* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Availability : Available
  • ISBN : 9789395477260
  • Edition : 2
  • Publishing Year : DECEMBER 2003
  • Weight : 225.00 gms
  • Pages : 188
  • Language : MARATHI
  • Category : NON-FICTION
  • Available in Combos :LAXMAN MANE COMBO SET - 13 BOOKS
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THIS IS A COLLECTION OF SELECTED SPEECHES OF LAXMAN MANE IN THE LEGISLATIVE COUNCIL. SOME ISSUES RELATED TO NOMADIC CASTES-TRIBES, RESERVATIONS, COMMUNALISM, ASHRAM SCHOOLS, CONSTITUTION OF INDIA, HEALTH, NAME CHANGE, BUREAUCRACY, INDUSTRY, BABRI MASJID, EMPLOYMENT, DEVDASI, MARATHI AS OFFICIAL LANGUAGE, WOMEN ETC. ARE COVERED THROUGH HIS SPEECHES. HE THROWS LIGHT ON EXPLOITATION OF NOMADIC TRIBES BY THE SOCIETY AND THEIR NEGLECT BY THE GOVERNMENT. BESIDES THIS, HE ELABORATES ON THE CORRUPTION INVOLVED IN VARIOUS WELFARE SCHEMES FOR THEM. READERS ARE EXPOSED TO THE MISTAKES MADE IN CLASSIFYING THESE PEOPLE AND THE RESULTING CONFUSION, THE DELIBERATE ALIENATION OF THESE PEOPLE FROM EDUCATION, THE LAWS REGARDING CRIMINAL TRIBES AND THE HARDSHIPS IT CAUSES TO THESE TRIBES; THE MEAGER FINANCIAL BENEFITS THEY GET ALONG WITH THE POOR STATE OF ASHRAM SCHOOLS AND THE INDIFFERENCE OF THE GOVERNMENT TOWARDS THEM. HE HAS PRIMARILY DRAWN ATTENTION TO THE TROUBLES FACED BY NOMADIC CASTES AND TRIBES, DISREGARD BY UPPER CASTE SOCIETY AND POSSIBLE SOLUTIONS FOR THEIR PROGRESS IN THIS BOOK.
लक्ष्मण माने यांच्या विधान परिषदेतील निवडक भाषणांचा हा संग्रह आहे. भटक्या-विमुक्त जाती-जमाती, राखीव जागा, जातीयवाद, आश्रमशाळा, घटना (संविधान), आरोग्य, नामांतर, नोकरशाही, उद्योग, बाबरी मशीद, रोजगार, देवदासी, राजभाषा मराठी, स्त्रिया इ. विषयांना त्यांनी या भाषणांतून स्पर्श केला आहे. भटक्या-विमुक्तांचं समाजाकडून झालेलं शोषण, सरकारनेही त्यांच्याकडे केलेलं दुर्लक्ष, त्यांच्यासाठी काही योजना सुरू केल्या तरी त्यात होणारा भ्रष्टाचार, या लोकांची वर्गवारी करताना झालेल्या चुका आणि त्यामुळे होणारा गोंधळ, शिक्षणापासून या लोकांची जाणीवपूर्वक केलेली फारकत, गुन्हेगार जमातींविषयीचे कायदे आणि त्याचा या जमातींना होणारा त्रास, त्यांना मिळणार्या तुटपुंज्या आर्थिक सवलती, आश्रमशाळांची दुरवस्था आणि त्यांच्या बाबतीतली सरकारची उदासीनता...एकूणच भटक्या-विमुक्त जाती-जमातींच्या समस्या, सवर्णांकडून, समाजाकडून त्यांची झालेली उपेक्षा आणि त्यांच्या उद्धारासाठी काय करता येईल, याविषयीच्या उपाययोजना याकडे त्यांनी प्राधान्याने लक्ष वेधलं आहे.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके #मराठीप्रकाशक #मेहतापब्लिशिंगहाऊस #भटक्याचं भारूड #MARATHIBOOKS #ONLINEMARATHIBOOKS #MEHTAPUBLISHINGHOUSE #BHATKYACHE BHARUD #MANE LAXMAN
Customer Reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

RUCHIRA BHAG -1
RUCHIRA BHAG -1 by KAMALABAI OGALE Rating Star
संजीव_वेलणकर

*आज २० एप्रिल* *आज दोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणाऱ्या #कमलाबाई_ओगले यांचा स्मृतिदिन.* जन्म. १६ सप्टेंबर १९१३ सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे. कमलाबाई ओगले या माहेरच्या गोदूताई अनंत दांडेकर. त्याचा विवाह सांगलीतील कृष्णाजी ओगले यांच्याशी झाला. कमलााई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. कुठलाही प्रकाशक, या नाव नसलेल्या कमलाबाई ओगले यांचे हे पुस्तक स्विकारावयास तयार होईना काही प्रकाशकांनी तर बाईंकडेच प्रकाशनासाठी पैसे मागितले. पण या पुस्तकाच्या गुणवत्तेवर आणि उपयुक्ततेवर १०० % विश्वास असणार्‍या ओगल्यांनी धीर न सोडता त्यांचे आणि मुकुंदराव किर्लोस्करांचे स्नेही श्री. भिडे यांच्या मार्फत मुकुंदराव किर्लोस्कर यांना गाठले आणि पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव ठेवला. वृत्तीने पूर्णत: व्यावसायिक असणार्‍या मुकुंदरावांनी फायदा होणार नाही म्हणून हे पुस्तक स्वीकारण्यास नकारच दिला होता पण भिडे यांनी पटवल्यावर आणि तोटा झालाच तर तो सोसण्याची तयारी ओगल्यांनी दाखवल्यावर मुकुंदराव तयार झाले . किर्लोस्कर समूहाने ‘ स्त्री सखी प्रकाशन ‘ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली आणि पहिलेच पुस्तक म्हणून ‘ रुचिरा ‘ चे प्रकाशन केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली. केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. रुचिरा - भाग १ ने अभूतपूर्व यश मिळवले. वास्तविक रुचिराचे जे हस्तलिखित प्रथम तयार केले होते त्यात १०५० पदार्थकृतींचा समावेश होता. परंतु पुस्तक फार मोठे होईल व किंमतीलाही भारी होईल म्हणून त्यातले ३५० पदार्थ कमी करून रुचिरा प्रसिद्ध केले. या बाजूला काढलेल्या ३५० पदार्थांमध्ये अजून काही नवीन पदार्थांची भर घालून रुचिरा - भाग २, सन १९८५ मध्ये प्रसिद्ध केला आहे. कमलाबाई आपल्या मुलांकडे ऑस्ट्रेलियाला गेल्या असताना तेथेही ह्यांना नवनवीन पदार्थांचे प्रयोग केले. ऑस्ट्रेलियन सुगरणींकडून तेथील पदार्थांची माहिती करून घेतली व त्या पदार्थांना भारतीय चव देऊन रुचिराच्या पद्धतीनुसार वाटी चमच्याच्या प्रमाणात तयार केले. त्यामुळे रुचिरा - भाग २ मध्ये अनेक नाविन्यपूर्ण पदार्थांची रेलचेल आहे. स्वीडीश ऍपल पुडींग, स्वीस फिंगर्स, मटी ब्रिझल्स, ब्लॅक फॉरेस्ट केक, चीज मिरची भात, शानसाक, हुसेनी कबाब करी, ब्राऊन स्ट्यू अशा नावांनीच तोंडाला पाणी सुटावे. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता. या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता.. कमलाबाई ओगले यांचे २० एप्रिल १९९९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे कमलाबाई ओगले यांना आदरांजली. ...Read more