला दिसून येतो. प्रत्येक प्रकरणाचा प्रारंभ त्या त्या वर्षाच्या मुख्य राजकीय घटनेवर प्रकाशझोत टाकून केलेला आहे. तद्नंतर निवडक व्यक्तिमत्त्वे आणि त्या वर्षीच्या सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक घटना यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. अखेरीस काही ठळक घटनांचा नाममात्र उल्लेख आहे. त्याचवेळी समर्पक छायाचित्रे, रेखाटने दिलेली आहेत. आणि हे देत असताना तळटीप म्हणून पानोपानी संदर्भग्रंथांची सूचीही देण्याचा सूज्ञपणा दाखवला आहे. त्यामुळे जागृत, जिज्ञासू व अभ्यासू वाचकांना मूलस्त्रोताकडे जाता येऊ शकते. कोणत्याही देशाची प्रतिमा ही चित्रपट, साहित्य, संगीत, नृत्य आणि कला या विविध क्षेत्रांत घडलेल्या घटनांतून आविष्कृत होत असते. त्या त्या घडलेल्या घटनांमुळे संबंधित देशाची समृद्धी, श्रीमंती व विकासाकडे केलेली वाटचाल याचा प्रत्यय येत असतो. त्यामुळे ‘मी एक भारतवासी’ म्हणून हे सर्व वाचून उरात अभिमान भरून येतो. भारतातील या महान विभूती व त्यांनी केलेल्या कार्यामुळे आदर दुणावतो. या अभ्यासपूर्ण, संशोधनात्मक माहितीमुळे काही वाचकांच्या ज्ञानाची उजळणी होईल. काही वाचकांच्या ज्ञानात अधिक भर पडेल, काही वाचकांची जिज्ञासा अधिक जागृत होऊन अधिक जाणून घेण्याची जाणीव वृद्धिंगत होईल. या पुस्तकात विविध अंगाने परामर्श घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘‘मी जर पशु-पक्ष्यांवर प्रेम करत नसेल तर मी परमेश्वरावर देखील प्रेम करत नसतो.’’ असे कळकळीने सांगणारे शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी भेटतात. ‘‘मुलांना वाचनातून प्रथम जगातील जादूई किमयेची माहिती मिळाली पाहिजे.’’ असे आवर्जून भाष्य करणारे भारताचे माजी राष्ट्रपती झाकीर हुसेन आपल्याला प्रभावित करतात. तसेच ‘मिस वर्ल्ड’’ हा किताब जिंकणारी पहिली एशियन तरुणी रिरा फारियाची त्यांच्या प्रेमकहाणीचे दर्शन घडले. ‘भारत माझा देश आहे’, ही राष्ट्रीय प्रतिज्ञा लिहिणारे तेलगू लेखक पी. व्ही. सुब्बाराव सोबत ‘उडणारा शीख म्हणजे मिल्खा सिंग आपल्या नजरेत भरतो. त्याचवेळी कवयित्री कमला दास यांच्या कवितेच्या ओळीही मनाला साद घालतात– ‘मी आहे लाखो मृत्युंची प्रतिनिधी सुकून गेलल्या बियांच्या झुपक्यासारखी गळून पडेल मातीत, पुन्हा रुजवण्यासाठी आणखीन कुणाच्या तरी आठवणीत’ या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण हवं ते पान उघडावे आणि त्या-त्या वर्षी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना वाचून इतिहासाच्या काळात वावरत असताना वर्तमानकाळाच्या प्रकाशात भाविष्याचा वेध घेऊ शकतो. साध्या, सोप्या, ओघवत्या पण ललित्यपूर्ण भाषेत पुस्तकाची मांडणी केलेली आहे. सदर पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, पत्रकार, लेखक व पालक यांना जसे उपयुक्त आहे तसेच IAS, IPS विविध स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना उपयुक्त ठरेल. तसेच गेला बाजार, ‘कौन बनेगा करोडपती’ विविध प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यासाठी मार्गदर्शक ठरेल. या पुस्तकात गेल्या ७० वर्षांतील स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण, खेळ, संगीत, साहित्य इ. क्षेत्रांतील ठळक घटनांचा उहापोह आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

आबासाहेब कडू, अमरावती.

एकाच दमात छप्पन वेळा वाचावा असा काव्यसंग्रह* दै.सकाळच्या सप्तरंग पुरवणीत अ-अमिताभचा व दै.हिंदस्थान मधील `अमरावती सिरीज` चे स्तंभलेखक व अमरावती येथील प्रसिद्ध साहित्यिक श्री जी.बी.देशमुख ह्यांचा छप्पन कवितांचा समावेश असलेल्या अमरावतीच्या वस्तू,वास्ू आणि माणसाच्या वैशिष्ट्यावर आधारित `अमरावतीचे छप्पन स्वभाव` हे पुस्तक मी विकत घेतले. घरी गेल्यावर त्यातील छप्पनही कविता एकाच दमात वाचून काढल्या अन् पैसा वसूल झाल्याचे समाधान झाल्यावर त्यावर चिंतन करावेसे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच. वाचक हा अमरावतीकर असेल तर `अमरावतीतल्या गमती` ही पहिलीच कविता त्याच्या मनाचा ठाव घेते आणि `याटोत` बसवून परकोटातल्या मुर्गी मठासह अख्खी अमरावती फिरवून आणते. गांधीचौकात गांधी नाही मालटेकडीवर माल नाही.. खेटरे झाली ब्रँडेड सगळी मोची गल्लीत मोची नाही.. तपोवनात तपस्वी नाही कल्याणनगरात कल्याण नाही… लेखकाच्या भारदस्त शब्दशक्तीचा इथेच विजय होतो आणि मग अमरावतीची एकेक वैशिष्ट्ये पादाक्रांत करित छप्पनीकडे वाटचाल करीत जातो. ही काव्यात्मक रुपातील वैशिष्ट्ये वाचतांना अमरावतीचा पन्नाशितला वाचक देहभान विसरुन गतकाळात रममाण होतो. त्याचे मन नकळत सुखावते, गात्रे जागृत होतात, मेंदू रिचार्ज होतो तर तरुण वाचकाच्या मनात अमरावती शहराविषयी कुतुहल निर्माण होते. तोही मग त्यातील खाणाखुणा शोधायचा प्रयत्न करत बसतो. या संग्रहातील प्रत्येक कवितेवर एकेक निबंध तयार होऊ शकतो. स्वभाव हा शब्द सहसा मनुष्याशी जोडून उपयोगात आणला जातो पण इथे तर लेखकाने निर्जीवातही प्राण फुंकले आहे. अमरावतीच्या याटोत बसून ह्यातील सजीवता आपल्याला अनुभवता येईल. मग तो बेनाम चौक असो, कुथे बस स्टॉप असो, अनेक नावांचे कापसाचे जीन असो, वालकट कम्पाउंड असो, हनुमान आखाडा असो, इर्विन, डफरीन दवाखाने असो, `अमरावतीतल्या विहिरी` असो नाहीतर मोर्शी रोडवरील थोर महात्म्यांचे पुतळे असो. अमरावतीच्या शब्दकळा, अमरावतीच्या हाका, अमरावतीच्या वल्ली, अमरावतीच्या टॉमीची पाॅटी, अमरावतीचे सुपरस्टार, अमरावतीचा बागुलबोवा, अमरावतीचे वेडे एकदमच बेस्ट. अमरावतीच्या रेल्वे ब्रीजचे तर ते भरभरुन कौतुक करतात. चारी बाजूनं उतरणारा पूल फक्त जपानमध्ये आहे अन् सिंगापूरच्या नंतर नंबर आपल्याच पुलाचा आहे कारण हा पूल आहेच कौतुक करण्याजोगा, मलाही ह्या पूलाचे कौतुक याच्याकरिता आहे की ह्या पूलाचे बांधकाम माझ्या पेठ मांगरुळी गावच्या अभियंत्याच्याच देखरेखीखाली झाले आहे. अमरावतीशी प्रत्यक्ष संबंध आला तो १९७५ सालापासून,पण काही अपवाद वगळता लेखकाच्या छप्पनीतील अनेक वैशिष्ट्ये मी अनुभवलेली आहेत. ह्याच रेल्वेपुलावर रोज संध्याकाळी एक भोळसट मुलगा गाणे गायचा,लोक त्याला प्रेमाने शाहरुख म्हणायचे,कारण तो स्वतःला शाहरुख खानंच समजत असे. अमरावतीच्या कॉलेजमधील तरुणांचे भावविश्व मांडतांना लेखकाने हात आखडता घेतला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज व व्ही.एम.व्ही. ही त्यावेळची आघाडीवरची कॉलेजेस होती. त्यामधील कॉलेजियन्सचे दर्द लेखकाने मिश्कीलपणे मांडले त्या `अमरावतीचा दर्द` ह्या कवितेतील ओळी आताच्या पेन्शनरांना त्या काळात घेऊन जातील. तरुण मंडळींनी तो आनंद पुस्तक वाचून घ्यावा. अमरावतीचा आद्य मॉल म्हणजे फक्त महिलांसाठीच राखीव असलेली बाजारपेठ अशी ओळख असलेलं `जोशी मार्केट`, `अमरावतीची नवरात्र`, `अमरावतीचे जेष्ठ नागरिक` ह्या पूरक कविताही त्याच प्रेमाच्या विश्वात घेऊन जातात.. `अमरावतीचा भुलभुलैय्या` मधील अनुभव आजही अनेकांना येतो, मलाही अनेकदा आला, त्याकरिता ही पूर्ण कविताच वाचणे आवश्यक आहे. अमरावतीचा अंबानाला, त्यानुषंगाने मास्तराने दिलेली `पदवी`, अमरावतीचे भोंगे, अमरावतीच्या उन्हाच्या चटक्यातील गरम चहाचे घोट थेट लंडनच्या थंड हवामानातल्या आईस्क्रीमलाही थंड करुन टाकतात ही तुलना मनाला भावून जाते. ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीतली मजा आताच्या डिजीटल फोटोग्राफीत नाही. त्यावेळी अमरावतीत मोजक्याच असलेल्या फोटो स्टुडिओची नावे लेखकाने दिलेली आहेत.त्यांनीही आता डिजीटल फोटोग्राफीच्या युगात प्रवेश केलेला आहे.त्यावेळेस काढलेले ब्लॅक अँड व्हाईट फोटो अनेकांनी जपून ठेवले असावे. लेखक मणीबाई गुजराती शाळेत शिकत होते त्यामुळे त्या शाळेचे व गुरुजनांचे गुणगान, स्वभाववैशिष्ठ्ये हे पुस्तकात येणे स्वाभाविकच आहे, मास्तराला पाणी पाजता पाजता त्यांचा वर्गमित्र पाणी पुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यापर्यंत कसा पोचला हा मनोरंजक किस्सा `अमरावतीची गुरुवाणी` कवितेतून खुसखुशीत भाषेत रेखाटला आहे. अमरावतीच्या टाकीजा, त्यांची वैशिष्ट्ये तर आहेतच पण दर गुरुवारी नवे सिनेमे अमरावतीत सर्वात पहिल्यांदा प्रदर्शित होत होते हे आज अनेकांना सांगूनही पटणार नाही पण तो मान अमरावतीला मिळत होता हा इतिहास आपल्याला अचंबित करुन जातो, सिनेमाचे अनेक डिस्ट्रीब्युटर हे अमरावतीतच होते, जवाहर रोडवरील जुन्या इमारतीवर ते बोर्ड तेव्हा हमखास दिसत, काळाच्या ओघात त्या जागी नवीन ईमारती उभ्या झाल्या, परंतु अजूनही एक-दोन ठिकाणी ते बोर्ड दिसतात.असे अनेक अचंबित करणारे किस्से या पुस्तकात काव्यरुपात लेखकाने अत्यंत खुमासदार व मनोरंजक पद्धतीने रेखाटून त्यात जीवंतपणा आणला आहे. हा काव्यसंग्रहातील ठेवा पुढील पीढीसाठी वारसा ठरेल यात मला तीळमात्रही शंका वाटत नाही. खवैयेगीरीत म्हणाल तर विनायकराव तायडेच्या गड्डा हॉटेलचा आलुबोंडा ज्या अमरावतीकरांनी आणि इतरांनीही खाल्ला असेल त्याला जगातल्या कुठल्याही हॉटेलातील आलुबोंडा आवडत नाही, अन् खाल्लाही असेल तर खातांना त्याला विनायकरावाचे आतिथ्य व तर्रीची आठवण आल्याशिवाय रहात नाही. अमरावती जिल्ह्यातील मंडळी लग्नबस्ता खरेदी करायला आली की खरेदी झाल्यावर वर वधूकडील मंडळीचे फराळपाण्याचे हे आदराचे स्थान होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना मनीऑर्डर हातात पडली की प्रभात चौकातील `गौ दुग्ध सागर` ही विद्यार्थ्यांची पहिली पसंती असे. `जीडीएस` म्हणून ते फेमस होते. साऊथ इंडियन डिशेश मिळणारे जिल्ह्यातील ते एकमेव ठिकाण होते. राजकमल चौकालगतच्या टी स्टॉलवरच्या बोर्डावर चहाचे नावंच `स्पेशल चहा`, `बादशाही चहा`, `यादगार चहा` अन साब को `एक शिंगल मलाई मारके` असा आपुलकीचा चहा तेव्हा अमरावतीकरांनी यथेच्छ रिचवला. आता ह्या सर्व चहांचा मिळून एकच चहा मिळतो. पण ह्या चहात ती लज्जत नाही. मग तुम्ही त्या स्टॉलला `प्रेमाचा चहा` हे नांव ठेवा किंवा अजून काही. हरेक शहराला एक संस्कृती असते, वस्तू-वास्तू वारसा असतो, त्यातून जगण्यातली नजाकत शोधावी लागते. ती नजाकत `अमरावतीचे छप्पन स्वभाव` ह्या काव्यसंग्रहातून अनुभवावयास मिळते.लेखकाच्या बहारदार लेखणीतून उतरलेले ही काव्यमय वैशिष्ट्ये वाचतांना अमरावती बाहेरील वाचकही मग आपल्या शहरातील वैशिष्ट्ये शोधत बसतो ही हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. तसेही छप्पन ह्या शब्दाला फार महत्व आहे, `छप्पन इंची छाती`, `अब तक छप्पन` हा सिनेमा, छप्पन भोग, छप्पन छुरी अन् पिव्वर वऱ्हाडातली वर्ल्ड फेमस धमकी म्हणजे `तुह्यासारखे त म्या सतराशे छप्पन पाह्यले बे, तुह्याकुन जे हुईन थे करुन घे.` छप्पन ह्या शब्दाचा पूरेपूर करुन घेतलेला वापर म्हणजे जी.बी.देशमुख सारख्या दिलखुश लेखकाने लिहिलेले हे खुमासदार,रसभरीत,टवटवीत प्रफुल्लित अन मिश्कील काव्य. आणि शेवटी……….. मणुश्याचे हे शरीर अणित्य आहे आतमा-णित्य आहे हा श्रद्धांजलीपर आवाज ज्याने हिंदू स्मशानभूमीत ऐकला नसेल त्याने ह्या जन्मात तरी तो ऐकेपर्यंत मरु नये. हे शब्द ऐकूनही त्याकडे कानाडोळा केला असेल तो माणूस करंटा पण हे करंटेपण लेखकाने घेतले नाही. लहानपणापासून अमरावतीत वावरतांना `डफरीन` (लँडीग पोर्ट) ते ही `वरची जागा` ह्यातील अत्यंत बारकाईने केलेले निरिक्षण लाजबाबच म्हणावे लागेल,त्याला तोड नाही. हे पुस्तक वाचतांना प्रत्यक्ष यमराज जरी द्वारी आला तरी त्याला "हे पुस्तक वाचेपावतर जराकसा थांबतं काय रे बॉ." अशी म्हणण्याची हिम्मत वाचकात येते हे मात्र नक्की. अमरावतीच्या वस्तू,वास्तू आणि माणसांच्या वैशिष्ट्यावर आधारित आपल्या बालमित्रांना समर्पित केलेला व मेहता पब्लिशिंग हाऊस ह्यानी प्रकाशित केलेला हा अमूल्य ठेवा आपणा सर्वांना नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे. ...Read more

बाबाराव घोरमाडे, अमरावती

प्रथम दर्शनी कविता लेखन असले तरी गद्य आणि पद्य सोबत सोबत चालल्यासारख्या लेखन शैलीचा भास जाणवतो. अमरावती शहरातील 70..80 व नंतरच्या दशकातील गुणवैशिष्ट्ये मार्मिक नर्म विनोदी शैलीत सुंदर रीतीने विषद केली आहेत. लेखकाची सुक्ष्म निरीक्षण शैली काव्य चना स्वरूपात पुस्तक रूपाने सादर करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. इजाफा,रूतबा, हिरव्या देठाचे,कैलहीचा मौहोल, ढगांचा,इत्यादी जुने वऱ्हाडी शब्द वापरल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखकाने अमरावती शहरातील जुन्या जाणत्या, गुणवान, असामान्य अशा व्यक्तींची दखल घेतली......पण काहींची दखल राहून गेली आहे असे माझे मत आहे. उदा. सुरेश भट, मधुकर केचे व त्यांची सायकल , अमरावतीचे दहा दिवसांची गणपती उत्सव सजावट..... प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक, विनोदी पण शेवटी असलेली कारूण्याची किनार अंतर्मुख करुन जाते. ...Read more