* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HALT STATION INDIA
  • Availability : Available
  • Translators : ROHAN TILLU
  • ISBN : 9789353173661
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HALT STATION INDIA CHRONICLES THE DRAMATIC RISE OF INDIA’S ORIGINAL RAIL NETWORK, THE ARRIVAL OF THE FIRST TRAIN, AND THE SUBSEQUENT EMERGENCE OF A PIONEERING ELECTRIC LINE—ALL IN THE PORT CITY OF BOMBAY. TRAINS THAT ONCE PROVOKED AWE AND FEAR—THEY WERE VIEWED AS FIRE CHARIOTS, SMOKE-SPEWING DEMONS—HAVE TODAY BECOME A NATION’S LIFEBLOOD. TAKING A WALK ALONG INDIA’S FIRST RAIL LINES, THE AUTHOR STUMBLES UPON FRAGMENTS OF THE PAST—A CLOCK AT VICTORIA TERMINUS THAT OFFERS A RARE VIEW OF A CITY; A CANNON NEAR MASJID BUNDER STATION THAT IS WORSHIPPED AS A GOD; A WATCHTOWER OVERLOOKING SION STATION, BELIEVED TO HAVE HOUSED A WITCH. EACH PIT-STOP COMES WITH STORIES OF DESIRE AND WAR, AMBITION AND DEATH—BY DOCKYARD ROAD STATION, FOR INSTANCE, AUTHOR LAURENCE STERNE’S BELOVED, ELIZA DRAPER, FOLLOWED A SAILOR INTO THE SEA; OR CLOSE TO PAREL STATION, THE WIFE OF INDIA’S GOVERNOR GENERAL, LORD CANNING FOUND A GARDEN RICH IN TROPICAL VEGETATION; THIS, SHE REPLICATED AT BARRACKPORE. DRAWING FROM JOURNALS, BIOGRAPHIES, NEWSPAPERS AND RAILWAY ARCHIVES—AND WITH NOSTALGIC, FIRST-TIME ACCOUNTS OF THOSE WHO TRAVELLED BY INDIA’S EARLIEST TRAINS—THE BOOK CAPTURES THE ECONOMIC AND SOCIAL REVOLUTIONS SPURRED BY THE COUNTRY’S FIRST TRAIN LINE. IN THIS, HALT STATION INDIA IS NOT JUST ABOUT THE RAILWAYS—IT IS THE STORY OF THE GROWTH OF INDIA’S BUSINESS CAPITAL AND A RARE STUDY OF A NATION.
भारतात १८५३मध्ये पहिली रेल्वे धावली. या शोधाने भारतीय जनजीवनाचा चेहरामोहरा बदलला. या पहिल्या आगीनगाडीच्या आगमनाची कहाणी अनेकानेक रोचक गोष्टींनी भरलेली आहे. . रेल्वेच्या विस्तारित जाळ्याबरोबरच अनुषंगिक प्रसंग,रेल्वे स्थानकाच्या निर्मितीचा इतिहास आणि त्या संदर्भातील छोटे उपकथानक या सर्वांचा रोचक, ऐतिहासिक वृत्तान्त या पुस्तकात समाविष्ट आहे. मुंबईतलं पहिलं वाफेचं इंजिन,आगगाडीला भुताटकी समजणारा भोळा समाज आणि त्यावेळच्या गमतीजमतींसह तत्कालीन अद्भुत व चित्ताकर्षक तपशीलवार गोष्टींमुळे त्या सोनेरी दिवसांचं चित्रच जणू डोळ्यांसमोर उभं राहातं.
INDIAN AUTHORS AWARD 2021 - HISTORY & TRAVEL
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HALT STATION INDIA #RAJENDRA AKLEKAR #ROHAN TILLU #FIRSTINDIAN RAILWAY #MARATHITRANSLATION #ONLINEBOOKS #MUMBAILOCAL #CST #RAILWAYHISTORY #कहाणीपहिल्याआगीनगाडीची #राजेंद्रआकलेकर #रोहनटिल्लू #मुंबईरेल्वे #मराठीअनुवादितपुस्तके #
Customer Reviews
  • Rating StarMadhav Jogdand

    Hello Everyone... एका छान पुस्तकाचा पुस्तक परिचय... कहाणी पहिल्या आगिनगाडीची... ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सात बेटांवर भर घालून तयार झालेलं हे शहर मुंबई.. त्यानंतर 1853 ला इथेच भारतातली पहिली रेल्वे धावली मुंबई म्हणजे तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे ्हणजेच सालसेत.( साष्टी) . त्या रेल्वेची ही कहाणी.... भारतात रेल्वे यायची हे कसं ठरलं कधी ठरलं त्यानंतर प्रत्यक्ष रेल्वे सुरू व्हायच्या आधी रेल्वे मार्ग कसा बांधला गेला तो बांधताना काय काय अडचणी आल्या... इथपासून ते पहिली रेल्वे कशी धावली याची माहिती आहे. त्यानंतर बोरीबंदर स्टेशन म्हणजेच आत्ताच CSTM Station हे बांधले जाताना चा इतिहास आणि त्याची माहिती... त्यानंतर लेखक अक्षरशा आपल्याला पुस्तकातूनच रेल्वे रुळावरून मुंबई पासून ते कल्याण पर्यंत घेऊन येतात येताना वाटेत येणार प्रत्येक स्टेशन प्रत्येक रेल्वे मार्ग याची माहिती आणि त्यांचा सुंदर इतिहास सांगतात.... त्यानंतर GIPR म्हणजेच आत्ताची मध्य रेल्वे आणि Harbor Railway. आणि BB &CI म्हणजे आत्ताची पश्चिम रेल्वे यांची अशीच सुंदर माहिती आहे. त्याचबरोबर बॉम्बे इम्प्रोवमेंट ट्रस्ट बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांच्या थोड्या किस्से कहाण्या... मुंबईच्या विकास कसा झाला याचा इतिहास आणि काही कथा या सुद्धा या पुस्तकात आहेत. मुंबई आणि रेल्वे यांवर ज्यांचे प्रेम आहे आणि ज्यांना जुन्या इतिहासात रस आहे त्यांनी हे पुस्तक नक्की नक्की वाचावं त्यांना खूप आवडेल.... मी हे पुस्तक माझ्या मोबाईल वरील Kindle app वर वाचलं इतक्या छान पुस्तकाची माहिती माझ्या मित्रांना मिळावी म्हणून हि पोस्ट! ...Read more

  • Rating StarSubhash Joshi

    जेमतेम सहा महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या आजच्या पुस्तकालाही ‘मुंबई`चाच संदर्भ आहे. मूळ इंग्रजी पुस्तक आहे Halt Station India, लेखक राजेन्द्र आकलेकर आणि रोहन टिल्लू यांनी मूळ पुस्तकाला न्याय देणारा यथोचित अनुवाद केला आहे. भारतात आगिनगाडी सुूं करण्याचा विचार 1840 पासूनच सुरूं झाला होता आणि भारतातलीच नव्हे तर आशियातली पहिली रेल्वे गाडी 16 एप्रिल 1853 रोजी तीन इंजिन्स आणि चौदा डब्यांसह बोरीबंदर ते ठाणे या चौतीस कि.मी.च्या मार्गावर धांवली. अशी रेल्वे सुरूं करण्याच्या संकल्पनेपासून ती प्रत्यक्ष धांवेपर्यंतची सगळी प्रक्रिया अतिशय रोमांचकारक आहे. या पुस्तकासाठी लेखकाने अक्षरशः हजारो कागदपत्रांचा, संदर्भ पुस्तकांचा, देशभर फिरून दस्तावेजांचा अभ्यास केला आहे आणि या रेल्वे मार्गावरून शेकडों वेळां पायी फिरून अभ्यास केला आहे. हे पुस्तक हलकेफुलके किस्से सांगत नाही तर अनेक संदर्भ आणि पुराव्यांसकट अनेक किचकट ऐतिहासिक तपशील सांगते. त्या निमित्ताने आपल्याला ब्रिटिश राजवटीबद्दलही बरंच कांही वाचायला मिळतं. हे पुस्तक इतक्या क्लिष्ट तपशीलाने भरलं आहे कीं आपण कंटाळून बाजूला ठेवायचा विचार करतो... पण तरीही हे पुस्तक आपल्याला ते बाजूला ठेववत नाही हे विशेष. हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने आणि अनुवादकाने घेतलेले परिश्रम वाचूनच आपली दमछाक होते, छाती दडपते, तरीही आपण ते वाचून पुरं करतोच. एक पराकोटीचा रोमहर्षक संदर्भग्रंथ असं मी त्याचं वर्णन करीन. - सुभाष जोशी, ठाणे ...Read more

  • Rating StarMaharashtra Times Samwad 24-2-2020

    लोकलशिवाय मुंबईची कल्पनाच करता येत नाही. आज मुंबईची लोकसंख्या १ कोटी ८२ लाख आहे आणि लोकलनं रोज सुमारे ७५ लाख माणसं प्रवास करतात. एवढ्या अवाढव्य प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आगगाडीचा जन्म झाला १६ एप्रिल १८५३ रोजी. देशातीलच नव्हे तर, आशिया खंडातल पहिली आगगाडी बोरीबंदर (आताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते ठाणे अशी धावली. तत्पूर्वी १८२५ साली इंग्लंडमध्ये पहिली आगगाडी सुरू झाली, त्यानंतर देशोदेशी आगगाडी सुरू करण्याचे प्रयत्न झाले. अमेरिकेत रेल्वेमार्ग बांधले गेले आणि त्यानंतर तिसरा नंबर भारताचा लागला. तेव्हा आपल्यावर इंग्लंडचं अधिराज्य होतं. हिंदुस्तानातला कच्चा माल इंग्लंडला पाठवणे आणि तिकडचा माल विक्रीसाठी हिंदुस्तानात आणणं, हा रेल्वे बांधण्यामागचा सरकारचा मुख्य हेतू होता. त्यासाठी हिंदुस्तानातील बंदरं अंतर्भागाशी जोडणं आवश्यक होतं. यातून मुंबई, कलकत्ता आणि मद्रास (आता चेन्नई) या बंदरांपासून रेल्वेमार्ग टाकायचं इंग्रज सरकारनं ठरवलं. हिंदुस्तानासारख्या मागास देशात रेल्वे चालवणं फायदेशीर होईल, याचा अनेकांना विश्वास वाटेना आणि सामान्यांना तर बिनबैलाची, बिनघोड्याची गाडी चालेल आणि सामान व माणसं वाहून नेईल असंच वाटेना. याबाबत लोकांना नीट माहिती देण्यासाठी म्हणून तेव्हाच्या टाऊन हॉलमध्ये एक मोठी सार्वजनिक सभा झाली. नाना शंकरशेटांसारख्या समाजधुरिणांची भाषणंही झाली, पण तरीही पुरेसा प्रतिसाद मिळेना. शेवटी सरकारनं कंपनीत पैसा गुंतवणाऱ्या भागीदाराना त्यांच्या गुंतवणकीवर ५% एवढ्या परताव्याची खात्री दिली. म्हणजे कंपनीला तोटा झाला, तरी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर ५% व्याज मिळेल याची खात्री दिली. शिवाय कंपनीला लागणारी सर्व जमीन, म्हणजे रूळ टाकण्यासाठी आणि इमारती, स्थानकं. पूल इ. साठीची सर्व जमीन सरकारनं फुकट देण्याचं कबूल केलं. त्यानंतर मात्र रेल्वेचं काम भराभर होऊ लागलं आणि १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली आगगाडी धावली... भारतीय रेल्वेची अशी विविध स्वरूपाची माहिती `कहाणी पहिल्या आगीनगाडीची` या या राजेंद्र आकलेकर लिखित पुस्तकात वाचायला मिळते. या मू‌ळ इंग्रजी पुस्तकाचा तेवढाच रंजक आणि माहितीपूर्ण अनुवाद रोहन टिल्लू यांनी केला आहे. आजमितीला मुंबईत १३६ लोकल स्थानकं आहेत आणि त्यावरून रोज २३४० पेक्षा अधिक लोकल गाड्या धावतात. या सगळ्या गाड्यांची आणि स्थानकांची माहिती पुस्तकात देणं शक्य नाही, पण त्यातल्या काही विशेष स्थानकांची आणि त्यांच्या आसपासच्या विशेष जागांची, तिथल्या इतिहासाची माहिती पुस्तकात आवर्जून देण्यात आली आहे. उदा. आजच्या सी.एस.एम.टी.च्या जवळच म्हणजे आधीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसजवळ, म्हणजेच बोरीबंदरजवळ पूर्वी `फोर्ट जॉर्ज` किल्ला होता. या जॉर्ज किल्ल्यातूनच पहिल्या आगगाडीला तोफांची सलामी दिली गेली होती. आकलेकरांनी मुंबईमधल्या अनेक लोकल स्थानकांची आणि आसपासच्या भागांची अतिशय रंजक महिती पुस्तकात दिलेली आहे. तसंच `इतिहासाच्या पाऊलखुणा` या शीर्षकाखाली त्या भागांची जुनी माहितीसुद्धा दिली आहे. त्यामुळे पुस्तक एखाद्या कथा-कादंबरीसारखं रोचक झालं आहे. आकलेकर हे खरे रेल्वेप्रेमी आणि मुंबईप्रेमीही आहेत, असं त्यांचं हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच जाणवतं. आपली पहिली आगगाडी ज्या मार्गानं धावली तो मार्ग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ते त्या मार्गानं पायी चालले आहेत. अजूनही ते रेल्वेमार्गानं चालत असतात (अर्थात आवश्यक त्या सर्व परवानग्या काढून). त्यामुळेच मार्गाचं काम सुरू असतानाच्या अडचणी, वेगवेगळ्या स्थानकांचं वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम, आसपासच्या ऐतिहासिक खुणा, काही जुन्या गोष्टी, फार माहीत नसलेल्या भागांची माहिती, असा खूप तपशील या पुस्तकात वाचायला मिळतो. पुस्तकातील ही सगळी माहिती अतिशय रंजक आहे. मात्र पुस्तकाला सलग कथानक नसल्यामुळे ही माहिती काहीशी विसकळीत वाटते. म्हणजे आगीनगाडीची कथा वाचताना अनेक छोटे छोटे भाग एकामागून एक वाचत जावं लागतं. एका भागाचा पुढच्या भागाशी संबंध असेलच असं नाही. मुंबईतल्या १३६ लोकल स्थानकापैकी एखाद्याची माहिती वाचायची असेल, तर ती कुठे आहे ते आधी शोधून काढावं लागतं. म्हणजे हव्या त्या स्थानकाची, किंवा इतर विशेष काही गोष्टींची माहिती पुस्तकात नेमकी कुठे सापडेल, हे कळण्याचा काही तरी सोपा मार्ग असायला हवा होता. अनुक्रमणिका जर विस्तारानं दिली असती, तर ही अडचण कदाचित दूर होऊ शकली असती. तेढी उणीव सोडली, तर रेल्वेविषयक माहितीचा एक खजिनाच या पुस्तकात दडलेला आहे. पुस्तकात बरीच छायाचित्रंही आहेत. मात्र त्यांपैकी बरीच काळपट आहेत. जुन्या छायाचित्रण तंत्रामुळे कदाचित तसं झालं असावं. परंतु काही चित्रं बरीच सुस्पष्ट आहेत. मुखपृष्ठावरील गाडीचं छायाचित्रही आकर्षक आहे आणि नावाला अगदी शोभेसं आहे. मुंबई बेटांचा आणि मुंबईतल्या रेल्वेचाही नकाशा पुस्तकात आहे. एकंदरीत रेल्वेप्रेमींनी जरूर संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे! ...Read more

  • Rating StarShubhada Gogte

    आज मुंबईची लोकसंख्या १कोटी ८२ लाख आहे. त्यापैकी अनेकांना रोज कुठेतरी जायचं असतं. शाळेला, कामाला, देवाला, कोणाला तरी भेटायला, लांबच्या-जवळच्या प्रवासाला आणि मुंबई बघायला सुद्धा! या पैकी कोणी चालत जातं,कोणी बसनं जातं, कोणी मोटरनं जातं, कोणी विमानानं त कोणी जहाजानंसुद्धा प्रवास करतं पण यातले बहुसंख्य लोक आगगाडीनं प्रवास करतात. रोज ठराविक ठिकाणी कामाला जाणारी बहुसंख्य सामान्य माणसं तर मुंबईच्या लोकल गाडीनं,ठराविक वेळेला असणाऱ्या ठराविक लोकलनं प्रवास करतात. एव्हढंच काय, त्यांचे डबे आणि ड्ब्यातले सहप्रवासी सुद्धा ठरलेले असतात. या लोकलगाडीला मुंबईची Lifeline ,जीवनवाहिनी असं म्हणतात. लोकलशिवाय मुंबईची कल्पनाच करता येत नाही. कारण लोकलनं रोज मुंबईतली सुमारे ७५ लाख माणसे प्रवास करतात. एव्हढ्या अवाढव्य प्रमाणात प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या आगगाडीचा जन्म झाला 16 एप्रिल १८५३ रोजी. देशातलीच नव्हे तर आशिया खंडातली पहिली आगगाडी बोरीबंदर (आताचं छ्त्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ) ते ठाणे अशी धावली आणि. ही देशातलीच नव्हे तर सर्व आशियातली पहिली गाडी ठरली. यापूर्वी १८२५ साली इंग्लंडमधे प्रथम आगगाडी सुरू झाली आणि त्यानंतर देशोदेशी आगगाडी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अमेरिकेत रेल्वेमार्ग बांधले गेले आणि त्यानंतर तिसरा नंबर भारताचा लागला. आगगाडी आली तेव्हांपासून जीवनाचा वेग वाढला. जेटयुग म्हणतात त्याला खरी सुरवात तेव्हांच झाली. तेव्हां आपल्यावर इंग्लंडचं आधिराज्य होतं. हिंदुस्तानातला कच्चा माल इंग्लंडला पाठवणे आणि तिकडचा माल विक्रीसाठी हिंदुस्तानात आणणे हा रेल्वे बांधण्या मागचा सरकारचा मुख्य हेतु होता. त्यासाठी हिंदुस्तानातील बंदरं अंतर्भागाशी जोडणं आवश्यक होतं. त्यासाठी मुंबई, कलकत्ता आणि मद्रास (आता चेन्नई) या बंदरांपासून रेल्वेमार्ग टाकायचं इंग्रज सरकारनं ठरवलं. ह्या साठी खाजगी रेल्वे कंपन्यांनी पुढे यावं असा सरकारचा प्रयत्न होता. ईस्ट ईंडीया रेल्वे कंपनी, ग्रेट ईंडियन पेनिन्शुला रेल्वे आणि साउथ इंडियन रेल्वे कंपनी अशा कंपन्या स्थापनही झाल्या. पण त्यांना पुरेसं भांडवल मिळेना. हिंदुस्तानासारख्या मागास देशात रेल्वे चालवणं फायदेशीर होईल याचा अनेकांना विश्वास वाटेना आणि सामान्यांना तर बिन-बैलाची, बिन घोड्याची गाडी चालेल आणि सामान व माणसं वाहून नेईल असंच वाटेना. याबाबत लोकांना नीट माहिती देण्यासाठी म्हणून तेव्हांच्या टाऊन ‘होलमध्ये एक मोठी सार्वजनिक सभा झाली. नाना शंकरशेटांसारख्या समाजधुरीणांची भाषणंही झाली पण तरीही पुरेसा प्रतिसाद मिळेना. शेवटी सरकारनं कंपनीत पैसा गुंतवणाऱ्या भागीदारांना त्यांच्या गुंतवणकीवर ५% एवढ्या परताव्याची खात्री दिली. म्हणजे कंपनीला तोटा झाला तरी त्यांना त्यांच्या गुंतवणीकीवर ५% व्याज मिळेल याची खात्री दिली. शिवाय कंपनीला लागणारी सर्व जमीन, म्हणजे रूळ टाकण्यासाठी आणि इमारती, स्थानकं. पूल इ. साठीची सर्व जमीन सरकारनं फुकट देण्याचं कबूल केलं. त्या बद-ल्यात रेल्वेनं सरकारी टपाल फुकट वाहून न्यायचं होतं. आणि सरकारचा एक अधिकारी कंपनीच्या डायरेक्टर बोर्डावर राहणार असंही ठरलं होतं. त्यानंतर मात्र रेल्वेचं काम भराभर होऊ लागलं आणि १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातली पहिली आगगाडी धावली. थोड्याच दिवसात बोरीबंदरहून मुंबईच्या अंतर्भागात जाणाऱ्या कमी अंतराच्या गाड्याही सुरू झाल्या. मुंबईतली लोकल सुरू झाली. सुरू झाली आणि दिसामाशी वाढू लागली. १८६७ मध्ये BB&CI कंपनीनं म्हणजे बॉम्बे,बरोडा ॲड सेंट्र्ल इंडीया रेल्वे कंपनीनं चर्चगेटपासूनही लोकल लाइन्स सुरू केल्या. मुंबईत आज या दोन्ही लोकल लाइन्स सुरू आहेत. सबर्बन लाइन्स - सेंट्रल आणि वेस्टर्न, म्हणून या ओळखल्या जातात. आणि ७०-७५ लाख लोकांना रोज इच्छित स्थळी घेऊन जातात. देशाच्या इतर भागातही वेगवेगळ्या कंपन्या रूळमार्ग बांधत होत्या. अर्थात ईंग्रज सरकाच्या मदतीनं. देश स्वतंत्र झाला तेव्हां ५०० च्या आसपास संस्थानं आपल्या देशात होती. काही अगदी लहान होती तर काही मोठी होती. आपापल्या संस्थानाचा म्हणजे आपापल्या राज्याचा कारभार स्वतंत्रपणे चालवत होती, त्यापैकी काही मोठ्या संस्थानांनी स्वत:च्या रेल्वे लाइन्सही सुरू केलेल्या होत्या. उदा.- बडॊद्याची GBSR (गायकवाड्स बडॊदा स्टेट रेल्वे), जयपूरची स्टेट रेल्वे,कच्छ स्टेट रेल्वे इ. अनेक कंपन्यांना असे छोटे मार्ग चालवणं जड जात होतं. मग मोठ्या कंपन्यांनी असे मार्ग आपल्यात सामिल करून घ्यायला सुरवात केली.इंग्रज सरकारनंही अनेक कंपन्यांशी बोलणी करून त्यांना आपल्या रेल्वे-जाळ्यात सामिल करून घेतलं. १९४७ साली देश स्वतंत्र झाला तेव्हां बहुतेक सगळे मार्ग सरकारच्या मालकीचे झालेले होते. जे थोडे शिल्लक होते तेही थोड्याच काळात सरकारी बनले आणि त्या सर्वांची मिळून ’भारतीय रेल्वे’ ही एकच सरकारी रेल्वे संस्था अस्तित्वात आली. Indian Railway आज देशभरातले रेलमार्ग चालवते. “कहाणी पहिल्या आगिनगाडीची “ (Halt Station India – या राजेंद्र आकलेकर यांच्या ईंग्रजी पुस्तकाच्या) आपल्या अनुवादात रोहन टिल्लू यांनी ) पहिल्या आगगाडीची तर माहिती दिलीच आहे. त्या जोडीला मुंबईतल्या उपनगरी रेल्वेची म्हणजे लोकलचही भरपूर माहिती दिली आहे. आजमितीला मुंबईत १३६ लोकल स्थानकं आहेत. आणि त्यांवरून रोज २३४० पेक्षा अधिक लोकल गाड्या धावतात. या सगळ्या गाड्यांची आणि स्थानकांची माहिती पुस्तकात देणं शक्य नाही पण त्यातल्या काही विशेष स्थानकांची आणि त्यांच्या आसपासच्या विशेष जागांची, तिथल्या इतिहासाची माहिती त्यांनी आवर्जून दिली आहे उदा. आजच्या सी.एस.म.टी.च्या जवळच म्हणजे आधीच्या व्हिक्टोरिया टर्मिनसजवळ म्हणजेच बोरीबंदरजवळ पूर्वीचा फोर्ट जॉर्ज होता. या जॉर्ज किल्ल्यातूनच पहिल्या आगगाडीला तोफांची सलामी दिली गेली होती. आकलेकरांनी मुंबईमधल्या अनेक लोकल स्थानकांची आणि आसपासच्या भागांची अतिशय रंजक अशी महिती पुस्तकात दिलेली आहे.आणि ’इतिहासाच्या पाउलखुणा’ या शीर्षकाखाली त्या भागांची जुनी माहितीसुद्धा दिली आहे. त्यामुळे पुस्तक एखाद्या क्था-कादंबरीसारखं रोचक झालं आहे. हाँ मार्ग बांधण्याची कल्पना, तिचा पाठपुरावाअशी रंजक माहिती त्यांनी पुष्कळ दिली आहे. आकलेकर हे खरे रेल्वेप्रेमी आहेत. आणि मुंबईप्रेमीही आहेत असं त्यांचं हे पुस्तक वाचल्यावर नक्कीच वाटतं. आपली पहिली आगगाडी ज्या मार्गानं धावली तो मार्ग प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी ते त्या मार्गानं पायी चालले आहेत. अजूनही ते रेल्वेमार्गानं चालत असतात. आवश्यक त्या सर्व परवानग्या काढून. , त्यासाठी निधि उभा करणं, मार्गाचं काम सुरू असतानाच्या अडचणी, वेगवेगळ्य़ा स्थानकांचं वैशिष्ट्यपूर्ण , बांधकाम, आसपासच्या ऐतिहासिक खुणा, काही जुन्या गोष्टी, फार माहीत नसलेल्या भागांची माहिती, अशी खूप माहिती आकलेकरांनी दिली आहे. आणि ती अतिशय रंजक आहे. पण त्याला कथानक नसल्यामुळे ते विस्कळीत आहे. म्हणजे ते वाचताना अनेक छोटे छोटे भाग एकामागून एक वाचत जावं लागतं. एका भागाचा पुढच्या भागाशी संबंध असेलच असं नाही, मुंबईतल्या १३६ लोकल स्थानकांपैकी एखाद्याची माहिती वाचावयाची असली तर ती कुठे आहे ते आधी शोधून काढावं लागतं. समजा, मला “करी रोड” स्टेशनची माहिती हवी असली तर ती कुठे आहे हे आधी शोधून काढायला हवं.ते करताना मूळ विषयातला – करी रॊड मधला रस कमी होऊ शकतो. म्हणजे संपूर्ण पुस्तकात “करी रोड” हे स्थानक कुठे आहे, आहे तरी की नाही हे आधी शोधावं लागतं. लोकलच्या १३६ स्थानकांपैकी सर्वांची माहिती देणं शक्य नाही हे आपल्याला कळू शकतं .म्हणून हव्या त्या स्थानकाची, किंवा इतर विशेष काही गोष्टींची माहिती पुस्तकात कुठे सापडेल,सापडेल की नाही हे कळण्य़ाचा काहीतरी सोपा मार्ग असायला हवा. अनुक्रमणिका जर विस्तारानं दिली तर ही अडचण दूर होऊ शकेल असं मला वाटतं. प्रत्येक पुस्तकाला अनुक्रमणिका असते. तशी ती याही पुस्तकाला आहे पण ती त्या मानानं त्रोटक आहे. अनुक्रमणिका जर विस्तारानं दिली तर ही अड्चण दूर होऊ शकेल. म्हणजे मग आपल्याला हव्या त्या ’ठिकाणी’, शोधाशोध न करता पोहोचता यईल! “कहाणी पहिल्या आगीनगाडीची” असं पुस्तकाचं नाव असलं तरी त्यापेक्शा बरीच अधिक आणि रोचक माहिती पुस्तकात आहे. राजेंद्र आकलेकरांचं पुस्त्क ईंग्लिश आहे आणो रोहन टिल्लू यांनी त्याचं अगदी सफाईदार भाषांतर केलेलं आहे. ते परभाषेतून भाषांतर केलेलं आहे असं कुठेही वाटत नाही. मुखपृष्ठावरील आगगाडी अगदी झुकझुकगाडी दिसते आणि पुस्तकाला आकर्षक करते. रेल्वेविषयक माहितीचा एक खजिनाच यात आहे. यात बरीच छायाचित्रंही आहेत. त्यांपैकी बरीच काळपट आहेत. जुन्या छायाचित्रण तंत्रामुळे कदाचित तसं झालं असावं. काही चित्रं मात्र बरीच सुस्पष्ट आहेत. मुंबई बेटांचा आणि मुंबईतल्या रेल्वेचाही नकाशा पुस्तकात आहे. एकंदरीत रेल्वेप्रेमींनी जरूर संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. ...Read more

Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MI GALIB BOLTOY
MI GALIB BOLTOY by SHABBIR ROMANI Rating Star
लोकमत २५.९.२०२३

शब्बीर रोमानी हे व्यवसायाने वकील. मातृभाषा अर्थात उर्दू आणि शिक्षण मराठी माध्यमातून झालेले. २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या उर्दू पुस्तकाला, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या साहित्य अकादमी केंद्राचे पुरस्कार लाभले आहेत. आता मिर्झागालिबवरचे नवे पुस्तक, `मी गालिब बोलतोय...!` लक्ष वेधून घेत आहे. गालिबच्या एका शेरची पहिली ओळ घेऊन सांगायचे झाल्यास, जिक्र गालिबचा आणि खूबसूरत बयान लेखकाचे असे या पुरस्काराबद्दल म्हणता येईल. मिर्जा असदुल्ला खां,`गालिब` या श्रेष्ठ शायरची शायरी, त्याचे पत्रलेखन, चरित्र यावर आजवर शेकडो पुस्तक प्रसिद्ध आहेत. लेखकाने प्रस्तावनेत नमूद केल्यानुसार गालिबवर अनेक लेखकांनी लिहिले आहे. मराठी, हिंदी-उर्दू लेखकांची ते तपशील पाहून आचंबा वाटतो. शिवाय शब्बीर रोमानी यांनी इथे आपल्या लेखनाचे प्रयोजन सांगताना म्हटले आहे, कि गालिबबद्दल अनेक उलट-सुलट प्रकारच्या कहाण्या, विनोद, (कसलेही शेर गालिबच्या नावाने सांगत राहणे) प्रचलित आहेत; त्यामुळे गालिबची कथा, त्याच्या पत्रांमधल्या मनोरंजक गप्पा-गोष्टी आणि त्याच्याशी निगडित आठवणी हे सगळं साध्या सोप्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न म्हणजे हे पुस्तक. सर्वसामान्य माणसाच्या जगण्यातल्या सर्व भावछटा गालिबच्या काव्यातून दिसत असतात. पुस्तक वाचताना गालिबची प्रकृती, त्याची विनोद बुद्धी, संवेदनशील वृत्ती हे आपल्याला जाणवत राहते, आणि लेखकाची तळमळसुद्धा. या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे, मोठी प्रकरण टाळून किस्से सांगावेत अशी रचना. शिवाय लेखकाची साधी-सरळ भाषा, यामुळे शायरीची आणि गालिबबद्दलची सर्वसाधारण माहिती आणि कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हे पुस्तक रंजक वाटेल. सहसा गालिबचे गाजलेले शेर, किस्से हे आपल्या वाचनात असतात. या पुस्तकात गालिबचे अनेक दुर्मिळ शेर, शिवाय फारसी रचनाही या पुस्तकात समाविष्ट असल्याने त्याला एक संदर्भ ग्रंथाचेही स्वरूप आलेले आहे. गालिबला आंबे फार आवडायचे, `मिर्झा गालिब` या गाजलेल्या चित्रपटातला तो प्रसंग आजही लक्षात आहे. आंबे खाताना एक मित्र गालिबला तुच्छतेने म्हणतो, `आम तो गधेभी नही खाते!` त्यावर गालिबने त्वरित उत्तर देतो. `सिर्फ गधेही नाही खाते!` शब्बीर रोमानी यांनी हा प्रसंग व विनोद म्हणून सांगितला नाही, तर त्याचे तपशिलाने वर्णन तर केलेच शिवाय आंब्यावरची गालिबची मोठी गजल त्यांनी दिलेली असल्याने त्या किश्श्याला एक गांभीर्य आलेले आहे. असाच एक किस्सा, ते कलकत्त्याला असताना साध्या चिकणी-सुपारीवर गालिबला कुणी छेडले होते, यावर तुमची शायरी होऊन जाऊ द्या! असे आवाहन केले. या सुपारीच्या दिसण्या-असण्यावरच्या अफलातून शायरीची भली मोठी झलकच गालिबने पेश केली! गालिबच्या एक महत्वाचा शेर आहे. जिक्र ऊस परी-वंश का और फार बयां अपना बन गया रिकीब आखिर, था जो राजदां अपना त्या परिच्या सौंदर्याचे वर्णन आणि तेही माझ्या भाषेतून, माझ्याकडून ऐकले आणि माझा जवळचा असा मित्र आता या प्रेमाच्या नात्यात माझा प्रतिस्पर्धी झाला (आता तो तिच्यावर प्रेम करायला लागला) कलकत्त्याला गालिब दीडेएक वर्ष राहिला होता. तिथल्या धनिकांनी मुशायरे, मुजरे आयोजित केलेले असायचे, गालिबचा तिथे सन्मानही व्हायचा. गालिबने या बद्दल फार जिव्हाळ्याने लिहिले आहे. या मुशायऱ्यामध्ये गालिबचे फारसीचे काव्यवाचन ऐकून फारसी भाषेचे तज्ञ त्याच्यावर नाराज झाल्याची आठवण आहे! गालिबच्या तोंडून फारसीचे कौतुक ऐकून लोकांनी आक्षेप घेतला! गालिब हा आपल्या दुःख, विवंचनेवर हसणारा अद्भुत असा कलावंत होता. हा शेर वाचल्यावर आपल्याला मुन्शी प्रेमचंद यांच्या `पूस कि रात` मधला हलकू आठवतो! मिर्झा गालिबच्या कुतुहूल असणाऱ्या वाचकांना हा संग्रह आवडण्यासारखाच आहे. लेखनातल्या भाषिक काही त्रुटी वगळल्यास, गालिबचे किस्से, त्याची शायरी हे सगळे रोचक आहे. ...Read more

MRUTYUNJAYEE
MRUTYUNJAYEE by RATNAKAR MATKARI Rating Star
पुस्तकप्रेमी

मीना कश्यप शाह *मृत्युंजयी* भयकथा हा रत्नाकर मतकरींच्या लेखनाचा हातखंडा. मी दहावीच्या सुट्टीत असताना भयकथा वाचायला सुरुवात केली आणि त्यांनी मला पुरात झपाटून टाकलं होतं. ही पुस्तकं असायचीही सुटसुटीत जाडीची. त्यामुळे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पुस्तक लगणाऱ्या मला सगळीकडे ती घेऊन जात येत असत. क्लास मध्ये लवकर पोहोचले - वाच पुस्तक, बससाठी उभी आहे, वाच पुस्तक; झोप येत नाही, वाच (हे बहुदा चक्राकार रित्या सुरु राहायचं, झोप नाही म्हणून वाचायचं आणि वाचत असायचे म्हणून झोप नाही... त्या वयात असं सगळं चालायचं - लहानपण देगा देवा...) मृत्युंजयी सुरु केली तेव्हा आधीच खेकडा, रंगांधळा वाचून झालं होतं. अजूनही एक संपवलं होतं, पण नाव नाही आठवत (बहुतेक कबंध). त्या पार्श्वभूमीवर मृत्युंजयी फार आवडलं नाही, आणि खरं तर त्यामुळे रत्नाकर मतकरींच्या भयकथा वाचणं थांबलं. अलीकडेच हे इ-बुक मिळालं किंडल वर, पुन्हा वाचलं - आतासुद्धा शेवटच्या परिच्छेदात काय वळण मिळतं त्याची उत्सुकता होती, पण एकूणच माझा patience खूपच कमी झालाय त्यामुळे skip reading, quick reading करत पुस्तक पटकन वाचून संपलं. मृत्यू, अखेर, शेवट ही भावना प्रत्येकासाठी भीतीदायकच. त्या भीतीवर बेतलेल्या कथा ह्या संग्रहात आहेत. अतिमानवीय, फँटसी, भुताटकी अशा धक्कातंत्राचा उपयोग अनेक लेखक करतात. पण मतकरीचं वैशिष्ठय असं, की ते जळमटं सारखी कथा लिहून जातात. मृत्युंजयी मधील कथांमध्ये मृत्यूची अनेक रूपं दिसतात, कथा जिवंत माणसांच्या - पण मृत्यूची चाहूल, त्याची भीती, कधी त्याचं हवेहवेपण, कधी त्याच्याकडे आपणहून जाणे, अशा अनेक रंगढंगांनी मतकरी गूढता कायम ठेवतात. ह्या पुस्तकातील, मृत्यू अवतीभवती असलेल्या प्रत्येक कथेत, आपणा सर्वांना नक्कीच सुप्त आकर्षण वाटत असलेल्या अनेक गूढ गोष्टी येतातच... मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी करण्याची अतिमानवीय साधना... स्त्री-पुरुषातील शारीरिक आणि मानसिक ओढ... पूर्वी केलेल्या चुका आणि त्याबद्दलचा सल... जुलमाचा प्रतिशोध... अतिमानवीय शक्तींनी झपाटणे... भूतबाधा, भूतांशी गाठभेट... मृत्यूच्या अनेकविध तऱ्हा... मानसिक संतुलन ढळणे... आणि तत्सम. ह्या कथाप्रकारात महत्वाचं असतं, ते शेवटच्या काही वाक्यांमधे कथेला दिलेलं वळण आणि त्यामुळे वाचकाला बसलेला धक्का. रत्नाकर मतकरींच्या गूढकथा म्हणूनच खूप प्रभावी ठरतात. आता मात्र हे धक्का तंत्र बऱ्याच जागी पाहायला मिळतं - OTT वरच्या अनेक चित्रपट किंवा नाट्यमालांमधे हे तंत्र कथाकार वापरतात, आणि लोकांना हे पहायला खरंच खूप आवडतं, म्हणूनच त्या प्रसिद्ध होतात. अलीकडचं उदाहरण "वाळवी" चित्रपट! मृत्युंजयी मधे देखील काही कथा असा आनंद देऊन जातात. पण असं आहे ना "अति सर्वत्र वर्जयेत" - त्यामुळे बऱ्याच कथांच्या शेवटचा अंदाज लागतो आणि त्यांचा प्रभाव कमी होतो. सुरुवातीला जी गूढकथांची पुस्तकं मी वाचली, तेव्हा हे धक्कातंत्र मला नवीन होतं, त्यामुळे त्यात हा अंदाज लागत नव्हता. कदाचित मृत्युंजयी तेव्हा वाचलं आणि आताही वाचलं ते ह्या तंत्राचा अति वापर झाल्यावर वाचलं गेलं म्हणून असेल, पण कमी प्रभावी वाटलं हे खरं. अर्थात प्रत्येक गोष्टीत (सध्या इतर कथांमधे फारसे न सापडणारे) एक समान सूत्र आहे - ते म्हणजे, *वाईटाचं कधीच भलं होत नाही*. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कधीही उचलून वाचायला सुरुवात करून काही मिनिटात एक गोष्ट संपते. सध्याच्या व्यग्र काळात हे पुस्तक पुन्हा वाचायला सोपे गेले, नक्कीच. आणि मी पुन्हा एकदा ह्या कथाप्रकाराकडे आकर्षितही झाले आहे... पुन्हा सगळी गूढकथांची पुस्तकं वाचायला हवीत. ...Read more