* Front & back cover images are for illustration purposes only and the price of book is sold separately.
  • Original Book Title: A BIOGRAPHY OF SWAMI VIVEKANAND
  • Availability : Available
  • Translators : MADHAV MORDEKAR
  • ISBN : 9788177664898
  • Edition : 11
  • Publishing Year : SEPTEMBER 2004
  • Weight : 0.00 gms
  • Pages : 260
  • Language : Translated From ENGLISH to MARATHI
  • Category : BIOGRAPHY
Quantity
Buying Options:
  • Ebooks:
  • Print Books:
THE VERY MENTION OF HIS NAME TAKES US TO DIVINE, AUGUST, LOFTY HEIGHTS. A CLOSE OBSERVATION OF HIS LIFE BRINGS US MORE CLOSE TO THE INDIAN CULTURE, ITS MORAL ABODE, ITS LIFE SYSTEM. HIS MESSAGE OF FORBEARANCE IS THE REAL PRESENTATION OF HIS KNOWLEDGE AND WIT. THIS QUALITY MAKES HIM THE IDEAL AND EXEMPLARY SPEAKER OF OUR NATION. HE HAD TARGETED HIMSELF AT COLLECTING A GROUP OF `SANYASI` FOR THE BETTERMENT OF THE COMMON PEOPLE AROUND AND MAINLY FOR THE DOWNTRODDEN. THIS INSIGHT PROVES HIS BEING AS THE PROPHET. IN TODAY`S LIFE ALSO HIS TEACHINGS PROVE THEIR TRUTHFULNESS. TODAY, THE POLITICAL, SOCIAL AND ECONOMICAL ENVIRONMENT OF INDIA IS BECOME VERY UNCLEAR AND FILTHY; THE RELIGIOUS INTOLERANCE HAS REACHED THE EXTREME LEVELS, PEOPLE HAVE LOST THEIR SENSE OF MIND. THIS MAKES ME FEEL THAT SWAMI VIVEKANANDA SHOULD TAKE REBIRTH AND BRING THE FILTHY WORLD OUT OF THIS CHAOS.
स्वामी विवेकानंद या नावाचा केवळ उच्चारच आपल्याला एका उदात्त, उत्तुंग आणि उन्मनी अवस्थेत घेऊन जातो. त्यांच्या जीवनाचा वेध घेणे म्हणजे भारतीय संस्कृती, तिचे नैतिक अधिष्ठान, तिची जीवनमूल्यपध्दती यांचा अभ्यासच आहे. त्यांनी दिलेला सहिष्णुतेचा संदेश ख-याखु-या ज्ञानाचा आविष्काराचा आहे. त्यामुळे स्वामीजी या देशाचा एक आदर्श, अनुकरणीय प्रवक्तेच टरतात. त्याशिवाय, आपल्या सभोवतालच्या तळागाळातील जनसामान्यांच्या कल्याणासाटी संन्याशांचा संप्रदाय निर्माण करण्याचे जे व्रत त्यांनी घेतले त्यामुळे स्वामी विवेकानंद एक महान प्रेषित व असाधारण लोकाग्रणी टरतात. आजघडीला तर त्यांच्या शिकवणुकीतील यथार्थता बावनकशी सोन्यासारखी वाटते. आज भारतातील राजकीय, सामाजिक व आर्थिक वातावरण इतके गलिच्छ व गढूळ झालेले आहे, धार्मिक असहिष्णुता आणि माथेफिरुपणा इतक्या टोकाला आहे की ‘यदा यदा हि धर्मस्य..’ या भगवद्गीतेतील वचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदासारख्या महापुरुषाने पुन्हा एकदा भारतात अवतार घेऊन आपल्या देशाला-नव्हे संपूर्ण जगाला या वाढत्या प्रक्षोभातून सुखरुप बाहेर आणावे असे उगीचच वाटत राहते.
Video not available
No Records Found
No Records Found
Keywords
#मराठीपुस्तके#मराठीप्रकाशक #MARATHIBOOKS#ONLINEMARATHIBOOKS#TRANSLATEDMARATHIBOOKS#TBC#TRANSLATEDBOOKS@50% #TRANSLATEDFROMENGLISHTOMARATHI #BIOGRAPHY #MADHAVMORDEKAR #A BIOGRAPHY OF SWAMI VIVEKANAND #आधुनिक भारताचे प्रेषित : स्वामी विवेकानंद #माधव मोर्डेकर #GAUTAM GHOSH
Customer Reviews
  • Rating StarDesaiprasad Desai (FB)

    एक वेळ वाचून बगाच

  • Rating StarYogesh Joshi Degloorkar (FB)

    A pratim pustak

  • Rating StarNEWSPAPER REVIEW

    चैतन्यमयी चरित्र... या सनातन हिंदुस्थानात तीन माणसं केवळ पाच मिनिटांसाठीदेखील एकत्र येऊन एखादं कार्य पार पाडत नाहीत. प्रत्येकाची धाप-धडपड सत्ता संपादनासाठी. केवळ पोटासाठी भूक शमत नाही म्हणून ती खिश्चन धर्माकडे आकर्षित होतात असा विचार करू नका. त्यांन (दीनदुबळे, दरिद्री, खालच्या जातीत जन्माला आलेले लोक इत्यादी) तुमच्याकडून (हिंदूकडून) सहानुभूती, प्रेम, दयामाया लाभत नाही म्हणून ते धर्मांतर करतात. हे मौलिक विचार आहेत स्वामी विवेकानंदांचे शंभरेएक वर्षांपूर्वी त्यांनी विविध ठिकाणी मांडलेले हे विचार आजच्या समस्त हिंदुस्थानींना विशेषत: राजकारण्यांना लागू पडतात. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असं म्हणणाऱ्या आणि धर्मांतराचं राजकारण करणाऱ्या मंडळींनाही स्वामींनी धर्मांतराबद्दल व्यक्त केलेले विचार आजही तंतोतंत लागू पडतात. कट्टर हिंदू धर्माभिमानी असलेल्या द्रष्ट्या स्वामी विवेकानंदांनी आपल्या अमोघ, विद्वत्ताप्रचुर अभ्यासू भाषणाने शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत छाप पाडली. सर्वांची मनं जिंकली. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेले स्वामी ४ जुलै १९०४ रोजी सदेह वैकुंठास गेले. उणेपुरे ३९ वर्ष आयुष्य लाभलेल्या या प्रेषितावर, त्यांच्या विचारांवर अनेक भाषांत पुस्तकं प्रकाशित झाली आहेत असं हे प्रेरणादायी चैतन्यमय चरित्र गौतम घोष यांनी इंग्रजीज लिहिलेलं पुस्तक The Prophet of Modern India : A Biography of Swami Vivekanand प्रकाशित झालं होतं. या सर्वांगसुंदर पुस्तकाचा अनुवाद केला आहे माधव मोर्डेकर यांनी ‘आधुनिक हिंदुस्थानचे प्रेषित स्वामी विवेकानंद’ पुस्तक मेहता पब्लिशिंग हाऊसने नुकतंच प्रकाशित केलं आहे. एकूण १२ प्रकरणांतून लेखकाने स्वामीचं चरित्र उलगडून दाखवलं आहे. बालपणीचा नरेंद्र कसा हुड होता. अत्यंत तल्लखबुद्धी, चौकसपणा, चिकित्सक वृत्तीच्या तरुणाचं बालपण, त्याच्या घराण्याची परंपरा-रूढी कथन करून लेखकाने गुरू श्री रामकृष्ण परमहंस योग्य शिष्याच्या शोधात (म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या) होते. स्वामींना देवाचं दर्शन हवं होतं. ती त्यांची इच्छा श्री परमहंस यांनी कशी पूर्ण केली याचं बहारदार वर्णन लेखकाने केलं आहे. स्वामींना दिव्यत्वाची प्रचीती आणि त्याची पायाभरणी केव्हा झाली हे वाचनीय आहे. श्री रामकृष्ण परमहंसांसारखा योगी पुरुष सद्गुरुच्या रूपाने भेटल्यावर नरेंद्रचा स्वामी विवेकानंद कसा झाला याचं मनोज्ञ चित्रण यात रेखाटलं आहे. बौद्ध हा हिंदू धर्माचाच एक भाग. या दोन्ही धर्मांच्या परस्परावरील संबंधावर भाष्य करताना स्वामींनी खिश्चन-यहुदी धर्माची तुलना त्यांच्यातील संबंधाशी केली आणि विचारवंतांना सडेतोड उत्तर दिलं. कर्म, भक्ती, राग इत्यादी योगाची महती स्वामींनी पाश्चिमात्त्यांना पटवून दिली. वेद आणि वेदांत या दोघांचं सार म्हणजे सामर्थ्य, स्वामी म्हणत, ‘हिंदूनी आपल्या धर्माचा त्याग बिलकूल करू नये.’ अंधश्रद्धेवर स्वामींनी कडाडून टीका केली. देश-परदेशातील या भटकंतीत स्वामींना भेटलेल्या व्यक्ती, ठिकाण त्या ठिकाणी त्यांनी मांडलेले मौलिक विचार इत्यादीचा सचित्र समावेश यात आहे. स्वामीच्या घराण्यातील थोर पुरुष, त्यांचे सद्गुरू, त्यांची पत्नी, शारदा माता, स्वामींचे गुरुबंधू यांच्या जीवनाचा वेध घेऊन लेखकाने परदेशात भेटलेल्या भगिनी निवेदिता आणि अन्य पाश्चिमात्य शिष्यांचा परिचय करून दिला आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यामागील उद्देश,कन्याकुमारीला स्वामींनी केलेली तपश्चर्या इत्यादींचा अनोखा मागोवा यामागील उद्देश, याचं सुंदर चित्रण यात केलं आहे. शेवटच्या प्रकरणात लेखकाने स्वामींचा शेवटचा प्रवास वर्णन करताना त्यांनी व्यक्त केलेले विचार, त्यावेळची त्यांची शांत वृत्ती या साऱ्या घटनांची नोंद समस्त वाचकांना करून दिली आहे. दिव्य दूरदृष्टी लाभलेल्या या प्रेषित योगी पुरुषाची सचित्र चरित्रात दुर्मिळ अप्रकाशित अशी छायाचित्रे आहेत. स्वामींचे विविध वस्त्रांतील, विविध मूड दर्शविणारी छायाचित्रे पाहणे हा एक आनंद योग म्हणावा लागेल. हे चरित्र वाचताना हे अनुवादित चरित्र आहे हे अजिबात जाणवत नाही. एवढा सुंदर अनुवाद मोर्डेकरांनी केला आहे. सर्वार्थाने उत्कृष्ट निर्मितीमूल्य लाभलेल्या या ग्रंथाचं देखणं मुखपृष्ठ केलं आहे चंद्रमोहन कुलकर्णी यांनी आज हिंदुस्थानात सर्व स्तरांवरील वातावरण गढूळ, गलिच्छ झालं आहे. अल्पसंख्याकांची वाढती लोकसंख्या, त्यांची वाढती धार्मिकता, माथेफिरूपणा, उपद्रवता, हिंदूची असहायता यात बहुसंख्याक भरडले जात आहेत. बहुसंख्याक हिंदूना पुन्हा मानाने जगवण्यासाठी हा सनातन देश सामर्थ्यशाली, बलशाली व्हावा यासाठी ‘यदा यदा हि धर्मस्य...’ या गीतावचनाप्रमाणे स्वामी विवेकानंदांसारख्या द्रष्टा योगी, प्रेषित महापुरुषाने अवतार घ्यावा. अक्षय प्रेरणादायी, चैतन्यमयी स्वामीचं चरित्र सर्वांनीच विशेषत: सर्वधर्मसमभावाची फुकाची पाठराखण करणाऱ्या विचारवंतांनी जरूर अभ्यासावं. -नंदकुमार रोपळेकर ...Read more

  • Rating StarDAINIK PUDHARI 29-08-2004

    असामान्य बुद्धिमत्ता... नवजात अर्भकाची सर्वसाधारण ठेवण पाहून दत्त कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. त्याच्याकडे पाहिले की, त्याच्या आजोबांची दुर्गाप्रसादांची आठवण चटकन यावी. त्याचा तोंडावळा बहुतांशी आजोबांच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता होता. त्या आजोबांनी आपल्ा जीवितकालात अचानक संन्यस्त जीवनाचा स्वीकार करून लौकिकाकडे पाठ फिरवलेली होती. या बालाकाच्या रूपाने त्या संन्यस्त जीवाने पुन्हा एकदा या जगात प्रवेश तर नसेल केला, असा एक विचार त्या सर्वांना कळत न कळत चाटून गेला. पहा, काही का असेना घरात वंशचा दिवा तर प्रज्वलित झाला ना! बस्स. नेहमीप्रमाणे मुलाचे नाव काय ठेवायचे याचा खल सुरू झाला. भरपूर घुसळण झाली. काहींनी सुचवले, ‘आजोबांच्या वळणावर गेला म्हणता तर त्यांचेच नाव... दुर्गाप्रसाद ठेवा ना!’ मात्र, मातोश्री भुवनेश्वरीदेवींनी सुचवले, ‘लक्षात घ्या, माझा छकुला साक्षात श्री वीरेश्वराचा प्रसाद आहे त्यामुळे त्याचे नाव ‘वीरेश्वर’ च ठेवायचे. दुसरा विचार नको...! भुवनेश्वरांच्या या सुचनेशी प्रत्येकजण सहमत झाला. अर्थात, आणखी एका रिवाजाप्रमाणे पाळण्यातले नाव पाळण्यातच राहिले. सारेजण त्याला ‘बिल्ले’ या संक्षिप्त नावानेच पुकारू लागले. पुढे त्यातही बदल झाला. कुटुंबातील इतर नावांना शोभा देईल असे आणखी एक नाव पुढे आले... नरेन्द्रनाथ! पुढे त्यातही सोयीप्रमाणे काटछाट होऊन ‘नरेन’ हे नाव जवळच्या लोकांच्या तोंडात बसले. छोटा नरेन स्वभावताच व्रात्य होता. खूपच खट्याळ, खोडकर. इतरांनी दाखवलेली आमिषे, घातलेला धाक आदींना तो बिलकूल बघत नसे. सतत काहीतरी गडबड, धांगडधिंगा, आरडाओरडा चालूच असायचा. गप्प बसणे, उगी राहणे त्याच्या स्वभावातच नव्हते. शेवटी, भुवनेश्वरींनी त्यावर एक इलाज शोधला. नरेनला चूप करायचे झाल्यास त्याच्या डोक्यावर गार पाण्याची धार धरायची आणि धारेबरोबरच ‘शव, शिव’ असा जप करायचा. कधी कधी धाकही घालायचा. ‘सरळ वागला नाहीस ना तर शिवशंकर तुला कैलास पर्वतावर पाऊलही टाकू द्यायचे नाहीत... लक्षात ठेव!’ आणि काय चमत्कार! बिल्ले पुन्हा सुतासारखा सरळ व्हायचा. तितकाच तरतरीत, उल्हसित. थोडक्यात, असा एखादा रागाचा झटका आला, चिडाचीड झाली की आई लगेच म्हणायची, ‘काय नशीब बघा! मुलगा व्हावा, मुलगा व्हावा म्हणून मी शिवशंकरांचे पाय धरले आणि भोलेनाथांनी माझ्या पदरात घातला हा दैत्य! त्यांच्या सेवकांपैकी एक!’ अर्थात, असे स्फोट हे वरकरणीचे होते, प्रत्येक घरात ते होतातच. तेवढा भाग सोडला तर नरेन एक तल्लख, बुद्धिमान, गोड आणि प्रेमळ बालक होता. कोणाकडेही दुडदुडू धावत जावे, त्याच्या मांडीवर खुशाल बसावे ही त्याची रीत होती. सगळ्यावर अगदी बिनधोक विश्वास ठेवणाऱ्या मुलांपैकी तो एक होता. लहान मुलाला भोवतालचे विश्व म्हणजे एक सततचे विस्मयकारी प्रकरणच असते. आपल्या लुकलुकत्या डोळ्यांनी जगाकडे पाहत क्षणोक्षणी आनंद लुटण्याचा तो एक काळ असतो. बाल नरेन तो आनंद मनमुराद घेत असे. आपल्या दोनही ज्येष्ठ भगिनींची सतत कुरापत काढण्याची त्याला हौस होती. त्या बिचाऱ्या त्याला पुरून उरत नसत. त्याने अनेक प्राणी पाळलेले होते. त्यांच्याशी खेळणे त्याला आवडत होते. त्यातल्या त्यात घरातल्या गायीवर त्याचे भलते प्रेम होते. त्याच्या बहिणी त्या गायीला गोमाता किंवा भगवती मानून तिची पूजा करत. घरातल्या नोकरचाकरात त्याला अधिक प्रिय होता त्याचा टांगेवाला. त्याच्याकडे तो मित्र आणि दैवत म्हणूनच पाहत असे. त्या मोतद्दारचे ते दिमाखदार पागोटे, त्याचा तो किनखापी, भरजरी गणवेश आणि त्याच्या हातातील तो रुबाबदार चाबूक याची त्याला पडलेली बालसुलभ भुरळ वेगळीच होती. लहान मुलांच्या कल्पनाविलासात अशा एखाद्या व्यक्तीला फार मोठे स्थान असते. त्यात ते पूर्णपणे रमलेली असतात. छोटा नरेन त्याला अपवाद नव्हता. फिरस्त्या साधू-संन्याशांचे नरेनला असलेले आकर्षण अद्भुत होते. तसा एखादा साधू वा पवित्र व्यक्ती दत्तांच्या राजवाड्यासारख्या निवासाच्या दारात अली रे आली की नरेश आनंदित होऊन हर्षभरे तिच्याकडे धाव घ्यायचा. एके दिवशी असाच एक साधू आला- ‘ॐ भिक्षांदेहि’... पुकारत! आता त्याला द्यायला नरेनजवळ काय असणार? फक्त कमरेला गुंडाळलेले नक्षीदार नेसू! तसे म्हटले तर त्याच्या ते धोतर आवडीची वस्तू होती कारण ते धोतर म्हणजे त्याची बाल्यावस्था संपल्याची खूणच होती शिवाय हे त्याचे पहिलेवहिले नेसू होते आणि तरीही त्याने मागचापुढचा कसलाही विचार न करता ते तात्काळ फेडून त्या साधूच्या हातावर ठेवलेदेखील. साधूला काय! त्याने ते गुंडाळलेले डोक्याला, नरेनला तोंडभर आशीर्वाद दिला व गेला निघून! नरेनच्या वडिलांना विश्वनाथ दत्तांना... आपले वडील साधू बनून घरातून निघून गेल्याची आठवण चांगलीच होती. ते स्वत: जरी उदार असले, साधूसंतांचा भरपूर आदर व आतिथ्य करणारे असले तरी त्या घटनेनंतर त्यांनी नरेनवर बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली. तेथून पुढे एखादा ‘साधू’ घरात आला तर नरेनची रवानगी थेट कडीकुलूपात. तो साधू निघून गेल्यानंतरच सुटका पण त्यामुळे नरेश बिलकुल विचलित होत नव्हता. दारात आलेल्या भिक्षुकाकडे खोलीच्या खिडकीतून हाताला लागेल ती वस्तू त्याच्या दिशेने फेकायचा. मातेची मांडी हीच कोणत्याही बालकाची पहिलीवहिली शाळा. आपल्या नवसाने झालेल्या पुत्राला उत्तम शिक्षण देण्यास माता भुवनेश्वरीदेवी उत्सुकच होत्या. मातेच्या मुखातून नरेनच्या कानावर हिंदूंच्या देव-देवतांच्या वैभवशाली कहाण्या तर पडल्याच पण त्याचबरोबर त्याला भारतीय ऋषिमुनींची आणि त्यांच्या पूर्वजांच्या महानतेचीही माहिती मिळाली त्याशिवाय भारतीय महाकाव्यातील कथाही त्याने भरपूर ऐकल्या. रोज दुपारी माताजी त्याला रामायण व महाभारतातील मजकूर वाचून दाखवत. नरेनचे त्या वाचनाकडे अगदी बारीक, सावध व एकचित्त लक्ष असे. आपल्या मातोश्रींच्या आईकडूनही त्याला पुष्कळ गोष्टी शिकायला मिळाल्या. आजीच्या मातोश्री वैष्णवीपंथी असल्यामुळे त्यांना भगवद्गीता व वैष्णवी लोकगीते व कथा यांची शिकवण मिळालेली होती. दत्त परिवाराच्या प्रसादात अनेक फिरत्या गायकांची झुंबड उडत असे. नरेनच्या मातोश्री त्यांचे जाणीवपूर्वक आगत-स्वागत करत, त्यांच्याकडून भक्तिगीते व गीतमय पुराणकथा गाऊन घेत. त्या मागचा उद्देश एकच होता, बालवयातच नरेनला भक्तिमार्गाची गोडी लागावी. पेशाने ती माणसे भिक्षेकरी असली तरी त्यांच्या गायनातील तन्मयता, सौंदर्य प्रभावशाली होते. त्यात श्रोत्यांच्या धार्मिक भावना उद्दीपित करण्याची ताकछ होती परिणामी त्या भावना अधिक दृढ होत असतं. नरेनच्या आईनेच त्याला बंगाली मुळाक्षरांची ओळख करून दिली. त्याला जोडूनच प्यारीचरण सरकार यांचे ‘द फर्स्ट बुक ऑफ इंग्लिश’ ही त्याच्या हातात ठेवले. जगातील नानाविध, चित्रविचित्र परिस्थितीशी झगडताना आपले नैतिक आचारण कसे शुद्ध ठेवावे आणि प्रसंगी त्यातून निभावून जाण्यासाठी ईश्वराच्या चरणीच कसा आधार शोधावा- माणसाच्या आयुष्यातला सर्वांत खात्रीचा तारणहार परमेश्वरच असतो, हे नरेन आपल्या आईकडूनच शिकला. त्या त्याला नेहमी म्हणायच्या, बाळ, संपूर्ण आयुष्यात सतत निष्कलंक, निर्मळ राहा, आपला स्वत:चा सन्मान, प्रतिष्ठा यांचे जीवापाड रक्षण कर आणि त्याचबरोबर दुसऱ्याची मानहानी करू नको, मर्यादा ओलांडू नको, चित्तवृत्ती स्थिर कशी राहील याची दक्षता घे. हां, मात्र गरज पडेल तेव्हा छातीवर दगड ठेवायलाही हयगय करू नकोस...! आपल्या संपूर्ण आयुष्यात नरेंद्रनाथांनी आईवर अंत:करणपूर्वक प्रेम केले. ते म्हणत, ‘जो कोणी आपल्या आईची अक्षरश: पूजा करत नाही तो कदापिही महान बनू शकणार नाही...’त्यांच्या झंझावाती आयुष्यात आलेल्या अ‍ेनक प्रसंगी त्यांनी मोठ्या अभिमानाने बोलून दाखवलेले आहे. -‘माझ्या ज्ञानाला लाभलेल्या फुलोऱ्याचे, त्याला आलेल्या बहराचे संपूर्ण श्रेय माझ्या मातेचे आहे. मी तिचा परमऋणी आहे...!’ दररोज रात्री निद्रावश होण्यापूर्वी नरेनला एकच विलक्षण दृश्य दिसत होते. झोपण्यासाठी बिछान्यावर पडल्यानंतर डोळे मिटायचा अवकाश ते दृश्य आकार घ्यायचे. ‘त्याच्या भुवयांच्या मध्यभागी एक विलक्षरण शोभायमान असा प्रकाशाचा ठिपका उमटे. हळूहळू त्याचे रंग बदलत, तो पसरत पसरत सर्व शरीर व्यापून टाके. संपूर्ण शरीर त्या विस्फुटित प्रकाशात न्हाऊन निघे. जिकडे-तिकडे स्फटिकशुभ्र तेजाचा पूर लोटे. त्याचे मन या चमत्कारात गढून जात असतानाच त्याचे शरीर निद्राधीन होई. विशेष म्हणजे प्रतिदिनी त्या प्रकाराची पुनरावृत्ती होत होत. त्याने विचार केला की, असा एखादा चमत्कार म्हणजे एक परिपूर्ण नैसर्गिक स्थितीच आहे. प्रत्येकाच्या वाट्याला ती येत असावी आणि म्हणून त्याने त्याची वाच्यता बरेच दिवस कोणाकडेही केली नाही. मात्र, एकदा त्याने आपल्या शाळासोबत्याला विचारले, ‘काय रे, जेव्हा तुला झोप येते तेव्हा तुझ्या भुवयांच्या मध्यभागात तुला कसला तरी प्रकाश दिसतो का?’ मित्राने उत्तर दिले- ‘नाही बाबा! तसले काही नाही दिसत!’ नरेनने त्याला सांगितले, ‘मला तसा प्रकाश दररोज दिसतो. तू देखील आठवून बघ. प्रयत्न कर तसा. बिछान्यावर पडल्या पडल्या झोपून जाऊ नकोस. काही क्षण तरी अगदी सावध रहा. पूर्ण जागा राहा. पूर्ण जागा राहा. तुलाही तो दिसेल. नक्कीच!’ पुढे नंतरच्या काळात नेमका तोच प्रश्न खुद्द नरेनला विचारणारा कोणीतरी त्याला भेटणार होता. ‘नरेन, माझ्या लेकरा, जेव्हा तू निद्रानाश होऊ पाहतोस तेवहा तुला प्रकाशकिरण दिसतात का रे?’ तो प्रश्नकर्ता होता त्याचे आध्यात्मिक गुरू श्री रामकृष्ण! आयुष्याच्या अंतापर्यंत तो साक्षात्कार नरेनच्या सोबतीला राहिला. जरी आयुष्याच्या उत्तरार्धात वारंवार तसे घडत नसले किंवा त्याची तीव्रता लक्षणीय नसली तरी ती सोबत चालूच राहिली. अशा तर्हेची एखादी घटना हे नक्कीच सांगून जाते की, संबंधित व्यक्तीला एक महान आध्यात्मिक वारसा लाभलेला असून तिच्या आत्म्याने स्वत:ला ईश्वराच्या चिंतानात खोल गाडून घेण्याची शिकवण इतकी उत्तम आत्मसात केलेली होती की, त्याची ध्यानावस्था म्हणजे एक उत्स्फूर्त सहाजावस्थाच मानावी. ...Read more

  • Read more reviews
Write Your Own Review
  • Default typing language is Marathi. To type in English press Ctrl+G key combination
Submit Review
PLEASE SEND YOUR AUDIO REVIEW ON editorial@mehtapublishinghouse.com

Related Books

People Who Bought This Item Also Bought

Latest Reviews

ANUWADATUN ANUSARJANAKADE
ANUWADATUN ANUSARJANAKADE by LEENA SOHONI Rating Star
कौशिक लेले

पुस्तक – अनुवादातून अनुसर्जनाकडे (Anuwadatun Anusarjanakade) लेखिका – लीना सोहोनी (Leena Sohoni) भाषा – मराठी पाने – २३९ प्रकाशन – मेहता पब्लिशिंग हाऊस. फेब २०२४ छापील किंमत – रु. ३७०/- ISBN – 9789357205337 ह्या परिचयाची माझी वेबसाईट लिंक htps://learnmarathiwithkaushik.com/courses/anuwadatun-anusarjanakade/ मराठी पुस्तकांमध्ये सध्या इतर भाषांतून अनुवादित झालेली पुस्तके सुद्धा मोठ्या संख्येने दिसतात. एखादा सरस अनुवाद वाचताना आपल्या डोक्यात सुद्धा आपल्या आवडीच्या परभाषेतल्या पुस्तकांची यादी तयार होते. ही पुस्तकं सुद्धा मराठीत आली तर काय मजा येईल असं वाटतं. भाषा हा ज्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे त्यांची इच्छा एक पुढचं पाऊल टाकेल. आपणही स्वतः असा अनुवाद केला तर ? आपल्यालाही दोन्ही भाषा चांगल्या येत आहेत मग अनुवाद का करू नये ? हे पिल्लू डोक्यात शिरेलच. असा अनुवाद करायचा स्वतः काही प्रयत्न केला की लक्षात येईल की हे किती किचकट काम आहे. चांगला अनुवाद करायचा असेल तर सराव लागेल. अभ्यास लागेल. त्याची काही तंत्र मंत्र शिकून घ्यावी लागतील. एखाद्या चांगल्या जाणकार व्यक्तीचं, अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शनही मिळायला हवं. जर तुमच्याही मनात अशा भावना आल्या असतील तर लीना सोहोनी यांचं “अनुवादाकडून अनुसर्जनाकडे” हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल. लीना सोहोनी हे नाव मराठीत अनुवादिका म्हणून प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनुवाद केलेली पन्नासच्यावर पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा अनुभव व अधिकार वेगळा सांगायला नको. त्यांचे हे पुस्तक "अनुवादातून अनुसर्जनाकडे" पुस्तकाचा पहिला भागात लीना सोनी यांनी आपल्या अनुवादाच्या प्रवासाचं सिंहावलोकन केलं आहे. त्यांनी अनुवादाची सुरुवात कशी केली, त्यात प्रगती कशी झाली हे लिहिलं आहे. अनुवादामुळे प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर, सुधा मूर्ती, किरण बेदी यांच्याशी जुळलेले संबंध आणि त्यांच्या भेटीची वर्णनं आहेत. ह्या प्रवासात “मेहता पब्लिशिंग हाऊस” या प्रकाशन संस्थेचा भरभक्कम पाठिंबा त्यांना मिळाला. सुनील मेहता आणि अनिल मेहता यांच्याबरोबरच्या आठवणी सुद्धा पुस्तकात आहेत. पुढच्या भागात अनुवाद या विषयाची एखाद्या शास्त्रीय शोधनिबंधाप्रमाणे माहिती दिलेली आहे. यात अनुवाद प्रक्रियेकडे अतिशय बारकाईने बघितलं आहे. ढोबळमानाने बघितलं तर, अनुवाद म्हणजे तर एका भाषेतल्या शब्दांच्या ऐवजी दुसऱ्या भाषेतले शब्द वापरणे. पण प्रत्येक वेळी एका शब्दाच्या बदल्यात दुसरा भाषेतला एक शब्द असं होतंच असं नाही. त्यामुळे काही वेळा शब्दाची फोड करून दाखवावी लागते. तर काही वेळा मूळ मोठं वाक्य लहान होऊ शकतं. कदाचित तिथे पूर्णपणे वेगळीच शब्दयोजना वाक्यरचना होऊ शकते. या प्रत्येक प्रकाराला एक विशिष्ट शास्त्रीय नाव (पारिभाषिक संज्ञा) आहे हे आपल्याला पुस्तक वाचून कळतं. जे शब्दांच्या बाबतीत तेच वाक्यांच्या बाबतीत. मूळ भाषेतल्या शब्दांसाठी नवीन शब्द वापरून वाक्य तयार झालं तरी ते वाचकाला सहज वाटलं पाहिजे. नाहीतर आपण लगेच म्हणू, “अनुवाद खूप बोजड झाला आहे; ठोकळेबाज झाला आहे”. हे टाळायचं तर वाक्यरचना सुद्धा सुधारायला पाहिजे. याची उदाहरणे पुस्तकात दिली आहेत आणि त्या अनुषंगाने पारिभाषिक संज्ञा (terminology) काय आहे हे मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिलं आहे. शब्द, वाक्य ह्यांना लावलेल्या कसोटीचा विस्तार करून ती कसोटी “संकल्पनां”ना लावायला पाहिजे. एखाद्या भाषेत, एखाद्या समाजात असणाऱ्या संकल्पना, प्रथा-परंपरा मराठी भाषेत नसतील तर अनुवाद करताना ते जसंच्या तसं ठेवायचं का तिथे काही वेगळी संकल्पना वापरायची ? का तळ टीप देऊन स्पष्टीकरण द्यायचं? असे एकाच गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. हा मुद्दा आपण सोदाहरण स्पष्ट केला आहे. हा ऊहापोह वाचल्यासार अनुवादासाठी दोन्ही भाषांवर आपली किती चांगली पकड पाहिजे हे वाचकाच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जे पुस्तक आपण वाचतोय त्याची पार्श्वभूमी, त्यातल्या प्रसंगाची सामाजिक पार्श्वभूमी, आणि लेखकाला काय ध्वनीत करायचे आहे हे सगळं समजणं सुद्धा किती महत्त्वाचं हे लक्षात येईल. म्हणजे अनुवाद प्रक्रिया दिसताना शब्दांची दिसली तरी “शब्दांच्या पलीकडले” अनुवादकाला पकडता आले तरच मूळ कृतीला न्याय मिळेल. हे या पुस्तकाच्या वाचनातून अधोरेखित होतं. पुस्तकाचा प्रकारानुसार अनुवादकासमोर असणारी आव्हाने सुद्धा बदलतात. कथा-कादंबरीचा अनुवाद वेगळा तर कवितेचा अनुवाद वेगळा. कारण कवितेमध्ये भावभावनांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व शब्द, लय, शब्दचमत्कृती यांनाही आहे. म्हणूनच तर ते पद्य आहे गद्य नाही. लीनाजींनी ह्याचाही परामर्श घेतला आहे. नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने अजून वेगळी. परिणामकारक संवाद, नेपथ्य, पात्रांची देहबोली, त्याचा प्रेक्षकांवर होणारा परिणाम या सगळ्याचा विचार करून अनुवाद करावा लागतो. म्हणूनच, अनुवाद म्हणजे प्रत्येक वेळी “शंभर टक्के पुस्तक जसेच्या तसे” असं नसतं. तर काही वेळा ते रूपांतर ठरतं. काही वेळा तो स्वैर अनुवाद ठरतो. तर काही वेळा मूळ कलाकृतीवर आधारित नवीन कलाकृती ठरते. हे सुद्धा कितीतरी उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडित आहेत त्यामुळे पुस्तकात बऱ्याच वेळा मुद्द्यांची पुनरावृत्ती झाली आहे असं मला वाटलं. ती पुनरुक्ती टाळून कदाचित थोडी पानं कमी करता आली असती. पण मुद्दा वाचकाच्या मनावर ठसावा, कुठलंही विशिष्ट प्रकरण वाचायला घेतले तरी ते त्या मुद्द्यापुरतं पूर्ण असावं हा त्यामागचा हेतू असेल. पुस्तकात पुढे अनुवादकांना नोकरी, व्यवसायाच्या काय संधी आहेत; कुठल्या संस्था याबद्दलचं शिक्षण देतात; कुठले कोर्सेस उपलब्ध आहेत याबद्दलचा तपशील आहे. अनुवाद करायला सुरुवात करायची असेल तर मजकूरनिवड, प्रकाशकांशी संपर्क, परवानगी ह्याचे मार्गदर्शन आहे. त्यांनतर शाळेत आपण जे प्राथमिक व्याकरण शिकतो; म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद, ॲक्टिव-पॅसिव्ह व्हॉइस, वेगवेगळे काळ इत्यादींच्या व्याख्या देऊन सगळ्याची उजळणी केली आहे. ज्याला अनुवाद क्षेत्रात उतरायचे आहे त्याला व्याकरणाचा अजून बराच अभ्यास करावा लागणारच आहे. आणि पुस्तकाचा उद्देश व्याकरण शिकवणं नाही तर अनुवादकासाठी व्याकरण अत्यावश्यक आहे हे ठसवणं आहे. त्यामुळे व्याकरणाचा भाग पुस्तकात नसता तरी चालला असता असं मला वाटलं. पुस्तकातील काही पाने वर दिलेल्या लिंकवर शेअर केली आहेत. म्हणजे तुम्हाला पुस्तकाची, लेखनशैलीची अजून चांगली कल्पना येईल. त्यात पुढील मुद्द्यांबद्दलची पाने आहेत १) अनुवादिका म्हणून येणारे कटुगोड अनुभव. २) प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर ह्यांच्या पुस्तकांचा मराठी अनुवाद लीनाजींनी केला आहे. त्यातून जेफ्री आर्चर ह्यांच्याशी भेटीगाठी झाल्या त्यातला एक प्रसंग. ३) अनुवादाचे वर्गीकरण/प्रकार सांगणाऱ्या प्रकरणातली दोन पाने. अनुवाद प्रक्रियेची किती बारकाईने तांत्रिक चिकित्सा केली आहे हे लक्षात येईल. ४) नाटकाचा अनुवाद करताना येणारी आव्हाने ह्याबद्दलच्या प्रकरणातली दोन पाने. लीना सोहोनींचे आत्मकथन असणारा पुस्तकाचा पहिला भाग सर्व वाचकांना वाचायला आवडेलच. पुस्तकाचा दुसरा भाग तांत्रिक आहे. तो सर्वसामान्य वाचकाला वाचायला आवडेलच असं नाही. पण तो वाचल्यावर अनुवादक म्हणून काम करताना किती कटकटी असतात, काय व्यवधानं सांभाळावी लागतात हे वाचकाच्या लक्षात येईल. त्यातून अनुवादकांकडे व त्यांच्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून कौतुकाचा आणि कृतज्ञतेचा होईल हे निश्चित. ज्यांना अनुवाद करायचा आहे, या क्षेत्रात शिरायचं आहे किंवा तशी उमेदवारी सुरू झाली आहे त्यांना हा भाग मार्गदर्शक ठरेल. जाण वाढवेल हे नक्की. त्यामुळे या पुस्तकाच्या वाचनातून अनुवादाचा किडा काही वाचकांच्या डोक्यात गेला आणि त्यातून नवे अनुवादक मराठीत निर्माण झाले तर ते सोन्याहून पिवळे ! मराठीत कथा,कादंबऱ्या, चरित्र, सामाजिक विषयांची चर्चा ह्या पद्धतीचे लेखन भरपूर होत असतं. पण ह्या पुस्तकाप्रमाणे शास्त्रीय/तांत्रिक चिकित्सा करणारी, गंभीरपणे शिकवणारी पुस्तकं कमी दिसतात. ती प्रकाशित झाली तरी ती क्रमिक पाठ्यपुस्तक किंवा “अभ्यासाचे पुस्तक” या प्रकारात ढकलली जातात आणि दुर्लक्षित होतात. पण या पुस्तकाच्या लेखिका आणि प्रकाशक यांनी हे पुस्तक मुख्यधारेतल्या पुस्तकाप्रमाणे सादर केलं आहे. त्यातून हे पुस्तक जास्त वाचलं जाईल; जास्त लोकांना विचार प्रवृत्त करेल असं मला वाटतं. अशा प्रकारची पुस्तकं मराठीत प्रकाशित होणे हे मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी मोठे योगदान आहे. त्याबद्दल प्रकाशक आणि लेखिका दोघांचेही एक मराठी भाषा प्रेमी म्हणून मी मनापासून आभार मानतो. —————————— मी दिलेली पुस्तक श्रेणी —————————— अनुवाद करणारे असाल किंवा करायची इच्छा असेल तर आवा ( आवर्जून वाचा ) इतरांनी जवा ( जमल्यास वाचा ) ——————————— आवा ( आवर्जून वाचा ) जवा ( जमल्यास वाचा ) वाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक ) नावाठी ( नाही वाचलं तरी ठीक ) ...Read more

OMKARACHI REKH JANA
OMKARACHI REKH JANA by MANJUSHRI GOKHALE Rating Star
सौ. जस्मिन जोगळेकर

आमच्या पुस्तकप्रेमी समुहावरचा एकही दिवसाचा खंड न पडता सलग 1730 वा पुस्तक परिचय पुस्तक प्रेमी समूह,पुस्तक परिचय अभियान: एकही दिवस खंड पडू न देता पुस्तकांचा परिचय हे पुस्तकप्रेमी समूहाचे यश ! पुस्तक सत्र:- ३ सप्ताह क्रमांक:- २४८ पुस्तक क्रमांक: १७३० दिनांक: १०/०३/२०२५ पुस्तकाचे नांव:- ओंकाराची रेख जना लेखक:- मंजुश्री गोखले पहिली आवृत्ती: फेब्रुवारी २०१२ पृष्ठ संख्या : ३०८ मूल्य: रु. ३२० प्रकाशन: मेहता पब्लिशिंग हाऊस परिचयकर्ती: सौ. जस्मिन जोगळेकर एखाद्या गोष्टीसाठी वेळ यावी लागते म्हणतात, तसं काहीसं झालं माझं. खरंतर पुस्तक वाचनाच्या बाबतीत असं व्हायला नको होतं पण झालं. `हे खूप सुंदर पुस्तक आहे, तुम्ही वाचाच` म्हणून एक पुस्तक आमच्या हाती आलं. अर्थात ज्यांनी सांगितलं त्यांनी त्यांच्या संग्रहातलं पुस्तक दिलं होतं. तसं बरेच दिवस होतं आमच्याकडे. नवऱ्याने वाचून खूपच सुंदर आहे, वाच नक्की सांगितलं देखील मला. पण पुस्तक परत द्यायची वेळ आली तरी वाचलं गेलं नाही. तरी ते नाव डोक्यात फिट बसलं होतं. अखेर एक दिवस ते एकच पुस्तक नव्हे तर त्याच लेखिकेची चार पुस्तकं विकतच घेऊन आले आणि मग ती वेळ आली…. त्या पुस्तकाच्या, पुस्तकातील भाषेच्या आणि त्या लेखिकेच्या प्रेमात पडण्याची. पुस्तक होतं…मंजुश्री गोखले यांनी संत जनाबाईंवर लिहिलेलं `ओंकाराची रेख जना`. `विठू माझा लेकुरवाळा`, `धरिला पंढरीचा चोर` अशा अभंग रचनेतून जनाबाई आपल्या ओळखीच्या आहेत. किंवा विठूराया त्यांना हर कामात मदत करत असतो वगैरे माहीत आहे. पण त्यांचं संपूर्ण चरित्र सगळ्यांना माहीत असेलच असं नाही. ते माहीत करून देण्याचं सुरेख काम या कादंबरीने केलं आहे. जनाबाईंच्या जन्मापूर्वीची आणि नंतरचीही त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती, छोट्या जनाला मागे ठेऊन दुखण्याने तिला सोडून गेलेली तिची आई, त्यानंतरची बिकट वेळ याचं वर्णन वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. पुढेही काही प्रसंग असे आहेत…भागाबाईचं वागणं असेल किंवा सुळावर चढवायचा प्रसंग असेल… डोळ्यात पाणी येतच राहतं. पण एवढं होऊनही त्यांची पंढरीरायावरची भक्ती मात्र गाढ होती. जनाईसुध्दा त्याला पाहायला आतुर होती. सोसले चटके l पोटी नाही घास l विठ्ठलाची आस l जनाईला ll भेटीसाठी त्याच्या l गोळा तनमन l धाडे आवतान l विठूराया ll अखेर विठुरायाकडून आमंत्रण आल्यावर बापलेक पंढरीची वाट चालू लागतात. काळया देवाला पाहायला आसुसलेली जना आणि लेकीला कायमचं परक्या घरी सोडून यायचं या विचाराने जडावलेला दमा… नशिबाची रेख l भिवरेच्या काठी l विठूराया ओढी l जनाईची ll दोघांचा प्रवास विठ्ठलाच्या विश्वासावर सुरू होतो. पुढं जनाईला दामाशेटींच्या घरी सोडून देणं, त्या घराने जनाला आपलंच म्हणणं, नामदेवांसोबत तिचं मोठं होणं अशा कितीतरी प्रसंगांनी सुखावून जायला होतं. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, जनाचं अतिशूद्र असणं आणि त्यातून स्त्री असणं…त्यासाठी तिला झेलावे लागणारे त्रास, संत म्हणून मोठेपण मिळाल्यावरही त्यांच्यावर आलेला चोरीचा आळ… त्रास होतो वाचताना. जनाची आणि विठ्ठलाची पहिली भेट आणि तिथून त्यांच्यात दृढ होत जाणारे नाते…वाचताना शहारून जायला होतं. जना ते संत जनाबाई हा प्रवास, त्यात जनाबाईंनी रचलेले अभंग, ज्ञानदेवादि भावंडांचा सहवास आणि मुख्य म्हणजे नामदेव आणि जनाबाई यांचे नाते… गुरू शिष्य ऐसी l जोडी कौतुकाची l जनी नामयाची l संतांमधे ll याबद्दल पुस्तकात आलेले उल्लेख मन लावून वाचण्यासारखे आहेत. विठ्ठलाच्या चरणी झालेला जनाबाईंच्या जीवनाचा शेवट म्हणजे तर 🙏 वृंदा कोमेजली l स्तब्ध वारा पाणी l ओघळले मणी l मंजिऱ्यांचे ll थरारली वीट l कंप राऊळाला l श्वास ओलावला l क्षणभर ll आज नाही घाई l विठोबाला काही l जनाईच येई l चरणाशी ll शांता शेळके यांनी अनुवाद केलेलं `चौघीजणी` जसं मनात कायमचं घर करुन बसलं आहे, त्या जोडीला आता `ओंकाराची रेख जना` हे ही अत्यंत आवडीचं झालं आहे. यापूर्वी संत साहित्य किंवा संतांवर लिहिलेलं साहित्य फारसं वाचलं नव्हतं. लताजी किंवा भीमसेनजींमुळे घराघरात पोहोचलेले अभंग तेवढे माहीत होते. त्यामुळं जनाबाईंवर लिहिलेल्या या पुस्तकाबाबत उत्सुकता होतीच. पहिल्या प्रकरणाच्या अगदी पहिल्या ओळीपासून या पुस्तकाशी जी बांधली गेले ते शेवटपर्यंत. पुस्तकातील सगळं वर्णन अगदी बारीक सारीक तपशील देऊन पुढं जात राहतं आणि त्यात आपल्याला गुंतवून ठेवतं. सुरुवातीची काही प्रकरणं तर डोळ्यात अश्रुंच्या धारा घेऊन, पुसट अक्षरं समोर ठेऊन वाचावी लागतात. प्रसंग सगळे l तपशिलासवे l डोळ्यात आसवे l वाचुनिया ll भाषा ही साजिरी l सत्य हेच वाटे l प्रसंग तो घडे l आसपास ll एकूणच पुस्तकातलं वर्णन इतकं जिवंत आहे की सगळे प्रसंग आपल्या आसपास घडताहेत असंच वाटत राहतं कायम. दमा - कुरुंडचं दुर्दैवी आयुष्य, पोटी मूल नसल्याचं त्यांचं दुःख, विठ्ठलाला त्यासाठी साकडं घालण्यासाठी त्यांनी केलेला पंढरपूरचा प्रवास असो किंवा जनाबाईंच्या खोलीत येऊन विठ्ठलाने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा, त्यांना कामात केलेली मदत…. सगळे अगदी सगळे प्रसंग आपणच जगतोय असं वाटावेत इतके मनाला भिडून जातात. काही ठिकाणं तर अशी… `अरे विठ्ठला, गडबडीत भलतंच काय उचलतोस. तुझा रत्नहार आणि शेला तर घेऊन जा`...असं आपणच विठ्ठलाला हाक मारून सांगावं असं वाटायला लागतं वाचताना. भाषा, वर्णनशैली फार साजिरी आहे. पुस्तकातला `साजिरी` हा शब्द एकदम आवडून गेलाय. एखादा चेहरा पाहिल्यावर कसं आपल्याला कळून जातं ना की, ही व्यक्ती मायाळू आहे किंवा तुसडी आहे वगैरे…तसं पुस्तकाच्या सुरुवातीलाच यातल्या भाषेबद्दल आपुलकी, प्रेम वाटायला लागतं. भाषा साधी पण सुंदर, शब्दांचा वापर असा की यापेक्षा वेगळा शब्द इथं शोभला नसता असं वाटायला लागेल असा. अनवाणी पायाला चटके बसावेत इतकं हवामान अजून बदललं नव्हतं…यासाठी `अजून मातीने माया सोडली नव्हती`... किती सुरेख वाक्य आहे ना! अशी कितीतरी वाक्य आपल्याला त्यांच्या प्रेमात पाडायला लावणारी यात सापडतील. एकूणच सांगायचं झालं तर पुस्तक अप्रतिम आणि सगळ्यांनी आवर्जून वाचावं असंच आहे. एकाच लेखकाची पुस्तकं सलग एका मागोमाग एक अशी माझ्याकडून वाचली जात नाहीत. पण आता खुणावतंय ते… `जोहार मायबाप जोहार`. ...Read more