* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: HALT STATION INDIA:THE DRAMATIC TALE OF THE NATIONS FIRST RAIL LINES
  • Availability : Available
  • Translators : ROHAN TILLU
  • ISBN : 9789353173661
  • Edition : 1
  • Publishing Year : DECEMBER 2019
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : NON-FICTION
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
HALT STATION INDIA CHRONICLES THE DRAMATIC RISE OF INDIA’S ORIGINAL RAIL NETWORK, THE ARRIVAL OF THE FIRST TRAIN, AND THE SUBSEQUENT EMERGENCE OF A PIONEERING ELECTRIC LINE—ALL IN THE PORT CITY OF BOMBAY. TRAINS THAT ONCE PROVOKED AWE AND FEAR—THEY WERE VIEWED AS FIRE CHARIOTS, SMOKE-SPEWING DEMONS—HAVE TODAY BECOME A NATION’S LIFEBLOOD. TAKING A WALK ALONG INDIA’S FIRST RAIL LINES, THE AUTHOR STUMBLES UPON FRAGMENTS OF THE PAST—A CLOCK AT VICTORIA TERMINUS THAT OFFERS A RARE VIEW OF A CITY; A CANNON NEAR MASJID BUNDER STATION THAT IS WORSHIPPED AS A GOD; A WATCHTOWER OVERLOOKING SION STATION, BELIEVED TO HAVE HOUSED A WITCH. EACH PIT-STOP COMES WITH STORIES OF DESIRE AND WAR, AMBITION AND DEATH—BY DOCKYARD ROAD STATION, FOR INSTANCE, AUTHOR LAURENCE STERNE’S BELOVED, ELIZA DRAPER, FOLLOWED A SAILOR INTO THE SEA; OR CLOSE TO PAREL STATION, THE WIFE OF INDIA’S GOVERNOR GENERAL, LORD CANNING FOUND A GARDEN RICH IN TROPICAL VEGETATION; THIS, SHE REPLICATED AT BARRACKPORE. DRAWING FROM JOURNALS, BIOGRAPHIES, NEWSPAPERS AND RAILWAY ARCHIVES—AND WITH NOSTALGIC, FIRST-TIME ACCOUNTS OF THOSE WHO TRAVELLED BY INDIA’S EARLIEST TRAINS—THE BOOK CAPTURES THE ECONOMIC AND SOCIAL REVOLUTIONS SPURRED BY THE COUNTRY’S FIRST TRAIN LINE. IN THIS, HALT STATION INDIA IS NOT JUST ABOUT THE RAILWAYS—IT IS THE STORY OF THE GROWTH OF INDIA’S BUSINESS CAPITAL AND A RARE STUDY OF A NATION.
भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे धावली. या शोधाने भारतीय जनजीवनाचा चेहरामोहरा बदलला. या पहिल्या आगीनगाडीच्या आगमनाची कहाणी अनेकानेक रोचक गोष्टींनी भरलेली आहे. . रेल्वेच्या विस्तारित जाळ्याबरोबरच अनुषंगिक प्रसंग,रेल्वे स्थानकाच्या निर्मितीचा इतिहास आणि त्या संदर्भातील छोटे उपकथानक या सर्वांचा रोचक, ऐतिहासिक वृत्तान्त या पुस्तकात समाविष्ट आहे. मुंबईतलं पहिलं वाफेचं इंजिन,आगगाडीला भुताटकी समजणारा भोळा समाज आणि त्यावेळच्या गमतीजमतींसह तत्कालीन अद्भुत व चित्ताकर्षक तपशीलवार गोष्टींमुळे त्या सोनेरी दिवसांचं चित्रच जणू डोळ्यांसमोर उभं राहातं.
INDIAN AUTHORS AWARD 2021 - HISTORY & TRAVEL
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#HALT STATION INDIA #RAJENDRA AKLEKAR #ROHAN TILLU #FIRSTINDIAN RAILWAY #MARATHITRANSLATION #ONLINEBOOKS #MUMBAILOCAL #CST #RAILWAYHISTORY #कहाणीपहिल्याआगीनगाडीची #राजेंद्रआकलेकर #रोहनटिल्लू #मुंबईरेल्वे #मराठीअनुवादितपुस्तके #
Customer Reviews
  • Rating StarSainath Chawali

    श्री राजेंद्र आकलेकर लिखित कहाणी पहिल्या आगीनगाडीची हे पुस्तक आज वाचून झालं.भारतामध्ये 16 एप्रिल 1853 रोजी 3:30वाजता बोरीबन्दर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली.धावण्यापूर्वी ही रेल्वे भारतात सुरू करण्यासाठीचा लढा,चळवळ यातील अधिकारी लोकांनी केलें प्रामाणिक काम माणसाच्या , वाचकाच्या मनाला क्षणभर विचार करायला लावत.जेम्स बर्कले ने पहिला वहिला भारतातील रेल्वे मार्ग बांधला हे आजच्या पिढीतील क्वचित लोकांना माहिती असेल.लंडनच्या किंग्ज कॉलेजमधून त्यांनी आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं.रॉबर्ट स्टीफन्सन यांच्याशी बर्कले यांची आयुष्यभर मैत्री राहिली.रॉबर्ट स्टीफन्सन हे जॉर्ज स्टीफन्सन यांचे पुत्र होते.(ज्यांनी वाफेच्या इंजिनवर चालणारी पहिली रेल्वे उभारली होती.) बर्कले साहेब 7 फेब्रुवारी1850 ला भारतात पोहचले आणि 16 एप्रिल 1853 ला रेल्वे धावली.म्हणजे अवघ्या 3 वर्षात हे सर्व काम त्यांनी केले.रेल्वे सुरू करण्याचा ब्रिटिशांचा उद्देश जरी स्वार्थी असला तरी आपल्याकडे त्यांनी सुरू करण्यापूर्वी रेल्वे नव्हती आणि त्यांनी जर आणलीच नसती तर सुरू झाली असती की नाही हा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच उत्तर नकारार्थीच असेल. ही आहे भारतातील पहिल्या रेल्वेमार्गाची कथा! आपला प्रवास मुंबईच्या दक्षिण टोकापासून म्हणजेच व्हिक्टोरिया टर्मिनसपासून सुरू होईल. या मूळ रेल्वेमार्गावर पडलेल्या अवशेषांकडे बघत,त्यांचा अर्थ लावत, त्यांची नोंद घेत तो उत्तर दिशेकडे कूच करेल. या अवशेषांपैकी काही अवशेष खूप महत्त्वाचे आहेत, काही अस्ताव्यस्त पडलेले आहेत, काही तर अगदीच क्षुल्लक आहेत; पण देशातील पहिल्यावहिल्या रेल्वेमार्गाच्या विकासाची गोष्ट सांगण्यासाठी ते अजूनही आपला श्वास टिकवून आहेत. त्या काळातल्या तंत्रज्ञानाबद्दल ते माहिती देतात. तसंच हे शहर कसं वाढलं, याचीही गोष्ट सांगतात. नेमक्या याच गोष्टीसाठी GIPR म्हणजे मध्य रेल्वे आणि BB&CI म्हणजे पश्चिम रेल्वे यांची रचना कशी झाली, हे इत्थंभूत सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. या संशोधनसाठी लेखकाने व्हिक्टोरिया टर्मिनस ते ठाणे यादरम्यान अनेकदा रेल्वेने प्रवास केला. अनेक गोष्टी धुंडाळण्यासाठी रेल्वेमार्गाच्या कडेने चालतचालत अभ्यास झाला. अर्थात त्यासाठी स्थानिक रेल्वे प्रशासनाची वेळोवेळी रीतसर परवानगी घेतली होती. भूतकाळातली रेल्वे, तिचे रूळ आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या गोष्टींचं कौतुक करताना आपण हे विसरता कामा नये की, मुंबईची ही रेल्वे किंवा भारतीय रेल्वे नेहमीच भविष्याकडे पाहत आली आहे. ...Read more

  • Rating Starडॉ. ओंकार सुमंत

    वाफेच्या इंजिनचा क्रांतिकारक शोधाने समस्त विज्ञान जगताने गरुड भरारी घेतली आणि वेगवेगळे शोध लागायला सुरुवात झाली. पारतंत्र्यात हालपेष्टा भोगणाऱ्या भारताला रेल्वे , पोष्टखात, तरायंत्र, रस्ते , वीज, अशा वेगवेगळ्या माध्यमातून विज्ञानाने आपल्या कवेत घेतलंआणि नवनवीन गोष्टी भारतात यायला सुरुवात झाली. १६ एप्रिल १८५३ रोजी भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी ३ इंजिन आणि १४ डब्यांसह बोरीबंदर ते ठाणे या ३४ किलोमीटरच्या मार्गावर धावली आणि भारताच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुवर्ण अक्षरांनी नोंदविला गेला. “ झुक झुक आगिनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी “ अशी गाणी म्हणत बालपणापासूनच रेल्वे ह्या गोष्टीच कुतुहुल आपल्या सगळ्यांच्या मनात कायम आहे. या रेल्वे कशा धावल्या , रेल्वे लाईन कुठे टाकल्या, त्या टाकताना आलेल्या अडचणी व त्यावर केलेल्या उपाययोजना अश्या अनेक गोष्टी जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर हे पुस्तक उत्तम आहे. रेल्वे इंजिन, रेल्वे पूल, भुयारी मार्ग , पादचारी मार्ग, रेल्वे मार्ग, वेगवेगळ्या स्टेशनचा तसेच त्यांच्या नावाचा इतिहास अश्या अनेक गोष्टींचा इतिहास ह्या पुस्तकात दडलेला आहे. जेम्स जॉन बर्कले हा सातासमुद्रा पार भारतात आलेले इंजिनिअर माणूस ह्याने रेल्वेलाइनची सुरुवात केली. असंख्य अडचणीवर मात करुन तसेच कठोर परिश्रम करुन ह्या माणसाने भारतातील पहिला रेल्वे मार्ग प्रस्तावित किंमतीपेक्षा २०% कमी किंमतीत उभा केला तसेच नियोजित वेळेच्या आधी देखील पूर्ण केला. ह्या सगळ्या वृत्तांत प्रस्तुत पुस्तकात लेखकाने दिलेला आहे. भारतात पिकणार कापूस हा आपल्याकडील रेल्वे जाळ विकसित करण्यासाठी कारणीभूत झाला हया विषयीची संपूर्ण माहिती आपल्याला ही पुस्तकात वाचायला मिळते. त्या काळी स्थानिक लोकांना रेल्वे हा चमत्कार होता तर रेल्वे गाडी ही देवतेप्रमाणे होती. कोणत्याही दृश्य शक्तीशिवाय वाफेच्या इंजिनवर सुरु झालेली ही रेल्वे त्या काळी अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडली आणि तिच्या विषयी अनेक कंड्या पिकल्या. पण सरळ साधा व सोप्या प्रवासाची थोड्या दिवसांनी लोकांना भुरळ पडली आणि अंधश्रद्धा मागे पडल्या. ह्याच वर्णन वाचताना गंमत वाटते. २०१६ साली “ लातूर “ या शहरात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीसाठी रेल्वेच्या माध्यमातून लातूर शहराची तहान भागवण्यात आलेली होती. ही बातमी आपण वर्तमानपत्रात वाचलेली होती. मुंबई च्या इतिहासात सुद्धा अशाप्रकारे पाणी रेल्वेने पुरवल्याचा उल्लेख आहे. ह्या पुस्तकात त्याच्या विषयी संपूर्ण माहिती वाचायला मिळते . इसवी सन १८५६ साली रेल्वेने एकूण २३ गाड्या पाण्यासाठी सोडल्या होत्या , त्याचा खर्च १०,७०० ₹ इतका आला होता अशी रेल्वे दफ्तरी नोंद देखील आहे. १७० वर्षाच्या रेल्वे चा इतिहास हा या पुस्तकाचा गाभा आहे. १७० वर्षात रेल्वे आणि रेल्वे विभागाने टाकलेली कात ह्याच पूर्ण वर्णन ह्या अनुवादित पुस्तकात आहे. २१ व्या शतकात अंतराळात बागडणारा माणूस परग्रहावरील जीवन, पर्यावरण, वातावरण ह्याचा अभ्यास करताना दिसतो. ह्या सगळ्या मध्ये दळणवळणाचे वेगवेगळे पर्याय आपण सध्या वापरतो आहे. कदाचित रस्ते , विमान, यामध्ये प्रगत देशात रेल्वे हरली असेल किंवा मागे पडली असेल पण अजूनही तग धरून आहे. तर भारता सारख्या विकसनशील देशात आपल्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी रेल्वे खस्ता खात आहे अस मला वाटत. आपल्या बहुरंगी आणि बहुढंगी देशाला जोडण्याच काम तसेच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा काम रेल्वेने केलेले आहे, करत आहे आणि तसेच करत राहील. भारतीय रेल्वेच्या जन्माची कहाणी, विकासाचे टप्पे , काळानुसार झालेले बदल ह्या सर्वांचा धावता आराखडा ह्या पुस्तकात घेतलेला आहे. ...Read more

  • Rating StarMadhav Jogdand

    Hello Everyone... एका छान पुस्तकाचा पुस्तक परिचय... कहाणी पहिल्या आगिनगाडीची... ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात सात बेटांवर भर घालून तयार झालेलं हे शहर मुंबई.. त्यानंतर 1853 ला इथेच भारतातली पहिली रेल्वे धावली मुंबई म्हणजे तत्कालीन बोरीबंदर ते ठाणे ्हणजेच सालसेत.( साष्टी) . त्या रेल्वेची ही कहाणी.... भारतात रेल्वे यायची हे कसं ठरलं कधी ठरलं त्यानंतर प्रत्यक्ष रेल्वे सुरू व्हायच्या आधी रेल्वे मार्ग कसा बांधला गेला तो बांधताना काय काय अडचणी आल्या... इथपासून ते पहिली रेल्वे कशी धावली याची माहिती आहे. त्यानंतर बोरीबंदर स्टेशन म्हणजेच आत्ताच CSTM Station हे बांधले जाताना चा इतिहास आणि त्याची माहिती... त्यानंतर लेखक अक्षरशा आपल्याला पुस्तकातूनच रेल्वे रुळावरून मुंबई पासून ते कल्याण पर्यंत घेऊन येतात येताना वाटेत येणार प्रत्येक स्टेशन प्रत्येक रेल्वे मार्ग याची माहिती आणि त्यांचा सुंदर इतिहास सांगतात.... त्यानंतर GIPR म्हणजेच आत्ताची मध्य रेल्वे आणि Harbor Railway. आणि BB &CI म्हणजे आत्ताची पश्चिम रेल्वे यांची अशीच सुंदर माहिती आहे. त्याचबरोबर बॉम्बे इम्प्रोवमेंट ट्रस्ट बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांच्या थोड्या किस्से कहाण्या... मुंबईच्या विकास कसा झाला याचा इतिहास आणि काही कथा या सुद्धा या पुस्तकात आहेत. मुंबई आणि रेल्वे यांवर ज्यांचे प्रेम आहे आणि ज्यांना जुन्या इतिहासात रस आहे त्यांनी हे पुस्तक नक्की नक्की वाचावं त्यांना खूप आवडेल.... मी हे पुस्तक माझ्या मोबाईल वरील Kindle app वर वाचलं इतक्या छान पुस्तकाची माहिती माझ्या मित्रांना मिळावी म्हणून हि पोस्ट! ...Read more

  • Rating StarSubhash Joshi

    जेमतेम सहा महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेल्या आजच्या पुस्तकालाही ‘मुंबई`चाच संदर्भ आहे. मूळ इंग्रजी पुस्तक आहे Halt Station India, लेखक राजेन्द्र आकलेकर आणि रोहन टिल्लू यांनी मूळ पुस्तकाला न्याय देणारा यथोचित अनुवाद केला आहे. भारतात आगिनगाडी सुूं करण्याचा विचार 1840 पासूनच सुरूं झाला होता आणि भारतातलीच नव्हे तर आशियातली पहिली रेल्वे गाडी 16 एप्रिल 1853 रोजी तीन इंजिन्स आणि चौदा डब्यांसह बोरीबंदर ते ठाणे या चौतीस कि.मी.च्या मार्गावर धांवली. अशी रेल्वे सुरूं करण्याच्या संकल्पनेपासून ती प्रत्यक्ष धांवेपर्यंतची सगळी प्रक्रिया अतिशय रोमांचकारक आहे. या पुस्तकासाठी लेखकाने अक्षरशः हजारो कागदपत्रांचा, संदर्भ पुस्तकांचा, देशभर फिरून दस्तावेजांचा अभ्यास केला आहे आणि या रेल्वे मार्गावरून शेकडों वेळां पायी फिरून अभ्यास केला आहे. हे पुस्तक हलकेफुलके किस्से सांगत नाही तर अनेक संदर्भ आणि पुराव्यांसकट अनेक किचकट ऐतिहासिक तपशील सांगते. त्या निमित्ताने आपल्याला ब्रिटिश राजवटीबद्दलही बरंच कांही वाचायला मिळतं. हे पुस्तक इतक्या क्लिष्ट तपशीलाने भरलं आहे कीं आपण कंटाळून बाजूला ठेवायचा विचार करतो... पण तरीही हे पुस्तक आपल्याला ते बाजूला ठेववत नाही हे विशेष. हे पुस्तक लिहिण्यासाठी लेखकाने आणि अनुवादकाने घेतलेले परिश्रम वाचूनच आपली दमछाक होते, छाती दडपते, तरीही आपण ते वाचून पुरं करतोच. एक पराकोटीचा रोमहर्षक संदर्भग्रंथ असं मी त्याचं वर्णन करीन. - सुभाष जोशी, ठाणे ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

MAHARUDRA
MAHARUDRA by G.B. DESHMUKH Rating Star
डॉ. जयंत वडतकर.अमरावती

मेळघाटचा एन्सायक्लोपिडीया असलेले निवृत्त वनाधिकारी श्री. रविंद्र वानखडे यांच्या अनुभवांवर आधारित कुलामामाच्या देशात हे पुस्तक वाचले तेव्हापासून या पुस्तकाचे लेखक श्री. जी. बी. देशमुख यांना भेटण्याची इच्छा होती. इच्छाशक्ती असली की योग जुळून येतो असं महणतात. रविंद्र वानखडे सरांच्या माध्यमातूनच तो योग जुळून आला. माझ्या एक पुस्तकाचे प्रकाशन बाबत वानखडे सरांशी चर्चा करीत असताना त्यांनी लेखकाचा संदर्भ दिला व जी.बी. ना भेटून घ्या असे सांगितले. भेट घडून आली. अगदी सहज, घरगुती भेट झाली, गप्पा रंगल्या. यावेळी जी. बी. देशमुख यांनी त्यांचे पहिले पुस्तक महारुद्र मला भेट दिले. आमच्या चर्चेतून आणि आंतरराष्ट्रीय फुटबॉल मथला मराठमोळा झंझावात महारुद्र, हे या पुस्तकाचे शीर्षक वाचून पुस्तकाचा विषय थोडक्यात समजला. लेखकाचे वडील भीमराव देशमुख यांनी फुटबॉलपटू म्हणून गाजविलेल्या कारकीदींचा आढावा या पुस्तकात होता. एका मुलाने आपल्या वडिलांवर लिहिलेले पुस्तक कसे असेल? असा प्रश्न अन पुस्तक, दोन्ही घेऊन घरी आलो. भेट मिळालेले पुस्तक वेळ मिळाला तसे एका बैठकीत वाचून काढले. आता गल्ली गल्लीत जसं क्रिकेट खेळल्या व बघितले जाते तसं स्वातंत्र्य पुर्व काळात वऱ्हाडात फुटबॉल खेळला जात असे. गावागावांत टीम असायच्या, सामने अर्थात स्पर्धा भरवल्या जात असत. स्वातंत्र्यपूर्व काळात अशाच रुपयांमधून चमकत, वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील एका खेळाडूने थेट मुंबईतील फुटबॉल क्लब व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मुसंडी मारत आपल्या खेळाचा व व्यक्तीमत्त्वाचा ठसा उमटविला होता. तो काळ होता १९३० ते १९५० चा. त्या वल्लीचे नाव होतं भिमराव देशमुख. जी. बी. देशमुख यांनी त्यांच्या वडिलांवर लिहिलेले महारुद्र पुस्तक काही फक्त भिमराव देशमुख यांची जीवन चरित्र नाही. स्वातंत्र्य मिळण्याच्या साधारण वीस वर्षा पुर्वी ३० ते ५० च्या दशकात आपल्या देशातील खेळाची स्थिती कशी होती. विशेषतः वऱ्हाडाच्या ग्रामीण भागातील स्थिती कशी होती. कुठले खेळ खेळले जात असत. स्पर्धा कशा भरवल्या जात असत. शाळा आणि शिक्षण कसं होतं. आर्थिक स्थिती कशी होती. अमरावती जिल्ह्यातील कोणत्या गावात फुटबॉलच्या नावाजलेल्या टीम होत्या. अमरावती कशी होती याची माहिती सुद्धा या पुस्तकातून वाचायला मिळते. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणात भीमराव यांचे व्यक्तिमत्व कसं होतं हे सांगण्यासाठी लेखकाने बाबा म्हणून जरी त्यांची ओळख करून दिली असली तरी पुढील सर्व प्रकरणातून त्यांनी भीमराव अशा एकेरी उल्लेखातून हे व्यक्तिमत्व साकारले आहे. वऱ्हाडातल्या आपल्या सवयीनुसार प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या एका नामवंत फुटबॉलपटूची कारकीर्द व फुटबॉल पश्चात कौटुंबिक कारकीर्द तटस्तपणे मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत हे आधीच सांगून टाकतो. अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील फुटबॉलच्या टीम मध्ये भीमराव देशमुख यांची कारकीर्द सुरु झाली. ती १९३० सालापासून त्यावेळी ते जेमतेम विशीत होते. प्रथम शालेय स्पर्धापासून पुढे क्लब स्पर्धा पासून भीमरावने आपल्या खेळाचा ठसा उमटविला हळूहळू ख्याती विदर्भांत पोहोचली, भीमराव यांचा खेळ बघण्यासाठी लोक खास वेळ काढून येऊ लागेल, १९३८-३९ मध्ये विदर्भात झालेल्या काही स्पर्धात मुबंईच्या काही टीम सहभागी झाल्या होत्या, त्यामुळे नावाजलेल्या ब्रिटीश खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळाली. मुंबईच्या इंग्रजांच्या टीमला वऱ्हाडातील भीमराव यांच्या टीमने हरविले. वायएमसिए, मुंबईच्या अलेक्झांडर नावाच्या कप्तानाने भीमरावच्या खेळाने प्रभावित होऊन खारतळेगावच्या चार खेळाडूंना मुंबईच्या टीम कडून खेळण्याचे निमंत्रण दिले. १९४० ला भीमराव सह चार खेळाडू मुंबईत पोहोचले. अलेक्झांडरने त्यांना सराव शिबिरीत घातले. पुढील वर्षात भीमराव वायएमसिए टीम कडून खेळण्यासाठी करारबद्ध झाले. जशा आयपीएल मध्ये आज वेगवेगळ्या टीम खेळतात तसे त्यावेळी मुंबईत फुटबॉलचे क्लब होते. पुढील १० वर्षे अनेक टीम कडून खेळत अनेक स्पर्धा गाजविल्या. भीमराव यांचेवर तेव्हाच्या इंग्रजी वृत्तपत्रांतून रकाने छापले जाऊ लागले. मुंबईतील आपल्या १२ वर्षाच्या कार्यकाळात क्लब स्पर्धामधून त्यांनी ४०० सामने खेळले, तब्बल २५० गोल मारलेत. भीमराव वेगवेगळ्या स्पर्धामधून खेळत मैदान गाजवत होते. त्यातूनच १९४८ च्या ऑलम्पिक स्पर्धेच्या टीम मध्ये निवड झाली मात्र एका सराव सामन्यात पाय फॅक्चर झाल्याने देशाकडून खेळण्याची संधी हुकली. पुढील वर्षात भीमराव हे भारतीय टीम सोबत मलेशिया, कंबोडिया, इंडोनेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, हाँगकाँग, थायलंड अशा देशात खेळले, या दौऱ्यातील २० पैकी १९ सामने जिंकले. भीमराव आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू झाले होते. इतके खेळून भीमराव यांचेकडे आर्थिक नियोजन नसल्याने परिस्थिती जेमतेमच होती. अशातच १९५१ साली त्यांनी निवृत्ती घेतली. अमरावती मध्ये परत आल्यावर त्यांनी आपला संसार थाटला, आर्थिक पाठबळ नसल्याने फुटकळ व्यवसाय केले. मात्र मी कधीकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू होते याचा कधी उल्लेख सुद्धा केला नाही, प्रसिद्धी पासून ते कायमच दूर राहिले. या काळात भीमराव यांच्या पत्नी अंजीरा यांनी जबाबदारीनं संसार सांभाळला. मुलांना मोठे केले. भीमराव शेवटपर्यंत मेहनत करीत राहिले. समाजात चांगले स्थान निर्माण केले. मात्र ते इतके मोठे फुटबॉलपटू होते ते अमरावतीकरांना काही माहिती झाले नाही. भीमराव यांच्या निधनानंतर या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचे कार्य पुढील पिढीला माहित व्हावे या उद्देशाने जी. बी. देशमुख यांनी या पुस्तकातून आपल्या तीर्थरुपांचे भावचित्र अगदी सोप्या सरळ भाषेत शब्दबद्ध करून महारुद्र च्या रूपाने वाचकांसमोर ठेवले. या लिखाणासाठी त्यांनी मुंबईत जाऊन त्या काळातील टाईम्स वृत्तपत्रांतील भीमराव यांचा उल्लेख असलेली कात्रणे मिळविली, त्यांच्या समवेत खेळलेल्या खेळाडूंना व पत्रकारांना भेटले, अमरावती मधील त्यांच्या समवयस्क परिचितांकडून त्यांची माहिती गोळा केली. त्यासाठी त्यांनी अथक अशी मेहनत घेतली. व २००५ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. या पुस्तकाच्या पुढील आवृत्ती मेहता प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केल्याने ते पुस्तक महाराष्ट्रभर पोहोचले. या निमित्त्याने भीमराव यांचे कार्य, त्यांचा फुटबॉल खेळातील झंझावात मराठी माणसाला माहिती झाला. अमरावतीकर या नात्याने मला तर आपल्या मातीतील माणूस त्या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर झेंडा गाडून आल्याचा अभिमान वाटला. अशा अनेक अर्थाने महारुद्र महत्वाचे आहे. ...Read more

HATUMUTUCHA CHANDRA
HATUMUTUCHA CHANDRA by FARUK KAZI Rating Star
सलिल तांबे

ज्यांना गोष्टींची आवड आहे अशा मुलांसाठी ही मेजवानी आहेच, पण आपल्या पाल्यांमध्ये संवेदनशीलता आणि निसर्गाप्रती आदर जोपासण्यासाठी मोठ्यांनीही हे पुस्तक वाचायला हवे. प्रदूषणाविरुद्ध लहान हातांनी दिलेला लढा असो किंवा निसर्गाचा खरा आनंद पिशवीत भरून आणण्यापक्षा मनात कसा साठवावा, हे सांगणारा दृष्टिकोन असो; हे पुस्तक प्रत्येक वाचकाला समृद्ध करते. पुस्तकातील प्रत्येक कथा संपताना आपल्याला जगण्याकडे बघण्याची एक नवी दृष्टी देऊन जाते. यातलं काही गूढ, काही थरार आणि खूप सारे हळवे प्रसंग अनुभवण्यासाठी तुम्हाला हे पुस्तक स्वतः वाचायलाच हवं. म्हणूनच, आपल्या संग्रही असावा असा हा `हाटूमुटूचा चंद्र` तुम्ही एकदा नक्की अनुभवा! चला तर मग, आपणही शोधूया आपला स्वतःचा ‘हाटूमुटूचा चंद्र’! ...Read more